(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • प्राचार्य…..(श्रद्धांजली)

    प्राचार्य…..(श्रद्धांजली)

  • भाजीचं नेमकं वजन तराजूने मोजता येतं का?

    फार पूर्वीच्या काळी बार्टर पध्दत होती. गव्हाच्या बदल्यात कापूस किंवा तांदूळाच्या बदल्यात मातीची भांडी अशी वस्तूंची देवाणघेवाण होत असे. पण किती गहू देऊन किती कापूस घ्यायचा हे त्या वस्तूंचा ढीग लावून त्यांच्या आकारामानावरुन ठरवणं चुकीचं ठरत असे.

  • विज्ञान आणि अध्यात्म – पूर्ण ब्रम्ह.

    ऋषिमुनींची प्रतिभा अचाट होती. संस्कृत भाषेवरील त्यांचे प्रभुत्व देखील असामान्य होते. त्यांचे ज्ञान त्यांनी लाखो श्लोकात लिहून ठेवले आहे. या श्लोकांच्या काही ओळी वाचीत असतांना जीभ अक्षरश: अडखळते. पण श्लोकात गुंफलेले हे ज्ञान, शिष्यांच्या अनेक पिढ्यांनी, तोंडपाठ करून शेकडो वर्षे जतन केले. लिहीण्याचे तंत्र विकास पावल्यानंतर हे सर्व ज्ञान लिखित स्वरूपात उपलब्ध झाले. लिखित मजकूरही शेकडो वर्षे दुर्मिळच होता. सर्व साहित्य हस्तलिखित स्वरूपातच होते त्यामुळे त्याचा प्रसार सामान्य माणसांपर्यंत पोचला नाही. त्या काळी ध्वनीलेखनाचा शोध लागला नव्हता. म्हणून त्यांना अभिप्रेत असलेले उच्चार आपल्याला करता येत नाहीत.

    पाठांतर आणि हस्तलेखन यात व्यक्तीनिहाय थोडेथोडे बदल होत गेले.

    हे पौराणिक साहित्य मूळ स्वरूपात आता फारच दुर्मिळ झाले आहे. ज्या थोड्या विद्वानांनी मूळ पोथ्या मिळवून, श्लोकांचा अन्वयार्थ लावून, प्रचलित भाषात भाष्ये करून ठेवली असल्यामुळे, आपल्याला आता त्या ज्ञानाचा आस्वाद घेता येतो. त्यामुळेच हजारो वर्षापूर्वीचे ऋषिमुनींचे विचार, आपल्यापरीने आपल्याला कळतात.

    पाचसहा हजार वर्षांपूर्वी, मौखिक माध्यमात साठविलेल्या कित्येक श्लोकांचा, ऋषिमुनिंना अभिप्रेत असलेला अर्थ, आज आपल्यापर्यंत पोचला आहे असे खात्रीपूर्वक म्हणता येत नाही.

    .

  • अत्तराच्या व्यापाऱ्याजवळ बसलो असता

    अत्तराच्या व्यापाऱ्याजवळ बसलो असता त्याने काही दिले नाही दिले , तरी आपल्याला फुकटचा वास घेता येतो वा मिळतो.

    चांगल्या लोकांचा सहवास त्या अत्तराच्या व्यापाऱ्यासारखा आहे. त्यानं काही दिलं नाही, बोलला नाही, उपदेश दिला नाही, चमत्कार केला नाही, तरी त्याच्या देहातून-मनातून ज्या पवित्र लहरी वा स्पंदनं बाहेर पडतात त्यांनी आसपासचं वातावरण पवित्र झालेलं असतं. अशा वातावरणात राहिल्यानं आपल्याही मनात पवित्र विचार येऊ लागतात, त्याचा परिणाम आपली बुद्धी व प्राक्तन यावरही होतो. म्हणूनच म्हणतात,

    न लगे मुक्ती, धन, संपदा ...
    संत संग देई सदा.

    शुभदिन

  • मराठी विज्ञान परिषद, मुंबई

    मुंबईतील मराठी विज्ञान परिषद ही संस्था मराठीतून विज्ञान प्रसारासाठी कार्य करते. मराठी समाजामध्ये विज्ञानाबद्दल जागरुकता आणि जाणीव निर्माण करण्यासाठी परिषदेची कामे चालतात.

    संस्थेचे विविध उपक्रम, प्रकाशने, पुस्तिका तसेच यांची माहिती www.mavipamumbai.org या वेबसाइटवर उपलब्ध आहे. साईटवर माहिती बरीच आहे. मात्र बयाचशा links इंग्रजी साईटसना दिलेल्या दिसतात. त्याऐवजी हीच माहिती मराठीत दिली असती तर कदाचित परिषदेच्या उद्दीष्टांची जास्त चांगल्या प्रकारे पूर्ती झाली असती.

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुचविलेली अ ची बाराखडी : आक्षेपांचे निरसन

    स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषाशुध्दीसंबंधी मूलभूत योगदान दिले आहे. त्याचे पुतणे श्री. विक्रम सावरकर यांचेशी फोनवर अनेक वेळा बोलतांना, बरेच मराठी शब्द स्वातंत्र्यवीरांनी सुचविल्याचे कळले. महापौर, कलामंदीर (स्टुडियो), दिग्दर्शन, दिनांक वगैरे सुटसुटीत आिण चपखल मराठी शब्द सावरकरांचेच. परंतू त्यांनीच सुचविलेली अ ची बाराखडी मागे का राहिली? त्यासंबंधी काही विचार….

  • जन्मापूर्वी चाऱ्याची योजना

    जन्मापूर्वी चाऱ्याची योजना

    योजना करी चाऱ्याची, मुख देण्याचे आधी,

    तुझ्या दयेची किमया, कळली न कुणा कधीं....१,

    बदल करूनी शरिरी, मातृत्वाचे भरतो रंग,

    क्षिराचा देई साठा, पुलकित करूनी अंग...२,

    सदैव तयार राहूनी, दाना देई भूमाता,

    कुणी न उपाशी राही, काळजी घेई विधाता....३,

    जन्म देवूनी साऱ्यांना, पोषण तोच करितो

    अनंत उपकार करूनी, ऋणी आम्हा ठेवतो...४

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती…

    प्रामाणिकपणा आणि त्या कष्टाचं बाळकडू या वारीत तूझ्या समस्त भक्तांना पाज…. त्यांना आशिर्वाद दे कुठल्याही विध्नाला सामोरं जाण्याची.. तू विध्न देतोस त माणूस घडण्यासाठीच मग त्यातून माणूस घडू दे देवा.. राक्षस या लढाईत हरू दे.. तूझ्या या भक्ताचं हेच साकडं आहे तूझ्याकडे..

  • एक भिजरी आठवण

    पाऊस हा साहित्याच्याही सुगीचाचं दिवस असतो…असचं पावसाचं सुचलेलं वाचकांसाठी…

  • मराठी माणसाला काय येतं?

    मराठी माणसाला काय येतं?