मॅडम , तुम्ही फार छान दिसता जितक्या छान दिसता त्यापेक्षाही छान तुम्ही हसता
मॅडम , तुमचंही एक घर असेल नवरा असेल , सासू असेल , सासरा असेल , दीर असेल घरात सारखी पीरपीर असेल जाऊ बाई जोरात असतील नणंद बाई तोऱ्यात असतील तुम्हाला छोटी छोटी मुलं असतील तुमच्या बागेत फुलं असतील सर्वांसाठी तुम्ही अहोरात्र झिजता
आणि तरीही , मॅडम तुम्ही फार छान दिसता जितक्या छान दिसता त्यापेक्षाही छान तुम्ही हसता.
तुमच्याही घरात भांड्याला भांडे लागत असणारच कुणी आपुलकीने तर कुणी द्वेषाने वागणारच कुणी रुसणार , कुणी फुगणार कुणी रागवणार , कुणी जागवणार कुणी भरवणार , कुणी जीरवणार मन मारून तुम्ही सगळ्यांचच मन राखता आणि तरीही , मॅडम तुम्ही फार छान दिसता जितक्या छान दिसता त्यापेक्षाही छान तुम्ही हसता सासऱ्याची एकादशी सासूचा प्रदोष नवरा म्हणतो मटण कर त्याचा काय दोष दीर म्हणतो गरम वाढा नणंद म्हणते उष्टी काढा आजेसासूची गोळीची वेळ मुलं म्हणती आमच्याशी खेळ नवऱ्याचाही असतो थाट नखरे त्याचे सतराशे साठ आल्या गेल्याचही तुम्ही किती बेवार बघता
आणि तरीही , मॅडम तुम्ही किती छान दिसता जितक्या छान दिसता त्यापेक्षाही छान तुम्ही हसता
तुम्हालाही मन आहे कोण जाणतं ? तुम्हालाही भावना आहे कोण जाणतं ? तुम्हीही माणूस आहात कोण मानतं ? त्यांना तुमचं काम हवं कमावून आणलेलं दाम हवं तुमची माया हवी तुमची अख्खी काया हवी विनातक्रार तुम्ही सारं कसं काय सोसता ?
पण जाऊद्या , मॅडम तुम्ही फार छान दिसता
जितक्या छान दिसता त्यापेक्षाही छान तुम्ही हसता.
-- विक्रम पाटील
एक गमतीदार परंतु मनोरंजक संत कथा वाचण्यांत आली. जीवनाचे खुपसे तत्वज्ञान कळले. सारे चिंतनीय होते. एका गावांत एक थोर संत रहात होते. तत्वज्ञानी …..
आजकाल विविध प्रसारमाध्यमांवरून प्रसारित केले जाणारे कार्यक्रम पाहिले की या माध्यमाला काही धरबंद राहिला नाही असेच म्हणावेसे वाटते. अगदी किरकोळ बाबीला अवास्तव महत्त्व देणे आणि जनतेच्या मुख्य प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे असा प्रकार सुरू आहे.
जुन्या काळातील चित्रपटात एक सीन हमखास रहायचा, तो म्हणजे नायिका बागेत चालत असते… चालता चालता तिच्या पायात अचानक काटा रुततो… शेजारी असलेला नायक अलगद तिच्या पायातला काटा काढतो… चित्रपट पुढे सरकत जातो. थोडक्यात काय तर चित्रपटात नायक-नायिकेचे प्रेम फुलवायला आणि चित्रपट पुढे सरकवायला काटा कारणीभूत ठरतो…
बागेतील तारका- थांबव, विज्ञाना तुझे शोध
मला आजही लख्खं आठवतंय, आजीचं एक पालूपद …. तुला “अनुभव” येईल नं तेव्हां कळेल. मी म्हणायची, ‘आजी कुठून ग येईल तो अनुभव ?’
‘अगं, तो काही असा सांगून येत नाही वेडाबाई. तुझं तुलाच जाणवेल हो.’
इंटरनॅशनल शाळेत मराठी शिकवण्याचा अनुभव.. अमराठी मुलांचा मराठी भाषेबद्दल असलेली अढी..
माणसाला जीवनात आवश्यक असलेले छंद !! .. माझा लेख -आजच्या "नवाकाळ"मध्ये ! माणसाला जीवनात आवश्यक असलेल्या छंदांसंबंधी माझा एक छोटेखानी लेख,आजच्या "नवाकाळ"मध्ये छापून आला आहे. आपल्या सर्वांसाठी हा लेख खाली देत आहे. आपला अभिप्राय जरूर कळवा . तसेच आपलेही काही वेगळे अनुभव आहेत का ?
असे म्हणतात की शिक्षणावाचून माणूस म्हणजे अर्धाच .. पण अलीकडे असे दिसते की कसलाही छंद नसलेला निवृत्तीनंतरचा माणूसही असा अर्धाच राहतो. अचानक बी पेरून लावलेले झाड जशी लगेच फळे देत नाही तसाच छंदही निवृत्तीनंतर नव्याने लावून घेता येत नाही.
आधीपासून त्याचे पिसे लागलेले असेल तर निवृत्तीनंतरचे आयुष्य खूप छान जाते. तो निवृत्तीच्या आधीही जपला असेल तर रोजच्या नोकरी व्यवसायात असलेल्याचीही मानसिक स्थिती उत्तम राखतो.
गरीब माणसाला अपचनाचा त्रास होत नाही. तसा बहुतेक प्रत्येक संग्राहक हा आपल्या संग्रहाबाबत तरी गरीबच असतो. कधीच संतुष्ट नसतो. आपल्या संग्रहात अजून अमुक नाही--तमुक नाही असे म्हणत तो सदैव शोधातच असतो. त्यामुळे विविध प्रकारचे संग्रह करणाऱ्या, माझ्या बरोबरच्या सुमारे १५ /२० विविध वयाच्या मित्रांना रक्तदाब, मधुमेह, कोलॅस्ट्रॉल असले काहीच त्रास नाहीत. खरोखरच्या गरिबांची क्षमा मागून असे म्हणता येईल की जमविलेल्या वस्तूंच्या बाबतीत तरी तो सदैव दारिद्र्य रेषेच्या खालीच असतो. कुणाचा द्वेष, हेवा, मत्सर करायला मन रिकामंच राहत नाही. हे छंदामुळे घडते काय हा प्रश्न मी एका खूप मोठ्या विद्वान डॉक्टरांना विचारला तेव्हा
त्यांनी होकारात्मक उत्तर दिले.
माझे एक असेच वयाची ८० वर्षे ओलांडलेले छांदिष्ट मित्र एक दिवस खूप खिन्न होते. त्यांना बरं वाटत नव्हतं हे उघड होतं .मी त्यांना विचारले, काय झाले? ..बरं नाही का ? डॉक्टरांकडे जायचंय का? त्यांनी एक दीर्घ सुस्कारा घेऊन सांगितले की तसे नाही हो. एकाने मला " रशियाचे ३ कोपेकचे दोन्ही बाजूंना छापलेले आणि नाणे म्हणूनही वापरले गेलेले टपाल तिकीट " देतो म्हणून कबूल केले होते आणि दुसऱ्या कुणी तरी ५० रुपये जास्त दिले म्हणून त्याला विकून टाकले. आता बोला. ... म्हणजे " हे " त्यांचे आजारपणाचे कारण होते तर ! ... मी ही "दुःख:द " बातमी आमच्या सर्व छांदिष्टांना सांगितली. त्यामुळे " ते दु:ख " लगेच वाटले गेले. सर्वच जण कामाला लागले. कुणी मित्रांकडे विचारणा सुरू केली, विदेशात मेल गेले. इ- शोध सुरू झाले. आणि आठवड्याच्या आत ते (तसेच) तिकीट या अतिज्येष्ठ छांदिष्टांपर्यंत पोचले. खुश झालेल्या या गृहस्थांनी आम्हा सर्वांनाच आग्रहाने घरी बोलावून चहा पाजला.आता या एकाच घटनेत किती चांगल्या गोष्टी दडल्या आहेत त्याचा हिशेब न मांडलेला बरा.
छंदांमुळे उच्चनीचतेची भावनाही कमी होते. एका चर्मकाराच्या दुकानातील संत रोहिदासांच्या चित्राशेजारी लावलेल्या एका वेगळ्याच दिव्याची चौकशी मी रस्त्यात त्याच्या शेजारी बसून करत होतो. शेजारून जाणाऱ्या माझ्या ऑफिसातील एका सेवानिवृत्त जनरल मॅनेजरला हे खटकले पण माझ्या ते लक्षातही आले नाही. पितळी ओतकाम, वेल्डिंग, पॉलिशिंग अशा गोष्टींमुळे होणारे कुंभारवाड्यातील प्रचंड प्रदूषण मला जाणवत नाही आणि त्याचा मला कधी त्रासही होत नाही.
रात्री झोपतांना , उद्या आपल्याला केवढी कामे करायची आहेत याचा केलेला विचार ,मला जगण्याची उमेद, आत्मविश्वास,सकारात्मक दृष्टी अशा गोष्टी देतोच पण हा विचार करता करता झोप कधी लागते ते कळतही नाही. .. मग कसली गोळी घेताय राव .... आणि कशाला ?
आज १० / १२ वर्षांच्या मुलांनासुद्धा निराशा ग्रासते. या वयाची मुले आत्महत्या करतात. काय भयंकर आहे हे ? पूर्वी दिवसातून एकदा जेवायला मिळणं ही सुद्धा चैन वाटावी अशा परिस्थितीत जगणारी लाखो मुले होती. फाटके कपडे, पडझडीचे घर, घरात वीज-पाणी नाही,
अभ्यासाला वह्या- पुस्तके नाही, अनवाणी / छत्रीशिवाय कित्येक मैल चालत शाळा गाठायची, अभ्यासाला वेळ आणि जागाच नसायची. तरीही मुले आत्महत्या करीत नव्हती. अशा दयनीय परिस्थितीतही त्यांचे आपले असे एक छोटेसे विश्व असे. अशा मुलांकडेही स्वतः:चे असे काहीतरी "जमवलेले" असे. गावाकडची मुले गुंजा , दगड गोटे, पक्ष्यांची पिसे, रंगीबेरंगी दगड, बिट्टी- पारिंगा अशा कुठल्यातरी बिया,सागरगोटे, पिंपळाची जाळीदार पाने तर शहरात मुले बसची तिकिटे,टपाल तिकिटे, चॉकलेटच्या चांद्या, नाणी, पत्ते , बांगडीच्या
रंगीबेरंगी काचा, क्रिकेटपटूंचे पेपरात आलेले फोटो,मोरपिसे, पिंपळाची जाळीदार पाने,शंख-कवड्या ,काड्यापेटीवरील चित्रे,सिगारेटची पाकिटे ( त्यावेळी या पाकिटांवर वैधानिक इशारा नव्हता तरीही केवळ पाकिटे जमवतो म्हणून ही मुले धुम्रपानाकडे वळत नसत.) ...... असे काय काय जमवीत असत. अहो तेव्हा त्यांना हा केवढा प्रचंड खजिना वाटत असे. कुठल्याही आर्थिक परिस्थितीतील ही मुले या
आघाडीवर तरी श्रीमंत असत.
आज सामान्य आर्थिक परिस्थितीतील पालकांना सुद्धा मुलांना ८-१० हजारांचा मोबाईल घेऊन द्यावा लागतो. नवे युनिफॉर्म्स, पुस्तके, वह्या, अत्यंत आकर्षक अशी दप्तरे, पेन्सिल-पेन-खोड रबर-वॉटर बॅग - रेनकोट- छत्र्या-बूट- चपला , स्कूल बस, पॉकेट मनी, वाढदिवसाचे खर्च, पिकनिकचे खर्च अशा अनेक खर्चिक गोष्टींसाठी, ऐपत असो नसो, पालक प्रचंड पैसा खर्च करतात. तरीही मुले आणि त्यामुळे पालक सुखी नाहीत. प्रचंड पैसा खर्चूनही ही मुले मनाने श्रीमंत होत नाहीत. कार्यानुभव म्हणून अनेक गोष्टी ही मुले आणि पालक सक्तीने करतात --मार्कांसाठी करतात पण आनंदासाठी नाही. या मुलांना पुन्हा छंदांकडे वळविले तर ?
" हा छंद जीवाला लावी पिसे" असे कुणी म्हटले तरी मी मात्र " घेई छंद मकरंद" असेच म्हणणार !
--मकरंद करंदीकर. अंधेरी पूर्व, मुंबई.
१९४२ चा वणवा भारतभर पेटला. अहिल्याबाई त्यावेळी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज ला शिकत होत्या. विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्यात भाग घ्यावा म्हणून सगळ्या विदयार्थ्यांना एकत्रित केले आणि “चलेजाव” चळवळीत भाग घेतला, साडे तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला. फ्लस्वरूप फर्ग्युसन कॉलेज ने त्यांना पुढील शिक्षणासाठी बंदी केली.
Copyright © 2025 | Marathisrushti