(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • सावरकर नावाची दहशत !!!

    सावरकर... त्यांची भिती किती आणि कोणाला वाटायची ह्याची ही कथा !

    दिल्लीचे पालम विमानतळ! विमानप्रवास फार दुर्लभ वाटावा असा तो काळ! विमानतळावर एक केंद्र सरकारचा टपाल खात्याचा मोठा अधिकारी आपल्या विमानाची वाट बघत होता. भोपाळ येथील टपाल विभागाचा तो मुख्य अधिकारी होता. त्याच्या शेजारीच एक माणूस येऊन बसला. हे वयोवृद्ध गृहस्थ होते. हा माणूस फार फार मोठा होता.
    इंग्लंडमधून रँग्लर ही पदवी त्याने गणितात मिळवली होती, पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचे ते प्राचार्य होते, भारताचे ऑस्ट्रेलिया मधील आयुक्त होते. स्त्रियांच्या शिक्षणासाठी ज्यांनी आयुष्य खर्चले त्या महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांचे भाऊ होते. त्यांची मुलगी ही कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात त्या काळी काम करत होती.

    ह्या माणसाने त्या अधिकाऱ्याला पाहीले आणि मराठीतून विचारले "तुम्ही श्री *** ना ?"
    त्या अधिकाऱ्याने सांगितले "हो". "पण मी आपणास ओळखले नाही!"

    त्या प्राचार्याने सांगितले "तुम्ही जेव्हा ICS ची परीक्षा दिली तेव्हा मी तुमचा परीक्षक होतो इंग्लंडमध्ये ".

    क्षणार्धात ओळख पटली.

    प्राचार्यांनी विचारले "ICS च्या लेखी परीक्षेत तुम्ही पहीले आला होतात, दुसऱ्या क्रमांकाचा विद्यार्थी आणि तुम्ही ह्याच्यात दीडशे गुणांचा फरक होता आणि तरीही इंग्रज सरकारने तुम्हाला अनुत्तीर्ण घोषित केले होते . बरोबर ?"

    ते अधिकारी उत्तरले "हो."

    "कारण माहीत आहे?", प्राचार्यांनी विचारले.

    "नाही" ते अधिकारी उत्तरले.

    "जाणून घ्यायचंय ?" प्राचार्य.

    "हो", अधिकारी.

    "सांगतो...", प्राचार्य.

    त्या प्राचार्यांनी दिलेले उत्तर पुढीलप्रमाणे!

    ह्या अधिकाऱ्याने ICS चा अर्ज भरतांना आपल्या गावाचे नाव दिले होते "रत्नागिरी" ! रत्नागिरी हे नाव वाचताच ब्रिटिशांनी आपल्या भारतातल्या गुप्तचर खात्याला तपासणी करण्याचा आदेश दिला .
    त्या तपासात असे आढळून आले की हा अधिकारी माणूस, शाळकरी असतांना, वीर सावरकरांच्या सम्पर्कात आला होता.

    सावरकर तेव्हा दररोज संध्याकाळी आजूबाजूच्या मुलांना गोष्टी सांगत असत. तेव्हा हा मुलगा त्या गोष्टी ऐकण्यासाठी सावरकरांच्या घरी जात असे.

    "आणि म्हणून लेखी परीक्षेत अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊनही आम्ही तुम्हाला नागरी सेवा परीक्षेसाठी अनुत्तीर्ण घोषित करून तुम्हाला भारतीय टपाल सेवेत प्रवेश दिला". ह्या परीक्षेत मी तुमचा एक परीक्षार्थी असल्याने मला सर्व माहीत आहे.

    सावरकरांशी कोणत्याही प्रकारे संबंध आलेला माणूस ब्रिटिशांना आपल्या नागरी सेवेत नको होता.

    मित्रांनो, आपला शत्रू आपली खरी परीक्षा करतो असे म्हटले जाते ते उगाच नाही.

    जी सावरकरांची परीक्षा ब्रिटिश सरकार करू शकले ती भारतीय सरकार मात्र कधीच करू शकले नाहीत.

    हा प्राचार्य होता रँग्लर रघुनाथराव परांजपे आणि हा विद्यार्थी होता श्री वेलणकर! संस्कृत भाषेचे तज्ञ! आपली, भारताची पोस्टाची पिनकोड पद्धती ज्यांनी शोधून काढली ते श्रीराम भिकाजी वेलणकर!!

  • केव्हा उघडेल कुंभकर्णी झोप…?

    जर ‘ आम्ही सुधारणारच नाही ‘ असे भारतीयांनी ठरविले असेल तर मग काही उपयोग नाही. आम्हाला वाईट सवय पडत चालली आहे. ग्रामीण भागात एक म्हण आहे,” घोरपडीच्या मागून फरकड .” आम्ही तसेच वागायला लागलो.समस्या उरावर येऊन पडल्यावर जागतो.

  • २०१४ चे स्वागत

    नित्यनेमाने येणारे ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी हे दिवस ! २०१३ सरुन आता आपण प्रवेश करतोय २०१४ मध्ये. मराठीसृष्टीच्या तमाम वाचक, लेखक आणि हितचिंतकांना या नव्या वर्षाच्या शुभेच्छा. या नववर्षात आपण जे नाही संकल्प केले असतील ते पूर्णत्त्वास जावोत ही सदिच्छा.

  • बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर

    “इंडिया ऑफिस “ ह्या सरकारी कार्यालयातले एक संबंध दालन १८५७ च्या ग्रंथ व फाइल्स यांनी भरलेले होते. सुदैवाने सावरकरांना याचा अभ्यास करायची परवानगी मिळाली. तिथे तासतास बसून महत्वाची टिपणे काढली. ते पाहून त्या ग्रंथपालला आश्चर्य वाटले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी गुप्त कागदपत्रेसुद्धा सावरकरना अभ्यासायला दिली. याचा उल्लेख त्यांनी “शत्रूच्या शिबिरात “ आत्मचरित्रात केला आहे. आणि त्यांनी १८५७ चे बंड नव्हते तर स्वातंत्र्य समर होते हे  सिद्ध केले.

  • पुण्यनगरी काशी – भाग ३ 

    धर्मचक्रप्रवर्तनाचे स्थान – सारनाथ

    गौतम बुध्दाच्या जीवन प्रवासातील महत्त्वाचे स्थान म्हणजे सारनाथ.वाराणसीहून ९ किमी.अंतरावर आहे. हिंदु आणि बुध्द असे दोन महान धर्म 2500 वर्षापासून एकत्रीतपणे या परिसरात रूजले गेले आणि गुण्यागोविंदात त्यांची वाटचाल पुढे चालत राहिली. नेपाळच्या सीमेवरील लुंबीवन हे जन्मस्थान. बिहार मधील पाटलीपुत्र जवळील जागा ही त्याला झालेल्या साक्षात्काराची. मुख्य धर्मचक्रप्रवर्तनाचे स्थान सारनाथ कुसीनारा हे गोरखपूर जवळील स्थान जेथे जीवनयात्रा संपली.

    बुध्दानी आपल्या पाच शिष्याना एकत्र पहिले प्रवचन दिले ती जागा सारनाथ. सारनाथ अथवा सारंगनाथ हरणांच्या वास्तव्याची जागा त्या काळात या भागात जंगलात हरणांचे कळप असत व बुध्दाला हरणांबद्यल फार प्रेम होते. बुध्दाच्या स्मर्णार्थ श्रीलंकेच्या धर्ममालीनी या शिष्यानी मुलगंध कृती विहार बांधला. पुढे याच देशाचे बुध्द धर्म प्रसारक डॉ.संपूर्णानंद यानी अथक परिश्रम करून या विहाराचे नंदनवनच केले त्यामुळे याला जगनमान्यता मिळाली. विहाराचे देवळासारखे कळस चारी बाजूनी सुरेख उद्यान गाभाऱ्यात सोन्याचा फुलांच्या माळानी श्रृंगारीत धीर गंभीर उदात्त चेहऱ्याचा बुध्दाचा पुतळा मंत्र जप पठण नाही की उदबत्ती धूपाचा धूर नाही शांत धीरगंभीर वातावरण उल्लेखनिय आहे.

    मुख्य विहाराच्या बाजूनी अनेक देशानी बांधलेले विहार त्यातले चीन जपान व ब्रम्हदेशचे प्रेक्षणिय आहेत. बुध्दगया येथिल प्रसिध्द बोधीवृक्षाची फांदी या उद्यानात आणून लावली त्याचा झालेला प्रचंड मोठा डेरेदार वृक्ष व त्याच्या असंख्य फांद्याा लक्ष वेधून घेतात. राजा अशोकाने धर्मप्रसाराकरता चार भव्य स्तुप बांधले त्यातील एकच शिल्लक आहे. स्तुपाची उंचीच 150 ते 200 फूट व त्याचा परिघ डोळयात न मावणारा त्यावरील नक्षीकाम बनारसी साडीवर जसे असते तसे व कोपऱ्या कोपऱ्यांवर डोके टेकवणारे चीनी जपानी प्रवासी .

    अशोकस्तंभ ज्या जागी उत्खननात मिळाला त्याचे अवशेष त्याच जागी जाळीच्या पिंजऱ्यात सुरक्षित ठेवले आहेत. त्याच्यासमोर जैन मंदिर असून तेथे अशोकस्तंभाची 11 मीटर उंचीच्या मार्बलच्या दगडाची प्रतिकृती आहे गुळगुळीतपणा इतका की आपले प्रतिबिंब पडते. सारनाथ वस्तूसंग्रहालय हे वर्ल्ड हेरीटेज बोर्ड मान्यता दिलेले स्तुपापासून 1 किमी. अंतरावर असून परिसर इतका सुंदर व स्वच्छ व भव्यता याने आपण भारावूनच जातो. मुख्य प्रवेश दालनात अशोकस्तंभ विराजमान झालेला त्यावरील चक्रांचे नक्षीकाम हत्ती घोडा व वृषभ अगदी खरेच उभे आहेत असा भास होतो. आपले राष्ट्रीय चिन्ह म्हणून मान्यता अतिशय योग्य शिल्पास मिळालेली आहे याची बालंबाल खात्री पटते. पुढे अनेक दालने बुध्दाच्या विविध मुर्ती देवदेवता नक्षीकाम व कोरीव काम केलेल्या कमानी दरवाजे अशा हजारो वस्तुंचे व्यवस्थित वर्गीकरण केलेले हया सर्व गोष्टींचा अभ्यास करणारे अनेक परदेशी पर्यटक दालनात ठाण मांडून बसलेले पाहिल्यावर वाराणसीच्या प्रेमात भारत व जगातील लोक का पडतात हे उमजते. रामनगर हे छोटे गाव वाराणसी पासून 35 किमी.अंतरावर गंगेच्या पलीकडील तीरावर वाराणसीचे राजा नरेष यांचे वास्तव्य रामनगर किल्ल्यात असे.गंगेवर मोटार व रेल्वेचे दोन भव्य पुल पाहिल्यावर गंगेच्या पात्राच्या भव्यतेची कल्पना येते. गावात सायकल व रिक्षा जाणारा पिंपानी केलेला पुल व त्यावरचा रस्ता एक अनोखा अनुभव आहे. तो केंव्हां व कसा बांधला त्याची निगराणी कशी करतात याबद्यल कुतहुलता होती पण बरोबर माहिती मिळण्याचे भाग्य नव्हते. किल्ला तीराला लागून चांगला 1 किमी लांब बुरूज 200 ते 300 फूट उंच आत अनेक दालने व वस्तुसंग्रहालय 17 व्या शतकातील तलवारी बंदुका राजघराण्यातील वापरले जाणारे उंची बनारसी सिल्कचे भरजरी कपडे भांडी कुंडी व्यवस्थित ठेवलेली त्याला साजेसा झुंबरांचा महाल आजकाल फिल्म शूटींगसाठी दिला जातो. एका भुयारी रस्त्याने तळघरात उतरलो तेथून 20 ते 30 उंच पायऱ्या चढून एका देवळापाशी आलो.लागूनच एक गच्ची होती समरा संथ वाहाणारे गंगचे पात्र मध्यात डुलणारा पिंप पूल पात्रातून डुलत चाललेल्या छोटया होडया खडया शिपायांसारखे ताठ उभे असलेले बुरूज वातावरणातील नीरव शांतता मनमुराद आनंदात बुडून गेलो. दसऱ्याला फुलांची सजावट व दिव्यांच्या रोषणाईत किल्ला उजळून निघतो. रामनगर ते वाराणसी प्रवास टॅक्सीने करत होतो इतका बेजबाबदार व अक्कलशुन्य ड्रायव्हर ज्या सुसाट वेगाने गाडी चालवत होता ते पाहून तो आम्हाला थेट मनकर्णिका घाटाचा र्स्वगाचा रस्ता दाखविणार असे वाटू लागले होते.

    अशा बहुढंगी शहरात विविध उद्योग चालतात. पक्षांची निर्यात व पैदास करण्याचे मोठे केंद्र विविध लोणची विविध खाण्याच्या पानांची उत्पादन केंद्रे माती व धातूची नक्षिकामाची भांडी याबरोबर कथ्थक नृत्यकेंद्रे शास्त्रिय संगिताची घराणी हे सगळे अनुभवण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक शहराला भेट देत असतात ताजमहाल खालोखाल सर्वात ज्यास्त परदेशी पर्यटक वाराणसीत येतात. काही जण महिनेचे महिने अनेक कला शिकतात पुस्तके लिहीतात.

    रांड सांड सिरी सन्यासी इनसे बचे तो सैवे कासी अशा बहुढंगी शहरात बिस्मीलॅांखाँचे वास्तव्य होते तानसेन ते तुलसीदास कबिर या सर्वांचे हे माहेरघर नवरात्रीची रामलीला नौटंकी रात्र रात्र जागविणाऱ्या नाचगाण्याच्या मैफीली वेश्याव्यवसायातील दर्जा जोपासणाऱ्या कलावंतिणी अशा बहुढंगी कलांचा साज गंगेला लाभलेला आहे. सकाळच्या कोवळया सुर्यकिरणात चमचमणारे घाट मोहून टाकतात व हजारो या्रत्री गंगास्नानानी पापमुक्त होतात आणि जिवंतपणी स्वर्गमुक्तीचा मार्ग दिसल्याची प्रचिती येते. अशी आहे पुण्यनगरी काशी.

    डॉ अविनाश वैद्य

  • दिल्ली शहराची आत्मकथा

    जीवाचा थरकाप उडवून देणारी घटना काल घडली आणि माझ्या नावावर कलंकाचा एक डाग माझ्या माथ्यावर लागला इ.सन १९४७ साली भारत देश स्वातंत्र झाला देशाची राजधानी म्हणून माझी निवड झाली.

  • पोस्ट ऑफिसचे मनोगत

    बऱ्याचवेळा पत्र पोस्ट करण्यासाठी पोस्टात जावे लागते किंवा कुरियरने पत्र किंवा टपाल पाठवावे लागते. पण या मागचा इतिहास माहीत नसतो आणि करून घेण्याची कोणी तसदी घेतही नाही. मग अश्यावेळी आठवते ती कविता रूपी पोस्टाचा इतिहास जो त्याने स्वत:च सांगितला आहे..!!

  • श्रीं’चे सदगुण

    अनंतचतुर्दशी मावळली. घरोघरीच्या गजाननाच्या मातीच्या मूर्ती आता विसर्जित झाल्या आहेत. हळूहळू वातावरणातला जल्लोष मावळेल. परततानाची रिकामी तबकं पाहून डोळे किंचित भरून येतील. दरवर्षी हे सारं असंच होतं.

  • इंडियन लायब्ररी – पढेगा इंडिया, बढेगा इंडिया

    Indian-Library

  • अाठवण

    एके दिवशी शालू मला काॅलेजच्या काॅरीडाॅरमध्ये भेटली.तिचासारखाच भोळाभाबडा, हसरा चेहरा अावाजही अगदी तिचासारखाच क्षणभर वाटलं तूच तर नाहीस ना.शालू मला बबोलून निघून गेली मी माञ माझ्याच तंद्रीत तिथेच उभा राहून भूतकाळाची पाने चाळत होतो. एखाद्या चलचिञपटाप्रमाणे माझ्या डोळ्यासमोरून चिञे जावीत तशी काॅलेजच्या अाठवणी भुर्रकन निघून गेल्या अाणि अाठवले काॅलेजचे ते सोनेरी क्षण...............

    जीवनरूपी काटेरी वळणावर मार्गक्रमण करत असताना .वळीवाच्या पावसाप्रमाणे तू माझ्या जीवनात अालीस .बरं वाटलं जीवन जगण्याचा खरा अर्थ कळला.प्रेम भावना काय असतात हे तू माझ्या जीवनात अाल्यावर कळले.खरया अर्थाने जीवन जगण्याला अर्थ अाला तूझ्यामुळेच. काॅलेजचे दिवस कसे भूर्रकन निघून जायचे काही कळायचे नाही.काॅलेजच्या पायरया उतरतच तूझी नजर मला धुंडाळायची. काॅलेजमध्ये मी दिसलो नाही तर तूझं मन लागायचं नाही. मी तुझ्याशी अबोला धरलो तर तू माझ्यावर रागावयाचीस. माझ्या हृदयी अाजही रंगतोय तु मांडलेल्या प्रेमाचा खेळ. हातात कुंचला अाणी कॅन्व्हास घेतला की तूच माझ्या डोळ्यासमोर तरळायचीस अन तूच माझी मोनालीसा व्हायचीस अन मी तूझा पिकासो. अापलं नातं लाजाळूच्या पालवीप्रमाणे कधिच कुणाला न समणारं. अापल्या नात्याचा अंत वाईट अाहे हे माहीत असतानाही अापण दोघांनी ते विष प्यायलो. अाणि अाज ते माझ्या जिव्हारी येतय.वाटलं नव्हतं तूझ्यासारखी सखी माझ्या जीवनात येवून कधिच न शमनारं प्रेमाचं वादळ उठवून देईल. प्रेमाच्या राज्यात सर्व काही सुरळीत चालत असताना वाटलं नाही असा डाव अर्ध्यावर सोडून जाशिल. कधि पुसटशी कल्पनाही केली नाही कि अापण एकमेकांपासून ईतके दूर जावू. खरंच वास्तव काती कटू असते पण वास्तव नाकारता येत नाही. तुझ्या लग्नाला पाच सहा वर्षे लोटली असतील कदाचित तू सूखी असशील तूला माझी अाठवणही येत नसेल पण मी माञ तूझ्याच अाठवणीच्या साह्याने कित्येक राञ जागून काढल्या. अाठवतोय का तूला तो निरोपाचा दिवस मी तूझ्या रूमवर अालो होतो.डोक्यात एकाच विचाराने थैमान घातले होते तू मला सोडून जाणार .काय बोलावं काय नाही काही सुचत नव्हतं. हृदय भरून अालं होतं डोळ्यासमोर सगळीकडे काळोख दिसत होता.कुठं जावं नि काय करावं काही सूचत नव्हतं. वाटलं नाही जगू शकत तूझ्याविना पण तूझा तो हसरा चेहरा मला जगण्याची नवी उम्मेद देवून जातो.

    जेंव्हा अाठवणीच्या सागराला भरती येते

    तेंव्हा कशात मन लागत नाही तुला येवून भेटावेसे वाटते पण उजाडणारा प्रत्येक दिवस मला जीवंत जाळत असतो

    तुझी ती अबोल प्रित स्मरताना...........................