महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
निजामशाहीच्या काळात हैद्राबाद संस्थानमध्ये समाविष्ट असणारे अकोला हे शहर ब्रिटिश काळात -१९ व्या शतकात – बेरार प्रांतात आले. अकोला जिल्ह्यातील आकोट येथे ब्रिटिशांची नागपूरकर भोसल्यांशी लढाई झाली होती.
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात इंद्रायणी नदीच्या काठावर देहू हे पुरातन तीर्थक्षेत्र आहे. संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ म्हणून देहू प्रसिध्द आहे. देहूपासून ५ किलोमीटर अतरावर असलेल्या भंडारा डोंगर येथे संत तुकाराम महाराज चिंतन करीत असल्याची नोंद आहे.
उस्मानाबाद हे मराठवाड्यातील एक मह्त्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. हैदराबादचा शेवटचा निझाम उस्मान अली खान यांच्या नावावरुन या शहराचे नामकरण करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्रातील परभणी हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठाची शहर म्हणूनही हे प्रसिध्द आहे. १८ मे १९७२ रोजी या विद्यापीठाची स्थापना झाली आहे.
मुंबईपासून सर्वात जवळ असलेले आणि सहजपणे जाता येणारे थंड हवेचे ठिकाण म्हणजे माथेरान. सह्याद्रीच्या डोंगररांगात असलेले हे छोटेखानी गाव इंग्रजांच्या काळातील बंगल्यांनी नटलेले आहे.
चित्तूर हे आंध्र प्रदेशच्या दक्षिण भागातील एक महत्त्वाचे शहर असून, राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ आणि १८ यांच्या जंक्शन पॉइंटवर ते वसलेले आहे.
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील धारुर हे तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी इतिहासप्रसिद्ध फतेहाबाद नावाचा डोंगरी किल्ला आहे.
गिनी हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. इ.स. १८९४ ते १९५८ दरम्यान गिनी ही एक फ्रेंच वसाहत होती व फ्रेंच गिनी ह्या नावाने ओळखली जात असे. गिनीच्या पश्चिमेस अटलांटिक महासागर तर इतर दिशांना गिनी-बिसाउ, सेनेगाल, माली, सियेरा लिओन, लायबेरिया व आयव्हरी कोस्ट हे देश आहेत. कोनाक्री ही गिनीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. आफ्रिकेतील गिनी हा शब्द वापरणाऱ्या गिनी-बिसाउ व इक्वेटोरियल गिनी ह्या देशांपासून वेगळा ओळखला जाण्यासाठी गिनीला अनेकदा गिनी-कोनाक्री असे संबोधले जाते.
बेल्लारी या शहराच्या नावाबाबत एक दंतकथा पुढीलप्रमाणे सांगितली जाते. प्राचीनकाळी या परिसरात राहणार्या बल्ला नावाच्या एका राक्षसाचा देवांचा राजा इंद्राने वध केला. संस्कृत भाषेत अरीचा अर्थ शत्रू असा होतो. बल्लाचा शत्रू म्हणजेच बल्ला अरी याचा अपभ्रंष होत सध्याचे बेल्लारी हे नाव पडले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामधे असलेला निवतीचा हा किल्ला पर्यटकापासून बराच दूर आहे. निवती किल्ल्यावरुन मालवण ते वेंगुर्ले असा किनारा दृष्टीपथात येत असल्यामुळे खूप दूर अंतरापर्यंत टेहाळणी करण्यासाठी निवती किल्ला महत्त्वाचा होता.
Copyright © 2025 | Marathisrushti