महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
रायचूर हे कर्नाटकातील जिल्हा मुख्यालय असलेले महत्त्वाचे शहर आहे. हे शहर कृष्णा आणि तुंगभद्रा या नद्दांच्या मध्ये वसलेले आहे. बंगलोरपासून ४०९ किलोमीटरवर ते वसलेले असून पूर्वी ते निझामाच्या अधिपत्याखाली होते.
कोलंबिया हा दक्षिण अमेरिका खंडाच्या वायव्य भागातील एक देश आहे. कोलंबियाच्या पूर्वेला ब्राझिल व व्हेनेझुएला, दक्षिणेला इक्वेडोर व पेरू हे देश, उत्तरेला कॅरिबियन समुद्र व पश्चिमेला प्रशांत महासागर आहे. इतर बहुसंख्य दक्षिण अमेरिकेतील देशांप्रमाणे कोलंबियाची राष्ट्रभाषा स्पॅनिश आहे. बोगोता ही कोलंबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात रेगूर या भागात अतिशय सुपीक माती आढळते. लाव्हाच्या संचयनातून तयार झाल्याने तिला लाव्हा रसाची काळी मृदा असेही म्हटले जाते. उस्मानाबादमध्ये जिरायत पिकाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.
विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मुक्तागिरी येथे १६ व्या शतकातील ५२ जैन मंदिरे आहेत. याला लहान सम्मेद शिखर असेही म्हणतात.::
कर्नाटक राज्यातील गदग आणि बेटागेरी या दोन शहरांची मिळून एकच महापालिका बनविण्यात आली आहे. याच शहरात गदग जिल्ह्याचे मुख्यालयही आहे.
गुती-वास्को महामार्गावर असणारे हे दुहेरी शहर हुबळीपासून ६० किलोमीटर अंतरावर आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वेचे गदग हे महत्वाचे जंक्शन असून हुबळी-होस्पेटगुंटुकल लाईनवर ते आहे.
मंदिरांचे शहर
गदग-बेटागेरी या शहरांत अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. येथील त्रिकुटेश्वर महामंदिरात शिव,ब्रम्हा आणि सूर्य यांची स्वतंत्र मंदिरे असून, चालुक्यकालीन शिल्पकलेचे सैादर्य येथे पाहायला मिळते. येथील प्राणिसंग्रहालयही खूपच प्रसिध्द असून ते पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात.
संयुक्त राष्ट्रांच्या विकासात्मक संस्थेपैकी एक संस्था असलेल्या युनिसेफ या संस्थेची स्थापना ११ डिसेंबर १९४६ ला झाली.
दुर्गोत्सवासाठी विदर्भात प्रसिध्द असलेल्या माहुरच्या रेणुका देवीच्या मंदिरात हजारे भाविकांची दररोज गर्दी उसळत आहे. माहूर येथे रेणुका देवीचे ३०० वर्षांपेक्षा जास्त जुने हेमाडपंथी मंदिर आहे, तसेच माहूर गडावर महानुभावपंथी दत्त मंदिर, परशुराम मंदिर व महासती अनुसया मंदिर असल्याने भाविकांची इथे सतत गर्दी असते.
महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. जवाहर नगर येथे युध्द साहित्य निर्मितीची ऑर्डिनन्स फॅक्टरी १९६४ पासून आहे. नागपूर पासून केवळ २८ किलोमीटर अंतरावर आहे.
डॉ. प्रकाश आमटे व त्यांच्या पत्नी सौ मंदा आमटे – आदरणीय बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून उभा राहिलेला लोकबिरादरी प्रकल्प. डॉ. प्रकाश आमटे व त्यांच्या पत्नी सौ मंदा आमटे हे हा प्रकल्प हेमलकसामधील नागेपल्ली, भामरागड येथे गेली ३५ वर्षे चालवत आहेत.
पंजाब राज्यातील अमृतसर शहरात जालियानवाला बाग आहे.
इंग्रजांच्या रौलेक्ट अॅक्टचा विरोध करण्यासाठी जमलेल्या लोकांवर १३ एप्रिल १९१९ रोजी अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. इंग्रज अधिकारी जनरल डायरच्या आदेशावरुन अचानक झालेल्या गोळीबारात एक हजारपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले. येथील विहिरीत १२० शव आढळले होते.
Copyright © 2025 | Marathisrushti