माझ्या वाचक मित्रांसाठी माझ्या काही कविता
तंत्रज्ञानात वेगाने प्रगती होत असताना आज प्रगत वाटणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे उद्याच जुनी होतात. नवी आणखी प्रगत उत्पादने त्यांची जागा घेण्यास टपलेली असतात. या जीवघेण्या स्पर्धेतही काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे अनेक वर्षे लोकप्रियता राखून आहेत. या वैशिष्ट्यपूर्ण उपकरणांचा मागोवा.
आनंद लिमये
या टोलसंस्कृतीची सुरुवात ज्यांनी केली तेच आता बोंबा मारतायत. मजाच आहे.
आपण नुस्तं बघत बसायचं. हातावर हात चोळत बसायचं.... जमलंच तर चार शिव्या हासडायच्या.. अगदिच पेटलो तर टोलनाक्यावरच्या माणसाला एक पेटवून द्यायची
आणि बाजूने एखाद्या VIP ची गाडी टोल न भरता सूसाट जाताना बघायची.
हीच आहे आपल्यासारख्या सामान्य माणसाची लायकी
आनंद लिमये
ढ़ळती अश्रु गालावरुनी,
दोन दिवसापूर्वी मी एका कंपनीचा सामाजिक उपक्रम म्हणून मेळावा आयोजित केला होता तो एका वृद्धाश्रमात.
त्या कार्यक्रमाचे फोटो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच पेनड्राईव्ह मध्ये पाठवतो असे व्यवस्थापकांनी सांगितले. वाटलं ..कोणी ऑफिसबॉय येईल पेनड्राईव्ह घेऊन म्हणून मी दुसऱ्या दिवशी वाट बघत होते.
7.30 ला मोबाईल वरून फोन आला . जरा थकलेला ..पण मार्दवपूर्ण असा एका आजींचा आवाज होता . " मी आलेय फोटो घेऊन . डेक्कन च्या बस स्टॉप वर उतरलेय. पत्ता समजावून सांगता का ?"
अरे बाप रे ..एवढ्या वयस्क आजी . मी माझ्या लेकीला गाडीने पिटाळले त्यांना आणायला . झक्कपैकी टू व्हिलर वर बसून आजी आल्या . फिकटस नऊवारी पातळ , सुपारीएवढा अंबाडा , हसतमुख चेहरा आणि हातात मोबाईल आणि पेनड्राईव्ह छोट्याशा बटव्यात .
ब्रेकफास्ट ची वेळ होती . नवरा ग्राऊंडवरून 10 मिनिटात येणार होता . मी बटाटे पोह्यांची तयारी केली होती .मला कंपनीत फोटो आणि न्यूज पाठवायची होती . लेक पसार झाली काहीतरी काम काढून .
शेवटी मी डाईनिंग टेबलवर लॅपटॉप घेतला नि गॅसवर कढई ठेवली . माझी धांदल पाहून आजी म्हणाल्या , " मी करते ग पोहे , तू निश्चिनतीने फोटोचे काम हातावेगळे कर ." मी जरा संकोचले पण पर्याय नव्हता म्हणून तेथून बाजूला झाले . माझे काम होस्तोवर पोहे तय्यार .
भरपूर ओला खोबरं आणि कोथिंबीर घालून आजीनी मस्त पोहे केले होते . हक्कानी पापड मागून घेतले . मी भाजते म्हंटलं तर म्हणाल्या " थांब मी तळते कि ".
एव्हाना लेक आणि नवरा घरी आले आणि आम्ही एकत्र ब्रेकफास्ट करायला घेतला .आजींच्या हातचे चविष्ट पोहे खाऊन घरातले खुश . जाते जाते म्हणत आजी जेवण करूनच निघाल्या इतका आग्रह माझ्या माणूसवेल्हाळ लेकीने आणि नवऱ्याने त्यांना केला . आणि आजीने पण खान्देशी भरीत करून त्यांच्या आग्रहाला पोच दिली.
निघताना मी जरा संकोचून आजींना म्हंटले , " आजी खूप त्रास घेतलात हो ."
आजी जे उतरल्या त्यात समाधान होते आणि वेदनाही .
त्या म्हणाल्या "नांदत्या घरात खूप दिवसांनी वावरले,अगदी स्वयंपाकघरातही हक्क दाखवला...खूप छान वाटलं ग "
या एका वाक्यात मीच रडवेली झाले . " पुन्हा याल ना ? " त्या उत्तरादाखल किंचित हसल्या अन म्हणाल्या " परमेश्वराची इच्छा "
खरा सांगू ..सणासुदीला पाव्हण्यारावळ्यांचा मर्यादेपेक्षा जास्त राबता झाला कि मी जरा वैतागायचे .....आजींच्या " नांदत्या " या एका शब्दाने मला ती किंमत कळली .
महागाई, स्पर्धा, दगदग, धावपळ, अनिश्चित दैनंदिन जीवनामुळे सर्वच जनता हवालदिल झाली आहे. त्यात महिलांचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालले आहे. काही महिलांचे लैंगिक शोषण होताना दिसते, काही महिला जाचाला बळी पडताना दिसतात तर काही कंटाळून व वैतागून हतबुद्ध होऊन आत्महत्या करीत आहेत. पण याने प्रश्न सुटणार तर नाहीच पण गुंता मात्र नक्की वाढणार. महिलांच्यात नैसर्गीरीत्याच श्रद्धा सबुरी असते पण कधी कधी मन बुद्धीच्या ताब्यात न राहिल्याने काही वेगळे प्रसंग बघायला मिळतात.
अन्नपूर्णा या पाकशास्त्रावरील प्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका मंगला बर्वे यांचे काल रात्री (२३ आक्टोबर) निधन झाले.
अन्नपूर्णा, इच्छाभोजन, मांसाहारी, चायनीय पदार्थ तसेच खाद्य पदार्थांवरची विविध छोटी छोटी पुस्तके, डोहाळे बारसे, रुखवताचे पदार्थ, लोकरीने विणून केलेली खेळणी अशी अनेक पुस्तके प्रसिद्ध होती.
मागील पिढीतील नावाजलेले लेखक अच्युत बर्वे यांच्या त्या पत्नी होत.
सकाळी अकरा – साडेअकराची वेळ होती. जरा बाहेरची कामे करून यावी म्हणून निघाले होते. घरात बाहेरची कामेच जास्त असतात. कधी लाईट बिल, पाणी बिल, बाजारहाट, बँकेची कामं वगैरे. आणि ही सगळी कामं सकाळीच करायला लागतात. तशीच त्या दिवशी पण बाजारात जायला निघाले होते. जवळच सेन्ट्रल स्कूल आहे. शाळा सुटली होती. सोसायटीतील लहान मुले परीक्षा संपल्या म्हणून जवळ जवळ नाचतच आनंदात घरी परत चालली होती ही सगळी मुले आठ ते अकरा या वयोगटातील आहेत. माझ्या मनात विचार आला “चला आजपासून धुमाकूळ चालू.”
साधारण दीड दोन तासाने कामे आटोपून घरी येत होते. बघितले कि ही सगळी ‘वानरसेना’ दोन तीन सायकलीवरून आलेल्या मुलांच्या मागे वेडी वाकडी धावत आमच्याच घराच्या बाजूने जात होती. मी थांबले आणि विचारले “अरे काय झाले?” सगळे एकदम चूप. तशी ही सगळी मला उगाचच घाबरत असतात. मला बघितल्यावर त्यांचे चेहरे हे कामासाठी निघालेल्या माणसाला मांजर आडवी गेली कि जितका वाईट होतो तेवढे वाईट झाले. क्षणभर मला वाटले शेजारच्या बाईच्या आंब्याच्या झाडावर चढण्याचा यांचा प्लॅन बहुतेक मला बघून फसलेला दिसतोय. शेजारचे दोघेही नवरा बायको नोकरी करतात त्यामुळे या मुलांना ही आयतीच संधी.
पण नाही. जशी घराच्या जवळ पोहोचले तसे लक्षात आले कि ही मुले या सायकल वरून आलेल्या मुलांच्याच मागे धावत होती. मी टोकल्यावर तशीच उभी राहिली आणि त्या मुलांकडे बघत होती. मला कळून चुकले कि काहीतरी गडबड या नवीन आलेल्या मुलांचीच आहे म्हणून जरा जोरातच त्या मधल्या एका मुलाला विचारले “काय आहे? काय गडबड चालली आहे?”
पण एक नाही की दोन नाही आणि माझ्याकडे बघतच तो शेजाऱ्यांच्या कंपाऊंडवर चढायला लागला. बाकीची मुले घाबरून उभी होती. क्षणभर वाटले की साप निघाला कि काय? या बाजूला बरेच वेळा लोकांनी साप बघितला आहे. म्हणून त्याला जोरात ओरडले “अरे चढू नकोस, तो साप उलटा तुझ्यावर येईल. खाली उतर.” तसा तो माझ्याकडे बघून हसला आणि म्हणाला “आँटी यहाँ साप नाही है.”
त्याला बघून माझी खात्रीच झाली हा सोसायटीतला नाही. दहा अकरा वर्षाचा असेल. सायकल चालवून चालवून दमलेला दिसत होता. हातात येशू ख्रिस्ताचा क्रॉस असलेली फिक्कट हिरव्यां रंगाची माळ होती. बहुतेक रेडियम सारखी असावी. ती त्यांनी हातात घट्ट धरून ठेवली होती. अगदी केविलवाणा, कावराबावरा. त्याच्याकडे बघून हा काहीतरी शोधत इथपर्यंत आलेला आहे आणि त्याचा त्या देवाच्या माळेवर अपार विश्वास असावा हे पटकन कळून येत होते आणि देव त्याला नक्कीच मदत करणार आहे अशी त्याला खात्री असावी. म्हणूनच एका हातात ती माळ घट्ट धरली असावी. त्याच्या बरोबरची मुले फक्त शांत उभी होती. त्यातल्या एकाच्या हातात एक काठी होती. दुसऱ्या जवळ बॅगेला गाडीत बांधायला वापरतात तशी एक साखळी होती आणि शर्टच्या खिशातून बिस्किटचा छोटासा डबा बाहेर डोकावताना दिसत होता.
मी त्यांच्याजवळ जाऊन विचारले, “ तुम्ही कोण आहात? कुठून आला आहात? आणि इथे काय करताय?” माझा तो शांत अवतार बघून सोसायटीतील चिटकी पिटकी माझ्या शेजारी येऊन उभी राहिली. आणि तो ही कंपाऊंडवरून खाली उतरला. त्याच्या बरोबरची मुले पण त्याच्या जवळ जाऊन उभी राहिली. तो मला काही सांगणार तेवढ्यात कंपाउंडच्या आत एक छोटेसे पांढरे कुत्र्याचे पिल्लू दिसले. तसा तो धावत “जॉली जॉली” करत त्याच्याकडे पळाला. मला माहित होते हे कुत्रे तर इथलेच आहे. मग हा का त्याला हाक मारतोय? तो म्हणाला, “हा माझा कुत्रा आहे”. बाकीची मुले ओरडली, “हा कुत्रा त्याचा नाही.” तो अगदी रडवेला झाला.
म्हणाला, “ मी तेरा सेक्टर मध्ये राहतो. एकदा मला रस्त्यात एक कुत्र्याचे पिल्लू सापडले त्याच्या पायाला काहीतरी लागले होते. त्याला पट्टी लाऊन, औषधे देऊन मी बरे केले. तो माझ्याबरोबर खेळतो म्हणून शेजारच्या डॉ. काकांनी त्याला इंजेक्शनं पण दिली आहेत. त्याला मी जेवणही देतो. तो माझ्याच जवळ राहतो पण माझ्या बाबांना वाटले की मी त्याच्यामुळे अभ्यास करत नाही. म्हणून माझ्या परीक्षेच्या आधीच त्यांनी त्याला या बाजूला कुठेतरी सोडून दिले आहे. हा त्यांचा ऑफिसचा रस्ता आहे. म्हणून मला खात्री आहे की तो इथेच कुठेतरी आहे. माझी परीक्षा आज आता सकाळीच संपली. आम्ही लगेच त्याला सायकलवर शोधायला निघालो आहोत. आम्ही जॉलीला घरी घेऊन जायला आलो आहोत.”
ऐकून काय करावे हे क्षणभर सुचलेच नाही. मी विचारले “हेच कुत्रे तुझे आहे कशावरून?” तो म्हणाला “तो असाच आहे. माझा आवाज ओळखतो, मी हाक मारली की लगेच येईल” असे बोलत परत त्या कंपाऊंडवर चढून “जॉली जॉली” अशी हाक मारायला लागला.
त्याच्या आवाजातली ती आद्रता ऐकून असे वाटले हाच त्याचा जॉली असावा आणि त्याच्याकडे धावत यावा. पण तसे झाले नाही. अगदी नाराज होऊन ती मुले सायकलवर चढून दुसरीकडे त्याच्या शोधात निघाली. आम्ही सगळे त्यांच्याकडे नुसते बघतच राहिलो. एवढा वेळ हा त्याचा कुत्रा नाही म्हणून भांडणारी इतर छोटी मुले त्याच्या मदतीला धावून गेली. “अरे शेजारच्या गल्लीत एक नवीन पांढरे कुत्रे आहे. जाऊन बघा” आणि परत त्यांच्या मागे धावत गेली.
संध्याकाळी सोसायटीतील मुले खेळत होती. एकदा वाटले कि त्यांना विचारावे “अरे त्याचा कुत्रा मिळाला का?” पण मन घाबरले, कदाचित नाही ऐकण्याची माझ्या मनाची तयारी नसावी. पण मनोमन देवाला प्रार्थना करत होते कि “त्या लहान मुलाचा जॉली त्याला लवकर भेटू दे आणि या इवल्याशा चेहऱ्यावर परत खूप आनंद झळकू दे. तुझ्यावरच्या त्याच्या श्रद्धेला तडा नको जाऊ देऊ”.
आणि स्वत:ला एक प्रश्न विचारावा असे वाटले की, “कधी कधी आपण आपल्या मुलांवर किती अन्याय करतो नाही?”
पुण्यात घडविण्यात आलेल्या स्फोट मालिकांनी, आम्हाला नव्याने नव्या संदर्भासह विचार करण्यास भाग पाडले आहे. स्फोट कमी तीव्रतेचे असले तरी मात्र त्या स्फोटांची परिणामकारकता निश्चितच मोठी आहे. कमी तीव्रतेचे म्हणून त्याकडे दुर्लक्ष वा कमी लक्ष देणे आमच्यासाठी आत्मघात ठरेल हे निश्चित !
राज्य सरकारच्या दळभद्रीपणामुळे गेले तीन चार वर्षे शेतकर्यांच्या आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. ऊस, कापूस व इतर पिकांचा हमीभाव देण्यास सरकार नाकर्तेपणा करत आहे. बुडीत आलेली किंग्स फिशर कंपनीला सरकार भरभरून आर्थिक साहाय्य करते परुंतु शेतकर्यांच्या कर्ज माफीसाठी व पिकांच्या हमिभावासाठी सरकारकडे पैसा नाही. यासारखे दुर्दैव नाही….समाजातील ‘असमानता, वाढती लोकसंख्या, गरीबी, बेरोजगारी आणि श्रेष्ठत्व व वर्चस्वाची स्पर्धा’ हीच हिंसाचार, आत्महत्या, बलात्कार, भ्रष्टाचार अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला कारणीभूत आहे….आत्महत्या होऊ नयेत यासाठी उपायात्मक काही सूचना.
Copyright © 2025 | Marathisrushti