(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्रीकृष्णभक्तीचा प्रसार-प्रचार

    भक्तीमध्ये सतत प्रगतीशील राहिले पाहिजे.

  • मानसोपचार तज्ज्ञांची भेट ! ( बेवड्याची डायरी -भाग २३ वा )

    आज मानसोपचार तज्ञांच्या भेटीचा वार होता ..या आठवड्यात नवीन दाखल झालेल्या सर्वांना माँनीटरने …सकाळी प्रार्थनेच्या वेळी त्यांना आज मानसोपचार तज्ञांना भेटायचे आहे हे सांगितले होते ..त्यावर एकदोन जणांनी सरळ सरळ नकार दिला होता ..त्यांना माँनिटरने वारंवार दारू अन्य मादक पदार्थांच्या सेवनाने मेंदूवर कसे दुष्परिणाम होऊन ..मानवी विचार ..भावना ..वर्तन यात कसा नकारात्मक बदल होतो हे समजून सांगितल्यावर ते तयार झाले

  • साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे!

    दैनिक लोकसत्ताच्या रविवार २९ ऑगस्ट २०१० च्या अंकात श्री अरुण जाखडे यांनी गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे असे मत मांडले आहे.

  • राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर सांगायचं कोणाला !

    राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर सांगायचं कोणाला !

  • भारतमातेच्या वीरांगना – २५ – उमाबाई कुंदापुर

    बिहार मधील भूकंप ग्रस्त क्षेत्र असो किव्हा चले जाव आंदोलनाचे क्रांतिकारी, उमाबाईचे घर सगळ्यांसाठी हक्काचा निवारा होता, त्याचे हात हक्काची मदत करणारे होते. १९४६ साली गांधीजींनी त्यांना कस्तुरबा ट्रस्ट च्या कर्नाटक शाखेचे प्रमुख म्हणून नेमले. ग्राम सेविकांचे प्रशिक्षण, गावातील वस्त्यांचे उत्थान अशी सगळी कामे त्यांनी पार पाडली. सरकार कडून कुठल्याच प्रकारची मदत नसतांना त्यांनी अगदी दारोदार हिंडून निधी गोळा केला आणि काम मोठे केले.

  • मुंबईकर..

    तुम्ही मुंबईकर आहात जर…

    १) कोणी एखादी जागा किती दूर आहे हे विचारले असता तुम्ही अंतर वेळेत सांगता- किमी मध्ये नाही.

    २) तुमचे पाच प्रकारचे मित्र असतात. एक ऑफिस ग्रुप, दुसरा ट्रेन ग्रुप, तिसरा कॉलनी ग्रुप आणि चौथा ट्रेकींग ग्रुप आणि हो, पाचवा कॉ्लेज मधला ग्रुप.

    ३) पावसाळ्याची तुम्ही वाट पहात असता ते उन्हाने कासाविस झाल्याने नाही तर, खरे कारण तुमच्या मनातले खरे कारण पावसाळा “सुरु = ट्रेकिंग सुरु= किंवा भटकंती सुरु “हे तुमचे समीकरण असते.

    ४) जगातले सर्वोत्कृष्ट स्नॅक कम स्टेपल फूड हे वडापाव आहे हे तुमचे ठाम मत असते. बेस्ट वडापाव वाला हा तुमच्या गल्लीतला (ज्याच्या कडून तुम्ही नेहेमी वडापाव घेता तो ) असतो हे तुमचे ठाम मत असते.

    ५) तुमचा वडापाव वाला जगातला उत्कृष्ट वडापाव बनवतो हे तुमचे पक्के मत असते. जर कधी चांगला वडा पाव हा मुद्दा डिस्कशन ला निघाला की तुम्ही आपल्या वडापाव वाल्याचे नाव पुढे करता आणि आपल्या मतावर ठाम असता. दुसरी गोष्ट म्हणजे वडा-पावाची तुलना कोणी मॅक डी बरोबर केली की तुमचा जळफळाट होतो.

    ६) तुम्ही कुठेही पाणीपुरी/भेळपुरी खाऊ शकता, पण पाणी प्यायची वेळ आली की बिसलेरी विकत घेता.

    ७)तुम्ही जिम मधे जाणे टाळता, कारण तुमच्या मते तुमचा दररोज जो लोकल मधे चढणे उतरणे, आणि ब्रिज चढणे उतरणे हा व्यायाम पुरेसा असतो, पण जर कोणी जातच असेल तर तो मात्र जिम पर्यंत बाईक/कार ने जातो..

    ८)लोकल मधे प्रवास करतांना जो पर्यंत कोणी तुमच्या पायावर पाय देत नाही तो पर्यंत लोकल मधे गर्दी आहे अशी तक्रार तुम्ही करत नाही.

    ९) क्रिकेट हा खेळण्याचा नाही तर बोलण्याचा /गप्पा मारण्याचा विषय आहे हे पुलं चे मत तुम्ही पुरेपूर सिद्ध करता. सचिन चे कसे चुकले? धोनी कसा वाईट कॅप्टन आहे वगैरे वगैरे विषयावर तुम्ही तास अन तास बोलू शकता.

    १०) मुंबई बाहेरच्या लोकांशी बोलतांना तुम्ही मी कुलाब्याला जातोय हे न सांगता टाऊन साईडला जातोय हे सांगता, आणि त्याच्या चेहऱ्यावरचे न समजल्याचे भाव एंजॉय करता.

    ११)तुम्हाला अगदी दादर पासून मुंबई सेंट्रल ( ३-४ स्टेशन )ला जायचे असले तरी पण तुम्ही फास्ट लोकलने प्रवास करता. त्या साठी तुम्ही आधीच्या दोन स्लो लोकल सोडून देता.

    १२)पावसाळा सुरु झाला की तुमच्या बॅग मधे छत्री विराजमान होते. अगदी निरभ्र आकाश जरी असलं तुम्ही छत्री वागवत फिरता.

    १३)भरपूर पाऊस पडल्याचे प्रुफ म्हणजे लोकल बंद पडणे. जो पर्यंत लोकल बंद पडत नाहीत तो पर्यंत तुम्ही खूप पाऊस खूप पडल्याचे मान्य करत नाही.

    १४) टुम्ही पावसाळ्यात मिलन सबवे बंद झाला का? हिंदमाता जवळ पाणी भरलं का? कुर्ल्याच्या ट्रॅक वरच्या सिग्नल प्रणाली पाण्याखाली बुडाल्या का? यावर लक्ष ठेऊन असता.

    १५) हापूस आंबा हा तुमचा विक पॉइंट असतो. तुम्ही जर मूळचे कोकणातले असाल, तर तुमच्या घरी दहा आंब्याची कलमं, २० सुपारीची आणि २० नारळ असतातच, पण तुमच्या जवळच्या नातेवाईकाने सगळे हडप केल्यामुळे तुम्हाला आंबे विकत घ्यावे लागतात हे तुम्ही सगळ्यांना आवर्जून सांगत असता.

    १६)तुम्ही बहुतेक मुंबईच्या हिंदी भाषेतच सगळ्यांशी बोलता, पण जेंव्हा एखाद्या हिंदी भाषीय माणसाबरोबर लोकल मधे भांडण होते, तेंव्हा तुम्ही आपल्या मराठीत बोलणे सुरु करता.

    १७) ८-०६, ८-३५ ९-५१ ह्या सगळ्या वेळा तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या असतात .

    १८)तुमच्या दृष्टीने तुमच्या उत्तरेला (नॉर्थ बॉंबे ला) रहाणारे सगळे खालच्या दर्जाचे, आणि दक्षिणेला ( साऊथ बॉंबे साईडला) रहाणारे शायनिंग मारणारे असतात. सेंट्रल आणि वेस्टर्न लाइनला हे लागू होत असतं.

    १९)तुमच्या दृष्टीने १० बाय १२ ची खोली म्हणजे हॉल असतो.

    २०) स्टॉक मार्केट तुमचा विक पॉइंट असतो, तुमची इनव्हेस्टमेंट अगदी ५० हजार असेल तरी सुद्धा, तुम्ही स्टॉक च्या मुव्हमेंट्स वर नजर ठेऊन असता आणि लोकल मधे डिस्कशन सुरु झाले की हिरारीने आपली मतं मांडता.

    २१)गर्दी नसली की तुम्ही नर्व्हस होता.

    २२) पावसाळ्यात गुडघाभर घाणेरड्या पाण्यातून गर्लफ्रेंडला बाइक वर मागे बसवून ड्राइव्ह करणे ही तुमची रोमॅंटीझम ची अल्टीमेट आयडीया असते.

    २३) ड्राइव्ह करतांना दहाव्या मिनिटाला तुम्ही इतरांना शिव्या देणे सुरु करता.

    २४) तुमच्या दृष्टीने मुंबई मधे आत शिरतांना ३० रु टोल टॅक्स हा योग्यच आहे

    २५)तुमच्या घरी पेपर वाला दर रवीवारी पेपर सोबत कमीत कमी ५ तरी निरनिराळे होम डीलिव्हरीचे मेन्यु टाकुन जातो, आणि तुमच्या कडे असे सांभाळून ठेवलेले कमीत कमी २० एक तरी होम डिलिव्हरी मेन्यु कार्ड्स असतात.

    २६) तुमच्या स्पिड डायल वर एक किराणा दुकानदार नक्कीच असतो.

    २७)तुम्ही राणीची बाग, तारापोरवाला मत्सालय, किंवा म्युझियम कधीतरी लहान असतांना एकदा पाहिलेले असते. नंतर तुम्ही या ठिकाणी कधीचे गेलेले नसता.

    २८) तुमच्याशी कोणी अनोळखी व्यक्ती चांगलं वागायला लागली की तुम्हाला त्याच्या वागणुकीबद्दल संशय वाटतो.

    २९) निरनिराळ्या भाषेतल्या शिव्या तुम्ही आधी शिकता, आणि त्या शिकल्या की त्यांचा मुबलक वापर केल्यावर आपल्याला ती भाषा येते असा तुमचा समज असतो. ( जसे गांडाभाई, बोकाचोदा वगैरे वगैरे)

    ३०) तुमच्या फ़्लॅटला एक नेहेमीचे दार आणि एक वॉच डोअर ( जाळीचे दार) नक्कीच असते. बाहेर जातांना तुम्ही मुख्य दाराला, एक लॅच लॉक, दुसरे कडी घालून लॉक आणि तिसरे लॉक जाळीच्या दाराला लावून आणि प्रत्येक कुलुपं तीनदा चेक करूनच तुम्ही बाहेर पडता.

    ३१) बार मधे गेल्यावर ५५ रुपयांच्या बिअर साठी तुम्ही २०० रुपये अगदी विना तक्रार देता , पण रिक्षावाल्याला एक रुपया पण जास्त देत नाही.

    ३२) सुटी म्हणजे ट्रेकींगला जायचा दिवस हे तुमचे स्पष्ट मत असते.

    ३३) भांडताना हिंदी भाषीय वरचढ व्हायला लागला की तुम्ही भैय्या म्हणून हिणवता, आणि मराठी मधे भांडण मुद्दाम कंटीन्यु करता.

    ३४) हिवाळ्यात जेंव्हा १२ डिग्री तापमान असते तेंव्हा तुम्ही कितना चिल्ड है म्हणून स्वेटर शोधायला लागता.

    ३५) खूप पाऊस पडला की तुम्ही सकाळी बातम्या लावून बसता, कुठे पाणी भरलंय का हे बघायला, म्हणजे ऑफिशीअली ऑफिसला दांडी मारण्याची सोय होते.

    ३६) तुमचे दररोजचे ४-५ तास ऑफिसला जाण्या – येण्यात खर्च होतात.

    ३७)डिओडोरंट हे तुमच्या साठी मस्ट असते.

    ३८) किती अंतर आहे हे तुम्ही मिनिटांमध्ये सांगता – किमी मध्ये नाही.

    ३९) टॅक्सी , ऑटॊ चे मीटर चुकीचे आहे म्हणून तुम्ही कमीत कमी आठवड्यात एकदा तरी त्यांच्याशी भांडता.

    ४०) लोकल मधे प्रवास करतांना गर्दी असेल तर तुम्ही जागा मिळवण्याचा प्रयत्न करता, पण जेंव्हा बसण्यासाठी जागा रिकामी असते, तेंव्हा मात्र लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करता.

    ४१) सुटीच्या दिवशी मित्र मैत्रिणी सोबत बाहेर जाऊन खाणे ही तुमचा अल्टीमेट एंजॉयमेंट!

    ४२) तुम्ही संध्याकाळी ५-३२ ला लोकलच्या ब्रिज वरून जात असतांना तुम्हाला ईंडीकेटर वर एखादी फास्ट लोकल १ मिनिटात येत आहे असे दिसले तर तुम्ही धावत जाऊन ती लोकल पकडण्याचा प्रयत्न करता. त्या लोकल नंतर दोनच मिनिटांनी दुसरी लोकल आहे हे माहिती असून सुद्धा!

    ४३) कोणाला भेटण्याची जागा म्हणजे रेल्वे स्टेशन वरच्या प्लॅटफॉर्म वरच्या इंडिकेटर खाली ही जागा असते.

    ४४) कुठे टाऊन साईडला जायचे असल्यास तुम्ही घरी कार असूनही शक्यतो लोकल ने प्रवास करता.

    ४५) स्वतःच्याच बायकोला ऑफिस सुटल्यावर बाहेर भेटायला बोलावता, आणि डेट ला घेऊन जाता :)

    ४६) पुणेकर विरुद्ध मुंबईकर हा तुमचा आवडीचा डिस्कशनचा विषय असतो.

    ४७) तुम्ही कुठेही गेलात तरी आपण होऊन कोणी न सांगता पण रांगेत उभे रहाता .

    ४८) तुम्ही कितीही गर्दी असलेल्या लोकल मधून उतरला तरीही तुमच्या बुटांचे पॉलिश खराब झालेले नसते.

    ४९) प्रभादेवीचा सिद्धिविनायक म्हणजे तुमचं ‘आराध्य दैवत’

    ५०) गणेशोत्सवात एकदा तरी लालबागला रांगेत उभे राहाता.

    ५१) तुमच्यासाठी बांद्रा रेक्लेमेनशन, मरीन ड्राईवच्या समुद्र किनाऱ्यापुढे हवाई आणि होनुलुलु ही ‘झक’ मारतं.

    ५२) मुंबईचा पाऊस + टपरी वरची चहा + चेतानाकडी (सिगरेट) = अल्टीमेट कॉम्बिनेशन !

    ५३) दर पावसाळ्यात तुम्ही एकदा तरी माळशेजला जाता आणि दर उन्हाळ्यात एकदा तरी अलिबागला!

    ५४) नवरात्रात दांडिया खेळताना कितीही बोटं मोडली तरि तुम्ही दरवर्षी नचुकता दांडिया खेळायला जाता

    ५५) FM radio is your best Entertainment in Traffic

    ५६) दक्षिणेकडे रहाणारे सगळे ( कर्नाटकी , तामीळ तेलगू ) हे तुमच्या मते “मद्रासी” असतात/

    ५७)रिक्षावाल्याला “ए रिक्षा” म्हणणे

    ५८)वयस्कर taxi वाल्याला “अंधेरी जायेगा?” असं एकेरी विचारणे आणि त्याने देखील वाईट वाटून न घेता सरळ “नही” असं निर्विकारपणे सांगणे हे देखील मुंबईतच.

    ५९)आपल्या गावी गेल्यावर “आमच्या बॉम्बेला ” हि तर चाकरमान्यांची हमखास सुरुवात!

    ६०)आपल्या गावी गेल्यावर सगळे लोकं कसे संथ वागताहेत, कोणाला काहीच काम नाही का? अशा कॉमेंट्स करणे.

    ६१)स्त्रियांचे स्पेशल :- लोकल मधे क्लिपा, नेलपॉलिश वगैरे विकायला येणाऱ्याचा खजीना उचकटून पहाणे , आणि घरी गेल्यावर नवऱ्यापुढे खजीना रिता केल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी दाखवणे.

  • आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे नियोजनबध्द शेती

    शिक्षणास आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास उत्पादन आणि उत्पन्नात भरीव वाढ करता येऊ शकते याचे उत्तम उदाहरण जालना जिल्ह्यातील नंदापूर येथील रहिवासी दत्तात्रय भानुदास चव्हाण यांनी घालून दिले आहे. बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर श्री. चव्हाण यांनी फळबाग आणि भाजीपाला पदविका मिळविली. पदविका घेत असतानाच ते खरपुडी येथील कृषि विज्ञान केंद्राचे सदस्य झाले आणि कृषिविषयक माहिती घेऊ लागले.

  • राजा केळकर संग्रहालय

    पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील ‘राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय’ तेथील वैविध्यपूर्ण ऐतिहासिक वस्तूंमुळे पुण्याचेच नव्हे तर भारताचे भूषण ठरले आहे.

  • अबोध सोहनी

    काळीभोर मखमली मध्यरात्र पुढ्यात असावी, वातावरणात गोड शिरशिरी अंगावर उठवणारी थंडी असावी, समुद्राच्या पाण्यावर चंदेरी लहरी हेलकावे घेत असाव्यात आणि हातात असलेल्या ग्लासातील मद्यात चंद्र किरण शिरून, त्या मद्याची लज्जत अधिक मदिर व्हावी!! दूर अंतरावर क्षितिजाच्या परिघात कुठेच कसलीही हालचाल नसावी आणि त्यामुळे शांतता अबाधित असावी!! समुद्राच्या लाटा देखील, नेहमीचा खळखळ न करता, आत्ममग्न असल्याप्रमाणे वहात होत्या. पाण्यात, निळ्या रंगाबरोबर विलोभनीय काळा रंग देखील आपले अस्तित्व देखणेपणाने दर्शवत होता!! किंबहुना, पाण्यातील निळा आणि काळा रंगांचे मिश्रण, वरून ओतत असलेल्या चंद्राच्या किरणांत इतके एकजीव झाले होते की, रंगांना स्वत:चे वेगळे आयुष्य लाभावे,असा अपरिमित गोडवा, मनाला अधिक गोड करीत असावा!! महाभारतात, व्यासांनी द्रौपदीच्या सौंदर्याचे वर्णन करताना, "तिच्या अंगाला निळ्या कमळाचा सुगंध होता" अशी असामान्य प्रतिमा वापरली आहे, त्याच प्रतिमेची नेमकी आठवण, पाण्याचा निळा रंग बघताना व्हावी!! आणि कानावर दुरून कुठूनतरी आर्त "रिषभ" यावा आणि तो सूर नेमक्या सोहनी रागाची आठवण करून देणारा असावा, इतका तरल असावा!!
    आरती प्रभूंच्या ओळी या संदर्भात आठवल्या.
    "वाजून मेघ जातो घननिळासा विरून,
    सर्वत्र तो भरून गंभीर नाद आहे;
    बोलें अखेरचे तो: आलो इथे रिकामा,
    सप्रेम द्या निरोप बहरून जात आहे".
    एकाच वेळी प्रणयाची धुंद साद घालणारा, त्याचबरोबर प्रणयातील विरहाची प्रचीती देणारा, मृदुभाषी असा हा सोहनी राग. सोहनी राग असाच स्वप्नांच्या प्रदेशात हिंडवून आणणारा प्रणयोत्सुक राग आहे. कोमल रिषभाची आच घेऊन, तीव्र मध्यमाला स्पर्श करून, जेंव्हा शुद्ध धैवत स्वरावर स्थिरावतो, तेंव्हा प्रणयाचे एक सुंदर वर्तुळ पूर्ण झाल्यासारखे वाटते!! वास्तविक "मारवा थाट" मध्ये या रागाचे वर्गीकरण आहे आणि हा राग ऐकताना, कुठेतरी पुरिया आणि मारवा रागाची पुसटशी का होईना आठवण होते. आडव/षाडव जातीचा हा राग तसा मैफिलीत फारसा गायला जात नाही परंतु वादकांनी मात्र या रागावर मनापासून प्रेम केलेले आढळते. "पंचम" स्वर, आरोह आणि अवरोह सप्तकात वर्ज्य असला तरी या रागाची अवीट गोडी कुठेही रतिभर देखील कमी होत नाही. वास्तविक भारतीय रागसंगीतात, "षडज पंचम" भावाला अपरिमित महत्व आहे पण, इथे खुद्द "पंचम" स्वराला अजिबात स्थान नाही. वादी, संवादी स्वर - धैवत आणि गंधार हे असले तरी अखेर, परिणाम घडवतात ते कोमल रिषभ आणि तीव्र मध्यम,हेच स्वर. या रागातील खास स्वरसमूह झाल्यास, "सा नि ध ग म(तीव्र) ध ग म(तीव्र)" किंवा "सा नि ध नि ध ग म(तीव्र) ग म(तीव्र) ग रे(कोमल) सा" यांचा वेध घेणे, बहारीचे ठरेल.
    पंडित शिवकुमार शर्मा यांनी सादर केलेला राग सोहनी या रागाच्या संदर्भात ऐकणे हा एक अनिवर्चनीय अनुभव आहे. मुळात, लोक संगीतातील वाद्य परंतु त्याला शास्त्रीय संगीताची बैठक देऊन, मैफिलीत स्थान प्राप्त करून दिले, ते याच कलाकाराने. तसे बघायला गेल्यास, या वाद्याला काहीशा मर्यादा आहेत, म्हणजे या वाद्यातून अति खर्ज किंवा अति तार सप्तकाची ओळख करून घेता येणे कठीण जाते. खरे तर मंद्र आणि शुद्ध सप्तकात हे वाद्य खुलते. ऐकायला अतिशय गोड असल्याने, रसिकांच्या मनाची पकड लगेच घेतली जाते. वाद्यातील तारांच्या नादाला देखील काही मर्यादा असल्याने काही वेळा "मींड" काढणे अवघड जाते आणि विशेषत: द्रुत किंवा अति द्रुत लयीत सुरांचा सुटेपणा काहीसा अदृश्य स्वरूपात वावरतो. अर्थात, इथे मी सतार आणि सरोद ही वाद्ये ध्यानात घेऊन, ही विधाने केली आहेत.
    वरील सादरीकरणात, पंडितजींनी सुरवातीच्या आलापीमध्ये, या रागाची ओळख करून दिली आहे आणि ती जरा बारकाईने ऐकली म्हणजे लगेच समजून घेता येईल, मी वरती मारवा आणि पुरिया रागाच्या साद्धर्म्याशी सांगड घातली होती पण ती घालताना, फरक सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि तो फरक इथे प्रकर्षाने ऐकायला मिळतो. रागाचे स्वरूप पहिल्याच आलापीमध्ये स्पष्ट झाल्यामुळे, पुढील वादनात, रागाचा विस्तार कसा होणार आहे, याची कल्पना करणे अवघड जात नाही.
    हिंदी चित्रपट संगीतात, "मोगल-ए-आझम" या चित्रपटाचे अढळ स्थान आहे. प्रचंड आणि वैभवशाली मोगल राज्याची कल्पना करता येऊ शकेल, अशा भव्यतेची कल्पना देणारा चित्रपट. त्यालाच साजेशा अशा संगीत रचना, संगीतकार नौशाद यांनी तयार केल्या. त्यातलीच, उस्ताद बडे गुलाम अली खानसाहेबांनी अजरामर केलेली रचना, या रागाची सुंदर ओळख करून देते. वास्तविक पहाता, रूढार्थाने हे चित्रपट गीत नव्हे, लखनवी ढंगाची ठुमरी आहे पण चित्रपटात ती चपखल बसली आहे. दीपचंदी सारख्या अनघड तालात ही रचना आहे.
    "प्रेम जोगन बन के,
    सुंदर पिया ओर चले,
    प्रेम गगन बन के
    प्रेम जोगन बन के."
    ठुमरी गायन, हा खास बडे गुलाम अली साहेबांचा प्रांत. ठुमरीला किती लडिवाळ पद्धतीने रंगवता येते, याचा खानसाहेबांचे गायन, हा अप्रतिम वस्तुपाठ ठरावा. मुळात, ठुमरी म्हणजे शृंगाराचा मनोज्ञ आविष्कार आणि तो आविष्कार त्याच तितक्याच रंजकतेने, खानसाहेब सादर करतात. यांच्या गायनाबाबत बोलायचे झाल्यास, आलापचारी गुंतागुंतीची नाही, सगळ्या स्वरांना त्यांचे मूल्य प्रदान करत, ती आवाहक होत असे. तान मात्र गुंतागुंतीची असे. एक तान सरळ तर दुसरी तान जवळजवळ तिन्ही सप्तकात प्रवेश करीत असे. याचा परिणाम, गायली गेलेली ठुमरी वैविध्यतेने सादर होत असे.
    उपरीनिर्दिष्ट रचना, सरळ सरळ ठुमरी गायन आहे पण, चित्रपटातील गायन असल्याने, थोडक्यात स्वरिक मजकूर भरून काढलेला आहे. पहिल्याच आलापीत सोहनी राग सिद्ध होतो आणि त्याच अंगाने, पुढे या रचनेचा विस्तार होत रहातो. परिणाम असा झाला, चित्रपटातील प्रसंग अधिक गहिरा आणि उठावदार झाला. अर्थात, चित्रपटातील गाण्यांचे मूळ प्रयोजन हेच तर असते. रचना ऐकताना, प्रत्येक स्वर, लोचदार तान आणि एकूणच, गायनाची संपूर्ण अभिव्यक्ती भारून टाकणारी आहे.
    असेच एक सुंदर गाणे, "गृहस्थी" या चित्रपटात आहे. अगदी या रागाची ओळख म्हणून निर्देश करावे, असे हे गाणे - "जीवन ज्योत जले".
    "जीवन ज्योत जले,
    कौन जाने कब निकसे दिन और रात ढले;
    जीवन ज्योत जले."
    त्रितालात रचना बांधली आहे आणि संगीतकार रवी आहे. गाणे अतिशय श्रवणीय आहे पण गाण्याची चाल म्हणून स्वतंत्र विचार केला तर त्यात तसे फार गुंतागुंतीचे काही नाही. गाण्यात, गायकीच्या अंगाने ताना आहेत आणि त्याचाच वेगळा विचार करावा लागेल. आता यात असे आहे, राग आधाराला घेतल्यावर, रागाच्या अंगाने, ज्या सुरावटी बांधल्या जातात, त्यात बहुतेकवेळा "अंगभूत" ताना अंतर्भूत असतात, त्यासाठी रचनेत फारसा बदल करावा लागत नाही. रचना म्हणून, संगीतकाराने अगदी सरळसोट रचना बांधली आहे. गायकी म्हणून निश्चितरीत्या आशा भोसले, यांचे कर्तृत्व अधिक पुढे येते. कविता म्हणून देखील फार उच्च प्रतीचे काव्य नाही. चालीच्या "मीटर" मध्ये शब्द चपखल बसले आहेत. पहिल्या सुरापासून, आपल्याला यात "सोहनी" राग ऐकायला मिळतो पण, रागाचे स्वरूप बऱ्याच प्रमाणात पातळ ठेवले आहे.
    गायकी म्हणून विचार करताना काही वैशिष्ट्ये इथे मांडावी लागतील. रचनाकारांना हवासा वाटेल त्या प्रकारचा स्वन (टोन) घेऊन, त्यास सांगीत गुण प्रचुर प्रमाणात बहाल करण्यासाठी आवश्यक ते कौशल्य आणि लागणारी कल्पनाशक्ती या आवाजात भरपूर आहे प्रस्तुत रचना, रागाधारित असल्याने, स्वरांचा लगाव कसा असावा आणि त्यातून, नेमकी गायकी कशी सादर केली जाईल, हा विचार ही रचना गाताना, स्पष्टपणे दिसून येतो. थोडक्यात मूल्यमापन करायचे झाल्यास, कंठसंगीतातील ध्वनीपरिणामांच्या शब्दावलीत भर टाकून, या आवाजाने चित्रपटीय आणि सांगीत शक्यतांची नवी परिमाणे एकत्र करण्यात लक्षणीय आणि ठाम पाउल पुढे टाकले. वास्तविक वरील रचना, "बंदिश" सहज होऊ शकली असती पण या गायिकेने तो धोका टाळला आणि सुगम संगीताच्या सीमारेषा आणि त्याचा परीघ, अधिक विस्तारित केला आणि हे योगदान, केवळ अतुलनीय, असेच म्हणावे लागेल. चित्रपट गीत गाताना, त्यात किती प्रमाणात नाट्यमयता आणायची, याबाबत या आवाजाने आदीनमुना पेश केला आहे आणि जसे लता मंगेशकर, यांच्याबाबत ठामपणे विधान करता येईल, त्याच विचारात आणखी पुढे जाउन, आशा भोसले यांनी स्वत:च्या गायकीचे स्वतंत्र "घराणे" निर्माण केले.
    "सुवर्ण सुंदरी" या चित्रपटात रागमाला धर्तीवर एक गाणे आहे - "कुहु कुहु बोले कोयलिया". वास्तविक या गाण्यात अनेक राग आहेत परंतु रागाचा "मुखडा" खास सोहनी रागाच्या वळणावर आहे.
    "कुहु कुहु बोले कोयलिया,
    कुंज-कुंज में भंवरे डोले;
    गुन-गुन बोले
    कुहु कुहु बोले कोयलिया".
    सगळे गाणे अतिशय द्रुत लयीत बांधले आहे आणि नेहमी वापरात असणारा त्रिताल योजलेला आहे. अर्थात गाणे मनावर लगेच गारुड घालते. संगीतकार आदी नारायण राव या दक्षिणात्य संगीतकाराने चाल बांधली आहे. या गाण्यातील, रफी आणि लताबाईंची "गायकी" विशेषत्वाने उठून दिसते. तसे बघितले तर रागांच्या अंगभूत सौंदर्यामुळे गाणे खुलते परंतु केवळ रचना म्हणून विचार केला तर सरळ सरळ रागाच्या चौकटीत गाणे तयार केले आहे, पण तरीही हे गाणे श्रवणीय वाटते.
    संगीत नाटक "कट्यार काळजात घुसली" मधील "सुरत पिया की छिन बिसराये" हे गाणे सोहनी रागाची आठवण करून देणारे आहे. तसे बघितले तर गाण्याची रचना पारंपारिक ठुमरी अंगावर बेतलेली आहे परंतु ठुमरी अंग घेऊन देखील, गाणे म्हणून ही रचना फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे. गायक म्हणून वसंतराव देशपांडे, यांची " खानसाहेबी" ढंगाची गायकी खुलून आलेली आहे. संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी, वसंतरावांच्या या गायकीचा, या गाण्यात बहारीने उपयोग करून घेतला आहे.
    -- अनिल गोविलकर

  • श्रीं’चे सदगुण

    अनंतचतुर्दशी मावळली. घरोघरीच्या गजाननाच्या मातीच्या मूर्ती आता विसर्जित झाल्या आहेत. हळूहळू वातावरणातला जल्लोष मावळेल. परततानाची रिकामी तबकं पाहून डोळे किंचित भरून येतील. दरवर्षी हे सारं असंच होतं.