महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
सिंधुदुर्गाचे महत्त्वाचे भौगोलिक स्थान ओळखून शिवरायांनी याच्या संरक्षणासाठी मालवणच्या सागरतीरावर तीन दुर्गांची निर्मिती केली. ते म्हणजे पद्मगड, राजकोट, आणि सर्जेकोट हे होय. सिंधुदुर्ग आणि पद्मगड समोरासमोर आहेत. किनार्यावरुन सिंधुदुर्गाकडे पाहील्यास डावीकडे पद्मगड तर उजव्या किनार्याच्या भूशीरावर राजकोट आहे. सर्जेकोट ४ कि.मी. अंतरावर आहे.
जामनेर हे जलगाव जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असलेले शहर आहे. हे शहर कापूस, केळी आणि संत्री यांकरिता प्रसिध्द असून, जळगावपासून अवघ्या ३७ किलोमीटरवर आहे.
औरंगाबाद बुरहानपूर महामार्गावरील या शहरापासून जगप्रसिध्द अजंठा लेणी २९ किलोमीटरवर आहेत. तसेच वेरुळ लेणी १३० किलोमीटरवर आहेत.
येथील रामवनही प्रसिध्द आहे.
वारुड हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. या शहराचा कारभार नगरपालिकेमार्फत चालतो. चुडामणी नदीच्या किनाऱ्यावर ते वसलेले असून या नदीला प्राचीन काळापासून पवित्र मानले जाते.
सध्या शेतकरी आत्महत्या, शेतकर्यांचा संप वगैरेमुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. महाराष्ट्र राज्यातील बहुतांश लोकांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे.
पुणे जिल्ह्याच्या उत्तर-पश्चिमेस ठाणे जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा, दक्षिण-पूर्वेस सोलापूर जिल्हा तर उत्तर-उत्तरपूर्वेस अहमदनगर जिल्हा आहे.
रेडी हे गांव सिंधूदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात असून तेथील गणपती हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव सुप्रसिद्ध गणपती आहे.
चीनमधील डाझू गुहा त्यातील सुंदर कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहेत.
अर्जेंटिनामधील तलांप्या नैसर्गिक उद्यान येथील खडकांत असणाऱ्या मानव व प्राणी यांच्या अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे.
चीनमधील यांगत्से नदीवरील थ्री गॉर्जेस हे धरण जगातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळखले जाते.
महाराष्ट्र व गुजरात राज्यांच्या सीमेजवळ वसलेले नंदुरबार हे खानदेशातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन करुन नंदुरबार हा वेगळा जिल्हा करण्यात आला.
Copyright © 2025 | Marathisrushti