सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।। नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची।।
August 10, 2010
असे आमचे एकमेवाद्वितीय पुणे !!
June 9, 2017
लाईफ बोट दोन प्रकारच्या असतात फ्री फॉल आणि डेव्हीट लाँच टाईप. इमर्जन्सीमध्ये मग जहाजावर लागलेली आग असो किंवा जहाज बुडत असेल अशा परिस्थितीत कॅप्टन अबँन्डड शिप म्हणून घोषणा करतो आणि सगळे जण जाऊन लाईफ बोट मध्ये बसतात. लाईफ बोट खराब हवामानात हलू नये, खाली पडू नये म्हणून जहाजावर विशिष्ट पद्धतीने हुक आणि सेफ्टी सिस्टिम लावून अडकवून ठेवलेली असते. लाईफ बोट मध्ये बसण्यापूर्वी प्रत्येकजण त्याच्या पूर्व निर्देशित ड्युटी प्रमाणे सेफ्टी सिस्टिम आणि हुक काढून बसतात. सगळे आत बसल्यावर कॅप्टन किंवा अजून एखादा जवाबदार अधिकारी लाईफ बोट मधून काढावा लागणारा शेवटचा हुक काढतो ज्यामुळे लाईफ बोट जहाजावरुन पाण्यात उतरवली जाते. फ्री फॉल लाईफ बोट पाण्यात उतरवली जात नाही, ही जहाजाच्या सगळ्यात मागील भागात असते. तिचा हुक आतून रिलीज केला की सुमारे चाळीस फुटांवरून जहाजावरील संपूर्ण क्रू सह ती खाली पाण्यात पडते. सगळ्यांसह उंचावरून पडून पाण्यात डुबकी मारून पुन्हा वर यावी अशी तिची रचना असते.
July 15, 2021
सध्याच्या तांत्रिक युगात आपली कलात्मकता जोपासून त्यात करिअर करायचं असल्यास गरज असते ती तिव्र इच्छाशक्तीची. सातत्याने प्रयत्न, अॅकेडेमिक पातळीवर अभ्यास आणि रियाझ केला तर आपली कला किंवा आवड कायमस्वरुपी आपल्या आयुष्यात टिकवता येते. आत्मिक सुख देणारी भरतनाट्यम ही अशीच एक कला. यात भाव-रस-राग-ताल, कथानक किंवा एखादा वर्तमान मुद्दा सादर करण्यासाठी नाटकाचा समावेश केला जातो. कल्पकता आणि नवनिर्मिती हा नृत्यकलेचा आत्मा आहे. नटराज हे या नृत्यशैलीचे दैवत मानले जाते.
भरतनाट्यम ही एक अभिजात दक्षिण भारतीय नृत्यशैली आहे. या शैलीचा उगम दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये झाला. भरतनाट्यम ही नृत्यशैली भरतमुनींच्या नाट्यशास्त्र या प्राचीन ग्रंथावर आधारित आहे. भरतनाट्यमचे सादरीकरण कर्नाटकी संगीताच्या साथीने होते. अलरिपु, वर्णम, पदम, तिल्लाणा ही भरतनाट्यमची विविध अंगे आहेत.
भाव - राग - ताल हे भरतनाट्यमचे तीन मुख्य अंग असतात. भ म्हणजे भाव, र म्हणजे राग, त म्हणजे ताल आणि नाट्यम म्हणजे अभिनय करुन सादर केलेले नृत्य. या अंगांच्या आद्याक्षरावरून भरत-नाट्य असे नाव पडले. दुसऱ्या मतानुसार भरतमुनी जनक असल्याने भरताचे नाट्य म्हणून यास भरतनाट्यम म्हटले जाते. या नृत्यास दासीअट्ट्म व सदिर या नावानेही ओळखले जाई.
भरतनाट्यम चे विद्यार्थी सुरुवातीस घुंगरूंशिवाय नाचणे शिकतात. ज्यावेळी गुरूस वाटते की विद्यार्थ्याची पुरेशी तयारी झालेली आहे तेव्हा गुरू विद्यार्थ्याकडून सलंगाई पूजा करवून घेतात व त्यावेळी घुंगरू प्रदान केले जातात. अधिक खडतर शिक्षणानंतर विद्यार्थ्याने एकट्याने किंवा एकटीने संपूर्ण कार्यक्रम करणे अपेक्षित असते. याला आरंगेत्रम असे नाव आहे. आरंगेत्रम नंतर गुरू आपल्या शिष्यास इतर कार्यक्रमांतून नृत्य करण्यास परवानगी देतात.
चिदंबरम येथील प्राचीन मंदिरातील मूर्ती हे भरतनाट्यम या नृत्यप्रकाराचे मूळ प्रेरणास्त्रोत. या नृत्यप्रकाराचा प्रसार व विकास तमिळनाडू येथील देवदास्यांनी केला. पूर्वीच्या काळी हा नृत्यप्रकार देवदास्यांनी प्रसारित व विकसित केल्यामुळे त्याला मान दिला जात नसे. परंतु २० व्या शतकाच्या सुरुवातीला कृष्ण अय्यर आणि रुक्मिणी देवी यांच्या प्रयत्नाने या नृत्यप्रकाराला पुन्हा प्रस्थापित केले गेले.
नाट्य, नृत आणि नृत्य हे सुध्दा भरतनाट्यमचे तीन भाग आहेत.
नाट्य : नाट्याद्वारे कलाकार एखादी कथा सादर करतो.
नृत : यात तालाचा वापर केला जातो.
नृत्य : नाट्य व नृत याचे मिश्रण म्हणजे नृत्य.
-- पूजा प्रधान
June 14, 2017
अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या इशार्यानंतर राज्यातील काही बेकायदेशीर टोलनाक्यांना स्थगिती देण्यात आली. पण, या कारवाईनंतरही काही प्रश्न कायम राहतात. ते कोणी विचारतही नाही आणि विचारलेच तर समाधानकारक उत्तर मिळत नाही अशी परिस्थिती आहे. असा प्रकार केवळ टोलनाक्यांबाबतच नव्हे तर अन्य ठिकाणीही सुरू आहे. अशा चुकीच्या प्रघाताबद्दल सरकार गांभीर्याने पावले उचलू इच्छिते का हा खरा प्रश्न आहे.
December 16, 2010
जिल्हा न्यायालयाच्या निकालानंतर कोठेवाडी गावात अनोळखी लोकांचा वावर वाढल्याचे अत्याचारित महिलांनी कळवूनदेखील राज्याचे पोलिस दखल घेणार नसतील तर पोलिसांना आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना अशी घटना पुन्हा घडावी, अशी प्रतिक्षा आहे का, असा प्रश्न निर्माण झाल्यावाचनू राहत नाही.
December 16, 2010
June 30, 2013
" आपल्या व्यक्तीमत्वात अमुलाग्र बदल घडवून आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याखेरीज कायमची व्यसनमुक्ती तसेच ..सुखी , समाधानी , संतुलित आणि उपयुक्त जिवन व्यतीत करणे खूप कठीण आहे " ..
असे सांगत सरांनी आज समूह उपचारात पुन्हा ' आत्मपरीक्षण ' या संकल्पनेवर जोर दिला .." हट्टी .जिद्दी ...आत्मकेंद्रित ..बेपर्वा ..टोकाच्या नकारात्मक भावना ..आळशीपणा ..चालढकल करण्याची वृत्ती ..इतरांना दोष देण्याचे तत्वज्ञान ..बेजवाबदारपणा ..इतरांच्या भावनांची किंमत नसणे ..स्वताचेच खरे करून दाखवण्याचा अट्टाहास ..अश्या प्रकारच्या व्यसनी व्यक्तिमत्वाच्या स्वभाव वैशिष्ट्यांची चर्चा सरांनी केली ..खरे तर नेहमी स्वतःच्या बचावासाठीच एक व्यसनी धडपडत असतो ..प्रत्येक वेळी तो चुका करतो आणि आपल्याला इतरांनी माफ करावे असा त्याचा आग्रह असतो ..त्याच वेळी तो इतरांच्या झालेल्या चुका मात्र लक्षात ठेवून असतो ..त्या चुकांचा वारंवार उल्लेख करून तो ..स्वतःवर किती अन्याय झाला आहे याचा पाढा मनात वाचत रहातो ..
त्यातून आत्मकरुणेचा भाव निर्माण होऊन ..आपण किती गरीब आहोत ..बिच्चारे आहोत ..हे जग खूप स्वार्थी आहे ..आपल्यावर किती अन्याय झालाय ..याचा हिशोब मनात ठेवत मानसिक संतुलनासाठी आधार म्हणून दारू किवा इतर मादक द्रव्यांचे सेवन करत रहातो .. स्वतःला आपण जोवर आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून ..स्वतःचा शोध घेत नाही ..तटस्थपणे आपल्या चुकांचे परीक्षण करीत नाही ...तोवर आपल्या विनाशाला पूर्णपणे आपणच जवाबदार आहोत हे समजणार नाही ..
शक्यता आहे की अनेक वेळा परिस्थिती ..आसपासची माणसे ..अघटीत घटना ..यामुळे आपले मानसिक संतुलन बिघडत असेल ..परंतु अशा वेळी दारूचे सेवन करून परिस्थिती बदलत नाही ..अथवा समस्या सुटत नाही ..तर समस्या वाढते ...इतकी वाढत जाते ..की पुढे पुढे संघर्ष करण्याची क्षमता गमावून केवळ व्यसने करत राहणे हाच एक पर्याय आपल्यापुढे शिल्लक उरतो ..त्याऐवजी जर आपण जिवनावरील तसेच आपल्या चांगल्या कर्मांवरील श्रद्धा जोपासली ..अखंड ठेवली तर नक्कीच आपल्या सकारात्मक क्षमता वापरून आपल्याला नव्याने उभे राहता येईल ..
" किती लोकांना आपल्या स्वभावात काही दोष आहेत आणि ते काढून टाकले पाहिजेत हे मान्य आहे ? " सरांच्या या प्रश्नावर बहुतेकांनी हात वर केले आणि होकार दर्शवला ..एक जण तसाच मख्ख पणे बसून होता ..काय रे तुला सुधारावेसे वाटत नाही का ? असे सरांनी विचरताच तो म्हणाला ' सर माझ्या घरी माझे वडील देखील दारू पितात रोज संध्याकाळी ..त्यांना कोणी काही बोलत नाही मात्र मला येथे दाखल केलेय घरच्या मंडळीनी ..असे का ? " त्याच्या प्रश्नावर सर स्मित करत म्हणाले .. अगदी बरोबर प्रश्न पडलाय तुला..तुझ्या वडिलांनी देखील दारू सोडली पाहिजे असे तुला वाटणे स्वाभाविक आहे ..परंतु इथे आपण स्वताच्या व्यसनमुक्तीसाठी दाखल झालो आहोत ..सध्या आपण फक्त स्वतःबाबत विचार करतो आहोत ..तू जर निश्चयाने प्रामाणिकपणे दारू सोडलीस तर नंतर तू वडिलांना देखील व्यसनमुक्तीसाठी मदत करू शकतो ..वडील पितात ..इतर नातलग पितात ..असे समर्थन करून आपण स्वतःचे व्यसन न्याय्य करू पाहतो आहोत ..एखादी चूक वडीलधारी माणसे करत असतील तर तीच चूक आपण केल्यास काही हरकत नाही हे तत्वज्ञान योग्य नाही ..तुझ्या वडिलांचे वय ..त्याच्या क्षमता ..त्याच्या जवाबदा-या ..यांची तुलना करता .कुटुंबीयांनी .. तू तरुण आहेस ..तुझे सगळे भविष्य घडायचे आहे ..तुला आधी उपचार दिले पाहिजेत असे ठरवले असले पाहिजे ..
..किवा वडिलांपेक्षा तुझ्या व्यसनमुक्तीला त्यांनी प्राधान्य दिले आहे.. हे खरेतर तुझ्या भल्या करिता आहे ..आता येथून सगळे चांगल्या प्रकारे आत्मसात करून तू बाहेर पडून व्यसनमुक्त राहिलास तर तुझ्या वडिलांना देखील उपरती होईल उपचार घेण्याची ..तू त्यांना मदत देखील करू शकशील व्यसनमुक्तीसाठी ..मात्र ते पितात म्हणून मी पितो हे समर्थन सर्वथा दुबळे आहे ..तू तुझ्या आईचा कधी विचार केला आहेस का ? नवरा आणि मुलगा दोघेही दारू पितात याचा आईला किती मानसिक त्रास होत असेल ? ती कशी सांभाळत असेल तुम्हा दोघांना ? तिची बिचारीची किती कोंडी होत असेल ? हा विचार कर आणि आधी स्वतःच्या व्यसनमुक्ती साठी प्रामाणिक प्रयत्न कर " सरांनी सांगितलेले त्याला पटलेले दिसले ..त्याने होकारार्थी मान हलवली .
" आपल्या स्वभावातील दोष आपल्यासाठी हानिकारक आहेत हे मान्य केल्यानंतर ते आपल्या व्यक्तिमत्वाला पोखरून टाकून कुटुंबात ..समाजात आपल्याला बदनाम करत आहेत हे लक्षात घ्यायला हवे .हे स्वभावदोष काढून टाकून एका नव्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यास या पुढे आपण सज्ज झाले पाहिजे ..त्याची सुरवात पाचव्या पायरीपासून होईल असे म्हणत सरांनी पाचवी पायरी फळ्यावर लिहिली..
.." आम्ही ईश्वराजवळ ..स्वतःपाशी ..तसेच दुसऱ्या आदरणीय व्यक्तीपाशी आमच्या गतजीवनातील चुकांची तंतोतंत कबुली दिली " सरांनी फळ्यावर लिहिलेली पायरी कोड्यात टाकणारी होती ..आपल्या चुकांची कबुली देण्याविषयी त्यात सुचवले होते ..मी जरा विचारात पडलो ..आजवर मी केलेल्या चुकांचे समर्थन केले होते ..आता त्याच सगळ्या चुका कोणाजवळ तरी कबूल करणे माझ्यासाठी कठीणच गोष्ट होती ..बहुतेक सरांनी आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरील भाव वाचले असावेत ते हसून म्हणाले " घाबरू नका ..ही चुकांची कबुली देणे कठीणच आहे हे मी जाणतो .. एक मराठी म्हण आहे ' मान सांगावा जनात ..अपमान सांगावा मनात " त्या नुसार आपण नेहमी आपल्या बाबतीत आपले यश ..सन्मान ..कर्तुत्व ..याबाबत आसपासच्या सर्वाना कळावे म्हणून धडपडत असतो ..आणि बहुधा आपल्या चुका ..अपमानाचे प्रसंग ..आपल्यामुळे झालेले नुकसान.. अशा गोष्टी इतरांपासून लपवून ठेवण्याचा जीवापाड प्रयत्न करत असतो ..त्यामुळे आपल्या चुकांची जाहीर कबुली देणे अवघडच आहे आपल्यासाठी ..या पाचव्या पायरीला ' कन्फेशन ' अथवा बदलाच्या सुरवातीची नांदी म्हणता येईल ..
ख्रिस्चन धर्मात अशा ' कन्फेशन ' ला खूप महत्व आहे ..आपण सिनेमात अनेकदा असे दृश्य पाहतो की जेथे ..चर्च मधील शांत गंभीर वातावरणात ' कन्फेशन ' बॉक्स मध्ये चेहऱ्यावर अतिशय प्रेमळ आणि आश्वासक भाव असणारा फादर ..समोर असलेल्या व्यक्तीचे ' कन्फेशन ' ऐकतो ..आणि नंतर त्याला दोष न देता धीर देतो ..मार्गदर्शन करतो ...अशी कबुली देणे ही बदलाची उपरती मानली जाते ..आत्मशुद्धीची ही एक महत्वाची सुरवात आहे..सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ अशी चुकांची कबुली देण्याबाबत सर्व धर्मानी मान्यता दिलेली आहे..असे केल्याने आपल्या मनातील अपराधीपणाची बोच निघून जाण्यास मदत मिळते ..
( बाकी पुढील भागात )
-- तुषार पांडुरंग नातू
" मैत्री ' व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये - ९३७३१०६५२१ ..तुषार नातू - ९८५०३४५७८५
June 28, 2020
•जगातली कोणतीही व्यक्ती कोणत्याही व्यक्तीशी फक्त सहा बिंदूंनी जोडली जाऊ शकते. हे सहा बिंदू व्यक्ती, संस्था वगैरे काहीही असू शकतात. त्याचं म्हणणं होतं, फेसबुक वगैरे माध्यमातनं आपण उगाचच एक बिंदू सहज पुरवतो. हे काहींसाठी फायद्याचं असलं तरी त्याचा मोठय़ा प्रमाणावर गैरवापरही होऊ शकतो.
•या समाजमाध्यमांत आपण कसे वागतो, कशाला ‘लाइक’ करतो, कशावर कशी प्रतिक्रिया नोंदवतो याचं पूर्णपणे विश्लेषण होत असतं. आणि व्यावसायिक, राजकीय कारणांसाठी या विश्लेषणाचा उपयोग करता येऊ शकतो; किंबहुना तो केला जातोय.
•मायकेल कोसिन्स्की हा विख्यात मनोविश्लेषक व केंब्रिजमध्ये मायकेलचा सहाध्यायी डेव्हिड स्टिलवेल यांच्या अध्ययनानुसार,
•एखाद्या व्यक्तीच्या फेसबुकवरच्या फक्त ६८ लाइक्सवरनं ती व्यक्ती गोरी की काळी, स्त्री की पुरुष, धूम्रपान करणारी/ न करणारी, मद्यपान करणारी/ न करणारी आणि मुख्य म्हणजे त्यांची राजकीय आवडनिवड.. हे सगळं सगळं निश्चित करता येऊ शकतं. यातली अचूकता ९५ टक्के इतकी निघाली. म्हणजे अशा पद्धतीनं काढलेल्या शंभर निष्कर्षांतले फक्त पाचच अंदाज त्याचे तितकेसे बरोबर आले नाहीत. बाकी सगळे तंतोतंत तसे निघाले. पुढे पुढे या लाइक्सची संख्या आणखी कमी झाली. साधारण १० लाइक्सवरनंच त्याला हे सगळे अंदाज बांधता यायला लागले. यातला भयानक धक्कादायक भाग म्हणजे एखाद्याच्या ७० लाइक्सचा अभ्यास केला तर ती व्यक्ती तिच्या जवळच्या स्नेह्यलाही कळली नसेल इतकी कळते, १५० लाइक्सचा अभ्यास केला की त्या व्यक्तीच्या आई-वडिलांनाही कळलं नसेल इतकं काही कळून येतं. आणि ३०० लाइक्सचं विश्लेषण केलं तर त्या व्यक्तीच्या जोडीदाराला कळलं नसेल इतकं काही समजून येतं.
•याच तंत्रज्ञानाचा वापर ब्रेग्झिट आणि ट्रम्प यांच्या निवडणुकीत जनमत घडवणारं तंत्र एकाच कंपनीकडनं राबवलं गेलं ती कंपनी म्हणजे अलेक्झांडर निक्स यांची ‘केंब्रिज अॅनालिटिका.’
•ट्रम्प यांना अर्थातच केंब्रिज अॅनालिटिकाचं महत्त्व पटलंय. म्हणून तर या कंपनीच्या संचालकातले एक स्टिव्ह बॅनन हे ट्रम्प यांचे धोरण सल्लागार म्हणून नेमले गेलेत. आता अशीही बातमी आहे, की इंग्लंडमध्ये पंतप्रधान थेरेसा मे यांनी आगामी निवडणुकीसाठी या कंपनीशी बोलणी सुरू केलीयेत. निक्स हेही सूचित करतोय की स्वित्र्झलड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांतनं त्याला मागणी आहे.
•अर्थसंकल्पोत्तर भाषण करताना आपले पंतप्रधान बोलून गेले. निश्चलनीकरणाच्या काळात आम्ही प्रचंड डेटा गोळा केलाय, त्याची छाननी सुरू आहे. पाठोपाठ कारवाईही होईल.
•तो डेटाबॉम्ब आपणही अनुभवणार आहोत. आपण ऑनलाइन असू किंवा ऑफलाइन. आपल्यावर लक्ष ठेवलं जातंय.. कोणी तरी आहे तिथं!
संदर्भ:- लोकसत्ता
March 12, 2017
सूर्याचा अंत!
August 17, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti