(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • सचिनच्या आयुष्यातल्या ‘जरा हटके’ गोष्टी

    सचिनच्या आयुष्यातल्या ‘जरा हटके’ गोष्टी

  • समुद्र सपाटीपासुन १३५०० फूट उंचीवरील शिवस्मारक

    अरुणाचल प्रदेशात समुद्र सपाटीपासुन साडे तेरा हजार फुट उंचावर असणाऱ्या शिवस्मारक आणि छत्रपती शिवाजी मार्ग याची कथा…

  • भोंडला (फेरीवाल्यांचा) (६)

  • लोकांसाठी वने

    जगभरातील ‘वनांचे संवर्धन, शाश्वत व्यवस्थापन आणि विकास’ याबाबत जन जागृती करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाने २०११ हे वर्ष ‘जागतिक वन वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. ‘लोकांसाठी वने’ ही संकल्पना यासाठी तयार करण्यात आली आहे.

  • भाजीचं नेमकं वजन तराजूने मोजता येतं का?

    फार पूर्वीच्या काळी बार्टर पध्दत होती. गव्हाच्या बदल्यात कापूस किंवा तांदूळाच्या बदल्यात मातीची भांडी अशी वस्तूंची देवाणघेवाण होत असे. पण किती गहू देऊन किती कापूस घ्यायचा हे त्या वस्तूंचा ढीग लावून त्यांच्या आकारामानावरुन ठरवणं चुकीचं ठरत असे.

  • दुःख तुझे

    ढ़ळती अश्रु गालावरुनी,

  • आजीच्या गोष्टी

    खूप काही शिकण्यासारखे ,विस्मरण झालेले...

    1 दूध तापविणे ते तूप कढवे पर्यंत आज्जी धेनु ऋण मंत्र म्हणत असे.

    2. कितीही श्रीमंती असली तरी शक्य असेल तर घेवडा वेल लावावा सांगत असे. असे का ह्याचे उत्तर हि तयार म्हणायची, श्रीमंती देवापुढे कधीच नसते, दत्तगुरु जेवण्यास येतात, घरची घेवडा भाजी गुरुवारी करावी. घेवडा कथा वाचावी, कमी असतेच ते वाढते

    3 अन्नाचे एक शीत तरि सैनिकासाठी पानात सुरवातीला बाजूला ठेवावे मग तुळशीत अर्पण करावे. देव त्यांना रोजचा घास पोहोचवतो, त्या लेकारांचे आयुष्य वाढते

    4 वाळवण घालताना आज्जी सूर्य मंत्र म्हणायची, काळजी घे म्हणायची माझ्या संसाराची

    5 रोज एकदा घरच्या झाडांना कुरवाळून यायची, कोरफड चे पण लाड करायची, आम्हाला नवल वाटायचे, तर म्हणायची, स्वतः शुष्क दिसते वरून पण अंगी खूप गुण आहेत. एखाद्याला फक्त वरअंगी, रूपावर तपासू नये

    6. मुंग्या ना साखर ठेवायची, म्हणत असे मी दिलेल्या मार्गावरूनच जा ग बायनो, सुखात राहा,माझ्या लेकरांना डसु नका

    7 तुळशीला दिवा लावायची, चिलटे,किडे नष्ट होऊन घरात येत नाही.ती माझ्या घशाला अराम देते मी तुळशीच्या पानांना उब देते.

    8 लाईट असूनही महिन्यातला एक दिवस रात्रीचे जेवण कंदील आणि चिमणी च्या उजेडात असावे आग्रह असे.
    भाकरी पण चंद्रा सारखी वाटते ,
    सावल्यांची भीती जाते, खेळ करताना मौज असते, अंधाराची सवय असावी, भुमातेला पण शांतता मिळते म्हणायची

    9 दारातल्या रांगोळीने सरपटणारे प्राणी लांब राहतात. त्यांच्या कातडीला रांगोळी चिकटते म्हणायची

    10 झोपताना तांब्याच्या धातुतील तांब्या पाणी भरून डोक्याशी ठेवायची, चांगले असतेच पण तापलेल्या भु चा तप्त असा भार किंवा स्पंदने तांबे घेते आणि अपल्याला शांती देते

    अजब अशा गोष्टी आणि त्या मागचा अभ्यास, अनुभव आणि ज्ञान कधी लक्षातच घेतले नाही.

    -- आरती सातपुते

  • इच्छामणी गणपतीची इच्छापूर्ती

    इच्छामणी गणपती मंदिराची स्थापना १९८६ मध्ये चैत्रपाडव्याला झाली. दादा महाराज जोशी यांना गणपतीचा साक्षात्कार झाला. त्यानुसार त्यांनी विविध ठिकाणी २५ मंदिरे बांधण्याचा संकल्प केला होता.

  • जामीन : अधिकार आणि अंमलबजावणी

    घटनेने प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्याचा मुलभूत अधिकार दिला आहे. कोणताही गुन्हा सिद्ध होईपर्यंत आरोपीचे स्वातंत्र्य हिरावून घेता येणार नाही अशी तरतूद कायद्यामध्ये करण्यात आली आहे. त्यासाठी अंतिम निवाडा होईपर्यंत आरोपीला जामिन दिला जात. त्यासाठी गुन्ह्यांचे जामिनपात्र आणि अजामीनपात्र या दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. जामीनाचा निर्णय देताना उच्च आणि सत्र न्यायालयांमध्ये विसंगती आढळते. ही विसंगती वेळीच टाळायला हवी.

  • माझ्या चारोळ्या …

    आकाशाला भिडणारे प्रेम
    आता कानाला भिडले
    हृदयात शिरणारे प्रेम
    मोबाईल मध्ये घुसले...

    मला मोठे व्हायचे होते
    पण फक्त तिच्या नजरेत
    मोठा झालो मी जगासाठी
    पण नालायक तिच्या नजरेत..

    माझ्या चारोळ्या वाचा
    सहन करू नका
    नाही आवडल्या तरी
    छान म्हणू नका...

    वाटत नाही कोणाला
    मी प्रेमवेडा आहे...
    कारण प्रेमाने मला
    बोलताच येत नाही...

    माझी कविता रोज
    तरुण होत गेली
    माझे तारुण्य रोज
    थोडे चोरत गेली...

    .

    माझी कविता काळापलीकडे
    कधीच जात नाही
    तरी कोणतीच बंधने
    काळाची जुमानत नाही...

    माणसांच्या गर्दीत मला
    कधीच हरवायचे नव्हते
    गर्दीतला एक माणूस
    कधीच व्हायचे नव्हते...
    भूत भविष्य आणि वर्तमान
    आपल्या जागी स्थिर असते
    मी बदलत गेलो वेड्यासारखा
    ती मात्र तशीच असते...
    का घाबरते का थरथरते
    तुझे प्रेम माझ्या समोर
    माझे प्रेमच वादळ होते
    असता माझ्या तू समोर...
    करोडो चांदण्या जरी नभात
    असते एकच त्याच्या जवळी
    माझ्या सभोवताली त्या असतात
    मी असतो तुझ्या जवळी...
    फाटक्या कपड्यातून डोकावणारे
    सौंदर्य पहावे लागते
    फाटक्या हृदयातून सांडणारे
    प्रेम जमवावे लागते...
    माझी प्रेमाची व्याख्या
    फारच निराळी आहे
    राधा- कृष्णाच्या अगदी
    जवळ जाणारी आहे...
    आभाळ दाटून येते
    आकाश निरभ्र असते
    वासना दाटून येते
    प्रेम निरभ्र असते...
    मला घायाळ करण्यासाठी
    शेवटी अस्त्र वापरले...
    माझ्यापर्यंत पोहचण्यासाठी तू
    तुझे सौंदर्य खुलवले...
    © निलेश बामणे