महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
सिडनीतील ओपेरा हाऊसची रचना डच आर्कोटेक्ट जॉन उत्झॉन यांनी केली. २० ऑक्टोबर १९७३ रोजी त्याचे उद्घाटन झाले.
फ्रान्समधील अल्बी या शहराची उभारणी १०ते१३ व्या शतकादरम्यान झाली. बिशपांच्या वर्चस्वाखाली असलेल्या या शहरात मध्ययुगीन काळातील अनेक चर्च, इमारती पहायला मिळतात.
द ग्रेट ब्लू होल हे मध्य अमेरिकेतील सर्वात मोठे समुद्री विवर आहे.
जगातील पहिला भूकंप झाल्याची अधिकृत नोंद १४ एप्रिल १६१५ मध्ये झाली.
श्रीलंका हा अशी नोंद असलेला पहिला देश आहे. या भूकंपामध्ये जवळपास २००० जण मरण पावले.
सर्वाधिक वेळेचा म्हणजे ५०० ते ६०० सेकंदाचा भूकंप २६ डिसेंबर २००४ मध्ये सुमात्रा, अंदमान येथे झाला.
कायर हे गाव यवतमाळ जिल्ह्यातील वणीपासून २० किमीवर विदर्भ नदीच्या तीरावर वसले आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या नागपूर सर्कलतर्फे येथे सध्या सुरू असलेल्या उत्खननात सातवाहनकालीन संस्कृतीच्या खुणा सापडल्या असून, या बहुसांस्कृतिक ठिकाणी त्याही पूर्वीच्या संस्कृतीच्या खुणा सापडू शकतात असा पुरातत्व उत्खनन विभागाचा अंदाज आहे.

शीखधर्माचे आठवे गुरु हरिकिसन साहिब यांना समर्पित प्रमुख धार्मिक केंद्र आहे. हे शीख धर्मीयांचे श्रध्दास्थान आहे.
गुरु बंगला साहिब सुरुवातीला एक हवेली होती. यामध्ये इ.स. १६६४ मध्ये हरिकिसन साहिब दिल्ली यात्रेदरम्यान थांबले होते. या काळात येथे महामारी पसरल्यानंतर गुरु हरिकिसन यांनी येथेच गोरगरिबांची सेवा केली.
रेड क्रॉस ही आंतरराष्ट्रीय संघटना आहे. रेड क्रॉसची स्थापना १८६३ मध्ये करण्यात आली.
अमेरिकेतील व्हर्जेनिया प्रांतात जेम्स टॉम्स येथे जॉन रोल्फ याने पहिल्यांदा तंबाखूचे व्यवसायिक उत्पादन घेतले. दक्षिण अमेरिकेत इ.स. ३ ते ५ हजार वर्षापासून तंबाखू प्रचलित आहे. तंबाखूला ब्राऊन गोल्ड म्हटले जाते.
वाडी हे कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्हयातील एक महत्त्वाचे शहर आहे या शहरात मोठे रेल्वे जंक्शन असून मुंबई , बंगलोर ,चेन्नई ,हैदराबाद येथून येणार्या अनेक एक्स्प्रेस गाड्या या स्थानकातून पुढे जातात.
या शहरात एसीसी कंपनीचे देशातील दोन मोठे सिमेंट प्लँट असून त्यांची क्षमता अनुक्रमे २.११ व २.०९ लाख मे.टन आहे तसेच येथे अनेक चुनखडीच्या खाणीही आहेत.
वाडी हे शहर एक धार्मिक स्थळ म्हणून प्रसिध्द आहे येथून जवळच असलेले कोंचूर या गावातील पुरातन हनुमान मंदिर प्रेक्षणीय आहे. तसेच सुफी संत अस्थाना कादिरी हलकता शरीफ यांचा दर्गाही येथून जवळच आहे देशभरातील अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात.
सातारा शहराच्या नैऋत्येस अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्यात उभा असलेला सज्जनगड हा समर्थ रामदासस्वामींच्या वास्तव्याने पावन झाला आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti