त्यावेळेस जहाजावर इंटरनेट आणि फोनची सुविधा आमच्या त्या जहाजावर उपलब्ध नव्हती. जहाजावर कामावरून सुट्टी झाली आणि संध्याकाळी सात वाजेपर्यंत सगळ्यांची जेवणे आटोपली की एकमेकांशी गप्पा मारणे, हिंदी गाणी किंवा पिक्चर बघणे याशिवाय मनोरंजन करण्यासाठी इतर काही साधने नव्हती. आमच्या बत्ती साबकडे महाभारत आणि रामायण या दूरदर्शनवर चालणाऱ्या मालिकांचे सगळे भाग असणाऱ्या डी व्ही डी होत्या. संध्याकाळी साडे सात वाजता क्रू स्मोक रूम मध्ये टी व्ही वर रामायण ची डी व्ही डी लावली जात असे. रोज एक एक भाग बघितला जायचा.
भारताला स्वतंत्र्य मिळून ६५ वर्षे झाली पण पिण्याच्या पाण्या सारखा मुलभुत प्रश्न आम्ही सोडवु शकलो नाहीत तर असे स्वातंत्र्य मिळुन काय उपयोग झाला
दगडात सुद्धा किती सौंदर्य आहे ते फक्त त्या दृष्टीने बघितले तरच कळत, बघणार्याचा भाव काय आहे यावर सर्व अवलंबून आहे.
देवाधिदेव महादेव श्री शिवशंभू आणि जगनमाता पार्वतीदेवी यांचे परमपवित्र निवास स्थान म्हणजेच कैलास पर्वत. जगामध्ये अस्तित्वात असलेल्या निरनिराळ्या धार्मिक पवित्र स्थळांमध्ये …..
सांगली जिल्ह्यातील विटा (ता. खानापूर) येथे विजयादशमी दिवशी देवांच्या पालखी शर्यतीचे आयोजन केले जाते. गेल्या १५० वर्षांची परंपरा असलेल्या देवांच्या या पालखी शर्यती संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहेत. विट्यातील श्री रेवणसिद्ध व मूळस्थान श्री रेवणसिद्ध या दोन देवांच्या पालखी शर्यती येथील विजयादशमीचे (दसरा) खास आकर्षण आहे.
दसऱ्याच्या दिवशी मूळस्थानी श्री रेवणसिद्ध देवाची पालखी विट्यातील श्री भैरवनाथ मंदिरात येते. मूळस्थान रेवणसिद्ध व विटा येथील श्री रेवणसिद्ध या दोन पालख्यांची आरती झाल्यानंतर देवाच्या सासनकाठ्या, देवांना वारे घालणाऱ्या चवऱ्या, आबदागिरी, चांदीच्या काठ्या, लाल छत्र्या, हलगी व डिमडीच्या निनादात या पालख्या शर्यतीसाठी सज्ज होतात. या दोन्ही पालख्यात देवांचा मुखवटा ठेवलेला असतो. काळेश्वर मंदिराजवळ पालख्या येतात. पालख्या शर्यतीसाठी सोडण्याचा मान विठ्ठल (आबा) पाटील यांच्या कुटुंबाकडे आहे. त्यावेळी मूळस्थानची पालखी पाहुणी असल्याने या पालखीला पाच पाऊले पुढे थांबण्याचा मान दिला जातो. त्यानंतर उजव्या बाजूला मूळस्थानचे नागरिक तर डाव्या बाजूला विटेकर नागरिक पालखी घेऊन धावण्यासाठी सज्ज होतात.
विजयादशमी दिवशी सायंकाळी 5 वाजता या दोन देवांच्या पालखींची शर्यत सुरु होते. काळेश्वर मंदिर ते खानापूर रस्त्यावरील शिलंगण मैदान हे सुमारे एक ते दीड कि.मी. अंतर कापण्यासाठी पालखीचे खांदेकरी आपले कौशल्य पणाला लावतात. शिवाजी चौक, बसस्थानकमार्गे या पालख्या शिलंगण मैदानाकडे धावतात. त्यावेळी रस्त्यात काही ठिकाणी विटेकर तर काही ठिकाणी मूळस्थान सुळेवाडीचे नागरिक विरोधी बाजूची पालखी अडविण्याचा प्रयत्न करतात. परंतु, त्यातून सुटका करुन घेत या दोन्ही पालख्या शिलंगण मैदानाकडे धाव घेतात. या मैदानात प्रथम पोहोचलेली पालखी विजयी घोषित केली जाते. त्यानंतर पाठीमागून श्री भैरवनाथ, श्री म्हसवडसिद्ध व श्री भैरोबा या देवांच्या पालख्या शिलंगण मैदानात जातात. त्याठिकाणी सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होतो. आपट्यांची पाने (सोने) देऊन नागरिक एकमेकांना शुभेच्छा देतात.
विजयादशमी दिवशी देवांच्या पालख्या पळविण्याच्या शर्यतीची परंपरा विटेकरांनी गेल्या 150 वर्षांपासून जोपासली आहे. जात, पात, धर्म, गट-तट आणि राजकारणाच्या भिंती भेदून विटेकर नागरिक ही पालखी शर्यत यशस्वीरित्या पार पाडून जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी आजही प्रयत्नशील आहेत. विजयादशमी दिवशी सांगली जिल्ह्यातील विटा शहरात जोपासलेली देवांच्या पालखी शर्यतीची परंपरा महाराष्ट्रात आजही सुप्रसिद्ध आहे. या शर्यती पाहण्यासाठी राज्यातून लाखो भाविक हजेरी लावतात.
(-- `महान्यूज' मधील दिलीप मोहिते, विटा यांच्या लेखावर आधारित. )
प्लास्टिक मनीचा (डेबिट कार्डस्, क्रेडिट कार्डस् ) चा वापरआपल्या आयुष्यातील महत्वाचा घटक बनलाय, कारण शॉपिंग पासून, दैनंदिन बिलं भरण्यापर्यंत “क्रेडिट” अथवा “डेबिट कार्डस्” चा वापर करण्यात येतो; भली मोठी शॉपिंग असेल किंवा किराणा दुकानात सुद्धा सर्वत्र नोटाच नोटा पहायला मिळतात.
काल २६ जानेवारी होती… दर कारगील दिन ,१५ आँगस्ट , २६ जानेवारी अशा दिवशी हमखास मला आठवण होते.. आर. के. पठाणिया यांची.. मी १०वीत असतानाची गोष्ट आहे… करगील युध्द सुरु होत…
ढोल आणि मालवणी मुलुख यांच नातं तसं प्राचिनच....
पण तुम्ही बघितलेला ढोल आणि मालवणी ढोल यात जमिन अस्मानाचा फरक आहे....
आत्ताचा अभिप्रेत ढोल सर्वानाच माहित आहे पण मालवणी ढोलाची माहिती सांगतो...
मिऴालाच तर फोटोही देईन.....
पहिला महत्वाचा फरक बांधणीचा
.. याच खोड...बहुधा फणसाचे.... पूर्णपणे आतुन पोकळ लाकुड कातुन ढोलाच्या साईज मधे आणणे एक कलाच होती.... आणी त्यातुन निघणार्या
रामरामरामरामरामरामरामराम...
आवाजानेच सुतार समाजाला..रामकातयो..... म्हणजेच रामखातयो..... हे नाव मिळालं असावं......
त्यातही श्रिमंतांचा ढोल तांब्याचा.
.. हे वेगळ वैभव.... वेगळा नाद....
दुसरी गोष्ट कुडा..... म्हणजे त्याला लावावं लागणारे चामडे.... यात एका बाजुला बैलाच ... काठीने वाजवाण्याचं.... तर दुसर्याबाजूने बकर्याचं कातडं.... हातानं वाजवण्याचं......
आणी खास त्यांना बांधणिसाठी काकर..... बारीक चांबड्याची दोरी न गाठ बांधलेली अखंड काकर... हे ढोलाच्या मालकाचे वैभव....
आता शेवटची गोष्ट.... कुडाप....
म्हणजे ढोल वाजवायची काठी. खास माडाच्या शेल्यापासुन... म्हणजे ज्या भागाला नारळ लटकलेले असतात, त्यापासुन बनवलेले....... अत्यंत मजबुत, हलकी, सहज ऊपलब्ध आणि महत्वाचे म्हणजे अजिबात गाठ नसलेली....
तर असा ढोल जेव्हा देवळात वाजायचा तेव्हा 4 ते 5 किमी सहज ऐकू जायचा.....
आता गेले तेदिवस....
फोटोसुद्धा शोधुन मिळेना या ढोलांचा....
आता महत्वाचा फरक आवाजाचा.... आश्या ढोलातुन येणारा आवाज एका वेगळ्या लयीत रामरामरामरामरामरामराम.
असा आवाज देय़ील... फक्त मन लाऊन ऐका.....
तर आताचे सिंथेटिक ढोल... डमडमडमडम किंवा ढमढमढमढमढमढम असा आवाज देईल....
आणी असाच नाशिक ढोल ताफ्यातला ढोल देवळात वाजतांना सहज एखादा मालवणी म्हातारा बरळतोच....
अरे मायझयानु हयते कसले ढोल.? ... हयते डबे वाजयताय.......
सरले रे ढोलाचे दिवस..... आता रवले ते आठवणी.......
खरच माझ्या कोकणच आणखी एक वैभव काळाआड गेलय....
बापूर्झा.....
डॉ बापू भोगटे....
आमच्या शेजारीचे दोन तरुण मित्र, भास्कर व अविनाष एका खोलीत रहात होते. सारखी विचारसरणी व स्वभाव. धर्मा बद्दल प्रचंड जागरुकता बाळगत होते. आपलाच धर्म …..
Copyright © 2025 | Marathisrushti