बी रुजते, वाढते, त्याचे रोपटे होते, रोपट्याचा वटवृक्ष होतो. बी ला माहिती नसते तिच्या आत दडलेल्या वटवृक्षाच्या अस्तित्वाची. तिची सृष्टी वेगळी असते. पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक सजीवाची सृष्टी वेगळी, त्याची रचना वेगळी. मानवी विश्वात प्रत्येक माणुस स्वत:ची वेगळी सृष्टी बाळगुन असतो. आपल्याच विश्वात रममाण झालेला. त्याची दु:खे, त्याचे सुख याचे कारण आणि निराकारण तोच करू शकतो. जसा अवकाशाच्या सृष्टीला अंत नाही, तव्दतच मानवाच्या आत दडलेल्या सृष्टीला देखील अंत नाही. ती अनादी आहे, अनंत आहे. मानसिक पातळीवर तेथे ही अनेक उलथापालथी होत असतात, बदल घडत असतात, हे शतक धावपळीचे आहे, स्पर्धेचे आहे. स्पर्धा जशी स्वत:शी आहे, तशीच इतरांशी देखील आहे. स्पर्धेच्या या जगतामध्ये प्रत्येक सजीव आपापली सृष्टी सांभाळून आहे, हे विशेष…
घराच्या अंगणात खेळणाऱ्या बाल गोपाळांना पाहून त्यांच्या भावविश्वाची कल्पना मनाला स्पर्शुन गेली. बालपण म्हणजे निरागस, निरलता आणि निर्लेप मनाचे विश्व. सगळ्यांकडे एकाच नजरेने बघण्याची दृष्टी. कोणाची जात माहिती नाही, त्याचा वर्ण महत्वाचा नाही. बालपणाचे हे भावविश्व साधे-सरळ आणि सोपे. क्षणात रागवायचे, क्षणात हसायचे. ना राजकारण माहित, ना कुणाला खाली खेचण्याची स्पर्धा माहिती. खेळणारे सर्वच जिंकतात, सर्वच हरतात. खेळात जो राजा असतो, पुढच्या क्षणाला तोच चोर बनुन खेळतो देखील. बालमनाच्या विश्वात अनंत प्रश्न जन्म घेतात, अन विरुनही जातात...
इमारतीच बांधकाम सुरू होत. बाजुलाच रखवालदाराची झोपडी होती. त्याची चिल्ले-पिल्ले बांधकामाच्या ठिकाणी टाकलेल्या वाळूवर खेळतात, बागडतात, त्यांना खेळण्यांची गरज लागत नाही. रखवालदार इमाने इतबारे बांधकामावर पाणी मारत असतो. त्याची बायको चुल पेटवुन काहीतरी शिजवत असते. रखवालदाराच्या भावसृष्टीत ‘दिवस भर काम तरच रात्री भाकर’ असेच येत असेल ना? मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता त्याला सतावत नसेल का? चांगले घर असावे असे स्वप्न तो पाहत नसेल का? की त्याच्या जगण्या प्रमाणेच त्याची सृष्टी देखील उजाड झालेली असेल. स्वत:ची स्वप्ने तुडवत, परिस्थितीशी समझोता करत जगण्याची लक्तरे पांघरत, श्वासांचे येणे-जाणे सुरू असेल…
घरात भाड्यांचा आवाज मोठ्याने यायला लागला की समजायचे मालकीणीचे काहीतरी बिनसले आहे. तिच जग जिथे बहरते, सजते आणि खुलते ते म्हणजे स्वयंपाकघर. याठिकाणी ती स्वत:शी संवाद साधत असते. बोलत असते. घरातल्या सदस्यांच्या आवडी-निवडी राखत स्वत:ची आवड बाजुला सारत असते. तिचे विश्व म्हणजे तिचं घर, तिची मुले अन तिचा पती. या सगळ्यांच्या सुखातच तिचं सुख. तिच स्वत:च अस काय असत. मनातून मात्र तिलाही वाटत असत पहाटे उशीरा पर्यंत ताणून द्यावी. कुणीतरी चहा आणुन द्यावा. एखादा दिवस कामातून सुटी मिळावी. मनातलं सगळं ऐकुन घेणारं कुणीतरी हक्काच असावं. दिवसभर राबराब राबणाऱ्या शरीराला अन मनाला सुखाचे दोन शब्द बोलणारा कुणीतरी आपला असावा. तिच्या अंतरंगातलं तिचं विश्व बाजुला सारून ती जगत असते इतरांची स्वप्न पुर्ण करण्यासाठी…
जगण्याच्या रहाट गाड्यात धावतांना अनेक विश्व आपल्या अवती-भोवती फिरत असतात. जो-तो आपल्याच विश्वात मग्न आहे. कुणाला घराची चिंता, कुणाला मुलांची, कुणाला भविष्याची, कुणाला देशाची, कुणाला राजकारणाची.. कुणाला प्रमोशनची… चिंतेचा पसारा जसा वाढत जातो तशी व्यक्तीच्या भावविश्वाची व्याप्तीही वाढत जाते. व्यक्तीपरत्वे विश्व निर्माण होत, बहरत आणि उलगडत जात. या विश्वाच पुढे काय होत… हा प्रश्न छळायला लागतो…
महाभारतामध्ये अर्जुनाला गीता सांगतांना श्रीकृष्णाने म्हटलेच आहे, ‘या विश्वाचा निर्माता मीच आहे आणि संहार करणाराही मीच आहे. अवकाशात असलेल्या अनेक विश्वांची निर्मिती माझ्या पासुनच होते, आणि माझ्यातच ते विलीन होतात. जन्माला आलेला प्रत्येक सजीव त्याची – त्याची सृष्टी घेऊन जगतो, त्याचे विश्व तयार करतो, रंगवतो. ते विश्व घेऊनच तो माझ्यात विलीन होतो…’
दिनेश दीक्षित, जळगाव (९४०४९५५२४५)
आत्म्याच्या आनुवंशिक तत्व सिध्दांतानुसार, सजीवांच्या शरीरातील आनुवंशिक तत्व (जेनेटिक मटेरियल) हाच आत्मा असतो. त्यामुळे तो अणूरूपच आहे. या विश्वाची निर्मिती हे वास्तव आहे. या निर्मितीस जे काही कारणीभूत आहे तोच ईश्वर असे वैज्ञानिक मानतात. पण तो, अध्यात्मात वर्णन केल्यानुसार नाही असेही मानतात. कार्बन, हैड्रोजन, ऑक्सीजन, नायट्रोजन, कल़्शियम, फॉस्फोरस वगैरे सारख्या अचेतन मूलद्रव्यांपासून, सजीवांचे चेतनामय शरीर ज्या कारणामुळे निर्माण होते तो आत्मा असे वैज्ञानिक मानतात. आनुवंशिक तत्व हे आत्म्याचे वास्तव स्वरूप आहे.
जगातील अस्वच्छ शहरांच्या यादीत मुंबईचे नाव असल्याचे कोठेतरी माझ्या वाचनात आले आणि माझे मन बेचैन झाले.
पोटाला तडस लागेस्तो मटण खाऊन अंगावर आलेली एक कुंद पावसाळी रविवार दुपार. पेंगुळलेले डोळे आणि ‘हिंदी राष्ट्रभाषा समिती’ तर्फे घेण्यात येण्याऱ्या हिंदी परीक्षांच्या ( बालबोधिनी,पहिली, दुसरी, तिसरी, प्रबोध इत्यादी ) खास वर्गाचा बालमोहनच्या दुसऱ्या मजल्यावर चाललेला तास.
रात्री तापा साठी गोळ्या घेऊन झोपायला गेलेला स्टीवर्ड सकाळी कामावर आला नाही म्हणून कूक ने चीफ मेट शी बोलून एक ट्रेनी सी मन मदत करण्यासाठी मागून घेतला. चीफ मेट ने कॅप्टन च्या कानावर ही गोष्ट घातली. कॅप्टन ने स्टीवर्ड ला केबिन मध्ये फोन करून तब्येतीची विचारणा केली असता त्याने डोकं दुखतंय आणि मळमळते आहे असे सांगितले तसेच अंगावर लालसर पुरळ उठत असल्याचे सांगितले. कॅप्टन ने सेकंड मेट ला विचारून कोण कोणत्या गोळ्या दिल्या याबद्दल खात्री करून घेतली.
संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुख सहा अंगांपैकी ‘आंतरराष्ट्रीय न्यायालय’ हे “न्यायविषयक” अंग आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात (इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस-ICJ) प्रामुख्याने राष्ट्रांमधील वाद ऐकले जातात. आंतरराष्ट्रीय न्यायालय हा संयुक्त राष्ट्रांच्या व्यवस्थेचा एक भाग आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय ही स्वायत्त संस्था आहे. ती कधीही बरखास्त होत नाही.
माणसाकडे कोणतेही कार्य करण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती, चिकाटी, कोणत्याही परिस्थितीमध्ये मेहनत करण्याची तयारी असेल तर असाधारण आणि कठीण काम सुध्दा सोप्पी वाटू लागतात.खादी उद्योगाला नव्या शिखरावर नेऊन त्या उद्योगात सुरुवातीलाच भव्य यश मिळून देण्याची किमया वर्धा जिल्ह्यातील बळवंत ढगे या तरुणाने साधली आहे.
‘मैं ख़याल हूँ किसी और का … ’ ही गझल मेहदी हसन यांनी ( व इतर प्रसिद्ध गायकांनीही) गाइलेली व सलीम कौसर या पाकिस्तानी ग़ज़लगोनें (गझलकार) लिहिलेली आहे. (मेहदी हसन यांनी आपल्या गायनाच्या आधी या गझलगोचा उल्लेख केलेला आहे).
दामोदर सावरकरांनी शिवरायांसाठी लिहलेली ही आरती…….
गेल्या आठवड्यापासून मेली माझी दाढ दुखू लागली आणि आयुष्यात पहिल्यांदा मी दाताच्या डॉक्टरची पायरी चढले.
रिसेप्शनमध्ये बसले होते, तर सहज नजर डॉक्टरांच्या डिग-यांच्या सटिर्फिकेटांवर गेली. त्यांचं पूर्ण नाव वाचून मी तर गारच पडले.
नंदकिशोर प्रधान... म्हणजे आमच्या शाळेतल्या वर्गाचा हीरो. गोरा गोरा, उंचापुरा, कुरळ्या केसांचा राजबिंडा मुलगा.
आता खोटं कशाला सांगू, माझ्यासकट त्या वर्गातली प्रत्येक मुलगी मरत होती नंदूवर.
या वयात छातीची धडधड वाढलीच माझ्या...... आत गेले आणि नंदूला पाहून चाटच पडले.
डोक्यावरचे केस मागे हटले होते. लहानपणचे गोबरे गाल आता फुगून गोल गोल झाले होते. पोट सुटलं होतं. निळे डोळे चष्म्याआड झाकले गेले होते. तरीही त्याचा रूबाब कायम होता.
त्याने मात्र मला ओळखलं नव्हतं.
तपासणी झाल्यावर मीच त्याला विचारलं,
'लहानपणी तुम्ही आपटे प्रशालेत होतात का?
''हो.''
' दहावी कधी झालात? सिक्स्टी सिक्सला का?'
' अगदी बरोबर! पण, तुम्हाला कसं कळलं?'
''अहो, तुम्ही माझ्या वर्गात होतात.'' सांगताना मी चक्क लाजलेच......
तर
तो
टकल्या,
ढापण्या,
ढोल्या,
थेरडा नंद्या विचारतो कसा...
''कोणता विषय शिकवायचात तुम्ही मॅडम!!!''
-- WhatsApp वरुन
Copyright © 2025 | Marathisrushti