(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • प्रेमःएक आठवणींची कविता. (क्रमशः पुढे चालू…..)

    प्रेमःएक आठवणींची कविता. क्रमशः पुढे चालू….

  • विवाह संस्था

    उंची वस्त्रं, दागदागिने, शृंगार, आराम, संपत्ती यापैकी कशाचंच या आश्रमाला वावडं नाही. पण त्याचबरोबर या आश्रमावर जबाबदायाही तितक्याच समाजातील बालकं आणि वृद्ध यांच्या संरक्षणाची जबाबदारी गृहस्थाश्रमाची संन्यासाश्रमातील ईशसेवा आणि जनसेवा करीत राहणाऱ्या विरक्तांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी गृहस्थांनीच पाहायची. आयुष्यातल्या या हक्काची आणि कर्तव्याची जाणीव आपल्या विवाहविधीमध्ये पुरेपूर करून दिली जाते.

  • ठाणे जिल्ह्यातील नियतकालिके

    मराठीतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ पंडित बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी प्रकाशित केले. ठाण्यात मात्र पहिले वृत्तपत्र २२ जुलै १८६६ रोजी निघाले. त्या वृत्तपत्राचे नाव होते ‘अरुणोदय.’ हे वृत्तपत्र काशिनाथ विष्णू फडके यांनी काढले. त्यांनी जांभळीनाक्यावरील पोलिस चौकीजवळ आपला छापखाना टाकला. फडके यांचे हे वर्तमानपत्र ठाणे जिल्ह्यातील पहिले साप्ताहिक होय.

  • कन्फेशन.. अपराधांची कबुली (बेवड्याची डायरी – भाग ४४ वा)

    कन्फेशन ' करताना अथवा आपल्या चुकांचा कबुली जवाब देताना पाचव्या पायरीत जो आदरणीय व्यक्तीचा उल्लेख आहे त्या बाबतीत सांगताना सरांनी आजच्या समूह उपचारात... अशी आदरणीय व्यक्ती कोण असावी असे आपल्याला वाटते ? हा प्रश्न सर्वाना विचारला ..एकाने सांगितले की त्याचे आजोबा त्याच्या दृष्टीने आदरणीय आहेत ..एकाने त्याच्या एका यशस्वी मित्राचे नाव सांगितले ..मी माझ्या एका नातलगाचे नाव सांगितले जो अध्यात्मिक विचारांचा होता ..सर्वांची उत्तरे ऐकून समाधानाने स्मित करत सर बोलू लागले ..मित्रानो , आपण योग्य विचार करत आहात ..पाचव्या पायरीत ईश्वराजवळ म्हणजे ईश्वरासामान असलेल्या आपल्या नातलगांपाशी ..स्वताच्या अंतर्मनाशी तसेच अन्य आदरणीय व्यक्तीजवळ आपल्या गतजीवनातील चुकांची तंतोतंत कबुली देण्यास सांगितले आहे ..

    या कबुलीजबाबात एक अडचण अशी येते की आपण गतजीवनात केलेल्या अनेक चुकांची स्पष्ट कबुली आपल्या जवळच्या नातलगांपाशी देणे कठीण असते ..अनेकदा आपण नशेत ..अथवा नशेसाठी पैसे मिळवण्यासाठी ..किवा नशेत असताना एखाद्या विकाराच्या आहारी जावून खूप खालच्या पातळीचे अनैतिक वर्तन केले असल्याची शक्यता असते ..जे वर्तन जवळच्या नातेवाईकांना कधीच समजू नये अशी आपली इच्छा असते ..कारण त्यातून त्यांना धक्का बसण्याची शक्यता असते ..किवा त्या गोष्टी सांगितल्याने नातलगांशी असलेले आपले जिव्हाळ्याचे संबंध बिघडण्याची शक्यता असते ..उदा . जर नशेच्या भरात मित्रांच्या आग्रहाने एखाद्याने विवाहित असूनही वेश्यागमन केले असेल ..विवाहबाह्य संबंध ठेवले असतील ..तर ते त्याला जवळच्या नातेवाईकांजवळ कबुल करणे कठीण असते ..त्यामुळे त्याच्या नातेसंबंधात बिघाड होण्याची शक्यता वाढते ..किवा पत्नी ..आईवडील ..भावंडे यांच्या दृष्टीने एखादा अक्षम्य गुन्हा केला असेल तर त्याबाबत कबुली त्यांच्याजवळच देणे शक्य नसते ..अशा वेळी मनमोकळे करण्यासाठी म्हणून आदरणीय व्यक्तीचा उल्लेख केलेला आहे ..

    ही आदरणीय व्यक्ती बहुधा जवळच्या नात्यामधील नसते ..अथवा जी आपल्या कबुलीजवाबाने विचलित होईल अशी नसावी ..तसेच आपण केलेल्या कबुलीचा गैरफायदा घेईल अशीही नसावी ही दक्षता घ्यावी लागते ..किवा ती व्यक्ती अशा गोष्टी खाजगी ठेवेल याची आपल्याला खात्री असायला हवी,,तसेच आपल्याला आपण केलेल्या चुकीबद्दल दोष न देता ...समजून घेवून पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी मार्गदर्शन करणारी असली पाहिजे ..कबुलीजवाबासाठी अशी आदरणीय व्यक्ती निवडणे हे हुशारीचे काम आहे ..उगाच भावनेच्या भरात कोणाजवळही अशी कबुली देणे नक्कीच हितावह नसते ..

    सरांनी या बाबत स्पष्ट केले की बहुधा अशी आदरणीय व्यक्ती म्हणून आपण अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमसच्या जेष्ठ सदस्याची निवड करू शकतो .. ज्याला अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमस मध्ये ' स्पाँन्सर ' म्हंटले जाते ..किवा ही व्यक्ती एखादा व्यावसायिक समुपदेशक ..किवा व्यसनमुक्ती केंद्रातील जवाबदार समुपदेशक असली पाहिजे ..अन्यथा आपल्या कबुलीजवाबाने आपली अपराधीपणाची बोच कमी होऊन पुढील योग्य मार्गदर्शन मिळण्याऐवजी एखाद्या नवीन संकटाला सामोरे जावे लागेल ..ही आदरणीय व्यक्ती जर व्यसनमुक्तीच्या बाबत आपल्यालों मदत करणारी असली तर अधिक उत्तम असते ..अशी व्यक्ती निवडताना आपण नीट काळजी घेतली पाहिजे ..आपला कबुलीजवाब आपल्या पुढील मार्गात अडथळा होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे ..असे सांगत सरांनी पाचव्या पायरीवरील चर्चा संपली असे जाहीर केले ..व्यसनी व्यक्तीचा स्वभाव बहुधा अनैतिकतेकडे झुकणारा असतो त्यामुळे त्याने व्यसनाच्या काळात कौटुंबिक दृष्ट्या , सामाजिक दृष्ट्या , कायद्याच्या दृष्टीने... काही गुन्हे केले असण्याची शक्यता असते ..अशा वेळी कबुलीजवाब जपून द्यावा हे सरांचे म्हणणे आम्हाला तंतोतंत पटले ..

    नंतर सरांनी आमच्यातील पाटील नावाच्या एकाला उभे केले व त्याला विचारले ' तू परवा रविवारी डिस्चार्ज झालेल्या कोणाजवळ आपल्या घराचा पत्ता व पत्नीचा फोन नंबर दिला होतास ते सांग ? सरांच्या या प्रश्नावर पाटील हडबडला ..त्याचा चेहरा गोंधळल्या सारखा झाला ..' नाही सर ..मी कोणालाच पत्ता व नंबर दिलेला नाही ..शपथ " असे म्हणू लागला ..हे नवीन काय ते आम्हाला समजेना ..सरांनी पुन्हा पाटीलला जरा दरडावून विचारले .' खरे सांग तू ..आम्हाला सगळे समजले आहे ..' यावर पाटीलने मान खाली घातली ...आम्हाला समजले की पाटील खोटे बोलतोय म्हणून ..
    सर पुढे सांगू लागले ' व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर लवकरात लवकर पडावे हे सर्वांनाच वाटणे स्वाभाविक आहे ..परंतु त्यासाठी आपण चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नये ..इथे वेगवेगळ्या स्वभावाचे ..वेगवेगळ्या संस्कृतीचे ..वेगवेगळी नशा करणारे लोक उपचार घेत आहेत ..या पैकी कोण मनापासून उपचार घेतोय हे समजणे कठीण आहे ..

    कारण व्यसनी व्यक्ती हा दुहेरी व्यक्तिमत्वाचा किवा ढोंगी प्रवृत्तीचा असतो ..तेव्हा येथे मैत्री करताना आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे ..इथून बाहेर पडल्यावर येथे मैत्री झालेल्या मित्रांना बाहेर भेटणे धोकादायक असू शकते ..कारण जर त्या मित्राने पिणे सुरु केले तर आपणही त्याच्या सोबत ' रीलॅप्स ' होऊ शकतो ..काही लोक डिस्चार्ज होणाऱ्या व्यक्ती जवळ आपल्या घरचा पत्ता किवा फोन नंबर देतात आणि सांगतात की माझ्या घरी जावून घरच्यांना सांग की मी खूप आजारी आहे ..इथे मला खूप त्रास होतोय ..मला उपाशी ठेवतात ..मारतात ..बांधून ठेवतात ..वगैरे ..म्हणजे घरचे लोक घाबरून लवकर मला डिस्चार्ज देतील ..मित्रानो हा मार्ग अत्यंत चुकीचा आणि खोटेपणाचा आहे ..आपण बाहेर व्यसने करून ..खोटे वागून कुटुंबियांना भरपूर त्रास दिलेला आहे ..आता येथे असताना पण आपण असे खोटे निरोप बाहेर पाठवून घरच्या मंडळीना त्रासात टाकणे योग्य नाही..

    ..या पाटीलने परवा डिस्चार्ज होणाऱ्या एकाजवळ आपल्या पत्नीचा फोन नंबर दिला होता ..तिला लवकर घेवून जा असा निरोप देण्यासाठी ...त्या माणसाने डिस्चार्ज होऊन बाहेर पडल्यावर सरळ याच्या पत्नीला फोन करून ..हा इथे खूप वाईट अवस्थेत आहे असा स्वताचे नाव न सांगता खोटा निरोप दिला ..याची पत्नी घाबरली ..तिने आम्हाला फोन करून खरी माहिती विचारली ..आम्ही सर्व काही ठीक आहे ..या असल्या फोनवर विश्वास ठेवू नका असा तिला धीर दिला ..मात्र नंतर ज्याला नंबर दिला होता तो आता रात्री बेरात्री वारंवार फोन करून याच्या पत्नीला याला लवकर घरी घेवून या असा आग्रह करतोय ..एकदा तर त्याने म्हणे दारू पिवून याच्या पत्नीला फोन केला ..आता हे कितपत योग्य आहे हे तुम्हीच सांगा ..हे ऐकून आम्हाला सगळ्यांना त्या फोन करणाऱ्या व्यक्तीचा रागच आला ..तसेच त्याच्याजवळ पत्नीचा फोन नंबर देवून तिला फोन करायला लावणाऱ्या पाटीलचा देखील राग आला ..शेवटी ती व्यक्ती पत्नीला त्रास देतेय हे ऐकून पाटीलने सरांना त्याचे नाव सांगितले ..

    ( बाकी पुढील भागात )

    -- तुषार पांडुरंग नातू

    " मैत्री ' व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
    संपर्क..रवी पाध्ये - ९३७३१०६५२१ ..तुषार नातू - ९८५०३४५७८५

  • अंधभक्तांची गोची

    एकदा एक साधूसदृश बाबा बारमध्ये शिरले. तिथे जाताच तिथे बसलेले तरूण पोरं त्यानां पाहुन हसायला लागले.

  • घावन (खाद्ययात्रा)

    घावन

  • माझी तत्वसरणी :: (४९) पंचमहाभूते आणि पृथ्वीवरील मूलद्रव्ये.

    इलेक्ट्रॉन हे आधुनिक युगाचे महामहाभूत आहे. इलेक्ट्रॉनमुळेच वीजप्रवाह निर्माण होतो. त्यामुळे आपली जीवनशैलीच बदलून गेली आहे. सजीवांचे शरीरही वीजप्रवाह निर्माण करू शकते आणि तेही सजीवांच्या आहाररूपी इंधनातूनच. मेदू, ह्रदय, यांचे कार्य देखील वीजप्रवाहामुळेच चालते. त्यामुळेच ईसीजी, ईईजी वगैरे आलेख काढून ह्रदय आणि मेंदूतील दोष हुडकून काढता येतात. सध्या, जगातील मोठमोठे शास्त्रज्ञ, विश्वनिर्मितीचे गूढ उकलण्यात गुंतले आहेत. मूलकणांना वस्तूमान प्राप्त करून देणारे हिग्जबोसॉन हे कण सापडले तर ते प्रचंड महाभूत ठरेल. विश्वात, गुरुत्वाकर्षण बल निर्माण करणारे ग्रॅव्हीटॉन नावाचे मूलकण सापडले तर तेही प्रचंड महाभूत ठरेल.

  • श्री. महागणपती – रांजणगाव

    भाद्रपद महिन्यात येथे  घरोघरी गणेशाची स्थापना करण्याची प्रथा नाही तर मंदिरातील गणेशाची पूजा केली जाते. श्री व्यंकटेश, पुणे यांच्या वतीने रोज सकाळी शिरा वाटप करण्यात येते. अष्टविनायकातील सर्वात शक्तिमान असे मानल्या जाणार्‍या महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराचे बांधकाम पेशवेकालीन पद्धतीचे आहे.

  • भविष्यातील उर्जास्त्रोत: अणूउर्जा

    अणूउर्जेच्या प्रश्नावरून भारत-चीन-अमेरिका आणि इतर राष्ट्रे महत्वाची भुमिका वटवू शकतात. अणूउर्जेकडे खनिजतेलाला पर्यायी आणि मानवतेच्या कल्याणासाठी वापरला जाणारा उर्जास्त्रोत या दृष्टीने पाहण्याची गरज आहे.

  • नवीन वर्ष आणि संकल्प

    नवीन वर्ष आपण कसा साजरा करतो यावरून आपली मानसिकता, आपला स्वभाव, आपल्या आवडी-निवडी आणि आपल्यात असणारी सामाजिक जाणिव इ. गोष्टी स्पष्ट होत असतात. आजकाल काही लोकांच्या मते दारू पिऊन धिंगाणा घालणे म्ह्णजे नवीन वर्ष साजरा करणे होय. नवीन वर्ष सुरू होण्याच्या काही दिवस अगोदर पासूनच काय मग थर्टीफस्टला कोठे जाणार ? काय खाणार ? काय करणार ? काय पिणार ? कोण कोण येणार आहे ? कसा येणार आहे ? सोय काय केलेय ? कोणी केलेय ? कोठे केलेय ? इ. प्रश्न सतत कानावर पडत असतात. दारू पिऊन धांगड – धिंगा करत नवीन वर्ष साजरा करण्यात आजचे शिक्षीत आणि उच्चशिक्षीत लोक ही मागे नाहीत. नवीन वर्ष कसा साजरा करावा याबाबतीत बहुदा कोणतीच नियमावली तयार झालेली नसावी. ज्याला जस वाटेल तसा तो साजरा करतो. ज्यांना तो साजराच करायचा नसतो ते तो इतरांना साजरा करताना पाहण्यात आनंद मानतात तो ही टी.व्ही.वर . दारू पिऊन धिगांना घालण्यापेक्षा हे बर नाही का ?

    सर्वच जण नवीन वर्षाचं स्वागत दारू पिऊन धिंगाना घालूनच करतात असं नाही काही लोक त्या निमित्ताने सहलीच आयोजन करतात, काही लोक आपल्या घरात एखाद्या छोट्या मेजनावीच आयोजन करतात, काही लोक आप-आपल्या कार्य क्षेत्रातील मित्रमंड्ळीना जमवून त्यांच्याशी संवाद साधतात, चर्चा करतात आणि नवीन विचारांच आदान-प्रदान करतात. हे योग्य आणि आपल्या भारतीय संस्कृतीला साजेलसच करतात. नवीन वर्षाच्या स्वागता निमित्त लोकांना दारू पाजण्यापेक्षा त्यांना गोड – धोड खायला देण हे योग्य होणार नाही का ?
    आयुष्यातील एक वर्ष सरलं म्ह्णून जरी आयुष्य एक वर्षाने सरलेलं असल तरी जगण सरलेलं नसतं आणि जगताना तारतम्य बाळ्गावेच लागते हे विसरून ही चालत नसतं. काही वर्षांपूर्वी भिंतीवरील कॅलेंण्डर संपल की नवीन कॅलेंण्डर भिंतीवर लावण्यापुरतच नवीन वर्षाचं महत्व होत. काहींना रोजनिशी लिहायची सवय असायची आता ब्लॉग लिहायची सवय असते तशी त्या रोजनिशीतील पाने लिहून संपली की समजायच आता वर्ष संपल. वर्ष संपल की त्या वर्षीच्या आठ्वणी त्या रोजनिशीत बंदीस्त व्हायच्या त्या आठवणी चुकून मोकळया झाल्या की त्यातून कविता, कथा अथवा कादंबरीचा जन्म व्हायचा. सरलेलं वर्ष आपल्याला बरंच काही शिकवून गेलेल असत जे आपल्याला पूढ्च वर्ष जगण्यासाठी उपयोगी पडणार असतं. त्यामुळे आपण सरलेल्या वर्षात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती करायची नाही हे आपण मनाशी ठाम ठरवायला हंव. मागील वर्षीच्या शेवट्च्या मध्यरात्री प्रत्येकाने काही मिनिटे एकान्तात स्वतःच आत्मपरीक्षण करायला हवं आपण कोण आहोत ,आपण काय आहोत, आपल्याकडे काय आहे, हे सारं विसरून, आपला अहंकार बाजूला सारून जीवन क्षणभंगूर आहे आणि या क्षणभंगूर जीवनात आपण असं काही केल आहे का ज्यामुळे आपण जग सोडल्यानंतरही लोक आपल नाव आदराने घेतील ? या प्रश्नाच उत्तर सापडताच जर प्रत्येकाने स्वतःच्या नव्हे तर जगाच्या कल्याणासाठी प्रत्येक वर्षी एक संकल्प केला तर येणार प्रत्येक नवीन वर्ष सर्वांनाच सुखा समाधानाच आणि समृध्दीचच जाईल अशी आशा धरायला कोणाचीच काही हरकत नसेल नाही का ?

    -- निलेश बामणे