महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
बहारीनवर १६व्या शतकापर्यंत अरबांचे राज्य होते. १५२१ ते १६०२ या काळात बहारीन पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. १७८३ पासून खलिफा घराण्याने बहारीन राज्य केले. मात्र, त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी इंग्रजांनी घेतली होती.
ठाणे जिल्ह्यात डोंगराळ प्रदेश, खाड्यांचा प्रदेश व वाढते नागरीकरण यांमुळे शेतजमिनीचे (कृषी क्षेत्राचे) प्रमाण कमी आहे. भात हे येथील प्रमुख पीक आहे. एकूण लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी ५०% हून अधिक क्षेत्र भाताच्या लागवडीखाली आहे. पालघर, भिवंडी, मुरबाड इ. तालुक्यांत भाताचे अधिक उत्पादन घेतले जाते. जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात नाचणी व वरीचेही पीक घेतले जाते. वसई तालुक्यात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
अँगोला हा मध्य अफ्रिकेतील एक देश आहे. येथे १६व्या शतकापासुन इ.स. १९७५ पर्यंत पोर्तुगालची वसाहत व आधिपत्य होते.
झिंबाब्वे हा दक्षिण आफ्रिकेतील एक देश आहे. झिंबाब्वेच्या उत्तरेला झाम्बिया, पूर्वेला मोझांबिक, दक्षिणेला दक्षिण आफ्रिका व पश्चिमेला बोत्स्वाना हे देश आहेत.
बेलारूसचे प्रजासत्ताक (बेलारूशियन: Рэспубліка Беларусь; रशियन: Республика Беларусь) हा पूर्व युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे. बेलारूसच्या पूर्वेला रशिया, दक्षिणेला युक्रेन, पश्चिमेला पोलंड, उत्तरेला लात्व्हिया तर वायव्येला लिथुएनिया हे देश आहेत. मिन्स्क ही बेलारूसची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
अमेरिकेच्या केप पर्पेट्युआ प्रदेशातील थोर्स वेल या सरोवरात तिन्ही बाजूंनी पाणी पडते. प्रशांत महासागराशेजारीच असलेल्या या गोड्या पाण्याच्या सरोवराचे छायाचित्रकारांना आकर्षण आहे.
महाराष्ट्रातील रत्नागिरी शहरातील प्राचीन मंदिर आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या सूचनेवरुन येथील प्रसिध्द व्यापारी भागोजी सेठ यांनी या मंदिराचे बांधकाम सन १९३१ मध्ये केले.
मंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य रस्त्याला लागूनच उजवीकडे आहे. दक्षिणायन आणि उत्तरायण यांच्या मध्य काळात सूर्याची किरणे मूर्तीवर पडतील अशी मंदिराची वैशिष्ठपूर्ण बांधणी केली आहे.
मुंबई, नागपूर, मनमाड, अकोला, पुणे, आणि सोलापूर ही प्रमुख रेल्वे जंक्शन्स आहेत. नागपूर हे भारताच्या मध्यभागी असल्याने पूर्व-पश्चिम तसेच उत्तर-दक्षिण या चारही दिशाना जाणार्या गाड्या तेथून जातात.
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कोयना अभयारण्य आहे. कोयना जलाशयाच्या कडेकडेने कोयना अभयारण्य पसरले आहे.
४२६ किलोमीटर एकूण क्षेत्रफळ असलेल्या या अभयारण्याला सन १९८५ मध्ये अभयारण्याचा दर्जा प्राप्त झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक घनदाट जंगलात कोयना अभयारण्याचा समावेश आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti