(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • निरंजनदास बल्लाळ – गणेश

    निरंजनदास बल्लाळ हे गणेशभक्त व गीतेचे टीकाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. ते निरंजनस्वामी कऱ्हाडकर यांचे शिष्य. हे मूळचे बीडचे असा उल्लेख निरंजनस्वामींचा चरित्रकार नातू भगवंत देव यांनी केला आहे.

  • भारतभर हाच पाण्याचा नव्हे तर विचाराचा,कामाचा दुष्काळ आहे हे जाणवते.

    पाणी !! पाणी!! पाणी !! खेड्या पासून भारताची राजधानी दिल्ही पर्यंत सामान्य माणसाचा एकच आक्रोश पाणी द्या!

  • जाणिव

    एका सूनबाईने सासूबाईंना. पगार वाढ झाली आहे म्हणून फोन करून सांगितले. आणि सासूबाईंनी अभिनंदन केले. पण ईथेच संपले नाही खरा भाग वेगळाच कारण सून बाईंनी याच श्रेय सासूबाईंना दिले नातवाला सांभाळले होतेम्हणून ती नोकरी करु शकली व बढती मिळाली यावर काही तरी सांगायच आहे मला.

  • टूर अंबाणी दादांच्या महालाची

    अंबाणी दादांच्या महालाची फार चर्चा होत असते. त्या चर्चेमुळे आग्य्रातील ताजमहल आणि वाशिंग्टन येथील व्हाईट हाऊस हे राजवाडे कम महाल फिके पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय या दोन्ही महालांची नव्हाळी कमी झालेलीच आहे. ताजमहलाचं दर्शन बिल क्लिंटन पासून ते बाबूराव कोटलवार  आणि  मिशेलवहिनी ओबामा पासून मंगलाताई ओतारे यांच्यापर्यंत कुणीही,कधीही घेऊ शकतात.

  • बोथट बहिष्कारास्त्र ?

    अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 

    आज आपल्या देशात असे एकही क्षेत्र नाही, जेथे चीनने घुसखोरी केलेली नाही. साध्या सुईपासून ते महागातल्या महाग इलेक्ट्रॉनिक वस्तूपर्यंत आपण चिनी उत्पादनावर अवलंबुन आहोत. आपल्या संस्कृतीचा, जीवनपद्धतीचा अभ्यास करून टाकाऊ पण आकर्षक आणि कमी किमतीच्या वस्तू विक्रीस आणून चिनी ड्रॅगनने भारतीय बाजारपेठेला विळखा मारला आहे. चीनची भारतातील गुंतवणूक डोळे पांढरे करणारी आहे. त्यामुळे हा विळखा तोडायचा असेल तर सर्वात आधी आपल्याला सक्षम व्हावे लागेल.

  • ‘पैठण’- धावती भेट

    स्लीपर कोचच्या थंङगार वाऱ्यात आमचा प्रवास सुरु झाला. एव्हाना कधी सकाळ झाली आणि आम्ही औरंगाबादला उतरलो. आम्ही कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय, सीवूड, नवी मुंबईचे सभासद आणि उपाध्यक्ष देवळेकाकांनी बुक केलेल्या सुभेदार शासकीय विश्रामगृहात फ्रेश होऊन आम्ही कारने पैठण नगरीत निघालो.

  • मुंबईतली अस्तंगत झालेली ट्राम

    आज साठीच्या जवळपासच्या मुंबईकरांना ट्रामचा प्रवास नक्कीच आठवत असेल.

    मुंबईत घोड्यांची पहिली ट्राम ९ मे १८७४ रोजी आली. तीन आण्यात कुलाबा ते पायधुणी आणि अर्ध्या आण्यात पायधुणी ते बोरीबंदर असा प्रवास करता येत असे. १८९९ सालच्या प्रारंभी ट्रामने एका आण्यात मुंबईत कुठेही जाता येत असे. सहा ते ८ घोड्यांनी ओढली जाणारी ही ट्राम एका तासात सुमारे ५ मैल अंतर कापत असे.

    मुंबईतली ट्राम सुरुवातीला व्यापारी विभागांमध्ये सुरु केली गेली. कुलाबा - क्रॉफर्ड मार्केट - पायधुणी आणि बोरीबंदर - काळबादेवी - पायधुणी अशा २ मार्गांवरून ती सुरु झाली. यामध्ये ग्रॅंट रोड, पायधूनी, गिरगाव, भायखळा आणि ससून डॉक या भागांचा समावश होता.

    १९०७ मध्ये ट्रामचे विद्युतीकरण झाले आणि ती किंग्ज सर्कल पर्यंत धावू लागली. तोपर्यंत ट्रामचे शेवटचे स्थानक होते दादरचे खोदादाद सर्कल. शेवटच्या स्टेशनला टर्मिनस म्हणून संबोधतात. त्यामुळेच खोदादाद सर्कललाही दादर ट्राम टर्मिनस म्हणजेच दादर टीटी याच नावाने ओळखले जाऊ लागले. ट्रामची वाहतूक बंद झाल्यानंतर इतकी वर्षे लोटली तरी खोदादाद सर्कलचे दादर टी.टी. हे नावं आजही प्रचलित आहे. कधीतरी टॅक्सीवाल्याला सांगून बघा की खोदादाद सर्कलला जायचेय.. कदाचित त्याला कळणारही नाही.

    १९०७ मध्ये BEST ने ट्रामवाहतूक आपल्याकडे घेतली. ७ मे १९०७ रोजी विजेवर चालणारी ट्राम सुरु झाली आणि १९२० मध्ये डबल डेकर म्हणजेच दुमजली ट्राम सुरु झाली.

    ३१ मार्च १९६४ पासून मुंबईतली ट्राम कायमची बंद करण्यात आली त्यानंतर मुंबईत जलद वाहतुकीसाठी BEST च्या बसगाड्यांना सर्वत्र रस्ते मोकळे झाले.

    फेब्रुवारी २०१६ मध्ये दक्षिण मुंबईतल्या काही रस्त्यांचे दुरुस्तीकाम सुरु असताना अचानकपणे जुन्या काळातल्या ट्रामच्या रुळांचे अवशेष सापडले आणि मुंबईतली ट्राम पुन्हा एकदा चर्चेत आली होती.

    -- निनाद अरविंद प्रधान
    व्यवस्थापकीय संपादक, मराठीसृष्टी
    www.marathisrushti.com

    मुंबईच्या रंजक इतिहासातील टप्पे - भाग ३
    (क्रमश:)

  • एमबीडी (Master of ………)

    एमबीडी ः- आपल्यावर आपल्या आबांची खूपच कृपा आहे (ओळखा बर कोण ?) त्यामुळे भरपूर नोकऱ्या आहेत

  • वास्तुशास्त्र पेंटिंग – लेखांक सहावा – हस्त नक्षत्र

    वास्तुशास्त्र पेंटिंगमध्ये हस्त नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीचे संदर्भात काय काय लाभदायक असते ते या लेखात पाहू....

    ही वास्तुशास्त्र पेंटिंग त्या व्यक्तीशी तसेच त्या व्यक्तीवर अवलंबून असणाऱ्यांची इतक्या विविधपणे मुकसंवाद साधत असते की, जसं निरागस तान्ह बाळ, ज्याला बोलताही येत नसतं तरी त्याच्या भोवती ते बाळ साऱ्यांना प्रेमाची मोहिनी घालते.

    एका घट्ट नात्यातते साऱ्यांना अखडवून टाकते. तद्वतच हे वास्तुशास्त्र पेंटिंग जेव्हा जेव्हा या नक्षत्रावर जन्मलेल्या आणि त्या व्यक्तीच्या नावावर असलेल्या वास्तूत लावले जाते तेव्हा तीन ते सहा महिन्यात ते पेंटिंग त्या कुटुंबाच्या गळ्यातील ताईत बनते. सर्व कुटुंबीय त्याला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपतात. असं काय घडतं ? की, या प्रकारच्या वास्तुशास्त्र पेंटिंग द्वारे सकारात्मक बदल घडतात ?

    आपण आता हस्त नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीच्या संदर्भात विचार करूया. या नक्षत्रावर आधारित कन्या राशीच्या व्यक्तीच्या वास्तूत असलेल्या एका वास्तुशास्त्र पेंटिंगचा प्रतिकात्मक म्हणुन विचार करूया. कन्या रास असल्यामुळे एका स्त्री आकाराचा स्वैर आणि स्वच्छंदी हालचालींचा आकार, रीठा वृक्ष, जाई-चमेली अन मालती या वेलींच्या पंचांगांचा आकारयुक्त अभ्यास, कन्येचा स्वामी बुध आणि नक्षत्रस्वामी सूर्यदेव आणि त्याची पहाट संधेची रूपे ज्याला सविता म्हणतात. त्यांचा रंग आकार, हस्ताचे पाच तारे या साऱ्यांचे आकार या वास्तुशास्त्र पेंटिंग मध्ये असतात. त्यांचं प्रमाण, आकारांचे इंचात असलेली प्रमाण, रंगांच्या छटांची तीव्रताया बाबी, वैयक्तिक त्या हस्त व्यक्तीशी संवाद साधून ठरविल्या जातात. ते आकार या वास्तुशास्त्र पेंटिंग मध्ये आहेत. या साऱ्या रंगाकारांनी बद्ध झालेल्या कलाकृतीमध्ये नक्षत्रस्वामी श्री सूर्य देवाचा जप ओम सूर्यनारायणाय नमःकिंवा ओम सवितृ सूर्यनारायणाय नमः हा त्यातील अक्षरांचा पटीत हजाराने करावयास पाहिजे असतो. त्यामुळे त्या वास्तुशास्त्र पेंटिंग मधील रंगाकारांना एखाद्या सिद्ध बीज मंत्रा प्रमाणे शक्ती प्राप्त होते.

    शीत रंगांसह पिवळा, ऑफ व्हाईट, हिरवा- हिरव्याच्या विविध शेड्स आणि तपकिरी रंगाचा प्रभाव असलेला नारिंगी या रंगांच्या यथायोग्य प्रमाणांचं महत्व शाबित ठेवून हे पेंटिंग बनविले जाते.

    साऱ्यात सकारात्मक ऊर्जा मुळे त्या वास्तूत नकारात्मक ऊर्जा गाशा गुंडाळायला सुरुवात करते. तीन ते सहा महिने लागतात अद्भुत परिणाम अनुभवायला...!!

    शुभं भवतु

    प्रा. गजानन शेपाळ.

  • पिवळा रॉकेल

    परवा गावात मोडक्या वडाकडे... म्हणजे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी एक मिटींग घेतली गेली... सर्वपक्षीय.. गावातल्या जुन्या जाणत्यानी बोलवलि... विषय... गावातल्या रस्त्यांची परिस्थीती, आणि ऊपाय... सगळ्यानी आपआपली मतं मांडली... कॉन्ट्राक्टर लॉबीन हिरहिरीन मांडले की रस्ते करतांना गावची सगळी मंडळी समोर असते ... आणि काम पाऊस पडापर्यंत चोख आसता . एक पण खड्डा नसतो... आता पाऊसच जास्त तर आम्ही तरी काय करणार ?

    मन्या घोगळ्याचो पकलो म्हणता माका बोलाचा हा.... सरपंचान गप बस, अस सांगितलं पण... पण तो काय ऐकेना... शेवटी म्हातार्या बाबीन परवानगी दिल्यान... बोल काय ता.......

    पकल्यान सुरू केल्यान.... मंडळी मी ह्या रस्त्याच्या दुखण्याचो अभ्यास केलय.... आणि ऊपाय पण शोधलय..... आणी तो पण बिनखर्चाचो..

    फुकट ऊपाय आणि ईतक्या मोठ्या समस्येवर ?..... सगळ्यानी कान टवकारल्यानी.... तरी बाबी बोल्लोच..... मायझया कायय सांगशित तर व्हानेन मारीन... सरळ सांग. आणि कसा ता सांग...

    पकलो म्हणालो... मी सांगलेला नाय पटला तर जुत्यान मारा माका सगळ्यानी....

    एकच ऊपाय रॉकेल पिवळा व्हया

    असो प्रत्तेक गावान ग्रामसभेत ठराव घालुक व्हयो..... आणी शासनान निळ्या एेवजी पिवळा रॉकेल देवक व्हया..... आणि त्यानंतर होणारे रस्ते बघा पावसातय व्हावाचे नाय...... काळ्यात निळा मीसाळला तर समाजना नाय.... त्यामुळे पेट्रोलात जाऊचा बंद झालेला रॉकेल डांबरात मिक्स होता़. पिवळा रॉकेल झाला तर रस्तो पिवळो... दुसर्यादिवशी लोक काय करूचा ता करतले....

    बाबीन पाठी बगल्यान तर सगळे कॉन्ट्राक्टर गायब... मगे विषय समाजलो... कायतरी रॉकेल मुरता ह्या खरा.... मग १५अॉगस्ट च्या ग्रामसभेत विषय घ्यायचा ठरला आणि सभा संपली....

    १५ अॉगस्ट च्या ग्रामसभेक पकलो सोडुन सगळे हजर.... चौकशी केल्यावर समाजला ह्या मिटींगच्या नियोजनाची पार्टी होती रात्री... थयसून पकलो टाईट होऊन ईलो तो ऊटाकच नाय दिवसभर.....

    बाकी तुमी शाने आसातच......

    बापूर्झा
    डॉ. बापू भोगटे....