(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मदत कुणालाही करु शकता…

    madat-konalahi-karu-shakata

    मदत करण्याची इच्छा तीव्र असेल अन त्यामागील भावना प्रामाणिक असतील...

    तर कोणीही, कुणासही कधीही कशीही मदत करू शकतो ...

    फक्त इच्छाशक्ती पाहिजे ..

  • गायीचे प्रेम

    रस्त्याच्या वळणावर एका झाडाखाली एक गाय शांत उभी होती. फक्त मानेची व शेपटीची हालचाल अधून मधून चालू होती. कितीतरी वेळ ती तशीच उभी होती. जाणारा येणारा तिच्या कपाळाला, शिंगाला व अंगाला हात लावून तिला नमस्कार करू बघत होता. डोळे मिटून शांत विश्रांती घेत असालेल्या त्या गायीला, प्रत्येकाचा स्पर्श होत असल्याची जाणीव, तिच्या किंचितशा हालचालीवरून दिसून येत होती. तिला त्यांच्या स्पर्शाबद्दल काय वाटत असावे, हे समजण्यास मार्ग नव्हाता. परंतु प्रत्येक वाटसरूला तिला स्पर्श करून,

  • मंगेशकर कुटुंबियांचा एक दुर्मिळ फोटो

    स्वरांची अफलातून किमया असलेल्या मंगेशकर कुटुंबाचा हा दुर्मिळ फोटो

  • बंजारा समाजातील होलिकोत्सव

    प्राचीन काळापासून दर्‍याखोर्‍यात वावरणार्‍या बंजारा समाजाचा इतिहास बंजारा लोकसंस्कृतीमधून दिसून येतो. बंजारा समाजाचा होळी उत्सव म्हणजे ग्राम रंगभूमीवरील टोटल थिअटरचा अविश्कार म्हणावा लागेल.

  • वृत्तवाहिन्यांचे भान सुटले

    अलीकडे टीआरपी वाढविण्याच्या हव्यासापोटी विविध वृत्तवाहिन्या आपले तारतम्य सोडून बातम्या दाखवत आहेत असे दिसते. आणि विशेषतः जेव्हा कधी मुंबईवर अतिरेकी हल्ले किंवा बॉम्बस्फोट होतात तेव्हा ही बाब प्रकर्षाने जाणवते. या नादात वृत्तवाहिन्या आपणच ‘गुप्तचर’ असल्याच्या अविर्भावात, (जेव्हा की तपासयंत्रणा अजून घटनास्थळावरून सॅम्पल गोळा करत होत्या, त्यानंतर त्यांची तपासणी होऊन त्याचे निष्कर्ष जाहीर होणार त्याआधीच) स्फोटके कोणती वापरली गेली, या बॉम्बस्फोटामागे कोणत्या संघटनेचा हात आहे हे फक्त आपल्यालाच ‘कळले’ अशा थाटात बातम्या दाखवताना दिसत होत्या.

  • बेवड्याची डायरी !

    एका व्यसनीला व्यसनातून बाहेर पडण्यास इच्छाशक्ती देण्यासाठी नेमके काय उपचार होतात ? याबाबत अनेकांना कुतूहल असते. तसेच व्यसनमुक्ती केंद्राबाबत अनेक गैरसमज देखील असतात ..तेथे मारतात ..टाॅर्चर करतात ..पोटभर जेवण मिळत नाही वगैरे गैरसमज आहेत ..माझ्या ‘ बेवड्याची डायरी ” या लेखमालेत मी आमच्या ‘ मैत्री व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद ‘ नागपूर ..येथे कसे वातावरण असते ..काय काय घडते …कशा गमती जमती तसेच गंभीर घटना घडतात ..याबाबत लिहिले आहे

  • वाद देवस्थानांच्या संपत्तीचा

    अलीकडे समाज शिक्षित होत चालला आहे त्याबरोबर त्याची धार्मिक वृत्तीही वाढीस लागली आहे. त्यातून आर्थिक संपन्नता, वाहतुकीच्या सोयी आणि मिळणारा वेळ यामुळे देवस्थानला आवर्जून भेटी देणार्‍यांची संख्या मोठी आहे. त्याबरोबरच देवस्थानकडे देणग्यांच्या रुपाने येणाऱ्या पैशांचा ओघही वाढला आहे. पण या संपत्तीचा मूठभर पुजारी आणि मोजक्या विश्वस्तांकडून मनमानीपणे केला जाणारा विनियोग चिंताजनक आहे.

  • कुठे आहेत मराठी वाहिन्या?

    आजकाल जिकडे पहावे तिकडे घराच्या छतावर छत्र्यांचे पिक उगवलेले दिसते. आता केबल ऑपरेटरकडून कनेक्शन घेण्याऐवजी स्वतःच्या मालकीची डिशअँन्टेना घराच्या छतावर लावून वाहिन्या पहाणे लोकप्रिय होत आहे.

  • विज्ञानयुगात धर्माची आवश्यकता

    ‘जो धारणा करतो तो धर्म’ अशी धर्माची व्याख्या केली जाते. त्यातून समाजसुधारणेसाठी, तो सुव्यवस्थित चालावा यासाठी धर्म आहे हे सूचित होते, पण कित्येक वेळा धर्मातील अनिष्ट रूढींमुळे किंवा धर्मामधील भांडणामुळे समाजाची घडी विस्कटते. त्याची प्रगती खुंटते. तेव्हा आजच्या या विज्ञानयुगात धर्म आवश्यक आहे का? असा प्रश्न निर्माण होतो.

  • भारतमातेच्या वीरांगना – 16 – तारा राणी श्रीवास्तव

    १२ ऑगस्ट १९४२ भारत-छोडो आंदोलनाचे पडसाद देशभरातून उमटत होते. ताराराणी आणि त्यांचे पती श्री फुलेंदू बाबू ह्यांनी हेच औचित्य साधून एक पद-यात्रा काढायचे ठरवले. सीवान पोलीस चौकीवर तिरंगा फडकणे हा उद्देश ठेऊन. ह्या अश्या पदयात्रांवर ताबा मिळविण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज सुरू केला. त्यानेही गावातली लोकं मागे सरली नाही, तेव्हा पोलिसांनी ह्या सगळ्या निःशस्त्र लोकांवर गोळ्या झाडायला सुरवात केली. फुलेंदू बाबू आणि ताराराणी आघाडी सांभाळत होते. फुलेंदू बाबूंना गोळी लागली. आपल्याच साडीचा तुकडा जखमेला तात्पुरता बांधून तारा राणींनी आपली यात्रा परत सुरू केली.