(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • वात्सल्य ट्रस्ट, अलिबाग

    ही संस्था अलिबागमधील काही धडाडीच्या महिलांमार्फत चालवली जाते व आपल्या सर्व कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडून या महिला, या लहान बाळांच्या जीवनात पहिल्या पावसासारख्या धाऊन येतात. त्यांना त्यांची आई मिळते, आईचं कुठल्याही शब्दात वर्णन न करता येण्यासारखं व कुठल्याही मापात न मोजता येण्यासारख तिच्यासारखचं निर्मळ व निर्भेळ असं प्रेम मिळतं…

  • बीएसएनएलची प्यारी जोडी स्कीम

    नुकतीच बीएसएनएलची ‘प्यारी जोडी’ ही स्कीम आली आहे. याअंतर्गत लँडलाईन असणर्‍या ग्राहकांना एक प्रीपेड किंवा पोस्टपेड सिमकार्ड मोफत दिले जात आहे. या सीमकार्डवरून ग्राहकाकडे असलेल्या लँडलाईन फोनवर अमर्यादीत कॉल्स मोफत केले जाऊ शकतात. ही यातील एकमेव जमेची बाजू आहे.

  • टिप्पणी – (३) : ‘गधेगाळ’वरील प्रतिमा : ( नरेंच केली हीन किति नारी !!)

    बातमी : (शीर्षक ) : बदलापुरात शिलाहारकालीन इतिहासाच्या पाऊलखुणा
    - लोकसत्ता, मुंबई आवृत्ती, दि. २९ जून २०१६.

    ‘लोकसत्ता’मधील बातमी सांगते की बदलापुरनजीक शिरगांव येथें शिलाहारकालीन, ‘गधेगाळ’, ‘वीरगळ’ इत्यादी प्रकारची शिळाशिल्पें सापडली आहेत. शिलाहार हे राष्ट्रकूटांचे अंकित होते, व त्यांचे कोंकण, दक्षिण महाराष्ट्र भागात राज्य होते. बदलापुरनजीकाचा भाग ‘उत्तर कोंकणा’वर राज्य करणार्‍या शिलाहार-शाखेकडे होता. हा काळ होता इ.स. चें नववें ते तेरावें शतक. याचा अर्थ असा की ही शिळाशिल्पें आजपेक्षा ७००/८०० ते १२०० वर्षें जुनी आहेत. हजार वर्षें म्हणूं या. लोसत्तामधील बातमीही सादारण हाच काळ दाखवते.

    आपण या ‘गधेगाळ’ नामक, शिळेवर-कोरलेल्या-प्रतिमेचा विचार करणार आहोत. ‘लोकसत्ता’च्या शब्दात-
    ‘शिलाहार राज्याच्या काळात, राजाज्ञा मोडल्यास कठोर शिक्षा करण्यात येण्याची ताकीद म्हणून,
    गाढव व स्त्रीचा समागम होत असल्याचें शिल्प कोरलें जाई’.

    राजाज्ञा मोडल्यास सज़ा होणें योग्यच आहे. आजही कायदा मोडणार्‍यांना शिक्षा होतेच. लोकांना या बाबीची आगाऊ वॉर्निंग देणेंही ठीकच आहे. राजाज्ञा, म्हणजेच तत्कालीन कायदा, मोडणार्‍याला ‘गाढव’ या सदरात टाकणें, हेंही ठीक आहे. पण ऑब्जेक्शनेबल् आहे ती ही गोष्ट की गाढवाचा स्त्रीशी समागम दाखवणें. गाढवाशी समागम दाखवून नारीला किती हीन, किती नीच पातळीला आणून ठेवलेलें आहे ! गुन्हा कुणाचा, अन् हीनत्व कुणाला !!

    बिचार्‍या ‘स्त्री’नें राजाचें (आणि समाजाचें) काय ‘घोडें मारलें होतें’, म्हणून तिचा असा अवमान ? अशी ‘प्रतिमा’ कोरल्यानें 'per se' नारीजातिची प्रतिमा मलिन होते, याचा विचार राजा किंवा त्याच्या जबाबदार प्रधानमंडळानें केला नाहीं काय? धर्मशास्त्र्यांनी हें राजाला सांगितलें नाहीं काय ? कोणी असा बदसल्ला शिलाहार राजाला दिला असेल ? कोणत्या शास्त्रात, कोणत्या ग्रंथात, अशा प्रकारचा समागम दाखवणें रास्त म्हटलें आहे ? शिल्प कोरलें भलेही पाथरवटानें असेल, पण त्याला, ‘काय कोरायचें’ हा हुकूम तर कोणी सुशिक्षित अधिकार्‍यानेंच दिला असेल ना ? राजाला या शिल्पाची कल्पना देऊन , त्याची पूर्वसंमतीही घेतली गेली असणारच. तत्कालीन राजे काय, मंत्री काय, धर्मशास्त्री काय, सगळेच, एकीकडे, ‘यत्र नार्यस्तु पूज्यंते, रमन्ते तत्र देवता’, ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी’ , ‘मातृदेवो भव’ असें म्हणत म्हणत, दुसरीकडे अशा प्रतिमा कोरायाच हुकूम देतात, याचा स्पष्ट अर्थच असा की, तत्कालीन सर्व समाजातच 'per se' स्त्रीला मान नव्हता, आणि असलाच तर तो फक्त तोंडदेखलाच होता. प्रत्येक व्यक्ती आपापल्या आई-बहीण-पत्नी-पुत्री यांना ममत्वानें वागवत असेलच, मान देत असेलच ; पण 'per se' नारीजातिला हीन समजलें जात असणार हें उघड आहे.

    आणि हा ‘समागम’ कुणाच्या साक्षीनें ? तर, शिल्पांवर कोरलेल्या सूर्य, चंद्र व (मंगल-)कलश यांच्या साक्षीनें ! ‘सूर्य-चंद्र असेतो ही राजाज्ञा कायम राहील’ असा याचा अर्थ लोकसत्तामध्ये दिलेला आहे. पण, सूर्य व चंद्र हा ‘समागम’ पहाताहेत, म्हणजेच, असा हीन समागम ‘यावच्चंद्रदिवाकरौ’ चालूं असल्याचाही अर्थ यातून काढता येईल. आणि, मंगल-कलशाचें काय ? हा हीन ‘समागम’, तत्कालीन ‘प्रस्थापित-उच्चपदस्थांना’ मंगल वाटला की काय ? सगळेंच आक्रित !

    प्रस्तुत शिल्पाजवळ मंदिराच्या खांबांचे अवशेष सापडले आहेत. म्हणजेच, अशी शिल्पें मंदिराजवळही प्रस्थापित केलेली असणारच. या मंदिरांमध्ये विविध स्तरातील अनेक स्त्रिया वेळोवेळी देवदर्शनाला, कथा-पुराण-प्रवचन ऐकायला, उत्सव साजरे करायला, जातच असणार. त्यांच्या नजरेला अशी शिल्पें नक्कीच पडत असणार. त्यांना ते पाहून काय वाटत असेल ? पण सांगणार कुणाला, तक्रार कोणाकडे करणार ? आणि, केलीच तर, ऐकणार कोण ? ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ ! ( आजच्या काळातही , जातां-जातां, स्त्रियांच्या कानांवर ‘आईबहिणीच्या’ हीन शिव्या पडतातच, आणि त्या बिचार्‍या ऐकून न-ऐकल्यासारखें करतात ! दुसरा पर्यायच काय आहे त्यांना ? )

    ‘थोर भारतीय संस्कृती’असें आपण सदासर्वदा म्हणत असतो, आपल्याला या संस्कृतीचा अभिमानही असतो. संस्कृतीतील चांगल्या गोष्टीबद्दल अभिमान असणें रास्त आहे ; पण संस्कृतीचें हेंही दुसरें अयोग्य रूप आहे, आणि त्याला राजमान्यता होती , ‘शिष्टजन’ यांची मान्यता होती, हेंही आपण विसरतां कामा नये. मध्ययुगात समाज एकीकडे राजकीयदृष्ट्या खाली-खाली जात होताच, व दुसरीकडे, सामाजिक दृष्ट्याही तो अधिक ‘दकियानूसी’, जुनाट, बनून खाली-खाली जात होता. पण, या शिल्पाचा काळ तर १००० वर्षांपूर्वीचा, म्हणजेच, आपण ज्याला ‘मध्ययुग’ म्हणतो, त्याआधीचा आहे. त्या काळात भारत राजकीय दृष्ट्या ‘उंच’च होता ( मध्ययुगीन परकीयांची , परधर्मियांची आक्रमणें सुरूंही झालेली नव्हती) ; मात्र सामाजिक दृष्ट्या, भारतीय समाजातील विचार, चालीरीती ‘उच्च’ पातळीच्या नव्हत्या, हेंच असली शिल्पें प्रकर्षानें दाखवतात.

    म्हणूनच, एका जुन्या सुभाषिताला पॅरॅफ्रेज करून म्हणावें लागतें की, ‘नरेंच केली हीन किति नारी’ !!

    कोणी म्हणूं शकेल , की, २१ व्या शतकातील विचार, अशा अनेक-शतकें-जुन्या शिल्प-प्रतिमेला लावणें कितपत योग्य आहे ? पण लक्षात राहूं द्या की, कांहीं सत्यें कालातीत असतात. किमान, नारीचा समाजातील दर्जा ‘उच्च’ ठेवणें , हें सत्य त्रिकालबाधितच असायला हवें. पण, जिथें आजही ‘स्त्री’ला, समानतेसाठी, तिच्या न्याय्य हक्कांसाठी, मंदिरप्रवेश, ‘राइट टु पी’ सारख्या गोष्टींसाठीं झगडावें लागतें, जिथें आजही सुनांच्या छळाच्या, त्यांना जाळायच्या घडना घडत आहेत ; तिथें, अनेक-शतकें जुन्या ‘प्रतिमां’मुळे डिस्टर्ब् व्हायला कुणा पुरुषाला वेळ आणि इंटरेस्ट आहे ? होय ना ?

    - सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
    eMail : vistainfin@yahoo.co.in
    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

  • मियां मल्हार

    आपल्या रागदारी संगीतात, परंपरेला अतिशय महत्व आहे आणि त्यानुरूप जे संकेत निर्माण झाले आहेत, त्यांची जीवापाड जपणूक करण्याची तोशीस केली जाते. मग, त्यात रागाचे समय, ऋतूप्रधान राग इत्यादी वर्गीकरणे अंतर्भूत होतात. शास्त्रानुसार अभ्यास करायला गेल्यास, शास्त्रात खरेतर, कुठल्याही रागाचा "समय" असा दिलेला नाही तसेच ऋतूप्रधान राग, असे वर्गीकरण केलेले नाही परंतु सुरांचे साद्धर्म्य जाणून घेऊन, असे अनेक संकेत जन्माला आले आहेत. तसे बघितले तर स्वरांच्या देवता, स्वरांचे रंग इत्यादी वर्णने वाचायला मिळतात पण, या सगळ्यांचा "मूलाधार" अखेर संकेत, या शब्दापाशी येउन ठेपतो. सुरांचे, मानवी भावनांशी अतिशय जवळचे नाते असते आणि याच भावनांची जोड, अशा प्रकारच्या वर्गीकरणात झाली.
    मियां मल्हार राग, याच स्वरूपाचा आहे. या रागाची उत्पत्ती तानसेन पासून सुरु झाली असे मानण्यात येते आणि त्यातूनच तानसेन आणि त्याच्या दंतकथा प्रसृत झाल्या. अर्थात या कुठल्याच गोष्टींना कसलाच शास्त्रीय आधार नसल्याने, त्याबद्दल अधिक लिहिणे योग्य नाही.
    दोन्ही गंधार, दोन्ही निषाद, आणि दोन्ही मध्यम, हे स्वर या रागाची खरी ओळख पटवून देतात. सगळे सूर या रागात उपयोगात येत असल्याने, रागाचा विस्तार प्रचंड प्रमाणात होतो. दोन्ही मध्यम जितक्या प्रभावी मांडता येतात, तितके या रागाचे रूप खुलून येते. खरतर मध्यम, रिषभ आणि पंचम या स्वरांचे चलन, इथे महत्वाचे ठरते.
    "निळावले मन, निळावले तन
    निळावले नवनीत घटांतून
    निळ्या वेळूंतील शीळ निळी सखी, निळा उरांतला पीळ.
    निळ्या निळ्या प्राणांतील ज्योती
    निळी निळी डोळ्यांतील मोती
    घननिळाच्या निळ्या गालिंचा निळा निळा मी तीळ".
    कवी बा.भ.बोरकरांच्या या "निळाईत" आपल्याला मल्हाराचे ललित आणि काव्यात्मक रूप सहज आकळून घेत येते. "घननिळाच्या निळ्या गालिंचा" या शब्दांतून तर याचा मल्हार रागाचे सूचन व्यक्त होते.
    उस्ताद अली अकबर साहेबांनी वाजवलेला मियां मल्हार म्हणजे संतत धारांचे असामान्य नृत्य. सगळी रचना, केवळ आलापी आणि जोड इतकीच आहे.एकतर सरोद्सारखे अंतर्मुख करणारे वाद्य त्यात, या रागाचे धीरगंभीर स्वरूप!! वास्तविक आपल्या मनात उगीचच मियां मल्हार म्हटलं की पावसाच्या घनघोर धारा आणि तांडव, असे एक चित्र डोळ्यासमोर येते परंतु, या चित्राच्या नेमकी उलट अवस्था उस्तादांनी काय अप्रतिम वाजवली आहे. सुरवातीपासून, प्रत्येक सूर अतिशय स्पष्ट, रेखीव वाजवला आहे. त्यामुळे स्वरांचा "मझा' घेता येतो. ज्यांना, स्वरज्ञान नाही, त्यांना देखील, रागातील कोमल स्वर कुठले, याचा सहज अंदाज घेता येतो.
    सरोद खरेतर तंतूवाद्य, परंतु अशा वाद्यावर उस्तादांनी अशी काही हुकुमत ठेवली आहे की, ऐकताना आपल्याला, वादनातील "गायकी" अंग सहज कळून घेता येते. तंतूवाद्यांवर "गायकी" अंग वाजवणे,हे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे. वाद्यातून सलगता निर्माण होणे शक्यच नसते परंतु खंडित सुरांतून "मींड" काढायची, हे खरच अति अवघड काम असते आणि इथे उस्ताद अली अकबरांनी हे काम अतिशय लीलया केलेले आहे. जरा बारकाईने ऐकल्यावर, एका सुरावरून दुसऱ्या सुरांवर जो "प्रवास" घडतो, ते ऐकणे खरोखरच चिरस्मरणीय आहे. या वादनात, सूर बोलके होत आहेत. वास्तविक, स्वरांना स्वत:ची अशी भाषा नसते परंतु कलाकार, त्यात दडलेली "भाषा" शोधून काढतो.
    तबलानवाज म्हणून उस्ताद झाकीर हुसेन यांचे नाव जगात गाजलेले आहे. परंतु त्यांनी, चित्रपट संगीताच्या क्षेत्रात फारसे योगदान दिलेले नाही. त्यांनी ज्या थोड्या चित्रपटांना संगीत दिले, त्यात "साझ" चित्रपटाचे नाव घ्यावे लागेल. अर्थात त्यांनी या चित्रपटात काही अप्रतिम गाणी दिली आहेत. त्याच चित्रपटात त्यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे आहे. "बादल घुमड बढ आये" या गाण्यात आपल्याला या रागाची "छटा" ऐकायला मिळेल.
    "बादल घुमड बढ आये,
    काली घटा घनघोर गगन मे
    अंधियारा चहु ओर
    धन बरसत उत्पात प्रलय का
    प्यासा क्यू मन मोर
    बादल घुमड बढ आये".
    गाण्याची चाल एका अप्रतिम तानेने होते. अगदी पूर्ण सप्तकी तान आहे. ही तानच इतकी अवघड आहे की, पुढे गाणे कशाप्रकारे विस्तारणार आहे, याची कल्पना येते. तीनतालात बांधलेले गाणे, अतिशय द्रुत लयीत आहे. या गाण्यात, इतर गाण्याच्या वेळेस, सुरेश वाडकर जसा आवाज लावतो, तसा नसून, रियाज करून घोटवलेला आवाज लावलेला आहे. अर्थात, असे सगळे गाताना, गाण्याची बंदिश होण्याचा एक धोका असतो आणि तो इथे पूर्णपणे टाळलेला आहे. गाण्याच्या शेवटी, गायकाने " चक्री" तान इतकी सहज घेतली आहे की ऐकताना, आपण देखील गाण्यात संपूर्ण गुंगून जातो. अखेर, संगीताचा मुख्य उद्देश तरी काय असतो ?? कलाकाराने मांडलेल्या सांगीतिक कलाकृतीत, रसिकाला हरवून जाण्याची संधी उपलब्ध करून द्यायची आणि त्या पातळीवर हे गाणे नि:संशय अप्रतिम अनुभव देते. या गाण्यात मात्र, मियां मल्हार रागाचे जे प्रचलित रूप आहे - प्रचंड सोसाट्याचा वारा आणि घनघोर पाउस, याचे मूर्तिमंत दर्शन ऐकायला मिळते.
    आता याच रागात मेहदी हसन साहेबांची अशीच अशीच एक अमूर्त रचना बांधली आहे. मेहदी हसन म्हणजे गझल गायकीत स्वत:चे स्वतंत्र घराणे निर्माण करणारी गायकी. गझल गायनाचा तोंडावळा पूर्णपणे बदलून टाकून, रागदारी संगीताची "कास" धरून तरीही, रागदारी गायन बाजूला सारून, संपूर्ण वेगळ्या धाटणीची गायकी इथे रुजवली. अत्यंत मुलायम आवाज, सगळ्या सप्तकात हिंडणारा आवाज. अर्थात, तरीदेखील, मंद्र सप्तकात खानसाहेबांची गायकी खऱ्याअर्थी खुलून येते. चाल बांधताना, रागाच्या स्वरांचा आधार घ्यायचा, परंतु रागाचे रसिकांना करून द्यायची, असा या गायकीचा सगळा कारभार असतो. "एक बस तू ही नहीं" हीच ती गझल.
    "एक बस तू ही नहीं मुझसे खफा हो बैठा
    मैंने जो संग तराशा वो खुदा हो बैठा".
    दादरा तालात बांधलेली रचना, अगदी सुरवातीपासून या रागाची छाप आपल्या कानावर येते. मेहदी हसन, नेहमीच रचनेची सुरवात अतिशय संथ, खर्जाच्या सुरांत करतात पण तो जो खर्ज असतो, तोच अति विलक्षणरीत्या आपल्या मनाचे पकड घेतो. गाण्याच्या ",जिसे बस खफा हो बैठा" इथे "हो" शब्दावर किंचित "ठेहराव" घेतलेला आहे आणि तो खरोखरच असामान्य आहे. जणू रागाची सगळी वैशिष्ट्ये त्या एका सुरांत एकवटली आहेत!! उत्तम श्रीखंडात हळूहळू केशर कांडी विरघळत जावी त्याप्रमाणे इथे गायकी, त्या शायरीच्या अनुरोधाने आपल्या मनात उतरत जाते. या गायकीचे आणखी खास वैशिष्ट्य म्हणजे, रचनेच्या बंधात समजा एखादा शब्द बसत नसेल तर तेव्हढ्यापुरते चालीला वेगळे वळण देण्याची किमया, या गायकाने असामान्य प्रकारे साधलेली आहे.
    मराठीत अर्थगर्भ गाणी तशी भरपूर सापडतात. याच यादीत "जन पळभर म्हणतील हाय हाय" हे गाणे निश्चित अंतर्भूत करावे लागेल. भा. रा तांब्यांची अप्रतिम कविता आणि त्याला तितकीच अर्थवाही अशी वसंत प्रभूंची चाल आणि लताबाईंचे गायन. यामुळे हे गाणे संस्मरणीय झाले आहे. तांब्यांच्या कवितेत, नेहमीच एकप्रकारचा राजसपणा आणि गेयता आढळते. कवितेतील शब्द आणि त्याची "जोडणी" यात, सहज आणि उस्फुर्त अशी लय असते. शब्दातील अंतर आणि त्यातून खटके, हे सगळेच फार विलोभनीय असते. वसंत प्रभूंच्या चाली या, बहुतांशी अत्यंत श्रवणीय आणि शब्द्वेधी असतात, त्यामुळे, त्या लगेच रसिकांच्या मनाची पकड घेतात. चाल सहज गुणगुणता येण्यासारखी असते.
    " जन पळभर म्हणतील हाय हाय
    मी जाता राहील कार्य काय? "
    कवितेच्या मुखड्यामध्येच प्रश्नार्थक वाक्य लिहून, तांब्यांनी रसिकांना एकप्रकारे कोडे टाकले आहे आणि सगळी कविता या प्रश्नाभोवती घुटमळत असते.
    या गाण्याची एक गंमत बघण्यासारखी आहे. कवितेचा आशय बघता आणि मियां मल्हारचा स्वभाव बघता, या गाण्यात, या रागाची "पाळेमुळे" सापडण्याची शक्यता सुतराम वाटत नाही. तरीदेखील, हे गाणे याच रागावर आधारीत आहे. अगदी पावसाळा झाला तरी मानवी आयुष्यात अंतर्मुखता, व्याकुळता, विरही भावना अस्तित्वात नेहमीच असतात. अर्थात, रागातून अशी नेमकी भावना अचूक शोधायची, हा संगीतकाराचा अप्रतिम आविष्कार. इथे आणखी एक मजा बघूया. वरती, आपण मेहदी हसन यांच्या रचनेतील " जिसे खफा हो बैठा" या ओळीची चाल बघा आणि या गाण्यातील "पळभर म्हणतील हाय,हाय" या ओळीचे स्वर ऐका आणि या गाण्याची चाल कशी मियां मल्हार रागावर आधारित आहे, हे समजून घेता येईल.
    कवी आणि संगीतकार मनोहर कवीश्वर यांनी या रागावार आधारित अतिशय सुंदर अशी रचना केली आहे आणि सुधीर फडक्यांनी आपल्या रसाळ सुरांत ती रचना कायमची अजरामर करून ठेवली आहे.
    "माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा;
    भोगी म्हणुनी उपहासा, मी योगी कर्माचा".
    सुधीर फडके, कवितेतील आशय जाणून, गाताना शब्दोच्चार कसा करतात, ते या गाण्यात खास ऐकण्यासारखे आहे या गाण्यात "मल्हार" अगदी सरळ ऐकायला, गाण्याच्या पहिल्या सुरांतून ऐकायला मिळतो. कवितेतील काहीसा उदास स्वर, रचनेतून देखील तसाच स्त्रवत आहे आणि तोच धागा गायनातून विणलेला आहे.
    मराठी चित्रपट "वरदक्षिणा" मध्ये "घन घन माला नभी दाटल्या" हे गाणे म्हणजे मूर्तिमंत "मल्हार" राग आहे. माडगूळकरांच्या सिद्धहस्त लेखणीतून अवतरलेला मल्हार, स्वररचना आणि गायनातून आपल्या मनावार सतत संतत धार धरून असतो.
    "घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा;
    केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा".
    संस्कृत साहित्यातील मोर आणि पावसाचे जे अतूट नाते अनुभवायला मिळते, त्याच प्रतीकाची इथे या गाण्यात सांगड घातली आहे आणि कविता म्हणून लगेच रचनेला "वजन" प्राप्त होते. वास्तविक, मन्ना डे हे बंगाली गायक, सगळी कारकीर्द प्रामुख्याने बंगाली आणि हिंदी गाण्यांत गेलेली तरी देखील संगीतकार वसंत पवारांनी, गायकाच्या गळ्याची ताकद ओळखून ही रचना मन्ना डे यांना गायला दिली आणि गायकाने गाण्याचे सोने केले.
    - अनिल गोविलकर

  • आपण आपल्याशी

    साधनाच्या अधीन असलेल्या प्रत्येक सुखाला भारतीय संस्कृतीने कमी महत्त्वाचं मानलं. कारण सुखाचं साधन जवळ असल्याचं सुख जेवढं मोठं, तेवढंच ते साधन नष्ट झाल्याचं, हरवल्याचं दुःखही मोठं ! टी. व्ही., रेडिओ, कॅसेट प्लेअर, व्हिडिओ अशी असंख्य करमणुकीची साधनं आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य अंग बनलीत आणि त्यात फारसं गैर काही नाही. उलट काही प्रमाणात ते अपरिहार्यच आहे. रोजचं जीवन दिवसेंदिवस अधिकाधिक धकाधकीचं, चिंतेचं बनतं आहे.

  • सेतू समुद्रम शिपिंग कॅनॉल प्रोजेक्ट.

    सेतू समुद्रम प्रकल्प राबविला तर वर्षाकाठी हजारो कोटी रुपयांचे उत्पन्न भारत सरकारला मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढं निश्चित आहे.

  • रिगल सिनेमा – मुंबई

    मुंबई नगरीत अनेक अशाही वास्तू आहेत ज्या ब्रिटीश कालीन असूनही अजूनही  तितक्याच ऐटीत आपली पाळंमुळं घट्ट रोवून उभी आहेत. मग त्या कुठल्याही क्षेत्राशी निगडीत इमारती असोत पण त्या त्यांचं अस्तित्व अजूनही टिकवून आहेत. अशीच एक वास्तू मुंबईत आजतागायत मुंबईकरांची मनोरंजनाची भूक भागवत आहे. ती वास्तू म्हणजे “रिगल सिनेमा” होय.

  • इंडियन लायब्ररी – पढेगा इंडिया, बढेगा इंडिया

    Indian-Library

  • महाराष्ट्र दिन १ में २०११

    हे राष्ट्र असेच अभिमानाने जर सदा सर्वकाळ उभे ठेवायचे असेल तर आजच्या पिढीला त्याची काळजी घ्यावी लागेल.

  • एक रुपया दंड

    ” सर, आपल्या इथे पेंटिंग सेक्शनचा राजेश हल्ली फार चिडचीड करायला लागला आहे.” सुपरवायझर गडहिरे सकाळी सकाळी तक्रार घेऊन आले होते.” अरे, मग तुम्ही त्याच्या चिडचीडीच कारण शोधायचा प्रयत्न करा .”