(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जनसेवा

    आता दुनियेत| होती खूप हाल|
    सुकलेत गाल| शोषितांचे||१||

    पाहिले अनेक|दु:खी जीव येथे|
    चित्त माझे तेथे|पांडूरंगा||२||

    करतो मी पूजा|मनी तुझा ध्यान|
    नाही मला भान|देवा आता||३||

    थोडी जनसेवा| हातून घडावी|
    साथ रे मिळावी| देवराया||४||

    भाव पामराचा| समजून घ्यावा|
    आशिष असावा| देवा तुझा||५||

    पुसू देत डोळे| भरवू दे घास|
    जगण्याची आस| वाढो त्यांची||६||

    अनाथांचे हास्य| फ़ुलवेन आता|
    बनुनी त्यांचा पिता| देतो ग्वाही||७||

    -- महेंद्रकुमार ईश्वरलाल पटले (ऋतुराज)
    दि. २२/०९/२०१९

  • रि-युनियन

    कोण म्हणतं एकदा वेळ निघुन गेली की परत येत नाही...
    'ती सध्या काय करते ' हा सिनेमा पाहिला आणि या विषयावर थोडा विचार करावासा वाटला.
    'ती सध्या काय करते' यावरून बरेच विनोद झाले, अतिशयोक्ती झाली. यातला विनोदाचा भाग सोडला तर हा विषय मनाच्या खुप जवळचा वाटला. यातल्या अन्याचा बायकोची (उर्मिला कानेटकर) भुमिका मनाला स्पर्श करून गेली.
    सध्या आपण पहातोय की, रि-युनियन हा विषय निघाला की पत्नी पती कडे किंवा पती पत्नी कडे संशयाच्या नजरेने पाहतात. पण खरं सांगू ? लग्नाची २०-२५ वर्ष एकमेकांच्या सहवासात घालवल्यावरही आपण आपल्या जोडीदारावर विश्वास ठेऊ शकत नसलो तर आपण काय सहजीवन जगलो ? लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात हेच खरं.. नाहीतर तुमचा जोडीदार शाळा-काँलेज मधे असतानाच सैराट झाला असता, नाही का ? पण तो संयमी आहे, विचारी आहे म्हणून आज तुमच्या जोडीला आहे. आज २५ वर्षांच्या संसारा नंतर ब्रम्हदेवही आले तरी तुमची गाठ सोडू शकणार नाही असा विश्वास हवा..
    एकदा सरलेले बालपण/तारूण्य पुन्हा मिळत नाही, या विचारावर रि-युनियन या संकल्पनेने मात केली आहे. ज्याने कोणी ही संकल्पना शोधून काढली, त्याला सलाम
    शाळा काँलेज मधिल मित्र मैत्रिणींना भेटा, त्यांचाशी गप्पा मारा, सरलेले बालपण- तारूण्य तुम्हाला परत मिळेल, नक्कीच ! आयुष्यात राहून गेलेली सगळी मजा उपभोगण्यासाठी पुन्हा एकदा मिळालेली ही सुवर्णसंधी आहे.
    खुप फिरा, मजा करा ! ४०-४५ हे वय असं आहे की, अजुनही तुम्ही भ्रमंती करू शकता. एकदा का साठी आली, की पुन्हा हळहळ वाटेल, आलेली संधी गमावल्याची. आणि करा की प्रपोज राहून गेलेलं ! काय हरकत आहे ?
    मनावर नियंत्रण असलं की सगगळच सुंदर असतं/अम्रुत असतं. आपली द्रुष्टी स्वच्छ असली की सगळच स्वच्छ दिसतं. म्हणूनच कोणतीही अतिशयोक्ती टाळून मजा घ्या जीवनाची.
    आणि मनावर नियंत्रण होतं म्हणून विधीलिखित जोडीदारा बरोबर तुम्ही संसाराची पंचविशी गाठू शकलात. चुकणारा माणूस कुठेही चुकतो, त्याला रि-युनियनच निमित्त लागत नाही.
    तुमच्यातले काही सुप्त कलागुण संसाराच्या धकाधकीत दबून गेलेले असतात, पण तुमचे मित्र ते बरोबर जाणतात. ते सादर करण्याची, त्याचा आनंद घेण्याची संधी म्हणजे रि-युनियन.
    मन एक पाखरू आहे, त्याला स्वच्छंद उडू द्या , बागडू द्या. संशयाच्या, लोकलज्जेच्या कुपीत त्याला बंदिस्त करू नका. गुदमरून मरेल ते ! आणि शिल्लक राहील ते फक्त शरीर..
    तुमच्या कुटुंबा समवेत गेट टुगेदर करा. न जाणो तुमची मुलं तुमच्या मैत्रीचा वारसा पुढे चालवतील.
    आपल्यातले काही मित्र मैत्रिणी इतर कारणांनी दुःखी असतील, त्यांना तुमच्यात सामाऊन घ्या.., तुमची सोबत त्यांचे विश्व बदलू शकते.
    हे जग सोडताना कोणतीही इच्छा मागे ठेऊ नका कारण मनुष्य जन्म एकदा मिळतो आणि आयुष्य सुंदर आहे.
    मित्रांची कदर करा आणि उरलेल्या आयुष्यात राहून गेलेल्या गोष्टी करा व सर्व मधूर आठवणी सोबत घेउनच जगाचा निरोप घ्या.
    अरे! आज मला माझ्यातला लेखक गवसला.., अर्थात क्रेडीट गोज टू रि-युनियन पटलं तर आपापल्या ग्रुप मधे नक्की अँक्टीव व्हा...

  • महिला : लोकशाही व शिक्षण ……

    स्त्रीच्या प्रगतीचा विचार करत असताना एकच दिसून येईल की, समाजात जसे-जसे शिक्षण वाढत गेले त्याबरोबरच स्त्री माणूस होण्याचा प्रयत्न करू लागली. स्त्री साहित्यात येऊ लागली ती राणी, पत्नी, बायको म्हणून नव्हे तर नायक म्हणून. यातूनच स्त्रियांना अस्मितेची जाण झाली आणि जीवन जगत असताना सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात स्त्रियांना महत्त्वाचे स्थान असावे, त्यांचा माणूस म्हणून विचार व्हावा ही धारणा समोर आली. त्यातून साहित्यातून स्त्री स्वातंत्र्याच्या छटा उभ्या राहू लागल्या आणि…….

  • मनस्वी यमन

    आपल्या भारतीय संगीतात, रागांच्या प्रकृतीनुसार त्याचे वर्गीकरण केलेले आहे आणि त्याला "थाट" असे म्हणतात, जसे, "मारवा थाट","कल्याण थाट" इत्यादी. त्यानुसार, हा राग "कल्याण" थाटात येतो तसेच गमतीचा भाग म्हणजे. आपले उत्तर भारतीय संगीत आणि दक्षिण भारतीय संगीत, यात बरीच देवाणघेवाण चालू असते. दक्षिणात्य संगीतात, याच रागाशी मिळता जुळता असा "कल्याणी" नावाचा राग ऐकायला मिळतो. अर्थात, स्वर लावणे, आणि सादर करणे, यात बराच फरक पडतो.
    राग संगीताची एक गंमत आहे, प्रत्येक रागाचे स्वर ठरलेले असतात पण, तेच स्वर, कसे घ्यायचे, याचा "अंदाज" प्रत्येक कलाकाराचा वेगळा असतो तसेच एका स्वरावरून दुसऱ्या स्वरावर कसे जायचे, याबाबत वेगवेगळे ठोकताळे असतात. म्हणूनच, प्रत्येक कलाकाराचे सादरीकरण, तोच राग असला तरी वेगळे होते. आपल्याकडे, जेवणात देखील हाच अनुभव असतो आणि त्यानुसार प्रत्येक गृहिणीची भाजी वेगळ्या चवीची होते!! मसाले तेच असतात पण प्रमाण वेगळे. म्हणूनच, रागाचे स्वर म्हणजे ओळख असते आणि ती कशी करून द्यायची, हे कलाकारावर अवलंबून.
    आता स्वरावली बघायला गेल्यास, आरोही सप्तकात "पंचम" वर्जित तसेच "मध्यम" तीव्र, तर अवरोहात सगळे स्वर उपलब्ध असतात. "नि रे ग रे सा", "नि रे ग म ग " या स्वरावली, यमन रागाची "ठेवण" दर्शवतात.
    हाच वेगवेगळा "अंदाज", सगळ्या संगीतकारांना, यमन रागात गाणी बनविण्यासाठी प्रवृत्त करीत असणार. या रागात, सहज सापडणारे भाव म्हणजे, शृंगार, भक्ती, विरह, प्रणय इत्यादी अगदी मुबलक आढळतात आणि सुगम संगीताच्या दृष्टीने, ही पर्वणी ठरते. त्यातून सुगम संगीतात गाणे बनवायचे म्हणजे, तंतोतंत राग सादर करण्याची अजिबात गरज नसते, एखादी हरकत, एखाद्या स्वरावर स्थिरावण्याची पद्धत, यातून अनेक छटा निर्माण होतात.
    कवियत्री इंदिरा संतांच्या "प्रवास" या कवितेतील या ओळींतून, यमन रागाच्या नवीन ओळखीची जाणीव होते.
    "मोकळे मोकळे चालतांनाच, पुढचे वळण व्याकूळ करते
    पहाडांतून सरकत सरकत, सांवळा मेघ आडवा येतो
    क्षणभर वेढून भान येऊन, आला तसाच सरकून जातो.
    मनांत अमृत टाकून जातो, पावलांत झुळझुळ गारवा भरतो."
    यमन राग असाच आहे. या रागातून कधीही पराकोटीची वेदना ऐकायला मिळत नाही. किंबहुना आपल्या रागदारी संगीतात, नेहमीच समर्पणाची भावना दृग्गोचर होते आणि त्या भावनेला यमन राग अप्रतिम कोंदण देतो.
    किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक, पंडित भीमसेन जोशींची "शाम बजाये आज मुरलिया" ही चीज म्हणजे यमन रागाची व्यवच्छेदक ओळख म्हणता येईल. या बंदिशीच्या सुरवातीला, पंडितजींनी "म ध नि" ही स्वरावली घेतली आहे आणि ती केवळ अपूर्व आहे. गायनाच्या संदर्भात लिहायचे झाल्यास, आवाजाचे लगाव, नावास साजेसा असा गरिमा ही खास वैशिष्ट्ये म्हणता येतील. गरिमा म्हणजे ध्वनीचे लहान-मोठेपण. त्याचबरोबर आणखी एक बाब नोंदवायला हवी. केवळ असामान्य गरिमा हेच वैशिष्ट्य म्हणता येणार नसून, तांत्रिक भाषेत लिहायचे झाल्यास, ते आपल्या आवाजात दोन्ही रजिस्टर्सचा वापर फार परिणामकारक करतात. त्यामुळे खालच्या स्वरांवर भरीव आणि संपन्न तर वरच्या स्वरांवर चमकदार तसेच उच्च तारतेवर सहज पोहोचणारा आवाज.
    त्यांच्या दृतगती तानांत गरिमा कमी असतो पण तरीही त्या परिणामकारक वाटतात. त्याचे प्रमुख कारण हे निमुळते चमकदारपण असते. रागाची बढत नेहमी पायरी पायरीने करत जायची, असे करायचे म्हटल्यावर गायनातील "स्वर" या अंगावर अधिक भर देणे क्रमप्राप्तच होते. अर्थात या ओघात शब्दोच्चार महत्व गौण ठरते. परिणाम असा होतो, शब्द उच्चारण्याला लागणारा श्वास, ते स्वरांच्या भोवती रुंजी घालण्यासाठी वापरतात. त्यामुळे घुमारायुक्त अखंडता राखता येते.
    मराठी भावगीतांत अढळ स्थान प्राप्त करणारे - "शुक्रतारा मंदवारा" हे गाणे यमन रागावर आधारित आहे. मंगेश पाडगावकरांची गेयताबद्ध कविता आणि त्याला चाल अर्पिणारे, संगीतकार श्रीनिवास खळे!! गाण्याच्या सुरवातीला सतारीचे जे सूर आणि त्याच्या पार्श्वभागी व्हायोलीन वाद्याचे स्वर, यातून आपल्या समोर यमन राग उभा राहतो. खळे साहेबांच्या सगळ्याच चाली जरा बारकाईने ऐकल्या तर काही वैशिष्ट्ये आपल्याला समजून घेता येतील. बहुतेक गाणी अतिशय संथ लयीत चालत असतात, तसेच शब्दानुगामी चाली असतात. गाण्यात लयीचे वेगवेगळे बंध अनुभवायला मिळतात. गाणी ऐकायला सोपी वाटतात परंतु लयीच्या अंगाने हरकती असल्याने, लायीफ्चे पक्के भान ठेवावे लागते अन्यथा गाताना भरकटले जाण्याची शक्यता अधिक. कविवर्य मंगेश पाडगावकर, खऱ्या अर्थी "भावकवी"आहेत आणि अशा कवितेतच त्यांची त्यांची खरी प्रतिभा आपल्याला दिसून येते.
    "शुक्रतारा मंदवारा, चांदणे पाण्यातुनी
    चंद्र आहे, स्वप्न वाहे, धुंद या गाण्यातुनी
    आज तू डोळ्यात माझ्या मिसळूनी डोळे पहा,
    तू अशी जवळी रहा."
    रचना म्हणून प्रस्तुत गीत हे अतिशय अवघड आहे.
    "लाजऱ्या माझ्या फुला रे
    गंध हा बिलगे जीवा,
    अंतरीच्या स्पंदनाने अन थरारे ही हवा".
    इथे कवितेत "सलज्ज"प्रणयाचा अनोखा संस्कार आहे आणि ती भावना गाताना, ज्या संयत पद्धतीने मांडली आहे, ते खास ऐकण्यासारखे आहे. लय मुखड्यावरून बदलली आहे पण गाताना ती लय नेमकी सांभाळून, शब्दांतील आशय अधिक अंतर्मुख केला आहे. हे फार अवघड आहे पण खळे साहेबांच्या रचनांचे खास वैशिष्ट्य म्हणावयास हवे.
    मराठी चित्रपट "कामापुरता मामा" मध्ये "जीवनात ही घडी अशीच राहू दे" हे गाणे यमन राग आनंदाने निथळत असतो, याची ग्वाही देणारे आहे. नुकताच प्रणयाचा स्वीकार झालेला आहे आणि नव्या जीवनाची स्वप्ने नायिकेच्या मनात असतत. याचा पार्श्वभूमीवर हे गाणे आहे. संगीतकार यशवंत देवांची चाल आहे आणि गीत रचना देखील त्यांचीच आहे. रूढार्थाने यशवंत देव हे कवी नाहीत परंतु त्यांनी प्रसंगोत्पात रचना लिहिल्या आहेत. लिहिताना, आपण "कवी" नसून केवळ काही गाण्यांच्या बाबतीत रचना करीत आहोत,याचे भान नेहमी आढळते. परिणामी शब्दरचना सहज, सोपी आणि गेयता प्रमुख असते.
    "जीवनात ही घडी अशीच राहू दे,
    प्रीतीच्या फुलांवरी वसंत नाचू दे."
    त्यांनीच एकेठिकाणी म्हटले आहे, "चाल ही शब्दातच दडलेली असते. संगीतकार फक्त ती चाल शोधून काढतो". अर्थात देवांनी काही प्रसंगी चालीवर देखील शब्दरचना केल्या आहेत पण तरीही तो केवळ अपवाद मानावा. गाणे अतिशय द्रुत लयीत आहे, पण तरीही शब्दोच्चार (अर्थात लताबाईंचे) आणि त्याची सुरांबरोबर घातलेली सांगड विलक्षण सुंदर आहे. एक गंमत आहे. पहिला अंतरा सुरु व्हायच्या आधी जो वाद्यमेळ आहे, त्यातील व्हायोलीनचे सूर किंचित "पुरिया धनाश्री" रागाची छटा दाखवतात!! चाल यमन रागावर आणि त्यात पुरिया धनाश्री रागाची छटा!! काय बिघडले? गाण्याच्या चालीत तर कुठेही विक्षेप आलेला नाही. संगीतकार म्हणून यशवंत देवांची ही खुबी खरोखरच अप्रतिम आहे.
    मराठी माणसाच्या भावजीवनात माडगुळकरांच्या गीत रामायणाचे स्थान अढळ आहे. आज इतकी वर्षे उलटून गेली तरी या गाण्यांची मोहिनी काही उतरलेली नाही. गेयबद्ध रचना कशी करावी याचा आदीनमुना माडगूळकरांनी पेश केला आहे. अर्थात, अशा कवितांना तितकीच तोलामोलाची सुरांची साथ सधीर फडक्यांनी दिली असल्याने, यातील सगळीच गाणी आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. ""दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा" हे गाणे तर चिरंजीवित्व लाभलेले गाणे. यमन रागाचे सूर या गाण्यात ओतप्रोत भरलेले आहेत. मुळात, गाण्याची शब्दरचना(च) इतकी अप्रतिम आहे की अशा कवितेला चाल देखील तितकीच सुमधुर लागणार. आयुष्याचा "अर्क" म्हणून गणले जावे, अशा ताकदीची शब्दरचना आहे.
    "दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा,
    पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा."
    गाणे लांबीला बरेच मोठे आहेत आणि हे ध्यानात घेऊन, सुधीर फडक्यांनी चाल बांधताना आणि गायन करताना, त्यात निरनिराळे "खटके" घेतले आहेत, प्रसंगी चाल तार स्वरांत नेउन ठेवली आहे. अर्थात तिथे देखील संगीतकाराने, शब्दांचे औचित्य सांभाळून गायन केले आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास,
    "दोन ओंडक्यांची होते सागरात भेट,
    एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाही गाठ"
    अगदी सोप्या पद्धतीने आशय व्यक्त केला आहे पण, गायन जर का नीट ऐकले तर चालीतील फरक कळून घेता येतो. आणखी एक विशेष मांडायचा झाल्यास, फडके गाताना, शब्दांबाबत फार विचक्षण दृष्टी ठेवतात. "दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा", या ओळीतील "दोष" हा शब्द किती अचूक पद्धतीने उच्चारला आहे, हे अभ्यासण्यासारखे आहे. सूर आणि लयीचा सगळा बिकट बोजा सांभाळून, शब्दांबाबत सजग भान ठेवणे, हे सहज जमण्यासारखे नव्हे.
    सुप्रसिद्ध कवी बा.भ.बोरकरांची "दिव्यत्वाची जेथे प्रचीती, तेथे कर माझे जुळती." ही कविता आजही, त्यांच्या लोकप्रियतेची निदर्शक अशी कविता आहे. आजही कवी बोरकर, बहुतांशी याच कवितेच्या संदर्भात ओळखले जातात. या कवितेचे गाण्यात रुपांतर केले आहे, संगीतकार वसंत प्रभू यांनी, "पोस्टातली मुलगी" या चित्रपटाच्या निमित्ताने. कविता अतिशय भावगर्भशील आहे जीवनाला यज्ञाची उपमा देण्याची कल्पकता आहे तसेच कवितेच्या शेवटी, "मध्यरात्री नभघुमटा खाली, शांतीशिरी तम चवऱ्या ढाळी; त्यक्त बहिष्कृत मी त्या काळी, एकांती डोळे भरती" सारख्या अजरामर ओळींनी करून, ही कविता सामान्य माणसाच्या भावजीवनाचा भाग बनून गेली.
    तशी कविता सरळ, सोपी आहे आणि त्याच प्रकाराने, वसंत प्रभूंनी गाणे तयार करताना, चालीची निर्मिती केली आहे. कवितेतील काही ठराविक कडवी घेतली आहेत परंतु चित्रपटातील प्रसंग उठावदार करण्याच्या दृष्टीने सुयोग्य आहेत. सरळसोट यमन राग या गाण्यात दिसतो. चालीत कुठेही औचित्यभग होणार नाही आणि आशयाची अभिवृद्धी सतत होत राहील, याची काळजी घेतली आहे. अर्थात, आशा भोसले यांचे परिणामकारक गायन देखील तितकेच महत्वाचे आहे.
    पंडित वसंतराव देशपांडे आणि पंडित भीमसेन जोशी यांनी "भोळी भाबडी" चित्रपटात यमन रागावर आधारित सुंदर अभंग गायलेला आहे - "टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संग". अभंग, माडगूळकरांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला आहे आणि त्याला तितकीच समर्पक चाल, संगीतकार राम कदम यांची आहे. संगीतकाराने, या दोन दिग्गज गायकांची गायकी समोर ठेऊन, चालीची निर्मिती केली आहे. स्वरांवर ताबा ठेवण्याची वसंतरावांची शैली तर घुमारेदार, गोलाईयुक्त गायनाची भीमसेन जोशीची शैली, दोन्ही प्रकारच्या गायकीचे पुरेपूर प्रत्यंतर आपल्याला ऐकायला मिळते. यमन सारखा सर्वसमावेशक राग हाताशी असल्याने, चालीत "गायकी" अंग अंतर्भूत होणे क्रमप्राप्त(च) आहे.
    "टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संग;
    देवाजीच्या दारी आज रंगला अभंग."
    भीमसेन जोशींचे अभंग गायनाशी कायमचे नाव निगडीत होण्यापूर्वीची ही रचना आहे परंतु गाणे ऐकताना पंडितजींच्या आवाक्याची आणि पुढील वाटचालीची कल्पना करता येते. तसे बघितले तर या गाण्यात वसंतरावांपेक्षा भीमसेनी गायनाचा प्रभाव अधिक आहे आणि त्यांना गायला बराच अवसर मिळालेला आहे. नवल असे वाटते, इतकी समृद्ध रचना काळाच्या ओघात मागे कशी पडली?
    कविवर्य भा.रा.तांब्यांनी आयुष्यात असंख्य गीतसदृश रचना केल्या. किंबहुना, त्यांच्या कविता वाचताना, आपल्या मनात आपोआप लयबद्ध चालीचा आराखडा तयार होतो. कवितेच्या प्रत्येक ओळीत गेयता सामावली गेली आहे. मुळात त्याकाळच्या इंदोरच्या सरंजामी राजवटीचा गाढा परिणाम त्यांच्या कवितेवर पडलेला दिसतो.
    "तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देई वाचन तुला;
    आजपासुनी जीवे अधिक तू माझ्या हृदयाला."
    या कवितेत देखील याच वृत्तीचा प्रभाव दिसतो. काही ठिकाणी संस्कृत प्रचुर शब्द वाचायला मिळतात परंतु त्यामुळे कविता अधिक "श्रीमंत" होते, ही बाब नाकारणे अवघड आहे. संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांनी, या कवितेतील "राजस" भाव ओळखून, नेमका यमन राग(च) निवडला. आपण मागील लेखात बघितले त्याप्रमाणे, यमन रागच समय, प्राचीन ग्रंथात "सांजसमय" दिलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर, या गाण्याच्या सुरवातीला संतूर वाद्यातून यमन रागाची धून छेडलेली आहे आणि पुढील रचनेची सूचना मिळते. चाल गायकी अंगाची आहे.
    किंबहुना हृदयनाथ मंगेशकरांच्या बहुतेक रचना या गायकी थाटाच्याच असतात आणि त्यामुळे गायला अवघड होतात. लताबाईंनी चालीतील अश्रूत गोडवा ओळखून गायनाची शैली ठेवली आहे आणि त्यामुळे गाणे कमालीचे रमणीय होते. चालीचा तोंडावळा खरेतर रागदारी चीजेकडे वळतो पण तसे असून देखील रागातील "लालित्य" शोधून, संगीतकाराने चालीचे खरोखर सोने केले आहे.
    -- अनिल गोविलकर

  • तलावांचे शहर ठाणे – भाग १

    तलावांचे शहर च्या पहिल्या भागात आपण ठाणे शहरातील मासुंदा तलावा विषयी माहिती घेणार आहोत. मासुंदा तलावाला भेट न देणारा असा एकही ठाणेकर आपल्याला मिळणार नाही.

  • महिंद्र साउथ आफ्रिका

    UB group मधील नोकरीचे "बारा" वाजायला लागल्यावर, नवी नोकरी शोधणे क्रमप्राप्त होते. वास्तविक, या नोकरीत स्थिरस्थावर व्हायची इच्छा होती पण प्रारब्ध वेगळेच होते. Standerton हे गाव, म्हणावे अशा अटकर बांध्याचे आहे. आजूबाजूला कुठलेच शहर नजरेच्या टप्प्यात नाही. जुन, जुलै महिन्यात हाडे गारठवणारी थंडी असल्याने, लोकवस्ती तशी विरळ!! सुदैवाने, माझ्याच ओळखीत, जोहान्सबर्ग इथे एका कंपनीत, नोकरी संदर्भात मुलाखत झाली आणि तिथे नोकरी पक्की झाली. तेंव्हा,मनात विचार केला, जर का ही नोकरी स्वीकारली तर आपले भारतात जाणे आणखी एक वर्ष तरी पुढे जाईल. म्हणून मग लगेच मुंबईचे तिकीट काढले आणि मुंबईत महिना काढावा, म्हणून निघालो. नव्या नोकरीला होकार दिला होता पण त्यांना, जानेवारीत join करण्याचा वायदा केला आणि मुंबईच्या विमानात पाउल ठेवले. हातात नोकरी असली म्हणजे, तुमच्या वागण्या,बोलण्यात आत्मविश्वास येतो आणि एकूणच सगळे व्यवस्थित होत आहे, असे वाटत रहाते. एव्हाना, विमान प्रवासात वेळ कसा घालवायचा, याचे पक्के गणित मनाशी केलेले असल्याने, विमानात बसलो आणि वाचायला पुस्तक काढले. अचानक मनात विचार आला, मुंबईत जात आहोत तर महिंद्र कंपनीत, आपला खुंटा हलवून बघायचा!! महिंद्र कंपनीने, साऊथ आफ्रिकेत, नव्यानेच व्यवसाय सुरु केला होता आणि तिथे काही संधी मिळते का? अशी चाचपणी करायचे ठरविले.

    सुदैवाने, एक, दोन मित्रांच्या ओळखी निघाल्या आणि त्या जोरावर, वरळी इथल्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये, P.N.Shah, या माणसाला भेटायला गेलो. सुदैवाने, लगेच भेट मिळाली आणि वेगळे सुदैव म्हणजे, त्याच सुमारास, साऊथ आफ्रिकेतील, १]विजय नाक्रा, २] हेतल शाह, मुंबईला येणार आहेत, तेंव्हा त्यांच्याशीच पुढील मीटिंग ठरवली. आणि पुढील आठवड्यात, भेट होऊन, नोकरीचे पक्के केले. इतक्या झटापट सगळे झाले की मलाच आश्चर्य वाटले. प्रिटोरिया इथे कंपनीचे मुख्य ऑफिस असल्याने, परत शहरात येण्याचा आनंद काही वेगळाच!! सेंच्युरीयन भागात, कंपनीचे ऑफिस - इथे क्रिकेटचे जगप्रसिद्ध स्टेडीयम आहे. हेतलने, मला भारतात फोन करून, कंपनीत कशी रुजू होणार आहेस, हे विचारले आणि माझी, पुन्हा परत जाण्याची लगबग सुरु झाली.
    पोहोचलो, त्याच दिवशी हेतलने ऑफिसला येण्याचे सुचवले. वास्तविक रात्रभराचा प्रवास अंगावर होता पण, नवी नोकरी आणि तो देखील सेंच्युरीयन भागात, हे आकर्षण असल्याने, तशीच गाडी कंपनीच्या ऑफिसमध्ये नेली. इथे एक बरे असते, तुम्ही जर का नेमका पत्ता हातात ठेवला असेल तर या देशात कुठेही जायला प्रश्न उद्भवत नाही. जर का एखादा Off Ram चुकला तर मात्र जबरदस्त हेलपाटा पडतो, कमीतकमी १५, २० कि.मी.चा फटका बसतो!! अतिशय सुंदर ऑफिस, त्यामुळे मनाला देखील उल्हसित झाल्यासारखे वाटले. पहिल्या प्रथम, एक बाब आढळली, ऑफिसमध्ये गोऱ्या लोकांचे प्रमाण लक्षणीय होते आणि सगळीकडे लगबग चालू होती. मी पोहोचलो आणि तिथे श्रीधर नावाच्या माणसाने, माझी ओळख करून घेतली. हा, मुंबईतून, हेड ऑफिसमधून बदलून इथे आला होता. अर्थात, इथे येणाऱ्या सगळ्याच भारतीय कंपन्या, आपल्या ओळखीची माणसे, भारतातून, बोलावून घेतात. Inter Company Transfer, या नावाने, त्यांना व्हिसा देखील लगेच मिळतो. त्यावेळी, आमच्या ऑफिसमध्ये, विजय नाक्रा, हेतल शाह, विजय देसाई, महेंद्र भामरे आणि श्रीधर, हे भारतातून इथे आले होते. (आता यापैकी एकही नाही!!)
    आता इथे ऑफिस म्हटल्यावर आसपास घर शोधणे गरजेचे (तोपर्यंत, मी "लोडीयम" इथे एका मित्राच्या घरात रहात होतो) आणि सुदैवाने लगेच "एको पार्क" या अत्यंत प्रशस्त आणि अवाढव्य संकुलात, मला एक जागा मिळाली. हे संकुल मात्र खरोखरच अवाढव्य आहे. इतकी वर्षे मी देशात काढली पण, मला इतके सुंदर घर आणि जागा, यापूर्वी आणि नंतर देखील मिळाली नाही!! संकुलात, ४ क्लब्ज, ५ स्विमिंग पूल, २ गोल्फ मैदाने आणि अनेक गोष्टी होत्या, जेणेकरून, संकुलाच्या बाहेर जायची फारशी गरज भासू नये.
    पहिल्याच दिवशी, नेहमीप्रमाणे ओळख परेड झाली. ऑफिसमध्ये गोऱ्या लोकांचे लक्षणीय प्रमाण होते. अर्थात, एव्हाना, गोऱ्या लोकांच्या कामाची मला सवय झाली होती. बरेचवेळा तर त्यांच्या बोलण्याच्या धर्तीवर माझे इंग्रजी बोलणे व्हायला लागले होते. हे तर कधी ना कधीतरी होणारच होते म्हणा. सतत, त्या लोकांच्या सहवासात राहिल्यावर कुठला न कुठला तरी गुण, नकळत आत्मसात केला जातो, इतकेच नव्हे तर आफ्रिकान्स भाषा देखील काही प्रमाणात समजायला आणि काहीवेळा बोलण्याच्या ओघात, तोंडातून बाहेर पडायला लागली. आफ्रिकान्स भाषा म्हणजे जुनी डच भाषा!! इथे फार पूर्वीपासून, डच आणि ब्रिटीश लोकांचे वर्चस्व होते. पुढे ब्रिटिशांनी युद्धात, डचांचा पराभव करून, सगळ्या देशावर स्वामित्व मिळवले. तरी देखील, आजही इथे इंग्रजी भाषेच्या जोडीने, आफ्रिकान्स भाषा बोलली जाते. आता तर राष्ट्राची अधिकृत भाषा म्हणून मान्य केली आहे. भाषेचा टोन बघता, जर का बारकाईने ऐकली नाही तर इंग्रजी आणि आफ्रिकान्स भाषेच्या उच्चारात फारसा फरक नाही - "ख" या व्यंजनाचा आफ्रिकान्स भाषेत भरपूर वापर केला जातो. असो!!
    जेम्स,वेंडी, सुझन, लिझा, वेडबर्न इत्यादी अनेक माणसे, दीर्घ काळ माझ्या संपर्कात होती, जेम्स आणि वेंडी, तर अजूनही आहेत. गोऱ्या लोकांचे प्राबल्य म्हटल्यावर, एक बाब अधोरेखित झाली, इथे कामाच्या बाबतीत टंगळ मंगळ नसणार आणि तो विश्वास इथे नेहमीच सार्थ ठरला. अर्थात, एक बाब अजूनही अदृश्य स्वरूपात वावरत असते. गोऱ्या लोकांना, आपल्या कातडीचा प्रचंड, अगदी घमेंड म्हणावी इतका पराकोटीचा अभिमान असतो. मला एकूणच बहुतांशी गोरे लोकं भेटली, त्यांनी अगदी न चुकता, माझा विश्वास सार्थ ठरवला!! एका दृष्टीने विचार केला तर, कामाच्या बाबतीत, चोख काम करण्यात, गोरा समाज, अगदी डोळे मिटून विश्वास ठेवण्या लायकीचा म्हणावा लागेल तर काळा समाज, अपवाद वगळता, अत्यंत कामचुकार!! वास्तविक, आता साऊथ आफ्रिकेत, कायद्याने, वर्णभेद नाहीसा केला आहे पण, तरीही समाजात एक अदृष्य रेघ आहे, तिथे हा फरक जाणवतो. किंबहुना असे देखील म्हणता येईल, अजूनही काळ्या लोकांचा समाज, वर्णभेदाच्या जोखडाखालून मोकळा झालेला नाही!! अर्थात, ही मानसिक गुलामगिरी आहे आणि याचे कारण, वर्षानुवर्षाचे झालेले संस्कार!!
    खरतर,राष्ट्रीय मंत्रिमंडळात, काळ्या लोकांचे प्रमाण लक्षणीय आहे आणि त्यांना आता पुरेसे अधिकार देखील प्राप्त झालेत. पण, ही सुधारणा फार वरवरची आहे. अजूनही इथे मानसिक गुलामगिरी चालूच आहे आणि गंमतीचा भाग म्हणजे, याला बहुतांशी, काळा समाज(च) कारणीभूत आहे. मी, पूर्वी लागोस - नायजेरिया मध्ये दोन वर्षे काढली आणि ऑफिस कामासाठी, काळा माणूस किती "उपयुक्त" आहे, याचा पुरेपूर अनुभव घेतला आहे. अर्थात, नायजेरिया देशातील काळा माणूस आणि साऊथ आफ्रिकेतील काळा माणूस, यात सुतभर देखील फरक नाही. कामाबाबत तसाच उदासवाणा दृष्टीकोन, फटाफट पैसे आणि ते देखील शक्यतो विनासायास पैसे कमावण्याची जबरदस्त इच्छा आणि त्या इच्छेपोटी, कुठल्याही थराला जायची तयारी!! शारीरिक काम जबरदस्त ताकदीने रेटून नेतील पण, बौद्धिक कामाचा प्रश्न आला, की शक्यतो पाय मागे!!
    वास्तविक, आता इथे काळ्या समाजातील लोकांसाठी असंख्य सुविधा आहेत, आर्थिक, सामाजिक इत्यादी सुविधा भरपूर आहेत पण मुळात बौद्धिक कष्ट घेण्याचीच वृत्ती कमी असल्याने, हा समाज, जितका पुढे यायला हवा त्याप्रमाणात, आजही मागासलेला आहे. मी हे मत अतिशय विचारपूर्वक मांडत आहे. आज, इथल्या बँकेत वरिष्ठ पदावर बरेच काळे अधिकारी दिसतात तसेच प्रचंड मोठ्या कंपन्यांच्या वरिष्ठ पदावर देखील काळ्या वर्णाची माणसे दिसतात पण, एकूण समाजाच्या आकारमानाने, हे प्रमाण आजही नगण्य आहे, हे जळजळीत वास्तव आहे. आता, याबाबतीत असे देखील म्हणता येईल, यांना स्वातंत्र्य मिळून, उणीपुरी २२, २३ वर्षेच झाली आहेत (इथली पहिली लोकशाही निवडणूक १९९२ साली झाली) आणि गुलामगिरीचे जिणे, त्यांनी शतकानुशतके झेललेले आहे.ते मानसिक जोखड इतक्या सहजपणे, भिरकावून देणे अवघड आहे. हा मुद्दा जरी मान्य केला तरी, आता स्वातंत्र्यानंतरची दुसरी पिढी इथे आली आहे आणि हे ध्यानात घेता, सुधारणांचा वेग केवळ नगण्य आहे. किंबहुना, काळ्या धंद्यात, हा समाज नको तितका गुंतलेला आहे आणि हा मुद्दा निश्चित चिंताजनक आहे.
    एक सुंदर प्रसंग - माझ्याच बाजूला रेमंड नावाचा एक काळा तरुण कामाला होता. इतर काळ्यांच्या मानाने शिकलेला आणि कामाची आवड असलेला. आता, बाजूला बसत होता, म्हटल्यावर गप्पा मारणे साहजिक होते आणि तशा आमच्या वेगवेगळ्या विषयावर गप्पा व्हायच्या. एकदा, कामाच्या निमित्ताने तो ऑफिसमध्ये फिरत असताना, आमचा C.O.O. वेडबर्नच्या खांद्याला किंचितसा धक्का लागला!! आता असे धक्के, ऑफिसमध्ये लागणे, सहज शक्य असते. इथे एक गोची झाली, वेडबर्नने, धक्का लागल्याबद्दल, रेमंडची माफी मागितली नाही!! झाले!! रेमंडला हा अपमान वाटला आणि "मी केवळ काळा आहे, म्हणून मला अशी वागणूक मिळते" असे अधिकृत पत्र लिहिले आणि जर का "न्याय" मिअल नाही तर पोलिस तक्रार करण्यात येईल, अशी धमकी देखील मांडली होती. या प्रसंगाला, साक्षीदार म्हणून हेतल आणि माझे नाव, त्यात घेतले होते!! वास्तविक, प्रसंग किती किरकोळ होता पण, रेमंडच्या डोक्यात काय भूत शिरले, समजले नाही. अखेर, त्याच्या "बाबा पुता" करून, प्रकरणावर पडदा पाडला. परिणाम एकच, दुसऱ्या दिवसापासून, त्याला जवळपास, "वाळीत" टाकण्यात आले!! कुणीही त्याच्याशी बोलायला देखील तयार नाही!!
    असो, इथे मला "सेटल" होणे अजिबात अवघड गेले नाही. दुसरा भाग म्हणजे, इतकी वर्षे, मी इथल्या मित्रांशी शक्यतो, फोनवरून संपर्क साधित असे आणि आता, प्रत्यक्ष भेटीगाठी सहज शक्य झाल्या. यात, मकरंद, विनय हे माझे जुने मित्र, माझ्या नेहमीच्या भेटीगाठीच्या संपर्कात आले. मकरंद इथे १९९२ पासून असल्याने, त्याचे मित्रवर्तुळ मोठे आणि त्याचा मला बराच फायदा झाला. दर वीक एंड एकत्र घालवायचा असे ठरले आणि त्याप्रमाणे, आम्हाच्या भेटी सुरु झाल्या. प्रिटोरिया आणि जोहान्सबर्ग, यात केवळ ६० कि.मी. इतकेच अंतर,त्यामुळे जोहान्सबर्ग मधील मित्रांशी संपर्क ठेवणे खूपच सुलभ झाले. याच सुमारास, मी दुसरी गाडी घेण्याचे ठरवले आणि परत डेव्हिडच्या जावयाशी संपर्क साधला. यावेळेस, त्याने मला VW कंपनीची "पोलो १.६" ही गाडी मिळवून दिली. एव्हाना, या देशात बऱ्याच गाड्या फिरवून झाल्या, पण या गाडीला तोड नाही!! जर्मन टेक्नोलॉजी म्हणजे काय, याचे ही गाडी म्हणजे मूर्तिमंत उदाहरण. लाल रंगाची गाडी म्हणजे कुणीही प्रेमात पडावे, इतकी सुरेख गाडी होती. पुढे, मी देखील,ही गाडी मनसोक्त फिरवली.
    याच वास्तव्यात, इथे T20 विश्वकप स्पर्धा सुरु झाली आणि आमच्या मित्रांच्या चमूने, ही स्पर्धा मनसोक्त उपभोगली. मकरंदची, त्यावेळच्या लालचंद राजपूत बरोबर मैत्रीपूर्ण संबंध होते आणि त्यामुळे, त्याच्याकडून आम्हाला, free passes मिळायचे. इथल्या स्टेडीयम मध्ये जावे आणि भारताने, अजिंक्यपद मिळवावे, असली वेडी आशा इथे पूर्ण झाली. अंतिम सामना - भारत/पाकिस्तान यांच्यात झाला आणि अति अतितटीची झुंज, अखेर भारताने जिंकली!! त्यावेळचा स्टेडीयम मधील आरडा-ओरडा, बक्षीस समारंभ, हातात असलेल्या बियरची अवर्णनीय चव, या आठवणी मनावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. विश्वविजयाची चव, आम्हा मित्रांच्या चमूने, स्टेडीयम शेजारील पब मध्ये, रात्रभर जागून साजरा केला. केवळ अविश्वसनीय विजय.
    ऑफिसमध्ये त्यामानाने लवकर स्थिरस्थावर झालो. आमच्या कंपनीचा व्यवसाय, भारतातून "रेडीमेड" गाड्या मागवणे - सोबत स्पेअर पार्टस देखील आणि त्यांचे देशभर वितरण करणे. खरेतर इथे इतक्या प्रकारच्या गाड्या उपलब्ध आहेत, तेंव्हा महिंद्र कंपनीने म्हटले तर धाडस केले. अर्थात, गाड्यांची किंमत, हा वाजवी मुद्दा असल्याने, आमचा भर त्यावरच अधिक. या ऑफिसची स्वत:ची अशी कार्यशैली होती आणि ती मी लगेच अंगवळणी करून घेतली. आमच्या ऑफिसमध्ये दर महिन्याला, शेवटच्या शुक्रवारी, पार्टी असायची आणि ती शक्यतो ऑफिसमध्येच असायची. त्या दिवशी ऑफिस दुपारी ४. वाजता बंद. गोरा माणूस, काय सज्जड ड्रिंक्स घेतो, याचा अप्रतिम नमुना या पार्टीत सतत मिळत गेला. ऑफिसमधील मुली देखील ड्रिंक्स घेत असत. अर्थात, प्रमाण हात राखून.
    त्यावर्षी, कंपनीने, राष्ट्रीय पातळीवर, सगळ्या एजंट्सची वार्षिक बैठक, दोन दिवसांची ठरवली. फायनान्स मधून, मी आणि हेतल हजार राहणार होतो. बैठकीचा इतका तपशीलवार विचार आणि नोंदी बघून, आपल्याला "प्रोफेशनल" व्हायला किती अवकाश आहे, याची नव्याने जाणीव झाली. बैठकीच्या प्रत्येक मिनिटांचा चोख हिशेब, आणि त्याबर सगळे नेमकेपणी घडवून आणण्याची तोशीस. चहापान, दुपारचे जेवण, संध्याकाळी, सत्रे कधी आणि कशी संपतील, याचा अचूक आराखडा, बैठक व्हायच्या आधी, आठवडाभर आमच्या हातात. कुठेही कसलाही हलगर्जीपणा नाही की गोंधळ नाही. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील अत्यंत मुद्देसूद मिळायची. कणभर देखील फापट पसारा नाही. एकदा का संध्याकाळ झाली, म्हणजे गोरा माणूस रंगायला लागतो. त्यावेळचा गोरा माणूस, हा दिवसभराच्या कार्यक्रमात दिसणाऱ्या माणसापेक्षा संपूर्ण वेगळा.
    एक गंमत. फेब्रुवारी महिना (इथे फायनांशियल वर्ष फेब्रुवारी महिना असतो) जवळ आला की, अकाउंटस विभागात, वार्षिक गडबड सुरु होणे, क्रमप्राप्त असते. आपल्या भारतीय पद्धतीप्रमाणे, आता रोज, ऑफिसमध्ये उशिरा बसणे, नेहमीचे असते. एका शुक्रवारी, मी जेम्सला, उशिरा बसण्याची विनंती केली आणि त्याची खरच जरुरी होती. माझे बोलणे ऐकून घेतल्यावर, अत्यंत थंड आवाजात," Anil, I got family at home and it's my family time!! I can't work after office hours!!". ऐकल्यावर, अनिल थंड!! इथे अशी बळजबरी कुणावरही करता येत नाही. ऑफिस वेळेत, काहीही काम सांगा, तिथे कुचराई नाही पण, एकदा का, संध्याकाळचे ४.३० वाजले, म्हणजे मग तिथला गोरा हा स्वतंत्र असतो, कंपनीशी काहीही देणेघेणे नसते!! समजा, उशिरा बसला तर कंपनीवर जणू उपकार केले, याच भावनेने (हे क्वचित घडते) काम करणार आणि त्याचा मोबदला, नेमका वसूल करणार आणि त्याहून महत्वाचे म्हणजे, "मी त्यावेळी उशिरा बसलो होतो", याची तुम्हाला सतत जाणीव करून देणार!!
    समजा, कंपनीचे बाहेरचे काही काम असेल तर, गोरा माणूस, आपली गाडी चुकूनही काढणार नाही. त्यामुळे प्रत्येक कंपनीला, स्वत:च्या अशा वेगळ्या गाड्या ठेवणे भाग असते. उं उलट, काही बँकेची कामे असतील आणि त्या साठी काळा माणूस पाठवला तर, तो काहीही करून, ते काम करून देईल. हा फार मोठा फरक, या दोन समाज प्रवृत्तीत आहे. गोरा माणूस अतिशय materialistic असतो आणि तिथे "माझी कंपनी" असली भावनिक गुंतवणूक अजिबात नसते. कंपनीचे काम, मनापासून करतील पण ती गुंतवणूक, केवळ कंपनी वेळेपुरती. पुढे, माझ्या घरी काय किंवा, इतर गोऱ्या लोकांच्या घरी जाण्याचा प्रसंग आला, प्रत्येकवेळी हाच अनुभव आला.
    याच सुमारास, इथल्या मराठी मंडळ आणि तिथल्या लोकांची ओळख झाली. खरेतर, इथले मराठी मंडळ, हे प्रामुख्याने, जोहान्सबर्ग आणि प्रिटोरिया, या दोन शहरांपुरते आहे. इतर शहरांत, त्यामानाने फारशी भारतीय माणसे आढळत नाहीत. याचे मुख्य कारण, जी माणसे भारतातून इथे येतात, ती प्रामुख्याने, Inter Company Transfer व्हिसावर येतात आणि त्यांची कार्यालये, ही बहुतांशी याच दोन शहरात असतात. मुळात, इथे भारतातून येण्याचे प्रमाण, अगदी २००० सालापर्यंत, जवळपास नगण्य होते. हळूहळू, भारतीय कंपन्यांनी इथे व्यवसाय केंद्रे उघडली, निरनिराळ्या बँकांची ऑफिसेस उघडली आणि इथे भारतीय माणसे यायला लागली. त्यामुळे, तसे म्हटले तर इथले मराठी मंडळ हे तसे नाममात्र(च) आहे (आजही यात फारसा फरक नाही). त्यातही, बहुतेक मराठी माणसांना, इथे आलो म्हणजे आपण युरोप/अमेरिकेत आलो, असेच वाटायला लागते!!
    याचा परिणाम असा झाला, त्यांना मराठी बोलण्याची "लाज" वाटायला लागली!! आपलीच भाषा पण, बोलायला देखील अवघड!! कारण विचारले तर, आमचे इंग्रजी भाषेत शिक्षण झाले, त्यामुळे मराठीशी संपर्क कमी राहिला!! अशीच काहीशी थातूर मातुर कारणे द्यायची. त्यामुळे, मंडळाचे जी काही तुरळक कार्यक्रम व्हायचे, त्यात मंडळाची कार्यकारिणी मंडळी वगळता, इतर लोकांची उपस्थिती नेहमीच तुरळक राहिली!! मी ही तुलना, विशेषत: नायजेरिया - लागोस इथल्या मराठी मंडळाशी केली आहे. मला आजही आश्चर्य वाटत आले आहे, मराठी आपली मातृभाषा आहे, असे असून देखील ती भाषा बोलायला "जड" जाते!! आपल्या भाषेचे संवर्धन आपण करायचे नाही तर कुणी करायचे? इथे, ना कुणाला खेद, ना कुणाला खंत!! मी इथे दोन वर्षे होतो आणि दोन वर्षात इथे काही ठराविक कार्यक्रम झाले आणि एकही कार्यक्रम, अपवाद म्हणून भरपूर गर्दीचा झाला!!
    तसे प्रिटोरिया शहर हे राजधानीचे शहर. इथे पार्लमेंट इमारत आणि सभागृह आहे. वर्णभेदाची चळवळ इथे फोफावली आणि इथेच नेल्सन मंडेलाचा शपथविधी झाला. याच शहरात, मी आयुष्यातील पहिला "सिंफनी ऑर्केस्ट्रा" अनुभवला आणि तो थरार आजही मनावर कोरलेला आहे. इथले म्युझियम बघण्यासारखे आहे, वर्णभेद किती भयानक होता, याची साक्ष इथे बघायला मिळते. परंतु ते प्रसंग अंगावर येतात, ते केप टाऊन इथल्या रॉबेन आयलंड इथल्या तुरुंगात!! तो भाग तर फारच विलक्षण आहे. इतर शहरांप्रमाणे इथे देखील प्रचंड मॉल्स आहेत, ऐषारामी हॉटेल्स आहेत, ऐय्याशी क्लब्ज आहेत. अर्थात हे सगळे पैशाचे खेळ आणि याचबरोबर येणारी असुरक्षितता देखील विपुल आहे. जोहान्सबर्ग आणि प्रिटोरिया, ही दोन्ही शहरे, सुरक्षिततेच्या दृष्टीने भयानक आहेत. केवळ संध्याकाळ उजाडल्यावर नव्हे तर दिवसाढवळ्या देखील,पायी हिंडणे अवघड झाले आहे. एकेकाळी, अमेरिकन कादंबऱ्या मधून,"मगिंग"ची वर्णने वाचली होती,त्याचे तंतोतंत प्रत्यंतर इथे अनुभवायला मिळते.
    आताच अनेक भारतीय वंशाची माणसे बोलायला लागली आहेत, " Racism was okay, just because crime rate was minimal". हे तिथल्या सामाजिक परिस्थितीचे द्योतक आहे. हळूहळू आर्थिक संकटे कोसळायला लागली आहेत आणि सर्वात भयानक म्हणजे आर्थिक विषमतेची दरी वाढत चाललेली आहे. आजही हा देश अप्रतिम सुबत्तेचा आहे, इथे भौतिक सुखाच्या अपरिमित संधी आहेत आणि आयुष्य कसे उपभोगावे, हे इथे समजून घेता येते. प्रश्न असा आहे, हे ऐश्वर्य आणखी किती वर्षे अबाधित राहील?
    -अनिल गोविलकर

  • वीज निर्मिती प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच निघू लागला प्रदूषणयुक्त धूर

    मोहाडी येथे प्रस्तावित असलेल्या एका खाजगी थर्मल पॉवर प्रोजेक्ट या वीज निर्मिती प्रकल्पावर आता ताशोरे ओढणे सुरू झाले आहे. हा थर्मल पॉवर प्रोजेक्ट आजूबाजुंच्या भागांकरिता प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणार असल्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधात संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली.

  • बा.सी. मर्ढेकर यांची एक कविता

    दवांत आलीस भल्या पहाटी
    शुक्राच्या तोऱ्यात एकदा,
    जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
    तरल पावलांमधली शोभा

    अडलिस आणिक पुढे जराशी
    पुढे जराशी हसलिस; - मागे
    वळुनि पाहणे विसरलीस का?
    विसरलीस का हिरवे धागे?

    लक्ष्य कुठे अन कुठे पिपासा,
    सुंदरतेचा कसा इशारा;
    डोळ्यांमधल्या डाळिंबांचा
    सांग धरावा कैसा पारा!

    अनोळख्याने ओळख कैशी
    गतजन्मीची द्यावी सांग;
    कोमल ओल्या आठवणींची
    एथल्याच जर बुजली रांग!

    तळहाताच्या नाजुक रेषा
    कुणि वाचाव्या, कुणी पुसाव्या;
    तांबुस निर्मल नखांवरी अन
    शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या!

    दवांत आलिस भल्या पहाटी
    अभ्राच्या शोभेत एकदा;
    जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
    मंद पावलांमधल्या गंधा.

  • बेवड्याची डायरी – भाग ६ – प्रार्थना व अर्थ

    ….सरांच्या मागोमाग सर्वानी प्रार्थना म्हंटली मग सरांनी हीच प्रार्थना फळ्यावर लिहिली व म्हणाले ” मित्रानो , आता आपण सगळ्यांनी जी प्रार्थना म्हंटली ती प्रार्थना अल्कोहोलिक्स एनाॅनिमसच्या प्रार्थनेवरून मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मराठीत रुपांतरीत केली आहे..तिचा सखोल आणि सविस्तर अर्थ आज आपण जाणून घेणार आहोत “

  • एक भिजरी आठवण

    पाऊस हा साहित्याच्याही सुगीचाचं दिवस असतो…असचं पावसाचं सुचलेलं वाचकांसाठी…