महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
नंदेश्वर हे सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. जत ते मंगळवेढा हा १७१ क्रमांकाचा राज्यमहामार्ग या शहरातून जातो.
ऐतिहासिक काळात मालीच्या साम्राज्याचा भाग असणारा गिनी-बिसाउ १९व्या शतकापासून पोर्तुगीजांची एक वसाहत होता. १९७४ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्या देशाचे नाव गिनी ठेवण्यात आले व शेजारील गिनी देशापासून वेगळेपण राखण्यासाठी ह्या देशाच्या नावामध्ये बिसाउ हे राजधानीचे नाव जोडण्यात आले. स्वातंत्र्यानंतर गिनी-बिसाउचे राजकीय अस्तित्व अस्थिर राहिले आहे. लोकशाहीवादी सरकारे येथे सर्रास उलथवून टाकण्यात आली आहेत व लष्करी राजवट अनेकदा स्थापित केली गेली आहे. १२ एप्रिल २०१२ रोजी येथील लष्करी अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा सत्ता हातात घेतली व विद्यमान राष्ट्राध्यक्ष व उमेदवारांना कैद केले.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरातील शिवाजी मंदिर हे प्रसिद्ध नाट्यगृह आहे. या नाट्यगृहाची व्यवस्था श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीकडे आहे.
आशिया खंडातील हिमालय, उत्तर अमेरिकेतील रॉकी, युरोप खंडातील आल्प्स हे पर्वत वली पर्वत म्हणून ओळखले जातात.
कर्नाल हे हरियाणा राज्यातील अतिशय पुरातन शहर आहे.
महाभारत काळात या शहराचे नाव कर्नालय असे होते. हे शहर कौरवांनी स्थापन केले आहे.
उच्च प्रतिच्या तांदळाच्या निर्मितीसाठी हे शहर आता प्रसिध्द आहे. डेअरी संशोधन संस्था येथे असून, येथे मोठे चराई क्षेत्र आहे.
उड्डपी हे दक्षिण -पश्चिम कर्नाटकातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे, इथले कृष्ण मंदिर प्रसिध्द असून वैष्णव संत माधवाचार्य यांनी ते स्थापन केले आहे वादळात अडकलेल्या एका व्यापारी जहाजाला सुखरुप किनार्यावर येण्यासाठी माधवाचार्याँ मदत केली होती यामुळे खुश झालेल्या व्यापार्यांनी हे मंदिर बांधण्यास मोठी मदत केली.
उड्डपी शहरात तुलू ही स्थानिक भाषा येथे मोठ्या प्रमाणात बोलली जाते. त्याचबरोबर कोकणी व कन्नड या भाषाही येथे बोलल्या जातात या शहरातील लोकांचे दरडोई उत्पन्न संपूर्ण कर्नाटकात सर्वाधिक आहे.
सिंडिकेट बँक व कॉपोरिशन बँक या बँकांची स्थापना याच शहरात झाली आहे.
महाराष्ट्रात लहान-मोठी ५० हून अधिक बंदरे आहेत. मुंबई हे आंतरराष्ट्रीय बंदर आहे. भारताचे प्रवेशव्दार म्हणूनच मुंबई प्रसिध्द आहे.
सुशिक्षितांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या डोंबिवलीत अनेक समृद्ध ग्रंथालये आणि वाचनालये आहेत. डोंबिवलीकरांची वाचनाची आवड जोपासण्यात त्यांचा मोठा हातभार आहे. विविध विषयांवरील असंख्य पुस्तके या वाचनालयांत संदर्भासाठी तसेच घरी नेण्यासाठी उपलब्ध आहेत. अनेक वाचनालये संगणकीकृत असून ऑनलाईन सुद्धा पुस्तक नोंदवता येते.
पळणी हे तमिळनाडू राज्यातल्या दिंडीगूल जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर मदुराईपासून १०० किलोमीटरवर तर दिंडीगूलपासून ६० किलोमीटरवर वसलेले आहे.
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात कागद उद्योग आहे. येथील कागद गिरणी उत्तम प्रतीच्या कागदाच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti