(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • येणार्‍या काळात मराठी भाषेचं भवितव्य काय?

    मराठी भाषा टिकविण्यासाठी आणि तिच्या विकासासाठी पावलं उचलली गेली पाहिजेत… अशी प्रतिपादनं वेळोवेळी साहित्य संमेलनात तर हमखास केली जातात. भाषेचा प्रश्न केवळ महाराष्ट्रालाच भेडसावतो आहे असे नाही. भारतातील सर्व भाषिक लोक या समस्येमुळे हवालदिल झाले आहेत. 

  • थांब ना आई

    पालकांनी ही कविता जरुर वाचावी

  • टूर अंबाणी दादांच्या महालाची

    अंबाणी दादांच्या महालाची फार चर्चा होत असते. त्या चर्चेमुळे आग्य्रातील ताजमहल आणि वाशिंग्टन येथील व्हाईट हाऊस हे राजवाडे कम महाल फिके पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय या दोन्ही महालांची नव्हाळी कमी झालेलीच आहे. ताजमहलाचं दर्शन बिल क्लिंटन पासून ते बाबूराव कोटलवार  आणि  मिशेलवहिनी ओबामा पासून मंगलाताई ओतारे यांच्यापर्यंत कुणीही,कधीही घेऊ शकतात.

  • चारोळी

    आवाज माझ्या कवितेचा

    माझ्यापेक्षा मोठा आहे

    माझा फक्त कानापर्यंत

    त्याची झेप थेट हृदयात आहे

  • भारतमातेच्या वीरांगना – 4 : अरुणा आसफ अली

    १९४२ भारत छोडो आंदोलनाने सगळ्या देशभरात जोर धरला होता. मुंबईला ला काँग्रेस चे अधिवेशन झाले. त्यात हा प्रस्ताव सर्वसंमतीने पुढे नेण्यात आला. अर्थात ब्रिटिश सरकार खवळले आणि सगळ्या बड्या नेत्यांची पाठवणी कारागृहात झाली. ८ ऑगस्ट ला सगळ्या नेत्याची रवानगी कारागृहात झाली आणि अरुणाने ९ तारखेचे सत्र स्वतः अध्यक्षस्थानी राहून पूर्ण केलं आणि मुंबईच्या गोवलिया टॅंक मैदानावर काँगेसचा झेंडा फडकवला.

  • पुरणपोळी आणि भैरवी

    पुरणपोळी ही भैरवीसारखी आहे. किमानपक्षी सूर नीट लागले तरी भैरवी कमीअधिक रंगतेच. तसंच पुरण छान जमलं की पुरणपोळीची वैगुण्यं क्षम्य आहेत !

    पुरणपोळीसाठी केलेले श्रम ही एक संपूर्ण मैफल आहे तर ती खाणे म्हणजे भैरवी आहे. रांधणे हा (जाणकारांसाठीच) आनंद आहे आणि भोजन हा परमानंदाचा कळस आहे.

    डाळ निवडून घेणे इ. भूप, किंवा बिलावल आहेत. जास्त कसब गरजेचं नाही. कणिक मळणे हा खमाज आहे. रटाळ तरी थाटाचा असल्याने गरजेचा !

    गूळ म्हणजे यमन!
    यमन हा रागांचा राजा तसंच गुळाचं महत्व!
    इथं तीव्र मध्यम श्रुतीमनोहरच लागायला हवा म्हणजेच गुळाचा हात नेमकाच पडायला हवा
    (अन्यथा बट्ट्याबोळ!).
    हां, आता ज्यांना जमत व गमतं
    ('प्रभू आजि गमला' या अर्थाने) नाही ते दोन्ही मध्यम घेऊन त्याचा यमनकल्याण करतात म्हणजेच गुळात साखरही मिसळतात.

    जायफळाची एखादी ठुमरी झाली की लगेच पुरण शिजवायचं ते अगदी देस रागाप्रमाणे. 'गनिसा' ही संगती देस ची ओळख (सिग्नेचर) तसंच, रटरट आवाजाबरोबर घमघमाट येणे ही पुरणाची सिग्नेचर मानावी. पुरण आणि देस हे ओघवते असावेत पण चंचल नकोत.

    नंतर होरीप्रमाणे पुरणाचं वाटण करायचं. म्हणजेच लवकर आटपायचं .... ख्या ख्या
    आता महत्वाचा 'टप्पा' ! पोळ्या करणे ! बिहागचा टप्पा साधायला कुण्या दिग्गज हाद्दूखान - हास्सूखान अशांचीच तालीम हवी. आणि सगळेच मालिनीताई होत नाहीत हे ही विनयशीलतेने मान्य करायला हवं. रागाला शरण जावं तशी निगर्वी शरणागती झाली तर हळूहळू जमेल. पण तपश्चर्या हवी.
    आता अशा कमालीच्या रंगरस-संपन्न मैफलीत तराणा यावा तशी तुपाची धार!

    तराणा मूळ आलाप-जोड यापासून वेगळा काढता येऊ नये अगदी तस्संच तुपानं पोळीशी अद्वैत करून असावं.

    मग .. 'जो भजे हरिको सदा', 'चिन्मया सकल ह्रदया", "माई सावरे रंग राची" अशा विविध रूपांनी सर्वगुणसंपन्न भैरवीचं रसग्रहण करावं त्याप्रमाणे एकेक घास जिभेवर ठेऊन असीम आनंद घ्यावा आणि मग "हेचि दान देगा देवा" अशा थाटात 'अन्नदाता सुखी भव' म्हणावं.

    भैरवीचे सूर मनात दीर्घ काळ रेंगाळावेत तशी पुरणपोळीची चव जिभेवर रेंगाळावी. दिवस सार्थकी लागावा ...... आयुष्य सार्थकी लागावं !!!

    लेखक : अनामिक
    व्हाॅटसअपवरुन साभार

  • मदार त्या पाण्यावर !!!

    रक्ताचे पाणी झाले,
    आणि बरसले छाताडावर,
    पाणी पिऊन लोक …. ….. करतात,
    खुल्या मोकळ्या भिंताडावर………

  • सुंदरतेचा आस्वाद ! (बेवड्याची डायरी – भाग ३३ वा)

    इथे आल्यापासून एक चांगली सवय लागलीय मला ..लवकर उठण्याची ..सकाळी साडेपाचला बेल वाजण्यापूर्वीच मला जाग येवू लागली आहे ..विशेष म्हणजे उठल्यावर एकदम फ्रेश वाटते ..याचे कारण रात्री वेळेवर झोप हे असावे बहुतेक ..तसेच इथे मी सगळ्या कौटुंबिक व इतर प्रकारच्या चिंतांपासून दूर असल्याने मनस्थिती देखील चांगली राहतेय ..घरी असताना रात्री कितीही दारू प्यायलो असलो तरी लवकर झोप लागत नसे ..लागली तरी ती झोप नव्हती तर दारूच्या नशेत शरीर मन शिथिल होणे असे ..त्यामुळे सकाळी उठल्यावर प्रचंड थकवा जाणवे..मन देखील विषण्ण असे ..डोळ्यांची चुरचुर ..अंगदुखी ..पित्तप्रकोप अशी सगळी लक्षणे जाणवत ..अंथरुणातून उठूच नये असे वाटे ..अलकाने खूप तगादा लावल्यावर मी नाईलाजाने उठत असे ..आता ही लवकर उठण्याची सवय अशीच ठेवायची असे मी ठरवले होते मनाशी ..मी लवकर उठतो म्हणून माॅनिटरने मला बेल वाजल्यावर इतरांना उठवण्याची देखील जवाबदारी दिली होती ...हे दुसर्यांना उठवण्याचे काम गमतीशीर होते ..विशेषतः काही आळशी लोक उठायला खूप कंटाळा करत असत ..कितीही हाक मारला तरी नुसते ..हु..हम्म ..पाच मिनिट ..अशी सवलत मागत असत ..

    काही जण वैतागून ..मला म्हणत ...यार तू रातको सोता है या नही ? ..एकाने तर मला चक्क शाप दिला होता ..तू चैन से सोनेवालो कि निंद हराम करता है ..तूझे कभी चैन नही मिलेगा ..एकदोन महाभाग असे असत की अजिबात त्यांच्यावर कसलाही परिणाम होत नसे ..शेवटी त्यांच्या तोंडवर थेंबभर पाणी शिंपडले की मग डोळे उघडत ते ..मला हे उठवण्याचे काम करतोय म्हणून काहींनी मला गमतीने ' मुर्गा ' म्हणजे ' कोंबडा ' म्हणण्यास सुरवात केली होती ..अर्थात मी हे काम उत्साहाने आणि हसतमुखाने न चिडता करत होतो ..सरांनी काल दिलेल्या प्रश्नानुसार मी येथे राहताना थेरेपीजच्या वेळा सोडून एक दिनक्रम लिहिला होता ..त्यात सकाळी पीटी झाल्यावर सूर्यनमस्कार ..दुपारी वाचन ..सायंकाळी मोकळ्या वेळात ..थोडा वेळ हास्यविनोदात सामील होणे ..थोडा वेळ कॅरम खेळणे ..टी.व्ही पाहणे ..आणि रात्री झोपण्यापूर्वी येथे जे जे शिकतो आहे त्याबाबत डायरीत नोंदी ठेवणे सगळे लिहिले होते .

    आज समूह उपचारांच्या वेळी सरांनी ' फक्त आजचा दिवस मधील शेवटची तीन वाक्ये फळ्यावर लिहिली .

    १० ) फक्त आज मी स्वतःसाठी अर्धा तास देईन ..या अर्ध्या तासात मी माझ्या आयुष्याचा चांगला अर्थ घेण्याचा प्रयत्न करेन .

    ११ ) जे चांगले आहे ..सुंदर आहे त्याचा आस्वाद घेण्यास मी घाबरणार नाही

    १२ ) मी ज्या प्रमाणे जगाला देईन ..त्या प्रमाणे जग मला देईल ..यावर मी विश्वास ठेवेन .

    रोजच्या रोज स्वताच्या जिवनाबद्दलच्या चिंतना साठी दहावी सूचना आहे असे सांगत सर म्हणाले ..दिवसभरात केव्हाही मोकळा वेळ असेल तेव्हा आपण किमान अर्धा तास तरी चिंतन केले पाहजे ..म्हणजे आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा घेणे ..माझे दिवसभराचे वर्तन तपासणे ..मी कोणाशी कसा वागलो ..काय बोललो याचे परीक्षण करणे होय ..तसा प्रत्येक माणूस नकळत असे चिंतन करतच असतो ..मात्र बहुधा असे चिंतन करताना तो दिवसभरात स्वताच्या मनाविरुद्ध घडलेल्या घटना आठवतो ..अपमान जनक प्रसंगांची उजळणी करतो ..इतरांनी त्याच्याशी केलेल्या वाईट वर्तनाचा विचार करून स्वताचे काय चुकले आहे हे न समजून घेता ...इतरांच्या चुका शोधून ..एकतर रागाची ..बदल्याची ..किवा निराशेची भावना मनात जोपासतो ..त्या ऐवजी माझ्या आयुष्याचा चांगला अर्थ घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे ..दिवसभरात घडलेल्या घटनांमधून मी काही सकारात्मक शिकतोय का ? मला भेटलेल्या व्यक्तींच्या वागणुकीतून मी काही धडा घेतोय का ?तसेच मी केलेल्या चुका उद्या कशा टाळता येतील ..आसपासच्या सर्वांशी आपुलकीचे संबंध कसे जोपासता येतील ..याचा विचार करणे म्हणजे सकारात्मक चिंतन होईल ..

    ' जे चांगले आहे ..सुंदर आहे त्याचा आस्वाद घेण्यास मी घाबरणार नाही ' हे वाक्य वाचल्यावर बहुतेक लोकांच्या मनात सुंदरता म्हणजे ' स्त्री ' चे सौंदर्य येवू शकते ..या सूचनेत सुंदरता या संकल्पनेत अनेक गोष्टी येतात ..तसेच या वाक्याचा असा ही अर्थ निघतो की ' जे वाईट आहे ..गलिच्छ आहे त्याचा आस्वाद घेण्यास मी घाबरेन ' म्हणजेच ज्या ज्या गोष्टीना समाजाने ..नैतिकतेने ..अथवा आपल्या संस्काराने वाईट म्हंटले आहे त्या सर्व गोष्टींपासून मी दूर राहीन .. समाज ज्याला चांगले म्हणतो ..सुंदर म्हणतो त्याचा आस्वाद घेईन ..यात विविध कलांचा आस्वाद ..निसर्गसौंदर्य ..भूतदया ..चांगल्या प्रकारच्या खाण्याच्या विविध गोष्टी ..संगीत ..वाचन ..समाजसेवा ..वगैरे गोष्टी येतात ..आपण व्यसन करत असताना नेमके ' जे वाईट आहे ..गलिच्छ आहे ' अश्या गोष्टी करत गेलो ..त्या ऐवजी आता चांगल्या आणि सुंदर गोष्टीत रस घेणे अपेक्षित आहे ...

    शेवटचे वाक्य होते ' मी ज्या प्रमाणे जगाला देईन ..त्या प्रमाणे जग मला देईल यावर मी विश्वास ठेवेन ' म्हणजे क्रिया -प्रतिक्रियेच्या सिद्धांतावर माझा विश्वास असला पाहिजे ..मी जर जगाला प्रेम ..आपुलकी ..माया ..दया ..करुणा ...देत गेलो तर नक्कीच या गोष्टी मलाही मिळतील ..मात्र मी जर द्वेष ..तिरस्कार ..राग ..वंचना ..फसवणूक ..निर्भत्सना ..कटुता देत गेलो तर मलाही कधीतरी असेच मिळेल जगाकडून हे आपण सदैव लक्षात ठेवले पाहिजे ..आपल्या चांगल्या कर्मांनीच आपले भविष्य घडत जाते ..हे लक्षात ठेवून आपली भावना आणि कर्मे याप्रती जागरूक राहणे महत्वाचे आहे ...

    ( बाकी पुढील भागात )

    -- तुषार पांडुरंग नातू

    " मैत्री ' व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
    संपर्क..रवी पाध्ये - ९३७३१०६५२१ ..तुषार नातू - ९८५०३४५७८५

  • राजीव गांधी, अफ़जल गूरू, ओमर अब्दुला आणि बॉम्बस्फोट

    ७ सप्टेंबर २०११ रोजी सकाळी १०.१४ वा. दिल्ली हायकोर्ट, गेट क्रं. ५ येथे भीषण बॉम्बस्फोट झाला. हा बाँम्ब एका ‘ब्रिफकेस’मध्ये ठेवण्यात आला होता. स्फोट इतका बलशाली होता की, स्फोटाच्या ठीकाणी चार फुटाहून मोठा खड्डा पडला आहे, या परिसरातील अनेक गाड्यांचेही तुकडे झाले आहे. बांगलादेशातील हरकत-उल-जिहादी “हुजी” (नावातंच जिहाद आहे) या आतंकवादी संघटनेने स्फ़ोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. ही जबाबदारी स्वीकारताना “हुजी”ने असे म्हटले आहे की महम्मद अफ़जल गूरू याला देहदंडाची शिक्षा झाली आहे, त्याचा विरोध म्हणून हा भयानक स्फोट घडवून आणला आहे. अफजलची फाशी रहित करावी, अन्यथा देशातील आणखी काही उच्च न्यायालयावर अशीच आक्रमणे करू, अशी धमकी “हुजी”ने भारताच्या मुस्कटात मारली आहे. काँग्रेसचे युवराज घायाळांना भेटण्यासाठी रुग्णालयात आले होते तेव्हा त्यांना जन-उद्रेकाला सामोरे जावं लागलं, त्यांच्या विरोधात भोषणाबाजी झाली. गांधी-नेहरु परिवाराला जन-उद्रेक काय असतो हे वेगळे सांगायला नको.

  • आरोप…

    वर्तमान राजकीय-सामाजिक परिस्थिती ही फारच विदारक व केविलवाणी आहे, तरी ती परिस्थिती कमीत कमी शब्दात मांडण्याचा/व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.