एका गावात Nirma आणि Wheel दाम्पत्याला Rexona नावाची सुंदर मुलगी असते,
तिचे प्रेम Margo आणि Hamam यांच्या देखण्या Cinthol वर असते.. तर Cinthol, आपला "Life Boy" होणार या कल्पनेने Rexona हरकून गेलेली असते..
501 नावाची तिची आत्या मध्यस्थी करून त्यांचे लग्न जमवते.
Rexona व Cinthol दोधेही खूप आनंदित होतात
आणि
Medimix गावातल्या Santoor सिनेमागृहासमोर असलेल्या Fair & lovely उद्यान कार्यालयात धुमधडाक्यात विवाह संपन्न होतो..
Lux, Dove, Dettol, Savlon, Tide, Fa, Jo सर्व या आपल्या बिरादरीतील मित्र परिवारास ते दोघेही विवाहाचे आमंत्रण देतात ...
नव विवाहित आपल्या स्वप्न नगरीतल्या "PEARS" या बंगल्यात सुखाने वैवाहिक जीवन जगत असतात..
सर्वांचा गुण्यागोविंदाने व्यवसाय चालू असतो....
२५ वर्षा नंतर त्यांना एक मुलगी होते व ती या सगळ्यांचे १२ वाजवते....
तीचे नाव .....
पतंजली
September 28, 2016
सध्याच्या जगाला लाडीलबाडी व प्रत्येक क्षेत्रातील जीव घेणी स्पर्धा , या दोन गोष्टींनी ग्रासलं आहे . भारताचे भावी आधारस्तंभ असलेल्या माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो, आपल्या अंगचा सज्जनपणा न सोड्ता, जर या परिस्थितीवर मात करुन तुम्हाला आपली ध्येये साध्य करायची असतील तर, अंगी चातुर्य बाणविण्याची आत्यंनतीक गरज आहे.
September 13, 2010
आपला भारत देश हा अध्यात्म प्रधान संस्कृती असलेला एकमेव प्राचीन देश आहे. इ.स.पू. १०००० वर्षे हा ऋग्वेदाचा काळ मानला जातो. त्यापूर्वीही इथे एक समृद्द, सुसंस्कृत, सुसंघटीत समाज धर्माचरण करत होता. अमेरिका युरोपला ५०० वर्षांपूर्वी माहीत झाली. पण युरोपचाही इतिहास ३ हजार वर्षांपेक्षा जुना नाही. आज जे धर्म स्वतःला देवाचा एकमेव धर्म म्हणवून घेतात आणि धर्माच्या नावावर अश्लाघ्य कृत्य करतात, त्यांचा २००० हजार वर्षांपूर्वी मागमूसही नव्हता. इ.स.पू. ८००० ते इ.स. १५०० पर्यंतच्या प्रचंड कालखंडात जगभरातील बहुतेक सर्व देशात हिंदू संस्कृतिचा प्रभाव होता.
April 9, 2011
एकाद्या परक्या देशात जर आजारी पडलात तर त्यांच्याच भाषेत बोला. नाहीतर अर्थाचा अनर्थ व्हायचा !!
अमेरिकेत एका भारतीयाला रस्त्यातच असतांना हृदयविकाराचा झटका आला. कोणीतरी त्याला अँब्युलन्समध्ये उचलून घेतले. तो भाविक गृहस्थ देवाची प्रार्थना करण्यासाठी सतत त्याच्या नावाचा जप करत होता.
“हरी ओम् हरी ओम् हरी ओम् हरी ओम् हरी ओम् हरी ओम् हरी ओम् हरी ओम् …..”
त्याला घेऊन अँब्युलन्स त्याच्या घरी गेली.
त्याच्या पत्नीने विचारले, “याला तुम्ही थेट हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेला नाहीत?”
समोरुन उत्तर आले, “काय करणार? त्याने हट्टच धरला होता हरी होम, हरी होम, हरी होम, हरी होम, हरी होम… ” (लवकर घरी न्या, लवकर घरी न्या, लवकर घरी न्या, )
तेव्हा सावध असा !!!!
February 18, 2016
मी सर्वप्रथम अमेरिकेत अपूकडे गेले ती 1998 साली.म्हणजे 25 वर्षांपूर्वी…. !पहिल्यांदाच विमानाचा प्रवास..आणि तो देखील इतक्या दूरचा आणि एकटीने करायचा… ! मी मुंबईतही कधी एकटीने प्रवास केल्याचं मला आठवत नाही.सासरी जायचं असो नाहीतर माहेरी जायचं असो.
August 22, 2023
“लोकं घोड्यावर बसू देत नाही आणि पायीही चालू देत नाहीत..” हा अनुभव सार्वजनिक आहे. तरीही ‘लोक काय म्हणतील ?’ याचाच विचार कोणताही निर्णय घेतांना केला जातो. आपल्या प्रत्येक कृतीवर, अगदी सार्वजनिक जीवनापासून ते वयक्तिक आयुष्यापर्यंत, राहणीमानापासून ते खाण्यापिण्यापर्यंत कुठलीही आवड – निवड ठरवितांना या तथाकथित ‘लोकां’चा विचार आपण करतो.
January 20, 2019
अलिबाग पासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कार्लेखिंडीत मुख्य रस्त्यापासून थोडया लांब आणि निसर्गाच्या हिरव्या पंखांमध्ये ’मोहोर‘ नावाचा टुमदार वृध्दाश्रम विसावला आहे. या वृध्दाश्रमाच्या आजूबाजूची शांतता आणि दुरवर पसरलेली हिरवी झाडं मनाला खूप प्रसन्नता देवून जातात.
June 28, 2011
७ सप्टेंबर २०११ रोजी सकाळी १०.१४ वा. दिल्ली हायकोर्ट, गेट क्रं. ५ येथे भीषण बॉम्बस्फोट झाला. हा बाँम्ब एका ‘ब्रिफकेस’मध्ये ठेवण्यात आला होता. स्फोट इतका बलशाली होता की, स्फोटाच्या ठीकाणी चार फुटाहून मोठा खड्डा पडला आहे, या परिसरातील अनेक गाड्यांचेही तुकडे झाले आहे. बांगलादेशातील हरकत-उल-जिहादी “हुजी” (नावातंच जिहाद आहे) या आतंकवादी संघटनेने स्फ़ोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. ही जबाबदारी स्वीकारताना “हुजी”ने असे म्हटले आहे की महम्मद अफ़जल गूरू याला देहदंडाची शिक्षा झाली आहे, त्याचा विरोध म्हणून हा भयानक स्फोट घडवून आणला आहे. अफजलची फाशी रहित करावी, अन्यथा देशातील आणखी काही उच्च न्यायालयावर अशीच आक्रमणे करू, अशी धमकी “हुजी”ने भारताच्या मुस्कटात मारली आहे. काँग्रेसचे युवराज घायाळांना भेटण्यासाठी रुग्णालयात आले होते तेव्हा त्यांना जन-उद्रेकाला सामोरे जावं लागलं, त्यांच्या विरोधात भोषणाबाजी झाली. गांधी-नेहरु परिवाराला जन-उद्रेक काय असतो हे वेगळे सांगायला नको.
September 8, 2011
येणाऱ्या जानेवारीत मुंबईतील गिरणी कामगारांच्या ऐतिहासिक संपाला ३९ वर्ष पूर्ण होतील. या संपाला २५ वर्ष झाली (१८ जानेवारी २००७) तेव्हा संवेदनशील लेखक जयंत पवार यांनी महाराष्ट्र टाईम्समधे लिहिलेला लेख त्यांच्या परवानगीने खाली उद्धृत करत आहे.
January 31, 2025
अरे बाबा काय होत तुला एवढे उपचार केले तू बरा का होत नाही रे बाळा
September 24, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti