(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • अंदमान – ‘रॉस’ व ‘नॉर्थ बे’ आयलंडस

    एके काळी काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी जाणले जाणारे  ‘अंदमान’ आता एक टुरिस्ट प्लेस म्हणून पण वेगाने प्रकाशात आलंय. पोर्ट ब्लेअर सेल्युलर जेल या बरोबरच अंदमानचे सुंदर समुद्र किनारे व छोटी छोटी बेटे या बेटावरील अनोखा निसर्ग, प्राणी पक्षी जीवन तसेच पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या “स्कूबा डायविंग” “Sea walk” ‘कोरल सफारी’ इत्यादी आकर्षणे यामुळे आज पर्यटक  मोठ्या संख्येने अंदमानला भेट देतायत.

  • कर्मभूमी ते पुण्यभूमी..

    जन्मभूमी ते कर्मभूमी आणि कर्मभूमी ते पुण्यभूमी करण्याचं सामर्थ्य दाखवायचं, का डाव अर्ध्यावर सोडायचा, हे अर्थातच आपण ठरवायचं आहे..

  • मेडिटेरेनियन आयलंड

    संपूर्ण बेटाच्या चारही बाजूला उंचच उंच कड्याप्रमाणे सरळसोट कडा उभा होता. स्वच्छ आणि निळेशार पाणी त्या खडकावर आदळून फेसाळत होते. पांढऱ्या शुभ्र बुड बुड्यानी बेटाभोवती एक वलय निर्माण झाल्यासारखे दिसत होते. जहाज जसं जसं पुढे सरकत होते तस तसे बेटाचे सौंदर्य आणखीनच खुलत चालल्या सारखे दिसत होते. सगळे खलाशी आणि अधिकारी बाहेर येऊन निसर्गाचे अनोखे सौंदर्य न्याहाळत होते. कॅप्टन ने चीफ इंजिनियर ला विचारले, बडा साब आपण ह्या आयलंड ला एक फेरी मारू या का? वीस मिनिटे जातील थोडा स्पीड कमी करावा लागेल, पण तुम्ही हो म्हणत असाल तरच. लगेचच चीफ इंजिनियर ने स्पीड कमी करतोय म्हणून इंजिन कंट्रोल रूम मध्ये फोन करून सांगितले.

  • कळंबचा चिंतामणी

    विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेले हे गणपतीचे मंदिर यवतमाळ नागपूर या राज्य महामार्गावर यवतमाळ शहरापासून सुमारे २३ कि. मी. अंतरावर असलेल्या कळंब गावात आहे. चिंतामणीचे मंदिर गावाच्या सामान्य भूपाताळीपेक्षा सुमारे ३५ फुट खोल आहे.

  • टोरली ( एक लिमरिक )

    एक होती टोरली, होती भली-थोरली
    ती होती सगळ्यांच्या कायम नजरेम्होरली
    रात्री होती जागेवर, नव्हती तिथें सकाळीं
    झाली पळापळी, अन् एक प्रश्न सर्वां छळी –
    ‘येवढी थोरली टोरली, कशी असेल चोरली’ ?

    - - -
    टोरली : Trolley

    - सुभाष स. नाईक
    (९८६९००२१२६)

  • तुझ्या येण्याने

    तुझ्या येण्याने…

    ऋतू बदलणार नाहीत

    …हे मलाही आहे माहित

  • राजा प्रधान संवाद

    सध्याच्या राजकारणावर आधारित !

  • तो असायला हवा होता म्हणून

    स्थळ : १० वी 'ब' वर्गाचा पहिलाच दिवस.बालमोहन विद्यामंदिर,दादर, मुंबई.
    काळ : (पालकांनी आडून आडून सुचविल्याप्रमाणे) गांभीर्याने घेण्याजोगा.
    वेळ : १३ जून १९७७, सकाळी १०.४२.
    प्रवेश पहिला : (वर्गात गलबला. एखाद्या धीरोदात्त नायकाप्रमाणे मराठेसर वर्गात प्रवेश करतात आणि वर्गातील कुजबुज आपोआपच कमी कमी होत वर्गात संपूर्ण शांतता पसरते.)
    मराठेसर पाच मिनिटे 'राष्ट्राच्या खऱ्या संपत्ती'समोर स्वागत आणि प्रोत्साहनपर भाषण करुन हजेरी घ्यायला सुरुवात करतात.

    'प्रफुल्ल अग्निहोत्री'
    "Present Sir".....
    सुट्टी सत्कारणी लावून कमावलेल्या जबरदस्त अमेरिकन ऍक्सेंटमधे प्रफुल्ल आपली उपस्थिती नोंदवतो.
    (सहा मुलींच्या भुवया उंचावतात.)
    'हेमंत बावकर'
    "Yes Sir"
    हेमंत नेहमीच्याच तरल आवाजात गुणगुणतो.
    (मराठेसरांच्या कपाळावर क्षणभर दीड मिलीमिटर जाडीची आठी उमटून जाते.)
    नंतर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतुकीप्रमाणे हजेरी संथगतीने चालू रहाते.

    'प्रविण रेगे'
    "नमस्ते गुरुजी !"
    'ऑं ?'.....धीरोदात्त नायकाचा चेहरा मानधनाचा धनादेश न वटल्यासारखा गोरामोरा होतो.
    आपण चुकून तळकोकणातील
    "जिल्हापरिषद मराठी शाळा क्र.४,वेताळबांबर्डे."मधे आलो असणार अथवा दादांनी (पक्षी : शिक्षणमहर्षी मा.दादासाहेब रेगे) आपल्या गळ्यात १० वी 'ब' च्या ऐवजी १० वी 'फ' चा वर्ग अडकविला असणार असे, आंगणेवाडीच्या जत्रेत हरविल्यासारखे भाव मराठेसरांच्या चेहऱ्यावर परावर्तित होतात.
    कथानायक प्रविणच्या चेहऱ्यावर मात्र एखाद्या अजाण बालकासारखे निष्पाप व निरागस भाव असतात.

    प्रविण मार्तंड रेगे !

    चेहऱ्यावर हेच भाव घेऊन प्रविण आमच्याबरोबर शाळेतील बारा वर्षे वावरला.
    माझे आवडते लेखक जयवंत दळवी त्यांच्या 'आल्बम' कादंबरीत लिहितात...
    "आपलं आयुष्य हे भागाकारासारखं असतं. समजा चौदाला चारने भागायचय. तर चार त्रिक बारा.बाकी उरले दोन.आता या बाकीचं काय करायचं ? अशीच काही ना काही बाकी आपल्या आयुष्यातसुद्धा उरत जाते आणि आपण पुढे चालत रहातो."
    मला वाटतं माझ्या मनातदेखील प्रविणच्या खात्यात थोडी गर्दगहिरी बाकी शिल्लक आहे.

    शिवसेनेचा पाळणा जिथे हलला त्या दादरच्या खांडके बिल्डिंगसारख्या राजकीय,सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्टया जागृत असणाऱ्या परिसरात तो लहानाचा मोठा झाला.त्याच्या पहिल्या मजल्यावरच्या घराबाहेर "सारस्वतांचा उपाध्ये" अशी,फुटपाथवरुनही वाचता येणारी पाटी लावलेली होती.(ती बहूदा त्याच्या आजोबांच्या व्यवसायाची जाहिरात असावी.)

    जगातील प्रत्येक शाळेच्या प्रत्येक वर्गात पंचावन्न ते साठ टक्क्यांच्या दरम्यान रेंगाळणारी एक अल्पसंख्य जमात असते. प्रविण त्या जमातीचा बिनीचा शिलेदार होता.रवी शास्त्री, मदनलाल व बिन्नी हे जसे भारतीय संघातील उपयुक्त खेळाडू होते त्याप्रमाणे प्रविण हा आमच्या वर्गातील उपयुक्त सदस्य होता.तो वर्गाच्या कबड्डी आणि क्रिकेट संघात तर असायचाच पण मिलिंद नेरुरकरला शनिवारच्या नाटुकलीमधे काम करायला कोणी मिळाले नाही की तो ऐनवेळी प्रविणला गळ घालायचा.मला स्मरतय,"थांब टकल्या भांग पाडते"सारख्या विनोदी नाटुकलीची नेमकी फार्सीकल नस पकडून तो बघता बघता मिलिंदसकट इतर सहकलाकारांना आरामात खाऊन टाकायचा.(अभिराम भडकमकरच्या 'हसत खेळत' नाटकात विनय येडेकरने जसे अशोक सराफ आणि कंपनीला खाल्ले होते ना,अगदी तसेच.) प्रविण म्हणजे "कमी तिथे आम्ही" या उक्तीची जणू चालतीबोलती जाहिरातच.किंबहुना कोणाच्याही मदतीला धावून जाणे हा त्याचा स्थायीभाव होता.

    पत्यांमधल्या जोकरप्रमाणे कोणाबरोबरही त्याचे गोत्र सहज जमायचे.शाळेतील त्याचा वावरही एखाद्या विदूषकासारखाच असायचा.कधी वर्गावर मुद्दामून उशीरा येऊन,शिक्षकांसकट सर्व विद्यार्थ्यांच्या नजरा रोखलेल्या असताना,तो बदकासारख्या दुडक्या चालीने दरवाजापासून आपल्या बाकापर्यंत चालत जायचा.तर कधी केसांचा गोटासदृश्य झीरोकटच करुन यायचा.
    पण आज इतक्या वर्षांनंतर वाटतं की या विदूषकी मुखवट्याआड तो त्याच्या मनातली खदखद किंवा अस्वस्थता आमच्यापासून लपवित तर नव्हता ?

    तो लवकर घरी जायला फारसा उत्सुक नसायचा आणि शक्य तितका वेळ घराबाहेर काढायचा असा मला तेव्हाही अंधुकसा संशय होता.
    एकदा तो मला संध्याकाळी उशीरा शाळेच्या युनिफॉर्ममधेच पार्कात भेटला.त्याच्या खिशात चक्क चार आणे होते.आमच्या शर्टला तर त्याकाळी खिसाच नसायचा.मला न कटवता उलट तो मला पाणीपुरी खायला घेऊन गेला.
    त्यानंतर त्याचा भय्याशी खालीलप्रमाणे प्रेमळ संवाद झडला.
    "भय्या, पानीपुरी कैसा दिया ?"
    'आठ आणा'
    "एक प्लेटमे कितना पुरी आयेगा ?"
    'सात'
    "हम दो दोस्त सात पुरी बराबर कैसे खायेगा ?"
    प्रविणने बिनतोड गणिती सवाल केला.
    (या भय्याने नंतरच्या काळात पवई परिसरात बऱ्याच अनधिकृत चाळी बांधल्या.पण इतका अवघड प्रश्न त्याला मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी देखील कधी विचारला नसावा.)
    'ठीक है बाबा, आठ पुरी देगा !'
    "ये ठिक है,यह लो चार आना,हम दोनो को दो-दो पुरी देना !"
    प्रविण विजयी स्वरात म्हणाला आणि हे संभाषण कौतुकाने ऐकणाऱ्या पाच-सहा गिऱ्हाईकांसमोर भय्याचा नाईलाज झाला.
    भय्याला जेरीस आणणारा पहिला मराठी माणूस मी पाहिलेला आहे.

    कधीकधी त्याच्या खिशामधे उघडझाप करणारा एक चार इंची चाकू असायचा.(एकदा सुजाता नाडकर्णीने बसमधून शाळेच्या सहलीला जाताना,सामुदायिक भेळेवर पिळण्यासाठी म्हणून त्याला एक लिंबू कापायला दिले.त्याच्या त्या बोथट चाकूने पातळ सालीचे लिंबूदेखिल कापले जाईना तेव्हा,आपल्याला विश्वासाने हातभर राख्या बांधणाऱ्या वर्गभगिनींसमोर आपले नाक कापले गेले म्हणून तो कमालीचा ओशाळला होता.) हे हौस म्हणून खिशात चाकू बाळगणं वगैरे ठिक आहे पण तो स्वभावाने बिल्कुल खुनशी अथवा गुन्हेगारी प्रवृत्तीचा नव्हता.शाळेत त्याने कधी कोणाशी पंगा घेतल्याचे किंवा कोणाशी मारामारी अथवा दादागिरी केल्याचे मला तरी आठवत नाही. तो मूलतः मवाळपंथी असावा असं मानायला बरीच जागा आहे.

    १९९१ सालातल्या एका भल्या पहाटे,बांद्राच्या टीचर्स कॉलनीसमोरील रस्त्यावर,प्रतिस्पर्धी टोळीकडून झालेल्या गोळीबारात तो मारला गेला.त्याच्या टोळीप्रमुखावर झालेला गोळीबार मधे पडून त्याने स्वतःच्या अंगावर झेलला म्हणतात.समोरच्याला मदत करण्याचा घेतलेला वसा त्याने मृत्यूच्या दारातदेखील टाकला नाही.

    तो काही राजकारण्यांना आणि बिल्डर्सना वेठीला धरणारा हाय प्रोफाईल गँगस्टर नव्हता.त्यामुळे त्याच्या मृत्यूचाही फारसा गवगवा झाला नाही. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात 'विवाहितेस जाळले' अथवा 'तरुण बुडाला' अशा सिंगल कॉलमी बातम्यांखाली त्याच्या मृत्युची बातमी छापून आली होती असे सांगतात.

    तो वाममार्गाला का,कधी व कसा लागला याचा शोध घेण्याची वेळ तर कधीच निघून गेली होती. त्याकाळी फिशपॉंड देण्याची पद्धत होती की नाही माहीत नाही पण "आदमी सडक का" हा फिशपॉंड त्याला चपखल बसला असता.

    तो आज असता तर आमच्या वर्गाच्या रियुनियन संयोजनात त्याने उत्साहाने भाग घेतला असता.आणि किमान यावेळेस तरी चांगला धारदार चाकू आणून त्याने लिंबू आणि उकडलेली अंडी कापायला आम्हाला नक्कीच मदत केली असती.

    प्रविण मार्तंड रेगे !!

    संदीप सामंत.
    ९८२०५२४५१०
    १४/०३/२०२२.

  • स्वभावरेषा ….

    मानवी मनाची उकल करणे हे सोपे नसते आणि ते सुद्धा त्याला न भेटता काही शब्दांवरून , अक्षरांवरुन खरे तर ग्रॅफालॉजी हा विषय अंधश्रद्धेकडे नेणारा आहे असे काही म्हणतात. ते विज्ञान आहे का ? असेही प्रश्न विचारले जातात. मी सतत सांगत आलो आहे हा एक अभ्यास आहे आणि अभ्यास म्हटले की , परीक्षा म्हटले की यात यश अपयश येतच रहाणार कॉम्प्युटरच्या युगात अनेक माणसे हाताने लिहिणे विसरले आहेत तर डिजिटल युगात चेकवर स्वाक्षरी करावी लागत नाही सर्व व्यवहार मोबाईल द्वारे होतात, कॉम्पुटर द्वारे होतात. पत्र लिहिणे हे शहरातील माणसे विसरली आहेत. तरीपण हजारो माणसे आजही पत्र लिहितात. ते कशी आणि काय करतात ह्याबद्दल आज आपण विचार करणार आहोत. लहानपणापासून मी रेडिओ वर ' आपली आवड ' ऐकत होतो आणि कोणी कुठून कशी गाण्याची फर्माईश केली त्यांची नावे सांगतात. असे रेडिओवर अनेक कार्यक्र्म होतात ज्यामध्ये श्रोत्यांच्या पत्रांना उत्तरे देतात. त्या येणाऱ्या पत्रांबद्दल मला खूप कुतूहल होते. परंतु मी रेडिओवर क्रिकेटचे लाईव्ह अपडेट्स द्यायला लागलो तेव्हा सम्पूर्ण सामना संपेपर्यंत मला स्टुडिओ मध्ये रहावे लागते तेव्हा ' आपली आवड ' हा कार्यक्रम स्टुडिओमध्ये बसून आईकाला मिळतो समोर निवेदक म्ह्णून कधी श्रीराम केळकर , दिनेश अडावदकर किंवा सुलभा सौमित्र असतात, ते जेव्हा ती पत्रे घेऊन त्यांची नावे वाचतात ती पत्रे माझ्या बघण्यात आली आणि खरेच इतके आस्चर्य वाटले की रेडिओचा प्रभाव खूप दूरवर पसरला आहे ते, त्यांची पत्रे अगदी सुशोभित केलेली असतात , छान बॉर्डर असते वेगळ्या रंगाची , कधी त्याचे नाव आणि पत्त्याचा रबरस्टॅम्प मारलेला असतो इतका रेडिओचा प्रभाव आणि आपले नाव रेडिओवर यावे यासाठी दुर्गम भागातून पत्रे येतात, तर आपल्या शहरात अजून मराठी कार्यक्रम रेडिओवर होतात किंवा रेडिओ चालू आहे हे देखील किती अज्ञानी मराठी माणसांना माहित नाही. एके दिवशी मी असाच बसलो असताना कुठले तर हायफाय जोडपे आले होते , पत्रांचा ढीग पाहून ती बाई म्हणाली अय्या अजून पोस्टकार्डे मिळतात, मी जरा शांत शब्दात म्हणालो अहो पुणा , मुबई, डोबावली, किंवा नाशिक म्हणजे महाराष्ट नाही रेडिओची किती क्रेझ आहे बाहेर ते आपल्या शहरातील लोकांना अजून माहीत नाही. आज खऱ्या बातम्या विश्वनीय बातम्या आज रेडिओवरून दिल्या जातात हे महत्वाचे आणि त्याची दखल अनेकजण घेतात.
    तर ती पत्रे मी पहिली , त्यावरील अक्षर, अत्यंत साधे संयमित लिहिणे पाहून बघत रहावे . त्याचे अक्षर अत्यंत कोरीवपूर्ण असते, परंतु सह्या बघीतल्या तर इतक्या वेगेवेगळ्या असतात कारण कधीकधी आपला ठसा उमटवण्याच्या नादात फार ही मंडळी अत्यंत आकर्षक आणि वेगळ्या सह्या करतात खऱ्या कधीकधी त्यांच्या नसतीलही परंतु बघताना खूप मजा येते. प्रत्येकाला आपले नाव रेडिओवर यावे ही इच्छा असते अर्थात ती पत्रे मी इथे देऊ शकत नाही ते व्यवहार्य होणार नाही परंतु आज मी अशी पत्रे देत आहे ती सुमारे ८० ते ९० वर्षांपूर्वीची आहेत माझ्याच घरामधली काही मोडी लिपीतली माझ्या आजोबांची आहेत त्यावेळचे जुन्या मंडळींचे अक्षर आणि लिहिण्यातील संयम , आपुलकी लक्षात येते सलगता ल्सखात येते. . ते अक्षर वाचताना कळेल की कठीण परिस्तिथी मध्येही ही माणसे कसा मार्ग काढतात ते बघावयास मिळले , तर काही ठिकाणी उद्वेग असेल तेव्हा त्यांचेच अक्षर कसे बदलेले असते हे पण कळेल.
    त्यावेळी टाक किंवा फाऊंटन पेन असे आणि निरोप पाठवायची दोन प्रमुख साधने म्हणजे तार म्हणजे टेलिग्राम , मला आठवतंय ७० ते ८० साली रेडिओवर कार्यक्रम असेल तर तार येत असे कारण टेलिफोन काहीच लोकांकडे असत. २००० सालपर्यंत आणि पुढे परिस्तिथी खूप बदलली , ७० वर्षात काहीच झाले नाही असे नाही बरेच काही झाले , जुने गेले नवीन आले परंतु काही गोष्टी आजही महत्वाच्या आहेत त्यातील एक म्हणजे म्हणजे स्वाक्षरी आणि पत्र. आजही अनेकजण आवर्जून पत्र लिहितात. आजही पोस्टकार्डे पोस्टात मिळतात हे नवीन पिढीला सागावेसे वाटत्ते. कारण त्या लिहिण्यात आपलेपणाचा सुगंध दरवळत असतो कारण त्या अक्षरातून , शब्दातून खरा माणूस दिसतो, माझ्याकडील जी पत्रे पहा , त्यावरील मोडी लिपीतील अक्षर स्वाक्षऱ्या पहा, त्यात आपलेपणा , सलगता जाणवते , त्या वव्यक्तीच्या मनात काय आहे हे जाणवते , आपण हे सगळे मिस करत आहोत असे जाणवत नाही का...जरा आपल्या हस्ताक्षरात आपल्या मित्र मैत्रिणीला पत्र लिहून पहा आपल्याला वेगळे काही केल्याचा भास निश्चित होईल कारण मोबाईलच्या मेसेजपेक्षा किंवा चॅटिंग पेक्षा आपलेपणा आधी जाणवेल. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीची मानसिक आंदोलने देखील तुम्हाला जाणवतील. हा सगळा शब्दांचा खेळ किती भारी आहे हे पण जाणवेल .
    --सतीश चाफेकर
  • माझं चिंतामणराव कॉलेज

    या वर्गात न बसण्यावरून आठवण झाली. टी. वायला असताना रोटरी क्लबने “आउटस्टॅंडिंग स्टुडन्ट ऑफ द इयर” अशी स्पर्धा घेतली होती. त्यात मला दुसरे बक्षीस मिळाले. अभिनंदन करताना लिमये सरांनी outstanding means student who stands out of the class असा चिमटाही काढला!