एक होती चिवताई इटुकली-पिटुकली. चिव-चिव करत आंगणात यायची, चिवताई ये दाणा खा, पाणी पी आणि भुर्रर्र उडून जा. आजी! चिवताई खरंच असते का? कशी दिसते? हुशार ग माझी सोनुटली, तुझ्या बाबांना सांगते, चिवताईचा फोटू आणायला.... एक होता काऊ, काळाकुट्ट, मोठे मोठे पंख, नेहमी चिवताईला त्रास द्यायचा.
हा! हा! हा!, आजी किती ग!खोट्ट-खोट्ट बोलते तू, काऊ असते व्हाईट-व्हाईट, लांग-लांग टेल, मोठी-मोठी शिंग. बाबा म्हणतात, काऊचे दूध हेल्दी-हेल्दी, गोडंगोड.
बाबा माझ्या साठी काऊचे दूधच आणतात. आजी ग, खोट्ट बोलणार्याला गाॅड, पनीशमेंट देतो. एक विचारू आजी, गाॅडने तुझे दात तोडले का? म्हणत सोनुटली तिथून पसार झाली. काहीही म्हणा, आमची सोनुटली भारी खोडकर, भारी हुशार. तिला मूर्ख बनविणे सौपे नाही, आजी मनातल्या मनात पुटपुटली.
आजीने डोळे बंद केले. गावातले घर.. सोनुटली, आजीच्या मांडीवर बसलेली, चिव-चिव करीत आंगणात चिवताई आल्या, दाणे टिपू लागल्या. चिवताई ये दाणा खा, म्हणत सोनुटलीने हात उघडला, एक चिवताई आली, तिने सोनुटलीच्या तळहातावरचा दाणा टिपला आणि भुर्रर्र उडाली. आजी-आजी, चिवताईने दाणा टिपला म्हणत सोनुटलीने उडड्या मारीत जोरात टाळ्या वाजविल्या, आंगणातल्या चिमण्या चिव-चिव करीत उडाल्या. घाबरट कुठल्या, सोनुटली जोरात हसली.
आजीने डोळे उघडले. ACवाल्या फ्लेटचे दार-खिडक्या सदैव बंद असतात. आंगणच नाही, तर चिवताई कुठून येणार... गोष्ट अर्धवटच राहिली.
एक होती चिव, एक होता काऊ. चिवचे घर होते मेणाचे, काऊचे घर होते शेणाचे, (असे फक्त गोष्टीतच असते). एकदा काय झाSSले... जोरात पाऊस आला. काऊचे घरटे वाहून गेले .... मोठ्या शहरात वाहून गेली,... चिव-काऊची खोट्टी-खोट्टी गोष्ट ....
-- विवेक पटाईत
काही व्यक्तींमध्ये कलाकार हा कुठल्यातरी कप्प्यात दडून बसलेला असतो, योग्य संधी मिळाली की तो स्वत:चं रुप प्रगट करतो, आणि त्या व्यक्तीला ही जाणीव होताच, त्याची कारकीर्द त्या दिशेनं वळू लागते, घडू लागते, पुढे फुलून त्या कलेला बहर पसरतो व कलाकार म्हणून ती व्यक्ती लौकिक मिळवते आणि सातासमुद्रपार सुद्धा चाहते निर्माण करते. अशीच प्रचिती आली संदीप लोखंडे या तरुणाशी बोलताना. स्टॅण्डअप कॉमेडियन, मिमिक्री आर्टिस्ट, निवेदक आणि स्वत:तील अभिनयाचे पैलू त्यांनी “शेअर” केले मराठीसृष्टी.कॉम शी केलेल्या या बातचीत मधून……..
“ग्राहक चेतना”
१९३२ साली पाहाडतळी युरोपियन क्लब वर हल्ला करण्याची योजना सूर्य सेन ह्यांनी केली आणि ह्याची जवाबदारी प्रितीलता ह्यांच्यावर सोपवली. हाच तो क्लब जिथे बाहेर पाटी होती, “Indians and dogs are not allowed”. २४ सप्टेंबर च्या रात्री १०.४५ मिनिटांची वेळ निश्चित करण्यात आली. प्रितीलता एका पंजाबी युवक बनून गेल्या,तर त्यांचे इतर साथीदार वेगळ्या वेषात क्लब जवळ पोचले. आतमध्ये ४० इंग्रज उपस्थित होते. बॉम्ब ने हल्ला करण्यात आला. गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात एक व्यक्ती मारला गेला तर अर्ध्याच्या वर जखमी झाले. प्रितीलता आणि त्यांचे साथीदार तिकडून बाहेर पडले, पण इंग्रजांनी दिलेल्या प्रतिउत्तरात प्रितीलता ह्यांच्या पायाला गोळी लागली, त्या पळण्यास असमर्थ ठरल्या. इंग्रजांच्या हाती पकडल्या जाण्यापेक्षा त्यांनी मरण पत्करले. पोटॅशियम सायनाईड खाऊन त्यांनी आपले जीवन देशाच्या चरणी अर्पण केले.
कॉमनवेल्थ, आदर्श, २जी, ३जी, येरवडा, बलवा, भूखंड-श्रीखंड……….
या सर्व महानाट्यांतील महान कलाकारांना मानाचा मुजरा करुन सादर होत आहे…..
एक खास स्वयंवर !!
रायगड जिल्ह्यातील पनवेलच्या उत्तर-पूर्व भागात किंचित त्रिकोणी आणि लिंगकृती किल्ला स्थित आहे. मुंबई-पुणे एकस्प्रेस वे वरुन सहज लक्ष वेधून घेणारा हा किल्ला म्हणजे कलावंतीण दुर्ग होय ! मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शेडुंग फाट्यापासून गडाकडे जायचा मार्ग आहे. कळंबोळीपासून पनवेल बायपासने आल्यास मुंबई-पुणे हा महामार्ग जोडला जातो. कलावंतीण ला जाण्यासाठी पनवेल ते ठाकुरवाडी बससेवा देखील उपलब्ध आहे. ठाकुरवाडीला पोहोचल्यावर प्रबलगडाच्या दिशेने पायी जावे लागते. येथे पोहोचल्यावर प्रबलगड आणि कलावंतीण हे दोन्ही किल्ले नजरेस पडतात.
साधारणत: २३०० फुट उंची असणार्या कलावंतीण दुर्गचा मार्ग हा शेडुंग या तुरळक वस्ती असलेल्या गावापासून सुरु होतो. कलावंतीण किल्ल्याला सुळका असे ही म्हणतात कारण तो सर करत असताना आडवाटेची वळण, पावसामध्ये लहान-मोठे धबधबे तर हिरव्यापानांनी फुललेला गडाचा परिसर मन मोहून टाकतो ! या भागात निरनिराळी फुले या दिवसांमध्ये आढळून येतात. अर्धा गड सर केल्यावर खाली नजर टाकल्यास दरीचं दृश्य विलोभनीय वाटत रहातं. बहरलेली शेतं, लहान-सहान झरे, अन् तलावांमुळे हा परिसर आपल्या मनाच्या कप्प्यात स्थित होतो. इथून पनवेल शहरातील वस्ती व तिथल्या उंच इमारती नजरेस येतात. गडाचा पहिला टप्पा सर केल्यावर आपण हळुहळू गडाचा महत्त्वपूर्ण टप्प्याकडे सरकतो. इथे मोठ्या दगडांच्या उजव्या बाजूस हनुमानाची कोरलिली मूर्ती आढळते. त्यापुढील पाऊलवाट काहीशी वरच्या दिशेला सरकत गेल्यामुळे व नंतरची चढाई रुंद आणि काही प्रमाणात झाडाझुडपातून जात अल्यामुळे चालताना थोडी सावधानता बाळगावी. पावसात या वाटेत पूर्णत: चिखल असतो ही नागमोडी वाट पार केल्यावर उजवीकडच्या भागामध्ये गुहा आढळून येते. या गुहेत जाताना सरपटून किंवा बसून जाण्यावाचून पर्याय नाही. काही सेकंदातच आपण गुहेच्या मुख्य भागामध्ये येऊन पोहोचतो या गुहेत पूर्णत: आहे. आत मध्ये विशेष काही बघण्यासारखे नाही. इतिहासात बहुधा या ठिकाणी गुप्त बैठक अथवा वार्तालाप किंवा महत्त्वाच्या गोष्टींसाठीच उपयोग केला जात असावा असं तरी वाटते. या गुहेत शिरताना टॉर्चचा वापर अनिवार्य ठरतो. त्याशिवाय इथे काय आहे हे देखील कळून येऊ शकत नाही. गुहेत प्रवेशासाठी आणि परतीसाठी एकच मार्ग असल्यामुळे आलेल्या वाटेने पु्न्हा त्याचस्थितीतून बाहेर यावे लागते. पुन्हा गडाकडे मार्गक्रमण करण्याच्या दिशेने आपण निघाल्यावर त्यापुढे काही अंतरावरच निमुळते व चिंचोळी जिन्यावरून अगदी सावकाशपणे पावलं टाकावी लागतात कारण पावसाळ्यात या भागात शेवाळं पसरलेले असते. काही ठिकाणी काताळमार्गातून वाट काढुन जाताना किल्ला आव्हानात्मक वाटतो. त्यामुळे शिवकालीन इतिहासाची अनुभूती डोळ्यासमोर उभी रहाते.
अखेर आपण गडाचे मुख्य टोक गाठण्यासाठी त्याच्या पायथ्याशी येऊन थबकतो. या टोकावर जाण्यासाठी तुम्हाला काहीश्या अवघड मार्गाने म्हणजे “कमी ग्रीपच्या उंच दगडांवरुन” वर चढत जावे लागते. या ठिकाणी दोरखंडाचाही मदतीने वर जाता येते. केवळ २०-२५ फुट असा हा “पिनॅकल” चढाई करताना दम काढतो हे नक्की ! पण ही चढाई तेवढी कठीण नाही जेवढं लांबून दिसते. पण एक मात्र नक्की की ही चढाई करताना तज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय चढू नये. पण त्या चढाई नंतर अखेर आपण गडाच्या मुख्य माथ्यावर पोहोचतो. इथून अगदी समोरच्या दिशेला लागून असलेल्या प्रबलगडाचे पूर्ण रुप जवळून पाहता येते तर भोवतालचं माथेरान, चांदेरी व पेब दुर्ग (विकतगड), इर्शलगड, कर्नाला किल्ला ही चित्त वेघून घेतात. फोटोग्राफर्ससाठी ही जागा म्हणजे पर्वणीच जणू ! चहुबाजूला पसरलेली हिरवाई, धबदबे आणि अथांग दरीची सुरेखता आपल्याला स्वर्गसुखाचा आनंद देते हे नक्की. माथा उतरताना तज्ञांच्या मार्गदर्शनाने उतरावे. पण उतरणीचा भाग कठीण नाही. जवळपास दिड तासातचं आपण माचीच्या पायथ्याशी येतो. आणि काहीसा कठीण वर्गात गणल्या जाणार्या कलावंतीण किल्ल्यावर आपण चढाई केल्याचा आनंद देखील मनात असतो.
यापूर्वी किल्ल्याला मुरंजन असे देखील म्हण्टले जात असे; पण मराठ्यांनी हा किल्ला जिंकल्यावर त्याचे नामांतर कलावंतीण असे करण्यात आले होते. या दुर्गच्या नावाबाबत असं ही बोलले जाते की कोण्या राज्याचे कलावंती राणीवर खूप प्रेम होते. कलावंती राणी आपल्याला सोडून न जावी म्हणून त्या राज्यांनी कलावंती राणीला त्या किल्ल्यावर महाल बांधून दिला. या दुर्गाशी माचीप्रबळ गावामधील आदिवासी लोकांचे जिव्हाळयाचे नाते असल्यामुळे दरवर्षी होळीला या दुर्गावर ते नृत्ये देखील करतात.
कलावंतीण किल्ला “वन डे ट्रेक”चा उत्तम पर्याय असला तरीपण नव्याने ट्रेकींग करणार्यांनी येथे शक्यतो जाऊ नये किंवा गेलातच तर सोबत अनुभवी ग्रुप व मार्गदर्शक असावेत. तसंच गडावरील गावांमधील स्थानिक लोकांना सुचित केल्यास उत्तम जेवणाची व नाष्ट्याची सोय देखील होऊ शकते. धो-धो पावसात हा किल्ला सर करणं म्हणजे अॅडव्हेंचर्स आणि "गडकर्यां"ची खरी कसोटी पाहून थ्रिलिंग अनुभव देणारा क्षण म्हणता येईल.
-- सागर मालाडकर

जॉर्ज वॉशिग्टंन कार्व्हर हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ होऊन गेले. हा माणूस अष्टपैलू व्यक्तीमत्वाचा होता. मीना गवाणकर यांनी या शास्त्रज्ञाचे “एक होता कार्व्हर” नावाचे एक छोटेखानी सुंदर असे आत्मचरित्र लिहीले आहे. त्यात एके ठिकाणी असा उल्लेख आहे की हा शास्त्रज्ञ एकदा चर्च बाहेर बसला असतानां त्याच्या तोंडून अत्यंत गोड आवाजात उस्फूर्त असे गीत बाहेर पडले ज्याचा समावेश जगातील उत्कृष्ट गाण्यात होतो. हे कसे घडले असावे? मला असं वाटतं की त्यांच्या आतली अतीउत्कट अशी मानवीय संवेदना गाण्याच्या रूपाने अशी बाहेर आली असावी. अनेक मान्यवर गायक वा गायिका असे मानतात की गाणे दोन प्रकारचे असते एक जे गळ्यातुन येते आणि दुसरे जे हृदयातुन येते. यात जर आवाजाची नैसर्गिक देणगी असेल तर हृदयातुन गळ्याद्वारे बाहेर पडणारे गाणे नि:संशयपणे अप्रतिम होते. गीता घोष रॉय चौधरी उर्फ गीता दत्तचे असेच काहीसे होते.
वयाच्या सोळाव्या वर्षीच गीता रॉयला गायनाची पहिली संधी मिळाली ती कोरस मधील दोन ओळीच्या रूपात. खूप मोठ्या जमिनदाराच्या १० अपत्यापैकी गीता एक होती. त्यात मुलगी असून गाणे शिकते व गाणे गाते हा तसा विरोधाभासच होता. तिचे वडील आपली ईदीलपूरची जिल्हा फरीदपूर (आताचा बांगला देश) मधील सर्व जमिन व इस्टेट मागे ठेवून कलकत्ता व आसामला आले. पूढे मग त्यांनी मुंबईला येऊन दादरला एक फ्लॅट खरेदी केला व तेथेच राहू लागले. त्यावेळी गीता रॉय १२ वर्षांची होती. लहानपणा पासूनच संगीताची ओढ गीताला होती. हनुमान प्रसाद नावाच्या एका संगीतकाराने गीताचा आवाज ऐकला आणि तिला गाणे शिकवण्याची जबाबदारी घेतली. पूढे त्यानीच मग “भक्त प्रल्हाद” नावाच्या चित्रपटात कोरस मधील दोन ओळी गाण्याची संधी दिली. पूढेही काही गाणी मिळाली पण फारसा प्रभाव नाही पडला. मात्र १९४७ मधील ‘दो भाई’या चित्रपटातील “मेरा सुंदर सपना बित गया’’ या गाण्यातुन तिच्या प्रतिभेची चुणूक मिळाली आणि पार्श्वगायीका म्हणून तिच्या नावावर शिक्का मोर्तब झाले. या नंतर दोनच वर्षांनी ‘महल’ मधल्या “आयेगा आयेगा …आयेगा आनेवाला” म्हणत लता दिदीचे नाव दुमदुमू लागले. याच काळात सचिन देव बर्मन यांची तिच्यावर नजर पडली आणि त्यांच्यातल्या चाणाक्ष संगीतकाराने गीता रॉयच्या नैसर्गिक आवाजातली जादू ओळखली. काय योगायोग बघा याच काळात बंगलोर मधील वसंतकुमार पडूकोण नावाचा एक तरूण कोलकत्ता, पूणे प्रवास करत मुंबईत आला होता. लवकरच या तरूणाशी गीता रॉयची भेट होणार होती आणि तिच्या आयुष्याला एक वेगळे वळण मिळणार होते.
१९५१ मध्ये देवानंद बंधूच्या नवकेतन या संस्थेचा चित्रपट “बाजी”चे काम सुरू झाले. चित्रपटाचे सगीतकार एस. डी. बर्मन यांनी गीता रॉय कडून सहा गाणी गाऊन घेतली. चित्रपटाचा दिग्दर्शक होता वसंतकुमार पडूकोण उर्फ गुरू दत्त. गाणी रेकॉर्ड होत असतानां गुरूदत्त गीताच्या आवाजाच्या आणि नंतर हळूहळू तिच्याच प्रेमात पडला. हा चित्रपट प्रदर्शीत झाला आणि यातील ‘तदबीर से बिगड़ी हुई तकदीर बना ले’ या गीता रॉयच्या गाण्याने अफाट लोकप्रियता मिळवली. तिच्या पार्श्वगायनाचे सर्वच दरवाजे उघडे झाले आणि खरेखरच तिची तकदीर बन गयी. दरम्यान गीता रॉय देखिल गुरूदत्तच्या प्रेमात पडली आणि २६ मे १९५३ रोजी दोघांनी विवाह केला. गीता रॉय गीता दत्त झाली. त्यानां तरूण व अरूण ही दोन मुलं आणि निना ही मुलगी झाली. नंतरची चार वर्षे तिचा गळा बहरत गेला. अनेकजण असे मानतात की तिच्यावर पाश्चात्य संगीताचा प्रभाव होता. पण मला ते फारसे पटत नाही. तिने पाश्चात्य सुरावटीची व तशी बाज असलेली गाणी सुंदरच गायली यात दुमत नाही. पण मग खयालों में किसी के इस तरह आया नहीं करते (बावरे नैन), सुनो गजर क्या गाए (बाज़ी)]न ये चाँद होगा, न ये तारे रहेंगे (शर्त),कैसे कोई जिए, जहर है जिन्दगी (बादबान), जाने कहाँ मेरा जिगर गया जी (मिस्टर एंड मिसेस 55), ऐ दिल मुझे बता दे, तू किसपे आ गया है (भाई-भाई), आज सजन मोहे अंग लगा ले (प्यासा), वक्त ने किया क्या हँसीं सितम (कागज के फूल), आन मिलो आन मिलो (देवदास), हम आपकी आंखो मे..रफी सोबत (प्यासा), बाबूजी धीरे चलना (आरपार), ना जाओ संया छुडा के बयाँ (साहब बिबी और गुलाम),मुझे जा न कहो मेरी जान (अनुभव), घुंगट के पट खोल (जोगन) अशी एकापेक्ष एक सरस गाणी गीता दत्तने गायली. यात अस्सल भारतीय मातीची लोक संगीतावर आधारीत अशीही गाणी होती. नंतर गुरूदत्तच्या बहुतेक सर्व चित्रपटाची गाणी ती गात राहिली. मात्र नंतर अचानक या सर्वाला ग्रहण लागले. जीए कुलकुर्णी यांच्या कथेत प्रकर्षाने आढळणारी नियती किंवा प्राक्तन या दोघांच्या आयुष्यात आडवे आले.
१९५७ च्या सुमारास गुरूदत्त आणि गीता दत्त यांच्यात अस्पष्टशी भेग पडली आणि हळूहळू यातील अतंर वाढत गेले. गुरूदत्त यानां वाटायचे की गीताने आपल्याच चित्रपटासाठी गाणी गावीत. पण गीता प्रतिष्ठीत झालेली पार्श्व गायिका होती. बाहेरच्या चित्रपटाच्या ऑफर्स येणे साहजिक होते. गीता दत्तला स्वत:ची अशी एक वेगळी ओळख होती, एक स्वतंत्र व्यक्तीमत्व होते. मग स्वत: एक संवेदनशील मन असणाऱ्या गुरूदत्तने हा हट्ट का धरला असेल? संगती लागत नाही. १९७३ मधील हृषिकेश मुखर्जीच्या ‘अभिमान’ मध्ये असेच काहीसे कथानक होते. ज्यात अमिताभ आणि जया भादूरी यांचा उत्कृष्ट अभिनय होता. तर सुरूवातीला या गोष्टीला नकार देणाऱ्या गीताने मग त्याच्या प्रेमापोटी हळूहळू माघार घेतली. पण यामुळे संगीतकारही हळूहळू बाजूला होत गेले. यात भर म्हणून की काय वहिदा रेहमानचा गुरूदत्तच्या आयुष्यात झालेला प्रवेश. या सर्वाचा परिपाक म्हणजे गीता वेगळी राहू लागली. हृदया पासून गाणारी गीता आतल्या आत कोसळू लागली. खरं तर सचिनदा यानां तिच्या आवाजावर खूप विश्वास होता. पूर्वी गाण्याच्या भरपूर रिहर्सल होत असत त्यात गीता दत्त म्हणावी तशी मेहनत घेतानां दिसेना. जर खरोखरच तशी मेहनत घेतली असती तर तिच्या गायकीचे अनेक रंग दिसू शकले असते. याच काळात मग आशाताई आपल्या प्रचंड मेहनतीने वर येत गेल्या. गुरूदत्तवर गीता दत्तने मनापासून प्रेम केले. कदाचित त्यामुळे तिच्या प्रत्येक गाण्यात अंतरिक तळमळ होती, उर्मी होती……. पूढे जेव्हा वहिदा रेहमान गुरूदत्तच्या आयुष्यातुन निघून गेली तेव्हा गुरूदत्त पूरता दारूच्या आहारी गेला. परीणाम १९६४ ला अतीमद्य आणि झोपेच्या गोळ्या सेवनाने गुरूदत्तचे निधन झाले. या दुसऱ्या धक्कयाने मात्र गीता दत्त पार कोलमडून गेली. ती नर्व्हस ब्रेकडाऊनची शिकार झाली. आर्थिक कटकटीचा गुंता अधिक वाढत गेला. त्यासाठी मग काही स्टेज शो पण करावे लागले. १९६७ मध्ये “बधू बारन” नावाच्या एका बंगाली चित्रपटात मूख्य भूमिका केली. पण मन आणि शरीर यांचा मेळ काही केल्या बसत नव्हता. १९७१ मध्ये कनू रॉय या संगीतकारासाठी गीता दत्तने शेवटचे गाणे रेकॉर्ड केले. चित्रपट होता बासू भट्टाचार्य यांचा ‘अनुभव’. पूढे गीता दत्तचा आजार वाढतच गेला. गीता दत्त याचं “वक्त ने किया क्या हंसी सितम…” हे गाणे जेव्हा आज कानावर पडते तेव्हा नकळत मनात विचार येतो की खरंच काळाने गुरूदत्त आणि गीता दत्त दोघांवरही अत्याचरच केला. गुरूदत्त गेला तेव्हा तो ३८ वर्षांचा होता तर गीता दत्तने अखेरचा श्वास वयाच्या ४१ व्या वर्षी घेतला…..
-दासू भगत (२० जुलै २०१७)
व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाल्यावर पहिले पंधरा दिवस काही विशेष कारण असल्याशिवाय नातलग तुम्हाला संपर्क करू शकत नाहीत ..कारण व्यसन बंद केल्यानंतरच्या सुरवातीच्या काळात ..व्यसनी व्यक्तीला अनेक प्रकारचे शारीरिक व मानसिक त्रास होऊ शकतात ..अशा वेळी घरी जाण्याची ओढ असते मनात ..जर संपर्क झाला तर बहुतेक जण ..मला इथे खूप त्रास आहे ..इथली व्यवस्था मला आवडली नाही ..आता मी घरी येतो ..या पुढे मी अजिबात व्यसन करणार नाही ..वगैरे प्रकारचे बोलून कुटुंबियांना घरी नेण्यास आग्रह करतात ..
Copyright © 2025 | Marathisrushti