(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आइसलंड

    आइसलंड

    आइसलंड हा उत्तर युरोपातील उत्तर अटलांटिक महासागरात वसलेला एक द्वीप-देश आहे. याचे क्षेत्रफळ साधारणपणे १ लक्ष चौरस मैल क्षेत्रफळ आहे. रेयक्यविक ही आइसलंडची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. यापेक्षा लहान दुसरे गाव अकुरेरी (Akureiri) आहे. हे उत्तरेकडे आहे. येथे प्रमुख आकर्षण असे गरम पाण्याचे झरे हे रेकयाविकपासून २० मैलावर आहेत.

  • दिगंबर सिद्धीविनायक, कडाव

    दिगंबर सिद्धीविनायक, कडाव

    कर्जत तालुक्यातील कडाव गावामधील हे बाल दिगंबर गणेशाचे अतिप्राचीन मंदिर पाहण्यासाठी भक्त लांबून येत असतात. मुंबई-पुणे लोहमार्गावरील कर्जत रेल्वे स्टेशन पासून ८ किमी. अंतरावर कडाव गांव आहे. कर्जतहून कडावला जाण्यासाठी बसची व्यवस्था आहे.

     

  • इक्वेटोरीयल गिनी

    इक्वेटोरीयल गिनी

    इक्वेटोरीयल गिनीचे प्रजासत्ताक हा मध्य आफ्रिकेतील गिनीच्या आखाताच्या किनार्‍यावरील एक छोटा देश आहे. ह्या देशाचे दोन भाग आहेत: पहिला, कामेरूनच्या दक्षिणेला व गॅबनच्या वायव्येला असलेला खंडांतर्गत भाग, व दुसरा अटलांटिक महासागरातील अनेक लहान मोठी बेटे. इक्वेटोरियल गिनीची राजधानी व सर्वांत मोठे शहर मलाबो हे बियोको नावाच्या एका बेटावर वसले आहे. ह्या देशाच्या नावात जरी विषुववृत्त असले तरी देशाचा कोणताही भाग विषुववृत्तावर मोडत नाही.

  • मनमाडचे अंकाई-टंकाई किल्ले

    मनमाडचे अंकाई-टंकाई किल्ले

    नाशिक जिल्ह्यातील मनमाड हे तिसरे मोठे शहर असून मुंबई -दिल्ली रेल्वेमार्गावरचे मोठे जंक्शन आहे. भारतीय अन्न महामंडळ, इंडियन ऑईल कॉपेरिशन, भारत पेट्रोलियम व दक्षिण मध्य रेल्वेचे मोठे प्रकल्प या शहरात आहेत.

  • जैन धर्मीयांची काशी – कर्नाटकातील कोप्पळ

    जैन धर्मीयांची काशी – कर्नाटकातील कोप्पळ

    कोप्पळ हे कर्नाटक राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. पर्वतरांगाच्या मध्यभागी वसलेल्या या सुंदर शहराला मोठा इतिहास आहे. इतिहासात या शहराचे नाव कोपनानगर असे आहे. या परिसरात ७२ झैनबस्त्या असल्याने या शहराला जैन समाजाची काशी म्हणूनही देशभर ओळखले जाते.

    पर्यटकांचे आवडते शहर

    कोप्पळ हे कर्नाटकातील एक पर्यटकप्रिय शहर आहे. येथील किल्ला गवीमठ आणि मालेमलप्पा मंदिर प्रेक्षणीय आहे. येथून जवळच असलेल्या इटगी येथील चालुक्यकालीन पुरातन महादेव मंदिरही सुंदर आहे.

    क्रांतिकारक बाळकृष्ण हरी चाफेकर हे या परिसरात काही काळ भूमिगत होते.

  • चिंचवड गावातील मोरया गोसावी गणेश मंदिर

    चिंचवड गावातील मोरया गोसावी गणेश मंदिर

    पुणे शहराचे उपनगर असणार्‍या चिंचवड गावात पवना नदीकाठी असलेल्या मोरया गोसावी गणपतीची मोठी महती आहे. या गणपती मंदिराच्या बांधकामाला १६५० मध्ये प्रारंभ झाला व १७२० मध्ये हे काम पूर्ण झाले. यातील मंगलमूर्तीचे देवघर मात्र १६०५ मध्येच बांधण्यात आले असून अद्यापही ते व्यवस्थित आहे. पवना नदीला पूर आल्यावर संपूर्ण मंदिर पाण्याखाली जाते.

    मोरया गोसावी या गणेशाच्या भाविकाने मोरगावला मोरेश्वराची उपासना केली. त्यामुळे त्यांना देवत्व प्राप्त झाले. समाजाला त्यांची प्रचिती येत होती. मोरयांना त्यामुळे उपसर्ग होत होता. त्यांच्या सेवेत खंड पडत होता. त्या वेळी त्यांना श्रीगणेशाने दृष्टांत दिला की मी तुझ्यासाठी चिंचवड येथे प्रकट होत असून तेथे तू माझी सेवा कर. त्यानुसार मोरया गोसावी यांनी मोरगाव सोडले आणि चिंचवडजवळील ताथवडे गावानजीकच्या जंगलात पवना नदीच्या काठी बसून गणेश उपासनेस प्रारंभ केला. तेथे त्यांनी गणपतीचे मंदिर बांधले आणि तेथेच गणेश उपासना केली.

    मोरया गोसावींनी याच ठिकाणी १५६१ मध्ये पवना नदीकाठी संजीवन समाधी घेतली. या मंदिरातील मूर्ती उजव्या सोंडेची असून मनोकामना पूर्ण करणारी अशी या गणेशाची ख्याती आहे. या मंदिराचा उल्लेख शिवाजी महाराज आणि पेशव्यांच्या ऐतिहासिक दस्तावेजांमध्ये आढळतो.

  • रायगड जिल्ह्याची भौगोलिक माहिती

    रायगड जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ७१४८ कि.मी.² इतके आहे. तर या जिल्ह्याची लोकसंख्या २००१ च्या जनगणनेनुसार २२,०७,९२९ एवढी आहे. जिल्ह्याच्या पश्र्चिमेकडे अरबी समुद्र असून पूर्व दिशेला सह्याद्रीची पर्वतरांग आहे.

  • सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य

    सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य

    उत्तर प्रदेश हे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य आहे.

  • लेह येथील पांढर्‍या दगडाचे शांती स्तूप

    लेह येथील पांढर्‍या दगडाचे शांती स्तूप

    जम्मू आणि काश्मीर राज्यातील लेह शहरपासून ५ कि.मी. अंतरावर चंगस्पा येथे प्रसिध्द शांती स्तूप आहे. लडाख शांती स्तूप समितीने पांढर्‍या दगडापासून सन १९८५ मध्ये भिक्षु ग्योम्यो नाकामुटा यांच्या नेतृत्वात बांधण्यात आलेल्या या स्तुपाची निर्मिती केली.

  • अंबेजोगाई

    अंबेजोगाई

    अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज यांनी अंबेजोगाई विवेक सिंधु ही मराठी कविता लिहिली. निजामशाहीत म्हणजेच १९४८ पूर्वी या शहराला मोमानाबाद म्हणून ओळखले जायचे.