(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • इंग्रजी शाळांची मनमानी

    नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने एक निर्णय देऊन सरकारला शाळांची फी निश्चित करता येणार नाही असे सांगितले. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे बर्‍याच इंग्रजी शाळांनी फी वाढ केली व त्यामुळे पालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. पण अर्थातच अनेक शाळांनी याला भीक घातली नाही. त्याचप्रमाणे काही ठिकाणी पालक पाल्याच्या भवितव्याच्या काळजीने गप्प बसले. पण एकंदरीतच मुलांच्या शिक्षणाचा खर्च हा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.

  • अवचित…

    भरून आलंच होतं , पडणार हे वाटलंच होतं पण पुण्यांतला मे मधला पाऊस एखाद्या सिग्नल प्रमाणे पडतो फार फार तर मोठ्या चौकातल्या १८० सेकंदाच्या सिग्नल प्रमाणे ; त्यामुळे आडोशाला थांबलेले निघण्याची तयारी करण्यासाठीच थांबलेले असतात. पण आजचा नूर वेगळाच होता. तयारी तब्येतीत कोसळण्याची होती. पावसाची पहिली सर ओसरली की नंतर तो कसा पडतो ह्यावर तो किती वेळाचा आहे हे साधारण कळतं. आजचा खेळी मोठी असणार हे स्पष्टच होतं. अगदी जूनच्या ३० किंवा जुलैच्या २३ ला पडावा तसा मुरलेला पाऊस होता. कडाडणं थोडं कमीच पण लयीला ठेहराव होता.

    शरणागती पत्करून समीर आणि कैवल्यने बाईक बाजूला घेतली आणि बंद शटरच्या पायऱ्यांवर येऊन डोकं आणि हात पुसले. पुंडलिकही सायकल लावून पायरीवर येऊन बसला. रोहन जिमहुन घरी जात होता तोही शटरजवळ डफल ब्याग टाकून बसला. पाव बाटली पाणी गटागटा पिऊन रिकामी केली आणि पडणाऱ्या पाण्याकडे "याचा मला काय फायदा ?" अशा आविर्भावाने कटाक्ष टाकला.

    समीर-कैवल्यच्या दिवसभराच्या मीटिंग्स सुदैवाने पार पडल्या होत्या आणि जूनच्या अंकाला अपेक्षित जाहिरातदारांशी गाठीभेटी होऊन त्यातून समाधानकारक असे निष्पन्न झाले होते त्यामुळे आजची संध्याकाळ तशी शांतच असणार होती.

    पावसाचा जोर पाहून ,"आपल्याला मिळालेली आडोशाची जागा चांगली आहे म्हणून बरं ! ". असे उद्गार कैवल्यने काढले आणि दोघंही पायऱ्यांवर बसले.

    कैवल्यने कॅन्डी क्रशायाला सुरुवात केली. त्यातल्या आवाजाने पुंडलिकने त्याचाकडे पाहिलं आणि रबर बँडने एकत्र धरून ठेवलेला ,अतिजीर्ण झालेला मोबाईल खिशातून बाहेर काढला. त्याचीही कामे आज लवकर आटोपली होती. कुरिअर मुक्कामी पोचती करून, मुलांची गाईड-पुस्तके घेऊन ,सायकलचे पेडल बदलून तो आता घरी निघाला होता.

    शटरसमोरच रस्त्यापलीकडे ABN बँकेची शाखा होती. पायरीवरच्या सिक्युरिटी डेस्कवर सखाराम बसला होता. खिदळण्याचा आवाज ऐकून त्याने वर पाहिलं. गौरी , समिरा ,रेश्मा ABN बँकेच्या पायऱ्यांवर धावत-पळत पोहोचल्या होत्या. त्यांच्या लगबगीतून त्यांची उडालेली तारांबळ सखाला जाणवली. "पाउस लय लागलाय…", सखानं रस्त्याकडे पहात तिघींना उद्देशून म्हटलं. ब्यागा बँकेच्या बाहेरील काचेला लावून ठेवत गौरी - समिराने स्कार्फ काढला आणि केस मोकळे केले. भिजल्याने असह्य झाले होते त्यामुळे त्या लगेचच सखासाठी लावलेल्या Standing Fan समोर उभ्या राहिल्या. रेश्माने ब्याग उघडून Tab आणि Laptop चेक करून पुढच्या कप्प्यातल्या प्लास्टिक ब्यागेत गुंडाळून परत ठेवले.

    पावसाचा जोर कायमच किंबहुना वाढतंच होता. वाळलेली झावळी बँकेच्या कार पार्कींग मधील प्लास्टिक शेडवर पडली, सखा ती बघायला गेला.

    समीर "जिंदगीss..कैसी ये पहेली हाएss…" गुणगुणत असतानाच सेल्फ़ि घ्यायला ओलेत्या उभ्या राहिलेल्या गौरी-समिरा त्याला दिसल्या आणि त्याने "ये रात भिगी - भिगी…ये मस्त हवांएss…" या गाण्याला सुरुवात केली. रेश्माला ऒढुन आणून गौरीने सेल्फ़ि घेतला आणि त्यानंतर ४- ५ पोझेस देऊन स्वतःचे फोटो काढुन घेतले.

    लास्ट सेमचा अभ्यास, प्रोजेक्ट सबमिशन्स आणि पुढच्या इंटरव्यूजची तयारी यात पार गुंतलेल्या तिघी या अवचित पावसाने वेळापत्रक विसरल्या होत्या. बाहेर पडून कामाला जाणं शक्यच नव्हतं त्यामुळे त्यांनी राहिलेली कामं उद्यावर टाकली आणि निश्चिंत झाल्या. उडणारे तुषार आणि मधेच टपकणाऱ्या पागोळयांमुळे ड्रेस ओले झाले होते. एकीकडे असह्य पण मे च्या पहिल्या आठवड्यात हजेरी लावल्याने आल्हाददायक अशी मनस्थिती झाली होती. शेवटी न राहून समिरा बँकेच्या बाईक पार्कींगमध्ये ; जिथे जरासे पाणी आता साचू लागले होते, त्यात जाऊन उभी राहिली आणि हात फैलावून तिने वर पाहत एक गिरकी घेतली. गौरी - रेश्माच्या चेहऱ्यांवरचं आश्चर्य सरून हसू उमटतं न उमटतं तोच समिराने ओंजळीने त्यांच्यावर पाणी उडवले. दोघींनीही धावत येउन तिथे गिरक्या घेतल्या आणि मनसोक्त भिजत राहिल्या.

    समीरने फेसबुक wallवरून ४-५ वेळा खालीवर केले. पोस्ट्स, फोटोज्, शेअर्स, स्टेटसेस काहीच नवीन नव्हते. whatsapp ग्रुप्स मधील अपडेट्स मात्र आज पहायच्या राहून गेल्या होत्या. 'मॉडर्न कॉलेज १९९७ बेच' चा सब्जेक्ट "HBD सुमंत नार्वेकर" असा ओझरता पाहिला आणि एकदम सेकंड ईअर च्या आंतर महाविद्यालयीन एकांकीकेतला सुमंत डोळ्यांसमोर उभा राहिला. मग अजूनही काही आठवणी जाग्या झाल्या. ह्या आठवणींच्या चल्लचित्रपटामुळे समीरला सुमंतशी बोलावेसे वाटले. पटकन ग्रुपमधून नंबर शोधून फोन केला. हलो,Mr. Sumant Narvekar ? (सुमंत एका MNC मध्ये मोठ्या पदावर आहे हे समीरला LinkeIn वरून कळलेच होते.) Yes..Speaking….Hi Sumant…I am Sameer !...Sameer Deshmukh…!!

    Reference जोडायला सुमंतला एक क्षण लागला पण त्यानंतर तो उडालाच. कॉलेजच्या मित्राशी तो तब्बल १८ वर्षांनी बोलत होता. सुमंतलाही बऱ्याचशा गोष्टी क्षणात आठवल्या. त्यानंतर कॉलेज ग्रुपमधील सगळ्यांबद्दल गप्पा झाल्या. कोण कुठे असतात , काय काय करतात… एकेकजणाबद्दल बोलताना त्यांना बऱ्याचशा गोष्टी आठवल्या आणि कॉलेजच्या आठवणींचा अल्बम चाळला गेला. नक्की भेटू… असं म्हणून समीरने फोन ठेवला पण अंगावरचा शहारा अजून तसाच होता. पावसाच्या पाण्याबरोबरच आठवणींच्या गुलाब पाण्याने त्याला अजूनच फ्रेश वाटू लागलं.

    पुंडलिकच्या फोनमध्ये सकाळचा missed call अजून तसाच होता. विलासने, त्याच्या मामेभावाने ४ वेळा फोन केला होता. पुंडलिकने call केला. विलास वाटच बघत होता. त्याला फवारणी यंत्राचा स्पेअर पार्ट काही केल्या मिळत नव्हता आणि पुण्यात तो खात्रीशीर मिळेल अशी जागा त्याला कळली होती. त्याने पुंडलिकला ते काम सोपवले आणि मामाच्या औषधाच्या गोळ्या आणायलाही सांगितले.

    रोहनला सर्फिंग करताना Battery Low चा मेसेज आला. तो फोन बंद करणार इतक्यात त्याला बहिणीने सांगितलेले काम आठवले. घाईने त्याने App उघडले आणि बहिणीच्या पुस्तकाचे shopping केले.

    आता तास - सव्वा तासानंतर पावसाचा जोर जरा कमी झाला होता. मंडळींनी निघायचा निर्णय घेतला आणि एकेक करून सगळे जण निघाले. बँकेसमोरून मुलींनीही निघण्याची तयारी सुरु केली होती.

    एकूणच अवचित पावसाने सगळ्यांची गैरसोय झालीच होती पण त्यामुळे त्यांना आप्तांसाठी अमुल्य असा वेळही मिळाला होता. टपटप पडणाऱ्या आणि भिजवणाऱ्या पागोळ्यांवर आता कुणाचाच राग उरला नव्हता. दाटलेल्या ढगांतही सर्वांना मोकळेपणा जाणवत होता.

    Rohit

  • जिनके घर शिशेके होते है: राजकुमार

    कधी कधी काही माणसं स्वत:वर इतके अफाट प्रेम करतात की त्यातुन त्यानां बाहेर येणे जमतच नाही. अर्थात त्यात त्यांचे स्वत:चे असे काही अंगभूत गूण वैशिष्ठ्यही असतात. त्यामुळे अशी माणसं चिरकाल लक्षात राहतात त्यात ती जर कलावंताच्या कुळीतील असतील तर मग बोलायलाच नको !!!! बलुचिस्थान येथे एका काश्मिरी पंडीताच्या घरात एक देखणे मूल जन्मले. इतर मुलां सारखेच शालेय व कॉलेज शिक्षण घेत मोठे झाले.

    १९४०च्या दरम्यान या मुलाला मुंबईतल्या माहिम पोलिस स्टेशनात पोलिस इन्स्पेक्टरची नोकरी लागली. या चौकीतला एकदम रूबाबदार व देखणा इन्स्पेक्टर अनेकानां भूरळ घालत असे. मग एक दिवस कुणी तरी त्याला म्हटले -‘तुम तो एकदम हिरो दिखते हो. फिल्मोमे काम क्यूँ नही करते.’ मग काय ? त्याच्याही डोक्यात किडा गेला की मी का प्रयत्न करू नये. पोलिस स्टेशनला अनेकदा चित्रपटसृष्टीतली अनेक माणसे येत असत. यापैकी एक होते चित्रपट निर्माते बलदेव दुबे. या तरूणाकडे एक खासियत होती ती म्हणजे त्यांची बोलण्याची विशेष ढब. दुबेला ती आवडली त्यांनी या तरूणाला आपल्या “शाही बाजार” या चित्रपटासाठी मूख्य नायकाची भूमिका देऊ केली. या तरूणाचे नाव होते कुलभूषण पंडित.

    त्याने चित्रपटासाठी धाडकन् नोकरीचा राजीनामा दिला. ही घटना आहे १९५२ ची. पूढच्या पाच वर्षात या तरूणाला अनमोल, सहारा, अवसर, घमंड, निलमणी,कृष्ण सुदामा असे चित्रपट मिळाले खरे पण सूर काही सापडेना. नोकरी गेल्यामुळे आथिर्क परिस्थिती पण बिघडली. मग १९५७ मघ्ये मेहबूब खानचा महत्वकांक्षी चित्रपट ‘मदर इंडिया’ आला. हा संपूर्ण चित्रपट नर्गिसच्या राधा या मूख्य पात्रा भोवती केंद्रीत केलेला होता. त्यात तिच्या नवऱ्याची एक छोटीशी भूमिका कुलभूषणला मिळाली आणि त्या छोट्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटा पासून कुलभूषणचा खऱ्या अर्थाने नवीन जन्म झाला व मग सुरू झाला ‘राजकूमार’ या काहीशा विक्षिप्त अभिनेत्याचा चित्रपट प्रवास.

    १९५९ मध्ये तर त्याने मग दिलीप कुमारशीच पंगा घेतला. “पैगाम” या चित्रपटात राजकुमार दिलीपकूमारचा मोठा भाऊ होता. मस्त जुगलबंदी बघावयास मिळाली. पण नंतर हे दोघे एकत्र कधीच दिसले नाही दिसले ते थेट ३२ वर्षानंतर सुभाष घईच्या ‘सौदागर’ मध्ये. मी कुठे तरी वाचल्याचे आठवते की पैगाम चित्रपटातल्या एका प्रसंगात राजकुमारला दिलीपकुमारला थप्पड मारायची होती आणि ती त्याने खरोखरीच सणकावून लगावली आणि मग दोघांचा बेबनाव झाला व कधी एकत्र आलेच नाही. असो. त्यानंतर लगेचच आलेल्या दिल अपना प्रित पराई, घराना, गोदान, दिल एक मंदिर, दूज का चांद या चित्रपटांतील सहजसुंदर व नैसर्गिक अभिनयाने राजकुमार यांना अभिनय सम्राटाच्या पदावर पोहचवले. मदर इंडियातील छोट्याशा भूमिकेने सुरु झालेला हा यशस्वी प्रवास अव्याहतपणे सुरु राहिला.
    मग त्यांच्या आयुष्यात १९६५ मध्ये आणखी एक कलाटणी देणारा चित्रपट आला. बी.आर. चोप्राचा भारतातील पहिला मल्टीस्टार चित्रपट ‘वक्त’. या चित्रपटा पासून राजकूमार स्वत:ला ‘हम’ या संबोधना पासून बोलायला लागले ते अखेरचा श्वास घेई पर्यंत. या चित्रपटातील त्यांच्या तोंडचे संवाद हे तुफान लोकप्रिय झाले. संवाद बोलण्याच्या त्यांच्या अंदाजावर प्रेक्षक इतके फिदा होते की चित्रपट कसा का असेना प्रेक्षक डॉयलागबाजी ऐकायला चित्रपटाला गर्दी करायचे. त्यांच्या ‘हिर रांझा’ या चित्रपटातील काव्यमय संवाद हा त्या चित्रपटाचा आत्माच होता. मात्र नंतर हळूहळू बहूतेक चित्रपटात त्यांच्या डायलॉगबाजीने त्यांच्यातल्या सुंदर अभिनयावर मात केली. संवाद फेकीच्या नादात अभिनय लुप्त होत गेला. आयुष्यभरात ६०-६५ चित्रपटात काम करणारा हा अवलिया नट सर्वांच्या लक्षात राहिला तो संवाद फेकीमुळे आणि स्वत:च्या खाजगी आयुष्यात कुणालाच कधीच शिरकाव करू न देण्या बाबत. आपल्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी कधीच आपल्या कुटूबांला कुठल्याही सिने पार्टीत् वा शुटींग वा प्रिमियरमध्ये येऊ दिले नाही. जेनीफर या अंग्लो-इंडियन एअर होस्टेसशी त्यांनी लग्न केले. नंतर जेनिफरने हिंदू धर्म स्विकारला व गायत्री हे नाव घेतले. पूरू, पाणीणी हे दोन मुलगे आणि वास्तविकता ही मुलगी..पूरू ने काही चित्रपटात काम केले पण तो टिकू शकला नाही. अगदी आपल्या मुलाला त्यांने शेवटची इच्छा सांगितली ती अशी- ‘मौत और जिंदगी इंसान का निजी मामला होता है। मेरी मौत के बारे में मेरे मित्र चेतन आनंद के अलावा और किसी को नही बताना। मेरा अंतिम संस्कार करने के बाद ही फिल्मउद्योग को सूचित करना।’ ‘जानी’ ही दोन अक्षरे राजकुमारची ओळख होती असे म्हटले तर वावगे होणार नाही. तर अशा या झक्की अभिनेत्याचे काही खास संवाद-
    चिनायसेठ, जिनके घर शीशे के होते है….. , (वक्‍त) आपके पांव देखे, बहुत हसीन हैं, इन्‍हें जमीन पर मत उतारिएगा मैले हो जाएंगे…. (पाकीजा)
    हम तुम्हें मारेंगे और जरूर मारेंगे। लेकिन वह वक्त भी हमारा होगा। बंदूक भी हमारी होगी और गोली भी हमारी होगी…..। (सौदागर)
    काश कि तुमने हमे आवाज दी होती तो हम मौत की नींद से भी उठकर चले आते….। ('सौदागर'),हम आंखो से सुरमा नहीं चुराते, हम आंखें ही चुरा लेते हैं…… (तिरंगा) …हम तुम्हें वह मौत देंगे जो न तो किसी कानून की किताब में लिखी होगी और न ही किसी मुजरिम ने सोची होगी… (मरते दम तक) ….हमारी जुबान भी हमारी गोली की तरह है। दुश्मन से सीधी बात करती है…('तिरंगा')
    दादा तो इस दुनिया में दो ही हैं। एक ऊपर वाला और दूसरा मैं……दिल एक मंदीर आणि वक्त या दोन चित्रपटाने त्यांना सहकलाकाराचा फिल्मफैअर पुरस्कार मिळवून दिला पण पुरस्कारात त्याना अजिबातच रस नव्हता…….३ जुलै १९९६ रोजी हा जानी आपल्यातुन देहरूपाने कायमचा निघून गेला.

    दासू भगत (३ जुलै ०१७)

  • मंगला बर्वे

    अन्नपूर्णा या पाकशास्त्रावरील प्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका मंगला बर्वे यांचे काल रात्री (२३ आक्टोबर) निधन झाले.
    अन्नपूर्णा, इच्छाभोजन, मांसाहारी, चायनीय पदार्थ तसेच खाद्य पदार्थांवरची विविध छोटी छोटी पुस्तके, डोहाळे बारसे, रुखवताचे पदार्थ, लोकरीने विणून केलेली खेळणी अशी अनेक पुस्तके प्रसिद्ध होती.

    मागील पिढीतील नावाजलेले लेखक अच्युत बर्वे यांच्या त्या पत्नी होत.

  • प्रेमाचा भुकेला

    प्रेम करणं फाज सोपं असतं पण टिकवणं फार कठीण

  • सेंद्रिय पद्धतीने उत्पादित अन्न आपल्या जिवानासाठी योग्य आहेत का….???

    पूर्वीच्या काळी जैविक/सेंद्रिय अन्न धान्य अस वेगळ काहीच नव्हते कारण सर्व काही उत्पादित अन्न हे जैविक / सेंद्रियच होते.

  • डॉ.संजय गोविंदराव पोहरकर – एक अष्टपैलू व्यक्तिमत्व…!

    नाशिकच्या ९१ वर्षाची परंपरा असणार्‍या “ वसंत व्याख्यानमालेत ” सावरकरी विचारांचे पुष्प गुंफण्यासाठी संजय पोहरकरांना २०१२ या वर्षात विशेषत्वाने पाचारण करण्यात आले. टिळक, आगरकरांनी ज्या व्याख्यानमालेत आपले विचार मांडलेत; त्या मंचावर उभे राहण्याच्या विचारानेही कितीतरी गर्भगळीत होतात, तिथे अधिकारवाणीने आपले विचार निर्भीडपणे अभिव्यक्त करणारा आत्मा म्हणजे संजय पोहरकर होत.

  • भ्रष्टाचारींचे कुळ नव्हे मूळ शोधा !

    लेखक व जाती व्यवस्थापनाचे अभ्यासक डॉ. आशिष नंदी यांचे भ्रष्टाचाराबाबतचे वादग्रस्त विधान हे अतिशय क्लेशकारक व निंदनियच आहे. दहशतवादी, भ्रष्टाचारी किंवा कोणत्याही गुन्हेगारांचे वर्गीकरण विशिष्ट …..

  • रस्त्यावरचा गोंधळ

    भारतातील कुठल्याही शहरातील कुठल्याही ट्राफिक सिग्नल जवळ दिसणारे चित्र हा देश किती मागासलेला आहे याचे एक उदाहरण आहे. दोन लेनचा रस्ता असो वा तीन लेनचा, सिग्नल जवळ त्याच्या सहा-सहा लेन कशा होतात. अत्यंत सुशिक्षित वाटणारे लोक जेव्हा आपल्या गाड्या लेनची शिस्त मोडून पुढे घुसवण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी डोक्याला हात लावावासा वाटतो.

    न्यूयॉर्क सारख्या शहरात ४ जुलैला लाखो गाड्या फटाक्याची आतषबाजी पाहायला रस्त्यावर येतात. पण कुणीही लेन कटिंग, आपली गाडी पुढे दामटवण्याचा प्रयत्न करीत नाही हे मी अनुभवले आहे. त्या गाड्यांमध्ये भारतीयांच्या गाड्या सुद्धा असतात.

    ज्या देशात सार्वजनिक ठिकाणी लोकांनी कसे वागायचे ह्याचे प्रशिक्षण देण्याची खूप गरज आहे त्या देशात स्मार्ट सिटी प्रकल्प आणणे हे पैशाचा अपव्यय करणारे ठरेल.

    RTO, पोलिस आणि महापालिकेचा कारभार प्रथम सक्षम करा. सार्वजनिक ठिकाणी गैर वागणा-या व्यक्तीस मग ती कितीही मोठी असो, तत्काळ शिक्षा होण्यासाठी कायदे कडक करा. सिटी आपोआप स्मार्ट दिसेल !

    नव्या मुंबईमधील रेल्वे स्टेशनला काय अवकळा आली आहे ते जाऊन पहा. सुरवातीला जेव्हा हि स्टेशन बांधली तेव्हा उर आभिमानाने भरून आला होता. परंतु आता मात्र स्टेशन आणि त्याच्या आसपासचा परिसर पाहून दुखः होते.

    काळाच्या कसोटीवर आगरकर खरे ठरले हेच याच वरून सिद्ध होते. ठाणे महानगरपालिकेचे रस्ते एकदा रात्री ३- ४ वाजता जाऊन पहा. इतक्या सुंदर शहरात राहतोय याचे अप्रूप वाटेल. पण मग दिवसा या रस्त्यांना अवकळा कोण आणतो? आपणच ना?

    जो पर्यंत लोकां मध्ये स्वयंशिस्त येत नाही तो पर्यंत सिटी स्मार्ट होणे शक्य नाही.

    -- चिंतामणी कारखानीस

  • शांत सागरी कशास…. तीन वर्षांनंतर

    शांत सागरी कशास उठविलीस वादळे?........... शांत सागरी कशास उठवतोस वादळे?
    गायिले तुवा कशास गीत मन्मनातले?............. भांडुन भांड्यावर भांडे कशास आदळे?

    काय हे तुझ्यामुळे........................... पहा किती तुझ्यामुळे
    देहभान हरपले.............................. गृहशांतता हरपते
    युगसमान भासतात आज नाचरी पळे.............. युगसमान भासतात क्षण एकैक त्यामुळे

    अमृतमधुर बोल एक.......................... खडाजंगी बोल तव
    श्रवणि जो न पाडिलास........................ श्रवणि माझ्या पाडतोस
    अधिरता भरे जिवात केवढी तयामुळे.............. भयभीती मनी भरे केवढी तयामुळे

    स्वर्ग कल्पनेतला............................. स्वर्ग कल्पनेतला
    येइल कधि भूतला............................ केव्हाच विरुन पार गेला
    दिवसरात्र अंतरात आस ही उचंबळे............... दिवसरात्र अंतरात त्रस्तता उचंबळे

    - संजीवनी मराठे............................ - आकाश विहारकर