सद्या होणार्या बेताल वक्तव्याचा घेतलेला एक वेध किवा त्याचा एक उत्तर
एक प्रवास वर्णन....नागपूर जवळील उमरेड कऱ्हान्डला वन्यजीव अभयारण्य सफारीचा हा एक अदिव्तीय प्रवास अनुभव....
पुणे स्थित Insearch Outdoors आयोजित (८-१३ जून २०१६) ह्या वन्यजीव अभयारण्य सफारीला जायचा योग आला आणि धन्य झालो. माझ्या आयुष्यातील हा एक फारच आगळा वेगळा अनुभव म्हणावा लागेल. सर्वप्रथम ह्या सगळ्याचे श्रेय मी Insearch Outdoors संघाला देईन. अप्रतिम व्यवस्थापन, जबरदस्त नियोजन, उत्कृष्ट संघटन, वक्तशीरपणा, तसेच व्यावसाईक परंतु एकसंध कौटुंबिक जिव्हाळा असलेला तरुणाईचा हा संघ मला तर खूपच भावला. खास करून हे श्रेय शौरी सुलाखे आणि मयुरेश कुळकर्णी ह्यांना जाते. वय वर्ष ८ ते ८४ सगळे मिळून २३ जणांचे बांधलेले कडबोळे तर वाखाणण्याजोगेच म्हणावे लागेल. ह्या पोरांना असलेली जैवविविधतेची, प्राण्यांची, निसर्गाची आणि भौगोलिक माहिती तर तोंडांत बोटेच घालावयाला लावते. ही नुसती एक जंगल सफारी नसून आपल्या तुटपुंज्या ज्ञानात भरच टाकणारी एक कार्यशाळाच होती. माझ्या साठी तर हा आयुष्यातील वयाच्या ५३व्या वर्षी आलेला एक सुखद असा धक्काच होता. मी तर मंत्रमुग्धच झालो होतो.
तसेच उमरेड येथील श्री. निशांत बरडे ह्यांच्या श्री साई शीतल विश्राम मध्ये केलेली निवास व जेवणाची व्यवस्था तर अगदी घरच्या सारखी होती. त्यांचे काळजी घेणारे कुटुंबीय तर कौतुकास पात्र आहेत. त्यांनी केलेला आमचा पाहुणचार (व्यावसाईक असूनही) अगदी घरच्या सारखा होता हे फारच विशेष आहे. असो.. वरील प्रस्तावनेनंतर मूळ मुद्द्या कडे येतो.
मी आणि आमचे कुटुंब २०११ साली आयुष्यातील पहिल्या वहिल्या, केनिया येथील मसाई मारा ह्या जंगलातील सफारीला गेलो होतो, त्यानंतर वाटले की भारतातील जंगलामध्ये ही मजा येणारच नाही. परंतु माझा हा एक भ्रमच होता असे मला उमरेडला जाऊन आल्यानंतर वाटते. सर्वात महत्वाचे म्हणजे वेगवेगळ्या कुटुंबांबरोबर अशा सहलीला जाण्याचा माझा हा पहिलाच अनुभव आणि तो ही इतका अविस्मरणीय आहे की मी तर आता ठरवलेच आहे की सहलीला अथवा सफारीला जायचे असेल तर Insearch Outdoors बरोबरच जायचे.
गरीब रथ ह्या रेल्वेने ८ जूनला संध्याकाळी पुण्यातून प्रवास सुरु झाला. सगळ्यांशी ओळखी होत होत सर्व सामान लावून मस्त पैकी गप्पा मारत मारत घरून नेलेल्या जेवणाचा आनंद घेत ९ तारखेला सकाळी १० वाजता नागपूरला कधी पोचलो हेच कळले नाही. तेथून नाष्टा करून उमरेडच्या प्रवासाला बसने सुरवात केली. वातानुकुलीत रेल्वेतून वातानुकुलीत बस मध्ये बसलो. येथपर्यंत ठीक होते. जेंव्हा उमरेडला उतरलो तेंव्हा एकदम नागपूरच्या वातावरणाची झलक मिळाली आणि साधारण विदर्भी उन्हाच्या तडक्याचा अंदाज आला. पोहचल्यावर काही वेळात जेवण करून लगेचच पहिल्या सफारीला जंगलामध्ये निघालो. चार जिप्सी मध्ये आम्ही २३ जण विभागलो गेलो (एका जिप्सी मध्ये सहा) आणि जी काही धमाल आली ती तर सांगणेच कठीण आहे. आहो वाघ राहिला लांबच, वरून सूर्यदेव तळपत होते आणि आम्ही उघड्या जिप्सी मध्ये जीव मुठीत घेऊन बसलो होतो. साथारण निवासस्थान ते जंगल हा १५ किलोमीटरचा प्रवास दुपारच्या २.३० च्या नागपूरच्या तळपत्या उन्हात तो ही उघड्या जिप्सी मध्ये म्हणजे आमची फाटलीच होती असे म्हणायला हरकत नाही. पण जेंव्हा कऱ्हान्डला जंगलाच्या दरवाज्याशी पोचलो तेंव्हा एक वेगळीच उर्जा शरीरात निर्माण झाली. तेथील एकंदरीत वातावरण व जवळ जवळ अजून २५ जिप्सी पाहून तर हुरुपच आला आम्हांला. चला आता वाघ बघायचे आहेत असे म्हणून सोबत आणलेल्या थंड पाण्याच्या अर्धी बाटली संपवली व कानाला पंचा बांधून तयार होऊन बसलो. ३.३०ला जंगलाचा दरवाजा उघडला आणि एक एक करून सर्व २५ जिप्सी आत जायला निघाल्या. पण आपल्याला संयम असतो का.. तर नाही. १५ – २० मिनिटे झाली जिप्सीत बसून पण एकही वाघ दिसला नाही. झाले आमची म्हणजे माझी कटकट सुरु झाली. बायको, मुलगी, मुलीच्या सासू बाई तर माझ्या मुक्ताफलांमुळे वैतागून गेले होते. मी मला माझ्या जावयाने व मुलीने (रेल्वेच्या प्रवासात) भेट म्हणून दिलेला फोटो काढण्याचे यंत्र (कॅमेरा) सरसावून बसलो होतो पण वाघ काही दिसत नव्हता. इतर प्राणी, चितळ, नीलगाय, माकडे, सरडे, खूप सारे पक्षी, गवे, घोरपड दिसत होते पण वाघोबा गायब होते. थोडासा वैतागलोच होतो.. ते बघा ते बघा असे सगळेजण एकमेकांना सांगत होते. मी म्हणालो पक्षी का प्राणी हे जरा मला समजून सांगा, म्हणजे मला फोटो काढण्यासाठी तसे तयार राहायला. आमचा गाईड जिप्सीतून वाघाला शोधत होता. आता इकडे गेला असेल, त्या पाणवठ्यावर असेल, येईलच लवकरच पाण्यावर वगैरे वगैरे.. पण वाघोबा काही दर्शन द्यायला तयार नव्हते. आम्ही साधारण ४०-५० किलोमीटर जंगल पालथे घातले पण पालथ्या घड्यावर पाणीच पडले. हा दिवस आमचा नव्हताच. संध्याकाळी ७ वाजता परत जंगलाच्या मुख्य दाराशी आमची जिप्सी अयशस्वी होऊन आली. सगळे एकमेकांना विचारायला लागले.. सगळ्याचा वाघाने पोपट केलेला होता हे समजल्यावर मी जरा शांत झालो. परत निवासस्थानी उघड्या जिप्सीतून आलो व वऱ्हाडी जेवणावर ताव मारून झोपायच्या तयारीला लागलो. तेवढ्यात शौरी आणि मयुरेशने येऊन सांगितले की उद्या पहाटे ३.०० ला सगळ्यांनी तयार राहायचे आहे. आपली उद्याची पहिली सफारी पहाटे ४ वाजता आहे. झाले. माझे तर अवसानच गळाले होते. पण मानसिक तयारी करून झोपायचा प्रयत्न केला व १२.०० वाजता झोपलो.
दुसऱ्यादिवशी पहाटे आमची फौज पहाटे ३.३० ला पुन्हा एकदा जंगलाच्या दिशेने उघड्या जीप्शीतून मार्गस्थ झाली. पहाटेचा गार वारा त्यात उघडी जिप्सी. साला मना मध्ये एक विचार आला की हा वाघ ही मंडळी इकडे निवासस्थानीच का आणत नाहीत उगाच एवढ्या पहाटे उठून त्याला कशाला बघायला जायचे.. बायकोला म्हणालो अग तुझ्यासाठी सुद्धा मी एवढा फिरलो नाही किंव्हा तुझीसुद्धा एवढी प्रतीक्षा केली नाही मी कधी. हा वाघ कोण लागून गेला. असे काहीतरी मुक्त संवाद चालू होते माझे.. अर्थात जीप्सितच.. तेवढ्यात मयुरेशची जिप्सी आम्हांला दिसली आणि त्याने सांगितले की त्यांना वाघ दिसला.. नुसता दिसला नाही तर जवळ जवळ ४५ मिनिटे तो त्यांच्या जिप्सीच्या पुढे चालत होता.. त्याने रस्त्यात शू केली, शी पण केली, झाडावर ओरखडे मारले, स्वतःच्या धुंधीत हा जंगलाचा राजा चालत होता. आमच्या चार जिप्सी पैकी दोन जिप्सींना हा सगळा सोहळा चित्रित करण्याची संधी मिळाली व त्यांचा आनंद गगनात मावेना असा होता. चला आमच्या पैकी निम्म्या लोकांना वाघाने दर्शन दिले ह्या विचाराने आम्ही आमच्या जिप्सीवाल्याला गाडी दामटायला सांगितले व एक झलक तरी मिळते आहे हे पाहायला वळलो. पण त्याने आमचा परत एकदा पोपट केला होता. पण आम्ही थोडे खुश थोडे नाराज असे परतीच्या प्रवासाला लागलो. वर लिहिल्या प्रमाणे ८ वाजता निवासस्थानी परत आलो थोडेसे आवरून जेवणा साठी तयार झालो व तेवढ्यात शौरी आणि मयुरेशने दुपारच्या सफारीसाठी ३.०० वाजता निघायचे आहे अशी वर्दी दिली. सगळे पट पट जेवण करून आपापल्या खोल्यांमध्ये विश्रांतीसाठी जावून विसावलो.
दुपारी परत तोच उघड्या जिप्सीतून रणरणत्या उन्हात प्रवास.. एक वेगळाच आनंद आणि आता तरी वाघ दर्शन देणार ह्या आशेने तयार होऊन निघालो. ह्या सफारीलाही आपला पोपट होऊ नये अशी आशा करत जंगलाच्या वाटा तुडवीत आमची जिप्सी धुराळा उडवीत वाघाला शोधात फिरत होती. ३.३० ते ६.१५ वाजेपर्यंत साधी झलकही दाखवली नाही पठ्ठ्याने. अगदी दिग्मुड होऊन परत निघालो. काही जिप्सी दुसऱ्या दिशेला शोधात होत्या तर काही अजून इकडे तिकडे आशेवर फिरत होत्या. जंगलाच्या नियमानुसार फक्त शेवटची १५ मिनिटेच राहिली होती आणि तेवढ्यात आमच्या पुढील ५०० मीटर लांब असलेल्या जिप्सीला एका ओढ्यात झोपलेली एक वाघीण दिसली आणि आमच्या जिप्सी वाल्याने लगेच गाडी दामटून त्या ओढ्याशी नेली व आम्हांला त्या वाघिणीचे दर्शन घडवले. एकदाचा जीव भांड्यात पडला. सगळ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. जो तो फोटो काढण्यात गुंग होता. ती वाघीण (चांदी/बरखा) शांतपणे ओढ्यात पहुडली होती आणि तुच्छतेने आमच्या कडे हे कोण वेडे आलेत म्हणून पाहत होती. (ह्या जंगलात प्रत्यक वाघाला नाव दिले आहे. तेवढ्यात जवळ जवळ १०-१५ जिप्सी तेथे येऊन धडकल्या आणि प्रेतेकाला त्या वाघिणीचे फोटो काढण्याची एक स्पर्धाच मला जगलात अनुभवायला मिळाली. लोक ओरडत होते, भांडत होते. सगळे नियम धाब्यावर बसवून जेवढे शक्य होईल तेवढे त्या वाघीणीस त्रास होईल असेच वागत होते. पण करणार काय येथे आलेला प्रत्यके प्रवासी हा फक्त वाघ बघायला आला असल्यामुळे कोणाचेच कोणाशी काहीच चालत नव्हते. पण एकदाचा एक तरी वाघ दिसला ह्या आनंदात आम्हीं वेळ संपत आली म्हणून मुख्य प्रवेश द्वाराच्या दिशेने वाटचाल करायला सुरवात केली होती. एकंदरीच मजाच आली होती. काळवंडलेले सगळे चेहरे वाघ दिसल्यामुळे थोडेसे उजळले होते एवढेच. परत निवासस्थानी ८ वाजता पोचलो. दमलेले काहीजण जेवण करून झोपायच्या तयारीला लागले होते आणि काहीजणांनी म्हणजे परुष लोकांनी गप्पांची मैफिल रंगवली होती.
इतक्यात शौरी आणि मयुरेशने सागितले की उद्या पहाटे दोन जिप्सी ३० किलोमीटर लांब असलेल्या गोठणगावं जगलात पहाटे जाणार आहोत व दोन जिप्सी दुपारी जाणार आहते. जे सकाळी गोठणगावंला जाणार नाहीत ते जवळच एका जंगलात पक्षी दर्शनाला जाणार आहेत. आमचा नंबर पहाटेचा होता त्यामुळे गपचूप गप्पांची मैफिल उरकती घेवून जेवण करून झोपयला गेलो.
भल्या पहाटे म्हणजे २.३० वाजता उठून ३.१५ ला ३० किलोमीटर उघड्या जिप्सीतून प्रवास करून आम्ही गोठणगावं जंगलात पोह्चोलो. हा अनुभव गोठवनाराच होता पण जंगल वेगळे असल्यामुळे व येथे वाघ दिसण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे आशावादी होतो. सफारी सुरु झाली. जंगल खूपच छान होते. गाईड मुलगी होती. पण वाघ साहेब आजही आमच्यावर नाराज होते. घूम घूम घुमवले पण साहेबांनी काही आम्हांला दर्शन नाही दिले. काही लोकांना मिळाले पण साले आमचे नशीबच जरा गांडू होते. पण एक मात्र चांगले होते की बाकीचे प्राणी मात्र अगदी जवळून पाहता आले. पक्षी तर फारच छान होते. माकडांनी तर त्यांच्या माकडचेष्टांनी आमची खूपच करमणूक केली होती. कोणीतरी सांगितले की काल मयुरेशला दिसलेला श्रीनिवास नावाचा वाघ आज ह्या जंगला मध्ये आलेला आहे व त्याने काही जिप्सींना दर्शन दिले आहे तसेच T६ नावाची वाघीण सुध्दा दिसली आहे. आम्हांलाच दिसली नव्हती. असो. पण मला एकंदरीत सर्व सफारी मध्ये जी काही मजा आणि अनुभव येत होता तो अफलातून असाच होता. वाघ दिसणे न दिसणे हे नशिबाचा भाग समजून मी संपूर्ण सफारीचा मनमुराद आनंद लुटत होतो. खरोखर मी ह्या सगळ्या वातावरणात रंगून गेलो होतो आणि माझ्यातील कवीला साद घालत होतो...आणि सुचले की अंदाज वाघांचा कधी बांधलाच नाही... वाघ हा असा मला सहज दिसलाच नाही...वाघासाठी केली वणवण.. त्याने केला आमचा पोपट.
तिकडे आमचा दुसरा समूह सकाळी जाऊन दुसऱ्या जंगलात जाऊन खूप पक्षी पाहून आला होता व एकदम खुश होऊन मस्त पैकी निवासस्थानी आराम करत होता कारण त्यांना दुपारच्या सफारीला जायचे होते. परत एकदा ३० किलोमीटरचा उघड्या जीप्सीतील प्रवास करून दुपारी ११ वाजता पोचलो... नाष्टा केला आणि आडवे झालो.
तेवढ्यात मयुरेश आला आणि म्हणाला जिप्सीत एक जागा आहे.. कोणाला दुपारच्या सफारीला यायचे आहे का.. झाले...मी लगेच तयार होऊन बसलो.. व निघण्याच्या तयारीला लागलो कारण मला असाही पक्षी बघण्यात फारसा रस नव्हता.
परत तोच पहाटे सारखा प्रवास दुपारच्या विदर्भातील चांदण्यात, एक वेगळाच अनुभव आणि मनाला उभारी देणारा असा प्रवास का सोडायचा ह्या भावनेने तयार झालो आणि जिप्सीत जावून बसलो. वाघ दिसो अथवा न दैसो मला त्याच्या काही घेणे देणेच नव्हते. कारण जगलात तर वाघ आहेच पण असा अनुभव परत घेता येईल का नाही ह्या विचारांनी मला थोडीशी भुरळच घातली होती. तसा मी वर्धा, हिंगणघाट, नागपूर, चंद्रपूर, भांदक येथे २० वर्षांपूर्वी फिरलेलो होतो पण ते कामा निमित्त. दुपारी ३.१५ ला परत मुख्य प्रवेशद्वाराशी पोचलो, ३.३० ला जंगलात प्रवेश केला.. सचिन नावाच्या गाईडशी गप्पा मारल्या, जो पुण्यात नोकरीला होता. मला जरा वाघ दिसण्याची अथवा तो नक्कीच दाखवेल अशी वेडी आशा मनात निर्माण झाली. पण हे समजलेच नाही की हे जंगल आहे आणि येथे राज्य त्या वाघाचे आहे सचिनचे नाही. तरीही खूप खूप प्रयत्न करूनही ह्या सफारीलाही अगदी ३०-३० मिनिटे एका ठिकाणी थांबून वाट पाहूनही वाघ साहेबांनी दर्शन दिले नाही. पण माझी काहीच तक्रार नव्हती. कारण मला दोन तीन प्रवाश्यांनी सागितले होते की ही त्यांची १६वी सफारी आहे पण अजून त्यांना वाघ दिसला नाही. मी तर खूपच नशीबवान होतो की मला तिसर्याच सफारीला वाघाचे दर्शन झाले होते. असो. ह्या वेळेसही खूप सारे प्राणी आम्हांला दिसले जे सुध्दा ह्या जंगलाचा एक भाग आहेत. पण लोक फक्त आणि फक्त वाघच बघायला येतात आणि स्वत:चा हिरमोड करून घेतात. उशिरा का होईना मला हे समजले आणि मी संपूर्ण सफारीचा आनंद घेऊ शकलो हे मात्र एकदम खरे आहे.
रात्री परत निघालो आणि पावसाने आम्हांला गाठले. जिप्सी उघडी असल्यामुळे थोडेशे भिजायला झाले पण तो ही एक मस्त अनुभव मनातील करपलेल्या कातडीला प्रफुल्लीत करून गेला आणि रात्री गप्पांच्या फडात आपसूकच एक उर्जा देऊन गेला. कधीही न भेटलेल्या व्यक्तींशी ओळख होऊन गप्पा व प्रत्येकाचे अनुभव ऐकण्यात गुंग होऊन गेलो. माझ्या काही कहाण्या ऐकवल्या व त्यांच्याही ऐकल्या तसेच काही वयस्कर मंडळींकडून मोलाचे सल्ले व आपुलकीच्या चार गोष्टी ऐकून मन कसे भरून आले होते. कोण कुठली ही माणसे पण दोन रात्रीत अगदी घरचीच वाटायला लागली होती. हेच तर ह्या सहलीचे फलित होते असे मला तरी वाटले.
सहलीचा शेवटचा दिवस, सकाळी ६ वाजता उठून जवळील एका जंगलात पक्षी पाहण्यासाठी बाहेर पडलो.. खूप पक्षी व पावसाच्या आगमनाची चाहूल देणारे किडे पाहायला मिळाले. शौरीने आम्हांला एकंदरीतच ह्या विषयातील दिलेली माहित मला तर अचंबित करून गेली. आपण किती अज्ञानी आहोत ह्याची जाणीव झाली. शौरी आणि मयुरेश काय किंव्हा Insearch Outdoors चा संघ काय, तुम्हांला फक्त जंगलात फिरवत नाहीत तर आपल्या सृष्टी सौदर्याची आपल्याला जाण करून देतात हे त्यामधील वैशिष्ट्य म्हणावे लागेल. निसर्ग सौदर्य कसे अनुभवायचे व कसे पाहायचे आणि किती आजमवायचे हे आयुष्यात उशिरा का होईना मला शिकवून गेले.
पक्षी पाहून आलो तर नाष्टा तयार होता. परतीच्या प्रवासाची तयारी करायाची होती आणि थोडासा आरामही. दुपारी १.३०ला जेवण करून आम्ही तयार होतो न होतो तोच आम्हांला नागपूरला पोहोचवायला बस तयार होती. परत ४ वाजता नागपुरात प्रवेश आणि प्रसिद्ध हल्दीराम दुकानातील संत्रा बर्फी खरेदी उरकून सगळेजण रेल्वेच्या वातानुकुलीत प्रतीक्षालयात विसावलो व ६.३० मिनिटांनी सुटणाऱ्या गरीब रथ गाडीची वाट पाहत पहुडलो होतो. आमच्यातील काही जाणकार (माझ्यासारखे) जवळील उपहार गृहातून गाडी मधील रात्रीच्या जेवणाच्या व्यवस्थेत गुंतून गेलो.
एकंदरीत ही जंगल सफारी खूपच छान आणि अगदी व्यवस्थित पार पडली. खूप सुखावून गेली आणि परत परत अशा सहलींना जाण्यासाठी मनाची तयारी करून गेली. मी तर ठरवले आहे की आता अशा सहलींची एकही संधी सोडायची नाही. अर्थातच Insearch Outdoors बरोबरच.
-- रविंद्र कामठे, पुणे
भ्रमणध्वनी -९८२२४०४३३०
गणेशगुळे हे श्री गणेशाचे स्थान रत्नागिरी-पावस-पूर्णगड या मार्गावर असून पावसजवळून या गावाकडे जाण्याचा फाटा फुटतो. पावसपासून ४ कि.मी. तर स्वामी स्वरूपानंदांच्या गावातून ३ कि.मी अंतरावर असणारे हे गाव मुख्य रस्त्यापासून आत असल्याने ते सहसा कोणाला माहीत नाही.
श्रीरंगम स्टेशनच्या जवळ जंबुकेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या भगवती जगदम्बेला अखिलाण्डेश्वरी म्हणतात.
1. रविवारची गाफील सकाळ:-
ते सगळं अशाच एका आळसटलेल्या रविवारी सूरू झालं... सोनाली स्वयंपाकाच्या तयारीत, संगणकावर ह्रूदयनाथ मंगेशकरांची गाणी आणि मी मस्त चहा पीत, पेपर वाचत बसलो होतो. चिन्मयी आली आणि म्हणाली " बाबा school मध्ये Elocution Competition अाहे, मराठा history च्या topic वर speach तयार करायचीय. मला help कर ना"
मी " हूं...help? आईला विचार.. आई छान सांगेल"
माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आत आतून एक खरमरीत आणि निर्वाणीचा ईशारा आला " तो पेपर बाजूला ठेव आणि ती काय सांगत्येय ते नीट ऐक"
मग मी योग्य तो निर्णय घेतला...म्हणजे पेपर बाजूला ठेवला.
"काय यार एवढ्या लहान मुलांना लिहून देणार? CBSC वाले पण YZ आहेत. एकदा पंजाब history, एकदा गुजराथ history....... आणि ते पण पोरांनीच करायचं कधी project तर कधी हे असलं Elocution.... कोणाच्या बापानी शिकवल्येय अशी history"
हो.... यात जरा त्रागा जास्त झाला पण मघाशी मी पेपर बाजूला ठेवला ही काही माझी माघार न्हवती हेही मला कूठेतरी दाखवून देणं गरजेचं होतं.
सोनाली शांतपणे " हो ना? मग तू शिकव ना तीला एखादी गोष्ट तूला हवी तशी....पीलू आपलं आहे आपणच त्याला घडवायचं... " (दरम्याने संगणकावर वेडात मराठे वीर दौडले सात गाणं सूरू होतं) "आता हे गाणं बघ.. सांग याची एक गोष्ट तीला समजेल तशी..ती सांगेल शाळेत. शिवचरित्राची पारायणं केली आहेस म्हणतोस तर बघूयाच तू कशी शिकवतोस ही history तीला"
आपल्याला असं clean bold करण्याची हूकमी कसब बायकोच काय ती जाणे. पण गोष्ट मात्र खरी होती, मलाही पटली होती. आता मात्र वेडात दौडलेल्या सात मराठ्यांची गोष्ट चिन्मयीला शिकवायचीच असं ठरवून टाकलं.
2. फिरंगी भाषेच्या वेढ्यात:
सुरूवात लगेचच केली. आधी चिन्मयीला घोड्याच्या टापांच्या ठेक्यावर मंगेशकरांनी बसवलेलं गाणं परत ऐकवलं. तीलाही आवडलं. मग सुरूवात तीला गोष्ट समजावून सांगायची...
" ही ना सात खूप शूर मराठा सरदारांची आहे, ते रागाच्या भरात चाळीस हजार शत्रू सैन्यावर चालून गेले."
चिन्मयी " बाबा चाळीस हजार म्हणजे? "
मी "Fourty thousand"
आता मात्र चिन्मयी अवाक्...
" but why baba? How can they be so stupid? मरणार नाहीत का ते?"
नकळत काटा टोचावा तसा तीचा "Stupid" शब्द मला टचकन् टोचला. कुसूमाग्रजांनीही त्यांना "वेडात" दौडले असंच म्हटलं होतं. पण ते "वेड" आणि या "Stupidity" यातला फरक मला खूप कासावीस करत होता. तीला चाळीस हजार म्हणजे forty thousand सांगणं मी समजून घेऊ शकत होतो पण तीच्या सात मराठ्यांचा आवेश न समजण्यानं मी इतका अस्वस्थ का होतो? कुठली तरी मनोमन जपलेली मौल्यवान् वस्तू हरवल्यावर वाटतं तसं वाटायला लागलं. इंग्रजी माध्यमात शिकणार्या माझ्या पिलापर्यंत काही गोष्टी माझ्या मराठीतून पोचणारच न्हवत्या. "इतक्या उपरी बदफैली केलीया मारले जाल" या शब्दातली जरब तीला कधीच जाणवणार न्हवती.
"आधी लगीन कोंडान्याचं" या शब्दातला रांगडा निर्धार तीला कळणार न्हवता. "लाख जावोत पण लाखांचा पोशिंदा राहो" म्हटल्यावर तीला दोन हातात दांडपट्टा घेतलेला बाजीप्रभू दिसणार न्हवता. निव्वळ इतिहास रंजनापलिकडे जाऊन या गोष्टी आम्हाला काही मूल्य शिकवून गेल्या. आणी त्या मूल्यांसाठी म्रुत्यूच्या दाढेत प्राण वैरून बसणारी ही माणसं हा आमचा वारसा होता. आज मात्र हा अनुवंशिक ठेवा मी पुढे देऊ शकत नाहीये असं वाटलं. रहाणीमान फक्त भाषेच्या विळख्यात न्हवतं, तर वेढा होता त्या भाषेबरोबर आलेल्या पाश्चात्य संस्कारांचा..........
3. फिरंगी भाषेतला "एल्गार":
मग विचार केला की जे आपल्याला कळलं आणी भावलं ते चिन्मयीला कळेल असं म्हणजे इंग्रजीतच का सांगू नये?
थोडं वाचन सूरू केलं. इंग्रजांच्या इतिहासातही अशा एका बेदरकार साहसाची नोंद आहे. क्रेमियाच्या युद्धात असेच सहाशे इंग्रज सैनीक शत्रू सैन्याच्या महासागरावर चालून गेले होते. लाँर्ड टेनीसन नावाच्या कुण्या गोर्यानं त्यांची शौर्यगाथा " March of light brigade" नावाच्या कवितेत व्यक्त केली आहे. ( wiki वर अवश्य वाचा). तो म्हणतो " Into the valley of death rode the six hundred". हे वेडात दौडलेल्या सात मराठ्यांसारखच होतं. फरक इतकाच की ते सहाशे होते आणी आमचे फक्त सातच होते. मग तर या सातांची गोष्ट इंग्रजीत सांगायलाच हवी. शिवाय भारतातील बर्याच बिगर मराठी लोकांना ही गोष्ट माहीतच नाहीये.
लाँर्ड टेनीसनच्या भाषेचा प्रभाव होताच. आता कुसूमाग्रजांची मनोमन माफी मागून लिहायला बसलो. पहाता पहाता Seven maratha warriors इंग्रजीत अवतरले......
With the blazing swords those
rose out of their sheathers
Oh they were so fearless
Seven maratha warriors
They saw their commander bit sombre
But his eyes were red with anger
They saddled the horses
with javelines that were longer
With the whirls of dust
they disappeared into frontiers
Oh they were so fearless
Seven maratha warriors
Leaving behind their
dumbfounded army
Vengeance to concur
same treacherous enemy
They took on the battle
in enemy yard so galantly
Like seven fireballs
Blew away enemy barriers
Oh they were so fearless
Seven maratha warriors
Their bravery leaves the
Trail till the horizon
The wind is humming
Songs of the martyrdom
A tribute to them for
for selfless heroism
We salute them,
Those braveheart warriors
Oh they were so fearless
Seven maratha warriors
4. समर्पण
चिन्मयीला आता Seven maratha warriors जरा चांगले समजले आणि आवडले आहेत. तीच्या elocution मध्ये तीनं त्यांची शौर्यगाथा इंग्रजी कवितेसह न अडखळता सांगीतली. त्यामुळे आम्ही तीघं जरा खूष आहोत.
पण या अंतरिक्षात आमच्या सारखे कूणी आई बाप अडखळले, तडफडले किंवा कासावीस झाले असतील तर त्यांच्या पर्यंत हा अनुभव पोचावा अशा ईच्छेपोटी हा "Forward" प्रपंच करीत आहे...........इदं न मम असं म्हणून......
जय महाराष्ट्र
SEVEN MARATHA WARRIORS
वेडात मराठे अर्थात्- Seven Maratha Warriors
-- WhatsApp वरुन आलेला मेसेज मला आवडला म्हणून शेअर केला.
-- सुशांत
मला आश्चर्य वाटायचं. सुखवस्तू आणि झोपडीतली माणसं,माणूस म्हणून सगळे सारखेच. आम्हाला जेवढं मिळतं ते कमीच वाटतं. त्या सुखाचे ही अनंत प्रकार. सगळंच हवं असतं. आणि हा रामकृष्ण, इतके वय झालेला. अजून कष्ट करतो तेही विनातक्रार.आला दिवस कसा जाईल अशा परिस्थितीत हा इतका संतुष्ट कसा?
पोलिसांवर विश्वास ठेवा .....
पोलिसांवर विनाकारण केलेले शक्ती प्रदर्शन , मोर्चे, बंद, नेत्यांच्या संरक्षणाचे नको ते ताण देवू नका. त्यांना वेठीला धरू नका. त्यांच्या घरांचे,मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न तत्परतेने सोडवा . त्यांची काम करण्याची शक्ती वाढेल. पोलीस गणवेशातील देश प्रेमी नागरिक आहेत.त्यांचे जीवन सुसह्य करा.
हे लिहिण्याचे मुख्य कारण असे कि -
पुण्याच्या घोरपडे पेठेत अलका हिचे माहेर आहे. ती प्रसूतीसाठी माहेरी आली होती. अलकाला शनिवारी पहाटे प्रसवकळा सुरू झाल्या. अलकासोबत तिची आई होती. आईने अलकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. दोघी घराबाहेर पडल्यानंतर अलकाची आई रिक्षा शोधण्यासाठी पुढे गेली. नेमक्या याचवेळी खडक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक इप्पर, हवालदार दत्तात्रय रत्नपारखी, नितीन पेठकर, पोलीस मित्र शिरीष शिंदे, नसरूल्ला बागवान हे तेथून गस्त घालत चालले होते.बोचऱ्या थंडीत एका महिलेचा विव्हळण्याचा आवाज रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या पोलीस व्हॅनमधील कर्मचाऱ्यांनी ऐकला..प्रसवकळा सोसणाऱ्या त्या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.. घोरपडे पेठेतून सुसाट वेगाने निघालेली पोलीस व्हॅन बाजीराव रस्त्यावर असतानाच ती महिला व्हॅनमध्येच प्रसूत झाली. त्यानंतर कमला नेहरू रुग्णालयात डॉक्टरांच्या मदतीने सर्व सोपस्कार पोलिसांनी पार पाडले आणि खाकी वर्दीत दडलेल्या माणुसकीची प्रचिती दिली.
-- चिंतामणी कारखानीस
कोण म्हणतं एकदा वेळ निघुन गेली की परत येत नाही...
'ती सध्या काय करते ' हा सिनेमा पाहिला आणि या विषयावर थोडा विचार करावासा वाटला.
'ती सध्या काय करते' यावरून बरेच विनोद झाले, अतिशयोक्ती झाली. यातला विनोदाचा भाग सोडला तर हा विषय मनाच्या खुप जवळचा वाटला. यातल्या अन्याचा बायकोची (उर्मिला कानेटकर) भुमिका मनाला स्पर्श करून गेली.
सध्या आपण पहातोय की, रि-युनियन हा विषय निघाला की पत्नी पती कडे किंवा पती पत्नी कडे संशयाच्या नजरेने पाहतात. पण खरं सांगू ? लग्नाची २०-२५ वर्ष एकमेकांच्या सहवासात घालवल्यावरही आपण आपल्या जोडीदारावर विश्वास ठेऊ शकत नसलो तर आपण काय सहजीवन जगलो ? लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात हेच खरं.. नाहीतर तुमचा जोडीदार शाळा-काँलेज मधे असतानाच सैराट झाला असता, नाही का ? पण तो संयमी आहे, विचारी आहे म्हणून आज तुमच्या जोडीला आहे. आज २५ वर्षांच्या संसारा नंतर ब्रम्हदेवही आले तरी तुमची गाठ सोडू शकणार नाही असा विश्वास हवा..
एकदा सरलेले बालपण/तारूण्य पुन्हा मिळत नाही, या विचारावर रि-युनियन या संकल्पनेने मात केली आहे. ज्याने कोणी ही संकल्पना शोधून काढली, त्याला सलाम
शाळा काँलेज मधिल मित्र मैत्रिणींना भेटा, त्यांचाशी गप्पा मारा, सरलेले बालपण- तारूण्य तुम्हाला परत मिळेल, नक्कीच ! आयुष्यात राहून गेलेली सगळी मजा उपभोगण्यासाठी पुन्हा एकदा मिळालेली ही सुवर्णसंधी आहे.
खुप फिरा, मजा करा ! ४०-४५ हे वय असं आहे की, अजुनही तुम्ही भ्रमंती करू शकता. एकदा का साठी आली, की पुन्हा हळहळ वाटेल, आलेली संधी गमावल्याची. आणि करा की प्रपोज राहून गेलेलं ! काय हरकत आहे ?
मनावर नियंत्रण असलं की सगगळच सुंदर असतं/अम्रुत असतं. आपली द्रुष्टी स्वच्छ असली की सगळच स्वच्छ दिसतं. म्हणूनच कोणतीही अतिशयोक्ती टाळून मजा घ्या जीवनाची.
आणि मनावर नियंत्रण होतं म्हणून विधीलिखित जोडीदारा बरोबर तुम्ही संसाराची पंचविशी गाठू शकलात. चुकणारा माणूस कुठेही चुकतो, त्याला रि-युनियनच निमित्त लागत नाही.
तुमच्यातले काही सुप्त कलागुण संसाराच्या धकाधकीत दबून गेलेले असतात, पण तुमचे मित्र ते बरोबर जाणतात. ते सादर करण्याची, त्याचा आनंद घेण्याची संधी म्हणजे रि-युनियन.
मन एक पाखरू आहे, त्याला स्वच्छंद उडू द्या , बागडू द्या. संशयाच्या, लोकलज्जेच्या कुपीत त्याला बंदिस्त करू नका. गुदमरून मरेल ते ! आणि शिल्लक राहील ते फक्त शरीर..
तुमच्या कुटुंबा समवेत गेट टुगेदर करा. न जाणो तुमची मुलं तुमच्या मैत्रीचा वारसा पुढे चालवतील.
आपल्यातले काही मित्र मैत्रिणी इतर कारणांनी दुःखी असतील, त्यांना तुमच्यात सामाऊन घ्या.., तुमची सोबत त्यांचे विश्व बदलू शकते.
हे जग सोडताना कोणतीही इच्छा मागे ठेऊ नका कारण मनुष्य जन्म एकदा मिळतो आणि आयुष्य सुंदर आहे.
मित्रांची कदर करा आणि उरलेल्या आयुष्यात राहून गेलेल्या गोष्टी करा व सर्व मधूर आठवणी सोबत घेउनच जगाचा निरोप घ्या.
अरे! आज मला माझ्यातला लेखक गवसला.., अर्थात क्रेडीट गोज टू रि-युनियन पटलं तर आपापल्या ग्रुप मधे नक्की अँक्टीव व्हा...
औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिध्द अजिंठा-वेरुळ लेण्यामुळे जगभरातील पर्यटक येथे मोठय़ा संख्येने भेट देतात. याचबरोबर म्हैसमाळ हेही एक थंड हवेचे ठिकाण विकसित होऊन प्रसिध्दीस आल्याने तेथेही मोठय़ा प्रमाणात पर्यटक येतात. प्रति म्हैसमाळ म्हणून सारोळा वनपर्यटन स्थळ आकारास येत आहे.
मोरपीस मोरपीस मोरपीस मोरपीस मोरपीस
Copyright © 2025 | Marathisrushti