बायको : ऐकलंत का, आपली नवीन शेजारिन म्हणते की, तीला सेम आपल्या बंड्या सारखा मुलगा झाला पाहिजे ...
नवरा : हो का ? अगं घे की मग तीला रात्री आपल्या घरी बोलावून
सगळया रूम मध्ये एकदम "सन्नाटा"
ऐका ना मंग पुढं बी, जोक खास खाली आहे.
बायको : पण मग मी तीला पाटलांच्या घरी जायाला सांगीतलं.
बा@@@@प रे
आता तर "सन्नाटा" थांबाचं नावच नही घेउन राहिला.
बॉनसाय तयार करण्याच्या दोन मुख्य पायर्या आहेत. पहिली पायरी म्हणजे निवडलेले रोप बॉनसाय बनवण्यासाठी तयार करणे आणि दुसरी पायरी म्हणजे बॉनसाय बनवणे.
सचिनच्या आयुष्यातल्या ‘जरा हटके’ गोष्टी
हा विशाल समुद्र आहे
आणि हे माझे इवलेसे अश्रू.
मी या विशाल समुद्राकडे पाहतो
आणि कविता लिहीतो.
भारतातील कुठल्याही शहरातील कुठल्याही ट्राफिक सिग्नल जवळ दिसणारे चित्र हा देश किती मागासलेला आहे याचे एक उदाहरण आहे. दोन लेनचा रस्ता असो वा तीन लेनचा, सिग्नल जवळ त्याच्या सहा-सहा लेन कशा होतात. अत्यंत सुशिक्षित वाटणारे लोक जेव्हा आपल्या गाड्या लेनची शिस्त मोडून पुढे घुसवण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी डोक्याला हात लावावासा वाटतो.
न्यूयॉर्क सारख्या शहरात ४ जुलैला लाखो गाड्या फटाक्याची आतषबाजी पाहायला रस्त्यावर येतात. पण कुणीही लेन कटिंग, आपली गाडी पुढे दामटवण्याचा प्रयत्न करीत नाही हे मी अनुभवले आहे. त्या गाड्यांमध्ये भारतीयांच्या गाड्या सुद्धा असतात.
ज्या देशात सार्वजनिक ठिकाणी लोकांनी कसे वागायचे ह्याचे प्रशिक्षण देण्याची खूप गरज आहे त्या देशात स्मार्ट सिटी प्रकल्प आणणे हे पैशाचा अपव्यय करणारे ठरेल.
RTO, पोलिस आणि महापालिकेचा कारभार प्रथम सक्षम करा. सार्वजनिक ठिकाणी गैर वागणा-या व्यक्तीस मग ती कितीही मोठी असो, तत्काळ शिक्षा होण्यासाठी कायदे कडक करा. सिटी आपोआप स्मार्ट दिसेल !
नव्या मुंबईमधील रेल्वे स्टेशनला काय अवकळा आली आहे ते जाऊन पहा. सुरवातीला जेव्हा हि स्टेशन बांधली तेव्हा उर आभिमानाने भरून आला होता. परंतु आता मात्र स्टेशन आणि त्याच्या आसपासचा परिसर पाहून दुखः होते.
काळाच्या कसोटीवर आगरकर खरे ठरले हेच याच वरून सिद्ध होते. ठाणे महानगरपालिकेचे रस्ते एकदा रात्री ३- ४ वाजता जाऊन पहा. इतक्या सुंदर शहरात राहतोय याचे अप्रूप वाटेल. पण मग दिवसा या रस्त्यांना अवकळा कोण आणतो? आपणच ना?
जो पर्यंत लोकां मध्ये स्वयंशिस्त येत नाही तो पर्यंत सिटी स्मार्ट होणे शक्य नाही.
-- चिंतामणी कारखानीस
आज या महाराष्ट्र भूमीत रहाताना,मराठी भाषेतुन संवाद साधताना आनंद आणि अभिमानानी ऊर भरुन येतो,जेव्हा आपण ऐकतो की जगात मराठी भाषेचा क्रमांक पंधरावा आहे. हजारो वर्षापूर्वी सुरु झालेला तिचा प्रवास अगदी आज ही टिकून आहे.
माझ्या घराजवळच बरेच दिवस मोठ्या इमारतीचे बांधकाम चालले होते . तेथून जाताना मला रोज बांधकाम मजुरांची लहान मुले ऐकमेकांचा सदरा पकडून आगगाडीचा खेळ खेळताना दिसायची . दररोज कुणीतरी इंजिन बनायचे आणि बाकिची मुले डबे व्हायची .
इंजिन आणि डबे रोज बदलली जायची, पण, एक फक्त अर्धी निकर घातलेला मुलगा हातात रुमाल फिरवून गार्ड व्हायचा...
आज न राहवून मी थांबून त्या गार्ड होणाऱ्या मुलाला बोलावून विचारले , "बाळ तू रोज गार्ड होतोस ,तुला कधी इंजिन कधी डबा व्हायला आवडत नाही का?"
त्यावर तो मुलगा उत्तरला , "बाबूजी मला घालावयास सदरा नाही मग माझ्या मागे कोण येणार ?"म्हणून मी रोज गार्ड बनूनच खेळात भाग घेतो..
"हे बोलताना त्याच्या डोळ्यांत मला पाणी तरळल्याचे जाणवले.. त्या मुलाने आज जीवनाचा एक धडा शिकविला.
आपले जीवन हे कधीच परिपूर्ण नसते. त्यात काहि ना काहि कमतरता असणारच .तरीही आपल्याला जीवनाचा खेळ खेळावा लागणारच.
त्या मुलाला घालावयास सदरा नाही म्हणून आई बापावर रागावून रुसून रडत बसता आले असते, पण, तसे न करता आहे त्यात समाधान मानून तो खेळात सहभागी झाला व जीवनाच्या खेळाचा अंग बनून राहिला.
मित्रांनो चला आपल्यालाही आहे त्यात समाधानी राहून या जीवनाच्या खेळाचा अंग व्हायचे आहे .सतत हसत खेळत रहा व जीवनाच्या खेळाचा आनंद घ्या...
*Be positive and be happy*
पुर्वीचा प्रत्येक राजकारणी आपल्या पक्षाशी, त्या पक्षाच्या विचारांशी आणि तत्वाशी शक्यतो एकनिष्ठ असायचा पण आता तो कपडे बदलावे तसे पक्ष बदलतो आणि नोकरीचा राजिनामा द्यावा तसा पक्षाचा राजिनामा देतो. पुर्वी मतदारांचा एक विशिष्ठ वर्ग कोणत्या पक्षाशी एकनिष्ठ आहे आणि तो कोणत्या पक्षाला मतदान करेल याचे अचूक अंदाज बांधता यायचे आता तसे ते बांधणे शक्य न राहिल्यामुळेच राजकीय भविष्य खोटी ठरतात आणि राजकीय गणित मांडणार्यां चाही गोंधळ उडतो.
वाढत्या महागाईमुळे प्रपंच चालवणे हीच तारेवरची कसरत बनल्याने घरात लग्नकार्य निघताच खर्चाचा मोठा आकडा परिस्थिती आणखी बिकट करतो. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष देशमुख यांच्या ‘लोकमंगल प्रतिष्ठान’ तर्फे राबवण्यात येणार्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे महत्त्व नेमकेपणाने अधोरेखित होते. केवळ सामाजिक जाणिवेपोटी चालणारा हा आनंदसोहळा अनेकांच्या जीवनात प्रकाश फुलवत आहे. या निमित्ताने…
प्लेग असाच जीव घेणारा रोग. त्याने प्रचंड संखेने बळी घेतले. आता तो काबूत आलेला आहे. त्यारोगाचे भयानक तांडव, त्यानी उडवलेला हाःहाःकार प्रत्यक्ष बघण्याचा, अण्याण्याच्या दुर्दैवी काळातून आम्ही गेलो. आता विज्ञान प्रगतीमुळे सुदैवाने तो प्रसंग दुर्मिळ झाला आहे. परंतु आज देखील त्याची आठवण अंगावर शहारे आणतात.
Copyright © 2025 | Marathisrushti