(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • वाक्यात स्वल्पविरामाचा नक्की उपयोग काय?

    एकदा ना. सी. फडके प्र. के.अत्रेंना म्हणाले, “वाक्यात स्वल्पविरामाचा नक्की उपयोग काय?”

    अत्रे म्हणाले, ” योग्य वेळ आली की मी ते तुम्हाला सांगीन.”

  • कविता राऊतची सावरपाडा एक्स्प्रेस

    कविता राऊत ज्या स्पर्धेत उतरते त्यात पदक कमावल्याशिवाय थांबत नाही, असा तिचा लौकिक आहे.
    यश म्हणजे जीवतोड मेहनत करावी लागणार, हे इतर सगळ्याच स्पर्धकांना न सांगताही माहीत असतं; पण तिचं आजचं यश हे असं सहजासहजी तिच्या पदरी पडलेलं नाही; तर तिनं शब्दशः घाम, रक्त आणि अश्रू गाळून ते कमावलेलं आहे.

    नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील एक आदिवासी पाडा... पाचशे वस्तीचं लहानसं गाव. रस्ते, वीज आणि पाणी या कशाशीही संबंध नाही. शाळा जेमतेम चौथीपर्यंत. असं जंगलातल्या कुशीतलं सावरपाडा. याच गावावरून कवितालाही नाव पडलं "सावरपाडा एक्‍स्प्रेस'.

    कविताचं सगळं बालपण याच सावरपाडामध्ये गेलं. वडील फॉरेस्टमध्ये नोकरीला होते; पण सावरपाड्यातल्या इतर मुलींप्रमाणेच तिचंही आयुष्य चालू होतं. रोजच 15-20 मैलांची पायपीट. सावरपाडामध्ये चौथीनंतरच्या शिक्षणाची सोय नव्हती; म्हणून मग तिच्या वडिलांनी तिला ठाणापाडा इथल्या आश्रमशाळेत घातलं. सावरपाडापेक्षाही आश्रमशाळेतले दिवस कठीण होते. ठाणापाडातही पाण्याची वानवाच होती. प्रत्येक मुलीला स्वतःच्या पाण्याची सोय स्वतःच करावी लागत असे. त्यामुळे सावरपाडातली पायपीट ठाणापाडामध्यही तशीच सुरू होती. ठाणापाड्याहून मग कविता हरसूलच्या केबीएच शाळेत शिकायला गेली. चौथीत असताना तिने पहिल्यांदा धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला आणि त्यानंतर आजतागायत तिने कधीच मागे वळून बघितलेले नाही.
    हरसूलच्या शाळेत असताना कविता विविध स्पर्धांमध्ये भाग घेत होती, बक्षीसंही मिळवत होती; पण शास्त्रोक्त पद्धतीने धावणं तिला माहीत नव्हतं. लहानपणापासून केलेल्या कष्टामुळे तिचं शरीर काटक बनलेलं होतं. मैलोन्‌ मैल पाण्यासाठी ये-जा करण्यामुळे तिचा स्टॅमिना तुफान होता आणि त्याच बळावर ती धावत होती. याचदरम्यान, विश्‍व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते डॉ. पिसोळकर यांनी शालेय राज्य स्पर्धेच्या तीन दिवस आधी "साई'चे (स्पोर्टस ऍथॉरिटी ऑफ इंडिया) प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्याकडे तिला आणलं. विजेंद्र सिंग यांच्याकडे कविता आली आणि तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. धावणं ही फक्त आवड न राहता त्यातच करिअर करता येऊ शकतं, हा विचार कवितामध्ये रुजला.

    कविता सांगते, ""आदिवासी मुलांमध्ये टॅलेंट ठासून भरलेलं आहे. फक्त त्यांना योग्य ती संधी मिळायला हवी. या मुलांमध्ये नैसर्गिकपणे असणाऱ्या अफाट ऊर्जेचा वापर योग्य पद्धतीने व्हायला हवा. तसं झालं तर सगळ्याच क्षेत्रांत ही मुलं नक्कीच उत्तम कामगिरी करून दाखवू शकतील.''
    कविता राऊत हे एक उदाहरण आहे, माणसातल्या जिद्दीचं... चिकाटीचं!

  • फोर्टमध्ये फिरताना – भाग २

    कला, वास्तुशास्त्र, ऐतिहासिक वारसा याचा त्रिवेणी संगम असलेला हा फोर्टचा भाग म्हणजे मुंबईचं सौंदर्य. इथला अनुभव घेण्यासाठी मात्र इथे चालतच जायला हवं. “फोर्ट” हे भारदस्त नामाभिधान बाळगणार्‍या या भागात धोबीतलाव ते कुलाबापर्यंतचा परिसर येतो.

  • पैसा

    पैसा म्हणजे देव नाही

  • महिंद्र साउथ आफ्रिका

    UB group मधील नोकरीचे "बारा" वाजायला लागल्यावर, नवी नोकरी शोधणे क्रमप्राप्त होते. वास्तविक, या नोकरीत स्थिरस्थावर व्हायची इच्छा होती पण प्रारब्ध वेगळेच होते. Standerton हे गाव, म्हणावे अशा अटकर बांध्याचे आहे. आजूबाजूला कुठलेच शहर नजरेच्या टप्प्यात नाही. जुन, जुलै महिन्यात हाडे गारठवणारी थंडी असल्याने, लोकवस्ती तशी विरळ!! सुदैवाने, माझ्याच ओळखीत, जोहान्सबर्ग इथे एका कंपनीत, नोकरी संदर्भात मुलाखत झाली आणि तिथे नोकरी पक्की झाली. तेंव्हा,मनात विचार केला, जर का ही नोकरी स्वीकारली तर आपले भारतात जाणे आणखी एक वर्ष तरी पुढे जाईल. म्हणून मग लगेच मुंबईचे तिकीट काढले आणि मुंबईत महिना काढावा, म्हणून निघालो. नव्या नोकरीला होकार दिला होता पण त्यांना, जानेवारीत join करण्याचा वायदा केला आणि मुंबईच्या विमानात पाउल ठेवले. हातात नोकरी असली म्हणजे, तुमच्या वागण्या,बोलण्यात आत्मविश्वास येतो आणि एकूणच सगळे व्यवस्थित होत आहे, असे वाटत रहाते. एव्हाना, विमान प्रवासात वेळ कसा घालवायचा, याचे पक्के गणित मनाशी केलेले असल्याने, विमानात बसलो आणि वाचायला पुस्तक काढले. अचानक मनात विचार आला, मुंबईत जात आहोत तर महिंद्र कंपनीत, आपला खुंटा हलवून बघायचा!! महिंद्र कंपनीने, साऊथ आफ्रिकेत, नव्यानेच व्यवसाय सुरु केला होता आणि तिथे काही संधी मिळते का? अशी चाचपणी करायचे ठरविले.

    सुदैवाने, एक, दोन मित्रांच्या ओळखी निघाल्या आणि त्या जोरावर, वरळी इथल्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये, P.N.Shah, या माणसाला भेटायला गेलो. सुदैवाने, लगेच भेट मिळाली आणि वेगळे सुदैव म्हणजे, त्याच सुमारास, साऊथ आफ्रिकेतील, १]विजय नाक्रा, २] हेतल शाह, मुंबईला येणार आहेत, तेंव्हा त्यांच्याशीच पुढील मीटिंग ठरवली. आणि पुढील आठवड्यात, भेट होऊन, नोकरीचे पक्के केले. इतक्या झटापट सगळे झाले की मलाच आश्चर्य वाटले. प्रिटोरिया इथे कंपनीचे मुख्य ऑफिस असल्याने, परत शहरात येण्याचा आनंद काही वेगळाच!! सेंच्युरीयन भागात, कंपनीचे ऑफिस - इथे क्रिकेटचे जगप्रसिद्ध स्टेडीयम आहे. हेतलने, मला भारतात फोन करून, कंपनीत कशी रुजू होणार आहेस, हे विचारले आणि माझी, पुन्हा परत जाण्याची लगबग सुरु झाली.
    पोहोचलो, त्याच दिवशी हेतलने ऑफिसला येण्याचे सुचवले. वास्तविक रात्रभराचा प्रवास अंगावर होता पण, नवी नोकरी आणि तो देखील सेंच्युरीयन भागात, हे आकर्षण असल्याने, तशीच गाडी कंपनीच्या ऑफिसमध्ये नेली. इथे एक बरे असते, तुम्ही जर का नेमका पत्ता हातात ठेवला असेल तर या देशात कुठेही जायला प्रश्न उद्भवत नाही. जर का एखादा Off Ram चुकला तर मात्र जबरदस्त हेलपाटा पडतो, कमीतकमी १५, २० कि.मी.चा फटका बसतो!! अतिशय सुंदर ऑफिस, त्यामुळे मनाला देखील उल्हसित झाल्यासारखे वाटले. पहिल्या प्रथम, एक बाब आढळली, ऑफिसमध्ये गोऱ्या लोकांचे प्रमाण लक्षणीय होते आणि सगळीकडे लगबग चालू होती. मी पोहोचलो आणि तिथे श्रीधर नावाच्या माणसाने, माझी ओळख करून घेतली. हा, मुंबईतून, हेड ऑफिसमधून बदलून इथे आला होता. अर्थात, इथे येणाऱ्या सगळ्याच भारतीय कंपन्या, आपल्या ओळखीची माणसे, भारतातून, बोलावून घेतात. Inter Company Transfer, या नावाने, त्यांना व्हिसा देखील लगेच मिळतो. त्यावेळी, आमच्या ऑफिसमध्ये, विजय नाक्रा, हेतल शाह, विजय देसाई, महेंद्र भामरे आणि श्रीधर, हे भारतातून इथे आले होते. (आता यापैकी एकही नाही!!)
    आता इथे ऑफिस म्हटल्यावर आसपास घर शोधणे गरजेचे (तोपर्यंत, मी "लोडीयम" इथे एका मित्राच्या घरात रहात होतो) आणि सुदैवाने लगेच "एको पार्क" या अत्यंत प्रशस्त आणि अवाढव्य संकुलात, मला एक जागा मिळाली. हे संकुल मात्र खरोखरच अवाढव्य आहे. इतकी वर्षे मी देशात काढली पण, मला इतके सुंदर घर आणि जागा, यापूर्वी आणि नंतर देखील मिळाली नाही!! संकुलात, ४ क्लब्ज, ५ स्विमिंग पूल, २ गोल्फ मैदाने आणि अनेक गोष्टी होत्या, जेणेकरून, संकुलाच्या बाहेर जायची फारशी गरज भासू नये.
    पहिल्याच दिवशी, नेहमीप्रमाणे ओळख परेड झाली. ऑफिसमध्ये गोऱ्या लोकांचे लक्षणीय प्रमाण होते. अर्थात, एव्हाना, गोऱ्या लोकांच्या कामाची मला सवय झाली होती. बरेचवेळा तर त्यांच्या बोलण्याच्या धर्तीवर माझे इंग्रजी बोलणे व्हायला लागले होते. हे तर कधी ना कधीतरी होणारच होते म्हणा. सतत, त्या लोकांच्या सहवासात राहिल्यावर कुठला न कुठला तरी गुण, नकळत आत्मसात केला जातो, इतकेच नव्हे तर आफ्रिकान्स भाषा देखील काही प्रमाणात समजायला आणि काहीवेळा बोलण्याच्या ओघात, तोंडातून बाहेर पडायला लागली. आफ्रिकान्स भाषा म्हणजे जुनी डच भाषा!! इथे फार पूर्वीपासून, डच आणि ब्रिटीश लोकांचे वर्चस्व होते. पुढे ब्रिटिशांनी युद्धात, डचांचा पराभव करून, सगळ्या देशावर स्वामित्व मिळवले. तरी देखील, आजही इथे इंग्रजी भाषेच्या जोडीने, आफ्रिकान्स भाषा बोलली जाते. आता तर राष्ट्राची अधिकृत भाषा म्हणून मान्य केली आहे. भाषेचा टोन बघता, जर का बारकाईने ऐकली नाही तर इंग्रजी आणि आफ्रिकान्स भाषेच्या उच्चारात फारसा फरक नाही - "ख" या व्यंजनाचा आफ्रिकान्स भाषेत भरपूर वापर केला जातो. असो!!
    जेम्स,वेंडी, सुझन, लिझा, वेडबर्न इत्यादी अनेक माणसे, दीर्घ काळ माझ्या संपर्कात होती, जेम्स आणि वेंडी, तर अजूनही आहेत. गोऱ्या लोकांचे प्राबल्य म्हटल्यावर, एक बाब अधोरेखित झाली, इथे कामाच्या बाबतीत टंगळ मंगळ नसणार आणि तो विश्वास इथे नेहमीच सार्थ ठरला. अर्थात, एक बाब अजूनही अदृश्य स्वरूपात वावरत असते. गोऱ्या लोकांना, आपल्या कातडीचा प्रचंड, अगदी घमेंड म्हणावी इतका पराकोटीचा अभिमान असतो. मला एकूणच बहुतांशी गोरे लोकं भेटली, त्यांनी अगदी न चुकता, माझा विश्वास सार्थ ठरवला!! एका दृष्टीने विचार केला तर, कामाच्या बाबतीत, चोख काम करण्यात, गोरा समाज, अगदी डोळे मिटून विश्वास ठेवण्या लायकीचा म्हणावा लागेल तर काळा समाज, अपवाद वगळता, अत्यंत कामचुकार!! वास्तविक, आता साऊथ आफ्रिकेत, कायद्याने, वर्णभेद नाहीसा केला आहे पण, तरीही समाजात एक अदृष्य रेघ आहे, तिथे हा फरक जाणवतो. किंबहुना असे देखील म्हणता येईल, अजूनही काळ्या लोकांचा समाज, वर्णभेदाच्या जोखडाखालून मोकळा झालेला नाही!! अर्थात, ही मानसिक गुलामगिरी आहे आणि याचे कारण, वर्षानुवर्षाचे झालेले संस्कार!!
    खरतर,राष्ट्रीय मंत्रिमंडळात, काळ्या लोकांचे प्रमाण लक्षणीय आहे आणि त्यांना आता पुरेसे अधिकार देखील प्राप्त झालेत. पण, ही सुधारणा फार वरवरची आहे. अजूनही इथे मानसिक गुलामगिरी चालूच आहे आणि गंमतीचा भाग म्हणजे, याला बहुतांशी, काळा समाज(च) कारणीभूत आहे. मी, पूर्वी लागोस - नायजेरिया मध्ये दोन वर्षे काढली आणि ऑफिस कामासाठी, काळा माणूस किती "उपयुक्त" आहे, याचा पुरेपूर अनुभव घेतला आहे. अर्थात, नायजेरिया देशातील काळा माणूस आणि साऊथ आफ्रिकेतील काळा माणूस, यात सुतभर देखील फरक नाही. कामाबाबत तसाच उदासवाणा दृष्टीकोन, फटाफट पैसे आणि ते देखील शक्यतो विनासायास पैसे कमावण्याची जबरदस्त इच्छा आणि त्या इच्छेपोटी, कुठल्याही थराला जायची तयारी!! शारीरिक काम जबरदस्त ताकदीने रेटून नेतील पण, बौद्धिक कामाचा प्रश्न आला, की शक्यतो पाय मागे!!
    वास्तविक, आता इथे काळ्या समाजातील लोकांसाठी असंख्य सुविधा आहेत, आर्थिक, सामाजिक इत्यादी सुविधा भरपूर आहेत पण मुळात बौद्धिक कष्ट घेण्याचीच वृत्ती कमी असल्याने, हा समाज, जितका पुढे यायला हवा त्याप्रमाणात, आजही मागासलेला आहे. मी हे मत अतिशय विचारपूर्वक मांडत आहे. आज, इथल्या बँकेत वरिष्ठ पदावर बरेच काळे अधिकारी दिसतात तसेच प्रचंड मोठ्या कंपन्यांच्या वरिष्ठ पदावर देखील काळ्या वर्णाची माणसे दिसतात पण, एकूण समाजाच्या आकारमानाने, हे प्रमाण आजही नगण्य आहे, हे जळजळीत वास्तव आहे. आता, याबाबतीत असे देखील म्हणता येईल, यांना स्वातंत्र्य मिळून, उणीपुरी २२, २३ वर्षेच झाली आहेत (इथली पहिली लोकशाही निवडणूक १९९२ साली झाली) आणि गुलामगिरीचे जिणे, त्यांनी शतकानुशतके झेललेले आहे.ते मानसिक जोखड इतक्या सहजपणे, भिरकावून देणे अवघड आहे. हा मुद्दा जरी मान्य केला तरी, आता स्वातंत्र्यानंतरची दुसरी पिढी इथे आली आहे आणि हे ध्यानात घेता, सुधारणांचा वेग केवळ नगण्य आहे. किंबहुना, काळ्या धंद्यात, हा समाज नको तितका गुंतलेला आहे आणि हा मुद्दा निश्चित चिंताजनक आहे.
    एक सुंदर प्रसंग - माझ्याच बाजूला रेमंड नावाचा एक काळा तरुण कामाला होता. इतर काळ्यांच्या मानाने शिकलेला आणि कामाची आवड असलेला. आता, बाजूला बसत होता, म्हटल्यावर गप्पा मारणे साहजिक होते आणि तशा आमच्या वेगवेगळ्या विषयावर गप्पा व्हायच्या. एकदा, कामाच्या निमित्ताने तो ऑफिसमध्ये फिरत असताना, आमचा C.O.O. वेडबर्नच्या खांद्याला किंचितसा धक्का लागला!! आता असे धक्के, ऑफिसमध्ये लागणे, सहज शक्य असते. इथे एक गोची झाली, वेडबर्नने, धक्का लागल्याबद्दल, रेमंडची माफी मागितली नाही!! झाले!! रेमंडला हा अपमान वाटला आणि "मी केवळ काळा आहे, म्हणून मला अशी वागणूक मिळते" असे अधिकृत पत्र लिहिले आणि जर का "न्याय" मिअल नाही तर पोलिस तक्रार करण्यात येईल, अशी धमकी देखील मांडली होती. या प्रसंगाला, साक्षीदार म्हणून हेतल आणि माझे नाव, त्यात घेतले होते!! वास्तविक, प्रसंग किती किरकोळ होता पण, रेमंडच्या डोक्यात काय भूत शिरले, समजले नाही. अखेर, त्याच्या "बाबा पुता" करून, प्रकरणावर पडदा पाडला. परिणाम एकच, दुसऱ्या दिवसापासून, त्याला जवळपास, "वाळीत" टाकण्यात आले!! कुणीही त्याच्याशी बोलायला देखील तयार नाही!!
    असो, इथे मला "सेटल" होणे अजिबात अवघड गेले नाही. दुसरा भाग म्हणजे, इतकी वर्षे, मी इथल्या मित्रांशी शक्यतो, फोनवरून संपर्क साधित असे आणि आता, प्रत्यक्ष भेटीगाठी सहज शक्य झाल्या. यात, मकरंद, विनय हे माझे जुने मित्र, माझ्या नेहमीच्या भेटीगाठीच्या संपर्कात आले. मकरंद इथे १९९२ पासून असल्याने, त्याचे मित्रवर्तुळ मोठे आणि त्याचा मला बराच फायदा झाला. दर वीक एंड एकत्र घालवायचा असे ठरले आणि त्याप्रमाणे, आम्हाच्या भेटी सुरु झाल्या. प्रिटोरिया आणि जोहान्सबर्ग, यात केवळ ६० कि.मी. इतकेच अंतर,त्यामुळे जोहान्सबर्ग मधील मित्रांशी संपर्क ठेवणे खूपच सुलभ झाले. याच सुमारास, मी दुसरी गाडी घेण्याचे ठरवले आणि परत डेव्हिडच्या जावयाशी संपर्क साधला. यावेळेस, त्याने मला VW कंपनीची "पोलो १.६" ही गाडी मिळवून दिली. एव्हाना, या देशात बऱ्याच गाड्या फिरवून झाल्या, पण या गाडीला तोड नाही!! जर्मन टेक्नोलॉजी म्हणजे काय, याचे ही गाडी म्हणजे मूर्तिमंत उदाहरण. लाल रंगाची गाडी म्हणजे कुणीही प्रेमात पडावे, इतकी सुरेख गाडी होती. पुढे, मी देखील,ही गाडी मनसोक्त फिरवली.
    याच वास्तव्यात, इथे T20 विश्वकप स्पर्धा सुरु झाली आणि आमच्या मित्रांच्या चमूने, ही स्पर्धा मनसोक्त उपभोगली. मकरंदची, त्यावेळच्या लालचंद राजपूत बरोबर मैत्रीपूर्ण संबंध होते आणि त्यामुळे, त्याच्याकडून आम्हाला, free passes मिळायचे. इथल्या स्टेडीयम मध्ये जावे आणि भारताने, अजिंक्यपद मिळवावे, असली वेडी आशा इथे पूर्ण झाली. अंतिम सामना - भारत/पाकिस्तान यांच्यात झाला आणि अति अतितटीची झुंज, अखेर भारताने जिंकली!! त्यावेळचा स्टेडीयम मधील आरडा-ओरडा, बक्षीस समारंभ, हातात असलेल्या बियरची अवर्णनीय चव, या आठवणी मनावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. विश्वविजयाची चव, आम्हा मित्रांच्या चमूने, स्टेडीयम शेजारील पब मध्ये, रात्रभर जागून साजरा केला. केवळ अविश्वसनीय विजय.
    ऑफिसमध्ये त्यामानाने लवकर स्थिरस्थावर झालो. आमच्या कंपनीचा व्यवसाय, भारतातून "रेडीमेड" गाड्या मागवणे - सोबत स्पेअर पार्टस देखील आणि त्यांचे देशभर वितरण करणे. खरेतर इथे इतक्या प्रकारच्या गाड्या उपलब्ध आहेत, तेंव्हा महिंद्र कंपनीने म्हटले तर धाडस केले. अर्थात, गाड्यांची किंमत, हा वाजवी मुद्दा असल्याने, आमचा भर त्यावरच अधिक. या ऑफिसची स्वत:ची अशी कार्यशैली होती आणि ती मी लगेच अंगवळणी करून घेतली. आमच्या ऑफिसमध्ये दर महिन्याला, शेवटच्या शुक्रवारी, पार्टी असायची आणि ती शक्यतो ऑफिसमध्येच असायची. त्या दिवशी ऑफिस दुपारी ४. वाजता बंद. गोरा माणूस, काय सज्जड ड्रिंक्स घेतो, याचा अप्रतिम नमुना या पार्टीत सतत मिळत गेला. ऑफिसमधील मुली देखील ड्रिंक्स घेत असत. अर्थात, प्रमाण हात राखून.
    त्यावर्षी, कंपनीने, राष्ट्रीय पातळीवर, सगळ्या एजंट्सची वार्षिक बैठक, दोन दिवसांची ठरवली. फायनान्स मधून, मी आणि हेतल हजार राहणार होतो. बैठकीचा इतका तपशीलवार विचार आणि नोंदी बघून, आपल्याला "प्रोफेशनल" व्हायला किती अवकाश आहे, याची नव्याने जाणीव झाली. बैठकीच्या प्रत्येक मिनिटांचा चोख हिशेब, आणि त्याबर सगळे नेमकेपणी घडवून आणण्याची तोशीस. चहापान, दुपारचे जेवण, संध्याकाळी, सत्रे कधी आणि कशी संपतील, याचा अचूक आराखडा, बैठक व्हायच्या आधी, आठवडाभर आमच्या हातात. कुठेही कसलाही हलगर्जीपणा नाही की गोंधळ नाही. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील अत्यंत मुद्देसूद मिळायची. कणभर देखील फापट पसारा नाही. एकदा का संध्याकाळ झाली, म्हणजे गोरा माणूस रंगायला लागतो. त्यावेळचा गोरा माणूस, हा दिवसभराच्या कार्यक्रमात दिसणाऱ्या माणसापेक्षा संपूर्ण वेगळा.
    एक गंमत. फेब्रुवारी महिना (इथे फायनांशियल वर्ष फेब्रुवारी महिना असतो) जवळ आला की, अकाउंटस विभागात, वार्षिक गडबड सुरु होणे, क्रमप्राप्त असते. आपल्या भारतीय पद्धतीप्रमाणे, आता रोज, ऑफिसमध्ये उशिरा बसणे, नेहमीचे असते. एका शुक्रवारी, मी जेम्सला, उशिरा बसण्याची विनंती केली आणि त्याची खरच जरुरी होती. माझे बोलणे ऐकून घेतल्यावर, अत्यंत थंड आवाजात," Anil, I got family at home and it's my family time!! I can't work after office hours!!". ऐकल्यावर, अनिल थंड!! इथे अशी बळजबरी कुणावरही करता येत नाही. ऑफिस वेळेत, काहीही काम सांगा, तिथे कुचराई नाही पण, एकदा का, संध्याकाळचे ४.३० वाजले, म्हणजे मग तिथला गोरा हा स्वतंत्र असतो, कंपनीशी काहीही देणेघेणे नसते!! समजा, उशिरा बसला तर कंपनीवर जणू उपकार केले, याच भावनेने (हे क्वचित घडते) काम करणार आणि त्याचा मोबदला, नेमका वसूल करणार आणि त्याहून महत्वाचे म्हणजे, "मी त्यावेळी उशिरा बसलो होतो", याची तुम्हाला सतत जाणीव करून देणार!!
    समजा, कंपनीचे बाहेरचे काही काम असेल तर, गोरा माणूस, आपली गाडी चुकूनही काढणार नाही. त्यामुळे प्रत्येक कंपनीला, स्वत:च्या अशा वेगळ्या गाड्या ठेवणे भाग असते. उं उलट, काही बँकेची कामे असतील आणि त्या साठी काळा माणूस पाठवला तर, तो काहीही करून, ते काम करून देईल. हा फार मोठा फरक, या दोन समाज प्रवृत्तीत आहे. गोरा माणूस अतिशय materialistic असतो आणि तिथे "माझी कंपनी" असली भावनिक गुंतवणूक अजिबात नसते. कंपनीचे काम, मनापासून करतील पण ती गुंतवणूक, केवळ कंपनी वेळेपुरती. पुढे, माझ्या घरी काय किंवा, इतर गोऱ्या लोकांच्या घरी जाण्याचा प्रसंग आला, प्रत्येकवेळी हाच अनुभव आला.
    याच सुमारास, इथल्या मराठी मंडळ आणि तिथल्या लोकांची ओळख झाली. खरेतर, इथले मराठी मंडळ, हे प्रामुख्याने, जोहान्सबर्ग आणि प्रिटोरिया, या दोन शहरांपुरते आहे. इतर शहरांत, त्यामानाने फारशी भारतीय माणसे आढळत नाहीत. याचे मुख्य कारण, जी माणसे भारतातून इथे येतात, ती प्रामुख्याने, Inter Company Transfer व्हिसावर येतात आणि त्यांची कार्यालये, ही बहुतांशी याच दोन शहरात असतात. मुळात, इथे भारतातून येण्याचे प्रमाण, अगदी २००० सालापर्यंत, जवळपास नगण्य होते. हळूहळू, भारतीय कंपन्यांनी इथे व्यवसाय केंद्रे उघडली, निरनिराळ्या बँकांची ऑफिसेस उघडली आणि इथे भारतीय माणसे यायला लागली. त्यामुळे, तसे म्हटले तर इथले मराठी मंडळ हे तसे नाममात्र(च) आहे (आजही यात फारसा फरक नाही). त्यातही, बहुतेक मराठी माणसांना, इथे आलो म्हणजे आपण युरोप/अमेरिकेत आलो, असेच वाटायला लागते!!
    याचा परिणाम असा झाला, त्यांना मराठी बोलण्याची "लाज" वाटायला लागली!! आपलीच भाषा पण, बोलायला देखील अवघड!! कारण विचारले तर, आमचे इंग्रजी भाषेत शिक्षण झाले, त्यामुळे मराठीशी संपर्क कमी राहिला!! अशीच काहीशी थातूर मातुर कारणे द्यायची. त्यामुळे, मंडळाचे जी काही तुरळक कार्यक्रम व्हायचे, त्यात मंडळाची कार्यकारिणी मंडळी वगळता, इतर लोकांची उपस्थिती नेहमीच तुरळक राहिली!! मी ही तुलना, विशेषत: नायजेरिया - लागोस इथल्या मराठी मंडळाशी केली आहे. मला आजही आश्चर्य वाटत आले आहे, मराठी आपली मातृभाषा आहे, असे असून देखील ती भाषा बोलायला "जड" जाते!! आपल्या भाषेचे संवर्धन आपण करायचे नाही तर कुणी करायचे? इथे, ना कुणाला खेद, ना कुणाला खंत!! मी इथे दोन वर्षे होतो आणि दोन वर्षात इथे काही ठराविक कार्यक्रम झाले आणि एकही कार्यक्रम, अपवाद म्हणून भरपूर गर्दीचा झाला!!
    तसे प्रिटोरिया शहर हे राजधानीचे शहर. इथे पार्लमेंट इमारत आणि सभागृह आहे. वर्णभेदाची चळवळ इथे फोफावली आणि इथेच नेल्सन मंडेलाचा शपथविधी झाला. याच शहरात, मी आयुष्यातील पहिला "सिंफनी ऑर्केस्ट्रा" अनुभवला आणि तो थरार आजही मनावर कोरलेला आहे. इथले म्युझियम बघण्यासारखे आहे, वर्णभेद किती भयानक होता, याची साक्ष इथे बघायला मिळते. परंतु ते प्रसंग अंगावर येतात, ते केप टाऊन इथल्या रॉबेन आयलंड इथल्या तुरुंगात!! तो भाग तर फारच विलक्षण आहे. इतर शहरांप्रमाणे इथे देखील प्रचंड मॉल्स आहेत, ऐषारामी हॉटेल्स आहेत, ऐय्याशी क्लब्ज आहेत. अर्थात हे सगळे पैशाचे खेळ आणि याचबरोबर येणारी असुरक्षितता देखील विपुल आहे. जोहान्सबर्ग आणि प्रिटोरिया, ही दोन्ही शहरे, सुरक्षिततेच्या दृष्टीने भयानक आहेत. केवळ संध्याकाळ उजाडल्यावर नव्हे तर दिवसाढवळ्या देखील,पायी हिंडणे अवघड झाले आहे. एकेकाळी, अमेरिकन कादंबऱ्या मधून,"मगिंग"ची वर्णने वाचली होती,त्याचे तंतोतंत प्रत्यंतर इथे अनुभवायला मिळते.
    आताच अनेक भारतीय वंशाची माणसे बोलायला लागली आहेत, " Racism was okay, just because crime rate was minimal". हे तिथल्या सामाजिक परिस्थितीचे द्योतक आहे. हळूहळू आर्थिक संकटे कोसळायला लागली आहेत आणि सर्वात भयानक म्हणजे आर्थिक विषमतेची दरी वाढत चाललेली आहे. आजही हा देश अप्रतिम सुबत्तेचा आहे, इथे भौतिक सुखाच्या अपरिमित संधी आहेत आणि आयुष्य कसे उपभोगावे, हे इथे समजून घेता येते. प्रश्न असा आहे, हे ऐश्वर्य आणखी किती वर्षे अबाधित राहील?
    -अनिल गोविलकर

  • माझा मित्र

    निसर्ग कविता

  • दादरचा अभूतपूर्व छंदोत्सव !

    १० आणि ११ मार्चला दादरच्या दादर सार्वजनिक वाचनालयातील " छंदोत्सव २०१७ "
    या विविध छंद जोपासणाऱ्यांच्या छंदांच्या प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. होळीच्या सणाची सुट्टी, दुसऱ्या शनिवारची सुट्टी ,उत्कंठा शिगेला पोचलेल्या उत्तरप्रदेश निकालांची घोषणा आणि मुलांच्या परीक्षांचे दिवस यामुळे प्रदर्शनाला कसा प्रतिसाद मिळणार याबद्दल साशंकता होती. पण उ.प्र. च्या निकालांप्रमाणेच या प्रदर्शनाला छंदप्रेमी प्रेक्षकांनी अतिशय अनपेक्षित आणि अभूतपूर्व प्रतिसाद दिला. परीक्षा तोंडावर आलेल्या असूनही, कित्येक पालक आपल्या मुलांना " चांगले काही " पाहायला मिळावे म्हणून आवर्जून घेऊन येत होते.कितीतरी रसिक हे कल्याण, अंबरनाथ,वसई-विरार, पालघर अशा लांबच्या ठिकाणाहूनही आले होते.

    वेगळेच क्रोशाचे काम, फेल्टच्या कापडाच्या कलाकृती,सुसंगत अशा कविता लिहिलेल्या छत्री- बुकमार्क्स- टीशर्ट- पिशव्या-किचेन्स- पिगीबँक अशा वस्तू, कागदाच्या घड्या घालून केलेली फुले आणि विविध वस्तू, ओरिगामी, पार्चमेंट आणि आयरिश फोल्ड यांच्या वापराने बनविलेल्या कलाकृती,नारळ आणि बांबू यांच्या वापरातून बनविलेल्या श्रीकृष्ण मूर्ती- गणपती- दिवे-कलश-अशा कलाकृती,केवळ कागदाच्या जेमतेम पाव सेंटिमीटरच्या विविधरंगी पट्ट्या वापरून केलेली देखणी चित्रे, झाडांची पाने- झावळ्यांच्या पट्ट्या-- हिराच्या काड्या इत्यादींपासून बनविलेल्या पर्यावरण स्नेही वस्तू आणि छोटी खेळणी, कॅनव्हासवर उतरविलेली छायाचित्रे,रद्दी कागदापासून बनविलेले दणकट
    फर्निचर, नैसर्गिक रंगांमधील सुलेखन, वेगळ्या प्रकारच्या भरतकामातून तयार केलेले घड्याळ- कोंबड्याच्या आकाराचा टिकोझी- पर्स- फ्रेम्स- अशा अनेक गोष्टी,करवंटी आणि लाकूड यापासून बनविलेल्या लामणदिवा- मोटारसायकल- पिस्तूल- अशा वस्तू अशा असंख्य कलाकृती प्रदर्शनामध्ये होत्या.

    चित्रविचित्र आकाराचे - खूप जुने आणि नवे- विविध उपयोगाचे पत्ते आणि गंजिफा, विविध मुखवटे,महाराष्ट्रातील सर्व बस सेवेची तिकिटे, नाणी-नोटा- टपाल तिकिटे- प्रथम दिवस आवरणे,सुप्रसिद्ध व्यक्तींच्या सह्या आणि हस्ताक्षरे , जुन्या / नव्या काड्यापेट्यांची लेबल्स यांचे संग्रहही खूप छान होते. कागद कोरून साकारलेला आयफेल टॉवर- २ x २ इंचाचा कॅरम बोर्ड- २ इंचाचा फ्लॉवरपॉट अशा वस्तू सत्तरी
    ओलांडलेल्या चंद्रहास पटवर्धन यांनी बनविल्या होत्या. उपनिषदांचा अभ्यास केलेल्या यास्मिन श्रॉफ या ज्येष्ठ पारसी बाई स्वतः: काढलेल्या पक्ष्यांच्या आणि निसर्ग छायाचित्रांवरून " जगात सर्व गोष्टी शक्य आहेत, कधीही निराश होऊ नका, सकारात्मक विचार करा " असा प्रत्येकाशी व्यक्तीश: बोलून संदेश देत होत्या. मालती मेहेंदळे या सर्वात ज्येष्ठ म्हणजे ८१ वर्षांच्या छंद कलाकारांनी बनविलेली सध्या आणि क्रेप कागदाची फुले शब्दशः: अचंबित करणारी होती. त्यांनी बनविलेली बकुळ, सोनचाफा, जास्वंद, आंबोली,नागचाफा अशी फुले ही कागदाची आहेत यावर विश्वासच बसत नव्हता. त्यांनी बनविलेल्या कागदाच्या जरबेरा फुलांच्या शेजारी खरी जरबेरा फुले ठेवून मी एक छायाचित्र घेतले. यातील खरे कुठले आणि खोटे कुठले हे ओळखणे कठीण होते.

    छंद जोपासला की वय, जात-धर्म, भाषा असे बांध राहतच नाहीत पण खूप सकारात्मक आणि सृजनशील जीवन जगता येते.

    -- मकरंद करंदीकर.

  • पहिले आंतरराष्ट्रीय ऊर्जा संमेलन

    २१ व्या शतकातील दुसर्‍या दशकाच्या शेवटी पृथ्वीवरील पा‌णि, ऊर्जा, जमीन एकू‌णच निसर्गातील पंचमहातत्वाच्या प्रदूष‌णाचा प्रश्न गंभीर होत आहे.एवढंच नव्हे तर पुढील पिढीला देण्यासाठी आपल्याकडे नैसर्गिक संपत्तीचा ठेवा कदाचित उरणार नाही एवढा र्‍हास होत आहे. जमिनीचा वरचा थर तयार हो‌ण्यासाठी किमान ६०० वर्ष इतका वेळ म्ह‌‌णजे जवळ जवळ ६ शतकांचा कालावधी लोटतो. हे एक उदाहर‌ण झालं मात्र यासारखी कितीतरी नैसर्गिक साधन संपत्ती आपण रिसायकल न करता पिढय़ानुपिढय़ा वापरत आहोत, यासाठीच विज्ञानभारती व केंद्रीय ऊर्जा व नवीनकर‌णीय खात्यातर्फे पहिल्या आंतरराष्ट्रीय ऊर्जा संमेलनाचे आयोजन विश्वसरैय्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर येथे आयोजन केले होते.

  • चिरकाल स्मरणात राहणारे बाबूजी

    पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा…. हे शब्द खरे ठरवत, हे गीत ज्या महान गायकाने आपल्या स्वत:च्या आवाजात साऱ्या जगाला ऐकविले आणि या पुढेही ऐकवीत राहणार ते सुधीर फडके तथा बाबूजी आपल्यामधून जाऊन ‘पाच वर्षे झाली तरी सुध्दा त्यांच्या गाण्यांमुळे ते. निघून गेले यावरआपला विश्‍वास बसत नाही.

  • गोष्ट एका रात्रीची – भीमाशंकर ते खांडस

    Bhimashankar-to-khandas-1

    गोष्ट ३-४ वर्षापूर्वीची आहे. एका मोठ्या ग्रुप बरोबर मी या ट्रेकला गेलो होतो. एखाद्या मोठ्या ग्रुप बरोबर ट्रेकिंगला जाताना नेहमीच मी रस्ता पाहून घेण्यासाठी जात असतो. ग्रुपच्या म्हणून अनेक मर्यादा असतात. आपल्याला हवा तसा मनसोक्त वेळ मिळत नाही. हवं तेव्हा, हवं तिथे हवं ते खाता येत नाही. फोटो काढण्यासाठी हवा तेवढा वेळ मिळत नाही. एकच फायदा म्हणजे रस्ता कळतो. असाच हा भीमाशंकर ते खांडस मी ट्रेक केला. ट्रेक भर उन्हाळ्यात होता. आदल्या दिवशी आम्ही भीमाशंकरला मुक्कामी होतो. सकाळी लवकर उठून आम्ही चालायला सुरवात केली होती. आधी एकदा रस्ता चुकलो. मग पुन्हा योग्य रस्त्यावर आलो. मोठे ग्रुप बरोबर असताना असे रस्ते चुकणे योग्य नाही, पण रस्ता चुकला नाही तर ट्रेक पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. या ट्रेकचे दोन रस्ते आहेत असं ऐकतो. एक शिडीची वाट आणि दुसरी गणपती घाटाची वाट. शिडीची वाट अधिक अवघड आहे असं ऐकलय, आम्ही मात्र तुलनेनी कमी कठीण अशा गणपती घाटाच्या वाटेनीच गेलो होतो. पहिला उताराचा एक मोठा टप्पा पार करून आल्यावर थोडा पठाराचा भाग आहे. डोंगरावरून पाहताना तिथे गाव असावं असं वाटत. पण तिथे गेल्यावर असं काही नाही हे लक्षात आलं. सिंहगडावर जाताना अनेक ठिकाणी जसे लिंबू सरबत किंवा ताक विकायला माणसं बसतात, त्यांची ती कच्ची दुकानं कशी असतात तसं एक लाकडी बंधाकाम आम्हाला लागलं. कच्च बांधकाम होतं. फक्त चार खांब, त्याच्यावर तिरके टाकलेले वर काही खांब, आणि त्यांच्यावर झावळ्या. बसायला सुद्धा झाडाचं खोड आडवं टाकून आधार केलेला. जागा छान होती. आम्ही तिथे थांबलो थोडा वेळ थोडी पोटपूजा केली. आणि पुढे निघालो. पण माझ्या डोक्यातला किडा वळवळायला लागला. या ट्रेकच्या आधीच माझा एकट्यानी राजमाचीचा ट्रेक करून झाला होता. राजमाची नंतर ही भीमाशंकरची जागा डोक्यात बसली. ट्रेक यथावकाश पूर्ण झाला. आम्ही पुण्यात आलो.

    आता एखादी ट्रेकिंगची कल्पना डोक्यात शिरली कि ती स्वस्थ बसून देत नाही. एकटं भीमाशंकरला जायचं. आणि आधी गेलो होतो त्याप्रमाणे नियोजन न करता रात्री मुक्कामाला ‘त्या’ ठिकाणी जायचं, आणि सकाळी उठून पुढे खांडसला जायचं!

    मग एक दिवस नक्की केला. आदल्या रात्री घरातले बाकीचे सगळे झोपल्यावर मी माझी बॅग भरली. बॅग म्हणजे काय होतं, खाली अंथरायला एक घोंगडी, एक पांघरायला शाल.. खायचं सामान उद्या घरातून बाहेर पडलो कि घेऊ असं ठरवलं. आणि बॅग घराच्या दरवाज्याजवळ आणून ठेवली. सकाळी लवकर उठलो, लायब्ररीमध्ये जातो असं सांगून सकाळी लवकर बाहेर पडलो. तयार केलेली बॅग उचलून बाहेर पडलो. थेट स्वारगेटला गेलो. तिथे गेल्यावर कळलं थेट भीमाशंकर गाडी दुपारी होती, मी स्वारगेट वर पोहोचलो होतो सकाळचे सातला. थोडी संत्री, अंजीरं, थोड्या काकड्या, गाजरं असं सामान विकत घेतलं. थेट नाही तर गाडी बदलून जावू, असा विचार करून राजगुरुनगरची गाडी मिळाली. तिकडे गेलो. जाताना एसटी पंक्चर झाली. एरवी मी वैतागलो असतो. पण मला वेळ हवा होता. माझं लक्ष भीमाशंकरच्या जंगलात येणाऱ्या रात्रीवर होतं. भीमाशंकरच्या शंकराच्या मंदिरापासून ती जागा तासादीड तासाच्या अंतरावर होती, त्यामुळे भीमाशंकर हुन दुपारी दोन-अडीच पर्यंत निघालो पुढे चालायला तरी चालणार होते. यथावकाश मला राजगुरुनगरला पोहोचायला साडेनऊ झाले. मग मी तिथे पण थोडा टाईमपास केला. तिथून सुद्धा थेट एसटी नव्हतीच. पण मी विचार केला कि भीमाशंकरला जाऊन वेळ घालवावा. मग मी वडाप पकडली, तिने मला अकरापर्यंत भीमाशंकरला पोहोचवलं. अधिक वेळ न घालवता मी थेट मंदिरात गेलो. मी प्रचंड घाबरट आहे. माझा भूत-पिशाच्च वगैरेंवर अजिबात विश्वास नाही, पण त्यांच्या गोष्टी ऐकायला मला आवडतात. त्यामुळे अशा अनेक गोष्टी माझ्या कानावर पडलेल्या. एकांताच्या ठिकाणी त्या नेमक्या आठवतात. त्याच्यावर उपाय म्हणून मग मी गाणी म्हणतो, अथर्वशीर्ष, रामरक्षा म्हणतो वगैरे. पण अजून दिवस सुरु होता, परिसरात माणसांची वरदळ सुरु होती. मी आपला गाभाऱ्यात गेलो. फुलांचा वास त्या गाभाऱ्यात तुंबला होता. मी तिथे प्रार्थना केली, उद्यापर्यंत लक्ष ठेवून असा. बाहेर पडलो गाभाऱ्यातून. वेळ तर भरपूर होता. गुप्त भीमाशंकर पाहून येऊ असा विचार करून तिकडे निघालो. एक सांगायचं राहिलं दिवस अजून उन्हाळ्याचेच होते. पण सगळा परिसर अभयारण्याचा आहे, त्यामुळे कायम हवेत गारवा हा असतोच. गुप्त भीमाशंकरला उन्हाळ्यात पाहण्यासारख काहीच नव्हतं. धबधब्याच कोरडं पात्र. आणि गरम तापलेला काळा दगड. त्यात कातळाच्या सावलीत शंकराची छोटीची पिंड आणि समोर नंदी, नंदी मात्र उन्हात होता. तो परिसर मात्र वर्दळीपासून लांब होता, त्यामुळे शांत होता. माझ्या डोक्यात भुतांच्या गोष्टी नाचू लागल्या. मग मी ठरवून किशोर कुमारची दर्दभरी गाणी जोरात म्हणायला सुरवात केली. अशी तीन-चार गाणी म्हणून झाली. मग गाणीही आठवेनाशी झाली. तोपर्यंत साडेबारा होऊन गेले होते. मग मी एक गाजर एक काकडी खाल्ली. वेळ तर अजून भरपूर होता. मग बसून राहिलो तिथेच. वातावरण शांत होतं. मग मी मोबाईल काढला आणि अण्णांचा वृंदावनी सारंग लावला. डोळे मिटून बसलो. त्यांनतर भुतांच्या गोष्टी पण थांबल्या. आणि एकटं वाटणही बंद झालं. मग तो संपल्यावर उठलो. एक वाजून गेला होता. पुन्हा मुख्य मंदिरापर्यंत आलो. दुपारची गर्दी कमी होती. पुन्हा एकदा गाभाऱ्यात गेलो. पुन्हा तीच प्रार्थना. फक्त गुप्त भीमाशंकर पासून मुख्य मंदिरापर्यंत येताना अभयारण्यात असणाऱ्या प्राण्यांचे माहितीपर बोर्ड लावले आहेत. त्यात अनेक फुलपाखरं, पक्षी, शेकरू मुख्य. मग बाकीचे प्राणी वगैरे होते. त्यात बिबट्या सुद्धा भीमाशंकरच्या अभयारण्यात आहे असं मी वाचलं त्या बोर्डवर मग घाबरलो. माझ्याकडे कोणतही हत्यार नव्हतं. स्व संरक्षणासाठीच कोणतही साधन नव्हतं. आणि मी तर जंगलात राहायचं म्हणत होतो. एकदा विचार केला, कि नको.. आपण इथेच थांबू आणि सकाळी पुढे चालायला सुरवात करू. पण तो विचार किती क्षणभरच टिकला.

    मागच्या वेळी ग्रुप बरोबर आलो होतो तो रस्ता माझ्या लक्षात होता. त्यामुळे न चुकता मी निघालो. मी गेलो होतो तो दिवस मी ठरवून विकेंड निवडला नव्हता किंवा गुरवार सुद्धा नव्हता. मी ठरवून मंगळवार निवडला. सोमवारी सुद्धा शंकराला डिमांड भरपूर. त्यामुळे मला एकटाच कुठे चाललास, एकटं फिरू नये वगैरे उपदेश देणारे कोणी भेटणार नाहीत अशी अपेक्षा ठेऊन मी गीवास निवडला होता. माझ्या नियोजित ठिकाणापर्यंत जाण्यासाठी फक्त उतरावं लागतं. आणि सगळा जंगलाचा प्रदेश असल्यामुळे कडक ऊन असून सुद्धा त्याचा त्रास असा होत नव्हता. मी अगदी आरामात चालत होतो. सूर्यास्त मला त्या स्पॉट वरून बघायचा होता. म्हणून कोणतीही गडबड न करता मी चाललो होतो. फोटो काढत होतो. जमेल तिथे जंगलाचा व्हिडीओ सुद्धा बनवत होतो. मी काही जंगलाचा अभ्यासक नाही, त्यामुळे मला पक्ष्यांची किंवा फुलपाखरांची विशिष्ट नावं काही माहिती नव्हती. पण मी असंख्य पक्षी पहिले निरनिराळ्या रंगांचे आकाराचे. फुलपाखरंही भरपूर पहिली. अगणित प्रकारची झाडं.. एकटं असलं म्हणजे हे बघता येतं. ग्रुप असेल तर ट्रेक वेळेत पूर्ण करण्यावरच सगळा भर असतो. असं भरपूर बघत मी चाललो होतो. माझ्या इतक लक्षात होतं कि पहिल्या उताराचा टप्पा पार झाला कि थोडी सपाटीची जागा आहे, कि तिथेच लगेच माझा नियोजित स्पॉट.. पण उताराचा पहिला टप्पा संपवून मी सपाटीला आलो तरी ती जागा दिसेना. रस्ता सुद्धा मळलेला वाटत नव्हता. किंबहुना मी मागे पाहिलं तर त्याला रस्ता सुद्धा म्हणणं अवघड होता. मग मात्र माझी तंतरली. तीन-सव्वातीन होऊन गेलेलं होते. आणि आताचा मुख्य प्रश्न होता रस्ता शोधायचा. अशा वेळी सगळ्यात मोठं चॅलेंज असतं ‘पॅनिक’ न होण्याचं. पण मी झालो. लगेच अस्वस्थ झालो. ‘पॅनिक’ झाल्यामुळे दिशा सुद्धा कळेनाश्या होतात. तसचं माझही झालं.

    पण माझ्या हे लक्षात आलं कि पॅनिक न होणं महत्वाच. all is well वाला प्रकार स्वतःला समजावून सांगितला. दिशांचा अंदाज घेतला. आणि त्या लक्षात आल्या. आपल्या जायचं कुठे ‘खांडस’ला ते भीमाशंकरच्या नेमक्या कोणत्या दिशेला आहे हे आठवलं आणि चालायला लागलो. चालता चालता माझं मुक्कामाच प्लॅनिंग सुद्धा बदलून टाकलं. चालण्याचा वेगही वाढवला. तसा अर्धा तास चाललो आणि माझी नियोजित जागा समोर आली. भीमाशंकरच्या डोंगरावरून जिथे उतरायचं त्याच्या मागे मी उतरलो चुकून, म्हणून सगळी गडबड झाली.. मला आनंदही झाला आणि टेन्शनसुद्धा. जशी गेल्यावेळी मी ती जागा पहिली होती ती आजही तशीच होती. आजूबाजूची झुडपं वाढलेली. पण माणसाचा वावर तिथे होता एवढं काळात होतं. कारण ती जागा स्वच्छ होती. कचरा किंवा पाचोळा दिसत नव्हता. कदाचित ती छोटी टपरी शनिवार रविवार येणाऱ्या ट्रेकर्सना लिंबू पाणी किंवा ताक विकणारी असेल. आज मात्र मी सुनसान होती. चार-सव्वाचार झाले असतील. ऊन उतरतीला लागलेलं कळत होतं. पण अजून तो चांगला हातभार वर होता. सूर्यास्त व्ह्यायला अजून भरपूर वेळ होता. पण तितक्या वेळात मी खांडस पर्यंत पोहोचू शकलो नसतो. मग पुन्हा मी मुक्कामाचा विचार पक्का केला.

    आता मला पुढंच टेन्शन होतं. माझ्याशिवाय आई बाबांना चैन पडत नाही. त्यांचा फोन येईल तेव्हा काय करायचं? काय सांगायचं? कोणाला फोन करायला रेंज सुद्धा मिळेना. मग मी माझी बॅग त्या टपरीच्या एका खांबाला टेकवून उभी केली. बॅगेतून एक काडकी आणि गजर घेऊन रेंज शोधायला बाहेर पडलो. अर्धा पाउण तास पायपीट केल्यावर थोडीशी रेंज मिळाली. मी विष्णूला फोन करून सांगितलं, ‘कि आई ला फोन करून सांग मुकुलच्या मोबाईलची बॅटरी संपली आहे, तो बसलाय अभ्यास करत. आणि बहुतेक तो आज रूम वरच थांबले’ आणि बाकीचं तू मॅनेज कर. उद्यापर्यंत मला फोन येता कामा नये.’ खरंच खूप चांगला मित्र आहे माझा. आई बाबांचा खरच फोन आला नाही मला. पण तेव्हढा विष्णूला फोन करून मी बॅग ठेवली होती तिथे येऊन बसलो. मग लक्षात आलं कि रात्री आपल्याला थांबायचं तर शेकोटी केली पाहिजे. आणि तर त्या अंधारात जीव नको होईल. पुन्हा मी उठलो. उन्हालाच असल्यामुळे कोरड्या लाकडांचा तुटवडा नव्हता. कोरडं गवतही तितकंच. अस सगळं साग्रसंगीत घेऊन आलो. चागला तासभर मी वाळकी लाकडं नि गवत तोडत होतो. रात्रभराची सोय करायची होती. यासगळ्यात भरपूर वेळ गेला. सूर्य बुडून गेला आणि माझ्या लक्षातही नाही. आणि खरं म्हणजे मी जिथे होतो तिथे झाडीच इतकी होती कि सूर्यास्त दिसलाही नसता. आता संधिप्रकाश पसरला होता. भूतांची दुसरी लाडकी वेळ. पहिली मध्यरात्री आणि दुसरी संध्याकाळी. मी घाबरायला सुरवात झाली. पण धीर धरून होतो मी. भीत होतो पण धीर सोडला नव्हता. कुठेतरी गुंतवून घ्यायचं म्हणून मी पुन्हा मोबाईल काढला हेडफोन कानात टाकले आणि गुलाम आली लावला. त्याच्या चांगल्या पंधरा-वीस मोठया गझल माझ्याकडे होत्या. मी त्या ऐकल्या. मग पोटात गुडगुड करायला लागलं.. मी संत्री काढली, सोलून एक एक फोड गुलाम आली च्या एका एका शेर बरोबर तोंडात टाकत होतो. गझल संपल्या. संत्री सुद्धा संपली. पोटातली गुडगुडही थांबली.

    मला झोप कधीच त्रास देत नाही. माझ्या आयुष्यात तिच्याइतकी कार्यक्षम कोणीच नाही. डोळे मिटले कि मला झोप लागते. पण आज जास्तीत जास्त जगायचा माझा विचार होता. साडे आठलाच मध्यरात्री सारखा अंधार पडला होता. कुठून तरी मला कोल्हेकुई सुद्धा ऐकू आली. प्रचंड घाबरून मी जागेवरून उठलो. जमवलेली लाकडं एकत्र केली. गावात घेतलं आणि आणि जाळ तयार केला. शेकोटी करण्याआधी ती जागा स्वच्छ करून घेतली. थोडा खड्डा खणून त्यात एक जाड लाकडाचा बुंधा उभा केला. बाजूनी थोडी कमी जाड रचली सगळ्याच्या मध्ये गावात भरलं. आणि माझ्या हातानी निर्माण केलेलं ते शिल्प पेटवून दिलं. मधलं गावात भुरभूर पेटून गेल, पण माझी मेहनत वाया गेली नाही. जसं अपेक्षित होतं तसचं ते पेटलं. त्याच्या उजेडात माझी झोपयची जागा थोडीची साफ करून घेतली. साफ म्हणजे काय, दगडं थोडी बाजूला करायची इतकंच. बरोबर आणलेलं घोंगडं खाली अंथरलं आणि त्याच्यावर जाऊन बसलो. मी किती घाबरलो होतो हे मला सांगायची गरज वाटत नाही. ते कोणालाही कळू शकतं. बेक्कार घाबरलो होतो. ते इसापनीतीतल्या गोष्टीत बघा सश्याच्या पाठीवर झाडाचं पान पडत, आणि तो पळत सुटतो तसं प्रत्येक छोट्या मोठ्या आवाजाला माझं होत होतं. पूर्वी ऐकलेल्या सगळ्या गोष्टीतली भूतं समोर नाचायला लागली. पूर्वी एकदा ‘कोकणातले देव’ नावाचं पुस्तक मी वाचलेलं, त्यात भूतांचे प्रकार, त्यांना ओळखायचं कसं, ते सापडण्याची ठिकाणं, त्यांचे अॅक्टिव्ह होण्याचे काळ अशी सगळी रंजक माहिती त्यात होती. एरवी स्मरणशक्ती इतकी साथीला येणार नाही. पण एकटा असलो कि ती तत्परतेने येते. त्या ‘कोकणातले देव’ मधली एकेक भूतं मला समोर दिसायला लागली. शेवटी मी आडवा झालो. कुशीवर झोपलो आणि डोळ्यासमोर पेटवलेली शेकोटी येईल असा झोपलो. झोप येत नव्हतीच. झोपण्याचा प्रयत्न केला पण ती काही साथ देईना. शेवटचा निर्वाणीचा प्रयत्न केला तो ही फेल. मग पुन्हा उठून बसलो. हॅरी पॉटर ज्याप्रमाणे वॉल्डमॉर्ट समोर आल्यावर आनंदाचे प्रसंग आठवतो त्याच प्रयत्नात मी पण लागलो. कानात हेडफोन होतेच. आता कुमार गंधर्वांचा ‘श्री’ सुरु होता. मी ऐकलेल्या रागांपैकी सर्वात गंभीर राग. म्हणजे तो सुरु झाला कि वातावरण गंभीर होऊन जातं. पण मी तो बदलला नाही. डोळ्यासमोर शांत पेटलेली शेकोटी. पण डोळ्यात आनंदाचे प्रसंग आणि कानात श्री! आजूबाजूला नाचत असलेले ‘कोकणातले देव’ सुद्धा माझ्या कानाला कान लावून ‘श्री’ ऐकण्याच्या धडपडीत आहेत असा मला भास झाला. माझी भीती सुद्धा गेली. धीर करून मी अंगावर घेतलेलं पांघरूण बाजूला केलं. आणि उठून उभा राहिलो. हेडफोन कानात होतेच. मग मी शेकोटीच्या आसपासच चालत राहिलो. गोल फिरत राहिलो. शेकोटी दृष्टीआड जाऊ दिली नाही. लघु आणि दीर्घ शंका व्यक्त करून आलो. भीती आता गेली होती. कानात श्री सुरु असल्यामुळे भीतीदायक असे कोणतेही आवाज आता येत नव्हते. पेटलेल्या लाकडाचा उजेड जिथे पर्यंत आहे त्याच्या पलीकडचं काही दिसतं नव्हतं. त्यामुळे भीती कमी झालेली.

    रात्रभर मला नीट झोप अशी लागलीच नाही. भीतीने असेल किंवा शेकोटी विजेल या भीतीने असेल पण मी तासातासाने जागा होत होतो, शेकोटी व्यवस्थित करून पुन्हा येऊन झोपत होतो. असा किती वेळा उठलो माझ्या लक्षात नाही. टक्क जाग आली तेव्हा झुंजूमुंजू झालं होतं. शेकोटी विजून गेलेली. फक्त निखारे थोडे शिल्लक होते. रात्री थंडी भरपूर पडली होती. माझे हात आखडले होते थंडीनी. मग मी पुन्हा थोडं गावात आणून शेकोटी पुन्हा पेटवली. थोडं शेकलं अंग! तोंड धुतलं, चूळ भरली. पुन्हा दोन गाजरं आणि अंजीरं खाल्ली. हे सगळे सोपोस्कर होईपर्यंत सूर्य उगवलाच. मी फार वेळ न घेता आवरलं, शेकोटी पाणी मारून पूर्ण विजावली. पुढे चालायला सुरवात केली. आता कसलंच टेन्शन नव्हतं. आता रस्ता चुकण्याची भीती नव्हती. ‘कोकणातल्या देवांची भीती नव्हती. जंगलातल्या प्राण्यांची भीती नव्हती. मला खांडसला पोहोचायला नाऊ वाजले. लगेचच कर्जतला जाणारी वडापसुद्धा मिळाली. कर्जत स्टेशन वर पोहोचतोच तोपर्यंत मुंबई कडून कोणती तरी एक्सप्रेस आलीच. गाडी लगेच सुटेल या भीतीनी मी तसाच तिकीट न काढताच चढलो. मला बसायला सुद्धा जागा मिळाली, आणि पुण्यात शिवाजी नगरला स्टेशन वर एकही तिकीट चेकर नव्हता!!

    (घरी कोणालाही माहिती नव्हतं म्हणून मी असा असा फिरून आलोय याचे सर्व पुरावे मी नष्ट केले विष्णू सोडून. म्हणून केवळ ब्लॉग आकर्षक व्हावा यासाठी फोटो वापरतो आहे. मी काढलेला एकही फोटो ठेवला नाही सर्व डिलीट करून टाकले. काही फोटो गुगल वरून घेतलेले आहेत, तर काही मी दुसऱ्या ठिकाणी काढलेले फोटो आहेत..)