(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पोस्ट ऑफिस बंद आहे !

    पोस्टऑफिसउघडआहे !
    या पोस्टचा जिकडेतिकडे समाज माध्यमावर धुमाकूळ सुरू दिसला. मला या "उघड्या पोस्ट ऑफिस " चा काही केल्या लवकर उलगडा होईना .यावर काही आचरट विनोद ही आले. आचरटच विनोद लोकांना भारी वाटतात .पण हे सभ्य लोकांना बोलता येत नाही. तेही जाहीरपणे ? बर ते जाऊ द्या ! हा सगळा घोळ झाला तो माझ्या घरचा टीव्ही मागील कित्येक वर्षात बंद असल्यामुळे ! हा काय प्रकार आहे ते माझ्या लक्षात आले नाही.पण आज मी माझ्या बंद टीव्हीची नाही तर बंद पोस्ट ऑफिस ची गंमत सांगणार आहे !
    सुनीता गुंजाळ , पोस्ट ऑफिस जवळ , कळंब .

    हा माझा पत्ताच होता .म्हणजे मी डबल आडनावाची नाहीतर सिंगल आडनावाची असतानाची ही माझ्या बालपणाची गोष्टय ! आमचं घर पोस्ट ऑफिसच्या आगदी जवळच होतं. आणि पोस्ट ऑफिस म्हणजे आम्हा सगळ्या मैत्रिणींचा खेळण्याचा तो अड्डाच होता. मी आठवी /नववीला असेल. मला हिंदी शिकवायला कदम सर होते .अगदी रुबाबदार व्यक्तिमत्व ! गोरेपान .पिळदार काळ्याभोर मिशा . अगदी हिरो सारखेच दिसायचे सर. पण भयंकर कडक होते. अख्खी शाळा त्यांना टरकायची. सर गृहपाठाच्या वह्या वर्गात तपासत होते. आपली वही आली की सरांच्या जवळ जाऊन उभा रहायचे .हा नियमच होता. माझा नंबर आला, तशी मी सरांजवळ जाऊन उभारले.

    "गुंजाळ....."
    सर कडाडले .तशी मी निमूटपणे उभी राहिले.
    " काल महाराणाप्रताप घोड्यावर बसून पोस्टात पत्र टाकायला आले होते !"
    मी प्रचंड घाबरले .
    "सर मी काल पोस्टात खेळत नव्हते ."
    अत्यंत घाबरत मी उत्तर दिले. " म्हणजे काल तू महाराणा प्रताप यांना पाहिले नाहीस!" सरांचा स्वर अजून वाढला होता.
    मी मानेनेच नाही म्हणाले.
    " तू मूर्ख आहेस का ?"
    मला काहीच समजेना. माझ्यापेक्षा जास्त वर्ग घाबरला होता .
    सर हळू आवाजात म्हणाले,
    ," तुला उत्तर देता येत नाही का ?
    ते कसे येतील आता. "
    सगळा वर्ग खो-खो हसायला लागला .मीही त्यात सामील झाले अन सर ही !
    पण त्या दिवसाने मला आत्मविश्वासाने प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला मात्र नक्की शिकवलं.
    90 च दशक म्हणजे पत्राचा जमाना होता तो .15 पैशाला मिळणार पोस्ट कार्ड पळत पळत जाऊन आणायला अन पोस्टात टाकायलाही तेवढीच मजा यायची. आम्हीही त्याकाळी बरीच पत्र लिहायचो. बाई मावशी या आमच्या लाडक्या पण अशिक्षित मावशीला आम्ही जास्त पत्र लिहायचो.ती कोणाकडून तरी ते वाचून घ्यायची .आमच्या सगळ्यांचीच ती आवडती मावशी होती .
    एकदा मोठ्या भावाने मावशीला पत्र लिहिले .पत्र मिळाल्यावर मावशीने ते नेहमीच्या वाचणाऱ्या मुलाकडे नेले .आणि ती त्याला पत्र वाच म्हणाली.
    " काकू काहीच वाचता येत नाही हे पत्र !"
    तो मुलगा म्हणाला.
    मावशी रागातच पण मनात म्हणाली
    "मेल्या तुलाच वाचता येत नाही ! माझ्या बहिणीचा मुलगा किती हुशार आहे!"
    (हे तिनेच आम्हाला नंतर सांगितले )ती दुसऱ्या व्यक्तीकडे पत्र घेऊन गेली. ते पण म्हणाले ,
    "पत्र वाचता येत नाही!" मावशी भयंकर चिडली .ती आणखी दोन-तीन व्यक्तीकडे तेच पत्र घेऊन गेली. पण कोणालाच वाचता आले नाही .आमच्या बंधूची ती करामत होती .कोणालाच वाचता येणार नाही असं पत्र लिहिलं होतं. महत्त्वाचं म्हणजे कॉम्प्युटर प्रिंट पेक्षाही त्याच अक्षर सुंदर आहे. मावशी प्रत्येक वेळी आली की ही आठवण काढायची.अन आम्ही हसायचो.मावशी गेली.पण आठवण कायम आहे.
    याच बंधूने आणखी एक करामत केली! तो खूप लहानही नाही पण आडमाप असतानाची ही गोष्ट. पोस्ट ऑफिस जवळ घर आहे कळाल्याने एका व्यक्तीने लिहिलेलं पोस्ट कार्ड त्याच्याजवळ पोस्टात टाकायला दिले .
    घरी आल्यानंतर त्याने ते पत्र वाचलं अन त्या पत्रात उरलेल्या रीकाम्या जागेत लिहिलं की ,
    "तायडीच्या लग्नाचा प्रयत्न करतो आहोत .पण अजून जमलं नाही ."
    आणि ते पत्र पोस्टात टाकलं. नंतर आईला हे कळालं .
    आईने कपाळावरच हात मारला. त्या एका वाक्याने पत्र मिळणाऱ्याच्या घरात काय काय गजब झाला असेल ? मागील कित्येक वर्षात आम्ही चर्चा करतो आहोत. पत्र लिहिणाऱ्याच्या घरातली तायडी अगोदरच विवाहित नसावी इतकीच प्रार्थना आईने केली .नाही तर काय भानगड झाली असती बिचारीच्या सासरी ! देव जाणे.
    पोस्टमन दारात आल्याबरोबर ,
    गुंजाळ ......गुंजाळ! असा जोरात आवाज द्यायचा .काय आनंद व्हायचा म्हणून सांगू. घरातली प्रत्येक व्यक्ती पळतच दारात येऊन पोस्टमन कडे अगदी आशाळभूत नजरेने पहायची. त्या दिवशी असेच पोस्टमन काका ,
    गुंजाळ ......गुंजाळ करत आले. ते म्हणाले,
    " सुनीता गुंजाळ कोण आहे ?"
    माझं नाव घेतल्यावर मी अगोदर घाबरले .
    "सुनिता गुंजाळ ची
    मनीऑर्डर आहे !"
    क्षणात स्वर्ग दोन बोटावर आला !.
    माझी मनीऑर्डर कसली ? प्रत्येकालाच उत्सुकता लागली. पण त्या अगोदर त्यांनी कागदात गुंडाळलेली वस्तू माझ्या हातात दिली. त्यावर बक्षीसाचं नाव ,कोणी पाठवलं .सगळी माहिती होती. मुलांसाठी असलेल्या स्पर्धेचे बक्षीस थेट पुण्याहून मला आलं होतं .मनामध्ये मोर थुई थुई नाचायला लागला. पोस्टमन काका माझ्या सह्या घेत होते .मनी ऑर्डर पाहण्यासाठी आता घरच्या सोबत शेजारीपाजारी सुद्धा गोळा झाले .कारण मला मनी ऑर्डर आली हे जणू काही आठवे आश्चर्यच बनले होते .पोस्टमन काकांनी सगळी प्रोसिजर झाल्यावर खिशातून एक रुपया काढून माझ्या हातावर ठेवला. शेवटचं बक्षीस अनेकात विभागून माझ्यापर्यंत एक रुपया आला होता ! सगळेजण हसायला लागले. या रुपयासोबत किल्ल्यावरचे मावळे तयार करण्याचा साचा बक्षीस म्हणून होता .पोस्टमन नाकीलमामाही हसत हसत निघून गेले. मला प्रत्येक वेळी ते घरी टप्पा घेऊन आले की ते त्या मनीऑर्डर मुळे मलाच हसतात !असे वाटायचे .पण आई म्हणायची ,
    " नाही ग नाकील मामाचा चेहराच हासरा आहे !"
    आईने दुकानात काही सामान आणायला पाठवले की ,मी थोडा वेळ पोस्टात खेळायचीच .पत्र टाकतात त्या पेटीच्या खाली एक आडवी फळी मस्त ठोकलेली होती. त्यावर चढायचं आणि खाली उड्या मारायच्या. हा आमचा खेळच होता. बऱ्याच वेळी त्या पत्रपेटीत लांबपर्यंत हात घालायचा .ती ही एक मज्जा असायची .त्या दिवशी सामान आणायचं म्हणून आईने एक नोट दिली होती. आणि माझ्याकडे एक छोटी पर्स होती .त्यामध्ये माझी काही चिल्लर होती. आईने दिलेली नोट त्या पर्स मध्ये ठेवून मी दुकानाला निघाले खरी पण ,मध्येच पोस्ट ऑफिस कडे वळले. एक दोन मैत्रिणी तिथेच गजगे खेळत होत्या .(परवाच विषय निघाल्यावर शेजारची छोटी दुर्गा ,
    काकू व्हॉट इज मिन बाय गजगे ! म्हणाली होती !)
    मी त्यांचा गजग्यांचा डाव मोडला. अन पोस्टातल्या त्या आडव्या फळीवर आम्ही चढलो. मी माझा हात त्या पत्रपेटीत घातला .पुन्हा काढला .एवढ्यात माझी ती पर्स आत मध्ये पडली .पर्स काढायचा प्रयत्न केला पण छे !काही केल्या जमेना .मग रडायला सुरू केलं. सोबत आनी होती. ती म्हणाली
    "अगं पर्स जिथे पडली तिथून आणू ,चल मला माहित आहे !"
    पण कसं शक्य होतं ?आम्हाला ते लोक खूप रागवायचे .आज पोस्ट ऑफिस नेमक उघड होतं. त्यामुळे आम्ही नेहमीच पोस्ट ऑफिस बंद होण्याची वाट पाहायचो.
    म्हणजे अगदी बिनधास्त खेळता यायचं. आम्ही सगळ्याच घाबरत घाबरत आतमध्ये गेलो.
    तसा एक जण जोरात खेकसला ,
    " आत काय काम आहे ग कारट्यांनो !"
    मी पुन्हा रडायला सुरुवात केली. एवढ्यात मला तिथेच नेहमीचेच पोस्टमन
    नाकीलमामा दिसले. माझा जीव भांड्यात पडला. आम्ही त्यांच्या कानावर घडला प्रकार घातला .ते पुन्हा तसेच गोड गोड हसले. .अन ती इटूकली पर्स जिथे पडली होती तिथून माझ्या ताब्यात दिली. आणि पुन्हा एकदा गड जिंकल्याचा आनंद मिळाला. पण घराजवळ पोस्ट ऑफिस असल्याने एक मात्र झालं, सारखं सारखं लिहायच आणि पोस्टाची सवय लागली .
    म्हणून तर मग माध्यमावर जेव्हा *पोस्ट ऑफिस उघड आहे* म्हटल्याबरोबर मला बंद पोस्ट ऑफिस ची माझी आठवण आली. आम्हाला उघड्या पोस्ट ऑफिस ऐवजी बंद पोस्ट ऑफिस का आवडायचे ते आता तुम्हालाही कळले असेल! हो की नै !

    सुनीता गुंजाळ -कवडे
    धाराशिव (उस्मानाबाद)

  • उंबरठा (१९८२)

    डी.व्ही. राव यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची सहनिर्मिती आणि दिग्दर्शक म्हणून डॉ. जब्बार पटेल यांनी धुरा सांभाळली असून, हा चित्रपट “बेघर” या कादंबरीवर आधारीत आहे. २९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये उंबरठा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून गौरवण्यात आले होते..

  • राशी व त्यांचे स्वभाव – वृषभ

    राशी :- वृषभ
    स्वामी :- शुक्र
    देवता :- वासुदेव विश्वरूप
    जप मंत्र :- ॐ ह्रीं विश्वरूपायनमः
    उपास्यदेव :- दुर्गा देवी
    रत्न :- हीरा

    जन्माक्षर :- ओ औ इ उ ए ऐ वा व वीवि वु वू वे वं ई ऊ वृषभ राशीवर शुक्र (ज्योतिष)ग्रहाची मालकी आहे. ही रास कष्टाळूपणा, सोशीकपणा, सतत कार्य करण्याची धमक व दीर्घोद्योग हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शवते. ही सम राशी आहे. कुंडलीतील समस्थानात सम राशी सामान्यत: बलवान असते असे
    मानले जाते. ही स्थिर आणि पृथ्वी तत्वाची राशी आहे. तसेच ही चतुष्पाद राशी आहे. चतुष्पाद राशी दशम भावात बलवान असतात. ही पृष्ठोदय राशी आणि रात्रीबली राशी आहे. ही मध्यम प्रसव आहे. वृषभ ही रास चंद्राची रास आहे. या राशीच्या व्यक्ती तेजस्वी, बुद्धीमान असतात. लोकांना आपलेसे करणारी ही रास आहे.

  • आठवणी

    आठवणींचा जगण्याशी संबंध सांगणारी कविता

  • सुरक्षित, प्रागतिक चैतन्योत्सवासाठी

    गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करायचा असेल तर त्यासाठी इच्छाशक्तीची, सद्सद्विवेकबुद्धीची गरज असते. गणेशोत्सव मंडळांनी समाजाशी असलेली बांधिलकी लक्षात घेऊन उत्सव विधायक पद्धतीने साजरा करायला हवा. उत्सवाच्या निमित्ताने गणेशासमोर नतमस्तक होऊन केवळ प्रार्थना करून चालणार नाही तर प्रयत्न, निष्ठा, निश्चय आणि भक्तीच्या साहाय्याने ध्येयाकडे मार्गक्रमण केले पाहिजे.

  • जाहिरात : अंदर की बात

    जाहिरातींतून जे जे येत आहे ते समाजाचे मानस ठरत आहे. केवळ मालाचे खपच नव्हे तर राजकीय, सामाजिक आर्थिक चित्राला जाहिराती रंग देत आहेत. जाहिरातीतून नको ते बिंबवलं जातय, नको त्या वस्तूंचा संग्रह वाढीस लागत आहे. शेजार्याबकडे आहे मग आपल्याकडेही हवं ही वृत्ती वाढली. जास्त जाहिरात, मोठी जाहिरात, सातत्याने जाहिरात लोकांच्या मानसिकतेवर परिणाम करत आहे, खच्चीकरण करत आहे.

  • दृढ निश्चय

    दृढ निश्चय करुन सकाळी उठलो, आवरलं, आणि पिशवी भरायला घेतली.

    बायको: कुठं निघालात?

    आम्ही: हिमालयात

    बायको: ट्रेकिंगला?

    आम्ही: सन्यास घेतोय.

    (बायकोने आमच्या कपाळाला वगैरे हात लाऊन पाहिले, बहुतेक ताप चेक करत असावी)

    बायको: आता हे काय मध्येच?

    आम्ही: सन्यासी लोकांना सध्या चांगला स्कोप आहे. 2024 ला या अखंड महाराष्ट्राचा मामु…………

    बायको: अहो, पण तो पर्यंत मार्केट राहील का सन्याशांच?

    आम्ही: जो पर्यंत सुर्य-चंद्र …………

    बायको: (किंचाळत) आणि हे काय? या तांब्याच्या तांब्याचे हे हाल कोणी केले?

    (काल आम्ही गुपचुप तांब्याला दोन भोकं मारुन नायलॉनची दोरी बांधली होती.)

    आम्ही: ते कमंडलु आहे.

    बायको: (रागाने) आपल्या लग्नात मिळालेला तांब्या होता, माझ्या बाबांनी ………

    आम्ही: हे बघ आता मोह, माया यापासुन दुर राहिले पाहिजे. आम्ही दोन वर्षाने परत येऊ, पण आपण 14 वर्ष तपश्चर्या केली असं लोकांना सांगायचं.

    बायको: (ओरडत) कायपण काय? अजुन लग्नाला दहा वर्ष झाली नाहीत.

    आम्ही: गणित चुकतय काय?

    बायको: साफ चुकतय.

    आम्ही: ठिक, मग सात वर्ष दिवस रात्र घोर तपश्चर्या केली असे सांगु.

    बायको: (त्राग्याने) काय करायचे ते करा, माझी मला कामे पडलीत.

    (आम्ही आमचे उरकुन निघायच्या तयारीत,बायकोची परत एंट्री)

    बायको: (किंचाळत) अहो काय घातलयं हे?

    आम्ही: (निर्विकारपणे) भगवी वस्त्र

    बायको: कसली डोंबलाची वस्त्र, माझा गाऊन आहे तो.

    आम्ही: पण भगवाच आहे ना?

    बायको: गप काढा.

    (मधेच पोराची एंट्री, कापडी पिशवी घेऊन)

    मुलगा: बाबा पैसे द्या.

    आम्ही: कशाला?

    मुलगा: रविवार आहे, मटण आणायचेय.

    बायको: (आमचे पाकिट काढुन घेत) हे पाकिट आणि एटीएम इथच ठेवा, याची गरज नसतेय सन्याशाला, (मुलाला उद्देशुन) हे घे पैसे.

    मुलगा: बाबा तुमचं फायनल झालयं का?

    आम्ही: काय बेटा?

    मुलगा: हिमालयात जायचे.

    आम्ही: कारे?

    मुलगा: नाही म्हणजे जाणार असाल तर मटण आमच्या दोघांच्या पुरतेच आणायला.

    (मनात चलबिचल)

    बायको: जा, दोघांसाठीच आण, यांच डोकं फिरलयं.

    (मुलगा चप्पल घालुन बाहेर पडणार, एवढ्यात)

    आम्ही: थांब, हे बघ मांडीचं जास्त दे म्हणावं, आणि थोडे चॉप्स, चरबी जास्त टाकु नको म्हणाव, मागच्या वेळी…………

    मुलगा: माहिति आहे सगळं (आम्हाला दुर्लक्षित करुन बाहेर)

    बायको: अहो इकडं या, जरा कांदा कापायला घ्या.

    (सदर क्षणिक मोहापायी अखंड महाराष्ट्र एका हुशार आणि प्रामाणिक मुख्यमंत्र्याला मुकला)

    नुकताच कांदा कापुन झाल्यावर अश्रुनयनांच्या साक्षिने पोस्ट टाईप केली आहे.

  • ब्लॅक आउट

    हवामान सकाळपासून खराब होणार आहे असा व्हेदर फोरकास्ट आदल्या दिवशीच मिळाला होता त्यामानाने संध्याकाळी साडे सहाला डिनर होईपर्यंत सहन करण्याइतपत जहाज हेलकावत होते. पण रात्री दहा नंतर वाऱ्याचा वेग वाढला होता. सुं सुं करत वाहणाऱ्या वाऱ्यासोबत लाटांनी सुद्धा आक्राळ विक्राळ रूप धारण केले होते. जहाज येणाऱ्या लाटेवर स्वार होऊन दुसरी लाट यायच्या आत दोन्हीही लाटांच्या मध्ये धाडकन खाली आदळत होते आणि पुन्हा एकदा उसळी मारल्या सारखं वर येत होतं.

  • माझी रीमाताई

    ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांचा रीमा लागू यांच्याबद्दलचा हा लेख

  • गुलाबजाम आणि जिलेबी यांचे एकमेकांवर खुप प्रेम

    गुलाबजाम आणि जिलेबी यांचे एकमेकांवर खुप प्रेम...दोघांनी नीट विचार केला आणि त्यांच्या आधी, त्यांच्या उपरोक्ष कोणी घरी सांगण्याऐवजी त्यांनीच आपले प्रेम प्रकरण आपल्या आपल्या घरी सांगून टाकले...

    आता गुलाबजामचे वडील श्रीखंड आणि आई बासुंदी ही साधी माणस...रितीरिवाज जपणारी, सणवार सांभाळणारी आणि तरीही आधुनिकतेची जाणीव असणारी...त्यांचा फारसा विरोध झाला नाही..

    जिलेबिचे वडील बूंदीचे लाडू व आई ईमरती यांचा तसा प्रेम विवाह तरीही इमरतीचा याला नकार ...इमरती जाम हट्टी..कट्टर...धष्टपुष्ट पंजाबी..तिचा मात्र विरोध होता....त्याचे कारणही असे की तिची मुलगी जिलेबी एवढी नाजुक-साजुक,कवळी काकड़ी सारखी, गोरीपान आणि त्याउलट गुलाबजाम गलेलठ्ठ, काळा सावळा आणि

    त्यात गुलाबजामचा मोठा भाऊ कालाजाम एक नंबरचा गुंड दिसायचा...

    खुप समजून सांगितले पण इमरती काही ऐकेना... मग बूंदीच्या लाड़वाने आपल्या परदेशी मित्राला म्हणजे रसगुल्ला आणि त्याची पत्नी रसमलाई यांना मध्यस्थ घातले आणि कसेबसे इमरतीचा होकार मिळवला...

    लग्नाची बोलणी सुरु झाली...बैठका झाल्या...याद्या झाल्या...देवाण घेवाणीचा प्रश्नच नव्हता...फक्त चार वयस्कांचे मानपान एकमेकांनी करायचे व वर्हाड़ी मंडळींना पंचतिखटीय, चटपटित, चमचमित, जेवण द्यायचे हे तय झाले...

    आणि बघता बघता जिलेबी आणि गुलाबजामच्या विवाहाची तारीख निच्छित झाली..

    सगळे कामाला लागले...निमंत्रणे धाडली जावु लागली...

    बूंदीच्या लाडुचा गोतावळा मोठा, अगदी रव्यापासून, मग बेसन,शेंगदाना ते मोतीचूर पर्यन्त सगळ्यांना निमंत्रणे गेली...

    इमरतीने आपल्या बहिणीला रबड़ीला मदतीला बोलावून घेतले,तिच्या बरोबर लस्सीही आली...

    इकडे श्रीखंडाने आपल्या मोठ्या भावाला आम्रखंडाला बोलावणे धाडले..बासुंदीची बहिण खीर आणि त्यांची सगळी मूल, रवा, गवले, तांदूळ इत्यादि यांना बोलावले गेले...

    बोलता बोलता...लग्नाची तारीख येवून ठेपली..

    मांड्याच्या पुरणपोळीचा मांडव घालण्यात आला...

    मुंबई हलव्याचे स्टेज तयार करण्यात आले..त्यावर छान सूंदर सोनपापडीचे जाजम अंथरण्यात आले...

    स्टेजच्या मागे...वेगवेगळ्या प्रकारच्या चॉकलेटची फुले आणि तऱ्हेतऱ्हेच्या गोळयांच्या माळांनी आरास करण्यात आली..

    पिठीसाखरेची रांगोळी घालण्यात आली...

    स्टेजवर चढण्यासाठी काजुकतलीच्या पायऱ्या करण्यात आल्या...

    हळूहळू पाहुण्यांनी मंडप भरू लागला...विविध प्रकारच्या बिस्किटाच्या, नानकटाइच्या खुर्च्या मांडण्यात आल्या..

    एक एक पाहुणे येवू लागले.... बालुशाही आपल्या राजेशाही थाटात मंडपात विराजमान झाली.... ...वेगवेगळ्या बर्फीची लगबग सुरु झाली...

    कलाकंद, घेवर, मालपुवा, गुळ पापड़ी इत्यादि मंडळी येवून विराजमान झाली...

    बूंदी, शंकरपाळी, चिक्की ई. लहान लहान मुले उगाच इकडे तिकडे पळत दंगा करत होती....नुक्ती आपला जूना रुबाब कायम ठेवत दुरून सर्व बघत होती....

    दूर कोपऱ्यात गावाकडून आलेले गोडीशेव आणि रेवड़ी आपले अंग चोरून एवढा तामझाम बघुन उगाच बिचकुन बसले होते..

    सगळ्यांची नजर चुकवत शंकरपाळा, रसभरीत कुल्फिवर लाइन मारत मंडपात तिच्या मागे मागे फिरत होता...

    म्हैसूरपाक,गाजर हलवा आणि मुगडाल हलवा आल्या गेल्याचे स्वागत करत होते..

    आमरस बाहेर गावी गेला असल्याकारणाने त्याची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती.

    तेवढ्यात कोणीतरी सांगितले की वरमाय रुसून बसली...शेवटी म्हाळसा सारखीच ती, तिची समजूत काढत तिला स्टेजवर आणण्यासाठी सुतारफेणीच्या पायघड्या घालण्यात आल्या...

    मग याद्यात् ठरल्याप्रमाणे थोऱ्या मोठयांचा म्हणजे करंजी, साठोरी, अनारसे,नारळीभात, इत्यादि यांचा मानपान करण्यात आला.

    शिरा आणि त्याची बायको लापशी यांना 'मेहुन' म्हणून बोलावण्यात आले..

    तेवढ्यात गुरूजी म्हणजे 'उकडीचे मोदक' यांनी विवाह समय जवळ आल्याची व वराला वधुला मंडपात आणण्याची आज्ञा दिली...

    गुलाबजामचे मामा पेढ़े आणि जिलेबीचे मामा पेठा वधुवरांना घेवून मंडपात आले.

    साखर फुटाण्यांच्या अक्षता वाटण्यात आल्या...

    ग़ुलाबजामच्या पायावर पाकाचा अभिषेक करून पाद्य पूजन करण्यात आला...जिलेबी वधु आपल्या नारंगी शालुत खुपच खुलुन दिसत होती...तिला केशराचा टिळा लावण्यात आला...

    माहिम हलव्याचा अंतरपाठ धरण्यात आला..मंगलाष्टके झाली....

    छोट्या छोट्या गोळ्याच्या माळांचा हार वधु वरांनी एकमेकांना घातला...

    लग्न लागताच पंच तिखट आणि चमचमित जेवणाच्या पंक्ती उठु लागल्या..

    जेवणात...समोसे, कचोरी, भेळ, पाणीपुरी, SPDP ढोकळा, ठेपले, बटाटेवडा, मिरची वडा अश्या आणि अनेक पक्वान्नाचा फडशा पडत होता..

    जेवणावळी नंतर, जिलेबीची पाठवणीची वेळ आली.

    चॉकलेटची गाडी सजवली गेली...जिलेबी जाताना आईच्या गळ्यात पडून रड़ू लागली...ते पाहताच तिच्या वडिलांच्या म्हणजे बूंदीच्या लाडुच्या डोळ्यात सुधारस दाटुन आला तो अलगद पुसत त्याने जिलेबीला आशीर्वाद दिला...

    चॉकलेटची गाडी जिलेबी आणि गुलाबजामला घेवून रवाना झाली...

    -- WhatsApp वरुन फॉरवर्ड झालेली पोस्ट