(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • गायीचे प्रेम

    रस्त्याच्या वळणावर एका झाडाखाली एक गाय शांत उभी होती. फक्त मानेची व शेपटीची हालचाल अधून मधून चालू होती. कितीतरी वेळ ती तशीच उभी होती. जाणारा येणारा तिच्या कपाळाला, शिंगाला व अंगाला हात लावून तिला नमस्कार करू बघत होता. डोळे मिटून शांत विश्रांती घेत असालेल्या त्या गायीला, प्रत्येकाचा स्पर्श होत असल्याची जाणीव, तिच्या किंचितशा हालचालीवरून दिसून येत होती. तिला त्यांच्या स्पर्शाबद्दल काय वाटत असावे, हे समजण्यास मार्ग नव्हाता. परंतु प्रत्येक वाटसरूला तिला स्पर्श करून,

  • ही आवडते मज…..

    एप्रिल-मे हे सर्वांचे आवडते महिने! मुलांना शाळेला सुट्टी म्हणून-तर आई-बाबांना मुलांना सुट्टी म्हणून. खरंतर सगळेच रिलॅक्स! मौजमजा, सहली, मामाचागाव इत्यादीमध्ये सुट्टी कधी संपते ते कळतही नाही. मे संपून जून सुरू झाला की मंडळी भानावर येतात. चिमणीपाखरं आपापल्या घरट्याकडे परततात. नकळत शाळेची घंटा साद घालू लागते, मुलांना आणि पालकांनाही! हल्ली तर बाळ जन्माला येण्यापूर्वीच त्याची शाळा ठरते. शाळेचे तास जेवढे अधिक, डोनेशन जेवढे जास्त तेवढी शाळा दर्जेदार हे समीकरण पक्के होत आहे. आपल्या स्टेटसनुसार जास्तीत जास्त चांगली शाळा निवडली जाते. त्यामुळेच तर दोन वर्षाचे बोबडे बोल 'ए फॉर अॅपल'ने सुरू होतात आणि ट्विंकल ट्विंकलने चमकतात. ड्रॉईंग, क्राफ्ट ही तर मम्मीची आर्ट असते. अपटूडेट युनिफॉर्म, नेकटाय, आयकार्ड, शूज सगळे कसे टापटीप असते. त्या निष्पाप चेहऱ्यावर उत्सुकता असो वा नसो, मात्र सारे घरदार त्याच्या शाळेची पूर्वतयारी एन्जॉय करीत असते. आईबाबा आपल्या लाडक्यासोबत मनाने पुन्हा एकदा शाळेत प्रवेश घेत असतात. खरच त्यांनाही प्रवेश परीक्षा द्यावीच लागते. त्यांच्या ज्ञानाबरोबर तिजोरीचा अंदाज घेऊनच अॅडमिशनचे मिशन पूर्ण होते. युनिफॉर्मच्या दुकानासमोरची रांग पाहून लक्षात येते नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात होत आहे. लग्नसराईत जसे वधुवरांपेक्षा यजमानांची धावपळ अधिक तशीच धावपळ आणि टेन्शन आता सुध्दा आईबाबांना असते. नवी कोरी वह्यापुस्तके, पाठीवरच्या ओझ्याचा भाग बनतात. पाटी अाण श्रीगणेशा दोन्ही आऊटडेटेड झाले असल्याने वह्या पुस्तकांनाच यथासांग कव्हरचा युनिफॉर्म आणि नामदर्शक लेबल लावले जातात. मात्र शाळेच्या गेटमध्ये मम्मीचा हात घट्ट धरून भोकाड पसरण्याची परंपरा आजही नकळत जपली जाते. तिचाही जीव क्षणभर गलबलतो. मात्र काही दिवसातच चित्र पालटते. स्वत:च्या हाताने खाणे, शर्टला लटकवलेल्या रुमालाने नाक- तोंड पुसणे, स्वत:च्या वस्तू सांभाळणे या सगळ्या गोष्टींचे प्रशिक्षण शिशू वर्गात पूर्ण होते. खरंतर बाललीलांनी भरलेले बालपण शिस्तीच्या कोंदणात बसविण्याचे कामच या बालवर्गांमधून केले जाते. नंतरच्या काळात हीच पाखरे एकमेकांच्या संगतीत इतकी रमतात की शाळा आणि घर यातले अंतर मिटून जाते. मग मात्र दरवर्षी एप्रिलमध्येही मनातल्या शाळेला सुट्टी नसते. भातुकलीच्या खेळातही शाळेचा वर्ग भरतो. जूनमध्ये शाळा सुरू होण्याआधीच मन शाळेकडे धाव घेते. सगळ्या नव्या कोऱ्या वस्तू घेऊन पहिल्या दिवशी शाळेत पोहोचणे यात खूप मोठे सुख असते. तर नवा वर्ग, नवी जागा, नव्या बाई यांची अनामिक ओढ लागते. नव्या वह्या-पुस्तकांचा सुवास सुखावत असतो. त्याच मित्रमैत्रिणींना पुन्हा नव्याने भेटण्याची उत्सुकता असते. सुट्टीतल्या गमती जमती मनात साठलेल्या असतात. खरंतर हा रेशीमकिडा घराच्या रेशमी कोशातून सुरवंट हेाऊन बाहेर पडत असतो. पुढे या सुरवंटाच्या पंखात बळ येते आणि ते फुलपाखरू स्वच्छंद विहार करू लागते. पण हा सगळा प्रवास मात्र जून ते एप्रिल या शैक्षणिक वर्षाच्या मार्गावरून होत असतो. शाळा आणि बालपण हातात हात घालून फुलपाखराच्या पंखात रंग भरतात. त्याला उडण्याची उर्मी देतात. आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न देतात. सर्वात महत्वाचे म्हणजे आयुष्याच्या इमारतीचा पाया मजबूत करतात. आत्मविश्वास, माणुसपणा, संस्कार, जीवनावरची निष्ठा या सगळ्यांची रुजवण करतात. म्हणूनच तर जीवनाच्या दगदगीत 'माझी शाळा 'कधीही विसरली जात नाही. हृदयाच्या कप्प्यात ती अत्तराच्या कुपीसारखी जपली जाते. नकळत कधी उघडली जाते, तेव्हा शाळेच्या आपारातल्या आठवणींचा सुगंध मनाला सुखावतो. हल्ली 25-30 वर्षामागचे वर्गमित्र-मैत्रिणी एकत्र येऊन आपल्या जीवनातील ती सोनेरी पाने पुन्हा उलगडण्याचा प्रयत्न करतात. एकपकारे यामध्ये शाळेविषयीची कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि पुन्हा एकदा मन उड्या मारीत शाळेत जाऊन पोहोचते. तो वर्ग, तो बेंच, तो फळा, ती खिडकी सगळे बोलू लागतात आणि नकळत हसता हसता डोळ्यांच्या कडा पाणावतात. अशावेळी त्या शाळेलाही कृतकृत्य वाटत असेल ना? 'बालपणाचा काळ सुखाचा' ही उक्ती शालेय जीवनाशिवाय पूर्ण होत नाही. जसे कॉलेज म्हणजे तारुण्य तसे शाळा म्हणजे बालपण. बोबडे बोल ते अस्खलित वक्तृत्व, वेड्यावाकड्या रेघोट्या, ते डौलदार लेखन, आईचा हात सोडून शाळेतला प्रवेश, ते आयुष्याच्या खुल्या प्रांगणात दमदार प्रवेश करणारी पावले. हा सारा प्रवास म्हणजे 'माझी शाळा' असते. कदाचित त्यामुळेच तर सुट्टी इतकीच दरवर्षी शाळा सुरू होण्याची वाट पाहिली जाते. खूप अभ्यास करण्याचा संकल्पकरूनही दरवर्षी शाळा आणि विद्यार्थी यांची पुनर्भेट होत असते. दरवर्षी तोच नवा उत्साह शाळेला चिरतरुण करीत असतो. तेच नवचैतन्याचे दिवस कालपरवापासून सुरू झाले आहेत. तुमच्या आमच्या मनातली 'आपली शाळा' आपल्याला आजही खुणावतेय ना? म्हणूनच नवीन शैक्षणिक वर्षासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

    ही आवडते मज मनापासुनी शाळा, लाविते लळा ही जशी माऊली बाळा

    ("ठाणे वैभव" च्या सौजन्याने)

    -- नूतन बांदेकर

  • तेरीमा कसीह

    डिपार्चर नंतर अरायव्हलला पब्लिक ऍड्रेस सिस्टिम वर इंडोनेशियन भाषेत अनाउन्समेंट झाल्यावर तेरीमा कसिह हा शब्द ऐकला. तोच शब्द विमानातून बाहेर पडताना एअरहोस्टेस सगळ्यांना बोलत होती. तेरीमा कसिह या इंडोनेशियन शब्दाचा अर्थ म्हणजे धन्यवाद.

  • रामसेज किल्ला

    नाशिक पासून १५ कि.मी. अंतरावर दिंडोरी तालुक्यातील शकुनाची अशी ओळख असणारा व ज्याच्या पायथ्याशी आशेवाडी गांव वसलं आहे तो म्हणजे रामसेन किल्ला, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वास्तु कलेचा उत्तम नमुना व पुरातन खाणा खुणा अबाधित राखत पर्यटनाच्या दृष्टीनं हौ महत्वाचा असा “रामसेज किल्ला” वर्णन करता येईल.<

  • दुधी भोपळा टमाटो सूप

    (दुधी भोपळ्याचे सूप सहजासहजी मुले पिणार नाही पण त्यात टमाटो घातल्यास कोणालाही कळणार नाही हे दुधी भोपळ्याचे सूप आहे. )

  • अनंत चतुर्दशी

    अनंत चतुर्दशीला विसर्जन करतात, हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र अनंत चतुर्दशीला आणखी एक महत्त्व आहे. त्या दिवशी अनंताच्या दो-याची पूजा केली जाते. त्याला अनंताचं फूल वाहतात. अशा या व्रताला अनंताचं व्रत असं म्हणतात.

    भाद्रपद शुद्ध चतुर्दशीस अनंताचं व्रत केलं जातं. कोणाला रस्त्यामध्ये, वाटेमध्ये अनंताचा दोरा सापडल्यास किंवा कोणी अनंत व्रताची पूजा मागून घेतलेली असेल किंवा अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाल्यामुळे हे व्रत मागून घेतलेले असेल तरच त्या त्या लोकांकडे अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंताची पूजा केली जाते.

    अनंताची पूजा होईपर्यंत गणपती विसर्जन करत नाहीत. माणूस जेव्हा त्याचे एखादे इप्सित साध्य करतो तेव्हा त्याच्या मनात त्याच्या कर्तृत्वाबद्दल अहंकाराची भावना उत्पन्न होते. असा अहंकार मनी भरलेला माणूस माणसाला ओळखू शकत नाही; परंतु जेव्हा हा अहंकार गळून पडतो तेव्हा मात्र साध्या साध्या गोष्टींमध्ये त्याला देव मिळू लागतो. असा परमेश्वर घराघरात पाहायला शिकणे म्हणजे अनंत दर्शन होय.

    अनंत पूजेत प्रामुख्याने यमुना, शेष आणि अनंताचा दोरक म्हणजे दो-याची पूजा असते. यमुना हे मनावरील कामक्रोधांचा ताबा ठेवण्याचे प्रतीक आहे. शेष हे महासामर्थ्य शाली पण अहंकाररहित तत्त्वाचे प्रतीक आहे. अनंताचा दोरक हे संसारातील कालचक्राचे प्रतीक आहे. कालचक्राचे चौदा भाग दाखवण्यासाठी अनंताचा दोरकही चौदा धाग्यांचा असतो. या दिवशी चौदा या संख्येला महत्त्व अधिक असते. हे व्रत कोणाकडूनही घ्यायची गरज नसते. हे व्रत कोणीही सुरू करू शकतं. चौदा र्वष व्रत केल्यावर चौदाव्या वर्षी व्रताचे उद्यापन करावे.

    या दिवशी मध्यान्हकाळी स्नान करून अनंताची पूजा करतात. शुद्ध पाण्याने भरलेला कलश घेऊन त्याला दोन पंचे गुंडाळतात. त्यावर दर्भाचा शेषनाग करून ठेवतात. कलशावरील पात्रात अनंताची प्रतिमा किंवा शाळीग्राम मांडून षोडषोपचारे पूजा करतात.

    त्याप्रमाणे चौदा गाठी मारलेला तांबडा रेशमाचा दोरक घेऊन त्याचीही पूजा करतात. या दो-याला अनंत असं म्हटलं जातं. तो पुरुषाने उजव्या हातात बांधावा. त्याचप्रमाणे मिळणारी अनंती पत्नीने उजव्या हातात बांधावी. त्यानंतर अनंताची कथा पठण करावी. रात्री मंत्रजागर करून ब्राह्मणास दक्षिणा देऊन पक्वान्नांचे वाण देतात. याप्रमाणे चौदा र्वष अनंत पूजन केलं जातं. या व्रतामुळे इच्छित हेतू सफल होतो, असं म्हणतात.

    चौदाव्या वर्षी या व्रताचं उद्यापन केलं जातं. या व्रतासाठी दांपत्य भोजन देण्याची प्रथा आहे. निमंत्रित केलेल्या दाम्पत्यांना चौदा अनारशांचं वाण दिलं जातं. अनारसे देणे शक्य न झाल्यास चौदा पेढे किंवा लाडू द्यावेत. अनंताचा दोरक वास्तविक वर्षभर ठेवायचा असतो. परंतु शक्य नसल्यास एखाद्या चांदीच्या डबीत ठेवून ती डबी देव्हा-यात ठेऊन रोज तिला हळदीकुंकू वाहून नमस्कार करावा. पुढल्या वर्षी त्या दो-याने विसर्जन करावं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.प्रहार

  • एका शून्यासाठी मोजले 12 लाख रुपये

    आपल्या दारासमोर एक गाडी असावी, असं प्रत्येक मध्यमवर्गीयाचं स्वप्न असतं. त्यासाठी त्याची पैशाची जुळवाजुळव सुरू असते.

    गर्भश्रीमंतांसाठी लाख-दोन लाख म्हणजे फुटकळ खर्च. अगदी चणे-फुटाण्यासारखा. त्यामुळे या श्रीमंत वर्गाकडून पैसे कमावण्याचा एक धंदा वाहतूक विभागानेही सुरु केला. त्याला यश येऊन वाहतूक विभागाने मोठी कमाईसुद्धा केली आहे.

    त्यामुळेच जेवढ्या पैशांत किमान 20 मध्यमवर्गीयांचे गाडीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते, तेवढे पैसे खर्च करून अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आपल्या नव्या ‘रोल्स रॉईस’ गाडीसाठी खास क्रमांक मिळवला. उद्योगजगतातील आपला अव्वल क्रमांक गाडीवरही असावा म्हणून मुकेश अंबानींनी १२ लाख रुपये भरून ‘००१’ असा क्रमांक आपल्या नव्या गाडीला मिळवला. मात्र, त्यांच्या ‘ज्योतिषा’ने हा क्रमांक अशुभ असल्याचे सांगितले. त्यामुळे या क्रमांकापुढे आणखी एक ‘शून्य’ जोडण्यासाठी त्यांनी आणखी १२ लाख मोजले!

    जगातील गर्भश्रीमंताच्या यादीतील हमखास भारतीय असलेल्या मुकेश अंबानी यांच्या साडेचार कोटी रुपयांच्या ‘रोल्स रॉईस’साठी हा ‘अंक’प्रपंच झाल्याची माहिती ताडदेव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली. ‘रोल्स रॉईस’ खरेदी करण्याचे अंबानींचे स्वप्न अलीकडेच पूर्ण झाले. त्या गाडीची नोंदणी 16 एप्रिल रोजी ताडदेव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात करण्यात आली. त्या वेळी 12 लाख रुपये खर्च करून या गाडीसाठी 001 हा क्रमांक घेण्यात आला होता. मात्र, ज्योतिषांनी हा क्रमांक फायदेशीर ठरणार नसल्याचे सांगितल्यावर अंबानी यांनी दुसर्‍या क्रमांकासाठी प्रयत्न केले. त्यानुसार त्यांना 0001 हा क्रमांक मिळालादेखील, पण त्यासाठी त्यांना आणखी 12 लाख रुपये खर्च करावे लागले. अशा प्रकारे अंबानींना गाडीच्या क्रमांकासाठी 24 लाख रुपये भरावे लागले. ‘0001’ हा क्रमांक अंबानींसाठी कितपत फायदेशीर हे अद्याप उघड व्हायचे आहे. मात्र, अंकज्योतिषाच्या सल्ल्याचा प्रादेशिक परिवहन कार्यालयाला मात्र फायदा झाला आहे. परिवहन कार्यालयांच्या नियमानुसार आवडीचा क्रमांक घेण्यासाठी ऑनलाईन पद्धत सुरू करण्यात आली आहे. उपलब्ध व्हीआयपी क्रमांकांची किंमतही ठरवण्यात आली असून त्यासाठी सात हजार रुपयांपासून पुढे 12 लाख रुपयांपर्यंतचे शुल्क भरावे लागते.

    गेल्या वर्षभरात एकट्या ताडदेव विभागाने 34978 वाहनांद्वारे या व्हीआयपी क्रमांकांच्या नोंदणीपोटी 25.28 लाख रुपये उत्पन्न मिळवल्याची माहिती ताडदेव कार्यालयातील सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे यंदा मुकेश अंबानींच्या एकाच गाडीसाठी दोन वेळा रक्कम भरावी लागल्याने यंदा विशेष क्रमांकातून गोळा होणार्‍या महसुलाची सुरुवात चांगली झाल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.

  • प्रकाश (कथा)

    कथा

  • भोंडले (३)

  • मुलाखत : राधा ही बावरी फेम सौरभ गोखले

    प्रश्न : तुझ्या शाळेतील एखादी आठवण सांग.

    सौरभ : शाळेतील आठवणी तर खुप आहेत. त्यापैकी एक सांगतो… आमच्या शाळेतही नाटकं बसवायचो तेव्हा मी छोटा शिवाजी करत होतो आणि तो सीन सुरु होता.. दादाजी कोंडदेव शिवाजीला हत्यारे चालवायला शिकवत होते. तेव्हा आम्ही स्टेजवर तोफ सुद्धा लावायचो आणि एकदा असं झालं की मी तोफ लावल्यावर त्याची ठिणगी दादाजी कोंडदेव बनलेल्या मुलाच्या धोतरावर उडाली आणि त्याचं धोतर जळालं. तेव्हा मी लगेच त्याला वींगेत ढकलले. आणि बिच्चारा सावरासावर करुन परत आला.. हा एक गमतीदार प्रसंग आठवतो.