(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • क्रीडाविश्वाचे ऐतिहासिक सीमोल्लंघन !

    लगान, चक दे इंडिया यासारख्या जोशभर्‍या चित्रपटातील रोमांच प्रत्यक्षात यावेत आणि अंगावर शहारे उमटावेत असंच काहीसं दिल्लीमध्ये राष्ट्रकुल स्पर्धांच्या निमित्ताने अनुभवायला मिळालं. नकारात्मक प्रचाराकडून अभूतपर्व ऐतिहासिक यशाच्या दिशेने वाटचाल करणारी या स्पर्धेची यशोगाथा एखाद्या चित्रपटाला साजेशी होती. या स्पर्धेमुळे भारताने क्रीडा महासत्ता बनण्याच्या दिशेने कूच केली असल्याचे जगाला पहायला मिळाले.

  • बातम्यांचे आकर्षक आणि खेचक मथळे

    आज पन्नाशीच्या पुढे असलेल्या मंडळींना “अमृत” वगैरे मासिके आठवत असतीलच. या मासिकांमध्ये “मुद्राराक्षसाचा विनोद” वगैरेसारखी मनोरंजक सदरे असत. वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांच्या मुद्णावर अचूक बोट ठेवून त्यातल्या चुका दाखवून त्यातून मनोरंजन करणे हाच या सदरांचा उद्देश.

    सध्या “ब्रेकिंग न्यूज” आणि खळबळजनक मथळ्यांचा जमाना आहे. इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या हल्ल्यामुळे वर्तमानपत्रे जरा मागेच पडलेली आहेत. “ब्रेकिंग न्यूज” आधल्या दिवशी बघितल्यावर पुन्हा बातमी कोण कशाला वाचेल ? मात्र वृत्तपत्रातल्या बातमीचा मथळा दिलखेचक असेल तर ती बातमी किंवा लेख हमखास वाचला जाणार असेच हे गणित.

    काही बातम्यांचे मथळे असेच आकर्षक आणि खेचक असतात. त्यातलेच काही नमूने....


    - खूप वर्षांपूर्वी, एक महिला विमानप्रवासात प्रसूत झाली. त्या बातमीचे हेडिंग होते,
    'भाळी तिच्या, जन्म आभाळी.'


    - वजनात मारणे हा रद्दीवाल्यांचा आणि भाजीवाल्यांचा जणू हक्क असतो. त्यावर वैधमापन विभागाने कारवाई सुरू केली. त्या बातमीचं हेडिंग होतं,
    'मापात पाप' करणार्‍यांना चाप!


    - काही वर्षापूर्वी मुंबई पावसात तुंबली. एका बातमीचं हेडिंग होतं..
    'तुंबई'!


    - आणखी एका बातमीचं हेडिंग ...
    “अटक न करण्यासाठी लाच घेताना अटक!”


    बाय द वे, एक आठवणीतलं हेडिंग आठवलं.
    'जीव वाचवण्यासाठी पळताना खड्ड्यात पडून मृत्यू! '


    सौरभ गांगुली आणि युवराज सिंग यांनी त्रिशतकी भागीदारी पाकिस्तानविरुद्ध केली आणि त्याच दिवशी कम्युनिस्टांनी मनमोहनसिंग सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची धमकी दिली.

    लोकसत्ता फ्रंट पेज हेडिंग.

    डाव्यांचा तडाखा


    मागे कोल्हापुरात एक खून खटला गाजला होता. त्याच्या बातम्या खूप वाचल्या जायच्या. सहाजिकच, साक्षी, पुरावे, उलट तपासणी यांत हेडिंगचा मसाला मिळायचा.
    त्याच काळात, एका स्थानिक पेपरची हेडलाईन होती, 'नाम्या, बगतूस काय? घाल गोळी!'
    ... नंतर रिक्षांच्या मागेही दिसू लागले... 'नाम्या, बगतूस काय, घाल गोळी!'


    राहुल द्रविड च्या निवृत्ती वेळी एका इंग्रजी पेपर चा अप्रतिम मथळा होता.
    'indian team is now bread n butter but without jammy'


    भारताने वानखेडेत होणाऱ्या विश्वचषक अंतिम फेरी धडक मारली, तेव्हाचा एक अप्रतिम मथळा....
    'चारले खडे आता वानखेडे'


    पतंजली कोलगेटचे दात पाडणार! - मटा ऑनलाइन


    हे थोडं आक्षेपार्ह आणि तितकंच गमतीदार हेडिंग…

    गोव्यात पाळी नावाचं गाव आहे.विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेपूर्वी पाळी हा एक मतदारसंघ होता. निवडणुकीस एक नामांकित डॉक्टर उभे राहिले. मोठा मेळावा घेतला. धडाकेबाज भाषणे झाली. गोव्यातल्या एका नामांकित मराठी दैनिकाने दुस-या दिवशी हेडिंग दिले,
    "डॉ. ××××× पाळीच्या समस्या सोडविणार"!


    वादग्रस्ततेमुळे खैरनार यांची देवनार कत्तलखान्यात बदली झाली आणि त्यांनी तिथला कत्तलखानाच बंद करण्याच्या हालचाली आरंभल्या होत्या. त्याचे पंढरीनाथ सावंत याने दिलेले हेडींग अजून लक्षात राहिले आहे.

    खैरनार देवनारचे पवनार करणार


    या सर्वावर कडी करणारी हेडलाईन लोकसत्ताच्या अशोक पडबिद्री यांनी बर्‍याच वर्षांपूर्वी दिली होती. मुंबईत एका वर्षी प्रचंड म्हणजे प्रचंडच पाऊस झाला. अलीकडच्या 26 जुलैसारखाच. सारी मुंबई ठप्प झाली. लोकसत्ताची हेडलाईन होती - मुंबापुरीवर जलात्कार !!!


    मस्त... दिलखेचक शीर्षकांच्या आठवणींचा पाऊस पडतोय इथे. याच सम्दर्भात २००४ साली अटल सरकारचा पराभव करुन कॉंग्र्स बहुमताने जिंकली त्यावेळचं टाईम्स ऑफ इंडियाचं हेडींग होतं, King Cong... Queen Sonia. अर्थात परदेशी जन्माच्या प्रश्नावरुन सोनिया गांधींनी नंतर पंतप्रधानपद नाकारलं हा भाग वेगळा.


    बुटासिंघ २००५मध्ये बिहारचे राज्यपाल असताना तेथील त्रिशंकू विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस त्यांनी केली होती. त्यामुळे तत्कालीन केंद्र सरकारने तशी शिफारस राष्ट्रपतींकडे करून तेव्हा जदयू-भाजपच्या संभाव्य युतीला सरकार बनविण्यापासून रोखले होते. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द ठरवीत केंद्र सरकारवर कठोर प्रहार केले होते. तेव्हा एक शीर्षक होते(बहुधा "सामना"चे) - सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला "बुटा"ने हाणले.


    मध्यंतरी बालाजी तांबे यांना त्यांच्या गर्भसंस्कार या पुस्तकातील आक्षेपार्ह गोष्टींबद्दल खुलासा करण्याचे आदेश दिले होते तेव्हा लोकमत कि कुठल्याशा वर्तमानपत्राने ' तांबेचं पितळ उघडं' अशी बातमी दिली होती.


    'वडील लग्न करत नसल्याने मुलाची आत्महत्या'


    डिसेंबर २०१३ मध्ये, निवडणूक निकालानंतर, लोकसत्ता च्या मुख्य बातमीचे हेडिंग होते,
    'हाताची घडी, कमळावर बोट! '


    नवाकाळचे एक हेडिंग : श्रीकांतने जयसूर्याला गिळले. भारताच्या क्रिकेटसंघाने साजरी केली श्रीलंकेत हनुमान जयंती !


  • मार्लेश्वरची यात्रा

    सह्याद्रीच्या उंच कडय़ांच्या कुशीत वसलेले शंकाराचे स्वयंभू देवस्थान श्री क्षेत्र मार्लेश्वर हे महाराष्ट्रातील पवित्र देवस्थान आहे. हे अतिशय प्राचीन देवस्थान आहे. दरवर्षी संक्रातीला लाखो भक्त देवरुखजवळील मार्लेश्वराच्या यात्रेला जमतात. विशेष म्हणजे, त्यादिवशी मार्लेश्वराचे शुभमंगल साजरे केले जाते.(या वर्षी हा योग १४ जानेवारी ला आहे) मारळ या गावचा देव म्हणजे मार्लेश्वर. भगवान परशुरामाने मारळच्या देवस्थानाची स्थापना केली, असे सांगितले जाते. आणेराव साळुंके हा आंगवलीचा सरदार १८०० मध्ये शिकारीला गेला असता त्याला गुहेमध्ये शंकराचे दर्शन झाले. तोच हा मार्लेश्वर. ज्यादिवशी मार्लेश्वराचा शोध लागला तो दिवस मकर संक्रांतीचा होता. म्हणून संक्रांतीला मार्लेश्वराचा उत्सव साजरा होतो.

    त्यादिवशी साखरपा या गावातील गिरिजादेवी या देवीला मिरवत मार्लेश्वराच्या विवाहासाठी आणले जाते. आंगवली या गावात मार्लेश्वर प्रकट झाला म्हणून तेथील लोक चांदीचा मुकुट या सोहळ्यासाठी आणतात. अनेक गावांतून मार्लेश्वरला पालख्या येतात. देवरुख येथील श्री देव व्याडेश्वर हे यजमानी असतात. हा लग्नसोहळा मोठय़ा थाटात पार पडतो. त्यानंतर ठिकठिकाणच्या पालख्या व दिंडय़ा येतात. या दिंडय़ा श्री मार्लेश्वराच्या करवल्या होतात. या यात्रेसाठी अन्नछत्र चालवले जाते. अतिशय रमणीय निसर्ग लाभलेल्या या ठिकाणी आलेला माणूस तहानभूक विसरून आजूबाजूच्या सुंदर परिसराचा व हिरव्यागार वनराजीचा आस्वाद घेण्यातच दंग होतो. उंचच उंच डोंगर, मधूनच वाहणारी बावनदी, हिरवीगार झाडी.. हे सर्व पाहून प्रवासात आलेली मरगळ दूर होऊन मन प्रसन्न होते. येथून चालताना सभोवतालचे सृष्टीसौंदर्य व हिरवीगार वनराजी पाहून व या सर्वाचा आस्वाद घेत असतानाच आपण देवळाजवळ केव्हा पोहोचतो ते कळतच नाही.

    शंकराचे हे स्वयंभू देवस्थान संगमेश्वर तालुक्यातील देवरुख गावापासून 18 कि.मी. वर आहे. शंकराचे निस्सीम भक्त मार्लेश्वरची फेरी सहसा चुकवत नाहीत. मार्लेश्वरचं वैशिष्ट्य म्हणजे इथे नास्तिक मंडळीही रमतात. याचं कारण म्हणजे इथला रम्य निसर्ग. पावसाळ्यात इथला धबधबा रौद रूप धारण करतो. परंतु त्याचं ते रूपही मनाला भावतं. भाविक मंडळी शंकराचं दर्शन घेऊन तृप्त होतात तर निसर्गप्रेमींना इथे आगळीच भेट मिळते. म्हणूनच मार्लेश्वर हे ठिकाण लोकप्रिय आहे.

    मार्लेश्वर. भगवान शंकराचं मंदिर आणि नजिकचा धबधबा यामुळे आस्तिकांबरोबरच नास्तिकही इथे आवर्जून येतात. संगमेश्वर रेल्वेस्थानकापासून ३८ कि.मीटर अंतरावर आहे. देवरूख समुद्रसपाटीपासून उंच असल्यामुळे इथला बराचसा भाग ओसाड भासतो. मात्र पावसाळ्यात हाच परिसर घनदाट झाडांनी वेढला जातो. लांबवर पसरलेल्या सह्यादीचं दर्शन रस्त्यावरून जाताना होतं. देवरूख गावं मागं पडलं की काही मिनिटांतच आपण मार्लेश्वरला पोहोचतो. सह्यादीच्या उंच पर्वतांच्या तुलनेत मालेर्श्वरचा डोंगर एका दमात चढण्याइतपतच उंच आहे. डोंगर किंवा ब्रीज चढून गेल्यावर डोंगर पोखरून गुहा तयार केलेली दिसते. गुहेची उंची खूपच कमी असल्यामुळे वाकून आत प्रवेश करावा लागतो. आत गेल्यावर मिट्ट काळोखात समईच्या प्रकाशात मार्लेश्वराची पिंड आणि मूर्तीचं दर्शन होतं. असं सांगितलं जातं की या गुहेत एकही विजेचा दिवा टिकत नाही. अनेकांनी इथे विजेचा दिवा लावण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळेस तो असफल ठरला असं इथले पुजारी सांगतात. त्यामुळे इथे बॅटरी, मेणबत्ती किंवा कंदिल घेऊनच यावं लागतं. मेणबत्तीने गुहेच्या कपारीत निरखून पाहिल्यास बरेच साप दिसतात. परंतु आजवर कुणालाही सापाने चावल्याचं ऐकण्यात आलेलं नाही.

    मार्लेश्वराच्या मंदिरानंतर डोंगराची सपाटी संपते. इथल्या सपाट भागाला लागूनच खाली घळी आहे. मंदिरातून बाहेर आल्यावर समोर पांढराशुभ्र धबधबा आपल्याला खुणावतो. घळीत उतरून या धबधब्याकडे जाता येतं. इतर मोसमात तुम्ही या धबधब्याच्या पाण्यात खेळू शकता. पण पावसाळ्यात मात्र त्या घळीत उतरणंही कठीण होतं. गुळगुळीत दगड आणि डोंगरकपारीतून वाहणारा तो शांत धबधबा अचानक उग्र रूप धारण करतो. आता ब्रीजवर उभं राहून पावसाळ्यातही जवळून धबधब्याचे बोचरे तुषार अंगावर घेण्याचा आनंद लुटता येतो. मार्लेश्वराच्या डोंगराला तिन्ही बाजूंनी डोंगरांनी वेढलं आहे. मार्लेश्वरचा परिसर पावसाळ्यात अधिक खुलतो. त्यावेळेस तर इथे निसर्गप्रेमींनी आवर्जून यावं. त्याचबरोबर इतर दिवसांमध्येही मार्लेश्वरला आवर्जून भेट द्या. निसर्गाची भिन्न रूपं आपल्याला अनुभवायला मिळतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- विकिपीडिया

  • अपग्रेडेशन

    माणसाच्या भाग्यात जसे चढ-उतार असतात ,भरती-ओहोटी असते तसे गाव आणि शहराचेही असावे.नालासोपारा या गावाच्या बाबतीत हे दिसून येते.मुंबई महानगर प्रदेशाच्या सीमेवर पश्चिम रेल्वेच हे एक लोकल स्टेशन. एकेकाळी म्हणजे यादवांच्या वगैरे काळात हे महत्त्वाचे व्यापारी बंदर.

  • आमचं नव्हे, त्यांचं !

    नववर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने एका मित्राला फोन केला. शुभेच्छा दिल्यानंतर सगळे म्हणतात तसं तो मला ‘सेम टू यू’ म्हणेल या आशेने मी काही क्षण थांबलो. पण कसलं काय, तो अत्यंत त्रासिक आवाजात चिरकला ‘अरे, कोणतं नविन वर्ष? कोणाचं नविन वर्ष? हे त्या इंग्रजांच्या बाळांचं नववर्ष आहे, आपलं नाही. आपलं नववर्ष सुरु झालं की शुभेच्छा दे.’ असं म्हणून त्याने रिसीव्हर आदळला. मी त्याचा कडवट झालेला चेहरा डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करू लागलो. माणसं काही कारण नसताना अशी सतत वैफल्यग्रस्त असल्यासारखी का वागतात? त्यांना आनंदाची अॅलर्जी असते का? थोडंही नाउमेद न होता 'मित्र' नावाच्या आणखी एका प्राण्याला फोन लावला. शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद देण्याचं सौजन्य त्याने दाखवलं खरं, पण त्याचबरोबर ‘आम्ही एक जानेवारीला नाही, तर गुढीपाडव्याला नववर्षाचा आनंद मनवणार आहोत’ हे सांगायला तो विसरला नाही. मला माझ्या अनेक मित्र-मैत्रिणींना नववर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या, पण ‘हे नववर्ष आमचं नव्हे’ हे ऐकून माझा उत्साह हळूहळू मावळू लागला.

    आम्ही असे का वागतो? आयुष्याच्या क्षणभंगूरतेची यथार्थ जाणीव असल्यामुळे स्वतःच्या विवंचना विसरण्यासाठी एकत्र येऊन चार घटका आनंद मनविण्यासाठी मुद्दाम घडवून आणल्या जाण्याऱ्या विविध आनंदोत्सवांना धर्म आणि जातींमध्ये बुडवून काढण्याची आम्हाला का इच्छा होते? एका धर्माचे लोक आनंद मनवत असताना दुसऱ्या धर्माच्या लोकांनी त्यावेळी आनंद मनवू नये असं कोणत्या धर्मग्रंथात लिहिलं आहे? एखाद्या महोत्सवाचा खऱ्या अर्थाने आनंद लुटण्यासाठी तो महोत्सव आधी ‘आपला’ असायला पाहिजे ह्यालाच सर्वधर्मसमभाव म्हणायचं का? आनंद वाटण्याऐवजी आम्ही आनंदोत्सवांना वेगवेगळ्या प्रकारची लेबलं लावून त्यांच्या वाटण्या करतो आणि त्यानंतर आनंदी राहायचं की दिवसभर आंबट चेहरा करून बसायचं हे ठरवतो. ज्यांना भूतकाळात खितपत पडायची सवय नसते त्यांच्यासाठी आयुष्यातला प्रत्येकच दिवस हा नववर्षाचा पहिला दिवस असतो !

    केवळ ‘आमच्या’ नव्हे आणि ‘त्यांच्याही’ नव्हे तर ‘आम्हा सर्वांच्या’ नववर्षानिमित्त सर्व मित्र-मैत्रिणींना मन:पूर्वक शुभेच्छा !

    -- श्रीकांत पोहनकर
    98226 98100
    shrikantpohankar@gmail.com

  • जगातली १० अशी ठिकाणे जिथे तुम्हाला सहजपणे प्रवेश नाही.

    जगातली १० अशी ठिकाणे जिथे तुम्हाला सहजपणे प्रवेश नाही. इथली सिक्युरिटी व्यवस्था अचाट आहे. 

  • ऋण मातीचे (अनिल शिंदे)

     

  • यंत्राच्या गुलामगिरीत मानवत्व विसरू नका !

    टीव्ही पाहणे, मोबाईलवर बोलणे, वृत्तपत्र-पुस्तके वाचणे, अश्या अनेक गोष्टी जेवताना उरकल्या जातात. यातून जेवणाकडे तर दुर्लक्ष होतेच; शिवाय आप्तांशी प्रत्यक्ष बोलण्याची संधीही आपण गमावत असतो, हे पटकन ध्यानात येत नाही. मोबाईलमुळे सर्वांशी संपर्क कमी होत चालला आहे आणि त्यातून प्रत्येक कामामध्ये व्यत्यय येण्याचे प्रमाणही वाढले आहे. 

  • करून गेला गाव नाही नाही जळगाव

    चार दिवसापासून भाऊ कदम आणि ओंकार भोजने या जोडीला पाकिटात घेऊन फिरत होतो म्हणजेच नाटकाचे तिकीट घेवून हो....दिवस उजाडला... संध्याकाळी ७ लाच ऑफिस मधून कल्टी मारली....दोन घास खावून पोरा बाळांना घेऊन नाट्यगृहाच्या गेटवर गाडी लावून दाराशी हजर.... गेटवाला भाऊ (भाऊ कदम नव्हे) बोलला...भाऊ नाटक गह्यरे उशिरा सुरू झाले...तुम्ही या फिरीसन...झाले एक तास काय करू सगळे... यू टर्न मारला...आणि भाऊंचे उद्यान (भवरलाल भाऊचें ) गाठले, श्री दत्ताच्या पाया पडून गार्डनच्या फेऱ्या मारल्या....चांगले एक किलो वजन कमी झाले असेल असे वाटायला लागले...आणि चला चला वेळ झाली म्हणून गृहमंत्री आले...परत त्याच जागी आलो तर गर्दीच गर्दी..अजून पहिला शो सुटलेला नव्हता....आणि गेटवाला दादा मध्ये पण घेत नव्हता... पब्लिक डिमांड मुळे अखेर कंपाऊंड मध्ये प्रवेश मिळाला...९.१५ च्या आसपास शो सुटला...पण सेल्फी मुले लोक उशिरा आले बाहेर...असो शेवटी प्रवेश झाला...महा...नग..र (महानगर असे लिहायला त्रास होतो) पालिकेच्या नाट्यगृहात... बाल्कनीत रांगेत ६ तिकिटे आमची....बसलो एकदाचे आणि बोटीत बसण्याचा भारी feel आला...कारण सगळ्या खुर्च्या एक जरी हलला तरी डोलत होत्या....त्यात गृहमंत्री फक्त खोकल्या तरी मस्त अंग थरथरत होते...भारीच...एवढ्यात लाइट गेली ..काळोख पूर्ण..फक्त फेसबुक..व्हॉट्स अप.. रिल्स बघणारी तोंड चमकत होती...मध्येच लाईट यायची ..जायची...स्टेजवर पूर्ण अंधार होता... खुर्च्या वरचे लाईट सुरू...आणि बाकी सगळे बंद...आम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर असल्याने....ओळखले की कूछ तो गरबड है भाऊ...ऐसा लाइट लूक झाक नही करता...१०.१५ झाले.... इव्हेंट वाले दिनेश भाऊ (भाऊ कदम नव्हे)आले...५ मिनटात होईल सुरू प्रयोग.. टाळ्या वाजवून दाद दिली सगळ्यांनी...कारण आपण जळगावकर अती सहनशील...खूपच... हे झाले आजूबाजूचे वातावरण...वाचून तुम्ही नाट्यगृहात पोचल्याचा feel येत असेलच...

    आता माझा जांगळबुत्ता कोणी केला....माझ्या बाजूला ७५ तरीचे बाबाजी आणि एक ६०चे काकाजी येवून बसलेले.... एक कान खूप पकला...टाईमपास करणेका था...मग बाबाजी ने काकाला अख्या मोबाईलची गॅलरीच दाखवली...विमान... हेलिकॉप्टर...बर्फ.. गॉगल..जंगल...काय अन् काय...सगळे फोटो दाखवून ..त्या प्रत्येक जागेची महती सांगितली...मग मध्येच हा असा उशीर पुण्याला झाला असता तर...चालले असते का...पुणेकर वेळेचे पक्के...काका बोल्ले पिक्चर टाकी असती तर लोकांनी अंगावर घेतली असती....खुर्च्या तोडल्या असत्या....ब्ला ब्ला ब्ला...मग अजून टाईमपास कसा तर...खाली ८०० रुपयाचे तिकीट काढलेल्या भाऊला (भाऊ कदम नव्हे) फोन लावला...त्याला पिळला....खूप पिळला...आम्ही तर ३००चे काढले....तुम्ही ८०० चे काढले...३०० गेले तर वाटणार नाही...तुमचे कसे होईल...थंडी वाजतेय का खाली... अडी गह्यर गरम हुई राहलय....मग हा इव्हेंट वाला भाऊ (भाऊ कदम नाही)मह्या घरच्या जोय राहतो....सकाळीच ३०० मांग्याले जान पडीन ... हे झाल की परत पुण्याचा डायलॉग....मग नाटक पाहायला येणारे सगळे सज्जन म्हणून काही बोलत नाहीये म्हणे...अगदी नॉन स्टॉप दोघांचे एक कानात सुरूच....दुसऱ्या कानाला रमा राघव ची सीरियल सुरू मॅडमची....म्हंटले इथे पण हेच..मग करू तरी काय... हे उत्तर...१८ वर्ष झाली लग्नाला ...काय बोलणार ना माणूस...दुसरी पण सीरियल संपली...पाहून....या सगळ्यात एक मावशी मागे तिसऱ्या रांगेत....दर १० मिनिटाला ....साहेब पैसे परत द्या....नाटक होईल की नाही ते सांगा...आताच द्या पैसे....असे कुठे चालते का...८.३० चे नाटक १०.३० झाले तरी नाही सुरू केले....पैसे परत द्या....मावशीचा आवाज माझ्या कानापर्यंत येवून परत जात असेल एवढाच....पण रेगुलर ठरवून मावशी पिंगा घालत होत्या....मेरे पैसे मेरे पैसे....वाटलं आपणच देवून टाकावे हिला ३०० रुपये...निदान टिक टिक तरी बंद होईल ....पोर बाळ पण कंटाळली...मध्येच परत इव्हेंट वाले भाऊ(भाऊ कदम नाही हो)आले आता फक्त २ मिनिट....लागतील ...उठून बाहेर गेलेली ८०० वाली पब्लिक जागेवर आली ....वाटले बाबा..काका..मावशी...मॅडम.... शांत बसतील...लाईट आली...चमकली..आणि मस्त...अंधार झाला....झाले...मावशी जरा सुर लावत... बोल्ल्याच..समजायचे ते समजलो....कारण ऐकण्या शिवाय पर्याय नव्हताच ..माझ्याकडे पण...यात सोबत Dad आलेले....त्यांनी तिकीट मागितली काढलेली....म्हटले पाहत असतील ....तर त्यांनी तिकिटावरचा मोबाईल नंबर डायल केला....पलीकडून कोण बोलले काय माहित..फोन कट झाला ...डोक्याला हात लावण्या वाचून पर्याय नव्हता....१०.४५ झाले ...आणि आवाज आला.... अजून ५ मिनिट द्या.....झाले...बाबाजी बोलले....झोप येतेय आता म्हातारा माणूस मी...मावशी...बोलल्या..नोकरीवरून थकून भागून येतो आम्ही...असे काय करताय..पैसे परत द्या... हुश....डोकं फुटायची वेळ आलेली आता....११ वाजले....स्टेजवर ५/६ डोकी आली...अंधार असल्याने कपडे तेवढे दिसत होते ... पांढऱ्या कुर्त्यात आणि धोतरात माणूस दिसला (भाऊ कदम हेच आपले)आणि शेजारी लाल शर्ट फक्त...( कदाचित ओंकार भोजने हेच).....झाले... लाइट मध्ये प्रॉब्लेम असल्याने....आणि महा नग.... र.पालिकेच्या सौजन्याने generator नसल्याने आजचा प्रयोग होणार नाही अशा केविलवाण्या शब्दात आयोजक सांगून मोकळे झाले...कदम भाऊ सुद्धा हळू आवाजात काही बोलले की....क्षमा करा बिघाड झाल्याने आजचा प्रयोग नाही करू शकत....झाले....३ तास मनोरंजन बाबा ..काका मावशी यांनी केले....

    आता जाता जाता बाबा... हे जर पुणे असते ना भाऊ..नुसत्या शिव्या दिल्या असत्या....असे चाललेच नसते... हे सुरू झाले....त्यात खाली स्तेजजवळ एक काकां आले...मी ५० किलोमीटर वरून आलोय....नाटक पाहायला...सुरू करा... आताच करा....आता काय करतील आयोजक...बिचारे...मुद्दाम थोडी केले त्यांनी....एक जण बोलला मला आताच ऑनलाईन पैसे पाठवा....काय करतील...ते...त्यांनी का गोणी मध्ये पैसे आणले असतील का...परत करायला....कठीण काळ सगळा ...बाबा उठले ...काकांना बोलले...त्याने घरून पैसे पण आणले ना... अडी सकाळ हुई जाईन भो.. नंबर लागत लागत....त्या भाऊ कदम च तोंड बी दिसत नाहीये...त्याच्या तोंडावर बट्रिक चमकवा रे भो.....निदान दिशिन तरी भाऊ..अशी शेवटची आर्त हाक मला ऐकू आली...आणि मी जायला निघालो....ऐकून नाट्यगृहाची गुणवत्ता....लक्षात आली....बाहेर पडताना नाट्यगृहाची कोनशिला छान होती ... आताचे माननीय उप मुख्यमंत्री... तेव्हाचे मुख्यमंत्री याचे नाव सुवर्णा अक्षरात छान चमकत होते.... कोनशिलेची गुणवत्ता छानच अगदी...असो आपल्याला काय...नाटक पाहायचे सोडून बाबा ...काका..मावशी हा तीनपात्री प्रयोग फुकटात ऐकण्याचा योग प्राप्त झाला ...अजून काय हवे ...गाडी काढली सगळे घरी आलो....हळदीच्या दुधाने जखमेवर उतारा केला आणि लिहायला घेतले...

    नाटकाचे नाव करून गेला गाव होते ...आणि मला ...करून गेला जळगाव सुचले.... सूचना - राजकीय भक्तांनी या पोस्टशी स्वतचा दूर दूर पर्यंत संबंध जोडू नये....फक्त तेवढे जरा नाट्यगृहाचे काम चांगले करून द्या....आम्ही आमचे ६ तिकिटांचे पैसे १८०० रुपये परत घेऊच.....चूक भूल माफ असावी.

    आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपवरील लेखक धीरज महाजन ह्यांनी लिहिलेला हा लेख

  • भारतमातेच्या वीरांगना – 16 – तारा राणी श्रीवास्तव

    १२ ऑगस्ट १९४२ भारत-छोडो आंदोलनाचे पडसाद देशभरातून उमटत होते. ताराराणी आणि त्यांचे पती श्री फुलेंदू बाबू ह्यांनी हेच औचित्य साधून एक पद-यात्रा काढायचे ठरवले. सीवान पोलीस चौकीवर तिरंगा फडकणे हा उद्देश ठेऊन. ह्या अश्या पदयात्रांवर ताबा मिळविण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज सुरू केला. त्यानेही गावातली लोकं मागे सरली नाही, तेव्हा पोलिसांनी ह्या सगळ्या निःशस्त्र लोकांवर गोळ्या झाडायला सुरवात केली. फुलेंदू बाबू आणि ताराराणी आघाडी सांभाळत होते. फुलेंदू बाबूंना गोळी लागली. आपल्याच साडीचा तुकडा जखमेला तात्पुरता बांधून तारा राणींनी आपली यात्रा परत सुरू केली.