एकीकडे आम्ही गांजा आणि चरस ओढत होतो तरी नेहमी नशा करताना आमच्या चर्चा मात्र देशहिताच्या व्हायच्या व भ्रष्टाचार , काळाबाजार , जातीयवाद असे विषय आमच्या चर्चेत असत . आमच्या या ‘ गंजडी ‘ समूहात सर्व जातीधर्माची मुले होती आणि आमचा वयाने मोठा असणारा मित्र विलास हा जेव्हा जेव्हा आम्हाला भेटत असे तेव्हा तो नेहमी आम्हाला चार चांगल्या गोष्टी सांगत असे
युद्ध फक्त सैनिक लढत नाहीत तर देशाच्या नागरिकांनाही संयमाचे आणि विवेकाचे युद्ध लढावे लागत असते. त्यामुळे विद्यमान नाजूक परिस्थितीत भारतीय नागरिकांनी सावध आणि दक्ष राहण्याची गरज आहे. समाजमाध्यमवर व्यक्त होतांना संयम आणि विवेकाचं भान प्रत्येकाने ठेवायला हवे. देशांतर्गत शांतता बाधित होणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. समोरून वार करणाऱ्याची छाती चिरता येते. मात्र, पाठीत वार करणाऱ्याचा घाव रोखता येत नसतो. तेव्हा, जन हो सावध असा ! दक्ष असा !!रात्र वैऱ्याची आहे !!!
आजच्या जगात काय काय नाय घडतयं
आपली भारतीय सनातन आर्य संस्कृती अखिल विश्वा मध्ये प्राचीन संस्कृती मानलेली आहे.
गुलाबजाम आणि जिलेबी यांचे एकमेकांवर खुप प्रेम...दोघांनी नीट विचार केला आणि त्यांच्या आधी, त्यांच्या उपरोक्ष कोणी घरी सांगण्याऐवजी त्यांनीच आपले प्रेम प्रकरण आपल्या आपल्या घरी सांगून टाकले...
आता गुलाबजामचे वडील श्रीखंड आणि आई बासुंदी ही साधी माणस...रितीरिवाज जपणारी, सणवार सांभाळणारी आणि तरीही आधुनिकतेची जाणीव असणारी...त्यांचा फारसा विरोध झाला नाही..
जिलेबिचे वडील बूंदीचे लाडू व आई ईमरती यांचा तसा प्रेम विवाह तरीही इमरतीचा याला नकार ...इमरती जाम हट्टी..कट्टर...धष्टपुष्ट पंजाबी..तिचा मात्र विरोध होता....त्याचे कारणही असे की तिची मुलगी जिलेबी एवढी नाजुक-साजुक,कवळी काकड़ी सारखी, गोरीपान आणि त्याउलट गुलाबजाम गलेलठ्ठ, काळा सावळा आणि
त्यात गुलाबजामचा मोठा भाऊ कालाजाम एक नंबरचा गुंड दिसायचा...
खुप समजून सांगितले पण इमरती काही ऐकेना... मग बूंदीच्या लाड़वाने आपल्या परदेशी मित्राला म्हणजे रसगुल्ला आणि त्याची पत्नी रसमलाई यांना मध्यस्थ घातले आणि कसेबसे इमरतीचा होकार मिळवला...
लग्नाची बोलणी सुरु झाली...बैठका झाल्या...याद्या झाल्या...देवाण घेवाणीचा प्रश्नच नव्हता...फक्त चार वयस्कांचे मानपान एकमेकांनी करायचे व वर्हाड़ी मंडळींना पंचतिखटीय, चटपटित, चमचमित, जेवण द्यायचे हे तय झाले...
आणि बघता बघता जिलेबी आणि गुलाबजामच्या विवाहाची तारीख निच्छित झाली..
सगळे कामाला लागले...निमंत्रणे धाडली जावु लागली...
बूंदीच्या लाडुचा गोतावळा मोठा, अगदी रव्यापासून, मग बेसन,शेंगदाना ते मोतीचूर पर्यन्त सगळ्यांना निमंत्रणे गेली...
इमरतीने आपल्या बहिणीला रबड़ीला मदतीला बोलावून घेतले,तिच्या बरोबर लस्सीही आली...
इकडे श्रीखंडाने आपल्या मोठ्या भावाला आम्रखंडाला बोलावणे धाडले..बासुंदीची बहिण खीर आणि त्यांची सगळी मूल, रवा, गवले, तांदूळ इत्यादि यांना बोलावले गेले...
बोलता बोलता...लग्नाची तारीख येवून ठेपली..
मांड्याच्या पुरणपोळीचा मांडव घालण्यात आला...
मुंबई हलव्याचे स्टेज तयार करण्यात आले..त्यावर छान सूंदर सोनपापडीचे जाजम अंथरण्यात आले...
स्टेजच्या मागे...वेगवेगळ्या प्रकारच्या चॉकलेटची फुले आणि तऱ्हेतऱ्हेच्या गोळयांच्या माळांनी आरास करण्यात आली..
पिठीसाखरेची रांगोळी घालण्यात आली...
स्टेजवर चढण्यासाठी काजुकतलीच्या पायऱ्या करण्यात आल्या...
हळूहळू पाहुण्यांनी मंडप भरू लागला...विविध प्रकारच्या बिस्किटाच्या, नानकटाइच्या खुर्च्या मांडण्यात आल्या..
एक एक पाहुणे येवू लागले.... बालुशाही आपल्या राजेशाही थाटात मंडपात विराजमान झाली.... ...वेगवेगळ्या बर्फीची लगबग सुरु झाली...
कलाकंद, घेवर, मालपुवा, गुळ पापड़ी इत्यादि मंडळी येवून विराजमान झाली...
बूंदी, शंकरपाळी, चिक्की ई. लहान लहान मुले उगाच इकडे तिकडे पळत दंगा करत होती....नुक्ती आपला जूना रुबाब कायम ठेवत दुरून सर्व बघत होती....
दूर कोपऱ्यात गावाकडून आलेले गोडीशेव आणि रेवड़ी आपले अंग चोरून एवढा तामझाम बघुन उगाच बिचकुन बसले होते..
सगळ्यांची नजर चुकवत शंकरपाळा, रसभरीत कुल्फिवर लाइन मारत मंडपात तिच्या मागे मागे फिरत होता...
म्हैसूरपाक,गाजर हलवा आणि मुगडाल हलवा आल्या गेल्याचे स्वागत करत होते..
आमरस बाहेर गावी गेला असल्याकारणाने त्याची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती.
तेवढ्यात कोणीतरी सांगितले की वरमाय रुसून बसली...शेवटी म्हाळसा सारखीच ती, तिची समजूत काढत तिला स्टेजवर आणण्यासाठी सुतारफेणीच्या पायघड्या घालण्यात आल्या...
मग याद्यात् ठरल्याप्रमाणे थोऱ्या मोठयांचा म्हणजे करंजी, साठोरी, अनारसे,नारळीभात, इत्यादि यांचा मानपान करण्यात आला.
शिरा आणि त्याची बायको लापशी यांना 'मेहुन' म्हणून बोलावण्यात आले..
तेवढ्यात गुरूजी म्हणजे 'उकडीचे मोदक' यांनी विवाह समय जवळ आल्याची व वराला वधुला मंडपात आणण्याची आज्ञा दिली...
गुलाबजामचे मामा पेढ़े आणि जिलेबीचे मामा पेठा वधुवरांना घेवून मंडपात आले.
साखर फुटाण्यांच्या अक्षता वाटण्यात आल्या...
ग़ुलाबजामच्या पायावर पाकाचा अभिषेक करून पाद्य पूजन करण्यात आला...जिलेबी वधु आपल्या नारंगी शालुत खुपच खुलुन दिसत होती...तिला केशराचा टिळा लावण्यात आला...
माहिम हलव्याचा अंतरपाठ धरण्यात आला..मंगलाष्टके झाली....
छोट्या छोट्या गोळ्याच्या माळांचा हार वधु वरांनी एकमेकांना घातला...
लग्न लागताच पंच तिखट आणि चमचमित जेवणाच्या पंक्ती उठु लागल्या..
जेवणात...समोसे, कचोरी, भेळ, पाणीपुरी, SPDP ढोकळा, ठेपले, बटाटेवडा, मिरची वडा अश्या आणि अनेक पक्वान्नाचा फडशा पडत होता..
जेवणावळी नंतर, जिलेबीची पाठवणीची वेळ आली.
चॉकलेटची गाडी सजवली गेली...जिलेबी जाताना आईच्या गळ्यात पडून रड़ू लागली...ते पाहताच तिच्या वडिलांच्या म्हणजे बूंदीच्या लाडुच्या डोळ्यात सुधारस दाटुन आला तो अलगद पुसत त्याने जिलेबीला आशीर्वाद दिला...
चॉकलेटची गाडी जिलेबी आणि गुलाबजामला घेवून रवाना झाली...
-- WhatsApp वरुन फॉरवर्ड झालेली पोस्ट
वाढत्या महागाईमुळे प्रपंच चालवणे हीच तारेवरची कसरत बनल्याने घरात लग्नकार्य निघताच खर्चाचा मोठा आकडा परिस्थिती आणखी बिकट करतो. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष देशमुख यांच्या ‘लोकमंगल प्रतिष्ठान’ तर्फे राबवण्यात येणार्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे महत्त्व नेमकेपणाने अधोरेखित होते. केवळ सामाजिक जाणिवेपोटी चालणारा हा आनंदसोहळा अनेकांच्या जीवनात प्रकाश फुलवत आहे. या निमित्ताने…
प्रतीयमानं पुनरन्यदेव वस्त्वस्ति वाणीषु महाकवीनाम /
यत्तत्प्रसिध्दावयातिरिक्तं विभाति लावण्यामिवांगनासु //
या संस्कृत श्लोकाचा अर्थ सौभाग्यवती सन्नी लिऑन यांना विचारला गेला तेव्हा,त्यांना ही भाषा मंगळावरची की बुधग्रहावरची हा प्रश्न पडला.या प्रश्नात त्यांना एक उत्तर दिसलं,ते असं की परग्रहावर कुणीतरी नक्किच असायला हवं. म्हणजे,देअर इज ऍ़न ऍ़र्पाच्युनिटी टू लेड फौंडेशन ऑफ पॉर्न इंडस्ट्री.त्या उत्स्फुर्तपणे उद्गारल्या.
यू ऑर ग्रेट,सौ.सन्नीचे मिस्टर त्यांची पाठ थोपटत म्हणाले. तुम्हास संधी कुठेही सापडू शकते हा शोध लागून आमचे ह्रदय भरुन आले आहे.
संधीचं असच असतं यारा,कोलंबस शोधायला गेला इंडिया पण त्यास मिळाली अमेरिका.ही अमेरिका त्यास मोठी संधी वाटली.त्या संधीचं इतरांनी सोनं केलं.मी सुध्दा अमेरिकेत आले.
म्हणून तू सन्नी झालीस. पतिराज बोलले. यारा स से सोनं आणि स से सन्नी..
हौऊ ब्युटिफूल.तुला कसं रे सुचतं,इतकं छान छान..
मी तुझाच यारा ना ! तुला त्या परग्रहावरच्या भाषेत जर पॉर्न इंडन्स्ट्रीची संधी दिसू शकते.तर मला स से सन्नी कां सुचू शकत नाही.
पण यारा ,हा जो श्लोक आहे,तो कशासाठी परग्रहावरुन इकडे आला असेल,आपण अँजिनिलाला विचारु या का?
नको,ती आपल्याला ओळखत नाही.
राखी सावंतलाच विचारलं तर..
त्यांचा पत्ता आपणास कुठे ठाऊक.शिवाय त्यांनी अर्थाचा अनर्थ करुन सांगितला तर पुन्हा पंचाईत.त्या तिखट नाहीत का जराशा.
ते ही खरच म्हणा,त्यांना कळलं की परग्रहावर माणसं राहतात तर त्या तिथं बिग बॉस सुरु करण्यासाठी सलमानभाईच्या पाठिमागे लागतील. तशा त्या फार हुषार. त्यांच्याकडे बिझिनेस माईंड असल्याचं शोभाताई डे यांनी एकदा म्हंटल होतं.
मग मार गोली तिला,आपण आपलं बघावं.हिला विचार,तिला विचार कशाला.प्रियंका चोप्रा काय शिल्पा शेट्टीस विचारत बसली का प्रेमात पडण्यासाठी? शिल्पाच्या बाजुने वेळ होता तेव्हा ती प्रेमारली.प्रियंकाने वेळ साधली आणि ती अक्षय बहरली.
तुला कसं ठाऊक सारं.
बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये प्रेमाच्या कथा अशाच लिहिल्या जातात.जेनिफर ब्रॅड पिटवर फिदा होती. ब्रॅड पिट अँजेनिलावर प्रेम करयाचा.अँजेलिना चार जणांवर प्रेमाचा वर्षाव करायची. ब्रॅडने जेनिफरला सोडले.अँजेलिनाचा प्रेम पाऊस आटला.जेनिफर,जस्टिन थेरॉक्समध्ये गुंतली.ब्रॅड,अँजिलिनास आय लव्ह यू म्हणाला.अँज्येलिनाने त्याला त्याच्या घरातून बाहेर काढले.आपलंही घर सोडलं.तिसऱ्याच घरी रहायलं गेले.वगैरे. जेनिफरच्या आधिची ब्रॅडची प्रेयसी ग्वालथेन प्लॉट्रो एकमेंकाना कॉफी पिण्यासाठी भेटल्या.ती तिच्या नव्या प्रेमकथेत गुंतलेली आणि ही हिच्या चौथ्या प्रेमकथेत.
याचा अर्थ प्रेमा तुझा रंग कसा असं या दोघी तिकडे आणि प्रियंका टू कॅटरिना टू दीपिका इकडे यावर चिंतन करतात नाही का रे.
मग या श्लोकाचा अर्थ आपणास कोण बरं सांगणार.कारण महाराष्ट्रप्रांती सध्या दूरान्वयेही एकही महामहोपाध्याय वगैरे दृष्टिक्षेपात येत नाही.
आपण मिसेस निरजा राडियाला याचा शोध घ्यायला ऍम्लॉय करु या का?
सखे,काय पण तुझं डोकं चालतं गं.या राडियाताई ग्रेट कनेक्टर आहेत.त्या कुठे ना कुठे या श्लोकाचं कनेक्शन नक्किच जोडून देतील. कसं गं सुचतं तुला हे.ब्रेन वुईथ ब्युटी म्हणतात ना, ते हेच.ते केवळ ऐश्वर्या रॉय यांच्याकडेच नसून तुझ्याकडेही आहे,हे बघून माझे ह्रदय भरुन आलेय., पतिराज सन्नीचं कौतुक करत असतानाच,आकाशवाणी झाली.
मित्रा,कशाला जातोस कुठे विचारायला,राडिया ताईला.तू जे काही बोललास ना तुझ्या याराला तोच या श्लोकाचा अर्थ.
म्हणजे ? सन्नी आणि त्यांच्या पतिराजांनी आकाशाकडे चमकून बघितलं,
म्हणजे असं की दोस्ता, एखाद्या स्त्रिचं खरं सौंदर्य हे तिची गात्रं किंवा अवयवांपासून वेगळं असतं की रे..
म्हणजे मी बाहेरची वेगळी आणि मी आतली वेगळी असं काही म्हणायचय का तुम्हास.
तसचं काहीसं.
अरे देवा,इट मिन्स तो श्लोक मंगळावरचा किंवा बुधावरच्या मनुष्यप्राण्यांचा नव्हता तर..
यात एवढं,अरे देवा असं म्हणण्यासारख काय झालं.
काय झालं म्हणजे,इट मिन्स नो ऍ़पॉर्च्युनिटी टू लाँच पॉर्न इंडस्ट्री ऍ़ट मंगळ ना..
सन्नीचं हे बोल ऐकून आकाशवाणी करणाऱ्याने कप्पाळावर हात मारुन घेतला.
राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा तोंडावर आल्या असताना एकीकडे स्पर्धेची तयारी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. तर दुसरीकडे रोजरी भ्रष्टाचाराची नवी प्रकरणे बाहेर येत आहेत. अशा परिस्थितीत खेळ, खेळाडू आणि देशाची प्रतिष्ठा याचा विचार कोणीही करत नाही. प्रत्येकाला या स्पर्धेनिमित्त वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायचे असून स्पर्धा झाल्या नाहीत तरी त्याचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
किरण नगरकरांची पहिली कादंबरी १९६७-६८च्या सुमारास ‘अभिरुची’ मध्ये प्रसिद्ध झाली होती. नगरकर हे त्यांच्या रोखठोक लिखाणामुळे नेहमी चर्चेत होते.
Copyright © 2025 | Marathisrushti