टाऊन हॉल ते फाऊंटनचा परिसर हा इथला एक टप्पा. हा “टाऊन हॉल” म्हणजेच सध्या आपण बघतो ती “एशियाटिक लायब्ररी”ची सुंदर इमारत. ही इमारत “दोरिक” या जुन्या ग्रीक शैलीत बांधली असून तीला ३० पायर्या आहेत.
संस्कार हे संस्कार असतात
माझ्या कोकणावर काही तरी लिहावं हे बरेच दिवस माझ्या डोक्यात होतं ते ह्या लेखाच्या रुपात प्रकट झालं आणि मराठीसृष्टीच्या माध्यमातुन माझ्या वाचक मित्रांसाठी……..
काही शब्द असे असतात की जे उच्चारताच हमखास कशाची तरी आठवण येते. काही ब्रॅंडस आपल्या डोक्यात इतके फिट्ट बसलेले असतात की त्यांच्या लोगोची अक्षरं जरी दिसली तरीही आपण पुढचं न वाचता त्या वस्तूची खरेदी करतो. यामुळेच बाजारात अनेक नामांकित ब्रॅंडसच्या वस्तूंच्या नकली मालाची मोठी बाजारपेठ तयार झालेय.
कधीकधी अक्षरांची फिरवाफिरव तर कधी स्पेलिंगमधला बदल... नकली माल बनवणारे कशाचाही आधार घेतात.
बर्फाचा थंडगार गोळा विकणार्या फोटोतल्या या विक्रेत्याने मात्र कोणताही नकली माल विकण्याचा प्रयत्न केलेला नाही. मात्र त्याने “गुगल”ची लोकप्रियता बघून त्याच्या गाडीवर असा काही बोर्ड लावलाय की गिर्हाईकाचे लक्ष हमखास त्याच्याकडे गेलेच पाहिजे. त्याने नुसती अक्षरांची फिरवाफिरवच नाही केली... तर “गुगल”चं होम पेजच आपल्या बोर्डवर प्रिंट करुन घेतलंय.
ही आहे भारतीय क्रियेटिव्हिटीची कमाल !!
जवळची ब्राऊन शुगर संपल्यावर माझी चीडचीड वाढली होती , मला ब्राऊन शुगर न मिळाल्याने त्रास होतोय हे मित्रांना सांगणे देखील लज्जास्पद वाटत होते , कारण मग त्यांना समजले असते मी ब्राऊन शुगरच्या आहारी गेलोय ते ( एखाद्या व्यसनीला आपण व्यसनी झालोय हे इतरांजवळ कबुल करायला खूप त्रास होतो , त्याचा अहंकार त्याला हे करू देत नाही ) त्यांनी माझ्याशी खोटे बोल्रून माझ्याजवळचा साठा संपवला होता या बद्दल त्यांचा खूप रागही आला होता .
क्रेडिट किवा डेबीट कार्डचा वापर करून खरेदी केल्यास ग्राहक आणि दुकानदार दोघांचेही बरेच श्रम वाचतात. परंतु, ग्राहकाने अदा
केलेली रक्कम दुकानदाराबरोबरच बँकांमध्येही विभागली जाते. यात दुकानदाराच्या नफ्यातील जवळजवळ अर्धी रक्कम खर्च होते असे दुकानदारांचे म्हणणे आहे. त्यामुळेच दुकानदार कार्ड पेमेंटपेक्षा रोखीने व्यवहार करण्यास प्राधान्य देतात.
भगवान श्रीकृष्णांचा जन्म मथुरेच्या कारागृहात झाला. सावरकरांच्या हिंदुत्व विचारांचा उगम अंदमानच्या कारागृहात झाला. काय सुंदर योगायोग आहे हा? कारागृहात जन्माला आलेले श्रीकृष्ण आणि सावरकरांचे हिंदुत्ववादी विचार आज आपल्याला संजिवनी देत आहेत.
आषाढ सुरु होतो तोच वारी चे वेध घेऊन...!! आम्ही सुद्धा गेलो होतो वारीला...!हे दुसरं वर्ष आमचं!! नोकऱ्या... शाळा कसं काय जमणार २१ दिवसांचा वारीचा सोहळा अनुभवायला वैगरे सारखे प्रश्न गेल्यावर्षी पासून अडगळीत गेले ते गेलेच.... माऊलीला भेटण्याची आमची इच्छा आणि तितकीच माऊलीची सुद्धा !!! अहो...जिथे जगतनियंता पाठीशी उभा तिथे इतर चिंता उभ्या राहतायत होय ? हां ... थोडा वेगळा केला प्रवास आम्ही पण वारी करून पांडुरंगाच्या पायी डोकं ठेवून आलो हे हि खरंय !!
सामानाची बांधाबांध करता करता वारकरी गेल्यावर्षीची वारी मनातून जगत असतो... आम्ही सुद्धा गेल्या वर्षीच्या आठवणीत रमलो..पांढरे सदरे ..उपरणी सगळी छान तयारी करून ठेवली आणि वारी ची चाहूल लागल्याबरोबर लगेच bookmyshow वर जागा धरून ठेवल्या... दिंडीत कसं काही वारकरी पुढे जाऊन पाल (तंबू)रोवून ठेवतात ना!!...हो नंतर उगाच प्रॉब्लेम नको ना? आणि आमची ठरलेली दिंडी बरं का .. काही ठरलेले... काही नवीन जोडले गेलेले वारकरी असे सगळे एकत्रच जातो आम्ही..!! एकमेकांच्या मनातल्या विठ्ठलाला अनुभवत... स्वतःच्या अंतरंगातल्या विठ्ठलाची अनुभूती घेत घेत त्या विठ्ठलाच्या वारी चा आनंद म्हणजे स्वर्गसुख !! जिवंतपणी मोक्ष अनुभवणं म्हणजे काय ते हे २१ दिवस शिकवून जातात आम्हाला!! आळंदीला कळस हलला आणि पालखीप्रस्थान झालं कि मग ... भेटी लागी जिवा लागलीसे आस !! ऊन..वारा..पाऊस कशाचीही तमा न बाळगता अखंड नामघोषात मन तल्लीन होऊन जातं ! रोजच्या जबाबदाऱ्या..मुलांच्या शाळा... स्वतःच्या नोकऱ्या या ऊन.. वाऱ्या... पावसासारख्याच आडमार्गी होत्या पण माऊली ने या सगळ्याचा भार सांभाळलेला होता त्यामुळे आम्हालाही विशेष चिंता नव्हतीच या कशाची!! वारीत वारकरी मोकळ्या वेळात सुद्धा नामस्मरण करीत असतात तसाच आमच्या whatsap गप्पांमधून पांडुरंग रंगू लागला ..तो रंगला आणि आम्हालाहि रंग चढू लागला त्याच्या भक्तीचा! असाच प्रवास करत करत दिवेघाट... जेजुरी...अगदी वाखरी पर्यंत येऊन पोहोचलो...सगळ्या दिंड्या एक होऊन माऊली भेटीला जातात तसंच पुणे-मुंबई अशी सगळी मंडळी आम्ही एक झालो.. पुढे चंद्रभागा तीरावर पुंडलिकाचं मंदिर दिसलं आणि साद आली ... "आलोच!!" नवखे वारकरी ना आम्ही सगळे!..देवदर्शन नीट व्हायला हवं ना ! आणि पुंडलिका खेरीज कोण भेट घडवून देणार माऊलीची आम्हाला?? एव्हाना आमच्या आषाढीचा दिवस उजाडला...आज माऊली ची भेट होणार हि भावनाच हृदयात उफाळून येत होती सारखी...आणि पावलांनी वाट धरली......... षण्मुखानंदची!!!!
एरवी साठी ऑडिटोरियम पण आज मात्र सगळ्यांसाठी मंदिर बनून गेला...! त्यात प्रवेशताच गंध... बुक्क्याच्या टिक्याने अंतर्बाह्य विठ्ठलमय झालो...! वेगवेगळे वेष परिधान केलेले... वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले सगळे पण कपाळावरच्या तो एक टिळा इतका उठून दिसत होता कि आम्ही सगळेच आता भागवत !! राम कृष्ण हरी कानावर आलं आणि स्तब्ध झालो ...संथ लयीच्या नामस्मरणापासून ते गजर होई पर्यंत!!!जणू काही भगवंताचं विश्वरूप दर्शन घडत होतं...स्वराभिषेक होत होता माऊलीच्या पायावर!!!
राम कृष्ण हरी ने वातावरण भरून टाकलं तिथलं!! अभंगरसात न्हाऊन निघत असतानाच कर्नाटकातून दिसणारा विठ्ठल सुद्धा अनुभवला !...विश्वरूप पाहून थक्क झालेल्या मनाने हात जोडले गेले आणि रंध्रा रंध्रा ने नामघोष केला ...... जगदोद्धारणा!! विठ्ठल आता पुरेपूर सामावला मनामध्ये..... 'आता अंतरंग झाले पांडुरंग........' हे शब्द जगला तिथला प्रत्येक जण!! आता तिथे बाकी कोणीच उरलं नाही... गायक नाही... वादक नाही...रसिक नाही... तिथे कणाकणात होता फक्त आणि फक्त 'विठ्ठल'!! अभंगशृंखला सुरु झाली... नामदेव पायरीच दर्शन घेऊन एक एक पाऊल माऊलीच्या गाभाऱ्याकडे जाऊ लागलो !! माऊलीचं साजरं रूप डोळे भरून अनुभवलं आणि विठ्ठला.... मायबापा ... आमच्या मनातल्या भक्तीचा सूर असाच निरागस राहो ही प्रार्थना करून त्याच्या पायावर नतमस्तक झालो!!
मोरया इंटरटनमेंट Morya Entertainment(पुणे) आणि Mukesh Patil ventures (मुंबई ) या दोन पालख्यांनी आमची आषाढवारी.... 'अभंगवारी' घडवून आणली !! गेली ४ वर्ष ज्यांच्या स्वरांमधून या वारीची ओढ लावली आणि पुंडलिकाच्या भक्तिभावाने ज्या स्वरांनी आम्हाला विठ्ठलाचं दर्शन घडवून आणलं ते म्हणजे आमचे सर! या वर्षीच्या सोहळ्याचं अजून एक वैशिष्टय म्हणजे वैभव जोशी यांनी लिहिलेली आणि प्राजक्ता माळी यांनी निवेदनातून ती उत्तमरीत्या साकारलेली संहिता !! माऊलीच्या गळ्यात नानाविध अलंकार असले तरी तुळशीहाराने माऊलीचं रूप खुलून दिसतं. या वर्षी Soniya Saanchi दि ने सरांसाठी बनवलेला कुर्ता म्हणजे सरांच्या स्वरांमधून अनुभवलेल्या भक्तीचं 'मूर्त स्वरूप' भासला!!
वारीत चालणं हे भाग्यच पण कर्तव्यात बांधले गेलेल्यां आमच्यासारख्यांच्या धावपळीच्या आयुष्याला वारीचा रंग देऊन विठ्ठला दर्शनाची अनुभूती देणारे सरांचे स्वर....म्हणजे माऊलीने आम्हाला दिलेली सगळ्यात गोड आणि मौल्यवान भेट !!
आज तिथून परतणाऱ्या प्रत्येक पावलाने मनात हा स्वररूपी विठ्ठल सामावून घेतला आणि प्रत्येकाच्या मनातल्या शुद्ध भक्तीभावनेने न्हाऊन निघालेला हा सोहळा संपन्न झाला ती पुढल्या वर्षीची वारीची आस घेऊनच !!
©अपर्णा
अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर वारसदार म्हणून अनेक नावे पुढे आली. पण, पृथ्वीराज चव्हाण आणि सुशिलकुमार शिंदे ही दोन नावे आघाडीवर राहिली पण निवड पृथ्वीराजजींचीच झाली. मुख्यमंत्रीपदाच्या निवडीत पक्षनिष्ठा आणि निष्कलंक चारित्र्य हे महत्त्वाचे घटक होते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयातील कामाचा अनुभव लक्षात घेता पृथ्वीराजींची निवड सार्थ ठरते.
मुळचे स्पॅनिश असलेले परंतु क्युबातच कित्येक पिढ्या गेल्यामुळे वेगळी अस्मिता जोपासणार्या क्युबन जनतेने १८९८ मध्ये क्युबात क्रांति केलि. अमेरिकेने या क्रांतीत मदत करून आपले एक बाहुले सत्तेवर बसविले,या बाहुल्याचे नाव होते जनरल बातिस्टा . या बदल्यात अमेरिकेने क्युबातील टेलिफोन,वीज,साखर आदी महत्वाच्या व्यापारावर आपले नियंत्रण मिळविले. यात क्युबाची जनता भरडली जाऊ लागली. या असंतोषाला वाचा फोडली एका तरुण वकिलाने त्याचे नाव होते फिडेल कास्त्रो . लष्करी राजवट उलथविण्यासाठी फिडेलने देखील शस्त्र उचललि. अनेक घडामोडी घडून सत्तेची सूत्रे कॅस्त्रोच्या हातात आलि. कॅस्त्रोने सर्वप्रथम बहुराष्ट्रीय कंपन्यांची हकालपट्टी सुरु केली,हे पाहून सोवियत रशियाचा क्युबामधील रस जागा झाला.
तत्कालीन सोवियत अध्यक्ष निकिता कृश्चेव यांनी "साम्यवाद स्वीकारल्यास रशिया क्युबाला सर्वतोपरी मदत करेल असा निरोप कॅस्त्रोंना पाठविला ज्याला त्यांनी मान्यता दिली.अमेरिकेच्या मुख्य भूमीपासून ९० किमी अंतरावर रशियन कळपातला साम्यवादी क्युबा अमेरिकेच्या डोळ्यात सलू लागला.क्युबन अध्यक्ष फिडेल यांना मारण्यासाठी साठि सी आय ए ने १०/१५ वेळा जीवघेणे हल्ले केले परंतु त्यातून कॅस्त्रो सहीसलामत वाचले.
इकडे रशियाने गुपचूप कारवाइद्वारे क्युबात अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र तळ उभारायचे ठरविले ,त्याकाळात अमेरिका क्युबन समुद्रात जहाजांवरिल विमानांद्वारे गस्त घालत असल्यामुळे इतकी मोठी मोहीम सुरवातीला त्यांच्या नजरेतून निसटली.परंतु ६२ च्या सप्टेंबर मध्ये अमेरिकी विमांनाना सहा रशियन जहाजे मोठ्या कंटेनरसह क्युबाच्या दिशेने जाताना दिसल्याचा रिपोर्ट वर पाठविला गेला.
त्याआधी चार वर्षे रशियाने इल्युजन २८ हि बॉम्बर विमाने मित्र देशांना वाटल्याचे अमेरिकेला माहित होते त्यामुळे १४०० किमी प्रहार मर्यादा असलेली किमान २१ विमाने क्युबाला पाठविण्यात आली असल्याचा निष्कर्ष अमेरिकेने काढला जो खळबळ माजविण्यास पुरेसा होता. आता अंदाजपंचे काम करण्यापेक्षा बंदी घातलेल्या यु-२ या हेरगिरी विमानांना अमेरिकेने मोकळे सोडले. ज्यात उच्च दर्जाचे कॅमेरे बसविलेले होते. या विमानांनी भरारी मारून त्यातल्या फिल्म्स सी आय ए च्या ताब्यात दिल्या. मोठ्या प्रोजेक्टरवर त्याचे निरीक्षण करून तपासणी करण्यात आली, दोन दिवस हे काम चालू होते. एका तज्ञाच्या लक्षात एक क्रेन सारखी लौन्चर्स आली,जी १९०० किमीच्या अण्वस्त्र वाहू क्षेपणास्त्रा साठी वापरली जात. त्याच फिल्ममध्ये ५०० सैनिक मावतील एवढे तंबू,क्षेपणास्त्र वाहक वाहनं,आठ क्षेपणास्त्र ,इंधनाचे tankars आदी दिसत होते. तिथे सुरु असलेले काम ४००० किमी मारक क्षमता असलेल्या तळाचे सुरु आहे हे लक्षात येताच सर्वांचे धाबे दणाणले .
तज्ञांनी आपले निष्कर्ष सुरक्षा सल्लागारांसमोर मांडले,त्यांनी लगेच अध्यक्ष जोन केनेडी यांची भेट घेऊन स्थिती स्पष्ट केलि. अध्यक्षांनी चेहर्यावर चिंता न दाखविता त्या दिवसाचे कार्यक्रम नेहमीप्रमाणे पार पाडले. दुसर्या दिवशी महत्वाची बैठक पार पाडली ज्यात सर्व निर्णय केनेडिंवर सोपविण्यात आला. रशियाच्या या हालचालिंकडे दुर्लक्ष करणे किंवा त्यांना प्रतिकार करणे एवढेच पर्याय त्यांच्यासमोर होते. लोटांगण घालायची सवय लागल्यास त्याचे परिणाम गंभीर ठरले असते,तर युद्धाला तोंड फोडल्यास अणु युद्धाला प्रारंभ होणार होता. जगाचे भवितव्य धोक्यात आले होते. केनेडिंनि कठोर वृत्तीचे प्रदर्शन करून अमेरिकी सैन्याला डिफ़कोन-३ चा आदेश दिला. हा आदेश म्हणजे युद्ध हालचालिंना सुरवात करायची होति. या आदेशाच्या पाच पायऱ्या असतात.डिफ़कोन -५ म्हणजे शांतता काळ,डिफ़कोन -२ म्हणजे युद्धासाठी तयार राहाणे आणि डिफ़कोन -१ म्हणजे प्रत्यक्ष युद्धाला सुरवात.
आंतरखंडिय अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे तयार ठेवण्यात आली,पाणबुड्या जगभरातील आपापल्या नेमलेल्या जागेवर निघाल्या,तीन विमानवाहू जहाजे,पाच विनाशिका,एक गायडेड मिसाईल क्रुजर,आणि ६ युद्ध नौकाना क्युबन समुद्राची नाकेबंदी करायची होती त्यांना डिफ़कोन -२ चा आदेश होता व गरज भासल्यास डिफ़कोन-१ चा आदेश आल्यावर प्रत्यक्ष हल्ला करायचा होता.
२२ ऑक्टोबरला केनेडिंनि अमेरिकन जनतेला उद्देशून भाषण केले त्यात जनतेला परिस्थितीची कल्पना देण्यात आलि. त्यात रशियाला इशारा देण्यात आला. हे भाषण म्हणजे युद्धाला प्रत्यक्ष तोंड फोडण्याची तयारी होति. या भाषणा नंतर अचानकपणे रशियन अध्यक्ष कृश्चेव यांनी एक पाऊल मागे घेऊन,क्युबाची नाकेबंदी दूर केल्यास आणखी क्षेपणास्त्रे क्युबात न पाठविण्याची तयारी दाखविलि.
परंतु यात आधीच पाठविलेल्या अण्वस्त्रांबद्दल उल्लेख न्हवता,अमेरिकेला हा प्रस्ताव मान्यच न्हवता. २४ ऑक्टोबरला क्युबाला निघालेल्या २५ रशियन जहांजापैकि १२ रशियन नौका अमेरिकन युद्ध नौकांच्या समोरासमोर आल्या. त्यात त्यांना सुरक्षा देणारया पाण बुड्याहि होत्या. त्यांना अडविण्यात आले. सुदैवाने रशियन जहाजे पुन्हा माघारी गेली,कुणि चुकून जरी एक बटन दाबले असते तर जगाने न भूतो न भविष्यति असा संहार पाहिला असता. ज्यात संपुर्ण मानवजात नष्ट झाली असति.
परंतु माघार घ्यावी लागलेल्या क्रुश्चेवनि अमेरिकेची हेरगिरी करणारी दोन यु-२ विमाने पाडून आपला राग व्यक्त केला. यावर केनेडिंनि संयम दाखविला कृश्चेवनि केनेडिंपुढे एक प्रस्ताव ठेवला त्यात तुर्कस्तानात असलेली क्षेपणास्त्रे अमेरीकेनी काढुन घ्यायची व त्याबदल्यात रशिया क्युबातील क्षेपणास्त्रे काढुन घेईल असे सांगितले. केनेडिंनि याला नकार देऊन बिनशर्त माघार घेण्याचा इशारा रशियाला दिला. क्रुश्चेवनि याला काहीच उत्तर दिले नाही,नाईलाजाने केनेडिंनि डिफ़कोन-२ चे आदेश सैन्याला दिले. पण डिफ़कोन-१ चा आदेश देण्याची वेळच आली नाहि. २८ ऑक्टोबरला निकिता क्रुश्चेव यांनि क्युबातील अस्त्रे काढुन घेत आहोत असे जाहीर केले.
परंतु यात रशियाच्या बाजूने माघार घेतली गेली असली तरी ३० ऑक्टोबर १९६२ हा दिवस प्रत्यक्ष युद्धाचा दिवस म्हणून अमेरिकन अध्यक्षांनी निश्चित केला होता हे नंतर उघड झालेल्या कागदपत्रांत कळाले. त्या काळात ४/५ हजार अणुबॉम्ब असलेल्या या देशांनी संपूर्ण मानवजातीचे भवितव्य आपल्या साम्राज्यवादाच्या हव्यासापोटी पणाला लावलेले होते.
जय हिंद
तुषार दामगुडे
Copyright © 2025 | Marathisrushti