नागपूर शहरात मध्यवर्ती असलेले सिताबर्डी नावाच्या टेकडीवरचे हे मंदिर. साधेच परंतु ऐसपैस असे आहे.
October 25, 2012
अरे नखशिखांत भ्रष्टाचारात बरबटलेल्या निर्लज्ज राजकारण्यांनो,
नका उगाच आमच्यासाठी इतकं भांडण्याचं नाटक करू.
आम्ही मंदिराच्या लायनीत उभे होतो तेंव्हा तुम्ही आम्हाला उन्हां-तान्हांत थांबवून देवदर्शनाला जात होतात....
आम्ही जेव्हा मतदानाला रांगेत होतो तेंव्हाही तुम्ही बोटांचा V करून आम्हाला ओलांडून जात होतात...
कधी रेशनच्या लायनीत तुमचे हुजरे तुमचा जयजयकार करत आम्हाला डावलून पुढे जायचे नि आम्ही तसेच तासन् तास तिष्ठत उभे राहायचो लायनीत..
कधी रेल्वे तिकिटासाठी....
कधी बोर्डिंग पास साठी....
कधी बादली भर पाण्यासाठी...
कधी पोरांच्या दाखल्यासाठी...
कधी शेतमालाच्या पैश्यांसाठी...
कधी हक्काच्या वेठबिगारीसाठी..
कधी पेन्शन साठी तर कधी गॅस सिलेंडर साठी...
आम्ही नेहमीच लायनीत होतो बेशरम भ्रष्टाचार्यांनो...
नाईलाजाने उभे होतो...
हतबल होऊन उभे होतो...
दुःखी होऊन उभे होतो...
कष्टात उभे होतो....
पण इतक्या वर्षांत कधीच आम्ही तुम्हाला दिसलोही नाही आणि कधी आमच्या त्रासाचा तुम्हाला कळवळा ही आला नाही.
आज मात्र आम्ही आनंदाने लायनीत उभे आहोत...
आमच्याबरोबर आमचा देशही बदलायला उभा आहे...
तर आता तुम्हाला इतका त्रास का होतोय??
नका आमची काळजी करू इतकी...स्वतःच्या कमरेखालचं एक-एक करत सुटत चाललयं, ते आधी सांभाळा
आम्ही सामान्य कष्टकरी माणसं आहोत. आम्हाला चलनातील बदलाचा कुठलाही त्रास होत नसून, कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी आमची काळजी करू नये आणि समजा झालीच काही अडचण तर ती आमच्या पातळीवर सोडवण्यास आम्ही भारतीय बंधु-भगिनी समर्थ आहोत
जय हिंद
December 2, 2016
भारतातील विशेषत: ग्रामीण भागातील रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होताना दिसतोय. या एका गोष्टीचे विविधांगी दुष्परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत आहेत. यामुळे एकूणच तिथल्या स्थानिक नागरिकाचे जीवनमानही खालावले आहे. पण या समस्येवर तंत्रज्ञान हा क्रांतीकारी उपाय ठरू शकतो.
November 11, 2010
संत आणि वारी यांचा वेध घेण्याचा केलेला छोटासा प्रयत्न…
June 30, 2013
जिथे जिथे सत्ता किंवा साधनसंपत्ती केंद्रीभूत होते तिथे तिथे गैरव्यवहाराला, भ्रष्टाचाराला, दडपशाहीला प्रचंड वाव मिळतो. मूठभरांची मत्ते*दारी निर्माण होते, ही वस्तुस्थिती आहे. या विषमतेतूनच पुढे असंतोष जन्माला येतो आणि क्रांतीची ठिणगी पडते.
January 28, 2007
नंदीबैलाचे खेळ करणे, भविष्य सांगणे यावर नंदीबैलवाल्यांची उपजिविका असते. नंदीबैलवाले मुळ आंध्रातले. ‘तिरूमल` हा त्यांचा मुळ देव. सरोदे, शिंदे, पवार, जाधव अशी नंदीबैलवाल्यांची आडनावे असतात. औरंगावबाद जिल्हातिल पैठण जवळी जेवूर हैबती हे नंदीबैलवाल्यांचे मुळ गाव.
August 22, 2010
राशी :- कन्या
स्वामी :- बुध
देवता :- पीताम्बर
जप मंत्र :- ॐ ह्री परमात्मने नमः
उपास्यदेव :- श्री कुबेर
रत्न :- पाचू
जन्माक्षर :- टो ट्रो प पा पृ प्रपि प्रि प्री पी पु पू ष ण ठ पे प्रे प्रो कन्या रास एक ज्योतिष-राशी आहे. राशीवर बुधाचाअंमल आहे. द्विस्वभाव, पृथ्वी तत्वाची ही रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे. मीन रास कन्या राशीचा विरोधी रास मानली जाते. उत्कृष्ट बुध्दीमत्ता संशोधक वृत्ती दिसून येते. वेळी कामाला येणारी अचाट स्मरणशक्ती आढळते. बुध्दीचातुर्य, हजरजबाबीपणा, हास्यविनोद याच्या जोरावर उत्कृष्ट लोकप्रियता मिळते. निरीक्षण हातोटी उत्तम. अंतर्मनाचा थांग लागू देत नाहीत. पैशाच्या बाबतीत काटेकोर, दूरचा विचार करणारी असतात. माणसाची उत्तम पारख असते.
November 28, 2016
कळत नकळत या मालिकेचे शीर्षक गीत
September 20, 2013
पहाटे पहाटे जहाज जेट्टी वर बांधत असताना इंजिनच्या मुव्हमेंट जाणवल्या होत्या. जहाज पुढे मागे करताना इंजिन चालू बंद होण्याचा आवाज आणि व्हायब्रेशन मुळे कितीही झोपेत असलो तरी जाग आल्याशिवाय राहात नाही . तसही रात्री लवकर झोपल्यामुळे सकाळी साडे पाच वाजता जाग आली होती.
November 30, 2019
काही माणसांमध्ये समोरच्या व्यक्तीचे अंतर्भूत् गूण ओळखण्याची एक विशेष दृष्टी असते. एकेकाळचा कॉमेडी किंग मेहमूद याच्याकडे ती दृष्टी होती. बरं नुसती दृष्टी असूनही भागत नाही त्या गुणानां संधी कशी व केंव्हा देता येईल याचाही ते विचार करतात. आज चित्रपटसृष्टीतल्या ज्या दिग्गजानांवर आपण मनापासून प्रेम करतो त्यात अमिताभ, आर.डी.बर्मन व राजेश रोशन यांचाही समावेश आहे. आणि या तिघानांही मेहमूदने मूख्य संधी दिली आणि या तिघानाही आपला अमीट ठसा उमटविला. आर.डी. बमर्न खरं तर खूप मोठ्या संगीतकाराचा मुलगा. वडील एस.डी.बमर्नची अनेक गाणी खरं तर स्वत: आरडीने कंपोज केली आहेत. मनात आणले असते तर त्यांनी कोणत्याही चित्रपट निर्मात्याकडे शब्द टाकून आरडीच्या कारकिर्दीची वाट मोकळी केली असती पण ‘स्वत:च्या कर्तृत्वावर काय हवे ते करा’ असं मानणाऱ्या लोकांचा तो काळ असल्यामुळे सचीनदांनी शब्द टाकला नसावा.
मेहमूद हा फक्त एक कॉमेडियनच नाही तर निर्माता-दिग्दर्शक होता. स्ट्रगल करणाऱ्या कलावंताचे कलागूण हेरणारा मोठ्या मनाचा माणूसही होता. त्याने आरडीतले टॅलेंट बरोबर ओळखले. १९६१मध्ये मेहमूदने ‘छोटे नवाब’ नावाचा चित्रपट काढला व त्यात आरडी ला पहिली संधी दिली. यात विविध मूडची ९ गाणी होती. मॉर्डन डान्स, विरह गीत, कॉमेडी गीत, कव्वाली, कब्बडी खेळावरील गीत पैकी अशा सर्व प्रकारची गाणी त्यात होती. पैकी “घर आजा घीर आए….” हे लताचे अप्रतिम क्लासिकल ढंगाचे गाणे आजही ओठावर सहज येते. या चित्रपटा पासून या दोघांच्या मैत्रीस सुरूवात झाली जी शेवट पर्यंत टिकली. पूढे आर.डी. बर्मनने चित्रपटसृष्टीत आपल्या आगळ्या रंगाने व ढंगाने चित्रपट संगीतात धूमाकूळ घतला. गमंत म्हणजे याच आरडीच्या बासू देव चक्रवर्ती व मनोहारी सिंग( बासू मनोहारी) या सहाय्यकानां मेहमूदने आपल्या ‘सबसे बडा रूपैय्या’ या चित्रपटात स्वतंत्र संधी दिली.( आठवा… ना बिबी ना बच्चा, ना बाप बडा ना मैया..द होल थिंग)
१९६१ ला सुरू झालेला हा संगीतमय प्रवास १९९४ ला संपला. ३०० च्या आसपास गाणी देणारे आर.डी बर्मन चिऋपटसृष्टीत पचंम या नावाने ओळखले जात. संगीतातल्या सात सुरात सा आणि प हे दोन स्वर शुद्ध मानले जातात तर बाकीचे पाच स्वर दोन प्रकारात गणले जातात तीव्र आणि कोमल. संगीतातला प अर्थात पचंम ही आरडी ओळख ठरली. लहानपणी त्यानां टुबलू या नावाने सर्व हाक मारीत. वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी त्यांनी एका गाण्याला चाल लावली ज्याचा पूढे सचिनदानी फंटूश या चित्रपटात वापर केला….”ये मेरी टोपी पलटके आ” हे ते गाणे. तसेच प्यासा ममधील “सर जो तेरा चकराये” याची चाल पण त्यानीच बांधली होती. परदेशी वाद्यां इतकाच देशी वाद्यांचा अप्रतिम वापर पचंम दा करीत असत. पूढे ते, आशाताई, किशोर व गुलजार यानीं चित्रपटसृष्टीला अप्रतिम गाणी दिली………………‘घर आजा घिर आई बदरिया सावरिया’ (छोटे नवाब- लता) मुजरा शैली व सेमी क्लासिकल असलेले हे गाणे मेलडीचेउत्तम उदाहरण आहे……….. ‘दइया ये मैं कहां आ फंसी’ (कारवां-लता) यात हास्य निर्मितीसाठी ऑर्केस्ट्राचा उत्तम वापर केला आहे……….’चुनरी संभाल गोरी’ (बहारों के सपने- मन्नडे व लता) पाश्चीमात्य संगीताचा छाप म्हणून ओळखले जाणाऱ्या पंचमदानी या गाण्यात अस्सल बिहारी मातीचा दरवळ दिलाय. यातील ताल वाद्यांचा मेळ ऐकण्या सारखा आहे…………’पल दो पल का साथ हमारा’(बर्नींग ट्रेन- रफी व आशा) साहिरची ही कव्वाली पचंमदानी केदार रागाचा मुलायम मुलामा देऊन किती सुंदर बांधली आहे…………….’अ आ इ ई मास्टर जी की आ गई चिट्ठी’ (किताब) या गाण्यात तर चक्क मुलांच्या डेस्कच्या ध्वनींचा वापर करून घेतला आहे……………….’मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है’ (इजाज़त- आशा भोसले) हे गाणे जेव्हा गुलजार यांनी पचंमदाकडे पाठवले तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया होती- ‘मला ही सामानाची यादी कशाला पाठवलीत. याला कशी चाल लावायची?’ पण गुलजार यानां माहित होते पचंमदाच याला चाल लावू शकतात आणि झालेही तसेच. या गाण्याने इतिहास रचला…………………………..’तेरे बिना ज़िंदगी से कोई शिकवा तो नहीं’ (आंधी- किशोर लता) यातील मधून मधून पेरलेले संजीव कुमारचे संवाद आणि लता किशोरचा आवाज म्हणजे पचंमदाच्या प्रतिभेचे सर्वोच्च शिखर…………’चांद मेरा दिल’ (हम किसी से कम नहीं)या गाण्यात पाच सहा छोटीछोटी गाणी होती. पाश्चिमात्य आणि भारतीय संगीताचा अनोखा मेळ म्हणजे हे गाणे……………’दम मारो दम’(हरे कृष्ण हरे रामा- आशा) या गाण्यातल्या सुरूवातीच्या गिटारच्या सुरांनी ७० च्या दशकातील पिढी पार वेडी झाली होती……………..’रैना बिती जाए’( अमर प्रेम- लता) हे गाणे जेव्हा मदन मोहन यांनी ऐकले तेव्हा त्यांनी सचिन देव बर्मन यानां फोन केला -‘’हे गाणे तुम्ही अप्रतिम रचले आहे,शुभेच्छा’’ म्हणाले. पण सचिनदा म्हणाले हे मी नाही पचंमने केले आहे तेव्हा मदन मोहन देखिल चकीत झाले………………………………बिती ना बिताई (परीचय- भूपेंद्र व लता)…………पचंमदाच्या गाण्याची यादी खूपच मोठी आहे…
रसिक प्रेक्षकातील प्रत्येकाला त्यांचे किमान एक तरी गाणे हे आवडतेच. ते स्वत: उत्कृष्ट हार्मोनिका व माऊथ ऑर्गन वाजवित असत. सामता प्रसाद या विख्यात तबलजी कडून तबला वादनाचे धडेही त्यांनी गिरवले होते.शोले मधील चल धन्नो अशी साद घालून वसंती जेव्हा टांगा पळवते तेव्हा तबल्याचे कडाडणारे बोल आठवा ते पचंमदानी वाजवले होते. तसेच शोले मधील गब्बर जेव्हा जेव्हा येतो त्यावेळचे पार्श्व संगीत आठवून बघा….काचेच्या ग्लासाने या ध्वनीची निर्मिती त्यांनी केली होती…..त्यांनी स्वत:च्या वेगळ्या आवाजाचा देखील छान वापर करून घेतला………चित्रपट विश्वातील अनेक गुणी कलावंत कमी वयात आपल्याला सोडून गेले. शुद्ध स्वराचे प्रतिक असलेला ‘पंचम’ सूर वयाच्या ५५ व्या वर्षी कोमल होऊन कायमचा विसावला.….
-दासू भगत (२७ जून २०१७)
June 27, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti