महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
चंद्रपूर जिल्ह्याचे प्रमुख पीक ‘भात’ हे आहे. पूर्ण महाराष्ट्रात भाताच्या उत्पादनात चंद्रपूर जिल्ह्याचा चौथा क्रमांक लागतो. आहे. चिमूर या भागात अत्यल्प प्रमाणात गहू पिकवला जातो. त्याचप्रमाणे काही प्रमाणात ज्वारीचे उत्पादनही केले जाते.
जालना, अहमदनगर, उस्मानाबाद, परभणी हे बीडच्या भोवतालचे सर्व जिल्हे राज्य महामार्गाद्वारे बीडशी जोडले गेले आहेत. जिल्ह्यातील एकमेव लोहमार्ग (मीटरगेज) परभणी- परळी-वैजनाथ असून तो १९२९ मध्ये वाहतुकीस खुला करण्यात आला होता.
पत्तनम्तिट्टा हे शहर केरळमधील जिल्हा मुख्यालय असलेले शहर असून, त्याचा मध्य त्रावणकोर विभागात समावेश होतो.
फिलिपाईन्स हा आग्नेय आशियामधील एक देश आहे. प्रशांत महासागरातील ७,१०७ बेटांवर वसलेल्या फिलिपाईन्सचे लुझॉन, विसायस व मिंदानाओ ह्या तीन भौगोलिक प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे. मनिला ही फिलिपाईन्सची राजधानी व त्या देशातले सर्वांत मोठे शहर आहे.
सॅण्ड चक्रीवादळ अत्यंत विध्वंसक मानले जाते. कॅरेबियन बेटांना धडक देत सॅण्डी अमिरिकेतील किनारपट्टीच्या शहरांवर जाऊन धडले. न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी या दोन प्रमुख शहरांना या वादळाचा जोरदार तडाखा बसला.
कृषिप्रधान असलेल्या लातूर जिल्ह्यात ज्वारी हे प्रमुख पीक असून ऊसाखालचे क्षेत्रदेखील लक्षणीय आहे. कन्हार जिल्ह्यातील नद्यांच्या खोर्यांमध्ये अतिशय सुपीक माती आढळते. काही भागात हलकी,मध्यम स्वरुपाची तर काही भागात भरडी जमीन आढळते.औसा येथील द्राक्षे प्रसिद्ध आहेत.
व्हेनेझुएला देशातील कोरो हे शहर इच व स्पॅनिश वास्तुकलांच्या मिश्रणातून उभारण्यात आले आहे.
सातारा जिल्हा हा प्रामुख्याने कृषिप्रधान जिल्हा आहे. ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून हे दोन्ही हंगामात घेतले जाते. येथील खरीप हंगामातील जोंधळा ज्वारी व रब्बी हंगामातील शाळू ज्वारी प्रसिद्ध आहे.
येथे वारली ही प्रमुख आदिवासी जमात राहते. २००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे १५% लोक आदिवासी आहेत.वारल्यांची खेडी विखुरलेल्या झोपड्यांच्या गटागटांनी वसलेली असतात. या वस्तीच्या गटाला पाडा म्हणतात. दहा-बारा पाड्यांचे एक खेडे बनते. यांच्या झोपड्यांच्या भिंती कुडाच्या, शेणा-मातीने लिंपलेल्या असतात. यांचा उदरनिर्वाह मुख्यत्वे शेती, शेतमजुरी, पशुपालन, लाकूडतोड या व्यवसायांवर होतो.
पृथ्वीच्या गाभ्यातील तप्त शिलारस भूपृष्ठावर येऊन ज्वालामुखीचा उद्रेक होतो. ज्वालामुखीचे केंद्रिय ज्वालामुखी व भेगी ज्वालामुखी असे दोन प्रकार आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti