(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • विद्रोही कवी

    विद्रोही कवी

  • “जुन्या भांड्यांची शोभा अन् थाट”

    आज कधीतरी प्रदर्शनातून हिंडताना किंवा एखाद्या संग्रहालयाला भेट देतो त्यावेळी तांबा, पितळ व जर्मनच्या वस्तु विक्रीसाठी तर कुठे फक्त माहिती कळावी म्हणून ठेवलेल्या असतात. थोडसं हसू ही येतं, कारण काल परवा पर्यंत वापरातल्या गोष्टींना आता अॅन्टीकचा दर्जा प्राप्त झालेला आहे..

  • भारतमातेच्या वीरांगना – 18 – भीकाजी कामा

    २२ ऑगस्ट १९०७ साली जर्मनीत झालेल्या दुसऱ्या समाजवादी काँग्रेस अधिवेशनात कामा ह्यांनी भाग घेतला. मानवी हक्क, समानता आणि स्वातंत्र्य ह्या मुद्यावर उपस्थित लोकांना त्यांनी भारताकडे पाहायला प्रेरित केले. भारताचा स्वातंत्र्य हा हक्क आहे हे उपस्थितांना जाणवून दिले. ह्याच अधिवेशनात त्यांनी स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकवला. आत्ताचा तिरंगा हा मॅडम कामा आणि इतर उपलब्ध डिझाईनचे तिरंग्याचे सुधारित रूप आहे.

  • आरक्षण…सोयीस्कर राजकारणाचं स्त्रोत!

    “मुस्लिम मागासवर्गाला आरक्षण”…निवडणुकांच्या तोंडावर घोषित आरक्षणाला सोयीस्कर राजकारणाचं स्त्रोत म्हटलं तर वावगे ठरेल का?…‘नॉन-क्रिमीलेअर’ सारख्या जाचक अटीमुळे ओबीसी, विमुक्त जाती, एस.बी.सी. व भटक्या जमातींना इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या कितीतरी सेवापदांना मुकावे लागले. ‘नॉन-क्रिमीलेअर’ या अटीची व्याख्या “उच्चवर्णीयांतील प्रत्येकजण श्रीमंत नसतो तसचं मागासवर्गातील प्रत्येकजण गरीब नसतो” या सिद्धांताला अनुसरून त्यांना समान पातळीवर आणायचे असेल तर मग उच्चवर्णीयांसहित सरसकट सगळ्यांनाच आर्थिक निकषावर आरक्षण का नाही?. आरक्षणासाठी फक्त जातींचाच व अल्पसंख्याकांचाच आधार का ?.केंद्र व राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या आरक्षणातून नेमका कोणत्या गोष्टीचा मागासलेपणा एका समान पातळीवर शासन आणू पाहतेय.

  • ब्रेक – अप

    ब्रेक – अप

    प्रेमात ब्रेक – अप आमच्या वाट्याला कधी आलाच नाही …..

    ब्रेक – अप होण्याइतक प्रेम कधी कोणावर केलच नाही ……

  • बाहेरून नागपूरले येणार्‍या लोकायसाठी जरूरी सूचना

    बाहेरून नागपूरले येणाऱ्या लोकायसाठी जरूरी सूचना

    १. नागपूरात येवून आपला शायनेपना दाखवू नये. इथं पहिलेच अतीशायने लोकं राहतात.

    २. पुणेवाल्या लोकायनं आम्हाले दुपारी एक ते चार झोपाचा फालतू सल्ला देवू नये. दुपारी आम्हाले खूप सारे कामं रायते.

    ३. नागपूरातल्या दुकानदारांशी जास्त वाद घालू नये. नाहीत् सामान भेटन नाहीच, उलट झोडपे भेटतीन.

    ४. आम्ही दुपारी एक ते चार ट्रॅफिकचे नियम पाळत नाई. कारण विचारू नये. तुम्हाले उत्तर दयाले आम्ही दबेल नाही.

    ५. इथल्या लोकायसमोर उगाच तुमच्या श्रीमंतीचा ताव मारू नये. तुमच्या पैशात आम्हाले जरासा बी इंटरेस्ट नाही.

    ६. मुम्बई अन् पुणेवाल्यांनी तर आम्हाले काम कमी करणारे आळशी म्हनू नये. आम्ही कितीही रिकामचोट असलो तरी तुमच्यापेक्षा पोटभर जेवतो.

    ७. नागपूरवाल्यायले अविकसित समजू नये. मनाची श्रीमंती हाच आमचा विकास.

    ८. नागपूरातल्या पोरी तोंडाले फडकं बांधून फिरतात म्हणून उगाच दात दाखवू नये. तो आमचा खाजगी प्रश्न आहे. अन् तुम्हाले तोंड दाखवाची जबाबदारी अजून आम्ही घेतलेली नाही.. समजलं..?? नाहीत् भर मे महिन्यात कामठी रोडावर नंग्या पायानं चालाची शिक्षा करण्यात येईल.

    ९. आमच्या भाषेले अजिबात हासाचं नाही. तुम्ही जर मराठीत विचारलं त् मराठीतच उत्तर भेटन. आमच्या भाषेत 'का बे ' चा अर्थ 'काय दादा' असा होते.

    १०. आमच्या रंगावर बिलकुल जायचं नाही. मूळचे आम्ही गोरेच आहो. हा इथल्या उनाचा परिणाम आहे.

    !! धन्यवाद भाऊ.. दे खर्रा!!

  • महाकवी कालीदास भाग५

    महाकवी कालीदासाची कथा कवन रूपात ५ भागात मांडली आहे.रसिक वाचकांनी जरूर वाचावी.

  • पिपली लाईव्ह (वात्रटिका)

    पिपली लाईव्ह

    जिकडे तिकडे लाईव्ह,

    जिकडे तिकडे ’पिपली’ आहे.

    गिधाडांची नजर तर

    शिकारीवरच टपली आहे.

    ” सर्वात आधी,सर्वात प्रथम”

    असे ढोल बडवल्या जातात.

    दाखवायला काही नसेल तर

    बातम्यासुद्धा घडविल्या जातात.

  • वीर सावरकर – स्वातंत्र्य क्रांतिकारकाचे महामेरू

    सावरकर कुटुंब मूळचे कोकणातील,गुहागर जवळील सावरी गावाचे, त्या गावात सावरीची खूप झाडे होती त्यामुळे त्याचा अपभ्रंश सावर झाला. सावरचे म्हणून सावरकर. पण त्यांचे पूर्वज पेशव्यांचा दरबारात रुजू झाले. त्यांच्या पराक्रमावर खुश होऊन त्यानी सावरकर कुटुंबाला नाशिक जवळील भगुर गांव वतन म्हणून दिले. त्याच बरोबर एक तलवार व एक अष्टभुजा देवीची पितळी मूर्ती मिळाली. त्याची स्थापना देवघरात करण्यात आली. याच भगुर येथे विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ साली झाला.

  • आपली संपत्ती चाललीये कुठे?

    टेलिकॉम क्षेत्र हे देशातील सर्वाधिक ऊर्जा वापरणारे दुसर्‍या क्रमांकाचे क्षेत्र ठरले आहे. टेलिकॉम क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी देशातील एक तृतियांश ऊर्जा खर्च होते, असे दिसून आले आहे. देशाच्या एकूण ऊर्जा आवश्यकतेपैकी आयसीटी क्षेत्रासाठीच्या ऊर्जेचे प्रमाण येत्या दहा वर्षांत २.७ टक्के एवढे मोठे होईल, असे सरकारी आकडेवारी सांगते. मोबाइल टॉवर्ससाठी सर्वाधिक ऊर्जा लागते.