आज सहज संध्याकाळी मळ्याच्या कडेने गेलो फिरायला .. 100 150 एकर चा भर ऊन्हाळ्यात हिरवागार असलेला ऊन्हाळीभाताचा -वायंगणीचा- मळा...... मन सहज 20 25 वर्ष मागे गेलं.....
मार्च एप्रिल महिन्यात पुर्ण मळा रिकामी व्हायचा... आणि आमची 7 8 गुराख्यांची टोऴी निघायची मळ्यात, 30 40 गुरे घेऊन... जेव्हा ईतरांच्या जनावरांना कोरडा चारा दुरास्पत असायचा... तेव्हा आमच्या जनावरांना हवा तेवढा हिरवा चारा...... मोकळी सोडलेली पुर्ण दिवस....
काय दिवसाचा अप्रतिम दिनक्रम होता.... सकाळी 7 ला दिवस उगवायचा आमचा.... 8. ला जनावरे सोडायचं काम... मोकळा वारा प्यायचा... तिथच एक बांधावर प्रचंड रायवळ आंबा होता.. 70 80 तरी आंबे गोळा करायचे... 10 10 तरी प्रत्तेकजण खायचा....
मग दोन तिन मेंबर फणसाच्या शोधात निघायचे. पिकलेले खायचे... तर कच्चे नदिच्या वाळुत पुरुन ठेवायचे... ऊद्याला...
एकदिवस चवळीच्या शेंगा भाजायच्या तरी दुसर्यादिवशी भुईमुगाच्या... कुणाच्याही...
11 वाजल्या नंतर सगळा लवाजमा नदिवर जायचा... मग 2 तास डुबणे नदित.... जनावरांची आंघोऴ... आणि ऱाखण्यांची पण... एकत्रच....
म्हैशीच्या कानात मासा पकडणे म्हणजे स्पेशालिटी.... अगदी थोड्यांकडेच....
मग घरी अडीजवाजता.... जेवण झालं की काजीनी खेऴायचं... मुकरीचा मांड खासच....
गल.... ढोपो...... जुगी..... सप..... फगाम....
हे शब्दच आता ऐकायला येत नाहीत. . किंवा हद्दपारच झालेत....
परत ऊन ऊतरलं की म्हशींसोबत मळ्याची वाट... पण आता क्रिकेट बॉल दिसायचा बंद होईस्तोवर क्रिकेट. त्यातही "कटीनी" खेळायचं म्हणजे खासच.. .......
मग खास बैठक चर्चा अगदि पंतप्रधानांपासुन बाजूच्या वाडीतील मंजिच्या लफड्यापर्यंत...
काऴोख पडल्यानंतर जनावरं चरवण्याची खास मालवणी स्टाईल.....
"म्हस कशी मेल्यासारखी एका जाग्यावर चरता"
मग जनावरं बांधायची....आणि जेवण झालं की अंगणात माटवात ऊघड्यावरच झोपायचं AC झकमारतो असा वारा आणि गारवा.... असा दिनक्रम अगदि मीरगाचो पावस... आणि चढणेचे मासे चढा पर्यंत....
बापुर्झा
डॉ. बापू भोगटे
लहान मुलांच्या जेवणाच्या संवयींविषयी वाचत होतो. लहान मुले जेवताना खूप त्रास देतात. हट्टीपणा करतात. त्यांच्या जेवणाच्या लहरीपणामुळे तास दोन तास देखील, …..
ध्येय असावे तुमचे नेहमीं
आनंद मिळवण्याकडे
'आनंद ' हाचि ईश्वर असतो
समजून घ्याहो हे कोडे ।।१।।
शरीर देई 'सुख ' तुम्हांला
क्षणिक ते तर असती
सुखाच्या पाठीशी छाया असते
'दुःख ' तयाला संबोधती ।।२।।
सुखाबरोबर नाते असते
सदैव अशाच दुःखाचे
वेगळे त्यांना कुणी न करती
जाणा तत्त्व हे जीवनाचे ।।३।।
'आनंद ' भावना असे एकटी
नसे तेथे दुजी भावना
'मोक्ष' तयाला म्हणती कुणी
आस्तित्व त्याचे तुमच्याच मनां ।।४।।
व्यर्थ जातील प्रयत्न तुमचे
'आनंद' शोधता बाहेरी
विसरुन जाता जर देहाला
मिळेल तुम्हां ते अंतरी ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
मी तसे अनेक संकल्प कुठलाही नशापान न करता करतो.नशा न करण्याचाही संकल्प मी तसाच केला होता.परंतु माझा कोणताही संकल्प सिद्धीस जात नाही.मोठे संकल्प जाऊ द्या अगदी छोटे संकल्प देखील तडीस जात नाहीत.माझा मूळ स्वभाव संकल्पाच्या आड येतो.
मर्ढेकरांच्या हाडांचे सापळे हासती ह्या कवितेवर अश्लीलतेच्या कारणावरून त्या काळात खटला भरण्यात आला होता. ह्या कवितेचा अर्थ वेगळ्या संदर्भात ऊलगडण्याचा प्रयत्न केला आहे.
वात्रट-टीका
अशाच एका वाढदिवशी डॉ. बच्चन व तेजी बच्चन इंदिराजींना भेटायला आली. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. हरिवंशराय बच्चन यांचाही वाढदिवस नोव्हेंबर महिन्यात २७ तारखेला येई. त्यांनी २७ तारखेला इंदिराजींना आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले.
क्रेडिट किवा डेबीट कार्डचा वापर करून खरेदी केल्यास ग्राहक आणि दुकानदार दोघांचेही बरेच श्रम वाचतात. परंतु, ग्राहकाने अदा
केलेली रक्कम दुकानदाराबरोबरच बँकांमध्येही विभागली जाते. यात दुकानदाराच्या नफ्यातील जवळजवळ अर्धी रक्कम खर्च होते असे दुकानदारांचे म्हणणे आहे. त्यामुळेच दुकानदार कार्ड पेमेंटपेक्षा रोखीने व्यवहार करण्यास प्राधान्य देतात.
“ट्रेक्स अणि रॅपलिंगचे आयोजन”..
Copyright © 2025 | Marathisrushti