रमजान ईद’चा दुसरा दिवस होता. पुण्याच्या सारसबागेवरून कुठेशी जात होते तेव्हा पाहिलं, तर सगळी बाग मुस्लिम बांधवांनी भरून गेली होती. नटून थटून आलेल्या बायका, मुलं आणि सगळी मिळून सणाची मजा लुटत होती. ते दृश्य पाहूनच छान वाटलं.
मी ‘मराठी’ आहे कारण…
जे जे स्कूल ऑफ आर्टस मध्ये असताना मला 1984 ला अंतरराज्य फोटोग्राफी स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळाले. दिल्ली येथे माझी फोटोग्राफी प्रदर्शनासाठी महाराष्ट्र राज्याने खास निवड केली. दिवस होता 28 ऑक्टोबर 1984 प्रदर्शनाचा विषय होता प्रौढ शिक्षा. या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी आल्या होत्या त्या वेळेच्या माननीय पंतप्रधान इंदिरा गांधी. त्यावेळी प्रत्येक राज्यातून आलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरव केला गेला. त्यात माझा समावेश होता
टेलिकॉम क्षेत्र हे देशातील सर्वाधिक ऊर्जा वापरणारे दुसर्या क्रमांकाचे क्षेत्र ठरले आहे. टेलिकॉम क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी देशातील एक तृतियांश ऊर्जा खर्च होते, असे दिसून आले आहे. देशाच्या एकूण ऊर्जा आवश्यकतेपैकी आयसीटी क्षेत्रासाठीच्या ऊर्जेचे प्रमाण येत्या दहा वर्षांत २.७ टक्के एवढे मोठे होईल, असे सरकारी आकडेवारी सांगते. मोबाइल टॉवर्ससाठी सर्वाधिक ऊर्जा लागते.
गड, कोट, किल्ले असे शब्द घेतले की, डोळय़ांसमोर इतिहास नाचू लागतो. राजवटी, लढाया, पराक्रम, कटकारस्थाने आणि अशा कितीतरी स्थलकालाच्या घटना त्या त्या वास्तूभोवती फेर धरायला लागतात. पण प्रत्येक गडकोटांना असा ज्वलंत इतिहास मिळतोच असे नाही. पण अशांपैकी काहींचे भाग्य मात्र मग भूगोलात उजळते आणि निसर्ग त्यांना आपली सारी अपूर्वाई बहाल करतो. या कुळातीलच एक लोणावळय़ाजवळचा कोरीगड! इतिहासाच्या उत्खननापेक्षा निसर्गाची भटकंती घडवणारा; म्हणूनच पावसाळा स्थिरावला की, एखाद्या वारी वेळ काढून कोरीगडची वाट धरावी. लोणावळय़ाच्या दक्षिणेस कोरबारसे मावळात एक वाट गेली आहे. या वाटेवरील आंबवणे गावच्या डोक्यावर हा कोरीगड. ‘सह्य़ाद्री’कार स. आ. जोगळेकर म्हणतात, कोरी हे कोळय़ांच्या एका पोटजातीचे नाव. तेव्हा या कोरी लोकांचा गड तो कोरीगड आणि त्याचा मावळ तो कोरबारसे. लोणावळय़ापासून या कोरीगडापर्यंत अंतर आहे साधारण वीस किलोमीटर. याशिवाय मुळशी रस्त्यावरील माले गावातूनही एक रस्ता घुसळखांबमार्गे कोरीगडकडे जातो. पण या दोन्ही वाटांवरून एका दिवसात ही भ्रमंती करायची असेल तर स्वतचे वाहन असणे सोयीचे. अन्यथा लोणावळय़ातून सुटणारी दुपारी १२ किंवा सायंकाळी पाचची भांबुर्डे एस.टी. पकडायची आणि आंबवणे गावातील महादेवाच्या मंदिरात मुक्काम ठोकत गडदर्शन आटोपायचे.
असो, तर या आंबवणेत आलो की, या गावातूनच एक वाट तीन हजार फूट उंचीच्या या गडावर जाते. पण यापेक्षा एक सोपी वाट आंबवणे अलीकडच्या शहापूरमधून गडाकडे निघते. हे शहापूर म्हणजे गडाची एकेकाळची पेठ. यामुळे गावचा उल्लेख पेठ शहापूर असाही होतो आणि यामुळेच कोरीगडला कुवारीगड, कोराईगडच्या बरोबरीने शहागड असेही म्हणतात. तर हे शहापूर ओलांडले की, एका मोठय़ा घळीतून जाणारा हा मार्ग थेट गणेश दरवाजात येऊन थडकतो. या दरवाजाअलीकडेच काही प्राचीन खोदीव लेण्या दिसतात. यातीलच एका लेणीत गणेशाची स्थापना केली आहे. त्यामुळे या दरवाजालाही त्याची ओळख मिळाली - गणेश दरवाजा! हा गणेश दरवाजा ओलांडून आत गेलो की, उत्तम तटबंदी आणि भरपूर सपाटी असलेला गड समोर येतो. यातील बलदंड तटावरूनच गडप्रदक्षिणा सुरू करावी. उत्तम तट, शत्रूच्या उरात धडकी भरवणाऱ्या तोफा, गडदेवता कोराईदेवी आणि पाण्याने काठोकाठ भरलेली दोन तळी ही एवढीच ती काय कोरीगडची दुर्गसंपत्ती! पण आपण पावसाळय़ात आलो तर या वेळेची हिरवाई या मोजक्याच निर्जीव अवशेषांनाही जिवंत करते. यातही सर्वात जास्त लक्ष जाते ते गडावरील दोन मोठय़ा तळय़ांकडे. पश्चिम तटाला खेटून असलेली ही तळी पावसाळय़ात काठोकाठ भरतात. अगदी कधीकधी वाऱ्याच्या हेलकाव्यावर हे पाणी बाहेर पडू पाहते. अशा वेळी या कठडय़ावर यावे आणि आपल्याच हलणाऱ्या प्रतिमा पाहत तासन् तास बसून राहावे. या तळय़ाच्याच पाश्र्वभूमीवर कोराई देवीचे मंदिर आहे. भव्य आणि तेजस्वी मूर्ती. असे म्हणतात की, शेवटच्या मराठे-इंग्रज लढतीत जेव्हा हा गड पडला तेव्हा इंग्रजांनी या देवीचे दागिने उतरवले आणि ते मुंबईच्या मुंबादेवीला घातले. पुढे काळाच्या ओघात देवीचे छतही कोसळले. यामुळे एरवी कधी आलो की, उघडय़ावरील ही मूर्ती आणि तिची ही कथा आठवली की हळहळ व्यक्त होते. पण तेच पावसाळय़ात आलो की, भोवतालच्या हिरवाईतून असंख्य रानफुले उमलतात आणि जणू हे सारे दु:ख बाजूला सारत कोराईदेवी नवरात्रासाठी पुन्हा सालंकृत होते.
गडाच्या पोटातील काही खोदीव लेण्यांकडे पाहून हा गड प्राचीन असावा असे वाटते. पुढे तो कोळय़ांच्या ताब्यात असताना १४८६ मध्ये निजामशाहीने जिंकल्याची नोंद आहे. यानंतर १६४६ मध्ये अन्य गडांबरोबर कोरीगडही स्वराज्यात दाखल झाला. १७०० मध्ये पुन्हा मुघल राजवटीकडून पंत सचिवांनी हा गड स्वराज्यात आणला आणि अखेर १८१८ च्या शेवटच्या मराठे-इंग्रज युद्धात तीन दिवसांच्या प्रखर लढय़ानंतर गडावर युनियन जॅक चढला. इतिहास सांगणाऱ्या या काही सन-सनावळय़ा आणि घटना कोरीगडाबाबत मिळतात. इतिहासाचे हे दाखले देणाऱ्या सहा तोफा आजही गडावर दिसतात. पैकी ११८ इंच लांबीची ‘लक्ष्मी’ ही सर्वात थोरली. तिच्या हिशेबाने उभे राहावे आणि उगाच समोरच्या मावळाकडे उरी अभिमान घेत पाहावे. गडावरील हे विशेष पाहत असतानाच आपल्या नजरा आजूबाजूलाही वळतात. यामागे दऱ्याखोऱ्यांचा मावळ हे कारण तर असतेच, पण त्यातही पावसाळा हे खास निमित्त असते. एरवी लक्षातही न येणारे डोंगर पाऊस पिऊन हिरवे-ओले झाले की, उगीचच ओळखीचे वाटतात. मग त्यातही थोडेसे धुके हटले की, दूरदूरचे कर्नाळा, माणिकगड, प्रबळगड, मोरगड, ढाक, राजमाची ही दुर्गमंडळी ओळखी देऊ लागतात. तळातील भातखाचरांची सर्वच गावे एकसारखी वाटतात. मुळशी जलाशय या साऱ्या देखाव्याला एक निळी किनार देतो आणि मग हे सारे पाहता पाहता कोरीगडची मुशाफिरी आकार घेऊ लागते.
पावसाळ्या मध्ये हा गड फिरताना एक वेगळाच अनुभव येतो. या गडाची भटकंती करीत असताना समोरील गावामधून वारकरी सप्ताहातील कीर्तने ऐकायला येत होती. या मधुर गाण्याच्या तालावर गड कधी फिरून झाला हे कळेच नाही. पावसाची अधूनमधून येणाऱ्या सरी आणि गार वाहणारा वारा अंगावरती शहारे उभे करीत होता. खरे तर या साऱ्याचा मोह ‘त्यांनाही’ झाला, त्यातूनच श्रीमंतांचा सहारा आता या कोरबारसे मावळात उभा राहिला. पण त्याच्या या विळख्यात आमचा कोरीगड मात्र उगाचच अवघडून उभा राहिल्यासारखा वाटतो. चालायचेच, काळाचा महिमा! पण या ‘काळा’ला एकच विनंती; गावे, शेती, जमिनी गेल्या; आता आमचा गड तरी आहे असाच सोळाव्या शतकातील राहू द्यावा! राजांच्या या कोरीगडालाही त्याचा मोकळा श्वास घेऊ द्यावा!
सौजन्य : संतोष घारे यांनी लिहिलेला हा लेख मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी शेअर करत आहे.
ज्याला तू कृष्णनिती म्हणतोस
लोकांना तो कृष्ण-कावा वाटतो !
१६१०८ चा आकडा वाचून
लोकांना तुझा उगीचच हेवा वाटतो !!
१९३२ साली पाहाडतळी युरोपियन क्लब वर हल्ला करण्याची योजना सूर्य सेन ह्यांनी केली आणि ह्याची जवाबदारी प्रितीलता ह्यांच्यावर सोपवली. हाच तो क्लब जिथे बाहेर पाटी होती, “Indians and dogs are not allowed”. २४ सप्टेंबर च्या रात्री १०.४५ मिनिटांची वेळ निश्चित करण्यात आली. प्रितीलता एका पंजाबी युवक बनून गेल्या,तर त्यांचे इतर साथीदार वेगळ्या वेषात क्लब जवळ पोचले. आतमध्ये ४० इंग्रज उपस्थित होते. बॉम्ब ने हल्ला करण्यात आला. गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात एक व्यक्ती मारला गेला तर अर्ध्याच्या वर जखमी झाले. प्रितीलता आणि त्यांचे साथीदार तिकडून बाहेर पडले, पण इंग्रजांनी दिलेल्या प्रतिउत्तरात प्रितीलता ह्यांच्या पायाला गोळी लागली, त्या पळण्यास असमर्थ ठरल्या. इंग्रजांच्या हाती पकडल्या जाण्यापेक्षा त्यांनी मरण पत्करले. पोटॅशियम सायनाईड खाऊन त्यांनी आपले जीवन देशाच्या चरणी अर्पण केले.
भारतीय संस्कृतीमध्ये बंधुप्रेम, भगिनीप्रेम या भावनांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. एकाच आई-वडिलांच्या पोटी आलेल्या या मुलांमध्ये निसर्गत:च प्रेम आणि आपुलकी निर्माण होते असं आपण समजतो.बंधुप्रेमाचा आदर्श म्हणून राम आणि लक्ष्मण, राम
आणि भरत आपल्या मनावर ठसलेले आहेत. याच्या विपरीत उदाहरण म्हणजे महाभारतातील एकाच कुळातले बंधू! भावंडातील मत्सराची एक भयंकर कहाणी बायबलच्या ओल्ड टेस्टामेंटमध्येही आहे. यात केन याने आपल्याच एबेल नावाच्या भावाचा खून केला. कारण काय? तर दोन भावांतील वैमनस्य.
अलिबाग पासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कार्लेखिंडीत मुख्य रस्त्यापासून थोडया लांब आणि निसर्गाच्या हिरव्या पंखांमध्ये ’मोहोर‘ नावाचा टुमदार वृध्दाश्रम विसावला आहे. या वृध्दाश्रमाच्या आजूबाजूची शांतता आणि दुरवर पसरलेली हिरवी झाडं मनाला खूप प्रसन्नता देवून जातात.
Copyright © 2025 | Marathisrushti