(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • नाच रे मोरा…….. ग.दि.माडगूळकर

    “नाच रे मोरा” ह्या पुस्तकाद्वारे गदिमांच्या ५० वर्षांतील लिहिलेल्या विविध गीतप्रकारांचा खजिनाच आपल्याला उपलब्ध होत आहे.यात ‘चंदाराणी’,’शेपटीवाल्या प्राण्यांची’,’एक कोल्हा बहु भुकेला’,’चांदोबा चांदोबा भागलास का?’ यांसारखी बालगीते किंवा ‘जिंकू किंवा मरू’,’वंद्य वंदे मातरम्‌’ सारखी स्फूर्तीगीते, तसेच ‘नीज माझ्या पाडसा’ ‘बाळा जो जो रे’ यासारखी अंगाई गीते आकर्षक चित्रांसहित भेट म्हणून दिली आहेत. बालपणाच्या आठवणी जागवणारा आणि छोट्यांना त्यांचा बालपणीचा काळ सुखाचा करून तो चिरकाल लक्षात राहील असा हा गीतसंग्रह लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल.

  • होय मी धर्माभिमानी हिंदू आहे.

    हिंदू धर्माला विनाकाराण विरोध करण्यापेक्षा हिंदू धर्म म्हणजे नक्की काय हे मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न.

  • राशी व त्यांचे स्वभाव – कन्या

    राशी :- कन्या
    स्वामी :- बुध
    देवता :- पीताम्बर
    जप मंत्र :- ॐ ह्री परमात्मने नमः
    उपास्यदेव :- श्री कुबेर
    रत्न :- पाचू
    जन्माक्षर :- टो ट्रो प पा पृ प्रपि प्रि प्री पी पु पू ष ण ठ पे प्रे प्रो कन्या रास एक ज्योतिष-राशी आहे. राशीवर बुधाचाअंमल आहे. द्विस्वभाव, पृथ्वी तत्वाची ही रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे. मीन रास कन्या राशीचा विरोधी रास मानली जाते. उत्कृष्ट बुध्दीमत्ता संशोधक वृत्ती दिसून येते. वेळी कामाला येणारी अचाट स्मरणशक्ती आढळते. बुध्दीचातुर्य, हजरजबाबीपणा, हास्यविनोद याच्या जोरावर उत्कृष्ट लोकप्रियता मिळते. निरीक्षण हातोटी उत्तम. अंतर्मनाचा थांग लागू देत नाहीत. पैशाच्या बाबतीत काटेकोर, दूरचा विचार करणारी असतात. माणसाची उत्तम पारख असते.

  • निसर्ग आणि आपण

    संक्रांत होऊन गेली, की हवा गरम होऊ लागते. पहाटे आणि संध्याकाळी येणारे वारे सुखद वाटू लागतात. ‘तहान’ जागी होऊ लागते. या दिवसात मला आठवतं, आम्ही झाडाला मडकी टांगून ठेवत असू. त्या मडक्यात पक्ष्यांना प्यायला पाणी ठेवलं जाई. दिवसभर जाता-येता त्या मडक्यात पाणी आहे ना, हे पाहिलं जाई. झाडावरचे कावळे, चिमण्या ते पाणी पीत आणि तृप्त होऊन उडून जात.

  • मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी विकासातील योगदान

    १८ मे हा मराठवाडा कृषी विद्यापीठाचा वर्धापन दिन. १९७२ साली परभणी येथे या विद्यापीठाची स्‍थापना झाली. मराठवाड्यातील शेती व अनुषंगिक व्‍यवसायातील समस्‍या दूर करण्‍यासाठी संशोधन करणे, कृषी खाते तसेच इतर विकास खात्‍यातील विस्‍तार कार्यकर्त्‍यांना प्रशिक्षण देऊन पथदर्शक विस्‍तार कार्य करणे आणि कृषी विकासासाठी प्रशिक्षीत मनुष्‍यबळ निर्माण करणे ही तीन प्रमुख उद्दिष्‍टे विद्यापीठ स्‍थापनेमागे होती.

  • पनीर बर्फी (खाद्ययात्रा)

    पनीर वापरुन केलेली ही बर्फी

  • बिसुर (सांगली) ते मुंबई व्हाया ठाणे – भाग – २

    सन १९९० ला लग्न झालं आणि सुविद्या पत्नी म्हणुन वृषालीनं संसाराची गोडी वाढवली. कठीण प्रसंगात पोलीस खात्यात काम करणाऱ्या एका कलंदर माणसाबरोबर अपेक्षा न करता ती माझ्या मागे ठामपणे उभी राहिली. अनेक संकटं आली पण ती कधी घाबरली नाही. म्हणुन यशस्वी वाटचालच नाहीतर मी उत्तुंग भरारी घेतली. कधी मागं पाहायला लागलं नाही. लग्नानंतर तिनं संसारवेल फुलवली. एका मागोमाग एक दोन फुलं बहरली.

  • हिंदुमहासभा आणि सावरकर

    १९०६ साली व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो ह्याच्या आशिर्वादाने मुस्लिम लीगची स्थापना झाली. मुस्लिम लीग ही पुर्वीपासून ब्रिटीशांशी एकनिष्ठ होती. लीगच्या स्थापनेमागे महत्वाचे कारण हिंदु-मुस्लिम ह्यांत दरी वाढवीणे. म्ह्णुन इंग्रजांची मुस्लिमांचे लाड पुरवणे व त्यांना अधिक प्रतिनीधीत्व देऊन त्यांचे राजकिय महत्व वाढवीणे व मुस्लिम बहुसंख्य प्रांत निर्माण करणे, अशी धोरणे हाती घेतली. त्या काळात आबालवृद्धांना मतदान करण्याची अनुमती नव्हती.प्राप्तीकर भरणारा, पदवीधर किंवा घर-जमीन असणाराच मतदान करु शकत असे.

  • माडगूळी डेज

    माझ्या कळतेपणापासून गेली जवळ जवळ पन्नास वर्षे माडगूळला जाण्याची कल्पना निघाली की सर्व प्रथम कोणत्या मार्गाने जायचे याची चर्चा घरात जवळ जवळ जाण्याच्या आदल्या दिवसापर्यंत चालायची. काहींचे मत पडायचे की कोरेगाव मार्गाने आटपाडीपर्यंत जावे, तर काहींचे कऱ्हा-वीटा मार्गाने! कुठलाही मोठा घाट नसलेल्या सोलापूर रोडने इंदापूर आणि तिथून अकलूज सांगोला मार्गे थेट माडगूळलाच जावे, तर काहींचे म्हणणे फलटण-म्हसवड मार्ग जवळचा असल्याने त्याच मार्गाने जावे असे असायचे. मला स्वत:ला मात्र कुर्डुवाडीवरून बार्शीलाईट रेल्वेने सांगोला आणि तेथून मोटारने माडगूळला जाणेच खूप आवडायचे.

  • साठे खत/खरेदी खत कधी करतात?

    घराच्या किमती दिवसेंदिवस वाढत असताना सुद्धा आपल्या मालमत्तेची कागदपत्रे इंटरनेट, सोशल मिडिया किंवा आपल्या परिचित व्यक्तींकडून घेतलेल्या कागदपत्रात थोडेफार फेरफार करून पैसे वाचवल्याचं आनंद हा तात्पुरता न राहण्यासाठी कायदेतज्ञांकडून करणे हे नेहमीच भविष्याच्या दृष्टीने चांगले असते. कारण प्रत्येक करार त्यातील अटी ह्या वेगळ्या असतात. अन्यथा तुमची छोटीशी निष्काळजी पुढे महागात पडू शकते.