(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • विजया दशमी (दसरा)

    अश्विन शुक्ल दशमीला विजया दशमी म्हणतात. या दिवशी शुंभ-निशुंभ, महिषासुर इत्यादी राक्षसांवर श्री दुर्गादेवीने विजय मिळविला, श्री रामांनी रावणावर याच दिवशी विजय मिळवला या कारणाने विजया – विजय मिळवून देणारी दशमी असे म्हटले जाते.

  • सांगलीचे राजे पटवर्धन यांचे गणपती मंदिर

    सांगलीचा इतिहास म्हणजे पटवर्धन संस्थानचा इतिहास ! पूर्वी सांगली तसं एक सर्वसामान्य गांवच होतं. पण पुढे पटवर्धन जहागिरीतून फुटून पहिल्या चिंतामणरावांनी सांगली येथे आपलं वेगळं संस्थान/राज्य १८०१ मध्ये निर्माण केलं आणि त्याचा सर्वप्रकारांनी विकास घडवून आणला.

  • गृहनिर्माण संस्थेतील प्रस्ताव आणि ठराव याबाबत

    मागील लेखात आपण वाचले की, सभासदांच्या वतीने संस्थेचा कारभार पाहण्यासाठी व्यवस्थापन समिती निवडली जाते. सभासदांचे प्रतिनिधी म्हणून निवडीन दिलेल्या समिती सदस्यांनी संस्थेच्या दैनंदिन कारभाराबाबत निर्णय घेण्याचे अधिकार असतात. सदर निर्णय चर्चा व विचारविनिमय करून घेणे आवश्यक असते. आजच्या लेखात आपण प्रस्ताव आणि ठराव यातील बारकाव्याबाबत माहिती देण्यात आली आहे.सदर माहिती आपणास आवडल्यास इतरानाही पाठविल्यास त्यानाही माहिती होईल.

    प्रस्ताव (Proposal)

    सभेपुढे चर्चेसाठी/विचारार्थव निर्णयासाठी विधानांच्या स्वरुपात ठेवलेला विषय म्हणजे प्रस्ताव होय. प्रस्ताव हा सभेपुढे ठेवलेली सूचना होय. प्रस्तावाने चर्चेला सुरुवात होते. सभाध्यक्ष कार्यक्रम पत्रिकेतील क्रमानुसार प्रत्येक विषय प्रस्ताव स्वरूपात सभेपुढे ठेवतात. प्रत्येक उपस्थित सभासदाला प्रस्तावावर चर्चा करण्याचा अधिकार असतो. पुरेशी चर्चा झाल्यानंतर मतदान घेण्यात येते. सभेने प्रस्ताव मंजूर केल्यास तो ठराव म्हणून ओळखला जातो.प्रस्ताव मांडणाऱ्या व्यक्तीस ‘सूचक’ असे म्हणतात व प्रस्तावाला अनुमोदन देणाऱ्या व्यक्तीस ‘अनुमोदक’ असे म्हणतात. प्रस्तावावर सूचकाची सही असावी लागते. प्रस्ताव हा लेखी स्वरूपात असावा. प्रस्तावामध्ये अनेक दुरुस्त्या सुचविता येतात किंवा मतदानापूर्वी त्यात बदल करता येतो. प्रस्ताव सभेच्या परवानगीने मतदानापूर्वी मागेही घेता येतो. प्रस्ताव हा सभेच्या सूचनेच्या कक्षेत व कार्यक्रम पत्रिकेतील विषयांसंबंधी असला पाहिजे. प्रस्ताव हा सभासदांवर व संस्थेवर बंधनकारक नसतो. प्रत्येक सभासदाला प्रस्तावावर एकदाच बोलता येते. पण, सूचकाला प्रस्ताव मांडताना आणि सर्वात शेवटी मतदान होण्यापूर्वी एकूण दोन वेळा बोलता येते. प्रस्तावाच्या सहाय्याने सभेत ठराव मांडता येत असल्याने प्रस्ताव हे ठरावाचे साधन आहे.

    ठराव (Resolution)

    सभेने प्रस्तावावर चर्चा करून अंतिमरीत्या मान्य/मंजूर केलेला निर्णयम्हणजे ठराव होय. ठराव हा सभेचा कौल असतो. सभेने संमत केलेला विषय ठरावाच्या स्वरूपात घेतला जातो. ठराव हा चर्चेचा/प्रस्तावाचा शेवट असतो. ठराव संस्थेवर बंधनकारक असतो. एकदा मंजुर केलेल्या ठरावावर कोणत्याही सभासदाला चर्चा व बदलही करता येत नाही. ठरावाचे दोन प्रकार आहेत.

    १) साधा ठराव

    २) निबंधकाकडे मंजुरीसाठी सादर करायचे विशेष ठराव. सहकारी संस्थेला पोटनियमामध्ये दुरुस्ती करण्यासाठी किंवा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी विशेष ठराव मंजूर केले जातात व हे ठराव निबंधकाकडे मान्यतेसाठी सादर करावे लागतात. निबंधकाच्या मंजुरीनंतरच परिसंस्थेच्या ठरावाची अंमलबजावणीकरता येते. ठराव हा सभेचा निर्णय असतो. सभेने मंजुर केलेला ठराव कोणत्याही परिस्थितीत मागे घेता येत नाही. प्रस्ताव मांडून ठराव पास करता येत असल्याने ठराव हे प्रस्तावाचे साध्य आहे. सभेतील ठराव हा इतिवृत्ताचा भाग बनतो.

    -- अ‍ॅड. विशाल लांजेकर.

  • विंटर स्पेशल अलिबाग

    लहान असताना मांडव्याला मामाच्या घरी लाकडी माळ्यावर सकाळी सकाळी लवकर जाग यायची ती समुद्राच्या लाटांच्या आवाजाने. जानेवारीत माघी गणेशोत्सवाला थंडी पडलेली असताना मांडव्यात आम्ही सगळे एकत्र जमायचो.

  • शिकागोच्या O’Hare आंतरराष्ट्रीय विमानतळाची गोष्ट

    आपण आज जे काही करतो त्याचा पुढील पिढीवर परिणाम किती आणि कसा होतो

  • विक्लांत अहिर भैरव

    “मेरी सुरत तेरी आंखे” या चित्रपटात, मन्ना डे यांनी गायलेले, “पुछो ना कैसे मैने रैन बितायी” हे गाणे ऐकले आणि बघितले, तेंव्हापासून माझ्या मनावर या गाण्याचा थोडा प्रभाव आहे. या गाण्यात, आपल्याला, सुरवातीपासून “अहिर भैरव” ऐकायला मिळतो आणि अशा असामान्य गायकीतून आपण या रागाचा आनंद घेऊ शकतो. हिंदी गाण्यात प्रसिद्ध असलेल्या, केरवा तालात हे गाणे बांधले आहे.

  • भोंडले (४)

  • भेटवावेसे वाटले म्हणून (उत्तरार्ध)

    शायर हसन नईम म्हणतो ,
    एक शायर था कि जागा रात भर
    सारे अहमक़ सो गये आराम से।
    मी गेल्यावर्षी वर्ल्डकपचा "भारत-पाकिस्तान" सामना पहायला मँचेस्टरला गेलो असतानाची गोष्ट. सामन्याच्या दिवशी पहाटे ३.३० वाजता ( अर्थात इंग्लंडच्या ) माझा मोबाईल खणाणला.
    "सामंतसाहेब , गुडमॉर्निंग"...

    .......वर्गावर आल्यावर आपल्या विद्यार्थ्यांना संबोधित करावे अशा प्रसन्न आवाजात प्रोफेसर अभिषेक निकम बोलत होते.
    "बाहेर हवा कशी आहे ? मॅच होणार ना ?".........त्याने "यंदा पाऊस पडेल काय ?" असे नंदीबैलाला निरागसपणे विचारणाऱ्या प्रश्नकर्त्याच्या उत्साहात (मला) विचारले. मला खात्री आहे की स्पर्धेच्या आयोजकांनीदेखील इतक्या धुंद गुलाबी पहाटे त्या दिवशीचा वेदर रिपोर्ट घेतलेला नसावा. त्यादिवशीचा ( खिडकीचा पडदा बाजूला करुन ) हवामान अंदाज देणारा निःसंशय मी पहिला वार्ताहर होतो. त्यानंतर दिवसभर तो मला "मनसब" रेस्टोबारमधे ५५ मित्रांबरोबर चाललेल्या सेलिब्रेशनचे व सामन्याचे 'लाइव्ह' अपडेट्स देत होता. जणूकाही तोच स्टेडियमवर होता आणि मी 'होम क्वारंटाईन' होतो. मात्र पाकिस्तानी कर्णधार सर्फराज खानची विकेट गेल्यावर त्याने पाठविलेला "झिंगाट विजयोत्सव व्हिडिओ" इतका स्फोटक होता की तो फुल व्हॉल्यूममधे लावल्यावर माझ्या आजूबाजूचे स्थानिक गुजराथी प्रेक्षक त्या तालावरच नाचायला लागले आणि सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणारा के.एल.राहुल आवाज कोठून येतो आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षागारात अचंब्याने पाहू लागला,आणि हे मी मँचेस्टरच्या जिल्हा न्यायालयातदेखिल चंद्रकांत पाटीलांची शपथ घेऊन सांगेन.

    त्याच्या मोदीप्रेमाविषयीदेखिल असेच काहीसे म्हणता येईल. ते प्रेम आंधळे असेल , एकांगी असेल , काहीसे टोकाचे आणि अनाकलनीयही असेल पण ते स्वार्थी , बेगडी आणि दिखाऊ आहे असे त्याच्या विचारधारेचे कट्टर विरोधक असलेले त्याचे जवळचे मित्रदेखील म्हणणार नाहीत. जी गोष्ट करायची ती आत्यंतिक मनापासून , आसुसून आणि स्वतःला पूर्ण झोकून देऊन , हा त्याचा स्थायीभावच आहे. त्याला आता इलाज नाही.२०१९च्या लोकसभेच्या मतमोजणीच्या दिवशी आम्ही जवळजवळ दिवसभर एकत्र होतो. भाजपाने ३०० जागांचा आकडा पार केल्यानंतरचे त्याच्या चेहेऱ्यावरचे बालसुलभ आनंदी भाव आजही माझ्या डोळ्यासमोर आहेत.

    इंग्लंडचा शैलीदार डावखुरा फलंदाज "गोल्डनबॉय" डेव्हिड गोवरच्या फलंदाजीचे वर्णन करताना कोणीतरी लिहिले आहे ...."His class is never in doubt , but his ability to stay on the ground is always in dark".
    शायर हमीद अल्मास म्हणतो ,
    वो भी इन्सान है ऐ दिल उसे इल्जा़म न दे
    जाने उसको भी किन आफ़ात ने घेरा होगा।

    मध्यंतरी त्याची काही व्यावसायिक गणितं चुकली असं म्हणतात. मला सांगा, कोणाची चुकत नाहीत ? कागदावर १००% फुलप्रूफ वाटणारे व्यावसायिक हिशेब प्रत्यक्षात व्यवहारात तसेच्या तसे उतरविणारा एकतरी व्यावसायिक सांगा मला. मी खात्रीने सांगतो , एकही नाही. प्रत्येक व्यावसायिकाच्या आयुष्यात ही फेज कधी ना कधी येतेच.एकतर आधी किंवा नंतर. पण सुदैवाने त्यातून तो लवकरच सावरला आणि आम्हाला आमचा जुना प्रोफेसर मित्र परत दिसायला लागला. मध्यंतरी त्याचे त्याच्या विद्यार्थ्यांसोबतचे , येऊरच्या वृद्धाश्रमात तिथल्या वृद्धांबरोबर गातानाचे , हास्यविनोद करतानाचे व्हिडीओज् माझ्या पाहण्यात आले आणि मी निश्चिन्त झालो.

    अभिषेक बदलला नव्हता. बदलणारही नव्हता. त्याला बदलवण्यासाठी नियतीला अजून किमान सात जन्म घ्यावे लागतील.
    आम्हाला तो 'ठाणेवैभव' दैनिकाच्या जाहिरातीच्या पोस्टरवर दिसणारा , मॅरेथॉन धावणारा , विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच देशभक्तीचे व देशसेवेचे बाळकडू पाजणारा , स्वतः लिंबूसरबत पिऊन मित्रांसाठी थीम पार्ट्यांचे आयोजन करणारा , जिममधे सकाळी ७.४५ वाजता केक आणून मित्रांचे वाढदिवस साजरे करणारा व त्यांच्यासाठी पावणेदोन मिनिटांचे व्हिडीओज् बनविणारा ,देओल खानदानावर जिवापाड प्रेम करणारा , हिरीरीने मोदी प्रशासनाची खिंड लढविणारा आणि क्रिकेट व तंदुरुस्ती यांना आपल्या आयुष्याचे अविभाज्य अंग मानणारा प्रोफेसर अभिषेक निकम खूप खूप प्यारा आहे.
    जीवनधर्माला असोशीने भिडणाऱ्या आमच्या या जिंदादिल मित्राने २५ एप्रिलला वयाची चाळीशी पार केली. त्याला तुम्हाला 'भेटवावेसे' वाटले म्हणून हा लेखनप्रपंच.

    वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी, अंगठीतला खडा लाभावा तसा अभिषेकसारखा मित्र लाभण्याचे भाग्य आयुष्यात किती जणांच्या वाट्याला येते ?
    शायर दुष्यंत कुमार म्हणतो ,
    सिर्फ शायर देखता है क़हक़हों की अस्लियत
    हर किसी के पास तो ऐसी नज़र होगी नही ।

    संदीप सामंत.
    ९८२०५२४५१०
    २८/०४/२०२०.

  • खाद्यसंस्कृती महाराष्ट्राची !!

    दर कोसावर भाषा बदलते असं म्हणतात. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर इथे फक्त भाषाच नाही तर खाण्यापिण्याच्या रितीभातीही बदलतात. महाराष्ट्राला जसा संपन्न ऐतिहासिक वारसा लाभला आहे, तसेच या राज्याला स्थिर, संपन्नता देणारे भौगोलिक स्थानही लाभले आहे.

  • वात्रटिका : भाजी आणि पुस्तक

    पुस्तकात विवादग्रस्त विधाने का केली जातात?…