कविता कशी करतात माहित नाही. पण कविता वाचताना एक अनोखा आनंद होतो. किमान मला तरी होतो. आणि आणखीन एक विचार मनात चमकून जातो.आपण का नाही करू शकत अश्या कविता? यातला प्रत्येक शब्द परिचित आहे ,त्यांचा अर्थ आपण जाणतो .मग मी का नाही करुशकत कविता? सराव नाही म्हणून? सरावाने जमेल?
मुलांच्या आत्महत्या – जबाबदार कोण ?
बर्याच दिवसांनी लिहीतोय.अश्विनी एकबोटे.अचानक आपल्यातुन निघुन गेल्यामुळे काही सुचतच न्हवतं.सैरभैर झाल होतं मन.गेल्या १५ वर्षांचा सहवास.एक अत्यंत गुणी अभिनेत्री व चांगली माणुस.पहिल्यांदा काम केल आम्ही ते एका वॉशिंग मशिनच्या जाहीरातीत.आणि तिथेच सुर जुळले.ते शेवटापर्यंत.पुण्यात घर.लहान मुलगा.सगळ कुटुंबच पुण्यात.मुंबईच माहित नाही.पण आली.दबकत दबकत.पहिली मालीका " काना मागुन आली""डॉ.गिरीष ओकांच्या पत्नीची मुख्य भूमिका.मीच नाव सुचवल.आली व चक्क ८०० रु.पर डे वर काम सुरु केलं.मग मुंबईत रहायला घर नाही.विजयनगर सोसा.मग वनराई कॉलनीतल्या ४ जागा.सतत डोक्यावर संसार घेऊन फिरायचं.सतत पुणे मुंबई.महिन्यात्यातुन ७ ते ८ वेळा मुंबई पुणे.तेही रात्री १२ ची टु बाय टु एशियाड पकडुन जायची.तीचा मुलगा शुभंकर लहान होता.सगळा जीव तिचा त्याच्यात गुंतला होता.हिरकणी सारखी वेळ काळ कशाचीही पर्वा न करता पुण्याला पळायची.भोर ला सोनियाचा उंबराचं शुट चालायचं.पण ही कित्येक वेळेला रात्रीची ड्रायव्हींग करत पुण्याला जायची.त्यात पुण्यात चालु केलेला भरतनाट्यमचा क्लास.त्या विद्यार्थिनींमधे जीव गुंतलेला असायचा.त्यांना कधी फक्त विदयार्थीनी म्हणुन पाहीलच नाही.मुलींसारखं प्रेम करायची.नृत्या व्यतिरीक्त.माणुस घडवण्याचा प्रयत्न करायची.जे करेल ते मन लावुन सर्वस्व ओतुन.मग हळु हळु मुंबईतलं स्थान पक्क करत चालली.मग मारुती 800 घेतली.त्या आधी माझ्या स्कुटरवरुन जाताना पाऊस आला.पंक्चर झालं पडलो.असे अनेक प्रकार घडले.पण ते क्षण सुध्दा तक्रार न करता भरभरुन जगली.एक सळसळता नदिचा प्रवाह होता अश्वीनी.मी तीला सुंदर म्हटलं की "तुला दिसते रे वेड्या." असं म्हणायची.आम्ही "मांदिआळी शब्द तालांची" कार्यक्रम सुरु केला त्याचे देश विदेशात प्रयोग केले.एकटीच नाचायची पण १० मुली नाचल्याचा आभास निर्माण करायची.दिवसभरातुन किमान १० फोन करायची.सतत चौकशी करायची.जी व्यक्ती तिला भेटायची ती तिच्या प्रेमात पडायची.हुशार.अभ्यासपूर्ण भुमिका करायची.मी ते करत नाही म्हणुन चिडायची.सिनेमा नाटक पाहिल्या नंतर त्याचं विच्छेदन सुंदर करायची.मग." तु फक्त हो म्हण", एका क्षणात","त्या तिघांची गोष्ट","नांदी", " नाच ग घुमा","कितीतरी चित्रपट ,पौराणीक सीडी्ज.ईतकं अप्रतिम काम करायची सगळे कौतुक करायचे पण पुरस्कार मात्र मिळाला नाही.मग लहान मुलासारख ऊदास व्हायची.पण तिने स्वतःच ह्यातुन स्वतःला बाहेर काढलं.ते सगळं पचवल.व ती आणखीनच प्रगल्भ झाली.नााचाचे कार्यक्रम शास्त्रीय नृत्याचे करायला मिळत नाहीत म्हणुन सतत खंत व्यक्त करायची.आणि आत्ता कुठे करीयरला छान आकार यायला लागला होता.पहिल्यांदाच महेश मांजरेकरांनी मिक्टाला बोलावलं किती खुष होती.एक लोकप्रीय अभिनेत्री म्हणुन नावारुपाला यायला लागली.नुकतीच जाण्यापुर्वी ८ दिवस होंडा सीटी घेतली.खुष होती.नविन नाटक मिळालं होतं.ज्यात मी नव्हतो त्याचा आनंद होता.कारण ऊगाचच लोक समज करुन घेतात.की ही शरद शिवाय काम करत नाही.तस काहीच नव्हतं.म्हणुन मला म्हणाली! की लोकांचा गैरसमज दूर होईल. तिचा मुलगा ह्याच क्षेत्रात करीयर करायला सिध्द झालाय.त्याचं करीयर व्हावं म्हणुन जीव तळमळाचा तीचा.त्याला कारण तीन ऊशिरा सुरु केलं होतं सगळं.पण नियतीच्या मनात वेगळच असतं.स्टेजवर नाचताना भैरवी रागावरचं गाणं चालु त्यावर तीचा नाच चालु.गाण संपलं नाचही संपला.व माझी जीवश्च मैत्रीणही संपली.तिलाच कळलं नाही.मला म्हणाली की नंतर लगेचच माझा प्रयोग होता तर पहिला अंक बघुन जाईन.पण तीच्या जिवनाचाच तिसरा अंक संपला होता.तिनं एक्झीट घेतली होती.रंगभुमी मालिका चित्रपट ह्या प्रत्येक ठिकाणी तिची ऊणीव नक्कीच जाणवणार.ती गेली आणि माझ्या हातात राहील्या फक्त सुंदर आठवणी.त्या खुपच सुंदर आहेत.पण तरीही ४४ हे जाण्याचं वय नाही.खुप काही करायचं होतं.सगळच अर्धवट राहीलं.पण शेवटी परमेश्वरापुढे कोणाचच काहीच चालत नाही.आपण फक्त बाहुल्या आहोत कठपुतळ्या.
- शरद पोंक्षे
मराठी अर्वाचीन कादंबरीचे जनक' अशा शब्दांत ज्यांचे वर्णन होते अशा हरी नारायण उर्फ ह. ना. आपटे यांचा जन्म ८ मार्च १८६४ रोजी झाला.
भारतातील कंपनी सरकारचे राज्य खालसा होऊन ब्रिटिश सरकारची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर प्रतिभावंतांची जी पहिली पिढी जन्माला आली, त्यात ह. ना. आपटे यांचा समावेश होता.
हरी नारायण आपटेंनी कथा, स्फूट लेखन, कविता, कादंबरी, नाटक व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत मर्दमुकी गाजवत आपले नाव प्रतिभेच्या सर्व दालनांवर सुवर्णाक्षरांनी कोरले. 'करमणूक' या त्या काळात वाचकप्रिय झालेल्या मासिकाची स्थापना त्यांनी केली व त्याचे ते काही काळ संपादकही होते. ज्ञान प्रकाश या मासिकाचेही त्यांनी काही काळ संपादन केले व आनंदाश्रम ही प्रकाशनसंस्था चालवली. प्रख्यात महिलांची माहिती देणारे 'स्त्रीरत्ने' हे सदर त्यांनी बराच काळ लिहिले. त्यात त्यांनी लीलावती, राणी दुर्गावती अशा कर्तृत्ववान महिलांची ओळख वाचकांना करून दिली.
कै. गोविंद बल्लाळ देवल यांचे सुप्रसिद्ध `संगीत शारदा' हे नाटक मा.ह. ना. आपटेंनीच प्रकाशात आणले व केशवसुतांची कविताही त्यांनीच प्रयत्नपूर्वक लोकप्रिय केली.
अकोल्यात झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना लाभले. त्यावेळी अध्यक्षपदावरुन त्यांनी केलेले भाषण बरेच गाजले. या भाषणात त्यांनी नवमराठी साहित्याचा पुरस्कार करून मराठी वाङमय जीवनस्पर्शी असलेच पाहिजे या भूमिकेचा पुरसकार केला. ह. ना. आपटेंनी अनेक पुस्तकांना प्रस्तावनाही लिहिल्या. मा.ह. ना. आपटेंनी साहित्याच्या अनेक प्रांतांत मुशाफिरी केली असली, तरी ते गाजले त्यांच्या कादंबरी लेखनामुळेच. बारा सामाजिक व अकरा ऐतिहासिक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्या सर्वच लोकप्रियही झाल्या. पण त्यांचे नाव आजतागायत गाजत राहिले, ते त्यांच्या 'पण लक्षात कोण घेते?' या कादंबरीमुळे. ही कादंबरी मराठी साहित्याच्या वाटचालीतील मैलाचा दगड बनून राहिली. त्यांच्या लिखाणावर महादेव गोविंद रानडे व गोपाळ कृष्ण गोखले या सुधारणावादी नेत्यांचा प्रभाव होता. त्यामुळे त्यांच्या लिखाणाचा गाभाही समाजाला शहाणे करून सोडण्याचाच होता.
ह. ना. आपटेंचा इंग्रजी भाषेचा अभ्यास दांडगा होता. त्यामुळेच त्यांनी शेक्सपियर व्हिक्टर ह्युगो, कॉग्रेव्ह, फ्रेंच नाटककार मोलियर यांच्या नाटकांची रुपांतरे मराठीत आणली. मेडोज टेलर याच्या दोन गाजलेल्या कादंबऱ्यांची 'तारा' व 'पांडुरंग हरी' ही रुपांतरे त्यांनी प्रकाशित केली. निबंधकार विष्णूशास्त्री चिपळूणकर हे ह. ना. आपटेंचे लेखनातील आदर्श. शास्त्रीजींच्या मृत्यूनंतर त्यांनी 'शिष्यजनविलाप' ही ऐंशी श्लोकांची विलापिका लिहिली. त्यांनी वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी 'केसरी'मध्ये त्यांनी भवभूती व कालिदास यांच्यासंदभांत टीकात्मक लेखन केले. हे लेखन त्यांनी 'बिचारा' या टोपण नावाने केले होते.
ह.ना.आपटे यांचे ३ मार्च १९१९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ : इंटरनेट
तुझी माझी अदा बघून
बघ कसे वेडे झाले होते?
अंडरवर्ल्डमधील दुश्मनीमुळे ज्येष्ठ पत्रकार जेडेंचा बळी गेला का, असा प्रश्न विचारला जात आहे.
कम्युनिटी रेडिओ म्हणजे एखाद्या विशिष्ट भौगोलिक भागासाठी किंवा विशिष्ट समाजासाठी असलेला रेडिओ. भारतात कम्युनिटी रेडिओची सुरुवात २००४ साली झाली. सुरुवातीला कम्युनिटी रेडिओ चालू करण्यासाठी असंख्य बंधने होती; पण २००८ नंतर ती बरीच शिथिल करण्यात आली आहेत. शेतीविषयक माहिती देणे, लोकांचे प्रबोधन करणे, शिक्षणविषयक कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवणे ही कम्युनिटी रेडिओची मुख्य उद्दिष्टे असतात. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या वेबसाइटवर असणाऱ्या आकडेवारीनुसार भारतात आज १७१ कम्युनिटी रेडिओ आहेत आणि अजून २८२ अर्ज माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या मंजुरीची प्रतीक्षा करत आहेत. चालू १७१ पैकी तब्बल २७ कम्युनिटी रेडिओ एकटय़ा तामिळनाडूमध्ये आहेत. कर्नाटकात २२, तर महाराष्ट्रात १८ कम्युनिटी रेडिओ आहेत. सामाजिक संस्था-संघटनांनी ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून भरीव कामगिरी केलेली आहे. एक कम्युनिटी रेडिओ केंद्र उभारण्यासाठी तंत्रज्ञानाच्या दर्जानुसार कमीत कमी तीन लाख रुपये, तर जास्तीत जास्त २० लाख रुपये इतकाच खर्च येतो. इतर प्रसार माध्यमे बघता कम्युनिटी रेडिओसाठीचा हा खर्च नगण्य आहे. आजमितीला सुमारे १९० समूह रेडिओ (कम्युनिटी) केंद्रे देशात चालतात. त्याच्या दुप्पट मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. मूळ उद्देश लोकांना शिक्षण, त्यांच्या अन्य समस्या, त्यावर उपाय याची चर्चा करण्यासाठी व्यासपीठ मिळवून देणे हा आहे. म्हणजे उदा. तालुक्यातल्या एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी चालणाऱ्या केंद्रातून शेतकऱ्यांना वेळोवेळी माहिती आणि अन्य मार्गदर्शन होऊ शकते, अनुभवकथन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, मुलाखती आणि शेतावर जाऊन प्रशिक्षण घेतले जाते. शेतकरी अश्या कम्युनिटी रेडिओचे सभासदत्व घेतात. पन्नास टक्के कार्यक्रम वर्गासाठी प्रसारित केले तर उरलेला वेळ उच्च शिक्षण वा अन्य सामाजिक विषयावर आधारित प्रसारणास परवानगी असते.
कम्युनिटी रेडिओ केंद्रे कुणाला सुरू करता येतात ?
शैक्षणिक आणि सामाजिक संस्था कम्युनिटी रेडिओ सुरू करायला दूरसंचार मंत्रालयाकडे अर्ज करू शकतात. त्यांच्या तांत्रिक आणि आर्थिक क्षमतेनुसार आणि मूळ उद्देश जे प्रामाणिकपणे पूर्ण करतील अश्या संस्थाना परवानगी मिळते. शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, कृषी वैज्ञानिक केंद्र, एनजीओ हे सर्व अशी केंद्रे सुरू करू शकतात. देशातली अनेक विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, तसेच माउंट अबू इथली संस्था, किंवा अनेक एनजीओज असे रेडिओ चालवतात. पण साधारण चारेक तास प्रसारण होत असल्याने कित्येकांना ते ठाऊकच नसतात.
थोडंसंच तांत्रिक:
नेहेमीच्या एफएम रेडिओप्रमाणेच ट्रांसमीटर आणि ध्वनीमुद्रणाची आणि संकलनाची किमान सुविधा, इतक्यावर कम्युनिटी रेडिओ सुरू होऊ शकतो. केंद्र सुरू करणे एकवेळ सोपे, पण त्याला सतत खाऊ द्यावा लागतो तो कसा मिळवणार? म्हणजेच उद्देश जरी प्रामाणिक असला, तरी इतके तास - म्हणजे समजा रोज सहा ते आठ तास लावायला कार्यक्रम तयार हवेत! अशी कित्येक तासांची ध्वनीमुद्रित कार्यक्रमांची पेढी (बँक) आधीच तयार असावी लागते. त्याशिवाय अशाच अन्य केंद्रांशी समझोता करून कार्यक्रमांची देवाणघेवाण होऊ शकते.
एफएम रेडिओ 'लाईन ऑफ साईट' चालत असल्याने प्रक्षेपकाच्या शक्तीनुसार सुमारे पन्नास किमीपर्यंत ऐकता येऊ शकतो. एफएम बॅण्डमध्ये म्हणजेच ८८ ते १०८ मेगाहर्टझ फ्रिक्वेंसी दरम्यान एक फ्रिक्वेन्सी यां रेडिओना वापरायला मिळते.
सध्या फक्त शंभर वॅट प्रक्षेपक वापरायला परवानगी दिलीय. दुर्गम भागात २५० वॅट. त्यामुळे आठ दहा किलोमीटर्स पर्यंत हे कार्यक्रम ऐकू येतात. व्यापारी तत्वावर चालणाऱ्या एफएम वाहिन्यांच्या किलोवॅट क्षमतेच्या तुलनेत ही शक्ती नगण्य आहे. पण सरकारचे म्हणणे असे की हा मर्यादित कम्युनिटीपुरताच रेडिओ असल्याने हवी कशाला जास्त पावर? त्यांच्याच काही संचालकांनी एफएम ऐवजी ए एम प्रकारच्या प्रसारणाची परवानगी मागितली आहे. त्यामुळे तितक्याच किमतीत जास्त दूरवर प्रसारण ऐकू येईल असे त्याना वाटते. सरकारी पातळीवर परवानगी देताना या रेडिओच्या सामाजिक उपयुक्ततेचा निकष मोजला जातो.
मर्यादा अन आव्हाने :
कम्युनिटी रेडिओचा मूळ उद्देश प्रबोधन आहे- मनोरंजन नाही. तसेच कॉपीराईटमुक्त गाणीच वाजवायला परवानगी असते. जाहिराती घेता येत नाहीत अशी अनेक बंधने असल्याने चालवणाऱ्या समूहावर मर्यादा येतात. एनजीओ एकवेळ पैसे उभारू शकतात पण शैक्षणिक संस्थाना हे कठीण जाते. साहजिकच राजकीय व्यक्ती त्यांच्या संस्था पुढे करून आपला कार्यक्रम पुढे ढकलतात. सुरुवातीचा पाचदहा लाखांचा खर्च हा कळीचा मुद्दा आहे. तळे राखील तो पाणी चाखणार! त्यातून स्वतःची प्रसिद्धी, जाहिराती घेणे, कॉपीराईट कार्यक्रमांचे प्रसारण वगैरे होत असते. व्यावसायिक वाहिन्या यावर लक्ष्य ठेवून असतात. त्यांचा महसूल बुडतो. त्यांनी वार्षिक एक ते दीड कोटींना हक्क विकत घेतलेले असतात. त्यांच्या तक्रारीनुसार नियमबाह्य वर्तणूक आढळल्यास अशी केंद्रे सरकारने बंदही केली आहेत.
आता इंटरनेट रेडिओच्या जमान्यात असले फ्री टू एअर समुदाय रेडिओ कालबाह्य होतीलच. खरं तर त्यांनी ऍप्स तयार करून मोबाईलवर ऐकता येतील असे कार्यक्रम प्रसारित करायला हवेत. अशा परिस्थितीत कम्युनिटी रेडिओचा मूळ उद्देश साध्य होणे कठीण आहे.
कम्युनिटी रेडिओ मुळे स्थानिक राजकीय पक्ष, राजकीय नेते, फारसे पैसे नसलेल्या राजकीय संघटना या सगळ्यांना बळ मिळेल; पण यातली मुख्य अडचण अशी की, माहिती प्रसारण मंत्रालयाने आपल्या धोरणात्मक नियमावलीमध्ये राजकीय पक्ष किंवा राजकीय पक्षाशी संबंधित संस्था संघटना यांना कम्युनिटी रेडिओ सुरू करण्यास मनाई केली आहे. लोकशाही देशात राजकारण नको, असं म्हणणं हा शुद्ध गाढवपणा आहे. उलट लोकशाही देशात राजकारणात लोक जितका जास्त रस घेतील तितकी लोकशाही बळकट होत जाते. कम्युनिटी रेडिओचे माध्यम राजकीय पक्षांसाठी खुले केले पाहिजे. खुल्या राजकीय स्पर्धेला वाव देण्यासाठी समान संधींची निर्मिती ही कम्युनिटी रेडिओसारख्या सर्वसामान्य प्रसार माध्यमांना मोकळे केल्याने होऊ शकते. आज काही प्रमाणात सोशल मीडियाने जे कार्य केले आहे ते अधिक व्यापक प्रमाणात करण्यासाठी, सोशल मीडियापासून मैलोन्मैल दूर असणाऱ्या गरीब, शेतकरी, आदिवासी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कम्युनिटी रेडिओ राजकीय पक्षांना खुले करणे, हा एक प्रभावी मार्ग ठरेल. राजकीय पक्षाचे मुखपत्र असू शकते, तर अधिकृत आकाशवाणी का असू नये? केवळ एवढाच कम्युनिटी रेडिओचा उपयोग आहे असं नाही. स्थानिक निवडणुकांमध्ये कम्युनिटी रेडिओचा प्रचंड प्रभाव दिसून येईल. लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात हे रेडिओ मोलाचं कार्य बजावतील. कम्युनिटी रेडिओच्या लहरींना अवकाशात संचार करू द्या. व रेडिओ लहरींना आपलेसे करू या! पुण्यात रेडिओ एफटीआयआय' चालू आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
महिलांची छेडछाड व वाढत्या गुन्हेगारीला आळा…कमकुवत कायदा ….त्यातील पळवाटा…न्याय मिळण्यास होणारी दिरंगाई …कायदा सुव्यवस्थेसाठी कडक कायदा करण्याची गरज… त्यासाठी उपायात्मक सूचना.
रविवारी अचानक आलेल्या पावसाने सगळ्यांची तारांबळ उडवून दिली आणि निसर्ग किती ग्रेट आहे हे कळले. अशाच एका मनातल्या मोरापिसाचे गाणे..!!
हेमांडपंती देवालय म्हटले की ते अगदी साधे, लहानसे, आणि ओबडधोबड बांधणीचे असते. असा सर्वसाधारणपणे समज आहे. परंतु सिन्नर किंवा अंबरनाथचे भरीव मंदिर पाहिल्यावर भ्रमनिवास व्हायला वेळ लागणार नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti