(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मार्लेश्वरची यात्रा

    सह्याद्रीच्या उंच कडय़ांच्या कुशीत वसलेले शंकाराचे स्वयंभू देवस्थान श्री क्षेत्र मार्लेश्वर हे महाराष्ट्रातील पवित्र देवस्थान आहे. हे अतिशय प्राचीन देवस्थान आहे. दरवर्षी संक्रातीला लाखो भक्त देवरुखजवळील मार्लेश्वराच्या यात्रेला जमतात. विशेष म्हणजे, त्यादिवशी मार्लेश्वराचे शुभमंगल साजरे केले जाते.(या वर्षी हा योग १४ जानेवारी ला आहे) मारळ या गावचा देव म्हणजे मार्लेश्वर. भगवान परशुरामाने मारळच्या देवस्थानाची स्थापना केली, असे सांगितले जाते. आणेराव साळुंके हा आंगवलीचा सरदार १८०० मध्ये शिकारीला गेला असता त्याला गुहेमध्ये शंकराचे दर्शन झाले. तोच हा मार्लेश्वर. ज्यादिवशी मार्लेश्वराचा शोध लागला तो दिवस मकर संक्रांतीचा होता. म्हणून संक्रांतीला मार्लेश्वराचा उत्सव साजरा होतो.

    त्यादिवशी साखरपा या गावातील गिरिजादेवी या देवीला मिरवत मार्लेश्वराच्या विवाहासाठी आणले जाते. आंगवली या गावात मार्लेश्वर प्रकट झाला म्हणून तेथील लोक चांदीचा मुकुट या सोहळ्यासाठी आणतात. अनेक गावांतून मार्लेश्वरला पालख्या येतात. देवरुख येथील श्री देव व्याडेश्वर हे यजमानी असतात. हा लग्नसोहळा मोठय़ा थाटात पार पडतो. त्यानंतर ठिकठिकाणच्या पालख्या व दिंडय़ा येतात. या दिंडय़ा श्री मार्लेश्वराच्या करवल्या होतात. या यात्रेसाठी अन्नछत्र चालवले जाते. अतिशय रमणीय निसर्ग लाभलेल्या या ठिकाणी आलेला माणूस तहानभूक विसरून आजूबाजूच्या सुंदर परिसराचा व हिरव्यागार वनराजीचा आस्वाद घेण्यातच दंग होतो. उंचच उंच डोंगर, मधूनच वाहणारी बावनदी, हिरवीगार झाडी.. हे सर्व पाहून प्रवासात आलेली मरगळ दूर होऊन मन प्रसन्न होते. येथून चालताना सभोवतालचे सृष्टीसौंदर्य व हिरवीगार वनराजी पाहून व या सर्वाचा आस्वाद घेत असतानाच आपण देवळाजवळ केव्हा पोहोचतो ते कळतच नाही.

    शंकराचे हे स्वयंभू देवस्थान संगमेश्वर तालुक्यातील देवरुख गावापासून 18 कि.मी. वर आहे. शंकराचे निस्सीम भक्त मार्लेश्वरची फेरी सहसा चुकवत नाहीत. मार्लेश्वरचं वैशिष्ट्य म्हणजे इथे नास्तिक मंडळीही रमतात. याचं कारण म्हणजे इथला रम्य निसर्ग. पावसाळ्यात इथला धबधबा रौद रूप धारण करतो. परंतु त्याचं ते रूपही मनाला भावतं. भाविक मंडळी शंकराचं दर्शन घेऊन तृप्त होतात तर निसर्गप्रेमींना इथे आगळीच भेट मिळते. म्हणूनच मार्लेश्वर हे ठिकाण लोकप्रिय आहे.

    मार्लेश्वर. भगवान शंकराचं मंदिर आणि नजिकचा धबधबा यामुळे आस्तिकांबरोबरच नास्तिकही इथे आवर्जून येतात. संगमेश्वर रेल्वेस्थानकापासून ३८ कि.मीटर अंतरावर आहे. देवरूख समुद्रसपाटीपासून उंच असल्यामुळे इथला बराचसा भाग ओसाड भासतो. मात्र पावसाळ्यात हाच परिसर घनदाट झाडांनी वेढला जातो. लांबवर पसरलेल्या सह्यादीचं दर्शन रस्त्यावरून जाताना होतं. देवरूख गावं मागं पडलं की काही मिनिटांतच आपण मार्लेश्वरला पोहोचतो. सह्यादीच्या उंच पर्वतांच्या तुलनेत मालेर्श्वरचा डोंगर एका दमात चढण्याइतपतच उंच आहे. डोंगर किंवा ब्रीज चढून गेल्यावर डोंगर पोखरून गुहा तयार केलेली दिसते. गुहेची उंची खूपच कमी असल्यामुळे वाकून आत प्रवेश करावा लागतो. आत गेल्यावर मिट्ट काळोखात समईच्या प्रकाशात मार्लेश्वराची पिंड आणि मूर्तीचं दर्शन होतं. असं सांगितलं जातं की या गुहेत एकही विजेचा दिवा टिकत नाही. अनेकांनी इथे विजेचा दिवा लावण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळेस तो असफल ठरला असं इथले पुजारी सांगतात. त्यामुळे इथे बॅटरी, मेणबत्ती किंवा कंदिल घेऊनच यावं लागतं. मेणबत्तीने गुहेच्या कपारीत निरखून पाहिल्यास बरेच साप दिसतात. परंतु आजवर कुणालाही सापाने चावल्याचं ऐकण्यात आलेलं नाही.

    मार्लेश्वराच्या मंदिरानंतर डोंगराची सपाटी संपते. इथल्या सपाट भागाला लागूनच खाली घळी आहे. मंदिरातून बाहेर आल्यावर समोर पांढराशुभ्र धबधबा आपल्याला खुणावतो. घळीत उतरून या धबधब्याकडे जाता येतं. इतर मोसमात तुम्ही या धबधब्याच्या पाण्यात खेळू शकता. पण पावसाळ्यात मात्र त्या घळीत उतरणंही कठीण होतं. गुळगुळीत दगड आणि डोंगरकपारीतून वाहणारा तो शांत धबधबा अचानक उग्र रूप धारण करतो. आता ब्रीजवर उभं राहून पावसाळ्यातही जवळून धबधब्याचे बोचरे तुषार अंगावर घेण्याचा आनंद लुटता येतो. मार्लेश्वराच्या डोंगराला तिन्ही बाजूंनी डोंगरांनी वेढलं आहे. मार्लेश्वरचा परिसर पावसाळ्यात अधिक खुलतो. त्यावेळेस तर इथे निसर्गप्रेमींनी आवर्जून यावं. त्याचबरोबर इतर दिवसांमध्येही मार्लेश्वरला आवर्जून भेट द्या. निसर्गाची भिन्न रूपं आपल्याला अनुभवायला मिळतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- विकिपीडिया

  • अबोध सोहनी

    काळीभोर मखमली मध्यरात्र पुढ्यात असावी, वातावरणात गोड शिरशिरी अंगावर उठवणारी थंडी असावी, समुद्राच्या पाण्यावर चंदेरी लहरी हेलकावे घेत असाव्यात आणि हातात असलेल्या ग्लासातील मद्यात चंद्र किरण शिरून, त्या मद्याची लज्जत अधिक मदिर व्हावी!! दूर अंतरावर क्षितिजाच्या परिघात कुठेच कसलीही हालचाल नसावी आणि त्यामुळे शांतता अबाधित असावी!! समुद्राच्या लाटा देखील, नेहमीचा खळखळ न करता, आत्ममग्न असल्याप्रमाणे वहात होत्या. पाण्यात, निळ्या रंगाबरोबर विलोभनीय काळा रंग देखील आपले अस्तित्व देखणेपणाने दर्शवत होता!! किंबहुना, पाण्यातील निळा आणि काळा रंगांचे मिश्रण, वरून ओतत असलेल्या चंद्राच्या किरणांत इतके एकजीव झाले होते की, रंगांना स्वत:चे वेगळे आयुष्य लाभावे,असा अपरिमित गोडवा, मनाला अधिक गोड करीत असावा!! महाभारतात, व्यासांनी द्रौपदीच्या सौंदर्याचे वर्णन करताना, "तिच्या अंगाला निळ्या कमळाचा सुगंध होता" अशी असामान्य प्रतिमा वापरली आहे, त्याच प्रतिमेची नेमकी आठवण, पाण्याचा निळा रंग बघताना व्हावी!! आणि कानावर दुरून कुठूनतरी आर्त "रिषभ" यावा आणि तो सूर नेमक्या सोहनी रागाची आठवण करून देणारा असावा, इतका तरल असावा!!
    आरती प्रभूंच्या ओळी या संदर्भात आठवल्या.
    "वाजून मेघ जातो घननिळासा विरून,
    सर्वत्र तो भरून गंभीर नाद आहे;
    बोलें अखेरचे तो: आलो इथे रिकामा,
    सप्रेम द्या निरोप बहरून जात आहे".
    एकाच वेळी प्रणयाची धुंद साद घालणारा, त्याचबरोबर प्रणयातील विरहाची प्रचीती देणारा, मृदुभाषी असा हा सोहनी राग. सोहनी राग असाच स्वप्नांच्या प्रदेशात हिंडवून आणणारा प्रणयोत्सुक राग आहे. कोमल रिषभाची आच घेऊन, तीव्र मध्यमाला स्पर्श करून, जेंव्हा शुद्ध धैवत स्वरावर स्थिरावतो, तेंव्हा प्रणयाचे एक सुंदर वर्तुळ पूर्ण झाल्यासारखे वाटते!! वास्तविक "मारवा थाट" मध्ये या रागाचे वर्गीकरण आहे आणि हा राग ऐकताना, कुठेतरी पुरिया आणि मारवा रागाची पुसटशी का होईना आठवण होते. आडव/षाडव जातीचा हा राग तसा मैफिलीत फारसा गायला जात नाही परंतु वादकांनी मात्र या रागावर मनापासून प्रेम केलेले आढळते. "पंचम" स्वर, आरोह आणि अवरोह सप्तकात वर्ज्य असला तरी या रागाची अवीट गोडी कुठेही रतिभर देखील कमी होत नाही. वास्तविक भारतीय रागसंगीतात, "षडज पंचम" भावाला अपरिमित महत्व आहे पण, इथे खुद्द "पंचम" स्वराला अजिबात स्थान नाही. वादी, संवादी स्वर - धैवत आणि गंधार हे असले तरी अखेर, परिणाम घडवतात ते कोमल रिषभ आणि तीव्र मध्यम,हेच स्वर. या रागातील खास स्वरसमूह झाल्यास, "सा नि ध ग म(तीव्र) ध ग म(तीव्र)" किंवा "सा नि ध नि ध ग म(तीव्र) ग म(तीव्र) ग रे(कोमल) सा" यांचा वेध घेणे, बहारीचे ठरेल.
    पंडित शिवकुमार शर्मा यांनी सादर केलेला राग सोहनी या रागाच्या संदर्भात ऐकणे हा एक अनिवर्चनीय अनुभव आहे. मुळात, लोक संगीतातील वाद्य परंतु त्याला शास्त्रीय संगीताची बैठक देऊन, मैफिलीत स्थान प्राप्त करून दिले, ते याच कलाकाराने. तसे बघायला गेल्यास, या वाद्याला काहीशा मर्यादा आहेत, म्हणजे या वाद्यातून अति खर्ज किंवा अति तार सप्तकाची ओळख करून घेता येणे कठीण जाते. खरे तर मंद्र आणि शुद्ध सप्तकात हे वाद्य खुलते. ऐकायला अतिशय गोड असल्याने, रसिकांच्या मनाची पकड लगेच घेतली जाते. वाद्यातील तारांच्या नादाला देखील काही मर्यादा असल्याने काही वेळा "मींड" काढणे अवघड जाते आणि विशेषत: द्रुत किंवा अति द्रुत लयीत सुरांचा सुटेपणा काहीसा अदृश्य स्वरूपात वावरतो. अर्थात, इथे मी सतार आणि सरोद ही वाद्ये ध्यानात घेऊन, ही विधाने केली आहेत.
    वरील सादरीकरणात, पंडितजींनी सुरवातीच्या आलापीमध्ये, या रागाची ओळख करून दिली आहे आणि ती जरा बारकाईने ऐकली म्हणजे लगेच समजून घेता येईल, मी वरती मारवा आणि पुरिया रागाच्या साद्धर्म्याशी सांगड घातली होती पण ती घालताना, फरक सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि तो फरक इथे प्रकर्षाने ऐकायला मिळतो. रागाचे स्वरूप पहिल्याच आलापीमध्ये स्पष्ट झाल्यामुळे, पुढील वादनात, रागाचा विस्तार कसा होणार आहे, याची कल्पना करणे अवघड जात नाही.
    हिंदी चित्रपट संगीतात, "मोगल-ए-आझम" या चित्रपटाचे अढळ स्थान आहे. प्रचंड आणि वैभवशाली मोगल राज्याची कल्पना करता येऊ शकेल, अशा भव्यतेची कल्पना देणारा चित्रपट. त्यालाच साजेशा अशा संगीत रचना, संगीतकार नौशाद यांनी तयार केल्या. त्यातलीच, उस्ताद बडे गुलाम अली खानसाहेबांनी अजरामर केलेली रचना, या रागाची सुंदर ओळख करून देते. वास्तविक पहाता, रूढार्थाने हे चित्रपट गीत नव्हे, लखनवी ढंगाची ठुमरी आहे पण चित्रपटात ती चपखल बसली आहे. दीपचंदी सारख्या अनघड तालात ही रचना आहे.
    "प्रेम जोगन बन के,
    सुंदर पिया ओर चले,
    प्रेम गगन बन के
    प्रेम जोगन बन के."
    ठुमरी गायन, हा खास बडे गुलाम अली साहेबांचा प्रांत. ठुमरीला किती लडिवाळ पद्धतीने रंगवता येते, याचा खानसाहेबांचे गायन, हा अप्रतिम वस्तुपाठ ठरावा. मुळात, ठुमरी म्हणजे शृंगाराचा मनोज्ञ आविष्कार आणि तो आविष्कार त्याच तितक्याच रंजकतेने, खानसाहेब सादर करतात. यांच्या गायनाबाबत बोलायचे झाल्यास, आलापचारी गुंतागुंतीची नाही, सगळ्या स्वरांना त्यांचे मूल्य प्रदान करत, ती आवाहक होत असे. तान मात्र गुंतागुंतीची असे. एक तान सरळ तर दुसरी तान जवळजवळ तिन्ही सप्तकात प्रवेश करीत असे. याचा परिणाम, गायली गेलेली ठुमरी वैविध्यतेने सादर होत असे.
    उपरीनिर्दिष्ट रचना, सरळ सरळ ठुमरी गायन आहे पण, चित्रपटातील गायन असल्याने, थोडक्यात स्वरिक मजकूर भरून काढलेला आहे. पहिल्याच आलापीत सोहनी राग सिद्ध होतो आणि त्याच अंगाने, पुढे या रचनेचा विस्तार होत रहातो. परिणाम असा झाला, चित्रपटातील प्रसंग अधिक गहिरा आणि उठावदार झाला. अर्थात, चित्रपटातील गाण्यांचे मूळ प्रयोजन हेच तर असते. रचना ऐकताना, प्रत्येक स्वर, लोचदार तान आणि एकूणच, गायनाची संपूर्ण अभिव्यक्ती भारून टाकणारी आहे.
    असेच एक सुंदर गाणे, "गृहस्थी" या चित्रपटात आहे. अगदी या रागाची ओळख म्हणून निर्देश करावे, असे हे गाणे - "जीवन ज्योत जले".
    "जीवन ज्योत जले,
    कौन जाने कब निकसे दिन और रात ढले;
    जीवन ज्योत जले."
    त्रितालात रचना बांधली आहे आणि संगीतकार रवी आहे. गाणे अतिशय श्रवणीय आहे पण गाण्याची चाल म्हणून स्वतंत्र विचार केला तर त्यात तसे फार गुंतागुंतीचे काही नाही. गाण्यात, गायकीच्या अंगाने ताना आहेत आणि त्याचाच वेगळा विचार करावा लागेल. आता यात असे आहे, राग आधाराला घेतल्यावर, रागाच्या अंगाने, ज्या सुरावटी बांधल्या जातात, त्यात बहुतेकवेळा "अंगभूत" ताना अंतर्भूत असतात, त्यासाठी रचनेत फारसा बदल करावा लागत नाही. रचना म्हणून, संगीतकाराने अगदी सरळसोट रचना बांधली आहे. गायकी म्हणून निश्चितरीत्या आशा भोसले, यांचे कर्तृत्व अधिक पुढे येते. कविता म्हणून देखील फार उच्च प्रतीचे काव्य नाही. चालीच्या "मीटर" मध्ये शब्द चपखल बसले आहेत. पहिल्या सुरापासून, आपल्याला यात "सोहनी" राग ऐकायला मिळतो पण, रागाचे स्वरूप बऱ्याच प्रमाणात पातळ ठेवले आहे.
    गायकी म्हणून विचार करताना काही वैशिष्ट्ये इथे मांडावी लागतील. रचनाकारांना हवासा वाटेल त्या प्रकारचा स्वन (टोन) घेऊन, त्यास सांगीत गुण प्रचुर प्रमाणात बहाल करण्यासाठी आवश्यक ते कौशल्य आणि लागणारी कल्पनाशक्ती या आवाजात भरपूर आहे प्रस्तुत रचना, रागाधारित असल्याने, स्वरांचा लगाव कसा असावा आणि त्यातून, नेमकी गायकी कशी सादर केली जाईल, हा विचार ही रचना गाताना, स्पष्टपणे दिसून येतो. थोडक्यात मूल्यमापन करायचे झाल्यास, कंठसंगीतातील ध्वनीपरिणामांच्या शब्दावलीत भर टाकून, या आवाजाने चित्रपटीय आणि सांगीत शक्यतांची नवी परिमाणे एकत्र करण्यात लक्षणीय आणि ठाम पाउल पुढे टाकले. वास्तविक वरील रचना, "बंदिश" सहज होऊ शकली असती पण या गायिकेने तो धोका टाळला आणि सुगम संगीताच्या सीमारेषा आणि त्याचा परीघ, अधिक विस्तारित केला आणि हे योगदान, केवळ अतुलनीय, असेच म्हणावे लागेल. चित्रपट गीत गाताना, त्यात किती प्रमाणात नाट्यमयता आणायची, याबाबत या आवाजाने आदीनमुना पेश केला आहे आणि जसे लता मंगेशकर, यांच्याबाबत ठामपणे विधान करता येईल, त्याच विचारात आणखी पुढे जाउन, आशा भोसले यांनी स्वत:च्या गायकीचे स्वतंत्र "घराणे" निर्माण केले.
    "सुवर्ण सुंदरी" या चित्रपटात रागमाला धर्तीवर एक गाणे आहे - "कुहु कुहु बोले कोयलिया". वास्तविक या गाण्यात अनेक राग आहेत परंतु रागाचा "मुखडा" खास सोहनी रागाच्या वळणावर आहे.
    "कुहु कुहु बोले कोयलिया,
    कुंज-कुंज में भंवरे डोले;
    गुन-गुन बोले
    कुहु कुहु बोले कोयलिया".
    सगळे गाणे अतिशय द्रुत लयीत बांधले आहे आणि नेहमी वापरात असणारा त्रिताल योजलेला आहे. अर्थात गाणे मनावर लगेच गारुड घालते. संगीतकार आदी नारायण राव या दक्षिणात्य संगीतकाराने चाल बांधली आहे. या गाण्यातील, रफी आणि लताबाईंची "गायकी" विशेषत्वाने उठून दिसते. तसे बघितले तर रागांच्या अंगभूत सौंदर्यामुळे गाणे खुलते परंतु केवळ रचना म्हणून विचार केला तर सरळ सरळ रागाच्या चौकटीत गाणे तयार केले आहे, पण तरीही हे गाणे श्रवणीय वाटते.
    संगीत नाटक "कट्यार काळजात घुसली" मधील "सुरत पिया की छिन बिसराये" हे गाणे सोहनी रागाची आठवण करून देणारे आहे. तसे बघितले तर गाण्याची रचना पारंपारिक ठुमरी अंगावर बेतलेली आहे परंतु ठुमरी अंग घेऊन देखील, गाणे म्हणून ही रचना फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे. गायक म्हणून वसंतराव देशपांडे, यांची " खानसाहेबी" ढंगाची गायकी खुलून आलेली आहे. संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी, वसंतरावांच्या या गायकीचा, या गाण्यात बहारीने उपयोग करून घेतला आहे.
    -- अनिल गोविलकर

  • अमृतमय चंद्रमा

    पावसाळा नुकता संपलेला. चार महिने अधूनमधून ढगाआड जाणारा चंद्रमा अश्विनातल्या पौर्णिमेला पूर्ण तेजानं उजळून आलेला. या पौर्णिमेचं स्वतःचं खास स्थान आहे. ही ‘कोजागिरी पौर्णिमा’ । रसिकांना कवींना, लक्ष्मीच्या पूजकांना आणि वैद्यांनाही महत्त्वाची वाटते.

  • शिक्षण आणि तुरुंग

    shikshan-ani-turung

  • दारूवाला विरुद्ध दूधवाला

    एक छोटीशी गोष्ट…..

  • बाई बाई मनमोराचा

    बाई बाई मनमोराचा

    १९६० साली प्रदर्शित झालेल्या मोहित्यांची मंजुळा या चित्रपटातील हे गाणे. या गाण्याचे गीतकार होते जगदीश खेबुडकर. संगीत दिले आनंदघन यांनी. तर स्वर होते गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे. चला तर मग ऐकुया हे गाणे..

  • रस्टनबर्ग मधील १ वर्ष!!

    रस्टनबर्ग मधील नोकरी ध्यानीमनी नसताना, हाताशी आली, म्हणजे इथे मी इंटरव्ह्यूसाठी २००४ साली आलो होतो पण पगाराबाबत आणि तेंव्हा ती कंपनीच्या Expansion Programme मध्ये प्रॉब्लेम्स आल्याने सगळेच रहित झाले आणि माझ्या डोक्यातून तो विचार निघून गेला होता. परत पीटरमेरीत्झबर्ग या शहरात सुखनैव (??) आयुष्य सुरु झाले होते. २००५ मधील, जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात ( वास्तविक या काळात सगळा साउथ आफ्रिका सुटीवर असतो) फोन आला आणि फोनवरच पगार, इतर पर्क्स नक्की झाले आणि नोकरी पक्की झाली. जेंव्हा २००४ साली इथे २ दिवस आलो तेंव्हा मला हे शहर काही फार आवडले नव्हते, किंबहुना गावात एकच मोठा मॉल वगळता फारसे काहीच बघण्यासारखे नव्हते (अर्थात इथून ४० मैलावर सन सिटी आहे, ही माहिती होती) आणि मला तसा खास उत्साह वाटला नव्हता.
    पीटरमेरीत्झबर्ग इथली नोकरी सोडायचे नक्की केले होते कारण, इथे कामाचे स्वातंत्र्य, कामाच्या वेळा आणि वरिष्ठांची वागणूक, या पातळीवर बरेच प्रॉब्लेम्स होते आणि त्याचा निचरा होणे, केवळ अशक्य होते. थोडक्यात, एका नवीन शहराचा नव्याने अनुभव, हा विचार मनाशी बांधून, पीटरमेरीत्झबर्ग सोडले. वास्तविक, तेंव्हा माझ्याकडे कंपनीची गाडी असल्याने, ती मला परत करावी लागली. पीटरमेरीत्झबर्ग पासून रस्टनबर्ग शहर, जवळ पास ८०० किलोमीटर लांब, तिथे विमानतळ नाही तेंव्हा Intercity बसने आधी जोहान्सबर्ग इथे जायचे, तिथे मला कंपनीची गाडी न्यायला येईल आणि मग रस्टनबर्ग गाठायचे, असे ठरले. त्यानुसार मी बसने निघालो. इथली बस सर्विस अत्यंत सुंदर आणि पोटातले पाणी देखील हलणार नाही, याची काळजी घेतली जाते!!
    जोहान्सबर्ग इथे माझ्या, पहिल्या कंपनीतील, विनय थलींजा, रहात होता आणि त्याच्याकडे त्यादिवसाचा मुक्काम करायचे ठरवले. विनय, इथे २ वर्षे रहात असल्याने, तिथे चांगला स्थिरावला होता. तो, बस स्टेशनवर उतरवून घ्यायला आला आणि मला हायसे वाटले. जोहान्सबर्ग शहर म्हणजे “विराट” या शब्दाला साजेसे शहर आहे आणि जर का तुम्हाला नेमका पत्ता माहित नसला तर या शहरात, तुम्ही पार गोंधळून जायला होते. (पुढे इथे नोकरी मिळाल्यावर मला, १,२ वेळा याचा अनुभव आला होता).
    दुसऱ्या दिवशी दुपारी, केसी (वास्तविक हा गुजराती मुलगा – कमलेश,पण इथे येउन, इथल्या संस्कृतीला साजेसे नाव स्वीकारले!!) मला न्यायला आला. माझ्याकडे त्यावेळी २,३ Bags वगळता फारसे सामान नव्हते. पीटरमेरीत्झबर्ग इथे कंपनीने घर दिल्याने, काही सामान विकत घेण्याचा प्रश्नच नव्हता. जवळपास दीड तासाच्या प्रवासानंतर रस्टनबर्ग आले. वाटेत, गाडीत बसल्यावर, कंपनीची अधिक खोलवर माहिती, म्हणजे, माझ्या हाताखाली कितीजण आहेत तसेच एकूण कंपनीची कार्यपद्धतीबद्दल जुजबी माहिती मिळवली. अर्थात १ वर्षानंतर परत या शहरात आलो पण तसा फारसा आढळत नव्हता.
    इथे मला राहायला एक छोटा बंगला होता परंतु इथे माझ्यासोबत, केसी, निमेश इत्यादी ४ गुजराती मुले होती. अर्थात, माझी स्वतंत्र व्यवस्था, बंगल्याचा वरच्या मजल्यावर केली होती. ही सगळी मुले, तेंव्हा पंचविशीच्या आसपास होती पण सगळी शाकाहारी!! आमचे किचन कॉमन होते, त्यामुळे स्वयंपाक एकत्र करणे, क्रमप्राप्तच होते!! सुरवातीला फारशी ओळख नसल्याने, वागण्यात बुजरेपणा होता. पुढे निमेशशी माझे फारच जवळकीचे संबंध निर्माण झाले.
    दुसऱ्या दिवशी सरळ ऑफिस!! माझ्या खात्यात, टीना ले रुक्स (माझ्या आयुष्यात आलेली पहिली गोरी मुलगी), ली ( ही काळी मुलगी) आणि माझी रिसेप्शनिस्ट स्टेला ( ही दुसरी गोरी मुलगी) असे कामाला होते. गोऱ्या समाजाची ओळख आणि काहीप्रमाणात अंतरंग, मला इथेच लक्षात आले. इथेही सुरवातीला वागण्यात थोडा बुजरेपणा होता आणि त्यात मला तरी काहीच नवल वाटले नाही. पहिला आठवडा तर कामाचा चार्ज घेण्यात गेला. आमच्या कंपनीचा सुपर मार्केटचा व्यवसाय होता आणि त्याचा व्याप तसा खूपच मोठा होता. रिटेल आणि होलसेल, अशा दोन्ही धंद्यात कंपनीने जम बसवला होता.
    जसजसे दिवस जायला लागले, तशी वागण्यात मोकळेपणा येत गेला. मी, या गोऱ्या लोकांचे एक वैशिष्ट्य बघितले आहे, जर का तुमच्या बरोबर काम करत असतील तर इतक्या मोकळेपणी वागतात की भारतातून येणाऱ्या माणसांना सुरवातीला थोडेसे बुजल्यासारखे होते. अर्थात, मला एव्हाना, या देशात येउन, १० वर्षे झाली असल्याने, इथल्या संस्कृतीचा बराचसा अंदाज आला होता.
    जानेवारी असल्याने, इथे उन्हाळा होता. आजूबाजूचा प्रदेश खाणींचा असल्याने परिसर बराचसा रखरखाट होता. अर्थात, इथे स्थिरस्थावर व्हायला फारसा वेळ लागला नाही. घरातील नवीन मित्रांशी वागण्यातील बुजरेपण लवकरच निघून गेले. वास्तविक माझ्या आणि त्यांच्या वयात २० वर्षांचे अंतर होते तरीही मैत्री लगेच जुळली. सगळेच भारतातून आलेले आणि अर्थात माझा या देशातील १० वर्षांचा अनुभव असल्याने, ओळख मैत्रीत सहज झाली.
    संध्याकाळी घरी परतल्यावर, एकत्र जेवण करणे, हा सोहळा असायचा. अर्थात, मसाले आणि चव, अर्थात गुजराती पद्धतीची!! हळूहळू, शनिवार संध्याकाळ, मॉलवर जाण्यात जाऊ लागली. इथला मॉल जरी मोठा असला तरी डर्बन इथल्या मॉलची सर नव्हती आणि ते क्रमप्राप्तच आहे. मुख्य कारण या गावाची लोकसंख्या दीड ते दोन लाख!! अगदी आजूबाजूची गावे धरली तरी चार लाखांच्या वर लोकसंख्या नाही तेंव्हा धंदा होणार कसा!! त्यातून, इथे बाहेरून येणारे सगळे सनसिटीला भेट देणारे म्हणजे त्यांच्याकडून देखील फार अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. असे असून देखील मॉल फार छान आहे, म्हणजे जगातील बहुतेक सगळ्या Branded वस्तू मुबलक उपलब्ध!! याचे दुसरे कारण, सनसिटी शॉपिंगच्या दृष्टीने कमालीचे महाग, त्यामुळे या गावातील सगळे इथेच खरेदीला येणार!!
    गावात भारतीय वस्ती ( अगदी भारतीय वंशातील वस्ती धरून) जास्तीजास्त दहा ते बारा हजार, त्यामुळे गावात भारतीय हॉटेल नाही, एकच मुस्लिम धाटणीचे हॉटेल आहे आणि तिथे तर बहुतेक सगळे मांसाहारी पदार्थ, म्हणजे गुजराती मित्रांना जाणे, न जमणारे!!
    मॉलमध्ये, आम्ही मित्र जेंव्हा जायचो, तेंव्हा मात्र मी मांसाहारी खाण्याची “तलफ” भागवून घेत असे!! तिथे सिनेमा थियेटर होते पण, बहुतांशी इंग्रजी चित्रपट. जरी माझे मित्र गुजराती असले तरी त्यांच्या आवडी/निवडी टिपिकल गुजराती!! वाचनाची आवड शून्य आणि संगीताची आवड फक्त चित्रपट संगीताची आणि ती देखील, माझ्या आवडीच्या पूर्ण विरुद्ध!! अर्थात, माझ्याकडे सिस्टीम असल्याने, मी, माझ्या वरच्या मजल्यावर शांतपणे, गाणी ऐकणे किंवा पुस्तक वाचणे, इत्यादी छंद पुरवून घेत असायचो. तरीही, ऐकलेल्या गाण्याबद्दल किंवा वाचलेल्या पुस्तकाबद्दल कुणाशी काही बोलणे, केवळ अशक्य!!
    त्यातल्या त्यात, निमेशला जगजीत सिंग, अति प्रिय असल्याने, तो वर येउन, माझ्या बरोबर ऐकत असे. परंतु, एक फरक पडायचा आणि तो म्हणजे त्याची ऐकायची पद्धत आणि माझी पद्धत, यात जमीनअस्मानाचा फरक तरीही माझ्या सोबतीला कुणीतरी ऐकायला आहे, हे देखील मला बरे वाटायचे!!
    ऑफिसमध्ये आठवडाभरात रुळून गेलो, इतका की टीना आणि स्टेलाशी एकत्रित गप्पा मारायला सुरवात केली. अगदी वैय्याक्तील स्वरूपाच्या गप्पा मारायला सुरवात झाली. स्टेलाचे पहिले लग्न मोडले होते (इथला नेहमीचा रिवाज) पण सध्या एका बॉयफ्रेंडबरोबर एकत्र रहात होती ( आता परत एकटीच रहात आहे, असे समजले) तर टीना – बॉयफ्रेंड नंबर ३ बरोबर रहात होती (दोन वर्षापूर्वी त्याच्याशीच लग्न केले). यात गमतीचा भाग असा, माझ्याशी याबद्दल बोलताना, त्यांना काहीच विशेष वाटत नव्हते. टीना म्हणजे स्मोकिंगचे “आगर”, दर अर्ध्यातासाने सिगारेट आवश्यक!! माझ्या कंपनीत जवळपास, ६ तरी गोऱ्या मुली/स्त्रिया होत्या आणि त्यातील बहुतेकांची कहाणी या दोघींपेक्षा फार वेगळी नव्हती.
    पुढे, दोन एक महिन्यांनी त्यांच्या बॉयफ्रेंडशी व्यवस्थित ओळखी वगैरे झाल्या, आणि त्यांच्या घरात प्रवेश मिळविण्याइतपत मैत्री झाली. अर्थात, कामाच्या बाबतीत सगळ्या इतक्या व्यवस्थित आणि टापटीप की मला कधीही कामाबद्दल आठवण करून देण्याची वेळदेखील आली नाही, किंबहुना, काहीवेळा मलाच थोडे उशिरापर्यंत बसून, माझे काम संपवावे लागायचे!!
    अर्थात, पुढे इतर कंपन्यात अनेक गोऱ्या व्यक्तींशी ओळखी झाल्या पण माझ्या या मतात कधीही तसूभर देखील फरक पडला नाही. दोन, तीन महिन्यांनी कमलेश, निमेश आणि मी, सनसिटीला जायचे ठरविले. तसा, २००० साली, मी, स्मिता आणि आदित्य, असे तिथे फिरायला जाउन आलो होतो. परंतु मित्रांबरोबर जाणे आणि घरच्यांबरोबर जाणे, यात फरक पडतोच!!
    भारतात, सनसिटी हे साउथ आफ्रिकेतील एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे, त्यातून, मला वाटते १९९४ साली (आता मला नक्की साल आठवत नाही) तिथे ऐश्वर्या रायने मिस वर्ल्ड किताब मिळवल्यापासून तर त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. तसे पाहिले तर सनसिटीचे दोन भाग आहेत. १] Sun city , २] Lost City. सनसिटी, मुळात एक हॉटेल आहे आणि त्यात, प्रचंड casino आहे!! माझ्या अंदाजाने, आफ्रिका खंडातील सर्वात मोठा casino इथे आहे, Last City म्हणजे ऐषारामाची परमावधी!!
    सनसिटी मधील हॉटेल, उडप्याचे वाटावे, इतके प्रशस्त, आलिशान असे हॉटेल आहे. मुळात, हि दोन्ही हॉटेल्स डोंगरात वसवली आहेत, त्यामुळे इथे दुपार कलंडली की लगेच थंड वारे बारमाही वाहतात. Lost City मध्ये केवळ हॉटेल, हेच आकर्षण नसून, तिथे यंत्राच्या सहाय्याने काही भागात भूकंपाचा अनुभव देतात, ठिकठिकाणी डोंगरात निरनिराळ्या प्राण्यांचे मुखडे कोरले आहेत आणि त्यात रात्री दिव्यांची रोषणाई केली जाते, तसेच इथे कृत्रिम तलाव तयार केलेला असून, त्यात कृत्रिम प्रवाहाने महाकाय लाटा निर्माण केल्या जातात, त्यामुळे पाण्यावरील खेळ खेळणे, हे दुसरे आकर्षण!!
    इथे मात्र, भारतीय पद्धतीचे जेवण मिळू शकते पण किंमती मात्र तितक्याच आलिशान!! इथेच मी, भारतातून आलेल्या चित्रपट तारकांचा शो पहिला होता, म्हणजे शाहरुख,सैफ, राणी, प्रीती वगैरे कलाकार आले होते. शाहरुखची प्रसिद्धी इथे बघून तर मला थक्कच व्हायला झाले!! असो, थोडक्यात, एकदा जाण्यासाठी हे ठिकाण ठीक आहे, ज्यांना जुगार खेळायचा आहे, त्यांना ही जागा म्हणजे स्वर्ग!!
    तसे पाहिले तर या गावात राहणे म्हणजे फार सुखाचे नाही, एकतर इतर शहरांप्रमाणे, एकदा संध्याकाळचे सहा वाजले की सगळे शहर स्वत:ला मिटून घेते!! बरे बाहेर जाऊन, विरंगुळा व्हावा, अशातले हे गाव अजिबात नाही. मॉल वगळला तर करमणुकीचे कसलेच साधन नाही आणि मॉल कितीही आलिशान झाला तरी त्यातील औत्सुक्य फार लवकर संपून जाते, मग उरतो तो कधीही न संपणारा वेळ!! मी तर सहा, सात महिन्यात कंटाळलो. त्यातून, कमलेशला नोकरीवरून काढून टाकले कारण त्याने नोकरीच्या जागी केलेली “हेराफेरी!!”
    निमेश माझ्याबरोबर असायचा पण तरीही गप्पा माराव्यात अशी काही मनापासून “आच” वाटायची नाही. अर्थात, असे मित्र देखील आवश्यक असतात. एके संध्याकाळी, अचानक माझ्या तब्येतीत थोडा बिघाड झाला आणि डॉक्टरकडे जाणे अत्यावश्यक झाले, किडनीचा जुना प्रॉब्लेम उपटला होता आणि थोडावेळ सैरभैर झाले होते आणि त्या विमनस्क क्षणी, निमेशने जी मदत केली, त्याला तोड नाही, मला लगेच गाडीत घातले, मोबाईलवरून जोहान्सबर्ग इथल्या डॉक्टरची वेळ नक्की केली आणि गाडी प्रचंड वेगाने हाकून, (जवळपास, १५० किलोमीटर अंतर आणि संध्याकाळची वेळ) मला डॉक्टर समोर उभा केला, रात्री, त्याच्याच ओळखीच्या मित्राच्या घरी राहिलो आणि दुसऱ्या दिवशी मला परत आणले.
    अखेर, प्रत्येकाला नेहमीच स्वत:चा विचार करणे आवश्यक असते आणि त्यानुसार, या गावातील माझा खेळ वर्षभरात संपला!!
    - अनिल गोविलकर

  • आधुनिक काळातील वैभव लक्ष्मीचं व्रत

    ……………मग त्याने मराठी माणसे धंद्यात मागे का? या विषयावर परीसंवाद भरवला पण तो मात्र जिथल्या तिथेच राहिला. त्याची बायको खूप दु:खी झाली. एके दिवशी ती झोपली असताना देवी लक्ष्मी तिच्या स्वप्नात आली आणि आधुनिक काळातील वैभव लक्ष्मीचे व्रत तिला सांगितले.

  • प्लेगमुळे स्थलांतर

    प्लेग असाच जीव घेणारा रोग. त्याने प्रचंड संखेने बळी घेतले. आता तो काबूत आलेला आहे. त्यारोगाचे भयानक तांडव, त्यानी उडवलेला हाःहाःकार प्रत्यक्ष बघण्याचा, अण्याण्याच्या दुर्दैवी काळातून आम्ही गेलो. आता विज्ञान प्रगतीमुळे सुदैवाने तो प्रसंग दुर्मिळ झाला आहे. परंतु आज देखील त्याची आठवण अंगावर शहारे आणतात.

  • शेत माझे