(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • मोठेपण

     

  • खरंच इतके महत्व द्यावे का?

    ज्या गोष्टींचे जगाला काहीच नवल वाटत नाही अशा गोष्टींना भारतात डोक्यावर घेतले जाते.
    इंग्रजी :-
    जगात कुठेही नसेल इतके महत्व भारतात इंग्रजी भाषेला दिले जाते? इंग्रजी बोलता येत नसेल तर तो अडाणी समजला जातो ... अरेरे !!!
    गोरेपणा :-
    गोरेपणाला भारतीय मुर्ख मंडळी एवढे भुललेत की या गोष्टीचा फायदा घेउन काही नामवंत कंपन्या गोरे बनवन्याच्या क्रिम तयार करुन दरवर्षी हजारो कोटी रुपये कमवतात !
    रिअॅलिटी शो :
    यात तर सगळं ठरवुन केलं जातं आणि भारतीय मुर्खासारखे खरं समजुन बघत बसतात !? त्यामुळे वास्तविक खरोखर असणारे कलाकार पडद्यामागेच राहतात हेच खुप मोठे दुर्दैव आहे !
    लग्नसमारंभ :
    बडेजाव आणि प्रतिष्ठा दाखवण्याचा सर्वात मोठा मार्ग.. काही मुलींच्या बापांना तर 25 वर्षे जीव लावलेल्या मुलीच्या विरहा पेक्षा दिखावा महत्वाचा वाटतो !
    इंजीनियरिंगची पदवी :
    ७० % मुलांच्या बापांना आपल्या मुलाने समाजसेवक, नामवंत खेळाडु, देशभक्त बनन्यापेक्षा इंजीनियरिंग पदवी मिळवुन श्रीमंत बनावं असेच वाटते.
    बाकीच्या क्षेत्रात नोकरी करणे काय पाप आहे का ??
    क्रिकेट :
    भारतात क्रिकेट हा खेळ नसुन धर्मच मानुन त्याची पुजा केली जाते ! लाखोंची सट्टेबाजी चालते ! भारतातील इतर अनेक खेळांना जगात डिमांड मिळते भारतात फक्त क्रिकेटच पाचवीला पुजलाय !
    सोने :
    जगात ज्या सोन्याचा सर्वांना कंटाळा येतो तेच सोने मिळवण्यासाठी भारतीय महिला जणु काय शपथच घेउन बैसल्यात ! त्याच सोन्याची भारतात जीवघेणी चोरी सुद्धा होते वा! काय छान दुर्दैव आहे !
    लोक काय म्हणतील ? :
    हे केले तर लोक काय म्हणतील... ते खाल्ले तर लोक काय म्हणतील... हे कपडे घातले तर लोक काय म्हणतील.... अरे काय चाललय ?? लोकांच्या म्हणण्याने चालाल तर मुर्ख बनाल ! आत्महत्या करणारे पण हाच विचार करतात लोक काय म्हणतील ?? मी तर यांना अर्धवटच म्हणतो
    बोर्डाची परिक्षा :
    जगात कुठे इतके महत्व दिले जात नाही येवढे भारतात बोर्डाच्या परिक्षेला महत्व दिले जाते ! किती तरी मुलं तर बोर्डाची परिक्षा ऐकुनच येवढे घाबरतात की ते परिक्षेला सुद्धा जात नाहीत.
    परदेशी ब्रँड :
    ज्या वस्तु परदेशात कचर्यात टाकुन दिल्या जातात त्या गोष्टी भारतात लाखों रुपये मोजून खरेदी केल्या जातात ! जे पदार्थ परदेशात जनावरांना खायला देतात तेच पदार्थ भारतात कधी कधी माणसांच्या नावावर खपवले जातात...
    कसले हे दुर्दैव !
    भारतातील ज्या इतिहासाचा जगात आदर्श घेतला जातो तोच इतिहास भारतात चुकीचा आणि खोटा सिद्ध केला जातो !
    कमाल आहे राव ?

  • भगवान श्री गौतम बुद्घ

    जीवनाच्या रगाड्यातून 

  • कॅाफीपुराण

    मी आणि आमच्या घरचे सर्वच चहावाले ! घरी कॅाफी व्हायची ती फक्त भजनी ग्रूप घरी येणार असेल तेव्हा!किंवा अजिबात कधीही चहा न प्यायलेले, “फक्त कॅाफीच” पिणारे पाहुणे घरी येणार असतील, तेव्हा!तेव्हाही शेजारच्या वाण्याकडून कॅाफी पावडर आणायची आणि साधी कॅाफी बनवायची!

  • माडगूळी डेज

    माझ्या कळतेपणापासून गेली जवळ जवळ पन्नास वर्षे माडगूळला जाण्याची कल्पना निघाली की सर्व प्रथम कोणत्या मार्गाने जायचे याची चर्चा घरात जवळ जवळ जाण्याच्या आदल्या दिवसापर्यंत चालायची. काहींचे मत पडायचे की कोरेगाव मार्गाने आटपाडीपर्यंत जावे, तर काहींचे कऱ्हा-वीटा मार्गाने! कुठलाही मोठा घाट नसलेल्या सोलापूर रोडने इंदापूर आणि तिथून अकलूज सांगोला मार्गे थेट माडगूळलाच जावे, तर काहींचे म्हणणे फलटण-म्हसवड मार्ग जवळचा असल्याने त्याच मार्गाने जावे असे असायचे. मला स्वत:ला मात्र कुर्डुवाडीवरून बार्शीलाईट रेल्वेने सांगोला आणि तेथून मोटारने माडगूळला जाणेच खूप आवडायचे.

  • मर्चंट नेव्ही रियालिटी

    मर्चंट नेव्ही मध्ये जहाजांवर कामं करणारे अधिकारी आणि खलाशी हे संपूर्ण जगभरात असंख्य देशात जात असतात. त्यामुळे जगभर पर्यटनाचा आनंद घेतात. जहाजावर भरपूर दारू प्यायला मिळते. अनेक देशात आणि अनेक बंदरात त्यांच्या मैत्रिणी असतात. एकूणच काय तर सगळ्यांना असे वाटते की मर्चंट नेव्ही मध्ये सगळे खूप एन्जॉय करत असतात.

  • वास्तुशास्त्र पेंटिंग – मृगशीर्ष नक्षत्र

    लेखांक ५

    मृगशीर्ष वा मृगशिरा वा मृग नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीवर चंद्राचा आणि चंद्र कलांचा कमी-कमी होत जाण्याचा अन वाढत वाढत जाण्याचा परिणाम हा होतोच होतो. राशिचक्रातील वृषभ आणि मिथुन राशीच्या व्यक्तींचा जन्म मृग नक्षत्रावर झालेला असतो. जलाशय, नदीकाठ, समुद्रकाठी या व्यक्तींचा उत्कर्ष होतो. शितल रंगाच्या चंद्रप्रकाशात या व्यक्तींनी रहावयास म्हणजे जास्तीत जास्त वेळ व्यतीत केला पाहिजे. चंदेरी रंग, रंग चक्रातील शीतरंग, पांढरा रंग हे सर्व रंग या व्यक्तींचे लाभ देणारे रंग होय.

    खैराचं म्हणजे काताचं झाड हे या नक्षत्राचं जवळचं असल्यामुळे या झाडाची पंचांगे म्हणजे मूळ-खोड-पान-फुलं आणि फळ तसेच या नक्षत्राचा स्वामी चंद्र किंवा सोम यांसह या नक्षत्राच्या मुहूर्तावर जन्मलेल्या व्यक्तींचा राशी, वृषभ आणि मिथुन यांपैकी जी ज्याची असेल तिचा आकारआणि ओम सोमाय नमः किंवा ओम चंद्रमसे नमः ही जपाक्षरे या सर्वांचं त्या व्यक्तीला प्रत्यक्ष पाहून, विशिष्ट चरणात म्हणजे चरण काळात बनविलेल्या त्या रंग आकारांच्या अचूक आणि सुचक रचनात्मक मांडणी द्वारा पेंटिंगला पूर्वाभिमुख दिशेला म्हणजेच पश्चिम दिशेला असलेल्या भिंतीवर सदर पेंटिंग लावले की, त्या व्यक्तीस आणि त्या वास्तूस अनेक सुखद अनुभव येऊ लागतात. यात काळजी काय घ्यायचीय? तर विशिष्ट वेळेला पेंटिंगमध्ये केलेल्या अर्थात उल्लेखिलेल्या स्वामींचा जप, जप सुरू असतानाच विशिष्ट दिशेला तोंड करूनच ते पेंटिंग चितारायला लागते.

    हे सर्व झाल्यानंतर राहुकाळ तपासून तो टाळून पेंटिंग दिलेल्या म्हणजे सुचविलेल्या भिंतीवरच्या जागी लावावे.

    या लेखात एक प्रतिकात्मक पेंटिंग दिलेले आहे. त्याचा आकार, त्या पेंटिंग मधील आकार यांना महत्त्व आहे. जप देखील कॅलिग्राफीच्या पद्धतीने चित्र घटक विषय म्हणून रंगविला आहे.

    बऱ्याचदा खैर वृक्षउपलब्ध झाला नाही तर अडुळसा शेवरी या वनस्पती वृक्षांचा पंचांगांसह पेंटिंगमध्ये उपयोग केला जातो. रंग, आकार, जपाक्षरे, आणि व्यक्तीनुरूप पेंटिंग मधील घटकांची रचना या चतुसूत्रींवर पेंटिंग त्या वास्तूशीअन वास्तुमधील व्यक्तींशी ते बोलू लागते.

    शुभं भवतु

    प्रा. गजानन शेपाळ

  • भारतमातेच्या वीरांगना – ३३ – लीला नाग रॉय

    आपल्या शिक्षणासाठी करावा लागलेला झगडा बघून त्यांना त्यांच्या कामासाठी क्षेत्र निवडणे सोपं झालं. त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी काम करायचे ठरवले आणि स्वतःला झोकून देऊन समाजसेवेचे हे व्रत हाती घेतले. नुसतेच पुस्तकी शिक्षण नाही तर शारिरिक शिक्षणावरही त्यांनी भर दिला. मुलींनी स्वतःच्या रक्षणार्थ इतरांवर अवलंबून राहणे त्यांना मान्य नव्हते. १९२१ सालच्या बंगाल मधील भीषण पुराच्या काळात, ढाका महिला मंडळ स्थापन करून, त्याच्या मार्फत नेताजींना भरपूर पैसा गोळा करून दिला.

  • पोस्ट ऑफिसचे मनोगत

    बऱ्याचवेळा पत्र पोस्ट करण्यासाठी पोस्टात जावे लागते किंवा कुरियरने पत्र किंवा टपाल पाठवावे लागते. पण या मागचा इतिहास माहीत नसतो आणि करून घेण्याची कोणी तसदी घेतही नाही. मग अश्यावेळी आठवते ती कविता रूपी पोस्टाचा इतिहास जो त्याने स्वत:च सांगितला आहे..!!

  • लग्न आणि विघ्न गूढ

    आज काकुंना एका नयनी आनंद व एका नयनात दुःख वाटत होतं. आपल्या मुलीच्या लग्नात पतीराजाची कमी त्यांना प्रकर्षाने जाणवत होती. पतीच्या जाण्याने न खचता मोठ्या धीरानी त्यांनी आपल्या मुलांना सांभाळले वाढवले. आज मातृ कर्तव्याबरोबरच पितृ कर्तव्यही त्या पार पाडीत होत्या.