(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • इतर टोळभैरवांचे काय ?

    अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या इशार्‍यानंतर राज्यातील काही बेकायदेशीर टोलनाक्यांना स्थगिती देण्यात आली. पण, या कारवाईनंतरही काही प्रश्न कायम राहतात. ते कोणी विचारतही नाही आणि विचारलेच तर समाधानकारक उत्तर मिळत नाही अशी परिस्थिती आहे. असा प्रकार केवळ टोलनाक्यांबाबतच नव्हे तर अन्य ठिकाणीही सुरू आहे. अशा चुकीच्या प्रघाताबद्दल सरकार गांभीर्याने पावले उचलू इच्छिते का हा खरा प्रश्न आहे.

  • ओबामांचे प्रमाणपत्र (वात्रटिका)

    आम्ही म्हणतो,महासत्ता व्हायचे आहे;

    ते म्हणाले,महासत्ता बनला आहे.

    त्यांच्या या धूर्तपणातला

    मतलब आम्ही जाणला आहे.

  • भ..भू .. भूत भूत ! (नशायात्रा – भाग ७)

    प्लान ठरला आणि आम्ही सर्व आसपास लपलो फक्त होळी जळत होती आणि होळीजवळ तो प्राण ची नक्कल करणारा उताणा अंगावर कांबळे घेऊन पडला होता सुधाकर येण्याची चाहूल लागली तसे शिटी वाजवून इशारा दिला आणि तो मुलगा हळूच उठून उभा राहिला इकडे सुधाकरची बोबडी वळलेली , भ ..भू .भूत असे म्हणत तो पळत सुटला…

  • लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण

    लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे आज म्हणजे १० डिसेंबर या दिवशी निधन झाले.
    सुलोचना शामराव चव्हाण म्हणजेच सुलोचना चव्हाण यांचा जन्म १३ मार्च १९३३ रोजी मुबंईत झाला. त्यांचे लग्नापूर्वीचे नाव सुलोचना महादेव कदम असे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण मराठी चौथी पर्यंत झाले. वत्सलाबाई कुमठेकर यांनी गायलेली " सांभाळ गं, सांभाळ गं, सांभाळ दौलत लाखाची " ही लावणी सुलोचना चव्हाण लहानपणी वारंवार गुणगुणत असत आणि त्यासाठी आईकडून त्यांनी भरपूर ओरडाही खाल्ला होता. कारण मुलींनी लावणी ऐकू नये, गाऊ नये असे त्यांच्या आईला वाटायचे . मुंबईतील एका चाळीत त्यांचे बालपण गेले. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्या गायला लागल्या. त्यावेळेस मुंबईत अनेक मेळे होते. सुलोचना चव्हाण यांच्या घरचाच एक मेळा होता "श्रीकृष्ण बाळमेळा". याच मेळ्यात त्यांच्यासोबत अभिनेत्री संध्या यांनीसुद्धा काम केले होते. या श्रीकृष्ण बाळमेळ्याच्या माध्यमातून सुलोचना चव्हाण यांचे कलाक्षेत्रात पहिले पाऊल पडले
    संगीत दिग्दर्शक श्याम बाबू भट्टाचार्य पाठक यांच्याकडे सुलोचनाबाई पहिले गाणे गायल्या. तो चित्रपट हिंदी भाषेतील होता आणि चित्रपटाचे नाव होते "कृष्ण सुदामा". पहिले गाणे जेंव्हा सुलोचना चव्हाण गायल्या तेंव्हा त्यांचे वय होते अवघे नऊ वर्षे. आपण गाणे रेकॉर्डिंगसाठी फ्रॉकमध्ये गेलो होतो अशी आठवण देखील त्या आवर्जून सांगतात. या नंतर त्यांनी मास्टर भगवान यांच्या काही चित्रपटांत पार्श्वगायन केले आणि त्यावेळेस त्यांच्यासोबत सहगायक असत सी. रामचंद्र . पार्श्वगायन करताना मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त, श्यामसुंदर यांच्यासारख्या आघाडीच्या गायकांबरोबर गाण्याची संधी त्यांना मिळाली. करियरच्या सुरुवातीलाच अनेक दिग्गजांबरोबर त्यांनी काम केले. वयाच्या सोळाव्या वर्षी गायक मन्ना डे यांच्यासोबत त्या "भोजपुरी रामायण" गायल्या होत्या. मराठी व्यतिरिक्त त्यांनी हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामीळ, पंजाबी या भाषांमध्ये त्यांनी भजन, गझल असे विविध प्रकारदेखील हाताळले आहेत. त्यांचे गझल गायन ऐकून बेगम अख्तर यांनी सुलोचना चव्हाण यांना जवळ घेऊन दिलखुलास दाद दिली होती. सुलोचनाबाईंच्या आयुष्यातील आठवणींपैकी ही एक अतिशय महत्त्वाची आठवण. सुलोचनाबाईंचे शास्त्रीय गायकीचे शिक्षण झाले नाही हे ऐकून तर बेगम अख्तर यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पुढे मराठी लावणीसम्राज्ञी ठरलेल्या सुलोचना चव्हाण यांनी पहिली लावणी, आचार्य अत्रे यांच्या "हीच माझी लक्ष्मी" या चित्रपटात गायली. संगीतकार होते वसंत देसाई, आणि ही लावणी चित्रित झाली होते हंसा वाडकर यांच्यावर. या एका गाण्याने सुलोचना चव्हाणांच्या कारकिर्दीला लावणीच्या दिशेने वळण लागले. आचार्य अत्रे यांनीच त्यांना "लावणीसम्राज्ञी" असा किताब दिला. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचे पाहिले गाणे ध्वनिमुद्रित झाले, ते होते ' कृष्णसुदामा ' या चित्रपटासाठी. या चित्रपटास श्यामसुंदर पथक आणि भट्टाचार्य या जोडीने त्यांना प्रथम गायनाची संधी दिली. सुलोचनाबाईना कोणी गुरु नव्हता, सर्व काही उपजत होते त्या दहा वर्षाच्या असताना हानी, उर्दू, गुजराथी नाटकातून भूमिका करायला लागल्या. त्यांनी आधी हिंदी गाणी गायली . त्यांची १९४७ मधील ' मौसम आया है रंगीन ' , किसी मजबूर का जलता हुआ घर देखते जाना ' या गाण्यांचे आजही रसिक दिवाणे आहेत. एकदा त्यांना लखनौहून त्यांच्या पहिल्या गाण्यापासून म्हणजे १९४७ ते १९७५ पर्यंतच्या गाण्याची लिस्ट पाठवली होती , आणि त्याचे गीतकार कोण होते, संगीतकार कोण होते , गीतकार कोण होते त्याची ती लिस्ट होती. परत त्याच्याकडे ते गाणे रेकॉर्ड केलेले होते , प्रत्येकी ३०० रुपये देवून . असे त्यांचे चाहते सर्वदूर पसरले आहेत अगदी पाकिस्तानमध्येही . त्यांनी मुबई , दिल्ली , इंदोर , काश्मीर भारतभर दौरे केले. बेगम अख्तरीबाई सारख्या महान कलाकाराला सुलोचनाबाईच्या गजल , भजनाने पार भरवून टाकले. त्यांच्या सुरांची जादू पाकिस्तानही पसरली .' मेरे नसीबमें खुशिया नही जमानेकी । तुम्ही कहो ये बात क्या है भूल जाने की । या गजलांच्या रेकॉर्डस् आजही पाकिस्तानात आहेत, एच .एम .व्ही . ने त्या खास पाकीस्तानसाठी करून दिल्या होत्या. पुढे डी .पी . कोरगावकर , वसंत पवार , राम कदम , बाळ पळसुले , तुकाराम शिंदे अशा अनेक संगीत दिग्दर्शकाच्या लावण्याची बरसात सुरु झाली. सुलोचना चव्हाण यांनी १९५३-५४ च्या सुमारास "कलगीतुरा" या चित्रपटासाठी राजा बढे यांनी गायलेल्या काही लावण्या गायल्या. त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे नाव " एस. चव्हाण " होते. म्हणजेच श्यामराव चव्हाण , पुढे याच दिग्दर्शकाबरोबर सुलोचनाबाईंचे लग्न झाले आणि सुलोचना कदम या सुलोचना चव्हाण झाल्या. श्यामराव चव्हाण यांना संगीताची आवड तर होतीच ते तबलाही उत्तम वाजवत. त्यांनी सुलोचनाबाईनां लावणी गाण्याचे शात्रशुद्ध प्रशिक्षण दिले , म्हणून त्या आपल्या पतीनाच गुरु मानतात.या दरम्यानच " रंगल्या रात्री अशा " या चित्रपटातील गाणी सुलोचना चव्हाण यांनीच गावी असा आग्रह गीतकार जगदीश खेबुडकर यांनी धरला आणि " नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापुरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची " या गाण्याने त्यांचे आयुष्यच बदलून गेले. त्यातूनच खर्या अर्थाने लावणीसम्राज्ञी म्हणून सुलोचना चव्हाण पुढे आल्या. मल्हारी मार्तंड, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, अशा अनेक तमाशाप्रधान चित्रपटांतून त्यांनी आपल्या ठसकेबाज स्वरात लावण्या सादर केल्या. चपखळ, फटकेबाज शब्दांना आपल्या आवाजाच्या, सुरांच्या माध्यमातून ठसका व खटका देण्याचे काम सुलोचना चव्हाणांइतके कुणीच उत्तम करू शकलेले नाही. " पाठीमागे अंतरे कसेही असोत पण लावणीच्या मुखड्याची सुरुवात ठसकेबाजच झाली पाहिजे " असे सुलोचना चव्हाणांचे ठाम मत होते आणि याचा प्रत्यय त्यांनी गायलेल्या लावण्यांतून येतोच.
    त्यानंतर खेळात रंग बाई होळीचा , पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा , सोळावं वरीस धोक्याचं , फड साभाळ तुऱ्याला ग आला , पाडाला पिकलाय आंबा ,लाडे लाडे बाई करू नका अशा एकापेक्षा एक लावण्या त्यांनी गायल्या. पट्ठे बापूराव, होनाजी सगनभाऊ , अनंत फंदी , परशुराम रामजोशी त्यांच्या लावण्या सुलोचनाबाईमुळे जिवंत होत होत्या तर दुसरीकडे ग. दि. माडगूळकर , पी. सावळाराम , राजा बढे , जगदीश खेबुडकर या गीतकारांच्या लावण्या सर्वोतमुखी झाल्या.
    सुलोचना चव्हाण यांनी समाजकार्यातही स्वतःला झोकून दिले होते . कार्यक्रमातून मिळणाऱ्या मानधनातील मोठा हिस्सा धार्मिक निधीसाठी एखादा मदतनिधी उभा करण्यासाठी वापरतात. त्यांना जे पुरस्कार मिळत त्यातील काही भाग गरजूंसाठी उपलब्ध करून देत.
    काही वर्षापूर्वी माझा कार्यक्रम आणि स्वाक्षरी प्रदर्शन पार्ल्यातील ' मॅजेस्टिक गप्पा ' मध्ये होते तेव्हा त्यांनी माझ्या स्वाक्षरीच्या प्रदर्शनाला भेट दिली होती.
    ' मल्हारी मार्तंड ' या चित्रपटासाठी त्यांना लावणी गायिकेचा सन्मान मिळाला, पी. सावळाराम-गंगा जमना ' पुरस्कार , त्याचप्रमाणे संगीत क्षेत्रातील अत्यंत मनाचा समाजाला जाणारा ' लता मंगेशकर ' पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले . आजही त्यांची लोकप्रियता कायम आहे पुढेही तशीच राहील . खूप संकटे आली परंतु त्यांनी त्यांना तोंड दिले. स्वतःचे आजार चालूच होते , त्या मुंबईमध्ये गिरगाव भागात आपले आयुष्य शांतपणे व्यतीत करत असत त्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले होते. आज १० डिसेंबर २०२२ रोजी ९२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
    --सतीश चाफेकर
  • काळजाला हात घालणारा गायक : मुकेश

    प्रत्येक व्यक्तीच्या घशात “व्होकल कॉर्ड’’ नावाचा अवयव निसर्गत: असतो. एक अत्यंत पातळ पापूद्र्या सारखा दिसणारा हा अवयव आम्हाला बोलताना किंवा गाताना मदत करत असतो. मी कुठे तरी वाचल्याचं आठवतं की लता दिदीनी आपल्या घशाचा विमा उतरविला आहे. कारण त्यांचा घसा हाच सर्वात महागडा असा अवयव आहे. निसर्गत:च आवाजाची देगणी अनेक कलावंताना लाभलेली असते मात्र प्रत्येक आवाजाचा एक विशिष्ठ पोत असतो. या पोतावरूनच आम्हाला सहज ओळखता येते की आवाज कुणाचा आहे. चित्रपटसृष्टीतल्या अनेक नामवंत गायक गायिकेचा आवाज म्हणूनच आम्ही सहज ओळखू शकतो. चित्रपटसृष्टीत आपले बस्तान बसविण्यासाठी अनेकजण येत असतात. पण अनेकदा त्याला जे व्हायचं असतं ते मात्र राहून जातं आणि त्याची वेगळीच ओळख तयार होते. लुधियानातील जोरावर चंद आणि चाँद रानी यांच्या पोटी जन्मलेलेल्या एका तरूणाचे काहीसे असेच होणार होते.

    खरं तर दिसायला सुंदरच होता हा तरूण. ३०-४० च्या दशकातल्या चित्रपटातले अनेक नायक स्वत:ची गाणी स्वत:च गात कारण तेव्हा पार्श्व गायन पूर्ण रूजले नव्हते. याला गाताही येत असल्यामुळे नायक होण्याची महत्वकांक्षा होती यात गैर काहीच नव्हते. मोठी बहिण संगीत शिकत असतानां याला लहानपणीच संगीताची गोडी लागलेली. जोरावर चंद् आणि चाँद रानी यांचे एक दूरचे नातेवाईक होते मोतीलाल. चित्रपटसृष्टीतले नामवंत अभिनेते. त्यांनी या तरूणाला बहिणीच्या लग्नाच्या कार्यक्रमात गाताना ऐकले. त्यांच्या आवाजातील वेगळेपण त्यांच्या लक्षात आले व ते त्याला मुंबईला घेऊन आले. मोतीलाल या तरूणापेक्षा १३ वर्षे मोठे होते. पण त्यावेळी त्यांनी ही कल्पनाही केली नसेल की याच तरूणाचा उसना आवाज घेऊन एके दिवशी त्यानां गावे लागणार आहे. मुंबईत त्याची रहाण्याची सोय मोतीलालनी स्वत:च्या घरातच केली व एक संगीत शिक्षक पण त्याच्यासाठी नेमला. १९४१ मध्ये या तरूणाला शेवटी एका चित्रपटात नायकाची भूमिका मिळाली. चित्रपट होता ‘निर्दोष’ यातील गाणीही त्याने स्वत: म्हटली होती. त्या काळात कुंदनलाल सैगल गायकात सर्वोच्च शिखरावर होते. आणखी तीन वर्षांनी हा तरूण सर्वांचे लक्ष वेधून घेणार होता पण अभिनयाने नव्हे तर आपल्या गोड गळ्याने…….
    मध्ये मजहर खान नावाच्या दिग्दर्शकाचा “पहली नजर” हा चित्रपट थिएटरमध्ये झळकला.

    मोतीलाल, वीणा, मुन्वर सुलताना, बाबूराव पेंढारकर, प्रसिद्ध शाहीर बाळकराम,बिब्बो अशी तगडी स्टार कास्ट होती. दोन पठाण मुस्लिम घराण्यातील शोकातिंका यात दाखविली होती. या चित्रपटाचे संगीतकार होते अनिल विश्वास. सफदर आह सितापूरी यांनी गाणी लिहली होती. पैकी एक गाणे होते “दिल जलता है तो जलने दे……” हे गीत कुणी गायले यावर त्यावेळच्या अनेक चित्रपट रसिकांनी पैजा लावल्याचे बोलले जाते. गाणे कुंदनलाल सैगलचे आहे म्हणणारे बहूतेक रसिक ही पैज हरले होते. स्वत: सैगलही हे गाणे ऐकून अचंबित झाले होते. कारण आवाज थेट तयांच्या सारखाच होता. हे गाणे गायले होते मुकेश चंद जोरावर चंद् माथूर या २२ वर्षीय तरूणाने जो पूढे चित्रपटसृष्टीतला महान गायक मुकेश बनला…….या गाण्याने भारतभर त्याला ओळख मिळवून दिली. नंतर हळूहळू मुकेश सैगलच्या प्रभावातुन मुक्त झाले. प्रत्येक कलावंत मग तो कोणत्याही क्षेत्रातला असो, सुरूवातीस कुणाच्या तरी प्रभावाखाली असतोच. जर त्याने स्वत:ला यातुन मुक्त केले नाही तर मात्र त्याची ओळख फार काळ टिकू शकत नाही.अनेक गायक-गायिकेच्या बाबतीत असे झाले आहे. मुकेशचा किंचीत अनुनासिक पण दर्दभरा आवाज हीच त्यांची खरी ओळख बनली. संगीतकार नौशाद यांनी दिलीपकुमारसाठी अनेक गाणी गाऊन् घेतली. मेहबूब खानच्या ‘अंदाज’ चित्रपटतील मुकेशची सर्वच गाणी गाजली. तु कहे अगर…..झूमझूम के नाचो आज…..हम आज कही दिल खो बैठे….वगैरे. ‘गाए जा गीत मिलनके’, धरती को आकाश पूकारे (मेला), ये मेरा दिवानपन है (यहुदी), सुहाना सफर और ये मोसम हँसी (मधूमती), जीवन सपना टूट गया (अनोखा प्यार)…इत्यादी. ही सर्व दिलीपकुमार साठी मुकेशने गायलेली गाणी. १९५० नंतर मात्र मुकेशचा गळा खऱ्या अर्थाने राज कपूरलाच शोभला. आणि रफीच्या उदया नंतर दिलीप कुमार रफीच्या आवाजात गाऊ लागला…याच वेळी किशोरदा चा आवाज देव साहबसाठी चपखल बसला.

    मुकेशच्या आवाजात एक वेगळीच आर्तता असायची. महंमद रफी सारखी सर्व सप्तकातील रेंज वा मन्नादाच्या आवाजतला शास्त्रीय टच भलेही नव्हता मुकेशच्या आवाजात मात्र हृदय भेदून जाणारा दर्द नक्कीच होता. काही मोजकीच गाणी सोडली तर संगीतकार तार सप्तकात त्यांना गायला सांगत नसत. ‘मात्र झूमती चली हवा’ हे सोहनी रागातील गाणे (संगीत समांट तानसेन) आणि शिवरंजनी रागातील ‘जाने काहाँ गए वो दिन’ (मेरा नाम जोकर) या गाण्यात मुकेशजीने खूप वरचे स्वर लावले आहेत..जे आजही ऐकतानां हृदयाच्या आरपार जातात. मुकेशची सर्वच गाणी ओठात सहज बसणारी आहेत. त्यांनी गायलेली उडत्या चालीची अनेक गाणी खूप हीट झाली. मेरा जूता है जापानी (आवारा ), किसी की मुस्कूराहटो पर हो निसार सब कुछ सिख हमने(अनाडी), डम डम डिगा डिगा (छलिया), रूक जा वो जानेवली रूक जा (कन्हैया), मेरा जुता है जापानी (श्री ४२०)वगैरे…….राज कपूरसाठी गातानां मुकेश ख्रोखरच अप्रतिम गात असत. राज कपूरचा चेहरा विलक्षण बोलका. चेहऱ्यावरची प्रत्येक नस न नस हलायची. डोळयातील भाव मुकेशच्या आवाजाने अधिक गहिरे होत जायचे. स्वत: राज कपूर पण सुंदर गात असत. मुकेशने त्यांची आठवण सांगतानां म्हटले होते की- ‘मनात आणले असते तर ते माझ्यापेक्षाही उत्तम गायक झाले असते.’ राज कपूरनी मुकेशला वचन दिले होते की मी आयुष्यभर तुझ्याच गळ्याने गायील व ते त्यांनी मुकेश यांच्या शेवटा पर्यंत पाळले देखिल. सत्यम् शिवम सुंदरम हा खरा नायिका प्रधान चित्रपट. पण या चित्रपटात मुकेश यांच्या गाण्यासाठी राज कपूरने प्रसंग निर्माण केले.

    मुकेश प्रत्यक्ष जीवनात अत्यंत भावूक आणि संवेदनशील होते. एकदा एक मुलगी खूप आजारी पडली. तिला मुकेश खूप आवडत असत. आजार वाढू लागला तसे तिने आई जवळ मागणी केली की मला जर मुकेशने गाणे म्हणून दाखवले तर मी लवकर बरी होईल. आईने तिला समजाविण्याचा खूप प्रयत्न केला की- ते खूप नामवंत गायक आहेत, ते कसे येऊ शकतील? शिवाय त्यानां खूप पैसेही द्यावे लागणार. पण तिचा हट्ट सुरूच…शेवटी डॉक्टरांनी मुकेशशी संपर्क साधला. आणि खरोखरच मुकेश त्या मुलीला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले आणि गाणे ही गायले. मुलीच्या चोहऱ्या वरील आनंद बघून ते म्हणाले- ती आता जितकी आनंदी दिसतेय त्याच्या किती तरी पट आनंद मला झाला आहे. त्यांच्या याच संवेदनशीलतेमुळे त्यांचे गाणे बहूदा हृदया पासून येत असावे. राज कपूरच्या “श्री ४२०” आणि “आह” चित्रपटात मुकेश तुम्हाला दिसतील. आह मधील ‘छोटीसी ये जिंदगानी’…हे गाणे गाणारा गाडीवान स्वत: मुकेश आहे. स्वत: मुकेशने दोन चित्रपटाची निर्मिती पण केली. १९५१ मध्ये त्यांनी ‘मल्हार’ हा चित्रपट निर्माण केला. यातील प्रमूख भमिका मोती सागर(रामानंद सागर यांचे चिरंजीव) आणि शम्मी यांनी केली होती. यातील मुकेश आणि लताचे ‘बडे आरमानसे रखा है बलम तेरी कसम’…..हे रोशनने संगीत दिलेले गाणे खूप लोकप्रिय झाले. दुसरा चित्रपट १९५६ मधील “अनुराग” हा होता. यात त्यांनी प्रमूख नायकाची भूमिका केली होती. या नंतर बहुदा त्यांच्या लक्षात आले असावे की अभिनय हा आपला प्रांत नाही. मग त्यांनी गाण्यावरच लक्ष केंद्रीत केले व आपला ठसा उमटवला.

    ६० च्या दशकातल्या सर्वच संगीतकारानी मुकेश कडून गाणी गाऊन घेतली. त्यांच्या यशस्वी कारकिर्दीचे सर्वोच्च शिखर असलेला काळ.सुनील दत्त, मनोज कुमार यांच्यासाठी गायलेली गाणी देखिल तुफान गाजली. १९६७ मध्ये सुनीलदत्त-नुतनच्या “मिलन” मधील ‘सावन का महिना’…. हे लताजी बरोबर गायलेले ड्युअट तुफान लोकप्रिय झाले. त्यावर्षीचे बिनाका मधील ते क्रमांक एक चे गाणे होते….’सब कुछ सिख हमने’( अनाडी: १९५९), ‘सबसे बडा नादान’…(पहचान:१९७०),’जय बोलो बेईमान की…’(बेईमान:१९७२), ‘कभी कभी मेरे दिलमे’…(कभी कभी:१९७६ )असे चार फिल्म फेअर पुरस्कार त्यांना मिळाले. तर १९७४ मधील रंजनीगंधा सिनेमातील ‘कई बार यूं देखा है….’या गाण्याने त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. त्यांनी रायचंद्र त्रिवेदी यांची मुलगी सरला त्रिवेदी यांच्याशी २२ जुलै १९४६ मध्ये लग्न केले. त्यावेळी गाणे बजावणे हे खालच्या पातळीवरचे समजण्यात येई. त्यामुळे रायचंद यांनी विरोध केला. मग दोघांनी कांदीवलीच्या एका देवळात जाऊन् लग्न केले.त्यावेळी मुकेश २३ वर्षाचे होते. मोतीलाल व आर.डी. माथूर (मुगल-ए-आझम या चित्रपटाचे छायाचित्रकार) यांनी त्यानां मदत केली. त्यानां नितीन मुकेश या गायक मुलासह सह एकूण चार अपत्ये आहेत. अभिनेता नील नितीन मुकेश हा त्यांचा नातू.
    मुकेशजी अनेकदा स्टेज शो देखिल करत असत. गातानां सोबत त्यांची हर्मोनियम नेहमी असे. किशोर कुमार जसे स्टेजवर मस्ती करत त्यांच्या नेमके उलट मुकेशचे असे. टापटीप कोट टाय, वळणदार भांग अशा वेषात ते जेव्हा सूर लावत तेव्हा त्यानां लोक उभे राहून सन्मान देत. त्यांच्या गाण्यात एका प्रकारचा साधेपणा असायचा. त्यांचे गाणे प्रेक्षक अत्यंत शांतपणे ऐकत असत मध्येच शिट्टया वा टाळ्या वाजत नसत. २२ जुलै १९७४ ला मुकेशनी त्यांच्या लग्नाची ३० वर्षे झाल्याचा सोहळा साजरा केला आणि लगेच चार दिवसांनी अमेरिकेला प्रयाण केले. डेट्रईट, मिचीगन येथे त्यांचा स्टेज शो होता. २७ ऑगष्टला एरवी पेक्षा लवकर उठून स्नान केले. कपडे घालतानां त्यांच्या छातीत दुखायला लागले म्हणून त्यानां लगेच डॉक्टरांकडे नेले. पण तो पर्यंत खूपच उशीर झाला होता. हॉस्पीटल मध्ये डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. शिल्लक राहिलेला स्टेज शो लतादीदी आणि त्यांच्या मुलगा नितीन मुकेश यांनी पूर्ण केला. लताबाई त्यांचे शव घेऊन भारतात आल्या त्यावेळी चित्रपटसृष्टीतले असंख्य मान्यवर उपस्थित होते. राज कपूर यांच्या कानावर जेव्हा वृत्त गेले त्यावेळी त्यांचे उदगार होते-‘आज माझा आवाज हरवला आहे’ त्यांच्या मृत्यू नंतर त्यांनी गाणी गायलेले चित्रपट प्रदर्शीत झाले. मुकेशजी देखिल वयाच्या ५३ व्या वर्षी हे जग सोडून गेले. म्हणजे तसे ते तरूणच होते. चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज असे अवेळी का सोडून गेले असावेत? हा प्रश्न मनाला सतत बोचणी लावतो.

    -दासू भगत (२२ जुलै २०१७)

  • चिपळूणचा गेवळकोट

    चिपळूणपासून साधारण ४ कि.मी. अंतरावर गोवळकोटचा डोंगरी किल्ला आहे. या ५० मीटर उंचीच्या टेकडीच्या माथ्यावर असलेला किल्ला तिनही बाजुनी वस्तीने घेरलेला आहे.

  • नात यशस्वी होण्यासाठी

    स्वत:ला कामामध्ये, एखाद्या छंदामध्ये, मित्रांच्या घोळक्यात गुंतवून घेणे, किंवा बेसुमार टीव्ही पाहणं अथवा नशापाणी करणं. पण त्यांच्या समस्येचं उत्तर लग्न संबंधांच्या बाहेर उपलब्धं नसतंच. ते तर घरातच उपलब्ध असतं. तुम्ही दुस-या कुणाच्या प्रेमात पडूच शकत नाही असं मला म्हणायचं नाहिये. पडू शकता आणि त्यामुळे तुम्हाला काही काळाकरिता छान सुद्धा वाटू शकतं. पण काही वर्षानंतर तुम्ही, आज आहात त्याच परिस्थितीमध्ये असाल.

  • राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर सांगायचं कोणाला !

    राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर सांगायचं कोणाला !

  • मखमली शुद्ध कल्याण

    संध्याकाळ उलटत असताना, रात्रीचे रंग आकाशात पसरत असताना, कानावर "रसिक बलमा" ही काळीज चिरून टाकणारे शब्द येतात आणि डोळ्यातील उरलेली झोप पूर्णपणे उडून जाते!! गाण्याचा पहिल्याच आलापित अवघे स्वरशिल्प उभे करणारा तो अविस्मरणीय आवाज, पहिल्याच झटक्यात आपल्या मनात रुतून बसतो. "रसिक बालमा हाये, दिल क्युं लगाया, तोसे दिल क्युं लगाया" या ओळीतील पहिल्या "लगाया" वर जी भावनांची थरथर दाखवली आहे, ती शास्त्राच्या पलीकडची आहे!! बहुदा श्रुती शास्त्र त्याचे स्वरांचे थोडेफार विश्लेषण करू शकेल तरीदेखील तो नेमका झालेला परिणाम, शब्दापलीकडचा आहे आणि तो ऐकून "भोगावा" लागतो. त्याशिवाय, त्याची विखारी खुमारी जाणवणार नाही!!

    "रसिक बलमा, हाये दिल क्युं लगाया,
    जैसे रोग लगाया".
    या गाण्यात एक आणखी खास बात आहे. पहिला अंतरा सुरु व्हायच्या आधी जो वाद्यमेळ आहे, तो सतारीच्या सुरांनी सुरु होतो आणि त्याच्या पाठीमागे सारंगीच्या सुरांचे "अस्तर" आहे. सतारीचे सूर वरच्या सुरांत वाजत आहेत आणि सारंगीचे सूर किंचित ठाय लयीत तसेच मंद्र सप्तकात वाजत आहेत आणि ही स्वरांचा खेळ, काही क्षणांपुरता(च) आहे. लगेच व्हायोलिनचे सूर अवतरतात, ते वेगळ्या पट्टीवर!! अखेर मात्र, सुरवातीच्या सुरावर सतार येउन थांबते!! हा खेळ फार विलक्षण आहे. संगीतकार म्हणून शंकर/जयकिशन यांना या सांगीतिक वाक्यांशाचे संपूर्ण श्रेय द्यावेच लागेल. यात आणखी मजा म्हणजे हा जो वाद्यमेळ आहे, तिथे हा राग दूर सारलेला आढळतो पण तरीही परत चाल मुखड्याला अप्रतिमरीत्या येउन मिळते. सुगम संगीतात प्रयोग कसे करता येतात, याचे हे गाणे म्हणजे उत्तम उदाहरण ठरेल.
    शुद्ध कल्याण रागाची ओळख करून घेण्यासाठी या गाण्याकडे नि:संशयरीत्या बघता येईल. "भूप" रागाचा "तोंडावळा" दिसत असताना, "मध्यम" आणि "निषाद" स्वर किंचित अस्तित्व दाखवतात आणि हा राग पूर्ण वेगळा म्हणून अवतरतो. यात आणखी गंमत म्हणजे "भूप" राग सकाळचा मानला जातो तर "शुद्ध कल्याण" मात्र रात्रीचा पहिला प्रहर घेतला जातो. याचे मुख्य कारण हा राग पूर्वांगात भूप रागाशी नाते सांगतो तर उत्तरांगात यमन रागाशी. त्यामुळे, "औडव-संपूर्ण" या प्रकारात, हा राग येतो. "सा","रे","ग","प" हे स्वर आणि याचे संगती, यामुळे या रागाची वेगळी ओळख मनात ठसते.
    या रागावर भूप रागाची सावली इतकी आहे की पूर्वीच्या ग्रंथात,या रागाची ओळख "भूप कल्याण" या नावाने केलेली वाचायला मिळते. खरेतर या रागाचे आरोही स्वर आणि भूप रागाचे आरोही स्वर, यात सत्कृत्दर्शनी काहीही फरक नाही पण खरी गंमत इथेच आहे. स्वर लावण्याची पद्धत आणि कुठल्या स्वराला प्राधान्य द्यायचे, याचे नियम, यामुळे भारतीय रागदारी संगीत अतिशय गुंतागुंतीचे आणि त्याचबरोबर विलोभनीय झाले आहे.
    भारतीय रागदारी संगीतात, "धृपद-धमार" गायकी वगळल्यास, दोन भाऊ एकत्रितपणे गायन करताना फारसे आढळत नाही. राजन-साजन मिश्रा (कदाचित वडाली बंधू) याला अपवाद असावेत. दोन तंबोरे एकत्रित सुरात रुणझुणत असावेत त्याप्रमाणे या व्दयीचे गाणे जमते. एकाने हरकत घ्यावी आणि दुसऱ्याने त्या हरकतीचे दीर्घ तानेत रुपांतर करावे, हा खेळ तर हे दोघेजण फारच बहारीने करतात. गाण्यातील लय किती वेगवेगळ्या पद्धतीने घेता येते तसेच "वाकवता" येते, यासाठी तर यांचे गायन उद्मेखूनपणे ऐकावे.
    "सकल गुण निधी ध्यान" ही बंदिश जवळपास ५० मिनिटांची आहे म्हणजे या रागाचे सगळे वैभव आपल्याला या रचनेत बघता तसेच अनुभवता येईल. आलापीत लागलेला खर्जातील स्वर इतका विलक्षण आहे की आपण, त्या स्वराकडे एकटक "बघत" बसतो!! वर मी जी स्वरावली मांडली आहे, त्याचे नेमके प्रत्यंतर या रचनेत ऐकता येईल. प्रत्येक स्वर आणि त्या स्वराला जोडलेली हरकत, काही ठिकाणी अतिशय लोभसवाणी आहे. तसेच रचना अगदी, द्रुत लयीत सुरु होते तेंव्हा मध्येच एके ठिकाणी जो असामान्य "खर्ज" लावलेला आहे, तो खास ऐकण्यासारखा आहे.गायनात एखाद्या तानेत "खटका" घेऊन, त्या स्वराचे निराळेच सौंदर्य दाखवण्याची त्यांची शैली केवळ लाजवाब अशीच म्हणावी लागेल.
    प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांनी अनेक अप्रतिम भजने गायली आहेत त्यातील एक रचना - "ओमकार प्रधान रूप गणेशाचे" ही रचना ऐकुया. संगीतकार कमलाकर भागवत यांची चाल आहे. लेखाचे नाव "मखमली शुद्ध कल्याण" असे जे मला द्यावेसे वाटले, ते या गाण्याच्या संदर्भात. गमतीचा भाग असा आहे, या गाण्याचे सूर बघितले तर यात, थोडा "भूप" आहे, थोडा "देसकार" आहे पण तरीही "शुद्ध कल्याण" राग या गाण्यात प्रकर्षाने आढळतो. खरतर चित्रपट गीते काय किंवा भावगीते काय, त्या गाण्याची चाल म्हणजे रागाची प्रतिकृती किंवा आराखडा नव्हे. अर्थात, याला अपवाद अशी काही गाणी असतातच.
    "ओंकार प्रधान रूप गणेशाचे,
    हे तिन्ही देवांचे जन्मस्थान".
    पारंपारिक भजनाचा ताल न वापरता वेगळ्याच ढंगाचा ताल वापरला आहे. "आकार तो ब्रह्म, ऊकार तो ब्रह्म" इथे मात्र राग दूर गेला आहे पण परत अंतरा संपताना, सूर मात्र नेमके जुळवून घेतले आहेत. सुमन कल्याणपूर इतकी सुरेल आवाजाची गायिका पण त्यामानाने तिच्या गायकीची "परीक्षा" घेणारी फारशी गाणी वाट्याला आली नाही, इतकेच नव्हे बहुतेकवेळा तिच्या आवाजाची तुलना लताबाईंच्या गायाकीशी होत गेली आणि बहुदा याच तुलनेच्या आग्रहापायी या गायिकेला मराठी चार भावगीते वगळता, फारशी संधी मिळाली नाही आणि गायनाचे तसे "चीज" झाले नाही.
    असेच एक गाणे इथे देण्यासारखे आहे. देशभक्तीवर आधारित गाण्यात "शुद्ध कल्याण" राग किती अप्रतिमरीत्या मिसळला आहे, हे बघण्यासारखे आहे. "जहां डाल डाल पर सोने की चिडिया" हेच ते गाणे. जवळपास, ७ मिनिटांचे गाणे पण ऐकताना, गायन, कविता आणि रचना, या सगळ्या बाबतीत गाणे कुठेही जरादेखील रेंगाळत नाही. केरवा तालात जरी गाणे सुरवातीला बांधले असले तरी पुढे त्यात अनेक ताल वापरले आहेत. गाण्यातील शब्दानुसार, गाण्याची चाल आणि ताल, बदलले आहेत आणि हे सगळे करत असताना, संगीतकार म्हणून हंसराज बहेल यांनी, गाणी फार खुबीने रंगतदार ठेवले आहे.
    "जहां डाल-डाल पर सोने की चिडियां करती है बसेरा,
    वो भारत देश हमारा,
    जहां सत्य, अहिंसा और धर्म का पग-पग लगता डेरा,
    वो भारत देश हमारा."
    मोहमद रफीचा मुळातला जोरकस, अतिशय सुरेल आवाज अशा गाण्यात फार विलक्षण खुलतो. सुरवातीचा संस्कृत श्लोक इतक्या वरच्या सुरात आहे की, तिथे गायकाचा "गळा" पोहोचणे, हीच मुळातली एक परीक्षा आहे. देशभक्तिपर गाण्यात नेहमी आवाजात एक जोरकस स्वर आवश्यक असतो, जेणेकरून शब्दातील भावना तितक्याच ओतप्रोतपणे रसिकांच्या मनात ठाण मांडून बसतील. अर्थात असे करताना, गाणे जरादेखील प्रचारकी वाटता कामा नये, ही काळजी जरुरीची असते अन्यथा सगळी रचना, एखाद्या पक्षाच्या जाहिरात वाटण्याची शक्यता असते. इथे, या गाण्यात ही सगळी व्यवधाने, संगीतकार म्हणून हंसराज बहेल यांनी फारच समर्थपणे सांभाळली आहे. हिंदी चित्रपट गीतांत अशी बटबटीत गाणी भरपूर सापडतात. त्यादृष्टीने बघता, हे गाणे इतके मोठे असून देखील अतिशय श्रवणीय झाले आहे. हिंदी चित्रपट संगीतात, हा प्रश्न मला बरेचवेळा पडलेला आहे. हंसराज बहेल सारखा प्रतिभावंत संगीतकार हाताशी असून, याला त्यामानाने फारशी संधी कधीच मिळाली नाहीत. हंसराज बहेलच्या मानाने निकृष्ट दर्जाच्या संगीतकारांना, इथे कितीतरी संधी मिळाल्या आहेत आणि संधी मिळून देखील त्याला वाया घालवलेल्या आढळतात. केवळ दैवगती, असेच फडतूस नाव द्यावे लागते.
    आह" चित्रपटात "ये शाम की तनहाइयां" हे गाणे आपल्याला "शुद्ध कल्याण" रागाचे आणखी वेगळे स्वरूप दाखवते. गंमत बघण्यासारखी आहे, सुरवातीला मी "रसिक बलमा" या गाण्याचा उल्लेख केला तो रागाच्या संदर्भात. आता याच संगीतकार जोडीने हे गाणे दिले आहे. शंकर/जयकिशन हे रागाच्या बाबतीत किती चोखंदळ होते, हे या गाण्यावरून समजून घेता येईल. या दोन्ही गाण्यांच्या चाली संपूर्णतया भिन्न आहेत पण तरीही चालीच्या अंत:प्रवाहातून याच रागाची धून ऐकायला मिळते. खरेतर कुठल्याही सुगम संगीताच्या रचनेतून रागाची संपूर्ण ओळख करून घेण्याच्या फंदात पडू नये कारण एकाच रागाची अनंत रूपे आपल्याला गोंधळात टाकू शकतात. किंबहुना नेहमीच गोंधळात टाकतात.
    "ये शाम कि तनहाइयां, ऐसे में तेरा गम;
    पत्ते कही फडके, हवा आयी तो चौके हम"
    हाच प्रकार इथे घडतो. अर्थात या विचाराची दुसरी बाजू अशी, सुगम संगीताने, रागदारी संगीत किती व्यामिश्र आहे, किती वैविध्याने नटलेले आहे हे सगळे फार सहजतेने अनुभवता येते.
    हिंदी चित्रपट, "पेईंग गेस्ट" मध्ये देखील या रागाची ओळख दाखवणारे नितांत रमणीय गीत आहे - चांद फिर निकाला मगर तुम ना आये". गाण्याची चाल आणि पडद्यावरील सादरीकरण इतके महत्वपूर्ण आणि परिपूर्ण आहे की, गाणे ऐकताना, कुठल्या रागावर आधारित? असला प्रश्नच मनात उद्भवत नाही आणि याचे श्रेय, संगीतकार सचिन देव बर्मन आणि गायिका लताबाई, यांच्याकडे नि:संशय जाते.या संगीतकाराला, चित्रपट गाणे कसे "सजवायचे" याचे नेमके भान होते आणि प्रसंगी त्यासाठी रागदारी नियमांना तिलांजली देण्याचे धार्ष्ट्य त्यांनी वेळोवेळी दाखवले.
    "चांद फिर निकाला मगर तुम ना आये,
    जला फिर मेरा दिल, करु क्या मैं हाये".
    इथे देखील हाच प्रकार घडला आहे. रागाचे सूर आणि चलन ध्यानात घेता, प्रथमत: या गाण्यात "शुद्ध कल्याण" कुठे आहे, याचाच शोध घ्यावा लागतो!! गाणे हे शब्दानुरूप असणे जरुरीचे आहे आणि त्यासाठी चाल निर्मिती करताना, सूर कुठून घेतले, कशा प्रकारे वापरले, हे मुद्दे नेहमीच गैरलागू ठरतात. थोडक्यात, केवळ हे गाणे या रागावर आहे म्हणून हे गाणे सुंदर आहे,असे ध्वनित करणे, हा रागदारी संगीताचा फाजील दुराभिमान ठरतो. मग प्रश्न असा येतो, शुद्ध कल्याण रागाच्या लेखात, या गाण्याची जागा कुठे? प्रश्न जरी वाजवी असला तरी काही प्रमाणात अस्थानी ठरू शकतो कारण, आपल्याला इथे या रागाची ओळख करून घ्यायची आहे, तो राग संपूर्णपणे समजून घ्यायचा नाही. एकदा का हा विचार नक्की केला म्हणजे मग वरील सगळेच प्रश्न निकालात निघतात!!
    -- अनिल गोविलकर

  • अरण्यातला काळदुर्ग

    “काळदुर्गला” भेट द्यायची असल्यास “पावसाळा” हा उत्तम ऋतू त्यात ही श्रावण महिन्यात येथे आल्यास ऊन-पावसाचा मस्त खेळ अनुभवता येतो, इथलं वातावरण सुद्धा कधी सूर्यप्रकाशित तर उंच गडावर ढगांची चादर पसरल्यामुळे पावसाच्या सरी कायम बरसतात.