……………मग त्याने मराठी माणसे धंद्यात मागे का? या विषयावर परीसंवाद भरवला पण तो मात्र जिथल्या तिथेच राहिला. त्याची बायको खूप दु:खी झाली. एके दिवशी ती झोपली असताना देवी लक्ष्मी तिच्या स्वप्नात आली आणि आधुनिक काळातील वैभव लक्ष्मीचे व्रत तिला सांगितले.
मी सर्वप्रथम अमेरिकेत अपूकडे गेले ती 1998 साली.म्हणजे 25 वर्षांपूर्वी…. !पहिल्यांदाच विमानाचा प्रवास..आणि तो देखील इतक्या दूरचा आणि एकटीने करायचा… ! मी मुंबईतही कधी एकटीने प्रवास केल्याचं मला आठवत नाही.सासरी जायचं असो नाहीतर माहेरी जायचं असो.
मानवाच्या शरीराची पंच इंद्रिये त्यांना नेमून दिलेले कार्य करणारी असतील तर त्यांचा उपयोग आहे. शरीरावर नुसती पंचेंद्रिये असून काय फायदा? ती सशक्त, सुद्रुढ व कार्यरत नसतील तर काय कामाची? तसेच अगदी सुंदर रेखीव मासोळीदार काळेभोर टपोरे डोळे आहेत पण ते बघू शकत नाहीत तर त्यांचा काय उपयोग? दैनंदिन जीवनात पदोपदी डोळ्यांची आवश्यकता भासते.
या सिनेमाने स्टीव्हन स्पीलबर्गपासून ते रिडली स्कॉट (२०१२ साली निर्मिलेल्या ‘प्रोमेथियस’ या गाजलेल्या सायन्स फिक्शन चित्रपटाचा दिग्दर्शक) पर्यंतच्या अनेक दिग्दर्शकांना प्रभावित केलं आहे.
वेळ ही एक हालचाल ( Movement ) समजली गेली आहे. वेळ कधीच स्थीर नसते. जगाच्या चक्राप्रमाणे ती फिरत असते. प्रत्येक हालचालीसाठी …..
न्यायालयाने निकाल दिला
जे तिथे आधी होते..
भाकरीच्या पाठीवर ठसे दिसती हातांचे
जातां तव्यावर भाजूनी निशाण राहते कष्टांचे
एका भाकरीच्या पाठीं हात कितीक गुंतले
कण कण देती ग्वाही मन भरुनी कसे आले
उन्हां पावसात फिरे शेतामधीं शेतकरी
टप् टप् घाम गाळी उभी करितो जवारी
पोती पोती उचलूनी वाहून नेई मजूर
दमछाक होऊनी ही मिळत नाहीं पोटभर
ओवी म्हणत मुखानें आई थापिते भाकरी
साऱ्यांच्या कष्टामध्यें तिच्या मायेची भागीदारी
धरणीच्या पोटातून जीवन रस येई वर
दुजासाठी जगा तुम्ही बघा सांगते भाकर
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
ओमान देशाला आखाती राष्ट्रसमूहाचे प्रवेशद्वार म्हटले आहे तर वावगे ठरू नये. तीन समुद्रांची किनार व निसर्गाचे लेणे लाभलेला हा देश पर्यटकांना आकर्षित तर करतोच परंतु गेल्या अवघ्या चार दशकांत व्यापार उदिमात झपाट्याने अग्रेसर बनून सर्वांगीण प्रगतीची कास धरणारे राष्ट्र म्हणून हा देश मला विशेष भावला. प्रस्तुत लेखात मस्कत-सूर आदी ओमान देशातील ठिकाणी केलेल्या शैक्षणिक दौर्यातील अनुभव लिहिलेले आहेत.
इंटरनेटच्या माध्यमातून आज मराठीतून काहितरी लिहीतांना खूप आनंद होतो आहे. आज सहजचं आपण डोळसपणे पाहिलं तर आपल्या एक लक्षात येइल की कुठेतरी आपण आपलं माणूसपण हरवतोय. समाजातून हळूहळू नितिमुल्य सुध्दा हरवतायत. भ्रष्टाचार हाच शिष्टाचार होऊ पहातोय. याचाचं सुशिक्षीत मनाला खूप त्रास होतोय. पण आपल्याच षंढपणामूळे आपण काहिच करु शकत नाही याची जाणिव मनाला खूप अस्वस्थ करतेय. आणि मग कधीतरी लिहिलेली कविता तुमच्यापर्यंत पोहचवावीशी वाटतेय….
Copyright © 2025 | Marathisrushti