एक गमतीदार परंतु मनोरंजक संत कथा वाचण्यांत आली. जीवनाचे खुपसे तत्वज्ञान कळले. सारे चिंतनीय होते. एका गावांत एक थोर संत रहात होते. तत्वज्ञानी …..
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या मुखपत्रांतून नेहमीच हिंदू राष्ट्र-स्थापनेचा पुरस्कार केला होता. त्यांचे हे विचार सत्यात आणून दाखवणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल !’
डॉ. जयंत आठवले
संस्थापक, ‘सनातन संस्था’
घडामोडी
२३८ - रोममध्ये प्रेटोरियन रक्षकांनी पुपियेनस आणि बाल्बिनस या दोन रोमन सम्राटांना त्यांच्या महालातून खेचून नेले. रस्त्यातून धिंड काढल्यावर त्यांचा वध केला गेला आणि १३ वर्षांच्या गॉर्डियन तिसर्याला सम्राटपदी बसवले गेले.
१६९२ : संताजी घोरपडे यांच्या कामगिरीवर खुश होऊन राजाराम महाराजांनी रामचंद्र नीलकंठच्या मार्फत त्यांना ‘मिरज’ ची देशमुखी दिली.
जन्म
१९२२ - बळवंत मोरेश्वर पुरंदरे, मराठी इतिहाससंशोधक, लेखक.
१९२५ - शिवराम दत्तात्रेय फडणीस, मराठी व्यंगचित्रकार.
१९५९ - संजय दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता.
मृत्यू
२००८ - इश्मीत सिंग सोधी, भारतीय पार्श्वगायक.
कित्येक वेळी आली आम्हास
भारतातील कुठल्याही शहरातील कुठल्याही ट्राफिक सिग्नल जवळ दिसणारे चित्र हा देश किती मागासलेला आहे याचे एक उदाहरण आहे. दोन लेनचा रस्ता असो वा तीन लेनचा, सिग्नल जवळ त्याच्या सहा-सहा लेन कशा होतात. अत्यंत सुशिक्षित वाटणारे लोक जेव्हा आपल्या गाड्या लेनची शिस्त मोडून पुढे घुसवण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी डोक्याला हात लावावासा वाटतो.
न्यूयॉर्क सारख्या शहरात ४ जुलैला लाखो गाड्या फटाक्याची आतषबाजी पाहायला रस्त्यावर येतात. पण कुणीही लेन कटिंग, आपली गाडी पुढे दामटवण्याचा प्रयत्न करीत नाही हे मी अनुभवले आहे. त्या गाड्यांमध्ये भारतीयांच्या गाड्या सुद्धा असतात.
ज्या देशात सार्वजनिक ठिकाणी लोकांनी कसे वागायचे ह्याचे प्रशिक्षण देण्याची खूप गरज आहे त्या देशात स्मार्ट सिटी प्रकल्प आणणे हे पैशाचा अपव्यय करणारे ठरेल.
RTO, पोलिस आणि महापालिकेचा कारभार प्रथम सक्षम करा. सार्वजनिक ठिकाणी गैर वागणा-या व्यक्तीस मग ती कितीही मोठी असो, तत्काळ शिक्षा होण्यासाठी कायदे कडक करा. सिटी आपोआप स्मार्ट दिसेल !
नव्या मुंबईमधील रेल्वे स्टेशनला काय अवकळा आली आहे ते जाऊन पहा. सुरवातीला जेव्हा हि स्टेशन बांधली तेव्हा उर आभिमानाने भरून आला होता. परंतु आता मात्र स्टेशन आणि त्याच्या आसपासचा परिसर पाहून दुखः होते.
काळाच्या कसोटीवर आगरकर खरे ठरले हेच याच वरून सिद्ध होते. ठाणे महानगरपालिकेचे रस्ते एकदा रात्री ३- ४ वाजता जाऊन पहा. इतक्या सुंदर शहरात राहतोय याचे अप्रूप वाटेल. पण मग दिवसा या रस्त्यांना अवकळा कोण आणतो? आपणच ना?
जो पर्यंत लोकां मध्ये स्वयंशिस्त येत नाही तो पर्यंत सिटी स्मार्ट होणे शक्य नाही.
-- चिंतामणी कारखानीस
हेल्मेटसक्ती करू नये असं म्हणणारे हेल्मेट वापरू नये असं कधीच म्हणत नाहीत. त्यामुळे हेल्मेटसक्ती ह्या विषयावर विचार करताना हेल्मेटचे फायदे तोटे ह्यापेक्षा सक्ती ह्या गोष्टीवर जरा जास्त गंभीरपणे विचार व्हावा. विशेषत: कल्याणकारी लोकशाही राज्यपद्धतीमधे कशाची सक्ती असावी आणि कशाची नसावी ह्याबाबत विचार व्हावा. हेल्मेटसारख्या गोष्टीची सक्ती करणं आणि ती पोलीस यंत्रणेमार्फत राबवणं हा लोकशाही सरकारनं केलेला मर्यादाभंग आहे. लोकशाही सरकारनं लोकांचं किती कल्याण करावं ह्या प्रश्नाची हेल्मेट ही मर्यादा आहे.
दिवाकर रावते म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी दुचाकी वाहनांच्या उत्पादकांवर / विक्रेत्यांवर प्रत्येक वाहनाबरोबर दोन हेल्मेट्स दिलीच (म्हणजे विकलीच) पाहिजेत अशी सक्ती जरूर करावी, जसे चार चाकी वाहनांमधे पट्टे असतात. कारण त्यांनी विकलेल्या वाहनामुळे ग्राहक डोके आपटून मरण्याची शक्यता आहे. म्हणजे ते दुसर्यांना धोका पोचेल अशी वस्तू विकत आहेत, म्हणून तिथे सरकारनं लक्ष घालणं आवश्यक आहे. पण ह्याच न्यायानं त्यांनी पोलिसांना मिळालेले कोणाही निरपराध व्यक्तीला गुन्हेगार ठरवण्याचे अधिकार काढून घेतले पाहिजेत, कारण हेल्मेट न वापरल्यानं कोणतीही व्यक्ती अन्य कोणालाही काहीच धोका निर्माण करीत नसते. त्यामुळे अशा बाबतीत सरकारनं लक्ष घालण्याचं कारणच नाही. हेल्मेटसक्ती हा केंद्राचा कायदा आहे त्यात राज्य सरकार काही करू शकत नाही हे जेमतेम अर्धसत्य आहे. राज्य सरकार त्यात नक्कीच बदल करू शकतं कारण मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी राज्यांच्या आखत्यारीतच आहे. वस्तुत: केंद्राच्या कायद्यालाच कोणा प्रबळ सामाजिक संस्थेनं आव्हान दिलं पाहिजे.
सरकारी यंत्रणेला हाताशी धरून "मार्केटिंग" करणं हा प्रकार जगभर सर्रास चालू आहे. वर्ल्ड हेल्थ ऑंर्गनायाझेशनच्या मदतीनं आभासी रोगांची आवई उठवून जगभर औषधं खपवली जात आहेत. सामान्य लोकांना फारसे उपयोगाचे नसलेले प्रचंड खर्चाचे मोठमोठे प्रकल्प विविध सरकारं हाती घेतच असतात. दिल्लीत खर्च मंजूर करून घेऊन गल्लीबोळात सीमेंट रस्ते होत आहेत, हे आपण पाहतोच आहोत. नशीब अजून कुठल्या औषधाची किंवा बुलेटप्रूफ जाकिटाची सक्ती नाही. रॉय किणीकर ह्यांच "इथे जगण्याची सक्ती आहे" नावाचं पुस्तकच आहे. ते हुकूमशाहीबद्दल आहे. आता लोकशाहीतही आपण तोच अनुभव घेतो आहोत. असांजला लोकशाही देशच छळतायत.
याच विषयावर २००५ मध्ये साप्ताहिक सकाळमधे माझा एक लेख प्रसिद्ध झाला होता. तो येथे वेगळा प्रकाशित करत आहेच.
निनाद माटे
पत्ता : जे ६ हिमाली सोसायटी, दीनानाथ हॉस्पिटलजवळ, एरंडवणे, पुणे ४११००४
फोन : (०२०) २५४३६११२
ईमेल : ninadmate@gmail.com
आठवणींचा जगण्याशी संबंध सांगणारी कविता
पंडित भीमसेन जोशी आणि राग तोडी याचे नाते फार जवळचे आहे. त्यांच्या गळ्यावर जणू हा राग कोरलेला आहे!! एकतर पंडितजींचा गळा हा मंद्र सप्तकापासून ते तार सप्तकापर्यंत विनासायास विहार करू शकतो. याचा परिणाम असा, तोडीसारखा सर्वसमावेशक राग, त्यांच्या कडून ऐकणे ही नेहमीच सुखद संवेदना असते. घुमारेदार आणि आश्वासक सूर ही तर पंडितजींच्या आवाजाची खासियत आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti