माहितीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञातील प्रगतीच्या जोरावर देश-विदेशात नवनवीन शोध लागताहेत आणि तरुणपिढीबरोबर इतरही मंडळी वाचन संस्कृती पासून दुरावत चालली आहेत असे काही विश्लेषकांच्या माहितीच्या आधारे कळते.
सध्याच्या वेगवान युगात वाहतुकीचे महत्त्व लक्षात घेऊन रस्ते सुधारणांवर भर दिला जात आहे. शिवाय प्रशस्त रस्त्यांची बांधणीही केली जात आहे. तरीही वाहतूक खात्याचे दुर्लक्ष आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन न करण्याची चालकांची प्रवृत्ती आदी कारणांमुळे रस्त्यांवरील अपघातांची संख्या वरचेवर वाढत आहे. परिणामी, हे रस्ते मृत्यूचे सापळे बनत आहेत. ही परिस्थिती कोण आणि कशी बदलणार हा खरा प्रश्न आहे.
याऐवजी मनुष्याने केवळ भगवान श्रीकृष्णांनाच शरण गेले पाहिजे.
समझोता (अंड़रस्टँड़ींग)
एका मुलाचे वेगवेगळ्या वयात असताना आपल्या वडिलांबद्दलचे विचार….
लेखांक ५
मृगशीर्ष वा मृगशिरा वा मृग नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीवर चंद्राचा आणि चंद्र कलांचा कमी-कमी होत जाण्याचा अन वाढत वाढत जाण्याचा परिणाम हा होतोच होतो. राशिचक्रातील वृषभ आणि मिथुन राशीच्या व्यक्तींचा जन्म मृग नक्षत्रावर झालेला असतो. जलाशय, नदीकाठ, समुद्रकाठी या व्यक्तींचा उत्कर्ष होतो. शितल रंगाच्या चंद्रप्रकाशात या व्यक्तींनी रहावयास म्हणजे जास्तीत जास्त वेळ व्यतीत केला पाहिजे. चंदेरी रंग, रंग चक्रातील शीतरंग, पांढरा रंग हे सर्व रंग या व्यक्तींचे लाभ देणारे रंग होय.
खैराचं म्हणजे काताचं झाड हे या नक्षत्राचं जवळचं असल्यामुळे या झाडाची पंचांगे म्हणजे मूळ-खोड-पान-फुलं आणि फळ तसेच या नक्षत्राचा स्वामी चंद्र किंवा सोम यांसह या नक्षत्राच्या मुहूर्तावर जन्मलेल्या व्यक्तींचा राशी, वृषभ आणि मिथुन यांपैकी जी ज्याची असेल तिचा आकारआणि ओम सोमाय नमः किंवा ओम चंद्रमसे नमः ही जपाक्षरे या सर्वांचं त्या व्यक्तीला प्रत्यक्ष पाहून, विशिष्ट चरणात म्हणजे चरण काळात बनविलेल्या त्या रंग आकारांच्या अचूक आणि सुचक रचनात्मक मांडणी द्वारा पेंटिंगला पूर्वाभिमुख दिशेला म्हणजेच पश्चिम दिशेला असलेल्या भिंतीवर सदर पेंटिंग लावले की, त्या व्यक्तीस आणि त्या वास्तूस अनेक सुखद अनुभव येऊ लागतात. यात काळजी काय घ्यायचीय? तर विशिष्ट वेळेला पेंटिंगमध्ये केलेल्या अर्थात उल्लेखिलेल्या स्वामींचा जप, जप सुरू असतानाच विशिष्ट दिशेला तोंड करूनच ते पेंटिंग चितारायला लागते.
हे सर्व झाल्यानंतर राहुकाळ तपासून तो टाळून पेंटिंग दिलेल्या म्हणजे सुचविलेल्या भिंतीवरच्या जागी लावावे.
या लेखात एक प्रतिकात्मक पेंटिंग दिलेले आहे. त्याचा आकार, त्या पेंटिंग मधील आकार यांना महत्त्व आहे. जप देखील कॅलिग्राफीच्या पद्धतीने चित्र घटक विषय म्हणून रंगविला आहे.
बऱ्याचदा खैर वृक्षउपलब्ध झाला नाही तर अडुळसा शेवरी या वनस्पती वृक्षांचा पंचांगांसह पेंटिंगमध्ये उपयोग केला जातो. रंग, आकार, जपाक्षरे, आणि व्यक्तीनुरूप पेंटिंग मधील घटकांची रचना या चतुसूत्रींवर पेंटिंग त्या वास्तूशीअन वास्तुमधील व्यक्तींशी ते बोलू लागते.
शुभं भवतु
प्रा. गजानन शेपाळ
१)आयुष्यातील सगळी गणितं निव्वळ बेरीज,वजाबाकी,गुणाकार आणि भागाकार यांच्या मदतीने सुटत नाहीत वा उत्तराबद्दल ठाम भाकीत करता येत नाही.या गणिताचं संपूर्ण ज्ञान आणि भरपूर सराव काही हमखास उत्तरं मिळवण्याचा मार्ग नव्हे.शेवटी नियतीनं तिच्यापाशी राखून ठेवलेला एक हाच्चा सगळी गणितं सोडवीत असतो . आणि याच हाच्च्याचा ज्याला अर्थ कळला त्याला आयुष्यभर गणिताची भीती उरत नाही.--- गणित हा सरावाचा विषय आहे.एकदा विशिष्ट प्रकारच्या गणिताला सोडविण्याची रीत कळली नि तशी भरपूर गणित सोडविण्याचा सराव केला कि परीक्षेतील शंभर पैकी शंभर गुणांची बेजमी झालीच म्हणून समजा....पण आयुष्यातलं गणित हे कुणालाच न कळलेलं कोडं आहे....इथं काही भाग्यवंताना ते सुटलेले असते...पण ते इतरांना समजावून देण्यात त्यांना यश येईलचं याची शाश्वती नाही....किंबहुना ते त्यांना सुटलेले आहे याचा भास होत असावा....काही भाबड्याना या सुटलेल्या कोड्याची खबर होत नाही ...ते पुन्हा पुन्हा पाप – पुण्याचा ताळा करीत बसतात...प्रत्येकाला आपल्यापेक्षा शेजाऱ्याचे प्रश्न...कोडी सोपी वाटतात...शेजारच्या घरातील तोळाभर आनंदाचे ओझे त्याला स्वत:च्या मणभर दु:खापेक्षा जड होत असते...पूर्वी पावकी...निमकी..मुखोदगत असणाऱ्या जमान्यात स्वत:ची गणितं स्वत:च सोडविण्यास फार जिकिरी कधीच होत नव्हती...पण या कलियुगात ... जिथं आजची तारीख विचारली तर मनगटावरल्या घड्याळाला विचारलं जातं ... तिथं सगळ्याच सोप्या सोप्या पायऱ्यावर कुठल्या ना कुठल्या कुबड्यांची मदत अपरिहार्य ठरत आलीय...वास्तविक अशा परावलंबी वृत्तीने माणसाची प्रतिकारशक्ती...विचारशक्ती...नि स्व-गुण ...कौशल्य...ओळखायची...जोपासायची सवय लुप्त झाली आहे...कायम साखळदंडात बांधला गेलेल्या सर्कशीतील हत्तीला जसं साखळदंडातून मुक्त केलं तरी मुक्त होण्यासाठी त्याचा पाय उचलत नाही ...तसं आपलं होतं...शिक्षणामुळे माणूस सुशिक्षित झाला पण सुसंस्कृत झाला असं म्हणायला काही जीभ रेटत नाही...कारण सुशिक्षितपणा आणि सुसंस्कृतपणा या दोन वेगळया गोष्टी आहेत...या दोन गोष्टींपैकी पहिल्या गोष्टीचा केवळ अभ्यासाशी नि दुसऱ्या गोष्टीचा नेक संवादाशी संबंध आहे .भूकेपुरते खाणे ही झाली प्रकृती....भुकेपेक्षा जादा खाणे ही झाली विकृती....नि स्वत:च्या चतकोर भाकरीतला नितकोर तुकडा कुणा भुकेल्या प्राण्यास देणे ही झाली संस्कृती...आणि ह्याच संस्कृतीचा वारसा आपल्या पिढ्यांनी चालवावा असं म्हणणे हीच नाही का माणसाची माणूस म्हणून ओळख
१७.०४.२०१३
निसर्गाची वैविधता काय असते आणि त्याचं स्वरुपही किती विस्मयकारक असू शकतं, हे जर का पाहायचं असेल तर किमान एकदातरी कास पठारला भेट द्यायलाच पाहिजे..
घात
काजळाचा देह माझा राबणारे हात
कधीची मी निथळत उभी रे उन्हात
तुझ्या तुळशीची बाग सुके अंगणात
लक्ष्मी तरणीताठी रे रुसते रानात
Copyright © 2025 | Marathisrushti