महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
जिल्ह्यात सातारा, कर्हाड, वाई, मायणी व कोरेगाव या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. सातारा तालुक्यातील जरंडेश्र्वर येथील भारत फोर्जचा लोखंडी सामग्रीचा कारखाना आहे. सातार्यातील बजाज समूहाचा स्कूटर निर्मितीचा कारखाना आहे.
निकाराग्वा हा मध्य अमेरिकेतील सर्वात मोठा व पश्चिम गोलार्धातील दुसर्या क्रमांकाचा सर्वात गरीब देश आहे. निकाराग्वाच्या उत्तरेला होन्डुरास व दक्षिणेला कोस्टा रिका हे देश, पूर्वेला कॅरिबियन समुद्र व पश्चिमेला प्रशांत महासागर आहे. मानाग्वा ही निकाराग्वाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातून दिल्ली – चेन्नई हा लोहमार्ग गेला आहे.
भारतातील आरोग्य सेवा क्षेत्राचा झपाट्याने विस्तार होत आहे. देशातील या क्षेत्राचा वाढीचा दर सध्या १५ टक्के आहे. या वृद्धीत खाजगी क्षेत्राचा वाटा ९० टक्क्याहून अधिक राहील. सरकारी क्षेत्राचा हिस्सा हा सातत्याने कमी राहीला आहे.
कापूस हे या जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असल्यामुळे कापसावर आधारीत उद्योग इथे मोठ्या प्रमाणात आहेत. या जिल्ह्यात हातमागावर कापड विणण्याचा व्यवसाय फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे.
पालीन हे अरुणाचल प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर आणि एक लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे. कुरुंगकुमे या जिल्ह्यात हे शहर येते. समुद्रसपाटीपासून १०८० मीटर उंचीवर वसलेल्या या शहराची लोकसंख्या ५८१६ इतकी आहे.
महाराष्ट्रात कालव्यांचा विकास जवळजवळ १५० वर्षांपूर्वी सुरु झाला. सन १८७० मध्ये “कृष्णा” हा नावाचा पहिला कालवा बांधल्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात राज्यात अनेक कालवे बांधले गेले आणि नंतर सिंचन क्षेत्राच्या विकासाला गती मिळाली.
ब्रिटीशकालीन खोडशी धरणातून सांगली जिल्हय़ात पाणी नेण्यासाठी कृष्णा कालव्याची निर्मिती करण्यात आली. सैदापूरच्या रेणुका मंदिराजवळ कृष्णा कालवा सुरू होतो.
खोडशी (ता. कराड) येथून निघालेला कृष्णा कालवा ८६ कि.मी. लांबीचा असून, तो सातारा, सांगली जिल्ह्यातून जातो. या दोन्ही जिल्ह्यातील कराड, वाळवा, पलूस, तासगाव या तालुक्यातील ४५ गावांतील सुमारे ९४०० हेक्टर क्षेत्र या कालव्याच्या लाभ क्षेत्रात येते.
सध्या या कालव्याला अतिक्रमणांनी विळखा घातलेला दिसतो. जवळपास २००० हेक्टरहून जास्त क्षेत्रामध्ये अतिक्रमणे आहेत.
बार्शी हे सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. या शहराला ‘मराठवाड्याचे प्रवेशद्वार’ असेही म्हणतात. बार्शीची तूरडाळ संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. देशात विष्णूची दोन मंदिरे प्रसिद्ध आहेत.
औरंगाबाद हे अनेक वर्षांपासून नाट्य क्षेत्रातील महत्त्वाचे स्थान मानलं जातं. तसंच टोमॅटोची भाजी, शेवेचा रस्सा हे पारंपारिक खाद्यपदार्थ प्रसिध्द आहेत.
औरंगाबाद जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. अनेकवेळा या जिल्ह्याला संभाजीनगर असेही संबोधले गेले आहे.जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०१०० चौ.कि.मी असून लोकसंख्या २८,९७,०१३ (२००१ च्या जनगणनेनुसार) इतकी आहे. या जिल्ह्यात प्रामुख्याने कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, ज्वारी, गहू ही पिके घेतली जातात.
Copyright © 2025 | Marathisrushti