“आज सकाळी (Jogging) फिरायला गेलो होतो तेव्हा माझ्यापासून ५00 मिटर पुढे एक व्यक्ति गतीने चालत होती, बहुदा रोज नियमाने चालत असणार,निरखून पाहिल्यावर लक्षात आले की त्या व्यक्तीची गती माझ्यापेक्षा थोडीशी कमी असावी असे मला वाटले आणि थोडा अजून वेगाने चाललो तर नक्की त्या व्यक्तीस ओलांडून मी पुढे जाईन ही खात्री झाली...!!!
मग काय, मी.... माझा वेग वाढवला आणि लक्ष एकवटून चालू लागलो.मला अजून १ मैल चालायचे होते.....घरी परतायचे होते व तेवढ्या वेळात आपण त्याला नक्कीच पार करू याची पुरेपूर खात्री मला होती...
थोड्याच वेळात लक्षात आले की आम्हां दोघांमधील अंतर कमी झाले आहे...........मी अजून वेगाने चालू लागलो. पावलागणिक अंतर कमी होत होते.....!!!
माझा मलाच अभिमान वाटू लागला होता, माझी गती पाहून.......!!
आणि तो क्षण आला, मी त्या गृहस्थाला पार केले, मागे टाकले..!
हुर्र्ये..!
हुर्र्ये...!!
हुर्र्ये....!!!
मनातल्या मनात स्वत:चे कौतुक वाटले,
जिंकलोच आपण...!?! जिंकलीच आपण स्पर्धा....!
स्पर्धा..?
याबद्दल त्या व्यक्तिला तर काहीच माहीत नव्हते, तो या स्पर्धेचा भाग ही नव्हता.
मात्र जिंकण्याच्या ईर्षेने मी माझा नियमित रस्ता सोडून पुढे निघून गेलो होतो...... जेथून वळायचे होते ते वळण मागे पडले होते...... आता उशीर होणार होता, वेळापत्रक चुकणार होते, अचानक चिडचिड होवू लागली,अस्वस्थता वाढली. परत जाण्यामध्ये बराच वेळ जाणार होता...
असेच होते ना आयुष्यात सुद्धा..?
सगळे लक्ष कोण पुढे आहे, कोण पुढे जातो आहे, कोण पुढे जाईल ? याकडेच असते -
सहकारी ?
शेजारी..?
मित्र?
नातेवाईक?,
यांच्यापेक्षा आपण सरस आहोत, त्यांच्यापेक्षा आपण पुढे आहोत हे स्वत:ला आणि इतरांना दाखवून देण्यातच आयुष्य जाते. मग आपला मार्ग चुकतो किंवा बरेच काही करायचे राहून जाते. या अनैसर्गिक तुलनेतील धोका म्हणजे “हे न संपणारे दुष्ट चक्र आहे.” ही नशा आहे, झिंग आहे हे ध्यानात येत नाही.
कोणीतरी पुढे असणारच आहे, हेच नैसर्गिक आहे हेही ध्यानात येत नाही. विनाकारण असुरक्षिततेची भावना प्रबळ होते व सुख गमावून बसतो.
कोणाचे तरी मूल जास्त शिकलेले बनणार हे नक्की;...!!
कोणी तरी आपल्यापेक्षा जास्त सुंदर असणारच;....!!!
कोणाला तरी एखादी संधी जास्त मिळणार;.....!!!
कोणाचे तरी वलय आपल्यापेक्षा मोठे असणारच;..!!!!
कोणाला तरी आपल्यापेक्षा कमी आजार असणारच;......!!!! कोणाजवळ तरी काही तरी वेगळे असणारच...!!!!
तेव्हा लक्ष आपल्यावर, आपल्या ध्येयावर केन्द्रित करावे, आपली चालण्याची गती आपल्या कालच्या गतीपेक्षा कशी आहे..?
हे पाहावे......!!!
आहे ते कसे उपभोगता येईल हे पाहावे.
आनंदी रहावे.......!!!
बस्स.....!!
खतम....!!!!!
बघा पटतय का..?
“मराठी चित्रपटांमध्ये नेहमीच वैविधता आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यातही अनेक टप्पे म्हणजे पौराणिक, ऐतिहासिक, स्त्रीप्रधान, कौटुंबिक, तमाशा किंवा नृत्याची पार्श्वभूमी लाभलेले चित्रपट झळकत राहिले. विशेष म्हणजे अशा अॅक्शनवर आधारीत सिनेमांमध्ये काही स्त्री कलाकारांनी मध्यवर्ती भुमिका साकारल्या. त्यापैकी एक महत्त्वाचं नाव होतं सुषमा शिरोमणी यांचं. चित्रपटातील त्यांनी साकारलेल्या भूमिका आणि तेव्हाच्या अनुभवांविषयी आम्ही जाणून घेतलं, “मराठीसृष्टी.कॉम”ला त्यांनी दिलेल्या “एक्सकलुझिव्ह” मुलाखतीतून…
आज पन्नाशीच्या पुढे असलेल्या मंडळींना “अमृत” वगैरे मासिके आठवत असतीलच. या मासिकांमध्ये “मुद्राराक्षसाचा विनोद” वगैरेसारखी मनोरंजक सदरे असत. वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांच्या मुद्णावर अचूक बोट ठेवून त्यातल्या चुका दाखवून त्यातून मनोरंजन करणे हाच या सदरांचा उद्देश.
सध्या “ब्रेकिंग न्यूज” आणि खळबळजनक मथळ्यांचा जमाना आहे. इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या हल्ल्यामुळे वर्तमानपत्रे जरा मागेच पडलेली आहेत. “ब्रेकिंग न्यूज” आधल्या दिवशी बघितल्यावर पुन्हा बातमी कोण कशाला वाचेल ? मात्र वृत्तपत्रातल्या बातमीचा मथळा दिलखेचक असेल तर ती बातमी किंवा लेख हमखास वाचला जाणार असेच हे गणित.
काही बातम्यांचे मथळे असेच आकर्षक आणि खेचक असतात. त्यातलेच काही नमूने....
- खूप वर्षांपूर्वी, एक महिला विमानप्रवासात प्रसूत झाली. त्या बातमीचे हेडिंग होते,
'भाळी तिच्या, जन्म आभाळी.'
- वजनात मारणे हा रद्दीवाल्यांचा आणि भाजीवाल्यांचा जणू हक्क असतो. त्यावर वैधमापन विभागाने कारवाई सुरू केली. त्या बातमीचं हेडिंग होतं,
'मापात पाप' करणार्यांना चाप!
- काही वर्षापूर्वी मुंबई पावसात तुंबली. एका बातमीचं हेडिंग होतं..
'तुंबई'!
- आणखी एका बातमीचं हेडिंग ...
“अटक न करण्यासाठी लाच घेताना अटक!”
बाय द वे, एक आठवणीतलं हेडिंग आठवलं.
'जीव वाचवण्यासाठी पळताना खड्ड्यात पडून मृत्यू! '
सौरभ गांगुली आणि युवराज सिंग यांनी त्रिशतकी भागीदारी पाकिस्तानविरुद्ध केली आणि त्याच दिवशी कम्युनिस्टांनी मनमोहनसिंग सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची धमकी दिली.
लोकसत्ता फ्रंट पेज हेडिंग.
डाव्यांचा तडाखा
मागे कोल्हापुरात एक खून खटला गाजला होता. त्याच्या बातम्या खूप वाचल्या जायच्या. सहाजिकच, साक्षी, पुरावे, उलट तपासणी यांत हेडिंगचा मसाला मिळायचा.
त्याच काळात, एका स्थानिक पेपरची हेडलाईन होती, 'नाम्या, बगतूस काय? घाल गोळी!'
... नंतर रिक्षांच्या मागेही दिसू लागले... 'नाम्या, बगतूस काय, घाल गोळी!'
राहुल द्रविड च्या निवृत्ती वेळी एका इंग्रजी पेपर चा अप्रतिम मथळा होता.
'indian team is now bread n butter but without jammy'
भारताने वानखेडेत होणाऱ्या विश्वचषक अंतिम फेरी धडक मारली, तेव्हाचा एक अप्रतिम मथळा....
'चारले खडे आता वानखेडे'
पतंजली कोलगेटचे दात पाडणार! - मटा ऑनलाइन
हे थोडं आक्षेपार्ह आणि तितकंच गमतीदार हेडिंग…
गोव्यात पाळी नावाचं गाव आहे.विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेपूर्वी पाळी हा एक मतदारसंघ होता. निवडणुकीस एक नामांकित डॉक्टर उभे राहिले. मोठा मेळावा घेतला. धडाकेबाज भाषणे झाली. गोव्यातल्या एका नामांकित मराठी दैनिकाने दुस-या दिवशी हेडिंग दिले,
"डॉ. ××××× पाळीच्या समस्या सोडविणार"!
वादग्रस्ततेमुळे खैरनार यांची देवनार कत्तलखान्यात बदली झाली आणि त्यांनी तिथला कत्तलखानाच बंद करण्याच्या हालचाली आरंभल्या होत्या. त्याचे पंढरीनाथ सावंत याने दिलेले हेडींग अजून लक्षात राहिले आहे.
खैरनार देवनारचे पवनार करणार
या सर्वावर कडी करणारी हेडलाईन लोकसत्ताच्या अशोक पडबिद्री यांनी बर्याच वर्षांपूर्वी दिली होती. मुंबईत एका वर्षी प्रचंड म्हणजे प्रचंडच पाऊस झाला. अलीकडच्या 26 जुलैसारखाच. सारी मुंबई ठप्प झाली. लोकसत्ताची हेडलाईन होती - मुंबापुरीवर जलात्कार !!!
मस्त... दिलखेचक शीर्षकांच्या आठवणींचा पाऊस पडतोय इथे. याच सम्दर्भात २००४ साली अटल सरकारचा पराभव करुन कॉंग्र्स बहुमताने जिंकली त्यावेळचं टाईम्स ऑफ इंडियाचं हेडींग होतं, King Cong... Queen Sonia. अर्थात परदेशी जन्माच्या प्रश्नावरुन सोनिया गांधींनी नंतर पंतप्रधानपद नाकारलं हा भाग वेगळा.
बुटासिंघ २००५मध्ये बिहारचे राज्यपाल असताना तेथील त्रिशंकू विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस त्यांनी केली होती. त्यामुळे तत्कालीन केंद्र सरकारने तशी शिफारस राष्ट्रपतींकडे करून तेव्हा जदयू-भाजपच्या संभाव्य युतीला सरकार बनविण्यापासून रोखले होते. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द ठरवीत केंद्र सरकारवर कठोर प्रहार केले होते. तेव्हा एक शीर्षक होते(बहुधा "सामना"चे) - सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला "बुटा"ने हाणले.
मध्यंतरी बालाजी तांबे यांना त्यांच्या गर्भसंस्कार या पुस्तकातील आक्षेपार्ह गोष्टींबद्दल खुलासा करण्याचे आदेश दिले होते तेव्हा लोकमत कि कुठल्याशा वर्तमानपत्राने ' तांबेचं पितळ उघडं' अशी बातमी दिली होती.
'वडील लग्न करत नसल्याने मुलाची आत्महत्या'
डिसेंबर २०१३ मध्ये, निवडणूक निकालानंतर, लोकसत्ता च्या मुख्य बातमीचे हेडिंग होते,
'हाताची घडी, कमळावर बोट! '
नवाकाळचे एक हेडिंग : श्रीकांतने जयसूर्याला गिळले. भारताच्या क्रिकेटसंघाने साजरी केली श्रीलंकेत हनुमान जयंती !
‘बिग बॉस’ मधील उत्तान, अश्लील चाळे आणि ‘राखी का इन्साफ’ मधील असभ्य, मानहानीकारक वक्तव्ये यामुळे या दोन्ही कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी पुढे आली. त्या निमित्ताने वाहिन्यांवर अंकुश ठेवण्याचाही मुद्दा ऐरणीवर आला. खरे तर वाहिन्यांवरील कार्यक्रमाच्या प्रसारणावर कायद्याने अंकुश ठेवायला हवा किंवा त्या संदर्भात आचारसंहिता तयार करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हायला हवी.
भारत देश हा पुरातन सनातन राष्ट्र आहे या देशांनी आजवर अनेक धोके खाले आहेत ह्याची साक्ष आपला इतिहास देतो. आज पर्यंत या देशाला काणत्याही विदेशी ताकतीने पराजित केले नाही.
आता हेच बघा नं…. Tag आणि लोकमत आयोजित, नातं खास.. नृत्य झकास..स्पर्धेची ad हर्षदानी मला पाठवली. मी आणि गीतानी हिंमत करुन भाग घेतला. फक्त २ दिवस जमके practice केली. जमेल नं या वयात? असं मनातही आणलं नाही.
नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मला 29 ऑगस्ट रोजी नुकतीच 22 वर्षे पूर्ण झाली आहेत.ऑनलाईन व्हिडीओ स्ट्रीमींगच्या माध्यमातून नेटफ्लिक्सने अल्पावधीतच डिजिटल क्रांतीच्या युगात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.वेबसीरिजला हक्काचं व्यासपीठ मिळवून देऊन फक्त भारतातच नाही तर संपूर्ण विश्वात अमर्याद मनोरंजनाचा साठा नेटफ्लिक्सने उपलब्ध करून दिला आहे.
वकील जातचं लय चतूर
प्रसंग - काल सकाळी...
स्थळ - सांगली स्टेशन...
फस्ट क्लास ए.सी. बोगीत आपला एक वकील एकटाच.
कोल्हापूर जवळ असल्याने बोगी जवळपास रिकामी...
एक स्त्री त्यांच्या कंपार्टमेंट मध्ये आली...
"तुमच्या जवळचा सगळा किंमती ऐवज काढा नाही तर मी आरडा ओरडा करेन की तुम्ही माझी छेड काढली म्हणून !!"
वकीलांनी साहेबांनी शांतपणे कागद पेन काढला...
त्यावर लिहीलं...
"मी मुकबधीर आहे...मला बोलता येत नाही ;ऐकू येत नाही... तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते या कागदावर लिहून द्या.."
बाई जे बोलली ते तिनं लिहून दिलं...
त्या वकीलांनी ते वाचलं...
कागदाची घडी करुन खिशात ठेवला आणि म्हणाले..
"हं...
बोंबला जोरात आता कि मी तुमची छेड काढली म्हणून,
माझ्याकडे तुमच्या हस्ताक्षरातली चिठ्ठी आहे पुरावा म्हणून "
बाई पळाली ना सैराट !!!!
वकिलांचा नाद करायचा नाय !
दर वर्षी, २० ऑक्टोबर रोजी, इंटरनॅशनल शेफ डे (आंतरराष्ट्रीय स्वयंपाकी दिवस) साजरा केलें जातो.
WACS ही संस्था २० ऑक्टोबर १९२८ मध्ये पॅरिस येथे स्थापना झाली. इंटरनॅशनल शेफ डे हा २००४ सालापासून World Association of Chefs Societies (WACS) या संस्थेतर्फे साजरा केला जातो.
स्वयंपाक ही एक कला आहेच पण तो आकर्षक व्यवसायही झाला आहे. शेफ बनणं आता प्रतिष्ठेचं मानलं जातं. हे क्षेत्र वेगाने विस्तारत असून, प्रोफेशनल शेफना बरीच मागणी आहे. स्वयंपाकाची आवड असणाऱ्या व्यक्तीला शेफ म्हणून नवनव्या डिशेस बनवण्याची संधी तर मिळतेच. शिवाय त्यातून स्वतःचं करिअरही घडवता येतं. निरनिराळी हॉटेल्स, त्यातून मिळणाऱ्या चमचमीत खाद्यपदार्थांवर ताव मारणं हे आजच्या लाइफस्टाइलचा एक भाग बनला आहे. काही हॉटेल्सचे विशिष्ट पदार्थ चाखायला लोक आवर्जून त्या हॉटेलची पायरी चढत असतात. शिवाय फूडचे वेगवेगळे इव्हेंटस टीव्हीवर दिसत असतात. त्यातून वेगवेगळ्या रेसिपीज लोकांसाठी पेश केल्या जातात. एकूणच स्वयंपाक बनवणं ही कला घरापुरती मर्यादित राहिली नाही. कुणालाही खूश करण्याचा मार्ग पोटातून जातो हे व्यावसायिकांना पक्कं उमगलं आहे. त्यामुळे चमचमीत खाना खजाना बनवणाऱ्यांना खूप महत्त्व आलं आहे. या व्यवसायाला एक प्रकारचं ग्लॅमरचं स्वरुपही प्राप्त झालं आहे. हॉटेल मॅनेजमेंट करणाऱ्या विद्यार्थ्यांना देशात तसंच परदेशातही नोकरीच्या संधी उपलब्ध होतायत. त्यामुळे या क्षेत्राकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढतेय.
व्यावसायिक पद्धतीने जेवण बनवणारी व्यक्ती म्हणजे मुख्य स्वयंपाकी (आचारी; शेफ.) सॅलड्स, सूप, मासे, मटण, भाज्या, पक्वान्नं किंवा इतर पदार्थ बनविण्याची तयारी करून घेण्याचं काम शेफचं असतं. त्याचप्रमाणे मेन्यू आणि त्याच्या किंमती ठरवणे, माल ऑर्डर करणं, रेकॉर्ड्स आणि अकाऊंट्स ठेवणं याही जबाबदाऱ्या त्याच्याच असतात. जेवणाची तयारी करणं आणि ते तयार करणं यात त्याचा प्रमुख सहभाग असतो. ऑर्डरनुसार आलेल्या प्रत्येक मालाची तपासणी करणे, त्याचा दर्जा तपासणं या कामावरही त्याचं लक्ष असलं पाहिजे.
करीयरसाठी चांगली संधी
पात्रता: दहावी किंवा बारावीनंतर सर्टिफिकेट कोर्स करता येतो, किंवा बारावीनंतर बॅचलर ऑफ केटरिंग टेक्नॉलॉजी अॅण्ड कुलिनरी आर्ट्स किंवा कुलिनरी आर्ट्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा करता येईल.
नोकरीच्या संधी: हॉटेल/ रेस्टॉरण्ट, एअर केटरिंग, रेल्वे केटरिंग, आर्मी केटरिंग, फूड प्रोसेसिंग कंपनी, कन्फेक्शनरी, थीम रेस्टॉरण्ट, मॉल्स, बेस किचन, खासगी हॉस्पिटल्स, क्रूझ लायनर्स, कॉर्पोरेट केटरिंग, इत्यादी. काही वर्षांच्या अनुभवानंतर फूड रायटर किंवा क्रिटीक किंवा शिक्षक म्हणून काम करता येईल. स्वतःचा व्यवसायदेखील सुरू करता येईल. जगात भारतीय खाद्यपदार्थांना बाहेरही मोठी मागणी असल्याने बाहेरही नशीब आजमावता येईल. बाहरील देशात भारतीय रेस्टॉरण्ट्सची मोठी संख्या प्रचंड मोठी आहे.
शेफचे प्रकारः- खासगी किंवा वैयक्तिक शेफ, एक्झिक्युटिव्ह शेफ/ मुख्य शेफ, स्यूस शेफ, स्टेशन शेफ (शेफ डे पार्टी, पॅस्ट्री शेफ (पॅटीसीअर), साऊट शेफ (सॉसिअर), फिश शेफ (पॉयजनियर), व्हेजिटेबल शेफ (एण्ट्रेमीटिअर ग्रिल शेफ), ग्रिलार्डीन, क्रूझ शेफ.
काही रंजक माहीती इंटरनॅशनल शेफ डे च्या निमित्ताने.
२१ जानेवारी १९३७ रोजी शेफ Marcel Boulestin यांनी बीबीसी वर पहिला कुकरी शो केला.
राजा हेन्री आठवा यांना त्याच्या सूप मध्ये केस सापडला,त्यांनी शाही शेफचा शिरच्छेद करवला होता, नंतर इतर शेफना टोपी परिधान करण्यास आदेश दिले. तेव्हा पासून जगातील सर्व शेफनी जेवण बनवताना टोपी (शेफ कॅप) घालावयास सुरुवात केली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti