(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गिरिजात्मक किर-किर (वात्रटिका)

    गिरिजात्मक किर-किर

    झोपडीत प्रतिभेचा स्पर्श नसतो

    गिरिजाताई किरकिरल्या आहेत.

    अध्यक्षीय लढाई अगोदरच

    उगीच वाकड्यात शिरल्या आहेत.

  • रहे ना रहे हम : रोशन

    रेडिओ सिलोन, विविध भारती व ऑल इंडिया रेडिओ या आकाशवाणी केंद्रानी आपल्या देशातील संगीताची विशेषत: चित्रपट संगीताची जेवढी भूक भागवली असेल तेवढी आजतागयत कोणत्याही रेडिओ केंद्राने भागवली असेल असे मला तरी वाटत नाही. एक संपूर्ण पिढी या संगीतावर पोसलेली आढळून येईल. मी तर धाडसाने असे म्हणेन की या संगीताने आमच्या काळातील पिढीला कधीही आत्महत्येचा विचार मनात येऊ दिला नाही. मन,मेंदू व हृदयावरील सर्व ताण दूर सारण्याची क्षमता या संगीतात होती व आहे. भारतीय संगीत, मग ते लोकसंगीत असो की शास्त्रीय संगीत असो की नाट्य वा चित्रपट संगीत आमची खूप मोठी मानसिक भूक आहे ही !!!! आता तर संगीत ग्लोबल झालेय, जगातील सर्व संगीताचा खजिना स्टिव्ह जॉब्ज नावाच्या अवलियाने आमच्या थेट घरी हातात दिला आहे. यातुन किती मोत्याचे दाणे वेचता येतील तेवढे वेचत रहा..असो….

    आताचे मला माहित नाही पण ५० ते ७० च्या दशकात मी सकाळी ७ ते ८ या वेळात न चूकता रेडिओ सिलोन एकत असे. सर्व जुनी गाणी आणि शेवटी के.एल. सैगलचे गाणे. सैगलचे गाणे लागले म्हणजे शंभर टक्के आठ वाजले….घडी बघायची गरज नाही. याच स्टेशनवर आठवड्यातून एक दिवस कव्वालीचां कार्यक्रम असे. आणि हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी एक धून वाजविली जाई. हा वाद्यमेळ इतका अप्रतिम की कानात दिवसभर रूंजी घालत असे. शालेय जीवनात जुने चित्रपट बघण्याच्या व्यसनाने माझा इतका ताबा घेतला आहे की आजतागायत मला दुसरे व्यसन लागलेच नाही. माझ्या शहरात मार्निंग वा मॅटनी शो मध्ये जुने चित्रपट दाखवले जात शिवाय या शोचा तिकीट दरही कमी असे. जुन्या चित्रपटाचे व्यसन लागण्याचे खरे कारण त्यातील गाणी हेच होते. अनेकदा चित्रपट खूपच भिकार असे पण गाणे सर्व पैसे वसूल करून देत. तर एकदा ‘बरसात की रात’ हा सिनेमा मॅटनीत लागला आणि मी “श्याम टॉकीज” कडे धूम पळालो. पाण्याच्या टाकी सारखीच सिनेमाची टाकी असते असा पूर्वी माझा समज होता. पण टॉकीज या शब्दाचा खरा अर्थ खूपच उशीरा समजला. मूळ इंग्रजी शब्द Talkie म्हणजे बोलणारा असा आहे. म्हणजे चित्रपट ज्या दिवशी पासून बोलू लागले तेव्हा पासून ते बोलपट झाले. ज्या हॉल मध्ये असे चित्रपट दाखवतात त्याला टॉकीज म्हणायचे.

    तर या चित्रपटाच्या क्लायमॅक्स मध्ये दोन कव्वालांच्या कव्वालीची स्पर्धा असते. ही कव्वाली सुरू होण्यापूर्वी एक सुंदर धून सुरू होते….धून ऐकली आणि मला अफाट आनंद झाला…..का? तर रेडिओवर जी धून कव्वाली कार्यक्रमाच्या आगोदर मी ऐकत असे ती समोरच्या चित्रपटात वाजत होती. यातील केवळ या एका कव्वालीने हा चित्रपट अजरामर झाला. चित्रपटात इतक्या दीर्घ लांबीची ही पहिलीच कव्वाली होती. “ना तो काँरवा की तलाश है”…….साहिरची गीत रचना तर मन्नाडे, रफी, आशा भोसले, कमल बारोट, सुधा मल्होत्रा,एस.डी.बातीश, बंदे हसन असे जादूई आवाज या कव्वालीत होते. चित्रपट संगीतातील मैलाचा दगड म्हणून आजही ही कव्वाली ओळखली जाते. या चित्रपटाच्या संगीताने ज्या संगीतकाराने आपले स्थान भक्कम केले ते म्हणजे रोशनलाल नागरथ अर्थात संगीतकार रोशन…..कव्वालीचे बादशहा म्हणून ते आजही ओळखले जातात. रोशन म्हणजे चमचमणारा….आपल्या संगीतमय तेजाने रोशनने अख्खी चित्रपटसृष्टी प्रकाशमय केली.

    १४ जुलै १९१७ हा त्यांचा जन्म दिवस… पंजाबातील गुजरनवाला गावातला जे आता पाकिस्तान मध्ये आहे. लहान वयातच रोशनजीने संगीत साधना सुरू केली होती. नंतर पूढच्या संगीत शिक्षणासाठी ते लखनौला आले. येथील आताचे पं. भातखंडे म्युझिक इनस्टिट्यूट जे पूर्वी मॅरीस कॉलेज होते त्याचे प्राचार्य पं. एस.एन. रतनजनकर होते जे रोशनचे पहिले संगीत गुरू. रोशन यांचे आवडते वाद्य म्हणजे ऐसराज किंवा दिलरूबा….अतिशय सुंदर वाजवायचे. या वाद्याच्या बळावरच १९४० च्या सुरूवातीला ऑल इंडिया रेडिओ दिल्लीचे कायर्क्रम निर्माते ख्वाजा खुर्शीद अन्वर यांनी सर्वप्रथम रोशन यांना स्टाफ आर्टीस्टची नोकरी दिली. प्रतिभावान कलावंताना त्यांच्यातील प्रतिभा एका जागी कधीच स्वस्थ बसू देत नाही. ते नेहमीच मोठी स्वप्ने पाहात असतात. मुंबई ही तर अशा सर्व स्वप्ने बघणाऱ्या कलावंताचे माहेरघरच !!!!! ख्वाजा खुर्शीद अन्वर आणि रोशन मग १९४८ मध्ये मुंबईला आले. वर्षभरांच्या प्रयत्ना नंतर किदार शर्मा यांनी रोशन यांना पहिला चित्रपट दिला “नेकी और बदी” किदार शर्मा त्यावेळी चित्रपटसृष्टीतले नावाजलेले दिग्दर्शक होते. त्यांच्या “निल कमल” या चित्रपटात राज कपूर यांना नायकाची पहिली संधी देखील त्यांनीच दिली. याच चित्रपटात अवघी १४ वर्षांची मधूबाला नायिकेच्या भूमिकेत होती. रोशनचा “नेकी और बदी” हा पहिला चित्रपट फ्लाप झाला. मग ते संगीत वादकाच्या भूमिकेतच संधीची वाट बघत राहिले. ही ‘संधी’ म्हणजे एक अजब रसायन असतं. ती प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येऊन आवाज देते पण खूपच हळू आवाजात. तो आवाज ज्याला ऐकता येतो तो त्या संधीचं सोनं करतो. रोशनजीला पूढच्याच वर्षी ही संधी आवाज देणार होती.

    १९५० मध्ये किदार शर्मा यांनी पून्हा रोशन यानां संधी दिली. पहिल्या चित्रपटात फारशी कामगिरी पार न पाडलेले रोशन यानां पुन्हा संधी दिली गेली कारण त्यांच्यातल्या प्रतिभेवर किदार शर्मा यांचा पूर्ण विश्वास होता. मोठ्या मनांची माणसे होती….चित्रपट होता “बावरे नैन” या चित्रपटाने मात्र रोशनजीचा संगीत सितारा चमकू लागला. या चित्रपटातले दरबारी कानडा रागात बांधलेले “तेरे दुनिया मे दिल लगता नही” हे मुकेशचे गाणे अफाट लोकप्रिय झाले. या गाण्याने मुकेशही गायक म्हणून सर्वत्र पोहचला तर राज कपूरचे नावही दुमदुमले. यातील तलत मेहमूदचे “खयालो मे किसी के..” हे गाणे पण तुफान लोकप्रिय झाले. ‘बडे आरमान से रखा है बलम’ हे “मल्हार” चित्रपटातले गाणेही धूम करून गेले., याच काळातील “नौबहार” चित्रपटातील ‘येरी मै तो प्रेम दिवानी मेरा दर्द ना जाने कोए’ या लताजीच्या गाण्याने रोशन क्लसिकल गाणे अत्यंत ताकदीने तयार करू शकतात यावरही शिक्कामोर्तब् झाले. एखादा कलावंत त्याच्या कला कतृत्वाने भले कितीही मोठा असू दे पण व्यक्तीगत माणूस म्हणून त्याच्यातील गूण समोर येऊ लागले की त्याची उंची अधिक मोठी होऊ लागते. त्या काळातील बहुतांशी कलावंतात हा गूण आढळत असे. म्हणून इतर नवख्या कलावंतानां ते आग्रहाने संधी देत. इंदीवर आणि आनंद बक्षी या दोन तरूणांना रोशनजीने प्रथम संधी दिली जे नंतर या चित्रपटसृष्टीतले नामवंत गीतकार झाले. १९५९ मध्ये आनंद बक्षीनां रोशनजीने पहिली संधी दिली तो चित्रपट होता “सीआयडी गर्ल” पण तो फारसा लक्षात घेण्याजोगा नव्हता मात्र या दोघांचा १९६६ मधला “देवर” हिट झाला.

    १९६०चे दशक मात्र रोशनजीने आपल्या कर्णमधूर संगीताने गाजवून सोडले. या काळातील त्यांचे प्रत्येक गाणे म्हणजे रत्नजडीत हारातील एकेक रत्नच होते…………निगाहे मिलाने को जी चाहता है (दिलही तो है), दुनिया करे सवाल तो हम (बहू बेगम), मन रे तू काहे ना धीर धरे (चित्रलेखा),पाँव छु लेने दो फुलोंके व जो वादा किया है (ताज महल), दिल जो न कह सका (भिगी रात), एरी आली पिया बिन (रागरंग), सारी सारी रात तेरी याद सताए (अजिबस शुक्रिया), लागा चुनरीमे दाग (दिलही तो है), रहे ना रहे हम महका करेंगे (ममता), स्वप्न झरे शूल से…काँरवा निकल गया गुबार देखते रहे (नयी उमर की नयी फसल), रहते थे कभी जिनके दिलमे (ममता), आप ने याद दिलाया तो मुझे याद आया (आरती), संसारसे भागे फिरते हो (चित्रलेखा), बहुत दिया देनेवाले ने तुझको आँचल ही न समाए तो क्या कीजे (सुरत और सिरत), छुपा लो यूँ दिल मे प्यार मेरा(ममता), फूल गेंदवा ना मारो सखी(दूज का चाँद), शराबी शराबी ये सावन का मौसम(नूर जहाँ), जिंदगी भर नही भूलेगी वह बरसात की रात(बरसात की रात),जो बात तुझमे है वो तस्वीर मे नही(ताज महल),हम इंतजार करेंगे कयामत तक(बहू बेगम), मिले ना फूल तो काँटो से, ओह रे ताल मिले नदी के जलमे(अनोखी रात),ऐ माँ तेरी सुरतसे अलग भगवान की सुरत क्या होगी(दादी माँ), बहारो ने मेरा चमन लूट कर (देवर)…………..ही यादी खूप मोठी आहे.

    रोशनजीचे सर्वात मोठे वैशिष्ठ्य म्हणजे वाद्यांचा कमी पण अत्यंत चपखल वापर. शंकर-जयकिशन वा लक्ष्मीकांत-प्यारेलाला सारखे ग्रेंजर त्यांच्या संगीतात नसे पण दोन अंतऱ्याच्या मधली जागा जी वाद्ये भरून काढत ती लाजबाब असत. त्यांनी लावलेल्या चाली इतक्या सुंदर असत की गायकांची संपूर्ण प्रतिभा पणाला लागत असे. ना तो कारवाँ की तलाश है… ही खूप मोठी कव्वाली. या कव्वालीत दोन भाग आहेत. रेडिओत कधी पहिला तर कधी दुसरा असे आलटून पालटून लावले जाई. दुसऱ्या भागापूर्वी (ये इश्क इश्क है इश्क….)रफीची एक अत्यंत सुरेल अप्रतिम तान आहे..तर शेवटी “ खाक को बुत और बुत को देवता करता है इश्क, इंतिहा ये है के बन्दे को खुदा करता है इश्क” या ओळी गातानां रफी इतका उंच पोहचतो की त्याला तोड नाही. साहिरने तर अख्ख्या प्रेमाचा इतिहासच यात रेखाटलाय. मात्र मला सगळ्यात मोठे आश्चर्य आणि वेदना आहे ती याची की या माणसाला जवळपास २० वर्षे हृदयाचा अत्यंत गंभीर त्रास होता आणि तरीही हा माणूस काळजात झिरपणारी गाणी तयार करत होता.!!!! हे बळ कुठून मिळते? संगीत ज्याचा श्वास असतो तोच हे करू जाणे. या हृदयाच्या आजाराने वयाच्या अवघ्या ५० व्या वर्षी रोशनवर अशी झडप घातली की गाणे समेवर येण्या आगोदरच संपविले.
    नवीन पिढी रोशनजी ना ओळखते ती राकेश रोशन व राजेश रोशन यांचे वडील आणि ऋतिक रोशन यांचे आजोबा म्हणून. नातवाला आजही रोशन या नावाची किती निकड आहे हे रोशनजीच्या कतृत्वा वरून दिसून येते. १९६८ सालाची गोष्ट आहे जेव्हा रोशन “अनोखी रात” या चित्रपटाचे संगीत तयार करीत होते. सर्व गाणी रेकॉर्ड झाली होती पण एक गाणे रेकॉर्ड व्हायचे बाकी होते. चाल तयार होती पण गाणे रेकॉर्ड होण्यापूर्वीच रोशन गेले. शेवटी त्यांच्या पत्नीने ही जबाबदारी स्वत:कडे घेतली. गायीका लताजीसह चित्रपटसृष्टीतले त्या काळचे असंख्य दिग्गज संगीतकार पण स्टुडिओत हजर झाले. लताजी माईक समोर उभ्या राहिल्या. डोळ्यात अश्रू, चेहऱ्यावर वेदना…… गाण्याची रेकॉर्डिंग सुरू झाली. गाणे संपले तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यांच्या कडा ओलसर झालेल्या. तिथे हजर असणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात या महान संगीतकारा बद्दलचे भाव स्पष्ट दिसत होते…..आजही तुम्ही जर “खुशी-खुशी कर दो विदा, तुम्हारी बेटी राज करेगी... “ हे गाणे ऐकाल तर मी खात्रीने सांगतो की तुमच्याही डोळ्यात तेच भाव असतील जे ४९ वर्षापूर्वी स्टुडिओत हजर असलेल्या सर्वांच्या डोळ्यात होते.

    दासू भगत (१४ जुलै २०१७)

  • वॉटरटाईट डोअर्स

    जहाजावर सगळ्या टाक्या किंवा जिथे जिथे बाहेर जाण्यासाठी दरवाजे असतात त्यांना वॉटर टाईट डोअर्स असे म्हणतात. वॉटर टाईट म्हणजे जहाज बुडाले तरी आत अकोमोडेशन किंवा एखद्या स्टोअर रूम मध्ये पाणी येऊ नये एवढे मजबूत दरवाजे असतात. मजबूत असल्याने ते खूप वजनदार आणि भारी भक्कम असतात. जहाज हेलकावत असताना हे दरवाजे अत्यंत काळजीपूर्वक उघडावे लागतात, वाऱ्यामुळे किंवा जहाजाच्या हेलकावण्यामुळे हे दरवाजे बंद होताना जोरात आदळले जातात. सेकंड मेट घरी जाण्याच्या तंद्रीत असल्याने अप्पर डेक मधून आत अकोमोडेशन मध्ये येताना त्याचे थोडेसे दुर्लक्ष झाले, एक पाय बाहेर असताना वॉटर टाईट डोर जहाज हेलकावल्या मुळे एवढ्या जोरात आदळले की सेकंड मेटला दरवाजावर नियंत्रण ठेवता आले नाही. दरवाजा आदळून बंद होत असताना त्याचा डावा पाय बाहेर होता आणि परिणामस्वरूप त्याच्या पायावर वॉटर टाईट डोअर एवढ्या जोरात आदळला की पायाचे हाड मोडल्याचा त्याला स्वतःलाच आवाज आला. त्याच्या तोंडातून जोरात किंकाळी निघाली ती ऐकून पायलट माघारी फिरला आणि त्याने सगळा प्रकार बघून ब्रिजवर कॅप्टनला वॉकी टॉकी वर कॉल करून ताबडतोब माहिती दिली.

  • काष्टा सोडून वैश्वदेव

    एका वाड्यातली गोष्ट.चार पिढ्या आधीची हं.नऊवारी सासू आणि नऊवारी सून असलेल्या काळातली.घरातभ पैपाव्हणे,द्विपदचतुष्पदसहितं असं म्हणताना खरोखर ते असायचे घरात त्या काळातली. घरात कुळधर्म
    कुळाचार अगदी जसंन् तसं पाळणारं घर ते,आणि पापभिरू सासवासुना!

    एका कुळाचाराच्या दिवशी सूनबाई देवाचे नैवेद्य वाढत होत्या केळीच्या पानावर.तेवढ्यात सासूबाईंची हाक आली आणि पाठोपाठ सूचना!'सूनबाई,मांजरीची पोरं टोपलीखाली झाक हो.आणि मगच नैवेद्य ठेव देवापुढे'

    सूनबाई त्या काळातल्या होत्या.खालमानेने फक्त मान हलवून हो म्हणणार्या.दरवर्षी हीच सूचना!
    पुढे सूनबाई सासूबाई झाल्या.त्यांच्या सूनबाई घरी आल्या.कुळधर्म कुळाचार तेच होते.सासूबाईंनी छान तयार केलं होतं सूनबाईंना!त्याही सूचना द्यायच्या.'नैवेद्य देवापुढे ठेवण्याआधी मांजरीची पोरं टोपलीखाली झाक हो!'

    पुढे या सूनबाईंना पाचवारी सून आली.नोकरी करणारी.पण कुलाचार तेच होते.आणि सूचनापण तीच.सूनबाईसुद्धा ऐकायच्या.मांजरीची पोरं टोपलीखाली झाकायच्या नैवेद्य देवापुढे ठेवण्याआधी.

    आता तो वाडा पडला.तिथे मोठा टॉवर झाला.मंडळी ब्लॉकमधे रहायला गेली.घरातले द्विपद होते पण चतुष्पद नाहीसे झाले.आता काय करायचं!प्रश्न पडला!तोवर पाचवारी सूनबाई सासूबाई झाल्या होत्या आणि त्यांची पंजाबीड्रेस सूनबाईपण आली होती.कुळाचाराच्या दिवशी त्या हळूच म्हणाल्या,"माझ्या सासूबाई सांगत असत,मांजरीची पोरं टोपलीखाली झाकून मग नैवेद्य दाखवायचा.आता गं?मांजरच नाही तर पोरं कुठली आणायची झाकायला.काहीतरी बाई पूर्वजांच्या पद्धती एकेक!'

    पंजाबी सूनबाई हुशार!ती म्हणाली ,"आहो सासूबाई,काळजी कशाला करता?आहे ना आपली ट्रेडिशन मग करूया की आपण.तुळशीबाग कशाला आहे मग!"

    सूनबाई तुळशीबागेत जाऊन चिनीमातीची मांजरं आणि छानशी डेकोरेटेड टोपली घेऊन आल्या.आणि टोपलीखाली चिनीमातीची मांजरं झाकून ट्रेडिशनली नैवेद्य दाखवायला लागल्या!

    संपली गोष्ट!
    आता आपण विचार करूया.वाड्यात रहाणारी मांजर,दारातली कुत्री ही घरातले सदस्य होते तेव्हा.मांजरीची पोरं नैवेद्याच्या ताटात लडबडायला येणार हे नक्की. म्हणून आधी ती टोपलीखाली झाकायची आणि मग पान देवापुढे ठेवायचं!आता हेतू लक्षात घेतलाच नाही नुसती मान डोलवली!मग पुढे त्यातला हेतू लोप पावून त्याची रूढी झाली!अशा पडतात रूढी!पूर्वजांचे हेतू नीट समजून न घेता आचरले की!

    म्हणून आपण जी परंपरा जपतो तिचा हेतू,अर्थ लक्षात घेऊन भावपूर्णतेने ,आर्थपूर्णतेने आचरली की काही झुगारावं लागणार नाही इतकी छान आहे आपली संस्कृती!

  • रत्नागिरीचा ऐतिहासिक ठेवा

    रत्नागिरी जिल्ह्याची भटकंती इतिहासप्रेमींसाठी पर्वणीच असते. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमधून हिंडतांना इतिहासातील अनेक प्रसंग डोळ्यासमोर तरळतात…छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तुत्व आणि स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या मावळ्यांचा पराक्रम आठवतो…त्याचबरोबर अनेक गडकिल्ले आणि ऐतिहासिक वास्तूंना भेट देतांना स्थापत्यकलेचे अद्भूत नमुने न्याहाळता येतात. दापोली परिसरात फिरतांना कोकणचे अस्सल सौंदर्यही डोळ्यास पडते. म्हणूनच पर्यटकांचा या परिसराकडे जास्त ओढा असतो.

  • आर्थिक तुट कमी करणार्‍या सोनेरी कडा !

    लग्नसराई आणि इतर कारणांसाठी देशांतर्गत सोन्याची मागणी दिवसागणिक वाढत असल्याने देशाला सोन्याची आयात जास्त करावी लागत आहे. सध्या देशात पैशाची गुंतवणूक करण्यासाठी अनेक प्रकारच्या बचत योजना असतांना सोन्यामधील गुंतवणूक सध्या सुरक्षित आणि फायदेशीर असल्याचे जाणवल्याने नागरिकांनी पहिली आणि मोठी पसंती सोन्याचांदीला दिली आहे.

  • बॉम्बस्फोट आणि राजकारण

    १३ जुलै २०११ रोजी सायंकाळी मुंबईत ३ ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटाने, मुंबई सुरक्षित आहे हे राज्य सरकारने वेळोवेळी केलेले दावे फोल ठरवले आहेत. आणि मुंबईकर आजही असुरक्षित आहेत हे पुन्हा एकवार अधोरेखित झाले आहे.

    बॉम्बस्फोट करण्यासाठी लागणारी स्फोटके आणि इतर साधनसामग्री मुंबईची सुरक्षाव्यवस्था भेदून अतिरेकी पार आतपर्यंत घेऊन येऊ शकतात ही एकच गोष्ट सुरक्षाव्यवस्थेचे धिंडवडे काढण्यास पुरेशी आहे. त्यामुळे सरकारच्या कोणत्याही दाव्यावर मुंबईकरांनी विसंबून रहाण्याचे कारण नाही.

  • बबुआ, जनता भारी है !

    काहीही न करता 15 वर्षे निवडून येण्याचा अनुभव लालूंच्या गाठीशी होता पण आपल्याला या जनतेनं कसं फसवलं याचं आश्चर्य त्यांच्या मनात मावेनासं झालं होतं. त्यातल्या त्यात आता घरी कसं जायचं याची चिंता त्यांना सतावत होती. कारण राबडीदेवींना दोन ठिकाणी उभं करून एकाही ठिकाणाहून निवडून आणू न शकल्याने घरात स्वागत कसं होतंय याची त्यांना काळजी लागून राहिली होती !

  • भारतमातेच्या वीरांगना – ४८ – गुलाब कौर

    स्वातंत्र्य संग्रामातील विषय, कामाचा आढावा सामान्य जनतेपर्यंत पोचवायची एकच पद्धत त्याकाळात उपलब्ध होती, ती म्हणजे पत्रक, वृत्तपत्र इत्यादी. गुलाब कौर ह्यांनी पत्रकारकेची भूमिका घेतली आणि त्यायोगे, घरा-घरातुन स्वातंत्र्य संग्रामशी जोडलेले साहित्य पोहचवू लागल्या. लोकांमध्ये स्वातंत्र्य संग्रामाबद्दल जन जागृती करणे हे त्यांचे मुख्य कामच झाले जणू. एक पत्रकार म्हंटल की थोडी सहूलत पण मिळत असेल बहुदा म्हणून मग त्यांनी आपल्या शबनम बॅग मधून क्रांतीकारकांसाठी दारुगोळा, पिस्तुलं अशी ने आण सुरू केली. एकूणच त्याचा समजात वावर बघता इंग्रजांना त्यांच्यावर शंका येऊ लागली. ते पण एखादा सुगावा / पुरावा मिळतो का ह्यासाठी त्यांच्यावर पाळत ठेवूनच होते. दैवदुर्विलास एकदा अश्याच गुलाब कौर क्रांतिकारी साहित्याच्या वाटप करायच्या उद्देशाने बाहेर पडल्या, ह्यावेळी त्यांना पिस्तुलं आणि काडतुस पोहचवायची होती, पण त्या सगळ्या मुद्देमाला सह पडकल्या गेल्या. इन्कलाब जिंदाबाद चा नारा परत एकदा पूर्ण आसमंतात घुमला.

  • शिक्षण आणि तुरुंग

    shikshan-ani-turung