(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • चं म त ग ! टेक्निक !

    "अगं ऐकलंस का, एक फक्कडसा चहा आण बघू, खूप दमलोय !"
    "एवढ दमायला काय झालंय तुम्हांला ? चाळीतल्या पोरांनी ख्रिसमससाठी बनवलेलं ख्रिसमस ट्री चढून एकदम घरात नाही नां आलात ?"
    "काहीतरीच काय तुझं ? मला अजून पायाखालच नीट दिसतंय ! तुझ्या सारख्या त्या टीव्हीवरच्या रटाळ सिरीयल बघून, मला चष्मा नाही लागलाय अजून !"
    "कळलं कळलं ! आता दमायला काय झालंय ते सांगा ?"
    "अगं हे काय आणलंय ते बघ तरी !"
    "अ s s ग्गो बाई ! डिनर सेट !"
    "करेक्ट, अगं आपल्याला लग्नात मिळालेला डिनर सेट आता किती जुना झालाय ! म्हटलं घेऊन टाकू एक नवीन !"
    "हो, पण त्यात एवढं दमायला काय झालंय म्हणते मी ?"
    "अगं तो बॉक्स जरा उचलून तर बघ ! सेव्हन्टी टू पिसेसचा अनब्रेकेबल डिनर सेट आहे म्हटलं ! एवढा जड डिनर सेट दोन जिने चढून आणल्यावर दम नाही का लागणार ?"
    "अगं बाई, खरच जड आहे हो हा !"
    "आता पटली खात्री, मी का दमलोय त्याची ! मग आता तरी आणशील ना चहा ?"
    "एकच मिनिटं हं !"
    "आता का s य s ?"
    "अहो, या बॉक्सवर Hilton कंपनीच नांव आहे !"
    "बरोबर, म्हणजे तुला इंग्लिश वाचता येतं तर !"
    "उगाच फालतू जोक्स नकोयत मला !"
    "यात कसला जोक? तू नांव बरोब्बर वाचलंस म्हणून......"
    "तुम्हांला ना, खरेदीतल काही म्हणजे काही कळत नाही !"
    "आता यात न कळण्यासारखं काय आहे ? हा डिनर सेट नाही तर काय लेमन सेट आहे ?"
    "तसं नाही, अहो Milton कंपनी डिनर सेट बनवण्यात प्रसिद्ध आहे आणि तुम्ही आणलात Hilton चा डिनर सेट, कळलं ! कुठून आणलात हा सेट ?"
    "अगं तुझ्या नेहमीच्या 'महावीर स्टोर्स' मधून ! तो मालक मला म्हणाला पण, काय शेट आज भाभीजी नाय काय आल्या तुमच्या संगाती ! मी म्हटलं शेठ, तुमच्या भाभीजीला सरप्राईज देणार आहे आज, म्हणून तिला नाही आणलं बरोबर !"
    "आणि पायावर धोंडा मारून घेतला !"
    "आता यात कसला पायावर धोंडा ?"
    "अहो Milton च्या ऐवजी Hilton चा डिनर सेट आणलात नां ?"
    "अगं तो शेठच म्हणाला, ही Hilton कंपनी नवीन आहे, पण चांगले डिनर सेट बनवते आणि Milton पेक्षा खूपच स्वस्त, म्हणून...."
    "स्व s s स्त s s ! एरवी मी दुकानात घासाघिस करतांना मला अडवता आणि आज स्वतःच डुप्लिकेट माल घेऊन आलात ना ?"
    "यात कसला डुप्लिकेट माल ? हे बघ या बॉक्सवर चक्क लिहलय, Export Quality, Made in USA !"
    "अहो, USA म्हणजे उल्हासनगर सिंधी अससोसिएशन पण होऊ शकत ना ? मला सांगा, हा डिनर सेट अनब्रेकेबल आहे कशावरून ?"
    "अग असं काय करतेस ? शेटजीनी मला एक सूप बाउल आणि एक डिश खाली जमिनीवर आपटून पण दाखवली !"
    "मग ?"
    "मग काय मग, ते दोन्ही फुटले नाहीत, म्हणजे तो सेट अनब्रेकेबल नाही का ?"
    "फक्त दोनच आयटम जमिनीवर टेस्ट केले ? सगळा डिनर सेट नाही ?"
    "काय गं, तुम्ही बायका भात तयार झालाय की नाही हे बघायला, फक्त त्यातली एक दोनच शीत चेपून बघता ना ? का त्यासाठी अख्खा भात चिवडता ?"
    "अहो भाताची गोष्ट वेगळी आणि डिनर सेटची गोष्ट वेगळी !"
    "ठीक आहे, मग हा सूप बाउल घे आणि तूच बघ जमिनीवर टाकून."
    असं बोलून मी बायकोच्या हातात त्या सेट मधला सूप बाउल दिला ! तिने तो हातात घेऊन मला विचारलं
    "नक्की नां ?"
    "अगं बिनधास्त टाक, अनब्रेकेबल..."
    माझं वाक्य पूरं व्हायच्या आत बायकोने तो सूप बाउल जमिनीवर टाकला आणि त्याचे एक दोन नाही तर चक्क चार तुकडे झाले मंडळी !
    "आता बोला ? हा डिनर सेट अनब्रेकेबल आहे म्हणून !"
    "अगं पण शेठजीने खरंच सूप बाउल खाली टाकला होता पण त्याला साधं खरचटलं पण नाही. शिवाय.....!"
    "एक डिश पण नां ?"
    असं बोलून तिने सेट मधली एक डिश घेतली आणि ती पण जमिनीवर टाकली. मंडळी काय सांगू तुम्हांला, ती डिश पण सूप बाउलच्या मागोमाग निजधामास गेली ! ते बघताच मी उसन अवसान आणून बायकोला म्हटलं, "अगं पण माझ्या समोर त्याने या दोन गोष्टी टाकल्या त्या कशा फुटल्या नाही म्हणतो मी ?"
    "अहो हेच तर त्या व्यपाऱ्यांच टेक्निक असतं !"
    "टेक्निक, कसलं टेक्निक ?"
    "अहो त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात, हे तुम्हांला कधीच कळणार नाही !"
    "म्हणजे ?"
    "मला सांगा, त्या शेठने ज्या सेट मधल्या बाउल आणि डिश खाली टाकल्या तो सेट तुम्हांला दिला का ?"
    "नाही नां, मला म्हणाला तो शोकेसचा पीस आहे, मी तुम्हांला पेटी पॅक सेट देतो !"
    "आणि तुम्ही भोळे सांब त्याच्यावर विश्वास ठेवून पेटी पॅक सेट घेवून आलात, बरोबर नां ?"
    "होय गं, पण मग आता काय करायच ?"
    "आता तुम्ही नां, मेहेरबानी करून काहीच करू नका ! फक्त तो बॉक्स द्या माझ्याकडे, मी बघते काय करायच ते !"
    "अगं पण...."
    "आता पण नाही आणि बिण नाही, आता मी माझं टेक्निक दाखवते शेटजीला ! ही गेले आणि ही परत आले ! आणि हो, मी येई पर्यंत आपल्या दोघांसाठी चहा करा जरा फक्कडसा !"
    असं बोलून बायकोने तो बॉक्स लिलया उचलला आणि ती घराबाहेर पडली ! मी आज्ञाधारक नवऱ्यासारखा चहा करायला किचन मधे गेलो ! माझा चहा तयार होतोय न होतोय, तेवढ्यात हिचा विजयी स्वर कानावर आला "हे घ्या !" असं म्हणत बायकोने Milton च्या डिनर सेटचा बॉक्स जवळ जवळ माझ्यासमोर आपटलाच !
    "अगं हळू, किती जोरात टाकलास बॉक्स ! सेट फुटेल नां आतला !"
    "आ s हा s हा s ! काय तर म्हणे सेट फुटेल ! अहो हा काय तुम्ही आणलेला डुप्लिकेट Hilton चा सेट थोडाच आहे फुटायला ? ओरिजिनल Milton चा डिनर सेट आहे म्हटलं !"
    "काय सांगतेस काय, Milton चा डिनर सेट ? अगं पण त्या शेटनं तो बदलून कसा काय दिला तुला ?"
    "त्या साठी मी माझं टेक्निक वापरलं !"
    "कसलं टेक्निक ?"
    "लोणकढीच टेक्निक !"
    "म्हणजे ?"
    "अहो मी त्याला लोणकढी थाप मारली, की तू जर का मला हा Hilton चा सेट बदलून Milton चा सेट दिलास, तर मी आणखी पन्नास Milton चे सेट तुझ्याकडून घेईन !"
    "काय आणखी पन्नास Milton चे डिनर सेट ? काय दुकान वगैरे...."
    "अहो, मी त्याला सांगितलं पुढच्या महिन्यात माझ्या नणंदेच लग्न आहे. तेंव्हा पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून मला ते हवे आहेत !"
    "अगं पण तुला मुळात नणंदच नाही तर तीच लग्न....."
    "अहो हेच ते माझं लोणकढीच टेक्निक !"
    "धन्य आहे तुझी !"
    --प्रमोद वामन वर्तक, ठाणे.
    २४-१२-२०२२
    Mob. 9892561086
  • बातम्यांचे आकर्षक आणि खेचक मथळे

    आज पन्नाशीच्या पुढे असलेल्या मंडळींना “अमृत” वगैरे मासिके आठवत असतीलच. या मासिकांमध्ये “मुद्राराक्षसाचा विनोद” वगैरेसारखी मनोरंजक सदरे असत. वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांच्या मुद्णावर अचूक बोट ठेवून त्यातल्या चुका दाखवून त्यातून मनोरंजन करणे हाच या सदरांचा उद्देश.

    सध्या “ब्रेकिंग न्यूज” आणि खळबळजनक मथळ्यांचा जमाना आहे. इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या हल्ल्यामुळे वर्तमानपत्रे जरा मागेच पडलेली आहेत. “ब्रेकिंग न्यूज” आधल्या दिवशी बघितल्यावर पुन्हा बातमी कोण कशाला वाचेल ? मात्र वृत्तपत्रातल्या बातमीचा मथळा दिलखेचक असेल तर ती बातमी किंवा लेख हमखास वाचला जाणार असेच हे गणित.

    काही बातम्यांचे मथळे असेच आकर्षक आणि खेचक असतात. त्यातलेच काही नमूने....


    - खूप वर्षांपूर्वी, एक महिला विमानप्रवासात प्रसूत झाली. त्या बातमीचे हेडिंग होते,
    'भाळी तिच्या, जन्म आभाळी.'


    - वजनात मारणे हा रद्दीवाल्यांचा आणि भाजीवाल्यांचा जणू हक्क असतो. त्यावर वैधमापन विभागाने कारवाई सुरू केली. त्या बातमीचं हेडिंग होतं,
    'मापात पाप' करणार्‍यांना चाप!


    - काही वर्षापूर्वी मुंबई पावसात तुंबली. एका बातमीचं हेडिंग होतं..
    'तुंबई'!


    - आणखी एका बातमीचं हेडिंग ...
    “अटक न करण्यासाठी लाच घेताना अटक!”


    बाय द वे, एक आठवणीतलं हेडिंग आठवलं.
    'जीव वाचवण्यासाठी पळताना खड्ड्यात पडून मृत्यू! '


    सौरभ गांगुली आणि युवराज सिंग यांनी त्रिशतकी भागीदारी पाकिस्तानविरुद्ध केली आणि त्याच दिवशी कम्युनिस्टांनी मनमोहनसिंग सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची धमकी दिली.

    लोकसत्ता फ्रंट पेज हेडिंग.

    डाव्यांचा तडाखा


    मागे कोल्हापुरात एक खून खटला गाजला होता. त्याच्या बातम्या खूप वाचल्या जायच्या. सहाजिकच, साक्षी, पुरावे, उलट तपासणी यांत हेडिंगचा मसाला मिळायचा.
    त्याच काळात, एका स्थानिक पेपरची हेडलाईन होती, 'नाम्या, बगतूस काय? घाल गोळी!'
    ... नंतर रिक्षांच्या मागेही दिसू लागले... 'नाम्या, बगतूस काय, घाल गोळी!'


    राहुल द्रविड च्या निवृत्ती वेळी एका इंग्रजी पेपर चा अप्रतिम मथळा होता.
    'indian team is now bread n butter but without jammy'


    भारताने वानखेडेत होणाऱ्या विश्वचषक अंतिम फेरी धडक मारली, तेव्हाचा एक अप्रतिम मथळा....
    'चारले खडे आता वानखेडे'


    पतंजली कोलगेटचे दात पाडणार! - मटा ऑनलाइन


    हे थोडं आक्षेपार्ह आणि तितकंच गमतीदार हेडिंग…

    गोव्यात पाळी नावाचं गाव आहे.विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेपूर्वी पाळी हा एक मतदारसंघ होता. निवडणुकीस एक नामांकित डॉक्टर उभे राहिले. मोठा मेळावा घेतला. धडाकेबाज भाषणे झाली. गोव्यातल्या एका नामांकित मराठी दैनिकाने दुस-या दिवशी हेडिंग दिले,
    "डॉ. ××××× पाळीच्या समस्या सोडविणार"!


    वादग्रस्ततेमुळे खैरनार यांची देवनार कत्तलखान्यात बदली झाली आणि त्यांनी तिथला कत्तलखानाच बंद करण्याच्या हालचाली आरंभल्या होत्या. त्याचे पंढरीनाथ सावंत याने दिलेले हेडींग अजून लक्षात राहिले आहे.

    खैरनार देवनारचे पवनार करणार


    या सर्वावर कडी करणारी हेडलाईन लोकसत्ताच्या अशोक पडबिद्री यांनी बर्‍याच वर्षांपूर्वी दिली होती. मुंबईत एका वर्षी प्रचंड म्हणजे प्रचंडच पाऊस झाला. अलीकडच्या 26 जुलैसारखाच. सारी मुंबई ठप्प झाली. लोकसत्ताची हेडलाईन होती - मुंबापुरीवर जलात्कार !!!


    मस्त... दिलखेचक शीर्षकांच्या आठवणींचा पाऊस पडतोय इथे. याच सम्दर्भात २००४ साली अटल सरकारचा पराभव करुन कॉंग्र्स बहुमताने जिंकली त्यावेळचं टाईम्स ऑफ इंडियाचं हेडींग होतं, King Cong... Queen Sonia. अर्थात परदेशी जन्माच्या प्रश्नावरुन सोनिया गांधींनी नंतर पंतप्रधानपद नाकारलं हा भाग वेगळा.


    बुटासिंघ २००५मध्ये बिहारचे राज्यपाल असताना तेथील त्रिशंकू विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस त्यांनी केली होती. त्यामुळे तत्कालीन केंद्र सरकारने तशी शिफारस राष्ट्रपतींकडे करून तेव्हा जदयू-भाजपच्या संभाव्य युतीला सरकार बनविण्यापासून रोखले होते. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द ठरवीत केंद्र सरकारवर कठोर प्रहार केले होते. तेव्हा एक शीर्षक होते(बहुधा "सामना"चे) - सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला "बुटा"ने हाणले.


    मध्यंतरी बालाजी तांबे यांना त्यांच्या गर्भसंस्कार या पुस्तकातील आक्षेपार्ह गोष्टींबद्दल खुलासा करण्याचे आदेश दिले होते तेव्हा लोकमत कि कुठल्याशा वर्तमानपत्राने ' तांबेचं पितळ उघडं' अशी बातमी दिली होती.


    'वडील लग्न करत नसल्याने मुलाची आत्महत्या'


    डिसेंबर २०१३ मध्ये, निवडणूक निकालानंतर, लोकसत्ता च्या मुख्य बातमीचे हेडिंग होते,
    'हाताची घडी, कमळावर बोट! '


    नवाकाळचे एक हेडिंग : श्रीकांतने जयसूर्याला गिळले. भारताच्या क्रिकेटसंघाने साजरी केली श्रीलंकेत हनुमान जयंती !


  • सुरक्षित, प्रागतिक चैतन्योत्सवासाठी

    गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करायचा असेल तर त्यासाठी इच्छाशक्तीची, सद्सद्विवेकबुद्धीची गरज असते. गणेशोत्सव मंडळांनी समाजाशी असलेली बांधिलकी लक्षात घेऊन उत्सव विधायक पद्धतीने साजरा करायला हवा. उत्सवाच्या निमित्ताने गणेशासमोर नतमस्तक होऊन केवळ प्रार्थना करून चालणार नाही तर प्रयत्न, निष्ठा, निश्चय आणि भक्तीच्या साहाय्याने ध्येयाकडे मार्गक्रमण केले पाहिजे.

  • माझ्या मनातलं

    बर्याच दिवसांनी लिहीतोय.अश्विनी एकबोटे.अचानक आपल्यातुन निघुन गेल्यामुळे काही सुचतच न्हवतं.सैरभैर झाल होतं मन.गेल्या १५ वर्षांचा सहवास.एक अत्यंत गुणी अभिनेत्री व चांगली माणुस.पहिल्यांदा काम केल आम्ही ते एका वॉशिंग मशिनच्या जाहीरातीत.आणि तिथेच सुर जुळले.ते शेवटापर्यंत.पुण्यात घर.लहान मुलगा.सगळ कुटुंबच पुण्यात.मुंबईच माहित नाही.पण आली.दबकत दबकत.पहिली मालीका " काना मागुन आली""डॉ.गिरीष ओकांच्या पत्नीची मुख्य भूमिका.मीच नाव सुचवल.आली व चक्क ८०० रु.पर डे वर काम सुरु केलं.मग मुंबईत रहायला घर नाही.विजयनगर सोसा.मग वनराई कॉलनीतल्या ४ जागा.सतत डोक्यावर संसार घेऊन फिरायचं.सतत पुणे मुंबई.महिन्यात्यातुन ७ ते ८ वेळा मुंबई पुणे.तेही रात्री १२ ची टु बाय टु एशियाड पकडुन जायची.तीचा मुलगा शुभंकर लहान होता.सगळा जीव तिचा त्याच्यात गुंतला होता.हिरकणी सारखी वेळ काळ कशाचीही पर्वा न करता पुण्याला पळायची.भोर ला सोनियाचा उंबराचं शुट चालायचं.पण ही कित्येक वेळेला रात्रीची ड्रायव्हींग करत पुण्याला जायची.त्यात पुण्यात चालु केलेला भरतनाट्यमचा क्लास.त्या विद्यार्थिनींमधे जीव गुंतलेला असायचा.त्यांना कधी फक्त विदयार्थीनी म्हणुन पाहीलच नाही.मुलींसारखं प्रेम करायची.नृत्या व्यतिरीक्त.माणुस घडवण्याचा प्रयत्न करायची.जे करेल ते मन लावुन सर्वस्व ओतुन.मग हळु हळु मुंबईतलं स्थान पक्क करत चालली.मग मारुती 800 घेतली.त्या आधी माझ्या स्कुटरवरुन जाताना पाऊस आला.पंक्चर झालं पडलो.असे अनेक प्रकार घडले.पण ते क्षण सुध्दा तक्रार न करता भरभरुन जगली.एक सळसळता नदिचा प्रवाह होता अश्वीनी.मी तीला सुंदर म्हटलं की "तुला दिसते रे वेड्या." असं म्हणायची.आम्ही "मांदिआळी शब्द तालांची" कार्यक्रम सुरु केला त्याचे देश विदेशात प्रयोग केले.एकटीच नाचायची पण १० मुली नाचल्याचा आभास निर्माण करायची.दिवसभरातुन किमान १० फोन करायची.सतत चौकशी करायची.जी व्यक्ती तिला भेटायची ती तिच्या प्रेमात पडायची.हुशार.अभ्यासपूर्ण भुमिका करायची.मी ते करत नाही म्हणुन चिडायची.सिनेमा नाटक पाहिल्या नंतर त्याचं विच्छेदन सुंदर करायची.मग." तु फक्त हो म्हण", एका क्षणात","त्या तिघांची गोष्ट","नांदी", " नाच ग घुमा","कितीतरी चित्रपट ,पौराणीक सीडी्ज.ईतकं अप्रतिम काम करायची सगळे कौतुक करायचे पण पुरस्कार मात्र मिळाला नाही.मग लहान मुलासारख ऊदास व्हायची.पण तिने स्वतःच ह्यातुन स्वतःला बाहेर काढलं.ते सगळं पचवल.व ती आणखीनच प्रगल्भ झाली.नााचाचे कार्यक्रम शास्त्रीय नृत्याचे करायला मिळत नाहीत म्हणुन सतत खंत व्यक्त करायची.आणि आत्ता कुठे करीयरला छान आकार यायला लागला होता.पहिल्यांदाच महेश मांजरेकरांनी मिक्टाला बोलावलं किती खुष होती.एक लोकप्रीय अभिनेत्री म्हणुन नावारुपाला यायला लागली.नुकतीच जाण्यापुर्वी ८ दिवस होंडा सीटी घेतली.खुष होती.नविन नाटक मिळालं होतं.ज्यात मी नव्हतो त्याचा आनंद होता.कारण ऊगाचच लोक समज करुन घेतात.की ही शरद शिवाय काम करत नाही.तस काहीच नव्हतं.म्हणुन मला म्हणाली! की लोकांचा गैरसमज दूर होईल. तिचा मुलगा ह्याच क्षेत्रात करीयर करायला सिध्द झालाय.त्याचं करीयर व्हावं म्हणुन जीव तळमळाचा तीचा.त्याला कारण तीन ऊशिरा सुरु केलं होतं सगळं.पण नियतीच्या मनात वेगळच असतं.स्टेजवर नाचताना भैरवी रागावरचं गाणं चालु त्यावर तीचा नाच चालु.गाण संपलं नाचही संपला.व माझी जीवश्च मैत्रीणही संपली.तिलाच कळलं नाही.मला म्हणाली की नंतर लगेचच माझा प्रयोग होता तर पहिला अंक बघुन जाईन.पण तीच्या जिवनाचाच तिसरा अंक संपला होता.तिनं एक्झीट घेतली होती.रंगभुमी मालिका चित्रपट ह्या प्रत्येक ठिकाणी तिची ऊणीव नक्कीच जाणवणार.ती गेली आणि माझ्या हातात राहील्या फक्त सुंदर आठवणी.त्या खुपच सुंदर आहेत.पण तरीही ४४ हे जाण्याचं वय नाही.खुप काही करायचं होतं.सगळच अर्धवट राहीलं.पण शेवटी परमेश्वरापुढे कोणाचच काहीच चालत नाही.आपण फक्त बाहुल्या आहोत कठपुतळ्या.

    - शरद पोंक्षे

  • का ‘मी मराठी’ ?

    मी ‘मराठी’ आहे कारण…

  • व्हॉईस गुरु- दिपक वेलणकर

    ‘वृत्तनिवेदक – दिपक वेलणकर” असं ऐकताक्षणीच डोळ्यासमोर येतं एक भारदस्त व्यक्तीमत्वं ज्यांना आवाजाची अनमोल देणगी आहे, ज्यात अनोखेपण लपलंय.

  • यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं..!

    यशवंतराव चव्हाण यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्र या गावी १२ मार्च १९१३ रोजी झाला. त्यांच्या ७० वर्षांच्या आयुष्यात त्यांनी जे काम केले आणि महाराष्ट्राची आणि देशाची जी सेवा केली ती स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळातील काहीच एकमेवाद्वितीयांपैकी एक. त्यांनी संतांची आणि समाज सुधाकारांची पार्श्वभूमी असणाऱ्या महाराष्ट्रापुढे त्याच पायावर शिवाजी महाराज-फुले-टिळक या आणि अशा अनेकांच्या विचारांच्या प्रेरणेने नव्या महाराष्ट्राचा कळस उभा केला.

  • असं असावं.. असं असावं..

    मतपेटी 'रिकामी' असूनही
    लोकप्रिय असावं
    "राज ठाकरे" सारखं....!

    तोंडुन निघालेल्या
    प्रत्येक शब्दावर
    ठाम रहावं
    "बाळासाहेब ठाकरें"
    सारखं....
    लोकांच्या अपेक्षा उंच
    कराव्या
    "नरेंद्र मोदीं" सारख्या...

    ३५ वर्षात जे कमावलं
    ते 'एका' वर्षात गमवावं
    "नारायण राणे" सारखं..!

    मैत्रीच्या नावाखाली
    धंदा करावा
    "बराक ओबामा" सारखा..!

    भ्रष्टाचाराचे लाखो आरोप होऊनही, एकही आरोप सिध्द न होणे असे चरित्र असावे "शरद पवार" सारखे.....!
    विद्वान असुनही
    मस्करीचा विषय बनावं
    "मनमोहन सिंह" सारखं..!.
    एकनिष्ठपणे पाठीशी
    उभं रहावं
    "बाळा नांदगावकर"
    सारखं.....!
    अपयशाने न खचता
    ध्येया पाई आयुष्य वेचावं
    "दलाई लामा" सारखं....!
    पुरुषांच्या क्षेत्रात
    ठसा उमटवावां
    "बरखा दत्त" सारखा..!

    बाॅलीवुड मध्ये
    मराठीपण जपावं
    "नाना पाटेकर" सारखं...!

    कर्मयेागी आणि निस्सिम
    समाजसेवा करावी
    "आमटे" कुटुंबा सारखी..!

    कवितेचा अपमानच नाही
    तर विनयभंग करु नये
    "रामदास आठवले"
    सारखा......!
    फक्त उत्क्रृष्टतेचाच
    ध्यास असावा
    "गुलझार" सारखा....!

    हजरजबाबी असावं
    "कपिल शर्मा" सारखं...!
    आयुष्यभर साडेसाती
    नसावी
    "संजय दत्त" सारखी...!

    ७५ व्या वर्षी 'मागणी'
    आणि 'busy' असावं
    "अमिताभ बच्चन"
    सारखं.....
    ४० व्या वर्षी निवृत्त व्हावं
    "सचिन तेंडुलकर"
    सारखं......!

    सोन्याची अंडी देणारी
    कोंबडी असावी
    "IPL" सारखी.....!

    'कात' टाकावी
    "मराठी सिनेमा"
    सारखी.....!
    वर्षानुवर्ष एकच
    चव टिकवावी
    "चितळे" आणि
    "मामलेदार" सारखी...!
    वाचनाची आवड व
    सहनशीलता हवी
    "तुमच्या" सारखी.....!!'
    Forward करण्याची
    हौस असावी माझ्या सारखी...!

  • रेखाटलेला महाराष्ट्र…

    वैभवशाली इतिहासाचा गौरवशाली कर्तृत्वाचा महाराष्ट्र राज्याचा सुवर्ण महोत्सव उत्साहात, दिमाखात वर्षभर साजरा करण्यात येत आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने देखिल राज्याची प्रगती विविध प्रकाशनांच्या माध्यमातून जनतेसमोर आणली आहेत.

  • किंग ऑफ द कॉमेडी : मेहमूद

    प्राचीन भारतीय ग्रंथात रसानुभूती बद्दल खूप सविस्तर असे वर्णन आले आहे. यात रसांचे चार अंगे सांगितली आहेत. मनात जे विविध भाव प्रगट होतात त्याना “संचारी भाव” असे म्हटले जाते. या संचारी भावात एकूण ३३ प्रकारचे भाव सांगितले आहेत. तर रसांचे एकूण ११ प्रकार नोंदवले आहेत. यामधील एक आहे हास्य रस. हे सर्वप्रकार भारतीय नृत्य शैलीत अत्यंत महत्वाचे समजले जातात. हास्य हे आमच्या आनंदी जीवनाचे मूख्य सूत्र आहे जे हल्ली दुर्मिळ होत चालले आहे. आम्ही दिवसभरातुन किती वेळी हसतो? हा एक संशोधनाचा विषय आहे. भारतीय आद्य लोककलेतील सोंगाड्या वा विदुषक हा हास्याचा पूर्वज म्हणायला हरकत नाही. नंतरच्या काळात नाट्य आणि चित्रपट या आधुनिक कलाप्रकारांनी हास्य टिकवून ठेवले हे त्यांचे उपकारच म्हणायले हवे. भारतीय चित्रपट हा नायक/नायिका, खलनायक, संगीत आणि विनोद या चार खांबावर आजही टिकून आहे. किंबहुना हे चार अंग चित्रपट बघायला भाग पाडतात.

    १९४०-५० च्या दशकात चित्रपटसृष्टी जसजशी सर्वांगाने बहरू लागली तसतसे चित्रपटांचे विषयही बदलू लागले. या काळात विनोदी अभिनेत्यानां चित्रपटातुन महत्वाचे स्थानही मिळू लागले. मा. भगवान, गोप, आगा, जॉनी वॉकर, किशोर कुमार,राजेंद्रनाथ, मुक्री, आय. एस. जोहर, धूमाळ, असित सेन, मारूती, सुंदर, टूणटूण, मनोरमा, केष्टो मुखर्जी, जगदीप, देवेन वर्मा, मोहनचोटी अशी एक लांबलचक फळी तयार झाली. मूख्य नायकाचा मित्र वा हितचिंतक असे हे पात्र असे. हसविण्या बरोबरच चित्रपट कथेला पूढे नेण्याचे काम हे विनोद वीर करत असत. या सर्व नावात भगवानदादा, जॉनी वॉकर आणि किशोर कुमार यांची पडद्यावरची एंट्री धूम करीत असे. या नामावलीत आणखी एका नावाची भर पडणार होती. १९४३ मध्ये भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतला पहिला सूपरडूपर चित्रपट “किस्मत” रिलीज झाला. या चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शक होते मुमताज अली. त्याकाळातले सर्वात प्रसिद्ध रंगभूमी अभिनेता व नृत्य दिग्दर्शक म्हणून त्यांचा नाव लौकिक होता. त्यांना एकूण आठ मुलं होती. किस्मतचे नृत्य दिग्दर्शन करतानां त्यांच्या दुसाऱ्या क्रमांकाच्या ११ वर्षाच्या मुलांने या चित्रपटात बाल कलावंत म्हणून भूमिका केली. या चित्रपटाने अशोक कूमार या अभिनेत्याला सुपरस्टार केले. भारतीय चित्रपटात नायकाचा सर्वप्रथम डबल रोल याच चित्रपटाने दिला. यातील या छोट्या बाल कलावंताने पूढे अशोककुमार बरोबर अनेक चित्रपट केले. “मेहमूद अली” हे त्याचे नाव. पूढे चित्रपट सृष्टीतला सुप्रसिद्ध विनोद वीर “मेहमूद” झाला. भगवान दादा, गोप व जॉनी वॉकर या विनोद वीरा नंतर नंतर सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली ती मेहमूदला. एक काळ हिंदी चित्रपटसृष्टीतला असा होता की मेहमूद हा चित्रपटात असायलाय हवा असे निर्माते व वितरक आवर्जुन सांगत. फक्त मेहमूदसाठी चित्रपट बघणारा एक खूप मोठा वर्ग त्याकाळी तयार झाला होता. मात्र मेहमूदला यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला.

    मेहमूदचा जन्म मुंबईचा. तरूण मेहमूदने अभिनेता होण्यापूर्वी सर्व प्रकारची पडेल ती कामे केली. लोकलमध्ये ट्रॉफी विकणे, सिने इंडस्ट्रीत ड्रायव्हरची गरज असते म्हणून ड्रायव्हर झाले. किस्मतचे दिग्दर्शक ग्यान मुखर्जी, गीतकार भरत व्यास,राजा मेंहदी अली खान, निर्माते पी.एल. संतोषी (दामिनी फेम दिग्दर्शक राजकुमार संतोषीचे वडील) यांचे ड्रायव्हर म्हणूनही काम केले. सुप्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारीला टेबल टेनीस शिकविण्याची नोकरी मेहमूदला मिळाली. याच काळात मीना कुमारीची बहिण मधू च्या प्रेमात तो पडला व नंतर त्यांनी लग्न केले. मुलही झाली. संसार जरा मोठा झाल्यामुळे अधिक पैसे कमाविण्यासाठी आपण अभिनय करायला हवा असे त्याचे मत झाले आणि त्याने गंभीरपणे हे मनावर घेतले. एकदा “नादान” नावाच्या चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते. मधूबाला या चित्रपटाची नायिका होती. तिच्या समोर एक ज्युनिअर कलाकार रिटेक वर रिटेक देत होता पण सीन ओके होत नव्हता. शेवटी दिग्दर्शकाने मेहमूदला संवाद म्हणायला लावले आणि टेक ओके झाला. मेहमूदला याचे ३०० रूपये मिळाले. त्यावेळी ड्रायव्हर म्हणून त्याला केवळ महिना ७५ रूपये मिळत असत. मग त्याने ड्रायव्हरचे काम सोडले व ज्युनिअर आर्टिस्ट असोशिएशनच्या यादीत आपल्या नावाची नोंद केली. या नंतर मग त्याने बिमल रॉयचा ‘दो बिघा जमीन’, त्रिलोक जेटलीचा ‘गोदान’, गुरूदत्तचा ‘प्यासा’, जागृती, सीआयडी वगेरे चित्रपटात लहान सहान कामे केली. पण आणखीही लक्ष वेधून घेणारी भूमिका त्याला मिळाली नव्हती.

    एव्हीएम ही दक्षिणेतील प्रसिद्ध चित्रपट संस्था. १९५६ मध्ये या संस्थेचा “मिस मेरी” नावाच्या चित्रपटाची निर्मिती होत होती. मीना कुमारी व जेमिनी गणेशन मूख्य भूमिकेत होते. मेहमूद स्क्रीन टेस्टसाठी तेथे गेला पण तो या टेस्टमध्ये नापास झाला. टेस्ट घेणाऱ्यांनी त्याला स्पष्ट सांगितले की – ‘तू आयुष्यात कधीही अभिनेता होऊ शकणार नाहीस तेव्हा हा विचार डोक्यातुन काढून टाक.’ आणि काय गंमत बघा याच एव्हीएम बॅनरने १५ वर्षा नंतर १९७१ मध्ये एक चित्रपट बनवला “मै सुंदर हुँ” आणि मुख्य भूमिकेत होता मेहमूद. असाच वाईट अनुभव व कडवे बोल त्याला आणखी एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने सुनावले होते. कमाल अमरोही हे मेहमूदचे दूरचे नातेवाईक. एकदा तो त्याच्याकडे काम मागायला गेला. तेव्हा कमाल अमरोही म्हणाले- “तू मूमताज अलीचा मुलगा आहेस याचा अर्थ तू अभिनेता होऊ शकलाच पाहिजे असे काही नाही. हवे तर मी तूला थोडी आर्थिक मदत करतो, एखादा छोटा मोठा धंदा कर”.या वेळी मात्र या कडव्या बोलानां मेहमूदने आव्हान म्हणूनच स्विकारले. याच वेळी त्याला बी.आर.चोप्राच्या कॅम्प मधून बोलावणे आले. बी.आर. फिल्मस् ही नामवंत संस्था. एक ही रास्ता या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला बोलावण्यात आले. पण तिथून आपल्याला कसे काय बोलावणे आले हे त्याला समजेना. नंतर माहिती घेतल्यावर त्याला कळले की त्याच्या बायकोने मीना कुमारीला मेहमूदसाठी शिफारस करायला लावले होते. मेहमूदने निर्मात्याला नम्रपणे नकार दिला व सांगितले- मला कोणाच्या शिफारशीवरून काम नको आहे. माझ्यातील क्षमताच मला एक दिवस काम मिळवून देईल. आणि खरोखरच तसेच घडले.

    मेहमूदचा संघर्ष चालूच होता. १९५८ मध्ये “परवरीश” नावाच्या चित्रपटात त्याला मोठी भूमिका मिळाली. चित्रपटाचा नायक राज कपूरच्या भावाची ही भूमिका होती. या भूमिकेने त्याला हास्य कलावंत म्हणून पहिली प्रसिद्धी मिळवून दिली. या नंतर १९५९ मध्ये दक्षिणेतल्या प्रसाद फिल्म या बॅनरच्या “छोटी बहन” मध्ये भूमिका मिळाली. हा चित्रपट त्याच्या आयुष्याचा टर्नींग पाँईट ठरला. मेहमूद आणि शुभा खोटे ही जोडगोळी या चित्रपटाने दिली आणि पूढे अनेक वर्षे ही जोडी हिट झाली. या चित्रपटाचे मानधन म्हणून मेहमूदला ६००० रूपये मिळाले जी त्याची आज पर्यंतची सर्वात मोठी कमाई होती. नंतर लगेच एका वर्षाने याच बॅनरच्या “ससूराल” मध्येही त्याला भूमिका मिळाली. राजेंद्र कुमार आणि बी. सरोजादेवी प्रमूख भूमिकेत होते.मग मात्र मेहमूदची गाडी सूसाट निघाली. पूढची १५ वर्षे त्याने धूमाकुळ घातला. अनेकदा तो नायकाला पण भारी पडला. त्याला कधी अंगविक्षेप करण्याची गरज पडली नाही.संवाद फेकीचे त्याचे स्वत:चे असे एक स्वतंत्र तंत्र होतं. नायकाचा सर्वात चांगला मित्र म्हणून तो अनेक चित्रपटात झळकला. चित्रपटात जवळपास नायकाच्या प्रत्येक फ्रेम मध्ये तो दिसायचा. खलनायकाची ऐशीतैशी नायकापेक्षा तोच अधिक करत असे. आता तो पूर्णपणे रूळला होता. मंझील, दिल तेरा दिवाना, छोटे नवाब, घर बसा के देखो, शबनम, चित्रलेखा, आरजू, पती पत्नी, मेहरबान, पत्थर के सनम, गुनाहो का देवता, प्यार किए जा, लव्ह इन टोकियो, आंखे, नील कमल, जवाब, जिगरी दोस्त इत्यादी चित्रपटात त्यांनी ध्माल केली. याच काळात तो आणि आय.एस.जोहर या जोडगोळीने धम्माल उडवून दिली. पण तो एवढ्यावरच समाधानी नव्हता त्याला अनेक प्रयोगही करायचे होते.

    १९६५ मध्ये राजा नवाथे यांचा “गुमनाम” चित्रपट आला. यात मेहमूदने पक्का हैद्राबादी आचारी हैद्राबादी बोली सकट आणला. लुंगी चट्ट्यापट्ट्याचे शर्ट, चॅपलिन टाईप मिशा असलेल्या या बटलरने ‘हम काले है तो क्या हुवा…’म्हणत हेलेन बरोबर अक्षरश: धूडगूस घातला. महानायक अमिताभला पण या गाण्याचा इतका मोह झाला की “देशप्रेमी” या चित्रपटात ‘खातुन की खिदमत मे…..’हे गाणे याच गाण्याची थेट कॉपी होते. तर ज्यु.मेहमूदलाही याच गाण्याच्या नकलेने चित्रपटात प्रवेश मिळवून दिला. शैलेंद्रने ‘हम काले है तो’ हे गाणे खास हैद्राबादी भाषेत लिहले होते. या चित्रपटात मेहमूद सगळ्याच कलाकारावर भारी पडला आहे. मेहमूदने आपल्या स्वभावाने अख्खी चित्रपटसृष्टी जवळ केली होती. स्वत: केलेले कष्ट तो आयुष्यभर विसरला नाही. सुरूवातीच्या काळात एकदा ‘मला कॉमेडी करण्याच्या टिप्स हव्या’ म्हणून तो किशोर कुमारकडे गेला होता. किशोर कुमारला त्याची क्षमता माहित होती. किशोर कुमार म्हणाला- “मी स्वत: कॉमेडियन असताना तुला का टिप्स देऊ?” यावर मेहमूद म्हणाला होता- “एक दिवस मी माझ्या सिनेमात तुला नक्की घेईन”. आणि मेहमूदने आपले वचन पाळले. १९६८ मध्ये मेहमूदने एन.सी.सिप्पी यांच्या सहकार्याने “पडोसन”ची निर्मित् केली. १९५२ मध्ये आलेल्या “पशेर बारी” या चित्रपटाचा रिमेक होता. सुनील दत्तने पहिल्यांदाच या चित्रपटात विनोदी भूमिका केली. यातील किशोर कुमार आणि मेहमूदच्या डान्स मास्टर अण्णाने धम्माल केलीयं. यातील “एक चतूर नार….”या गाण्याला आजही प्रचंड प्रतिसाद मिळतो. पचंमदाने काय अफलातुन गाणे रेकॉर्ड केले आहे.

    मेहमूदची शुभा खोटे नंतर ७० च्या दशकात अरूणा ईराणी बरोबरही मस्त जोडी जमली. दोघांची केमेस्ट्री छान जुळली होती. हमजोली या चित्रपटात मेहमूदने तिहेरी भूमिका करून धमाल केलीय. पृथ्वीराज,राज आणि रणजित कपूर अशी तिन अभिनेत्यांची धमाल पॅरोडी होती. “प्यार किए जा” मधील सिनेमा शौकिन बिलंदर पोरगं मेहमूद आणि त्याचा कवडीचुबंक बाप ओम प्रकाश यांनी जाम बहार उडवून दिलीयं. मराठीतला महेश कोठारेचा “धूम धडाका” याच चित्रपटावर बेतला आहे. अरूणा इराणी आणि अमिताभ यांना “बॉम्बे टू गोवा” या चित्रपटात नायक नायिकाच्या भूमिकाही मेहमूदनेच दिल्या. मेहमूद खूप मोठ्या मनाचा आणि नवीन टॅलेंट ओळखण्यात पारंगत होता. पचंमदा, राजेश रोशन, बासू मनोहारी याना त्यानेच स्वतंत्रपणे संगीत दिग्दर्शनची संधी दिली. मेहमूदने स्वत: अनेक चित्रपटाची निर्मिती केली. तृतीय पंथीय लोकानां चक्क स्वत:च्या चित्रपटात संधी दिली. “सज रही गली मेरी माँ…”.हे “कुवाँरा बाप” मधील गाणे आठवा. पोलिओग्रस्त मुलाची ही कथा होती. काय सुंदर आणि प्रगल्भ अभिनय केलाय यात मेहमूदने. मस्ताना, लाखो मे एक, मै सुंदर हूं, कुवाँरा बाप हे माझे खूप अवडते चित्रपट. यात सर्वच चित्रपटातुन मेहमूदने अक्षरश: प्रेक्षकानां रडवले आहे. यातली रिक्शांच्या शर्यतीत किती तरी खरे रिक्शावाले सामिल झाले होते. त्याच्या “साधू और शैतान” आणि “कुवाँरा बाप” मध्ये दिलीप कुमार, मुमताज, किशोरदा, अमिताभ, धमेंद्र, विनोदखन्ना,हेमा मालिनी, दारासिंग,असित सेन यांनी कुठलाही मोबदला न घेता काम केले. रिक्शावाला हा चित्रपटाचा नायक होऊ शकतो याची ग्वाही त्याने दिली. स्वत:चा वेगळा अंदाज, हावभाव बोलण्याचा ढंग याद्वारे मेहमूदने जवळपास ५ दशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आणि “किंग ऑफ कॉमेडी” ही पदवी प्रापत केली. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याने जवळपास ३०० चित्रपट केले व तीन वेळा फिल्म फेअर पुरस्कारही प्राप्त केला. १९९६ मध्ये शहारूख खानला घेऊन त्याने दुश्मन दुनिया नावाचा चित्रपट तयार केला पण तो साफ कोसळला. यात त्याने आपला मुलगा मंजूर अली याला लाँच केले होते.

    ७० च्या दशकात जगदीप, असरानी, पेंटल, देवेन वर्मा, कादीर खान यांच्या प्रभावामुळे मेहमूद काहीसा मागे फेकला गेला. त्याचे मधू बरोबरचे लग्न यशस्वी झाले नाही. १९६७ मध्ये दोघे विभक्त झाले. दुसरी पत्नी ट्रेसी ही अमेरिकन. या पत्नी पासून झालेले मन्झूर अली, मन्सूर अली आणि बेबी जीनी ही मुलगी…. पैकी मन्सूर अली हा लकी अली या नावाने सर्वाना परीचित आहे. तो अभिनेता आहे आणि त्याचा गझल आणि गीतांचा अल्बम प्रसिद्ध आहे. पहिल्या पत्नी पासून मसूद अली, मक्दूम अली, मासूम अली ही मुलं. ही सर्व मुलं आणि मुलगी जिनी त्याच्या “एक बाप छ बेटे” या चित्रपटात होती. त्याचा लहान भाऊ अन्वर अलीला पण त्याने अभिनेता म्हणून समोर आणले. तर मेहमूदची सख्खी बहिण मिनू मुमताज ही पण अभिनेत्री आहे. मेहमूदचे मूळ घराणे तामीळ आहे. त्याचे आजोबा (वडीलाचे वडील) एके काळी कर्नाटकचे नवाब होते त्यामुळे दाक्षिणात्य भाषेवरील प्रेम लक्षात येते. मेहमूद घोड्याच्या रेसचा शौकिन होता.बंगलोरला त्याचा स्वत:चा घोडयांचा तबेला होता.त्याचे वडीलावर अफाट प्रेम होते. त्याच्या कुवाँरा बाप या चित्रपटात त्याच्या वडीलांनी छोटी भूमिका केली आहे जी त्यांची शेवटची भूमिका होती. वडीलाच्या कबरी शेजारी मेहमूदने आपल्या कबरीचा जागा आगोदरच तयार करून ठेवली होती. २३ जुलै २००४ मध्ये अमेरिकेच्या पेनिसिल्व्हेनिया शहरात वयाच्या ७२ व्या वर्षी मेहमूदने त्याच्या पाठीवरच्या ऑक्सिजनच्या सिलेडंर मधून झोपेतच शेवटचा श्वास घेतला.

    असं म्हटलं जातं की अस्सल विनोदाच्या पायतळी वेदनांचा पाया असतो. चॅर्ली चॅप्लीनने आयुष्यात प्रचंड सहन केले होते कदाचित त्यामुळेच लोकानां तो इतकं खळखळून हसवू शकला. मेहमूदचे ही कदाचित असेच असावे. त्याच्या उतरत्या काळात हा माणूस प्रचंड एकटा पडला नव्हे एकाकी झाला. त्याची एक प्रदीर्घ मुलाखत मी युट्यूब वर बघीतली होती. या मुलाखतीत मेहमूद स्वत:चे कुटूंबीय व चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंता बद्दल भरभरून बोलला आहे. यात अमिताभ बद्दल जवळपास मिनिटांचा व्हिडीओ आहे. ज्या अमिताभला कधी काळी त्याने मदत केली होती ती सर्व हा महा नायक का विसरला असावा याचं गूढ समजत नाही. अमिताभ किशोर कुमार आणि मेहमूद यांच्या अत्यंविधीला गेले नव्हते हे एक सत्य आहे. पडद्यावरच्या ज्या मेहमूदने लाखो प्रेक्षकानां चार दशके हसवले, हसता हसता लोळवले त्या “कॉमेडी ऑफ द किंग”ला मी या मुलाखतीत ढसाढसा रडतानां बघितले. उतार वयातील त्याची वाढलेली पांढरी दाढी आणि नाकाला लावलेले ऑक्सिजनचे नळकांडे बघून – “हाच का तो मेहमूद ज्याने आपल्या हास्यातुन आम्हाला जगण्यासाठी प्राण वायू दिला होता” हा विचार मनाला बोचणी देत होता. आजही जेव्हा केंव्हा माझ्या मनावर मळभ दाटून येते तेव्हा मी- पडोसनचे एक चतूर नार…बघतो आणि नव्या उर्मीने कामाला लागतो.

    -दासू भगत (२३ जुलै २०१७)