(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • आजा आजा मै हूँ प्यार तेरा : पंचमदा

    काही माणसांमध्ये समोरच्या व्यक्तीचे अंतर्भूत् गूण ओळखण्याची एक विशेष दृष्टी असते. एकेकाळचा कॉमेडी किंग मेहमूद याच्याकडे ती दृष्टी होती. बरं नुसती दृष्टी असूनही भागत नाही त्या गुणानां संधी कशी व केंव्हा देता येईल याचाही ते विचार करतात. आज चित्रपटसृष्टीतल्या ज्या दिग्गजानांवर आपण मनापासून प्रेम करतो त्यात अमिताभ, आर.डी.बर्मन व राजेश रोशन यांचाही समावेश आहे. आणि या तिघानांही मेहमूदने मूख्य संधी दिली आणि या तिघानाही आपला अमीट ठसा उमटविला. आर.डी. बमर्न खरं तर खूप मोठ्या संगीतकाराचा मुलगा. वडील एस.डी.बमर्नची अनेक गाणी खरं तर स्वत: आरडीने कंपोज केली आहेत. मनात आणले असते तर त्यांनी कोणत्याही चित्रपट निर्मात्याकडे शब्द टाकून आरडीच्या कारकिर्दीची वाट मोकळी केली असती पण ‘स्वत:च्या कर्तृत्वावर काय हवे ते करा’ असं मानणाऱ्या लोकांचा तो काळ असल्यामुळे सचीनदांनी शब्द टाकला नसावा.

    मेहमूद हा फक्त एक कॉमेडियनच नाही तर निर्माता-दिग्दर्शक होता. स्ट्रगल करणाऱ्या कलावंताचे कलागूण हेरणारा मोठ्या मनाचा माणूसही होता. त्याने आरडीतले टॅलेंट बरोबर ओळखले. १९६१मध्ये मेहमूदने ‘छोटे नवाब’ नावाचा चित्रपट काढला व त्यात आरडी ला पहिली संधी दिली. यात विविध मूडची ९ गाणी होती. मॉर्डन डान्स, विरह गीत, कॉमेडी गीत, कव्वाली, कब्बडी खेळावरील गीत पैकी अशा सर्व प्रकारची गाणी त्यात होती. पैकी “घर आजा घीर आए….” हे लताचे अप्रतिम क्लासिकल ढंगाचे गाणे आजही ओठावर सहज येते. या चित्रपटा पासून या दोघांच्या मैत्रीस सुरूवात झाली जी शेवट पर्यंत टिकली. पूढे आर.डी. बर्मनने चित्रपटसृष्टीत आपल्या आगळ्या रंगाने व ढंगाने चित्रपट संगीतात धूमाकूळ घतला. गमंत म्हणजे याच आरडीच्या बासू देव चक्रवर्ती व मनोहारी सिंग( बासू मनोहारी) या सहाय्यकानां मेहमूदने आपल्या ‘सबसे बडा रूपैय्या’ या चित्रपटात स्वतंत्र संधी दिली.( आठवा… ना बिबी ना बच्चा, ना बाप बडा ना मैया..द होल थिंग)

    १९६१ ला सुरू झालेला हा संगीतमय प्रवास १९९४ ला संपला. ३०० च्या आसपास गाणी देणारे आर.डी बर्मन चिऋपटसृष्टीत पचंम या नावाने ओळखले जात. संगीतातल्या सात सुरात सा आणि प हे दोन स्वर शुद्ध मानले जातात तर बाकीचे पाच स्वर दोन प्रकारात गणले जातात तीव्र आणि कोमल. संगीतातला प अर्थात पचंम ही आरडी ओळख ठरली. लहानपणी त्यानां टुबलू या नावाने सर्व हाक मारीत. वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी त्यांनी एका गाण्याला चाल लावली ज्याचा पूढे सचिनदानी फंटूश या चित्रपटात वापर केला….”ये मेरी टोपी पलटके आ” हे ते गाणे. तसेच प्यासा ममधील “सर जो तेरा चकराये” याची चाल पण त्यानीच बांधली होती. परदेशी वाद्यां इतकाच देशी वाद्यांचा अप्रतिम वापर पचंम दा करीत असत. पूढे ते, आशाताई, किशोर व गुलजार यानीं चित्रपटसृष्टीला अप्रतिम गाणी दिली………………‘घर आजा घिर आई बदरिया सावरिया’ (छोटे नवाब- लता) मुजरा शैली व सेमी क्लासिकल असलेले हे गाणे मेलडीचेउत्तम उदाहरण आहे……….. ‘दइया ये मैं कहां आ फंसी’ (कारवां-लता) यात हास्य निर्मितीसाठी ऑर्केस्ट्राचा उत्तम वापर केला आहे……….’चुनरी संभाल गोरी’ (बहारों के सपने- मन्नडे व लता) पाश्चीमात्य संगीताचा छाप म्हणून ओळखले जाणाऱ्या पंचमदानी या गाण्यात अस्सल बिहारी मातीचा दरवळ दिलाय. यातील ताल वाद्यांचा मेळ ऐकण्या सारखा आहे…………’पल दो पल का साथ हमारा’(बर्नींग ट्रेन- रफी व आशा) साहिरची ही कव्वाली पचंमदानी केदार रागाचा मुलायम मुलामा देऊन किती सुंदर बांधली आहे…………….’अ आ इ ई मास्टर जी की आ गई चिट्ठी’ (किताब) या गाण्यात तर चक्क मुलांच्या डेस्कच्या ध्वनींचा वापर करून घेतला आहे……………….’मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है’ (इजाज़त- आशा भोसले) हे गाणे जेव्हा गुलजार यांनी पचंमदाकडे पाठवले तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया होती- ‘मला ही सामानाची यादी कशाला पाठवलीत. याला कशी चाल लावायची?’ पण गुलजार यानां माहित होते पचंमदाच याला चाल लावू शकतात आणि झालेही तसेच. या गाण्याने इतिहास रचला…………………………..’तेरे बिना ज़िंदगी से कोई शिकवा तो नहीं’ (आंधी- किशोर लता) यातील मधून मधून पेरलेले संजीव कुमारचे संवाद आणि लता किशोरचा आवाज म्हणजे पचंमदाच्या प्रतिभेचे सर्वोच्च शिखर…………’चांद मेरा दिल’ (हम किसी से कम नहीं)या गाण्यात पाच सहा छोटीछोटी गाणी होती. पाश्चिमात्य आणि भारतीय संगीताचा अनोखा मेळ म्हणजे हे गाणे……………’दम मारो दम’(हरे कृष्ण हरे रामा- आशा) या गाण्यातल्या सुरूवातीच्या गिटारच्या सुरांनी ७० च्या दशकातील पिढी पार वेडी झाली होती……………..’रैना बिती जाए’( अमर प्रेम- लता) हे गाणे जेव्हा मदन मोहन यांनी ऐकले तेव्हा त्यांनी सचिन देव बर्मन यानां फोन केला -‘’हे गाणे तुम्ही अप्रतिम रचले आहे,शुभेच्छा’’ म्हणाले. पण सचिनदा म्हणाले हे मी नाही पचंमने केले आहे तेव्हा मदन मोहन देखिल चकीत झाले………………………………बिती ना बिताई (परीचय- भूपेंद्र व लता)…………पचंमदाच्या गाण्याची यादी खूपच मोठी आहे…

    रसिक प्रेक्षकातील प्रत्येकाला त्यांचे किमान एक तरी गाणे हे आवडतेच. ते स्वत: उत्कृष्ट हार्मोनिका व माऊथ ऑर्गन वाजवित असत. सामता प्रसाद या विख्यात तबलजी कडून तबला वादनाचे धडेही त्यांनी गिरवले होते.शोले मधील चल धन्नो अशी साद घालून वसंती जेव्हा टांगा पळवते तेव्हा तबल्याचे कडाडणारे बोल आठवा ते पचंमदानी वाजवले होते. तसेच शोले मधील गब्बर जेव्हा जेव्हा येतो त्यावेळचे पार्श्व संगीत आठवून बघा….काचेच्या ग्लासाने या ध्वनीची निर्मिती त्यांनी केली होती…..त्यांनी स्वत:च्या वेगळ्या आवाजाचा देखील छान वापर करून घेतला………चित्रपट विश्वातील अनेक गुणी कलावंत कमी वयात आपल्याला सोडून गेले. शुद्ध स्वराचे प्रतिक असलेला ‘पंचम’ सूर वयाच्या ५५ व्या वर्षी कोमल होऊन कायमचा विसावला.….

    -दासू भगत (२७ जून २०१७)

  • सिंघम

    पाहत असतां सिनेमा ‘सिंघम’
    अविरत चघळत होतो चिंगम
    हाणामारी दावी पडदा
    जोरानें मी करी ओरडा
    चिंगम चिकटे गळ्यात
    धावत गेलो इस्पितळात.
    -
    चिंगम : Chewing Gum
    -
    सुभाष स. नाईक
    ( ९८६९००२१२६)

  • आधारची परवड……!!!

    आधार कार्ड मुळे येणार्‍या अडचणी, थोडक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न येथे केलेला आहे.

  • आई

    आई……………………

  • बिसुर (सांगली) ते मुंबई व्हाया ठाणे – भाग १

    २०१८ च्या डिसेंबर महिन्यात आमच्या गुड्डीचा (विशाखा) विवाह झाला. आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा पार झाला होता. सन-२०१८ साल लग्नाच्या गडबडीत कधी सरलं हे कळायच्या आत सन-२०१९ साल सुरू झालं.

  • संदुक आणि वळकटी

    बोलता बोलता सहज मी
    दिवाळीचा विषय काढला
    एकदम माझ्या मित्राचा
    चेहरा पांढरा पडला

    तो म्हणाला दिवाळी आली की
    हल्ली धड धड होतं
    जुनं सारं वैभव आठवून
    रडकुंडीला येतं

    चार दिवसाच्या सुट्टीत आता
    कसं होईल माझं
    एवढ्या मोठ्या वेळेचं
    उचलेल का ओझं ?

    मी म्हटलं अरे वेड्या
    असं काय म्हणतोस
    सलग सुट्टी मिळून सुद्धा
    का बरं कण्हतोस ?

    काय सांगू मित्रा आम्ही
    चौघ बहीण भाऊ
    कुणीच कुणाला बोलत नाही
    मी कुठे जाऊ ?

    आता कुणी कुणाकडे
    जात येत नाही
    आम्हालाही दोन दिवस
    कुणीच बोलावीत नाही

    चार दिवस कसे जातील
    मलाच प्रश्न पडतो
    लहानपणीचे फोटो पाहून
    मी एकटाच रडतो

    पूर्वीच्या काळी नातेवाईक
    बरेच गरीब होते
    तरीही ते एकमेकाकडे
    जात येत होते

    कुणाकडे गेल्या नंतर
    आतून स्वागत व्हायचं
    सारं काम साऱ्यानी
    मिळून मिसळून करायचं

    सुबत्ता फार नव्हती
    पण वृत्ती चांगली होती
    गरिबी असून सुद्धा
    खूप मजा होती

    मुरमुऱ्याच्या चिवड्या मधे
    एखादाच शेंगदाणा भेटायचा
    त्याप्रसंगी आनंद मात्र
    आभाळा एवढा असायचा

    लाल,हिरव्या रंगाचे
    वासाचे तेल असायचे
    अर्ध्या वाटी खोबर्याच्या तेलात
    बुडाला जाऊन बसायचे

    उत्साह आणि आनंद मात्र
    काठोकाठ असायचा
    सख्खे असो चुलत असो
    वाडा गच्च दिसायचा

    चपला नव्हत्या बूट नव्हते
    नव्हते कपडे धड
    तरीही जगण्याची
    मोठी धडपड

    सारे झालेत श्रीमंत
    पण वाडे गेले पडून
    नाते गोते प्रेम माया
    विमानात गेले उडून

    घरा घरात दिसतो आता
    सुबत्तेचा पूर
    तरी आहे मना मनात
    चुली सारखा धूर

    पाहुण्यांचे येणे जाणे
    आता संपून गेले
    दसरा आणि दिवाळीतले
    आनंदी क्षण गेले

    श्राद्ध , पक्ष व्हावेत तसे
    मोठे सण असतात
    फ्लॅट आणि बंगल्या मधे
    दोन चार माणसं दिसतात

    प्रवासाची सुटकेस आता
    अडगळीला पडली
    त्या दिवशी माझ्याजवळ
    धाय मोकलून रडली

    हँडल तुटलं होतं तरी
    सुतळी बांधली होती
    लहानपणी तुमची मला
    खूप सोबत होती

    सुटकेस म्हणली सर मला
    पाहुण्याकडे नेत जा
    कमीत कमी दिवाळीत तरी
    माझा वापर करीत जा

    सुटकेसचं बोलणं ऐकूण
    माझं ही काळीज तुटलं
    म्हणलं बाई माणसाचं
    आता नशीब फुटलं

    म्हणून म्हणतो बाबांनो
    अहंकार सोडा
    बहीण भाऊ काका काकू
    पुन्हा नाती जोडा

    ' संदुक ' आणि ' वळकटीचे '
    स्मरण आपण करू
    दिवाळीला जाण्यासाठी
    पुन्हा सुटकेस भरु

  • नाही चिरा.. नाही पणती…

    काल २६ जानेवारी होती… दर कारगील दिन ,१५ आँगस्ट , २६ जानेवारी अशा दिवशी हमखास मला आठवण होते.. आर. के. पठाणिया यांची.. मी १०वीत असतानाची गोष्ट आहे… करगील युध्द सुरु होत…

  • “हॅण्ड व्हिडिओ गेम्स”

    १९९३-९४ च्या सुमारास भारतात डिजिटल क्रांती वाढू लागली घराघरात “इलेक्ट्रॉनिक वस्तुंचे पेव फुटू लागले. खेळणी देखील याला अपवाद नव्हती. अर्थात चावी फिरवून डोलणार्‍या बाहुल्या, बाहुले, रॉबट्स तर एव्हाना खूप जुने झालेले, दूरचित्रवाणी वाहिन्यांवर सुद्धा अॅनिमेशन बर्‍यापैकी रुळलेली, त्यामुळे कार्टुन्सचा आनंद ही तेव्हांच्या लहानग्यांना घेता येत असे.

  • वक्तव्ये आणि मिडिया

    कुमार केतकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वादात माध्यमाच्या भूमिकेची चर्चा….

  • ट्रान्स्फर फी आणि प्रीमियम याबाबत

    घर/दुकान नोंदणी केल्यावर संस्थेचे सदस्य बनण्याकरता अर्ज करावा लागतो. सदर अर्ज संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सभेत ठेवून त्यावर निर्णय घेतला जातो. तो निर्णय सदर अर्जदारास कळविण्यात येतो. अर्जासोबत काही इतर कागदपत्र सोबत जोडावी लागतात. अनेकवेळा आपल्यापैकी बहुतेकांना प्रवेश फी/हस्तांतरण फी आणि अधिमुल्य किती याची माहिती नसते. सदर लेखात याबाबत बऱ्याचदा विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे आपल्यासाठी.