माघ चतुर्थी हा महाराष्ट्रातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सांगतेचा दिवस.
भाद्रपद शुध्द चतुर्थीला गणेश चतुर्थी असे म्हणतात तर माघ महिन्याच्या चतुर्थीच्या दिवसाला असलेले महत्व गणेश जयंती असे आहे. मात्र, यावेळी महाराष्ट्रातील पहिल्या गणेशोत्सवाची सांगता झाली, असे इतिहासात वर्णन आढळून येत आहे.
'विजापूरचा सरदार अफझलखान याने शिवाजी राजांच्याप्रांती येऊन कान्होजी जेध्यास आपल्या मदतीस येण्याचा हुकूम पाठविला. हे यवनी सत्तेच्या आक्रमणामुळे शिवरायांच्या जिवितास असलेला धोका पाहता यामुळे समर्थांनी आनंदवनभुवनी स्वयंभू शिवथरघळीमध्ये १६५८ साली रचलेली 'सुखकर्ता दु:खहर्ता। वार्ता विघ्नाची।... संकटी पावावे। निर्वाणी रक्षावे।' ही आरती नसून समर्थांनी शिवरायांच्या रक्षणासाठी केलेला नवसच होता. १६५९ साली अफझलखान प्रतापगडाच्या पायथ्याशी मारला गेला. १६७४ साली राज्याभिषेक झाला आणि १६७५ साली हा गणेशाचा नवस सुंदरमठामध्ये गणपतीची स्थापना करून फेडला गेला.
याच सुमारास समर्थ १५७१ चे आषाढात समर्थ पंढरपुरास जाऊन आले आणि भाद्रपदमासी, 'समर्थे सुंदरमठी गणपति केला। दोनी पुरूष सिंधुरवर्ण अर्चिला। सकळ प्रांतासि मोहोछव दाविला। भाद्रपदमासपर्यंत॥' हा उल्लेख भाद्रपद-माघपर्यंत असा असल्याचा गिरिधरस्वामींच्या समर्थप्रताप ग्रंथामध्ये दिसून येतो.
समर्थांनी शिवाजी महाराजांना ११ मुठी धान्य पाठवा, असा उल्लेखही दिसून येतो. या ११ मुठी समर्थांनी हनुमानाच्या मुठी गृहित धरल्या असाव्यात हे उमजलेल्या शिवाजी राजांनी १२१ खंडी धान्य पाठविले. सरासरी दररोज ६७५ किलो धान्य दिवसाला महाप्रसादासाठी लागल्यास प्रतिदिनी ९५०० लोक येथे येऊन महाप्रसादास आले. यामुळेच कोकणात गणेशोत्सव सर्वत्र पोहोचला असावा, हे जाणवते.
ज्याप्रमाणे गणपतीची आरती ही समर्थ रामदास स्वामींची असल्याचे 'दास रामाचा वाट पाहे सदना।' यावरून सांगितले जाते. त्याचप्रमाणे हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रातील सर्वात पहिला सर्वात मोठा गणेशोत्सव सुंदरमठामध्ये समर्थांनी करून संकटी पावलेल्या आणि शिवछत्रपतींना निर्वाणी रक्षिणाऱ्या सुरवरवंदनाचा नवस फेडला.
यानंतर लोकमान्य टिळकांनी पारतंत्र्य काळात या गणेशोत्सवाला ब्रिटीश सरकारविरूध्द जनतेत असंतोष पेरण्यासाठी सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप आणले. मात्र, गणपतीची आरती समर्थांची तसाच गणेशोत्सवाची सुरूवातही समर्थांचीच असल्याचे समर्थ वाङमयातून स्पष्ट होत आहे.
वर्षं किती भराभर जातात ना?दिवस तर एकामागून एक नुसते पळतच असतात…!आत्ताआत्ता पर्यंत माझे चारही नातू एवढाल्लेसे होते…बघता बघता चौघेही किती मोठ्ठे झाले..पिल्लं घरट्यातून कधी उडून गेली ते कळलंच नाही.
हिन्दूस्तानच्या सीमेपासुन पलीकडे १1 फुट उभा असणारया माणसाला ना दिसतो मराठा ना ब्राम्हण ना दलित ओ बी सी., राजपूत , जाट , मिणा , गुज्जर, पटेल , पाटीदार , यादव ,कुर्मी , लिंगायत , वक्कलीग , नंबियार , द्राविड ,पंजाबी , शिख , तेलगु , जैन , मारवाड़ी , बौद्ध , पारसी !!
आठशे वर्षापासून , चेंगीझखान , अल्लाउद्दीन खिलजी , महमंद घोरी , हुमायूँ , बाबर , औरंगजेब , आदिलशाहा , अफझलखान, निझाम , हैदर, टिपू ,
ह्यांच्या तलवारींनी तुम्हाला ओळखलं ते फक्त आणि फक्त " काफर " म्हणूनच...,
देशाच्या फाळणीसाठी लाहोर कराची कलकत्ता आणि संपूर्ण देशभर कायदे आझम जिन्नाच्या डायरेक्ट ॲक्शन खाली तुम्ही कापले गेलात, घरादारासहीत जाळले गेलात , ते "काफीर " हीच ओळख घेउन..
हैदराबादमध्ये निझामाच्या रझाकारांचा अमानुष अत्याचार हा खास फक्त तुम्हां काफीरांसाठीच होता ..
काश्मीर श्रीनगरच्या खोऱ्यात एके फोर्टीसेव्हन छातीवर रोखून वडिलोपार्जित घरादारातुन तुम्हाला रातोरात हाकलून दिले ते पंडित म्हणून नाही " काफीर " म्हणून..
मुंबई बॉम्बस्फोटात आणि २६ /११ च्या हल्ल्यात मारले गेलात जखमी झालात ते ब्राम्हण, मराठा, दलित, ओबीसी म्हणून नाही तर त्यांच्या दृष्टीने फक्त " काफर " हीच ओळख होती तुमची..
आज पाकिस्तान जो रात्रंदिवस तुमचा द्वेष करतो आहे ते तुम्ही काफीर आहात म्हणून...
जैश ए मह्मंद , लष्कर ए तोय्यबा , हाफिज सइद , मसुद अजहर , फीदायीन अतिरेक्यांद्वारे विध्वंस करून तुम्हाला कायम दहशतीखाली ठेवतात ते तुम्हाला " काफीर " म्हणूनच ओळखतात...
सहारनपूरचा इमरान मसूद ४४% लोकसंख्येचा हवाला देवून बोटी बोटी काट डालुंगा म्हणतोय ती कोणाची..? तुमची " काफीर " हया एकाच जातीची ..
अकबरुद्दीन ओवैसी " १० मिनिट पुलीस हटा दो २५ करोड १०० करोड पे भारी पडेंगे " म्हणतोय ते कोणाला ...?
कधी जागे होणार तुम्ही...?
आठशे , वर्ष तुम्ही जाती जातीत भांडत राहीलात आणि अरबस्तानातुन आलेल्या हिरव्या संकटाने तुमच्या आमच्या, देवा धर्माचा , संस्कृतीचा,आयाबहिणींचा सत्यानाश केला , तलवारीच्या धाकाने जबरीने धर्म बदलून कंधार लाहोर कराची ते ढाक्क्या पर्यंत आपल्या मायभूमीचे लचके तोडले ,
पानिपतावरुन ओढून नेलेले पेशव्यांचे ब्राम्हण वंशज , शिंद्यांचे मराठे वंशज , होळकरांचे धनगर वंशज आज बलोचिस्तानात ,अफगाणिस्तानात दिवसातून ५ वेळा नमाज पडून गायी गुरं खात आहेत .
विचार करा काहीशे वर्षापूर्वी अशाच जाती जमाती मीरवणारी ही आमचीच माणसे चांद ताऱ्याला कवटाळून आपली ओळख विसरुन आमचाच द्वेष करताहेत , त्यांच्या दृष्टीने आमची जात एकच " काफीर "
अजून जागे व्हा ...
हैद्राबादचे ओवैसी बंधू उद्याचा जिन्ना होण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत .
२०३० /३५ पर्यंत त्याना अपेक्षित लोकसंख्या वाढली की पुन्हा एकदा फाळणीची मागणी डायरेक्ट ॲकशन च्या कत्तली सुरु होतील ,
त्यांच्या हत्यारांना आपल्यातले मराठे , ब्राम्हण , दलीत ,ओबीसी दिसणार नाहीत,
त्याना फक्त " काफीर " दिसतील,
त्यावेळी पर्याय फक्त एकच मरण किंवा चांद ताऱ्याला शरण ...
मग कसली आलीय जात ,
कसली अस्मिता ..
आणि कसलं आलायं " आरक्षण " ..?
बघा जमलं तर करा विचार.... ,
जाती विसरुन एक व्हा ...
जाती चा अभिमान जरूर बाळगा पण इतर जाती कडे सक्खे भाउ म्हणून पहा .
नाहीतर आहेच ..
पालथ्या घड्यावर पाणी ......
एकदा एक भारतीय नोकरीसाठी अमेरिकेत गेला. काही दिवस खटपट करून त्याला एका सुपर मॅालमध्ये सेल्समन म्हणून नोकरी मिळाली.
दुसर्या दिवशी तो गृहस्थ कामावर आला. दिवसभर काम भरपूर करावं लागेल असे मालकाने सांगितले.
मॅालची वेळ सकाळी आठ ते रात्री आठ अशी होती. पहिल्या दिवसाचे काम संपल्यावर मालक त्याच्याकडे आला व किती ग्राहक केले असे विचारले. त्या भारतीयाने सांगितले की फक्त एकच ग्राहक केला.
मालक चिडला व म्हणाला बाकीच्यांनी प्रत्येकी पंधरा ते वीस ग्राहक केले आणि तू फक्त एक ! तुझा असा परफॅार्मन्स असेल तर मला तुझ्या बाबत विचार करावा लागेल. मालक चिडूनच पुढे म्हणाले किती डॅालरचा व्यवसाय केलास ? कारण एका ग्राहकाकडून असे कितीसे मिळाले असतील असा विचार मालकाने केला.
तो गृहस्थ म्हणाला दीड लाख डॉलर !
क्काय ! मालक जवळजवळ ओरडलाच !
बाकीचे सेल्समनही अचंबित झाले।
मालक म्हणाले काय विकलेस तू त्याला ?
तो म्हणाला एक मासे पकडायचा गळ विकला.
पण त्याचे एवढे पैसे कसे? मालकाची शंका.
मी त्याला फिशिंग रॅाडही विकला. मग गळाला लागणारे खाद्य विकले. मासे जास्त जिथे मिळतात त्या ठिकाणचे पाणी खोल आहे व तो भाग दुर्गम आहे, त्यायुळे बोटीने जावे लागेल, म्हणून आपल्या बेसमेन्टमधल्या गोडावूनमधून एक डबल इंजीनवाली मोटरबोट विकली. तिकडे आठवडाभर रहावं लागेल म्हणून पुरेल एवते खाद्य पदार्थ व दोन क्रेट बीयरही त्यालाच विकली सर !
एव्हाना मालकाचा ऊर आणि डोळे दोन्ही भरून आले होते, मालक म्हणाले कसला माणूस आहेस तू ? केवळ एक गळ विकत घ्यायला आलेल्या माणसाला तू हे विकून दाखवलेस!
तो गृहस्थ म्हणाला, नाही सर, तो माणूस डोकेदुखीवरचे औषध व बाम मागत होता, मी त्याला पटवून सांगितले की, डोकेदुखी घालवायची असेल तर फिशींग करा, आणि हे सर्व घडून आले,
मालक म्हणाले आजपास्नं तू माझ्या खुर्चीत बस बाबा! गुरु आहेस तू. कुठे काम करत होतास भारतात!
तो म्हणाला सर, एल आय सी एजंट होतो !
महाराष्ट्रीयत्त्व म्हणजे काय रे भाऊ? असं कोणी वाचारलंय का कधी. मग त्याला उत्तर एकच...
महाराष्ट्रात राहून जो मराठी बोलतो... इथली संस्कृती पाळतो आणि तिचा मान राखतो तोच महाराष्ट्रीयन.
आज आईचा रागरंग जरा वेगळाच भासला, तिने बाळाला जवळ बोलावले व गप्पा मारता मारता सहज प्रश्न विचारला, "बेटा मला सांग, कसे रे फेडशील पांग या माउलीच्या कष्टाचे? तुला जन्म देताना मरण यातना भोगल्या, तुला वाढविताना रात्रींचा सुध्दा दिवस केला. तुझ आजारपण, पडण, रडण, दुखण, भरवणं, शिकवण काय काय नाही केल. स्वत:च जगणंच विसरले मी."
मुलगा म्हणाला, "आता लवकरच मी मस्त पैकी नोकरी करेन, भरपूर पैसा कमवेन व जगातील सर्व सुख तुझ्या पायी ठेवेन."
आई स्मितहास्य करित म्हणाली, " अरे वेडया हे तर सर्व माझ्यासाठी तुझे बाबा करत आहेत की, अन् हो, तू जेव्हा खूप मोठा होशील, रग्गड पैसा कमावशील, तेव्हा ऐहिक सुखाची गरजच नसेल मला."
मुलगा म्हणाला,"बर मग मी एका छानश्या प्रेमळ मुलीशी लग्न करेन, ती तुझी मनापासून सेवा करेल व तू आराम कर"
आई आता हसली म्हणाली, "सुने कडून सेवा करुन घेण्याची माझी मुळीच ईच्छा नाही, मला नाही वाटत ते कर्तव्य तिचे आहे, माझ्या सुखासाठी तिने का कष्ट घ्यावे. तू लग्न कराव ते तुला आयुष्यासाठी साथीदार, जोडीदार मिळावा म्हणून, तुम्ही दोघांनी एकमेकाना साथ दयावी, समजून घ्याव व सुखाने एकत्र नांदाव."
मुलगा थोडवेळ विचार करुन आईला म्हणाला, "आता तूच सांग ना आई मला, "मी काय कराव तुझ्यासाठी?"
आता आईची कळी खुलली, ती मुलाला म्हणाली, "ऐक, जोपर्यन्त मी जिवंत असेन, तोपर्यन्त तू मला नेहमी भेटायला ये, माझ्याशी प्रेमाने मनमोकळया गप्पा मार. आई म्हणून हिच अपेक्षा आहे माझी.
जेव्हा देवासमोर उभा राहशील तेव्हा माझ्यावतीने सुध्दा प्रार्थना कर.
मी जेव्हा मरेन तेव्हा मला तू खांदा दे. माझ्या आठवणीत दानधर्म कर.
तु केलेले प्रत्येक चांगले काम मला सुख व समाधान देईल. म्हणून आता पासूनच सर्वांशी प्रेमाने वाग, आसपास असलेल्या लहानथोर प्रत्येकाचा आदर कर, यथायोग्य मान ठेव.
लक्षात ठेव तुला जन्म देताना झालेल्या वेदना व वाढविताना झालेले कष्ट हे मी स्वेच्छेने स्विकारले होते, तुझ्यावर उपकार नाही केले मी, तो आमचा दोघांचा निर्णय होता.
देवाने माझ्यावर विश्वास ठेवून तुला माझ्या पदरात टाकले व मला एक सुवर्ण संधी दिली एका त्याच्या कलाकृतीला घडविण्याची त्याबद्दल त्याची मी सदैव रृणी असेनच. तू मला निखळ आनंद व साथ दिली.
तूझ्याहातून घडणारे प्रत्येक कार्य म्हणजेच मोबदला असेल.
करशील का हे?"
निशब्द मुलाच्या डोळयातून वाहणारे अश्रु खूप काही बोलत होते.
धन्य धन्य ती माता!!
निरपेक्ष व निस्सिम प्रेम फक्त माताच करु जाणे, त्रिवार वंदन प्रत्येक मातेला !!!
-- संकलन : अशोक साने
फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी
शेअर करतो.. लेखकाचे नाव माहित नाही.
सांताक्रुझ मुंबई येथील द योग इंन्स्टिट्युट ही एक फार जुनी योग संस्था आहे. तिच्यामागे सत्त्याण्णव वर्षांची परंपरा आहे. सांताक्रुझ रेल्वे स्थानकाजवळच गर्द झाडीने वेढलेल्या परिसरात या संस्थेची वास्तू उभी आहे. तिची स्थापना १९१८ साली मणी हरिभाई देसाई उर्फ योगेंद्रजी यांनी केली. सुरूवातीच्या काळात ही संस्था वर्सोवा येथील दादाभाई नौरोजी यांच्या द सॅण्डस् या बंगल्यात सुरू झाली. १९४७ साली ती सांताक्रुझ येथील सध्याच्या जागेत स्थलांतरित झाली.
कोणाचा आत्मा बोलवायचा हा प्रश्न बाकी होता सर्वानी एकदम इतिहासातल्या आपापल्या आवडीच्या थोर व्यक्तींची नावे सुचवली ,पण इतक्या थोर व्यक्ती जास्त बिझी असणार तर येणार नाहीत म्हणून मग किरकोळ , सर्वसामान्य व्यक्तीचा आत्मा बोलवावा म्हणजे लवकर येईल व शक्यतो नात्यातील असेल तर लवकर येईल या कल्पनेने माझ्या आजोबांचा आत्मा बोलावण्याचे ठरले ते नैसर्गिकरित्या मरण पावले होते .
वाचकांना “युग” या संकल्पनेची अचूक माहिती व्हावी यासाठी केलेला एक छोटा प्रयत्न म्हणजे हा लेख!
हेल्मेटसक्ती करू नये असं म्हणणारे हेल्मेट वापरू नये असं कधीच म्हणत नाहीत. त्यामुळे हेल्मेटसक्ती ह्या विषयावर विचार करताना हेल्मेटचे फायदे तोटे ह्यापेक्षा सक्ती ह्या गोष्टीवर जरा जास्त गंभीरपणे विचार व्हावा. विशेषत: कल्याणकारी लोकशाही राज्यपद्धतीमधे कशाची सक्ती असावी आणि कशाची नसावी ह्याबाबत विचार व्हावा. हेल्मेटसारख्या गोष्टीची सक्ती करणं आणि ती पोलीस यंत्रणेमार्फत राबवणं हा लोकशाही सरकारनं केलेला मर्यादाभंग आहे. लोकशाही सरकारनं लोकांचं किती कल्याण करावं ह्या प्रश्नाची हेल्मेट ही मर्यादा आहे.
दिवाकर रावते म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी दुचाकी वाहनांच्या उत्पादकांवर / विक्रेत्यांवर प्रत्येक वाहनाबरोबर दोन हेल्मेट्स दिलीच (म्हणजे विकलीच) पाहिजेत अशी सक्ती जरूर करावी, जसे चार चाकी वाहनांमधे पट्टे असतात. कारण त्यांनी विकलेल्या वाहनामुळे ग्राहक डोके आपटून मरण्याची शक्यता आहे. म्हणजे ते दुसर्यांना धोका पोचेल अशी वस्तू विकत आहेत, म्हणून तिथे सरकारनं लक्ष घालणं आवश्यक आहे. पण ह्याच न्यायानं त्यांनी पोलिसांना मिळालेले कोणाही निरपराध व्यक्तीला गुन्हेगार ठरवण्याचे अधिकार काढून घेतले पाहिजेत, कारण हेल्मेट न वापरल्यानं कोणतीही व्यक्ती अन्य कोणालाही काहीच धोका निर्माण करीत नसते. त्यामुळे अशा बाबतीत सरकारनं लक्ष घालण्याचं कारणच नाही. हेल्मेटसक्ती हा केंद्राचा कायदा आहे त्यात राज्य सरकार काही करू शकत नाही हे जेमतेम अर्धसत्य आहे. राज्य सरकार त्यात नक्कीच बदल करू शकतं कारण मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी राज्यांच्या आखत्यारीतच आहे. वस्तुत: केंद्राच्या कायद्यालाच कोणा प्रबळ सामाजिक संस्थेनं आव्हान दिलं पाहिजे.
सरकारी यंत्रणेला हाताशी धरून "मार्केटिंग" करणं हा प्रकार जगभर सर्रास चालू आहे. वर्ल्ड हेल्थ ऑंर्गनायाझेशनच्या मदतीनं आभासी रोगांची आवई उठवून जगभर औषधं खपवली जात आहेत. सामान्य लोकांना फारसे उपयोगाचे नसलेले प्रचंड खर्चाचे मोठमोठे प्रकल्प विविध सरकारं हाती घेतच असतात. दिल्लीत खर्च मंजूर करून घेऊन गल्लीबोळात सीमेंट रस्ते होत आहेत, हे आपण पाहतोच आहोत. नशीब अजून कुठल्या औषधाची किंवा बुलेटप्रूफ जाकिटाची सक्ती नाही. रॉय किणीकर ह्यांच "इथे जगण्याची सक्ती आहे" नावाचं पुस्तकच आहे. ते हुकूमशाहीबद्दल आहे. आता लोकशाहीतही आपण तोच अनुभव घेतो आहोत. असांजला लोकशाही देशच छळतायत.
याच विषयावर २००५ मध्ये साप्ताहिक सकाळमधे माझा एक लेख प्रसिद्ध झाला होता. तो येथे वेगळा प्रकाशित करत आहेच.
निनाद माटे
पत्ता : जे ६ हिमाली सोसायटी, दीनानाथ हॉस्पिटलजवळ, एरंडवणे, पुणे ४११००४
फोन : (०२०) २५४३६११२
ईमेल : ninadmate@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti