(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • औचित्य जागतिक दृष्टीदान दिनाचे !

    मानवाच्या शरीराची पंच इंद्रिये त्यांना नेमून दिलेले कार्य करणारी असतील तर त्यांचा उपयोग आहे. शरीरावर नुसती पंचेंद्रिये असून काय फायदा? ती सशक्त, सुद्रुढ व कार्यरत नसतील तर काय कामाची? तसेच अगदी सुंदर रेखीव मासोळीदार काळेभोर टपोरे डोळे आहेत पण ते बघू शकत नाहीत तर त्यांचा काय उपयोग? दैनंदिन जीवनात पदोपदी डोळ्यांची आवश्यकता भासते.

  • नवीन व्रत

    एक आटपाट नगर होतं. तिथे एक सुंदर स्त्री रहात होती. घरगुती कटकटींनी कंटाळलेली, मुला मुलींच्या शिक्षणासाठी झटत होती. परंतु धीटपणे कर्तव्याला सामोरी जात होती. जबाबदारीचे ओझे, एकटेपणाची जाणीव, या सगळ्यांनी ती ग्रासली आणि आजारपणाच्या गुंताड्यात फसली बी.पी., शुगर यांनी शरीरात मांडले ठाण आणि आनंद, खुशी, हसू यांची उडाली धूळधाण.

    तशातच एके दिवशी तिच्या लेकीनं दिला स्मार्टफोन भेट आणि what's app मुळे मित्र मैत्रिणींशी संवाद घडू लागला थेट काहि दिवसांतच रिपोर्ट येऊ लागले नॉर्मल. चिकटून बसलेले बी.पी. शुगर वागू लागले फॉर्मल.

    ती आनंदली,what's app व्रताची यशवार्ता आल्यागेल्याला सांगू लागली.

    तिची एक सखी निर्मळ मनाची ! ती म्हणाली, मला पण सांग ना ग, हे व्रत ! उतणार नाही, मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही.

    स्त्री म्हणाली, बघ, रोज सकाळी उठताक्षणी ह्या देवाचे दर्शन करावे. GM, GNचा वेळोवेळी जप करावा.

    यथासमय देवाच्या देव्हार्‍यात डोकवावे, मन मोकळे करावे.

    एका ग्रुपने what's app ला वाहिलेले सर्व काही दुसऱ्या ग्रुपला यथाशक्ती मनोभावे अर्पण करावे.

    रुसू नये, रागवू नये, आपला ग्रुप सोडू नये. सखीने मनोभावे केले व्रत आणि आश्चर्य, चारच महिन्यात मिळाले फळ. शुगर कमी होऊन रडक्या मना येऊ लागले बळ.

    तुम्हीही व्रत हे धरावे,कामकाज काळवेळ सांभाळूनी त्रिकाळ what's app ला पुजावे.

    जसा हा देव त्या दोघी सखींना पावला, तसा तुम्हासही पावो. व्रत सर्व बंधुभगिनींनी करावे. साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण ....मन लाऊन वाचणाऱ्याला एक लाभ,फॉरवर्ड करणाऱ्याला अनेक लाभ.!!

  • आता मिळवा कष्टाशिवाय पैसा!

    आम्ही तुमच्या सार्‍या प्रश्‍नांना समर्पक आणि पुराव्यासह उत्तरे देऊ.

  • गृहनिर्माण संस्थांच्या सर्वसाधारण सभा कधी व कशाप्रकारे घ्यावी?

    हकार कायद्यातील नविन बदलानुसार, वार्षिक सर्वसाधारण सभा भरवण्याकरिता मुदतवाढ देणेची तरतूद नाही. परंतु, कोव्हीड-१९ च्या पार्श्वभुमीवर कायद्यात केलेल्या बदलाने सर्व गृहनिर्माण संस्थांना वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास ३१ मार्च, २०२१ पर्यंत सुट देऊन मोठा दिलासाच दिला आहे. तसेच, काही मार्गदर्शक सुचना देखील केल्या आहेत. तथापि, सदर सुचना सर्वसामान्य सदस्यांना माहित नसल्याने बरेच गोंधळून जातात. कायदे तज्ञाचा सल्ला न घेता, इतर कमेटी सदस्यांचा विचार न करता फक्त स्व:ता कायद्याच्या बडग्यापासून वाचण्यासाठी कमेटी सदस्यत्वाचा राजीनामा देतात.

  • रंगनाथ पठारे यांच्याशी संवाद

    रविवार, २ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ५ ते ६.३० या दरम्यान रंगनाथ पठारे यांच्याशी संवाद साधणार आहेत डॉ नीतीन रिंढे.

  • पुस्तके

    पुस्तके स्वप्नात येतात आणि विचारतात..
    'तू आम्हास ओळखले कां?'

    बोलता बोलता पुस्तके वितळतात
    आणि अथांग पाणी होऊन हेलावत विचारतात..
    'तू आमच्यात कधी न्हालास कां? पोहलास कां?'

    पुस्तके मग घनदाट वृक्ष होतात
    आणि विचारात ,
    'आमची फळे खाल्लीस कां
    छायेत कधी विसावलास कां?'

    पुस्तके भुरुभुरु वाहणारा वारा होतात नि विचारतात..
    'श्वासाबरोबर आम्हांला कधी उरात साठवलेस कां?'

    पुस्तके असेच काही विचारीत राहतात..
    एकामागून एक.

    प्रत्येक प्रश्नाला माझे काही उत्तर नसते;
    मी गप्प बसतो त्यांच्याकडे नुसता पाहत.

    तेव्हा पुस्तके सजावटीच्या कपाटात जाऊन बसतात
    नि म्हणतात..
    'म्हणजे आमचे आयुष्य व्यर्थच ना?'

    पुस्तके मूक होतात,
    झुरत जातात,
    स्वतःला वाळवीच्या स्वाधीन करतात,
    शेवटी आत्महत्या करतात ती-
    घरातल्या घरात,
    बंद कपाटाच्या कारागृहात...

    - शंकर वैद्य

  • भारतमातेच्या वीरांगना – २८ – प्रितीलता वड्डेदार

    १९३२ साली पाहाडतळी युरोपियन क्लब वर हल्ला करण्याची योजना सूर्य सेन ह्यांनी केली आणि ह्याची जवाबदारी प्रितीलता ह्यांच्यावर सोपवली. हाच तो क्लब जिथे बाहेर पाटी होती, “Indians and dogs are not allowed”. २४ सप्टेंबर च्या रात्री १०.४५ मिनिटांची वेळ निश्चित करण्यात आली. प्रितीलता एका पंजाबी युवक बनून गेल्या,तर त्यांचे इतर साथीदार वेगळ्या वेषात क्लब जवळ पोचले. आतमध्ये ४० इंग्रज उपस्थित होते. बॉम्ब ने हल्ला करण्यात आला. गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात एक व्यक्ती मारला गेला तर अर्ध्याच्या वर जखमी झाले. प्रितीलता आणि त्यांचे साथीदार तिकडून बाहेर पडले, पण इंग्रजांनी दिलेल्या प्रतिउत्तरात प्रितीलता ह्यांच्या पायाला गोळी लागली, त्या पळण्यास असमर्थ ठरल्या. इंग्रजांच्या हाती पकडल्या जाण्यापेक्षा त्यांनी मरण पत्करले. पोटॅशियम सायनाईड खाऊन त्यांनी आपले जीवन देशाच्या चरणी अर्पण केले.

  • कड्याच्या टोकावर पत्रकारिता

    बातम्या आणि जाहिराती यांच्यातले अंतर हळुहळू मिटत चालले आहे. कोविडनंतर तर जाहिरातींचा ओघ कमी झाल्यामुळे आर्थिक गणित जुळवण्यासाठी कसल्याही तडजोडी केल्या जातात. पेड न्यूज फक्त निवडणुकीच्या काळापुरत्या मर्यादीत राहिल्या नाहीत, तर त्या कायमच्याच मानगुटीवर बसल्या आहेत. त्यामुळे बातमी कुठली आणि जाहिरात कुठली हे वाचकांना कळेनासे झाले आहे.

  • दिल्लीतील मराठी पाऊलखुणा

    दिल्ली व मराठी माणूस यांचे नाते अतूट आहे. या संबंधाचा ऐतिहासिक मागोवा घेतला तर १७०७ सालापासून १८०३ सालापर्यंतचा सलग कालखंड डोळयासमोर येतो. शहेनशहा औरंगजेबच्या मुत्युनंतर येसूबाई व इतर २०० जण दिल्लीत डेरेदाखल झाले आणि हेच दिल्लीचे पहिले मराठी निवासी होत. १७०८ ते १७६९ या काळातील अंतोजी माणकेश्वर, महादेव हिंगणे, महादजी अशा चतुर, मुत्सद्दी सरदारांनी पेशव्यांच्यावतीने दिल्लीत अंमल केला. मराठी वकिलातीचे हे पहिले पाऊल म्हणावयास हरकत नाही.

  • बायको आणि तिचा मोबाईल

    परवा पेपरात बायकोने नवर्‍याला मारायची सुपारी दिल्याची बातमी वाचल्यावर माझे होश उडाले. कारण होते नवरा सतत वॉट्सअॅप आणि फेसबुकवर असायचा. मलाही वॉट्सअॅप आणि फेसबुकचा वापर जरा कमी करायला हवे याची प्रकर्षाने जाणीव झाली.