तांदूळ, तीळ, खसखस, तुळशीचे बी यावर जलरंगाने रंगविलेले विविध आकारातील श्री गणेश
भारतात वस्तूंच्या किमतीवर भारत सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. तर सट्टेबाज काळाबाजार करणारे मोठे व्यापारी उद्योजक यांचे नियंत्रण आहे आणि पक्ष चालवण्यासाठी लागणारा प्रचंड काळा पैसा कांही सामान्य नागरिक किंवा शेतकरी देवू शकत नाही.
पुण्याच्या सारसबागेत पेशव्यांनी बाग वसवली. तलाव खोदून त्यात पाणी सोडले, मधोमध एक बेटवजा जागा ठेवून त्यात बाग फुलवली.
अश्विन शुक्ल प्रतिपदेला शारदीय नवरात्र, घट:स्थापना होते. नवरात्र म्हणजे ९ दिवस व ९ रात्र अशी समजूत आहे. काही वेळा आठ किंवा दहा दिवस येतात. त्यावेळी यावर चर्चा सुरु होते. यावर धर्मसिंधू ग्रंथात असे म्हटले आहे
संगीतामधे शब्दामधून अर्थ समजतात तर सुरांमधुन भावना प्रकट होतात. सुरांच्या अंगाने शब्द गुंफले तर शब्दाच्या अर्थछटा सुस्पष्ट सुरांच्या साथीने संगीत प्रगल्भ होते. तस्सच, फरसाणाच्या अर्थपूर्ण शब्दांमधे तर्रीच्या झणझणीत भावना जुळून आल्या की मग काय विच्चारता!
तिकीट खरेदी खरेदी करून २०६० पर्यंत जिवंत राहण्याची तरतूद केली का?
बायकांचा रोज मूड वेगळा असतो
-कधी जाम खुश असतात
- कधी चिडचिड करतात
- कधी सगळ्या जगाचा राग येतो
- कधी आपल्यावरच कसे कसे अत्याचार झाले हे आठवतं
- कधी रोमँटिक असतात
- कधी आवराआवरीचा मूड असतो
- कधी राहू दे पसारा , कोण बघतंय असं असतं
- कधी शॉपिंग करायचं असतं
- कधी घराबाहेर पण पडायचं नसतं
- कधी नवीन पदार्थ करायचा असतो
- कधी शिळं खायचं असतं
- कधी हे कधी ते ,रोज नवीन !!
--कधी त्या छान दिसतात , कधी त्यांना स्वतःलाच त्या आवडत नाहीत
बरेच husband लोक सकाळी उठलं कि आधी हवामानाचा अंदाज घेतात ," आज काय परिस्थिती आहे " तसे adjust व्हायला , म्हणजे काय 'कलह नको '
भाजी आणायची आहे ? --आणतो
लग्नाला जायचंय --झब्बा घालू ? --घालतो
असे बरेच ....
तर बायका अशा का वागतात ? पुरुष त्या मानाने रोज same असतात . काही फरक नाही .
तर बायका अशा का वागतात ?
स्त्रियांच्या शरीरात ४ वेगवेगळे female hormones असतात , Oestrogen , Progesterone , FSH आणि LH . तर त्या चारही हॉर्मोन्सचे प्रमाण रोज वेगवेगळे असते .
अधिक thyroid , BLSUGAR , त्या दिवशी केलेलं जेवण , दगदग असं सगळं मिळून त्यांची तब्येत ठरत असेल .
त्या मुळेच बायकांचे घराघरात मतभेद होत असतील . प्रत्येकीचI रोज मूड वेगळा असेल .
पण बायका अशा आहेत म्हणून तर रंग आहेत , रस , गंध , निर्मिती आहे . जीवनाला स्वाद आहे नाहीतर एकसुरी झालं असतं
-- अंकुश सावंत
“नाच रे मोरा” ह्या पुस्तकाद्वारे गदिमांच्या ५० वर्षांतील लिहिलेल्या विविध गीतप्रकारांचा खजिनाच आपल्याला उपलब्ध होत आहे.यात ‘चंदाराणी’,’शेपटीवाल्या प्राण्यांची’,’एक कोल्हा बहु भुकेला’,’चांदोबा चांदोबा भागलास का?’ यांसारखी बालगीते किंवा ‘जिंकू किंवा मरू’,’वंद्य वंदे मातरम्’ सारखी स्फूर्तीगीते, तसेच ‘नीज माझ्या पाडसा’ ‘बाळा जो जो रे’ यासारखी अंगाई गीते आकर्षक चित्रांसहित भेट म्हणून दिली आहेत. बालपणाच्या आठवणी जागवणारा आणि छोट्यांना त्यांचा बालपणीचा काळ सुखाचा करून तो चिरकाल लक्षात राहील असा हा गीतसंग्रह लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल.
२३ तारखेला सासवडजवळील एका गावात माझ्या कार्यक्रमासाठी पुण्यातून बाहेर पडताना टिळक स्मारक मंदिराकडे बघायचं नाही असं अगदी निक्षून मनाला बजावलं होतं. पण स्वारगेटच्या दिशेने जाताना टिळक स्मारकच्या प्रवेशद्वारासमोर ड्रायव्हरला एक क्षण गाडी थांबवायला सांगितलेच. अवघ्या काही तासांपूर्वीचा भरत नाट्य मंदिरातील सळसळता पदन्यास नाट्य परिषदेच्या कार्यालयासमोर निपचित पडलेला बघणं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडली गोष्ट होती. दुरूनच तिला हात जोडून श्रध्दांजली अर्पण केली आणि माझ्या पाणावलेल्या डोळ्यांसमोर चार वर्षांपूर्वीची घटना उभी राहिली. माझा नागपूरचा एक जुना मित्र पुण्यात एका चित्रपटाचं दिग्दर्शन करत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने कोसळला होता व काही सेकंदात सर्व काही संपलं होतं. आज तिचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी जिथे ठेवण्यात आला होता तिथेच चार वर्षांपूर्वी माझ्या मित्राच्या मृतदेहासमोर मी अश्रू ढाळत उभा होतो. त्यानंतर अनेक दिवस मी सैरभैर झालो होतो. आज पुन्हा तसं काही होऊ नये म्हणून मी अंत्यदर्शनापासून कटाक्षाने दूर राहिलो.
ती होती अश्विनी एकबोटे व तो होता संजय सूरकर.
-- श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
माझे नुकतेच लग्न झाले होते. मी मे महिन्याच्या अश्याच एका गरम दुपारी आपल्या वडिलांसोबत थंडगार पन्हे पीत बसलो होतो. मार्च मध्ये माझे लग्न झाले होते आणि माझ्या वडिलांनी माझ्यात झालेले बदल अनुभवले होते. मी मित्रांना टाळत होतो, भेटी कमी झाल्या होत्या. बायको सोबत गुलुगुलु बोलणे हा माझा आवडीचा विषय झाला होता. मित्रांना टाळून आम्ही सिनेमाला जात होतो.
पन्हे पितांना वडील म्हणाले, अरे मी सांगतो म्हणून ऐक, पण मित्रांना भेटत जा, त्यांना टाळू नकोस. जसे तुझे वय वाढेल तशी तुला मित्रांची जास्त गरज भासेल.
मला जरा गंमतच वाटली. माझ लग्न झाले होते आणि आम्ही दोघेही अडल्ट होतो, आम्ही परिवार सुरू करणार होतो आणि माझा परिवार माझी काळजी घेणार हे मला माहीत होते. पण तरीही मी वडिलांचा सल्ला मानला. आज लग्नाच्या अनेक वर्षांनंतर मला काही गोष्टी रियालाईझ झाल्या आहेत.
१.पैसे आले आणि गेले
२.खराब वेळ आली गेली
३.पिल्ले घरट्यातून उडून गेली
४.नोकरी गेली आणि परत मिळाली
५.भौतिक आकर्षणे कमी झाली
६.आप्त गेले
७.आयुष्याशी रॅट रेस संपली
८.धावायची इच्छा कमी झाली
सगळं बदललं पण खरे मित्र बदलले नाहीत. पश्या पश्याच राहिला, घोड्याचा कधी बिपिन झाला नाही, देशपांड्याचा कधी मिस्टर देशपांडे झाला नाही, सँडीचा संदीप झाला नाही, मोरेचा आशय झाला नाही, सुज्याचा सुजीत झाला नाही, आशुचा आशुतोष झाला नाही तर फांज्याचा गिरीश झाला नाही. नम्या नम्याच राहिला, नमीत झाला नाही. संजय नाव कधी आवड्ले नाही, संजूची गोडी नाही त्यात. मंगेश दादाच राहिला त्याच दुसरे रूप कधी दिसलेच नाही. आम्ही सगळे एकत्र धावलो, काही मागे राहिले तर काही रेस जिंकले पण मेडल पोडीयमवर आम्ही सगळेच होतो.
आईवडिल, भाऊ बहीण, लेकरं यांची काळजी तर घ्याच पण मित्रांना जपा. सच्चे मित्रच तुमचे असतात, कारण त्यांना " अबे तू ...............है " हे सांगायला कोणतेही दडपण नसते.
-- संकलन : अमित कुलकर्णी
मला आवडलेले फेसबुक आणि WhatsApp वरचे पोस्ट मी शेअर करत असतो.. बर्याचदा या पोस्टमध्ये लेखकाचे नाव नसते. जर कोणा लेखकाचे हे साहित्य असेल तर कृपया मला कळवावे म्हणजे मी नक्की त्यांचे नाव देईन. आपण ही माहिती मला त्या-त्या पोस्टच्या कॉमेंटमध्ये देऊ शकता.
Copyright © 2025 | Marathisrushti