नंदीबैलाचे खेळ करणे, भविष्य सांगणे यावर नंदीबैलवाल्यांची उपजिविका असते. नंदीबैलवाले मुळ आंध्रातले. ‘तिरूमल` हा त्यांचा मुळ देव. सरोदे, शिंदे, पवार, जाधव अशी नंदीबैलवाल्यांची आडनावे असतात. औरंगावबाद जिल्हातिल पैठण जवळी जेवूर हैबती हे नंदीबैलवाल्यांचे मुळ गाव.
विपश्यना या संकल्पनेचा त्यांनी प्रसार केला. त्यासाठी त्यांनी आपल्या एस्सेल वर्ल्डमध्ये मुंबईला स्तूपही बांधला. मुलांसाठी किड झी, झी लर्न आणि ब्रेन ट्रस्ट ऑफ इंडिया हे उपक्रमही ते राबवतात. आपल्या झी चॅनेलवर तरुण वर्गासाठी समुपदेशन करतात.
अहाहऽआ काय सुंदर उद्यान ! उंच उडणारी कारंजी, पुष्कराणी, तर्हतर्हेची फुलझाडे – फळझाडे, थंडगार हवा दाट झाडांची सावली, पक्ष्यांचे मंजुळ कुंजन… मन उल्हसीत करणारा सगळा देखावा. जणू स्वर्गातलेच उद्यान असावे असा भास व्हावा.
निसर्गाने महाराष्ट्राला मुक्त हस्ताने भरभरुन दिलं आहे. पण सर्वाधिक खुणवणारी बाब जर इथली कोणती असेल तर ती म्हणजे अथांग समुद्र किनारा आणि सह्याद्रीच्या दूरवर पसरलेल्या पर्वतरांगा. गेल्या काही वर्षांपासून “सह्याद्री” चं नाव, जगातल्या अॅडवेंचर्सच्या तोंडावर रुंजी घालतय, विशेष म्हणजे त्याच्या भेटीसाठी ट्रेकर्सचा ओघ वाढतोय.
शांतता, सुरक्षितता, सौहार्द, शिक्षण, आरोग्य, रोजगार आदी बाबींपासून कोसो दूर असलेला देश धोकदायक असणार नाही तर काय ? पाकिस्तानात जोपर्यंत इजिप्त, ट्युनिशिया, लिबिया प्रमाणे विद्रोह होत नाही व या हुकुमशहांना कायमचे संपविले जात नाही तोपर्यंत पाकी जनतेला सुख मिळणार नाही व तेथील धोकादायक परिस्थिती संपणार नाही.
फक्त पाकिस्तानच धोकादायक नसून तेथे वारंवार येणारे सैनिकी हुकुमशहा हे सुद्धा संपूर्ण जगाला धोकादायक आहेत…..!
मागे पुण्याच्या बाहेर एका कार्यक्रमाला जायचा योग आला त्यावेळी त्या आयोजकांनी मेनू विषयी मत मागितलं ...त्यावेळी त्यांना दिलेले हे उत्तर...
मेनू साधारण असा असावा-
वरण- भात, तूप, मीठ, लिंबू - त्याबरोबर शक्य असल्यास चमचाभर पूरण.
मसाले भात, पण त्यावर ताज्या ओल्या नारळाचं किसलेलं खोबरं आवश्यक...
पुऱ्या, अळुची शेंगदाणे-खोबरे घालून केलेली भाजी,
सुकी बटाटा भाजी, गोड-आंबट आमटी.
पापड-कुरडई. कोथिंबीर वडी किंवा घोसाळ्याची भजी.
ओल्या नारळाची कोथिंबीरीची चटणी, काकड़ी मोजक्या प्रमाणात दाण्याचा कूट व दही घातलेली कोशिंबीर.
चवी पुरतं पंचामृमत.
गोडात श्रीखंड किंवा बासुंदी.
मठ्ठा.
आता काही सूचना....लक्षपूर्वक वाचा..
आम्ही अंमळ तिखट कमी खातो तेंव्हा भरमसाठ मसाल्याचा मारा नको.
तेलात आंम्हास पोहावयाचे नाही, तेंव्हा तवंगाचा तलाव नको.
श्रीखंड असेल तर वाटी चमचा हवाच, उगाच श्रीखंड बचकन पानात वाढू नये...
आम्ही बोटाने चाटत श्रीखंड खात नाही...श्रीखंडाशी अशी प्रतारणा आम्हास मान्य नाही...
उगीचच गळेपडू आग्रह नसावा ( विनाकारण आग्रह करून वाढल्यास अपमान करण्यात येईल ) .
अळुच्या भाजीतील शेंगदाणे आख्खे असावेत, उगाच तुकडे तुकडे टाकू नयेत...
तसेच खोबरे देखील पाउण इंचा पेक्षा जास्त लांबीचे नको.
मठ्ठा हा प्रमाणशीर थंड असावा. त्यातील मीठ, साखर, ताक-पाण्याचे प्रमाण, आलं, कोथिंबीर योग्य प्रमाणातच हवी, त्यात मिरचीचे तुकडे घालणार असाल ते 5 ते 6 मी.मी. पेक्षा जास्त लांबीचे नकोत.
वरणाची डाळ एक-पात्रीच हवी, नाहीतर चव बदलते.
पापड-कुरडई मरतुकडे नको....त्याच्यातला कुरकुरीतपणा निघुन गेल्यास आमची कुरकुर सुरु होईल...
गोडात सुधारस ठेवल्यास तो एक तारीच असावा, लिंबू योग्य प्रमाणात असावे.
ताटातली भजी आणि भाजी ही चमचमीत हवी ...तिखट नको...
त्यामुळे उगाच गुलाल उधळल्यासारख तिखट त्यात उधळू नये...
आता पान वाढावयाच्या सूचना -
पाट मांडून त्यासमोर छान (आटोपशीर) रांगोळी घालावी.. रांगोळी स्पर्धा असल्यासारखे वागू नये.
पानाच्या डाव्या बाजूला लोटी भांडे ठेवावे...
पान समोर ठेवून अगदी पुढचा भाग शून्य अंश पकडून मिठ वाढावे आणि
त्याच्या उणे पाच अंशावर लिंबू अन मग क्रमाने पाच-पाच अंशावर चटणी, पंचामृत, कोशिंबीर, लोणचे
वाढावे...
उणे 90 अंशावर पापड़, त्याखाली पूरी वाढावी.
मध्यभागी भाताची मुद असावी व सगळं वरण भसकन वाढू नये... वरणाचा ओघळ अजिबात येता कामा नये...
मुदाचा आकार प्रमाणशीर असावा...भसाडा नको...
वरण-भाता खाली मसाले भात वाढावा.
मसालाभाताच्या उजव्या बाजुलाच भाजी वाढलेली असावी..
आणि त्याच्या बरोबर वर आमटीची वाटी असावी.
उजव्या हाताला वरच्या साइडला 45 अंशावर गोडाची वाटी असावी व त्याच्या वर मठ्ठा वाटी असावी.
आमटी व भाजी गोडाच्या खाली असावी.
वर नमूद केलेल्यात काही त्रुटि असल्यास दुरुस्त कराव्यात, उगाच आमच्या चुका आंम्हाला दाखवू नये.
बस ऐवढेच अपेक्षित आहे. सूचना संपल्या असे समजू नये. प्रत्यक्ष जेवताना असतीलच.
आपला , ( नम्र वगैरे म्हणून मान खाली घालणे आवश्यक नाही )
"काटेकोर" पुणेकर
पुणे महानगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवक आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचा चिरंजीव अविनाश बागवेला आज पोलिसांनी अटक केली आहे.
मैने खिडकीसे सीटपर रुमाल डाला था, (बसमध्ये प्रवास करतांना भांडणं निर्माण करणारी नेहमीची एक समस्या आणि एक सुंदर प्रवासवर्णन, नक्की वाचा)
अखंड भारताच्या घोषणांनी मसुरी, नैनितालची थंडी गायब. देशातील अब्दुल -नारायण – डिसुझा हाच भारताचा मालक असून, खरा धर्म हा केवळ राष्ट्रधर्म आहे असे कळकळीचे आवाहन वीर सावरकर चरित्र गायक सतीश भिडे ह्यांनी नुकतेच मसुरी, नैनिताल येथे केले.
चंद्रपूर हा विदर्भामधील जिल्हा असून धनसंपदेमुळे निसर्गसंपन्न झालेला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या नैऋत्य बाजूला राजुरा तालुका आहे. या तालुक्यामधे माणिकगडाचा वनदुर्ग आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti