आज सकाळी जरा आळसच आला. उशीरा उठले आणि आतल्या आवाजाने आपला विचार मांडला, " जरा आयता चहा मिळाला असता तर बरे झाले असते. " तेवढ्यात आमच्या स्वयंपाकीण बाईने आवाज देउन सांगितले, " भाभी, चाय पिना है, चाय तैयार है |" हे ऐकताच मनात हास्यानंदाचे फटाके फुटत होते. असे होते ना कधी कधी आपण एखादी इच्छा व्यक्त करतो आणि ती इच्छा पुर्ण होते. आपली इच्छा पुर्ण होते याला कारणे दोन आहेत असे मला वाटते एक म्हणजे युनिव्हर्स चा Law of attraction नियम आणि दुसरे म्हणजे आपल्या मनातल्या आवाजाची शक्ती.
मनातल्या आवाजाची शक्ती ही नकारात्मक पण असु शकते आणि सकारात्मक पण किंवा या दोन्हीच्या पलीकडील पण असु शकते. जशी माझी इच्छा होती, आयता चहा मिळावा आता ही नकारात्मक पण नाहीये आणि सकारात्मक पण नाही. ही मनातील शक्ती कशी वाढवावी. काही नाही फक्त सकारात्मक राहायचे. चांगला विचार करायचा. काही घटना अश्या असतात ज्या आपल्या हातात नसतात. पण त्यात स्वत:ला गुरफटून न टाकता उलट स्वत:ला त्यातून बाहेर काढायचे, स्वत:वर विश्वास ठेवायचा, आणि देवावर श्रद्धा ठेवायची. देव जे करतो ते चांगल्यासाठीच करतो. आणि खूप महत्त्वाचे म्हणजे सकारात्मक दृष्टीने विचार करायचा. कारण आपण जसा विचार करतो तशी कमांड आपला मेंदू पूर्ण अवयवांना देत असतो. परिणामी आपल्या शरीरातील अवयव तसेच कार्य करतात. आणि त्यामुळे आपल्या शरीरातील मनातील भाव बदलतात आणि आपल्याला आपल्या आसपासचे वातावरण ही तसेच दिसु लागते. म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा, मनातील भाव बदलतील परिणामी शरीरही सुद्रुढ राहील आणि सगळेच छान होईल.
पियुषा खरे- केळकर
नौजवान भारत सभा च्या त्या सक्रिय सदस्या होत्या . त्यांच्या कार्याची सुरवात अगदी लवकरच झाली होती तरी त्यांच्या कामाचा परिचय तेव्हा झाला ज्यावेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली करतार सिंग सारबा (ज्यांनी वयाच्या १९ व्या वर्षी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले) ह्यांची ११ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
श्री विमल प्रसाद जैन ह्यांचा बॉम्ब बनविण्याचा कारखाना होता, ‘ हिमालयन टॉयलेट्स’ ह्या नावाखाली. दिखाव्या साठी काही और बनायचे आणि प्रत्यक्षात तिथे बॉम्ब बनविले जायचे. दुर्गा भाभी आणि त्यांचे पती श्री बोहरा दोघे जातीने तिथे मदत करायचे.
आज सहज संध्याकाळी मळ्याच्या कडेने गेलो फिरायला .. 100 150 एकर चा भर ऊन्हाळ्यात हिरवागार असलेला ऊन्हाळीभाताचा -वायंगणीचा- मळा...... मन सहज 20 25 वर्ष मागे गेलं.....
मार्च एप्रिल महिन्यात पुर्ण मळा रिकामी व्हायचा... आणि आमची 7 8 गुराख्यांची टोऴी निघायची मळ्यात, 30 40 गुरे घेऊन... जेव्हा ईतरांच्या जनावरांना कोरडा चारा दुरास्पत असायचा... तेव्हा आमच्या जनावरांना हवा तेवढा हिरवा चारा...... मोकळी सोडलेली पुर्ण दिवस....
काय दिवसाचा अप्रतिम दिनक्रम होता.... सकाळी 7 ला दिवस उगवायचा आमचा.... 8. ला जनावरे सोडायचं काम... मोकळा वारा प्यायचा... तिथच एक बांधावर प्रचंड रायवळ आंबा होता.. 70 80 तरी आंबे गोळा करायचे... 10 10 तरी प्रत्तेकजण खायचा....
मग दोन तिन मेंबर फणसाच्या शोधात निघायचे. पिकलेले खायचे... तर कच्चे नदिच्या वाळुत पुरुन ठेवायचे... ऊद्याला...
एकदिवस चवळीच्या शेंगा भाजायच्या तरी दुसर्यादिवशी भुईमुगाच्या... कुणाच्याही...
11 वाजल्या नंतर सगळा लवाजमा नदिवर जायचा... मग 2 तास डुबणे नदित.... जनावरांची आंघोऴ... आणि ऱाखण्यांची पण... एकत्रच....
म्हैशीच्या कानात मासा पकडणे म्हणजे स्पेशालिटी.... अगदी थोड्यांकडेच....
मग घरी अडीजवाजता.... जेवण झालं की काजीनी खेऴायचं... मुकरीचा मांड खासच....
गल.... ढोपो...... जुगी..... सप..... फगाम....
हे शब्दच आता ऐकायला येत नाहीत. . किंवा हद्दपारच झालेत....
परत ऊन ऊतरलं की म्हशींसोबत मळ्याची वाट... पण आता क्रिकेट बॉल दिसायचा बंद होईस्तोवर क्रिकेट. त्यातही "कटीनी" खेळायचं म्हणजे खासच.. .......
मग खास बैठक चर्चा अगदि पंतप्रधानांपासुन बाजूच्या वाडीतील मंजिच्या लफड्यापर्यंत...
काऴोख पडल्यानंतर जनावरं चरवण्याची खास मालवणी स्टाईल.....
"म्हस कशी मेल्यासारखी एका जाग्यावर चरता"
मग जनावरं बांधायची....आणि जेवण झालं की अंगणात माटवात ऊघड्यावरच झोपायचं AC झकमारतो असा वारा आणि गारवा.... असा दिनक्रम अगदि मीरगाचो पावस... आणि चढणेचे मासे चढा पर्यंत....
बापुर्झा
डॉ. बापू भोगटे
माझी तत्वसरणी कदाचित कुणालाही सहजासहजी पटणार नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे. तरीपण, ती सर्वाना सांगण्याचा मोह टाळता येत नाही. विचारांची दिशा म्हणजे विचारसरणी….तसेच तत्वांची दिशा म्हणजे तत्वसरणी असा अर्थ समोर ठेऊन मी हे लेख लिहिले आहेत.
दैनंदिन जीवनात आपण, दिवसाचा काही भाग, विशेषतः आंघोळीनंतर, देवपूजा, पोथ्या वाचन, जपजाप्य, मंत्रपठण, ध्यानधारणा, एखादे स्तोत्र म्हणणे वगैरेत घालवितो. ही सर्व धार्मिक आन्हिके, पुरातन काळापासून आचरली जात आहेत. ही आन्हिके केव्हातरी, कुणीतरी, काही विशिष्ट उद्देश ठरवून प्रचारात आणली असावीत. दिवसाचाकाही काळ, इतर विचार बाजूस सारून, चांगले सात्विक विचार मेंदूत यावेत हाच असावा असे वाटते. विज्ञानीय दृष्टीकोनातून या सर्वांचे मनन केल्यास, बर्याच बाबींचा उलगडा होतो.
दिस उजळला
रात सरली
बात उरली
अंधाराची
काजवे सावल्या
गोड चांदण्या
चंद्र कहाण्या
ओठांवरी
सुर किड्याचे
बोल घुबडाचे
तोल मनाचे
ढललेले
-- शरद अर्जुन शहारे
हा विशाल समुद्र आहे
आणि हे माझे इवलेसे अश्रू.
मी या विशाल समुद्राकडे पाहतो
आणि कविता लिहीतो.

कथा म्हटलं की त्यात ‘नायक’ आला आणि ‘नायक’ नेहमी शुर,पराक्रमी वगैरे असायचाच. मग तो परंपरागत महाकाव्यांचा नायक असू दे किंवा आजच्या चित्रपटांचा ! मात्र या दोन्ही नायकांमध्ये बराच फरक असतो. आपल्या प्राचीन महाकाव्यांचे नायक हे अन्यायाविरुद्ध लढणारे असायचे. त्या त्या काळातल्या आसुरी शक्तींविरुद्ध त्यांनी हातात शस्त्रही घेतलं. पण लढणं आणि मारणं एवढाच त्यांच्या शौर्याचा निकष नाही.
एखाद्या पदार्थाकडून जेव्हा त्याच्यावर पडणार्या प्रकाशकिरणांच्या ऊर्जेचं शोषण होतं तेव्हा त्याला मिळालेली वाढीव ऊर्जा नेहमीच उष्णतेच्या रुपात प्रकट होते असं नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti