(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • वात्सल्य ट्रस्ट, अलिबाग

    ही संस्था अलिबागमधील काही धडाडीच्या महिलांमार्फत चालवली जाते व आपल्या सर्व कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडून या महिला, या लहान बाळांच्या जीवनात पहिल्या पावसासारख्या धाऊन येतात. त्यांना त्यांची आई मिळते, आईचं कुठल्याही शब्दात वर्णन न करता येण्यासारखं व कुठल्याही मापात न मोजता येण्यासारख तिच्यासारखचं निर्मळ व निर्भेळ असं प्रेम मिळतं…

  • आत्मभान जागवणार्‍या यशोगाथा – अदान अॅण्ड ईव्हा, कटिग फ्री आणि इराणमधून सुटका

    ‘अदान अॅण्ड ईव्हा’, ‘कटिग फ्री’ आणि ‘इराणमधून सुटका’ हे तीन दर्जेदार अनुवाद प्रकाशित केले आहेत. उज्ज्वला गोखले, सुप्रिया वकिल, विदुला टोकेकर यांनी केलेले अनुवाद वाचकांच्या मनाचा ताबा घेतातच; पण एका विदारक वास्तवाचे दर्शन घडवतात. तिनही आत्मकथने महिलांच्या जीवनलढ्याच्या कहाण्या आहेत. हा लढा त्यांनी धिरोदात्तपणे देऊन स्त्री शक्तीची ओळख करून दिली आहे.

  • फक्त एक गंमत…

    कोकणस्थांची साफसफाई गेल्या रविवारी संपली आणि आज फराळ सुरू झाला....

    कर्‍हाड्यांकडे आज साफसफाई सुरू झाली, फराळ पुढच्या रविवारी.....

    देशस्थ अजून कॅलेंडरवर या वर्षीची दिवाळी कधी आहे, ते शोधत आहेत.........

    (मेसेज गंमत म्हणूनच घ्यावा.)

    -- विनय

  • रायगडावर एक दिवस

    रायगडावर एक दिवस

  • काळी गाय आणि भोरी म्हस

    पकल्या सावताची बायल, म्हणजे भागिरथी काकूची सून , लगिन झाल्यार आट वर्षानी गावाक ईली.. कारण तसा नाजूकच..... पोरग्या काय नाय पदरात... आता जिनच्या पँटीक पदर खयलो तो ईचारू नको.... तशि कर्तबगार सुन... 22 व्या माऴ्यारल्या मुंबयच्या हापिसातली सायबिन... 50 हजार म्हयन्याचो पगार... मुंबयतल्या सगळ्या डाक्टरांची भर करुन झाल्यार नाईलाज म्हणान म्हयनोभर सासयेच्या सांगण्यान घोवाक घेवन ईली.......

    ईल्याबरोबर काकून तंबी दिल्यान.... पाच दिवस सकाळीच गोठ्यात जावन गायची पूजा कर, पाय धू तिचे... आणि थयच दोन चमचे गोमुत्र घे आणी मग घरात ये.. सुनेन आयकल्यान सासयेचा..... नाईलाज बाकी काय ... रोज सांगल्याप्रमाणे केल्यान... वर सोनपापडेचो नेवेद्य दाखवल्यान.... आणि लवकर रिझट मिळाक व्हयो म्हणान रोज थयच धऱुन पेलोभर गोमुत्र पिल्यान.. असा पाच दिवस केल्यान....

    शेवटच्या दिवशी काकूक संशय ईलो.... काय तरी भानगड हा....... म्हणान ईचारल्यान... गे सुने गाय आपली वायच भुजकट हा...

    तुझ्याकडसून पुजा करून घेतल्यान कशी? सुनेन सांगल्यान... अहो ती काऴी गाय जवळ येऊच देत नव्हती.. पण पांढरी गाय खुप शांत आहे.. सेवा करून घेते.. मी पाच दिवस तिचे पेलाभर गोमुत्र पिते..... पण खरचं मला मुल होईल ना हो?

    काकून कपाळावर हात मारल्यान आणि थयच खऴ्यात बसली........ म्हणता कशी.... नक्की माका नातू जातलो..... कारण वाड्यात काळी गाय आणि भोरी म्हस आसा गे माझ्या आवशी.......

    बापूर्झा
    डॉ. बापू भोगटे....

  • भगवा……

    सद्या होणार्या बेताल वक्तव्याचा घेतलेला एक वेध किवा त्याचा एक उत्तर

  • सावरकर नावाची दहशत !!!

    सावरकर... त्यांची भिती किती आणि कोणाला वाटायची ह्याची ही कथा !

    दिल्लीचे पालम विमानतळ! विमानप्रवास फार दुर्लभ वाटावा असा तो काळ! विमानतळावर एक केंद्र सरकारचा टपाल खात्याचा मोठा अधिकारी आपल्या विमानाची वाट बघत होता. भोपाळ येथील टपाल विभागाचा तो मुख्य अधिकारी होता. त्याच्या शेजारीच एक माणूस येऊन बसला. हे वयोवृद्ध गृहस्थ होते. हा माणूस फार फार मोठा होता.
    इंग्लंडमधून रँग्लर ही पदवी त्याने गणितात मिळवली होती, पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचे ते प्राचार्य होते, भारताचे ऑस्ट्रेलिया मधील आयुक्त होते. स्त्रियांच्या शिक्षणासाठी ज्यांनी आयुष्य खर्चले त्या महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांचे भाऊ होते. त्यांची मुलगी ही कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात त्या काळी काम करत होती.

    ह्या माणसाने त्या अधिकाऱ्याला पाहीले आणि मराठीतून विचारले "तुम्ही श्री *** ना ?"
    त्या अधिकाऱ्याने सांगितले "हो". "पण मी आपणास ओळखले नाही!"

    त्या प्राचार्याने सांगितले "तुम्ही जेव्हा ICS ची परीक्षा दिली तेव्हा मी तुमचा परीक्षक होतो इंग्लंडमध्ये ".

    क्षणार्धात ओळख पटली.

    प्राचार्यांनी विचारले "ICS च्या लेखी परीक्षेत तुम्ही पहीले आला होतात, दुसऱ्या क्रमांकाचा विद्यार्थी आणि तुम्ही ह्याच्यात दीडशे गुणांचा फरक होता आणि तरीही इंग्रज सरकारने तुम्हाला अनुत्तीर्ण घोषित केले होते . बरोबर ?"

    ते अधिकारी उत्तरले "हो."

    "कारण माहीत आहे?", प्राचार्यांनी विचारले.

    "नाही" ते अधिकारी उत्तरले.

    "जाणून घ्यायचंय ?" प्राचार्य.

    "हो", अधिकारी.

    "सांगतो...", प्राचार्य.

    त्या प्राचार्यांनी दिलेले उत्तर पुढीलप्रमाणे!

    ह्या अधिकाऱ्याने ICS चा अर्ज भरतांना आपल्या गावाचे नाव दिले होते "रत्नागिरी" ! रत्नागिरी हे नाव वाचताच ब्रिटिशांनी आपल्या भारतातल्या गुप्तचर खात्याला तपासणी करण्याचा आदेश दिला .
    त्या तपासात असे आढळून आले की हा अधिकारी माणूस, शाळकरी असतांना, वीर सावरकरांच्या सम्पर्कात आला होता.

    सावरकर तेव्हा दररोज संध्याकाळी आजूबाजूच्या मुलांना गोष्टी सांगत असत. तेव्हा हा मुलगा त्या गोष्टी ऐकण्यासाठी सावरकरांच्या घरी जात असे.

    "आणि म्हणून लेखी परीक्षेत अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊनही आम्ही तुम्हाला नागरी सेवा परीक्षेसाठी अनुत्तीर्ण घोषित करून तुम्हाला भारतीय टपाल सेवेत प्रवेश दिला". ह्या परीक्षेत मी तुमचा एक परीक्षार्थी असल्याने मला सर्व माहीत आहे.

    सावरकरांशी कोणत्याही प्रकारे संबंध आलेला माणूस ब्रिटिशांना आपल्या नागरी सेवेत नको होता.

    मित्रांनो, आपला शत्रू आपली खरी परीक्षा करतो असे म्हटले जाते ते उगाच नाही.

    जी सावरकरांची परीक्षा ब्रिटिश सरकार करू शकले ती भारतीय सरकार मात्र कधीच करू शकले नाहीत.

    हा प्राचार्य होता रँग्लर रघुनाथराव परांजपे आणि हा विद्यार्थी होता श्री वेलणकर! संस्कृत भाषेचे तज्ञ! आपली, भारताची पोस्टाची पिनकोड पद्धती ज्यांनी शोधून काढली ते श्रीराम भिकाजी वेलणकर!!

  • संस्कार, विचार आणि विवेक

    सामाजिक बदलांचा आणि आर्थिक विकासाचा वेग जसजसा वाढत चालला, तसतसं माणसाचं राहणीमान झपाट्यानं उंचावत चाललं. विज्ञानानं असंख्य सुखसुविधा निर्माण केल्या. शिक्षणाचा प्रसार वाढला. ज्या समाजात ‘व्ह. फा. ‘पर्यंत शिकणाऱ्या मुला-मुलींकडे लोक आदरानं बघत होते, त्याच समाजात घरोघरी पदवीधर दिसू लागले. जास्तीतजास्त उच्च शिक्षण घेतलेला, नोकऱ्यांमध्ये मानाच्या जागा मिळवणारा आणि आर्थिक दृष्ट्या संपन्न असा एक नवा वर्ग, उच्च मध्यमवर्ग निर्माण होऊ लागला.

  • अविवाहित मुलींना मोबाईल फोन वापरण्यास बंदी…

    अविवाहित मुलींना मोबाईल फोन वापरण्यास बंदी.. असा फतवा बिहारमधील एका गावपंचायतीने काढला होता पण त्या विरोधात कोणीही तक्रार केल्याची माहीती नाही याचा अर्थ हा निर्णय गावकर्‍यांच्या संमतीनेच घेण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे शहरात राहणार्‍यां आपल्याला जेंव्हा या फतव्या बद्दल कळ्ते तेंव्हा आपण आपला देश अजूनही किती बुरसटलेल्या विचारसरणीचा आहे असा विचार अगदी सहज करून जातो. आपल्या देशातील गांव आणि शहर यांच्या विचासरणीत आजही कमालीच अंतर आहे हे सत्य नाकारता येणार नाही. आपल्या शहरातील सूख- साधने गावात पोहचली पण शहरातील अधूनिक विचारसरणी अजूनही गावात पोह्चलेली नाही. जी काही पोहचली ती चित्रपटांच्या माध्यमातून अतीरंजीत. भारतातील गावांत आजही पुरूषप्रधान संस्कृतीच गुण्यागोविंदाने नांदतेय हे सत्य आहे त्याचाच एक भाग म्ह्णून या फतव्याकडे पाह्ता येईल.

    मुंबईसारख्या शहरात लहानाचे मोठे झालेल्या, अधूनिक विचारसरणीचा बाळकडू प्यायलेल्या उच्चशिक्षीत पुरूषाच्या मनातही स्त्रियांच्या मोबाईल वापरावरच बंदी घालायला हवी हा विचार कित्येकदा डोकावून गेलेला असतो हे सत्य आहे. आता त्याचा मोकळेपणाने कोणी स्विकार करणार नाही हा भाग वेगळा. असो मुंबईसारख्या शहरात मोबाईल फोन हे काही एकमेव संपर्काचे साधन नाही आणि असल तरी त्याच्या वापरावर बंदी घालण पुरूषांनाच परवडणार नाही आणि शहारातील स्त्रिया हा अन्याय सहनच करून घेणार नाही. त्यामुळे शहारातील पुरूष असा विचार फक्‍त स्वप्नात अथवा मनातच करू शकतात. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट फतव्यात फक्‍त अविवहित मुलींच्याच मोबाईल वापरावर बंदी का घालण्यात आली त्या मोबाइलफोनचा दुरूपयोग करतात म्ह्णूनच ना ? पण आजच्या काळात सर्वच विवाहित स्त्रियां त्याचा सदुपयोग करतात याची खात्री त्यांना कोणी पटवून दिली ? मुंबईसारख्या शहरात मुलीच्या हातात दहा-वीस हजाराचे मोबाईल असतानाही त्या सार्वजनिक फोन बुथच्या बाहेर गर्दी करून आजही का उभ्या असतात ? हे कोडं आजही कित्येकांना उलगडत नाही.

    समाजात अनैतिकता वाढू लागलेय त्याला मोबाईल फोनला जबाबदार धरून आपली जबाबदारी टाळ्ण्याचाच हा प्रकार आहे. त्यापेक्षा समाजाने मुलींवर चांगले संस्कार केल्यास, त्याच्यासोबत सर्वच विषयांवर मनमोकळ्या चर्चा केल्यास, त्यांना आपले विचार स्पष्टपणे मांडण्याची संधी दिल्यास आणि त्यांच्या मनात उत्सूकतेतून निर्माण होणार्‍या प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळू दिल्यास हे असे फतवे काढण्याची आवश्यकताच भासणार नाही. विनोदाने सांगायच तर अविवाहीत मुली मोबाईल फोन वरून फोन कोणाला करणार अविवाहित मुलांनाच ना मग त्यांच्याही मोबाईल फोन वापरावर बंदी का घातली नाही. हा जो काही प्रकार घडलेला आहे तो पुरूषप्रधान विचारसरणीतून आणि पुरषी अहंकारातूनच घडलेला आहे. याच समर्थन होऊच शकत नाही...

    -- निलेश बामणे

  • खरेच ऑस्मासीस ( Osmosis ) प्रणाली पर्याप्त उर्जेचे श्रोत्र बनेल ?………… नवीन शोध.

    ग्लोबल वार्मिंगच्या समस्ये मुळे आपले वातावरण संतुलित राखणे गरजेचे आहे. जगभरात उर्जा मिळविण्यासाठी लाकूड,कोळसा व नैसार्गिक वायु खर्ची घालत आहोत. त्यामुळे हवामानात बदल होत आहे व आपले स्वंरक्षक छत्र छेदु लागले ही एक गंभीर बाब आहे. ह्या समस्येच्या निवारणासाठी संपूर्ण जग सध्या झटत आहे.