(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • वसंत देसाई- ‘कम्पोजर पार एक्सलन्स’

    वसंतरावांच्या कर्तृत्वाचा विभागवार आढावा घेणाऱ्या या ग्रंथाच्या पहिल्या भागात त्यांच्या एकूण कारकीर्दीची ओळख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, सुहृदांनी सांगितलेल्या आठवणी आहेत. त्यात पुस्तकाचे संकलक, संपादक विश्वास नेरूरकर यांनी ‘टेल ऑफ द मिस्टिक मिन्स्ट्रल’ या १५ पानी प्रदीर्घ लेखात वसंत देसाई यांच्या संपूर्ण प्रवासाची ओळख करून दिली आहे.

  • सर्जिकल स्ट्राईक २

    अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 

    दहशतवादी हल्ला झाला कि केवळ निषेधाच रडगाणं गाणारा भारत असा काही पवित्रा घेईल असे पाकिस्तनाला स्वप्नातही वाटलं नसेल! त्यामुळेच त्याची आता धांदल उडाली आहे. भारताच्या कोणत्याही हल्ल्याला प्रतिउत्तर देण्यास पाकी लष्कर सज्ज असल्याच्या वलग्ना पाकचे लष्करप्रमुख करत असले तरी वायुदलाच्या नुसत्या ट्रेलरने पाकची भंबेरी उडाली आहे.

  • ब्रह्मभूषण

    आजकाल सर्वच क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहेत आणि आपल्या कर्तृत्वाने यशाची शिखरे गाठीत आहेत. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपला ठसा उमटवत आहेत. फक्त पुरुषांचे प्राबल्य असलेल्या उद्योग क्षेत्रातही उद्योजकता आणि कुशलता यांचा संगम साधून नांव कमवीत आहेत.

  • श्री क्षेत्र माळेगाव यात्रा

    खंडोबा हे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही प्रदेशातील बहुसंख्य जनतेचे कुलदैवत आहे. मल्लारी, मल्लारीमार्तंड, म्हाळसाकांत, मैलार, मैराळ अशी नावे असलेल्या खंडोबारायाची महाराष्ट्र आणि कर्नाटकात एकूण बारा स्थाने आहेत. त्यापैकी नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील माळेगाव हे एक तीर्थक्षेत्र आहे.

  • नोटाबंदी आणि मिडिया

    नोटाबंदीच्या निर्णयामुळे भारतातील तमाम बातम्या देणाऱ्या वाहिन्यांच्या प्रतिनिधींना खरच मोठ्या प्रमाणावर दैनंदिन रोजगारामध्ये वाढ झाली आहे.. अनेक प्रतिनिधी खेडेगावात जाऊन त्यांना फक्त बँकेमुळेच सर्वांचे हाल होताना दिसतायत..., ईतर सुविधांचा ते प्रश्रच विचारत नाहीत..,,.

    बिचारे....

    स्वताःही ऊन्हातानात ऊभारुन रांगेत थांबलेल्या सर्वंच भारतीयांना फक्त तक्रारीचा प्रश्नांनी सुरुवातकरुन शेवट पंतप्रधानांच्या निर्णयाची अशी फजिती झाली.... असच सांगत आहेत.

    प्रतिनिधी सुसंस्कृत व सुशिक्षित ही दिसत आहेत.

    मग खरी माहीती का लपवत आहेत....?

    हेच कळत नाही....

    विवेक जोशी

  • आमची आजी

    काही दिवसापूर्वी दिर्घ आजारपणामुळे आमच्या आजीचे वयाच्या जवळ-पासपंच्याहत्तराव्या वर्षी निधन झाले. आमच्या आजीच्या मृत्यूमुळे आमची आई तिचे मायेचेछ्त्र कायमचेच गमावून बसली. आमच्यासाठी तर ती मायेच मोकळ आभाळ्च होती.

  • भारतमातेच्या वीरांगना – 5 : झलकारी बाई

    आपल्या सरदारांच्या सल्ल्यावरून राणीने किल्ला सोडून जाणे योग्य राहील असे ठरले. ह्या कठीण प्रसंगी झलकारी बाईंने समजदारीचा, स्वामीभक्तीचा आणि राष्ट्रप्रेमाचा परिचय दिला, राणीच्या वेषात किल्ल्यात लढत राहिल्या, आपल्या सैनिकांचे मनोबल खच्ची नाही होऊ दिले. इंग्रजांना कळलेच नाही की राणी नाहीये. राणी ला मार्गक्रमणासाठी वेळ मिळाला. झलकरीने बाईंनी फक्त राणीचे वस्त्रच परिधान नव्हते केले तर त्यांचा आत्माही राणीचाच होता असा भास होत होता.

  • रेल्वे स्टेशनवरील लुटमार ! (नशायात्रा – भाग ३३)

    सोडावॉटर च्या बाटल्यांचा वर्षाव झाल्यावर जमावाची जी पळापळ झाली ती गमतीशीर होती , वाट फुटेल तसे सगळे सैरावैरा पळत होते , तितक्यात समोरून पोलिसांचे गाडी आली तसे अजूनच गोंधळ झाला , आम्ही देखील पळत दुर्गा गार्डन गाठले , व तेथे अंधारात लपून बसलो , आम्हाला स्वतचेच खूप हसू देखील येत होते , इतक्या तावातावाने निघालेला जमाव केवळ १५ ते २० सोडावॉटरच्या बाटल्यांनी पांगवला होता .

  • मध्यमवर्गीय बुध्दीजीवींना विचारसरणी बदलावी लागेल

    काँग्रेसी सरकार भ्रष्ट होते म्हणून मोदींचे सरकार निवडून दिले. त्याच्याही प्रत्येक निर्णयावर कथित बुद्धीजीवी तुटून पडताहेत.

    आपण खरं म्हणजे खुश राहण्याची आपली क्षमता गमावून बसलोय. आपली सहनशक्ती जवळपास संपत आलीय. एखादा निर्णय झाल्याबरोबर त्याचे चांगले - वाईट परिणाम दिसण्याआधीच टीकेची झोड उठवली जाते. याच कारणांमुळे बर्याच नेत्यांनी कुठलाही निर्णय घेण्याची उत्सुकता दाखवली नाही. हा व्यक्ती किमान काही निर्णय घेवून काही जनताभिमुख सुधारणा आणण्याचा प्रयत्न तरी करतोय तर बुद्धीजिवी लोक विनाकारण भ्रष्टाचारी लोकांना अनावधानाने का असेना साथ देताना दिसताय. भ्रष्टाचारी लोकांना तर मोदी नकोच आहे.

    पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे की, मोदी स्वतः पैसे खात नाही कुणाला खाऊ देत नाही. त्या माणसाने १२ वर्षे गुजरातचे नेतृत्व केले. विकासात पिछडलेला गुजरात सर्वात पुढे नेवून ठेवला. आज प्रत्यक्ष जावून बघा गुजरात मध्ये रस्ते आणि इतर प्राथमिक सुविधा इतर राज्यांच्या तुलनेत किती चांगल्या आहेत.

    आता पंतप्रधान असतानाही तो व्यक्ती १४-१६ तास काम करतो, विदेश दौऱ्यात हॉटेलात न थांबता विमानात झोप घेतो, त्याने अडिच वर्षात सुटी घेतलेली नाही, त्याच्यावर कुठलाच व्यवहारात पैसे खाल्ल्याचा साधा आरोप नाही, स्वतःच्या किंवा कुणा नातलगाच्या नावे मालमत्ता घेतल्याचे आढळलेले नाही, कुठलाही नातेवाईक लाभाच्या पदावर नाही, मंत्रिमंडळात निवडून शक्य तेवढे जादा प्रामाणिक लोक नेमलेले आहेत. सगळे नातेवाईक चरितार्थासाठी १०-१५ वर्षापूर्वी करीत होते तिच नोकरी व व्यवसाय करताहेत, त्यांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय बदल दिसत नाही. असं यापूर्वी भारतात घडल्याचं मला तरी माहीत नाही, तरी आपण अशा व्यक्तीच्या प्रत्येक निर्णयावर तुटून पडत राहिलो तर आपण चांगला म्हणणार कुणाला?

    आपण खुश आणि समाधानी कशाने होणार ? प्रत्यक्ष राम, कृष्ण किंवा शिवाजी जरी पंतप्रधान झाले तरी आपण टीकाच करणार का ? निर्णय घेताच चांगले-वाईट परिणाम दिसण्याआधीच टीका. उलट मी तर म्हणतो जनतेसाठी काहितरी करण्याची तळमळ असलेल्या अशा माणसाचा एखादा निर्णय चुकला तरी त्याच्या पाठिशी ठाम रहायला हवे, असे केले नाही तर भविष्यात कोणताही नेता जनकल्याणाच्या गोष्टीसुध्दा करणार नाही. सत्ता मिळाली की आपल्याच सात पिढ्यांचे कल्याण करुन मोकळा होईल. आजही ९९ टक्के लोक तेच करताहेत.

    पण मध्यमवर्गीय बुध्दीजीवी लोकांनी आपली विचारसरणी बदलली नाही तर लवकरच पुन्हा परकिय राजवट किंवा असामाजिक विचारांचे लोक सत्ता बळकावून देशाचा बट्ट्याबोळ केल्याशिवाय राहणार नाहीत. धन्यवाद !

    लेखक - डॉ. विवेक उपासनी, जळगाव.
    [ कृपया लेख लेखकाच्या नावासह फॉरवर्ड करावा ]

  • मराठी चित्रपटांच्या पायरसीची आता कोटीची उड्डाणे !

    एके काळी हिंदी-इंग्रजी चित्रपटांच्या होत असलेल्या पायरसीचे लोण आता आपल्या मराठी चित्रपटांपर्यंतही पोहोचलेले आहे. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांची झोप उडाली आहे.