आपण गेले कित्येक वर्षे ज्यावर संगीत, माहिती व इतर गोष्टीचा आनंद घेत आहोत, ज्याने आपले बालपण तरुणपण आनंदात गेले त्या आकाशवाणी ला आज ९४ वर्षे पूर्ण होत आहेत. भारतात २३ जुलै १९२७ रोजी मुंबई आणि कोलकाता येथे आकाशवाणीचे प्रसारण सुरू झाले. त्यामुळे दरवर्षी २३ जुलै हा प्रसारण दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
‘नमस्कार! हे आकाशवाणीचे..... केंद्र. सकाळचे ६ वाजून ३५ मिनिटे झाली आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम...’ बोलणारी व्यक्ती अदृश्य; तरीही परिचयाची. आवाजातील सातत्य आणि न चुकता तो ऐकण्यातील नियमितता. अशावेळी कुठल्याही दृश्याकृतीची गरज भासत नाही. आपोआपच एक अनामिक बंध जुळला जातो. हा मर्मबंध आता नव्वदीत पदार्पण करीत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील ‘इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’चे स्वातंत्र्योत्तर काळात ‘आकाशवाणी’ (१९५७) असे नामकरण झाले.
‘आकाशवाणी’ हे संयुक्तिक नाव थोर साहित्यिक व नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी सुचविले होते. त्यानंतर सुरु झालेली आकाशवाणीची वाटचाल हा भारतीय संस्कृतीच्या आणि एकूणच भारतीयत्वाच्या सर्वंकषतेचा परिपाकच म्हणावयास हवा. देशभरात आकाशवाणीची ४१० केंद्रे असून २० अवघ्या महाराष्ट्रातच आहेत. ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान ते विभिन्न कला-सांस्कृतिक मूल्यांची रुजवात, रोजच्या घडामोडी ते आदर्शवत जीवनपद्धतीचा अवलंब अशा अनेकविध गोष्टी अबालवृद्धांसहित प्रत्येक वयोगटासाठी हाताळण्यातील संवेदनशीलता, जवळपास २३ भाषांतील प्रसारणाचा प्रचंड आवाका आणि मागील इतकी वर्षे सातत्याने त्यातील भाषिकस्तर कायम राखण्याचे कसब, या सर्व गोष्टी खरोखरच वाखाणण्याजोग्या आहेत.
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे तत्व चालवत आकाशवाणीची अतिशय जोमाने वाटचाल चालू आहे. जागतिकीकरणानंतर आलेल्या खाजगीकरणाच्या लाटेत अनेक व्यावसायिक माध्यमांचा पसारा वाढला. सुरुवातीला मात्र आकाशवाणी हे मनोरंजन व जनप्रबोधनाचं, सरकारी योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचं सशक्त माध्यम होतं. ‘संगीत सरिता’ ही शास्त्रीय संगीताच्या जलशांची वाहिनी तर ‘विविध भारती’ या आकाशवाणीच्या व्यावसायिक वाहिनीवरुन विविध सिनेसंगीत प्रसारित होतात. भाषावार प्रांतरचनेप्रमाणे राज्यांतर्गत येणाऱ्या आकाशवाणी केंद्रावरुन त्या-त्या राज्यभाषेतील सुगम-संगीतांचे कार्यक्रम होतात. नाट्य-संगीत हे सुरुवातीला सुगम-संगीत या प्रकारात समाविष्ट होते. परंतु त्यातील शब्द-स्वरांचा सुरेख समन्वय लक्षात घेऊन त्यास आकाशवाणीतर्फे उपशास्त्रीय संगीताचा दर्जा देण्यात आलामनोरंजनासोबतच बाल, युवा, महिला यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी गंमत-जंमत, युवावाणी, वनिता मंडळ असे कार्यक्रम प्रसारित होतात. अशा कार्यक्रमातून त्या-त्या वयोगटाचे भावविश्व व्यक्त होत असते. त्यातूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचीही जडण-घडण होत असते.
त्याचप्रमाणे कामगार सभा, कृषीवाणी, ‘माझं आवार माझं शिवार’ अशा माहितीपर कार्यक्रमांचा कामगार आणि शेतकरी बांधवांनाही फायदा होतो. त्यामुळे आकाशवाणी ही कित्येकांच्या रोजच्या जगण्यातील आधारस्तंभ बनली आहे. येथे पुनर्प्रसारण, ज्याला आपण रिपीट ब्रॉडकास्ट म्हणतो, ते एक-दीड-दोन वर्षांतून कधीतरी होते. कारण येथे सृजनशीलतेला बराच वाव असून श्रोत्यांना उत्तम व सकस खाद्य- ‘कंटेट’- पुरविण्यावर प्रामुख्याने भर दिला जातो. त्यामुळे आकाशवाणीवरुन प्रसारित होणारी कुठलीही गोष्ट ही संयत असते. त्यात ना ‘ब्रेकींग न्यूज’चा धडाका असतो, ना भावनांचा उद्रेक! निर्मळ आनंद देताना वास्तवाची जाणीव आणि त्यातूनही चांगलं कसं शोधावं हा विचार आकाशवाणी आपल्या श्रोत्यांना देत असते. यात सतत बदलणाऱ्या सुधारित तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना आकाशवाणीने विकसित केलेले स्वतःचं ‘ऑल इंडिया रेडिओ’ हे अॅप असेल, ‘न्यूज ऑन एअर’ अंतर्गत दर तासाला एखादा नंबर फिरवून चालू घडामोडीतील कुठल्याही तीन बातम्या मिळवणे असेल, आपल्या बलस्थानांवर भर देऊन, आपलं मूळ टिकवून नव्या जगाशी- नव्या काळाशी जोडले जाणे हे आकाशवाणीच्या नव्वदाव्या पदार्पणातलं तिच्यासमोरचे ध्येय आहे. कारण ज्यावेळी ‘तुमचा कार्यक्रम ऐकताना जगणं सुसह्य होतं’, अशी प्रतिक्रिया आकाशवाणीतील उमा दीक्षितांसारख्या अनेक कर्मचाऱ्यांना श्रोत्यांकडून मिळते. इतक्या वर्षांचे सहसंबंध दृढ होत असतातच; पण त्याचबरोबर ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ ही बहुआयामी उद्घोषणा सार्थ ठरत असते.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ: इंटरनेट / चारुश्री वझे, 'महान्यूज'
पुणे.
Bahujananche Shradhasthan- Dr. Babasaheb Ambedkar
बरेच विद्यार्थी प्रेमप्रकरणामुळे ग्रासलेले दिसतात तर काही इतर कारणांमुळे...
मित्रानो एक सांगावस वाटते प्रेम करा पण अभ्यासावर करा.पोस्ट मिळण्यावर प्रेम करा. सद्या Girlfriend आणि Boyfriend जसे आठवड्याचे वार बदलतात त्याप्रमाणे बद्दलतांना दिसतात. पैसा आहे तोपर्यंत तुमच्याकडे Gf आहे. किंवा तुमच्यापेक्षा जास्त चांगला मिळाला की तुम्ही मग गेले कचराकुंडीत, आज 1 उद्या 2 रा, परवा 3 रा.....हि सध्या fashion चालली.काय काय वचन, जिने मरणे के साथ, janu काय , उल्लू काय, पिल्लू काय आणि काय काय सोंग सुरु असतात .लग्न करेल तर तुझ्याशीच, पण वेळ आली आणि थोडं का तुमचं आणि तीच खटकलं कि महाभारताच्या युद्धाला सुरवात.मग आमच्या घरचे नाही म्हणतात मी लग्न नाही करू शकत, मला माफ करून द्या, काय काय बहाणे सुरु होतात, आजपर्यंतचे सगळे वचन, वायदे सगळे मातीमोल. रोज तीच किंवा त्याच ऐकलं तर खूप छान, रात्रभर फोन Engage , सकाळी लायब्ररी किंवा कॉलेज मध्ये परत रामायण सुरु.घरी सांगतात की मी अभ्यास करते, मी लायब्ररी जाते आणि आई बाबा पण विश्वास ठेवतात, पण तिकडे जाऊन काय करतात तर गार्डन किंवा इतर ठिकाणी मजा उडवतात .इकडे माय बाप तुमच्यासाठी स्वतःच्या पोटाला मारून तुम्हाला शिकवतात आणि तुम्ही लोक असले धंदे करता, थोडी लाज वाटली पाहिजे स्वतःची स्वतःला . " पहले खुद कुछ काबिल बनो फिर देखो दुनिया तुम्हारे पिछे दौडगी, तुम दुनिया के पिछे मत दौडो" सगळं काही तुम्हाला आपोआप मिळेल. Gf ला फिरवणे काय, आपला अमूल्य वेळ देऊनही एक दिवस ती तुम्हाला या मार्गावरील सगळ्या line व्यस्त आहे , आपला कॉल waiting वर आहे म्हणूनच ऐकवेल जाईल , परत तुम्ही Distrub व्हाल.म्हणून वेळ असतानाची योग्य वळणावर या.हे प्रेम वैगैरे काही नसते फक्त एक आकर्षण असते. प्रेम करायचं तर आईवर करा बहिणीवर करा, किंवा लग्न करून मोकळे व्हा आणि पत्नीवर आणि मुलामुलींवर प्रेम करा.हे असल्या प्रेमप्रकरणांच्या भानगडीत पडून आपलं आणि आपल्या घरच्या लोकांचं डोकं खराब करू नका.आज जेवढे निदर्शनास आलेत आणि बातम्यांवर ऐकलं किंवा वृत्तपत्र यांच्यावर प्रसिद्ध माहिती नुसार Love Marriage करणाऱ्यांचे बरोबर पटत नाही किंवा Divorce झालेय (काही अपवाद सोडता) आपल्या करियर कडे लक्ष द्या. स्वतःला सिद्ध करा.असल्या भांगडीतून बाहेर या. नाहीतर एक दिवस तुमचं Breakup ठरलं आहेच.आयुष्याच breakup झालं की तुम्हाला कोणीच विचारणार सुद्धा नाही .म्हणून तुमचीच line तुम्ही बदला म्हणजे कॉल waiting वर राहणार नाही. थेट जागी पोहचाल.परत एकदा सांगतोय हे प्रेम वैगेरे काही नसते हे फक्त सोंग असते.आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्या आणि आपलं आणि आपल्या लोकांचं आणि देशाचं नाव मोठं करा.
या लेखबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आपण 8275289828 या Whatsp क्रमांकावर पाठवू शकता.
@Prof_Hiteshkumar_Patle
-- प्रा. हितेशकुमार पटले
सुप्रसिद्ध क्रिकेटपटू जेफ्री बॉयकॉट हा त्यावेळी लक्षात राहिला तर तो त्याचा खेळामुळे, बिन्धास बोलण्यामुळे आणि कॉन्टॅक्ट लेन्स मुळे ….
सर्वांचा आवडता पाऊस कुठे लपला आहे?
गृहनिर्माण संस्थेला दरवर्षी विविध शुल्कातून होणाऱ्या उत्पन्नावर प्राप्तीकर भरावा लागतो. नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार संस्थेच्या मासिक शुल्क यामधील बिनभोगवटा शुल्क (NOC) ह्या उत्पन्नावर आता प्राप्तीकर देय नसल्याने गृहनिर्माण संस्थाना मोठा दिलासा मिळाला आहे. याबद्दलची माहिती आपल्यासाठी सदर सत्रात देण्यात आली आहे.

लहान-मोठ्यांच्या सगळ्यांच्या आवडीचे एकमेव बिस्किट. पार्ले-जी या बिस्किटाने रेकॉर्ड घडवलाय. गेली कित्येक वर्षे त्याची चव लाखोंच्या जीभेवर रेंगाळते आहे.
त्यांच्या कुजबुतीतून एक वाक्य स्पष्ट ऐकू आलं, “बारीश के दिनो में गरमागरम समोसे के साथ हरी मिरची का मजा तो कुछ और ही रेहता हैं”।
परकीय आक्रमकांच्या क्रूरतेला आणि फितुरांच्या कटकारस्थानाला, संघटीत शक्तीनिशी विरोध झाला असता तर आज श्रीविष्णू मंदिराच्या ठिकाणी कुतुबमिनार उभे नसते.
प्राचीन भारतीय हेमाडपंथी शैलीची मंदिरे पाहिल्यास आपल्याला उत्कृष्ट कलेची ओळख होते. कुतुबमिनार पाहतांना मात्र क्रूर आक्रमकांनी केलेल्या दुष्कृत्यांची प्रचीती आल्याशिवाय राहत नाही.
परिसरात बारकाईने लक्ष दिल्यास प्राचीन मंदिराचे हेमाडपंथी अवशेष दिसतात. तेथील हेमाडपंथी अवशेष, लोहस्तंभ तसेच शिलालेखावरून असे लक्षात येते की, त्या जागी श्रीविष्णूचे मंदिर होते, जे आक्रमकांनी क्रुरतेने ध्वस्त केले. प्रत्येक श्रीविष्णू मंदिरासमोर एक गरुडस्तंभ असतो, ज्यावर गरुडमूर्ती विराजमान असते. तसेच मंदिराच्या छताला यक्ष आणि गंधर्वांनी आधार दिल्यासारखी स्तंभांची रचना असते.
अशाप्रकारची कितीतरी (१००० वर्षापेक्षा जास्त प्राचीन) मंदिरे महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत. मंदिर पाडले तरी मात्र लोहस्तंभ (गरुडस्तंभ) नष्ट करता आले नाही. लोहस्तंभावरील गरुडमूर्तीमात्र आक्रमकांनी पळवून नेली. लोहस्तंभ हे ७.२ मीटर उंचीचे असल्याने, इर्षेपोटी ७२ मीटर उंचीचे कुतुबमिनार बांधण्यात आले. मंदिर नष्ट केल्या गेले तरी मात्र हेमाडपंथी शैलीचे अवशेष, प्राचीन श्रीविष्णू मंदिराच्या अस्तित्वाची साक्ष देत उभे आहे. शिलालेख,हेमाडपंथी शैलीचे अवशेष आणि लोहस्तंभ (गरुडस्तंभ), निसर्ग आणि काळासोबत आजही अविरत झगडत उभे आहे. त्याच अवशेषांच्या ह्या फोटो आहेत.
प्राचीनवास्तू अभ्यासकांनी जाणीवपूर्वक तुलनात्मक अभ्यास करून सत्य जगासमोर आणावे. त्याच शैलीचे विदर्भात चिमूर येथे बालाजीमंदिर (श्रीविष्णू) अस्तित्वात आहे. अन्यही ठिकाणी अशीच रचना असलेली प्राचीन मंदिरे आहेत.

-- नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
सध्या वातावरणातील गुलाबी थंडी आपल्याला अनुभवायला मिळते. हिवाळा सुरू झाल्याची कुणकुण आपल्याला वाढलेल्या भूकेमुळे समजते. हिवाळ्यात आपला जठराग्नी बलवान होतो. म्हणून या दिवसांत खाण्यात पचायला जड पदार्थ वापरले तरी ते बाधाकारक ठरत नाही. प्रामुख्याने या दिवसात गोड चवीचे पदार्थ अधिक खाण्यात असावेत (मधुमेही रुग्णांसाठी हे लागू नाही) विविध प्रकारची पक्वान्ने आपण हिवाळ्यात सहज पचवू शकतो. रव्याची खीर, दुधाची बासुंदी, श्रीखंड अशी विविध पक्वान्ने या दिवसात लाभदायक ठरतात.
दूध आणि तुपाचे पदार्थ, शुद्ध मिठाई यांचा उपयोग आपल्याला करता येतो. दूध आणि तूप हे गायीचे असावे. या दिवसांत भूक खूप लागते. त्यामुळे योग्य वेळी आहार घ्यावा. उपवास करणे शक्यतो टाळावे. खूप तिखट नसलेले पण मसालेदार असे पदार्थही या काळात आपण खावेत. दिवाळीतला फराळ हे याचे चांगले उदाहरण आहे.
फराळाचे सगळे पदार्थ हे चविष्ट, थोडे तिखट आणि आपली पचनशक्ती वाढविणारे असे असतात. शेव, चिवडा, चकली असे पदार्थ आणि जोडीला रवा-बेसणाचे लाडू, अनारसे, करंजी यांचा सुरेख समन्वय या दिवसात योग्य प्रमाणात केल्यास तो आरोग्यदायी ठरतो. या दिवसांत भूक चांगली असली आणि पचनशक्ती चांगली असली तरीही आईस्क्रिम, शीतपेय, फ्रिजचे पाणी असे अतिथंड पदार्थ घेणे टाळावेत, अन्यथा त्रासदायक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.
भारतीय वातावरणा प्रमाणे वर्षभरात येणाऱ्या सहा ऋतुंमध्ये प्रत्येक ऋतुत बाहेरील वातावरणाचा परिणाम आपल्या तहानेवर होत असतो. त्यानुसार आपले प्रत्येक ऋतुतील पाण्याचे प्रमाण आणि त्याचे स्वरूपही अवलंबून असते, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. हिवाळ्यातील हेमंत आणि नंतरचा शिशीर हे दोन्ही ऋतुही यास अपवाद नाहीत. हिवाळ्यात मुळातच आपल्याला तहान कमी लागते. त्यामुळे एरव्हीपेक्षा आपण पाणी कमी प्यावे. तहान भागेल इतकेच प्यावे, त्यापेक्षा जास्त पाणी प्याल तर मग सर्दी, खोकला, कफ असे विकार व्हायला लागतात.
पाण्याचेही अर्जीर्ण होते. पाणी जास्त प्यायल्याने सकाळी पोट साफ होते, असा अनेकांचा गैरसमज आहे. त्यासाठीही भरपूर पाणी पिण्याची प्रथा सगळ्या ऋतुमध्ये आपल्याकडे हल्ली सुरू झालेली आहे. पण ही प्रथा आरोग्यदायी नाही. हिवाळ्यात बाहेर वातावरण थंड असल्याने फ्रिज, माठ यांतले पाणी टाळणे चांगले. त्याऐवजी थोडीशी सुंठ घातलेले साधे पाणी या काळात प्यावे. ते हितकर असते. कफाचा त्रास ज्यांना हिवाळ्यात होतो, त्यांनी या काळात पाणी भांडे गरम करून आणि मर्यादेत प्यावे. थोडे उकळून पाणी प्यायल्यास त्याचाही फायदा होतो. विशेषत: एक ग्रॅम सोन्याचा दागिना एक लिटर पाण्यात टाकून उकळावा. मग गाळून घेऊन दिवसभर तेच पाणी प्यावे, असे सोन्याचे पाणी हे आपली प्रतिकारशक्ती वाढवते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ : इंटरनेट / लोकसत्ता
Copyright © 2025 | Marathisrushti