महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
कोकणातील अनेक गावांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. इतिहासात डोकावण्याची आवड असणार्या पर्यटकांनी गावांचा-पर्यटनस्थळांचा मागोवा घ्यायचा म्हटला तर सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण तालुक्यातील मालडी या सुंदर गावाला अवश्य भेट द्यायला हवी.
राज्यातील सात शहरांमध्ये १४२ नोंदणीकृत सहकारी औद्योगिक वसाहती असून, १०१ सध्या कार्यरत आहेत.
जालना हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. पूर्वी जालना हा औंरगाबाद जिल्ह्याचाच एक भाग होता. १ मे १९८२ रोजी जालना जिल्हा वेगळा करण्यात आला. हे शहर कुंडलिका नदीच्या किनार्यावर वसलेले असून, येथे दक्षिण मध्य रेल्वेचे स्थानक आहे. इथला मोती तलाव प्रसिध्द आहे.
नांदेड हे नाव श्रीशंकराच्या नंदी या वाहनाच्या नावावरुन उगम पावले असल्याचे सांगण्यात येते तर नऊ ऋषींचे निवासास्थान म्हणजेच ‘नवदंडी’ हे नांदेडचे पूर्वाश्रमीचे नाव होते असे म्हटले जाते.
एकेकाळी अत्यंत कठीण आणि अशक्य वाटत असलेले कोकणवासियांचे एक स्वप्न प्रत्यक्षात आले ते कोकण रेल्वेच्या उभारणी नंतर. भारतीय अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट आविष्कार म्हणजे कोकण रेल्वे.
विदर्भातील अकोला जिल्ह्याचे ग्राम दैवत श्री राजराजेश्वर आहे. श्रावण महिन्यातील चवथ्या सोमवारी कावड-पालखीने पुरातन राजराजेश्वराला जलाभिषेक करण्याची प्रथा आहे.
राज्यातील २५ शहरांत शहरांतर्गत वाहतूक सेवा आहे. यासाठी म.रा.प.म. दररोज सरासरी ५२० बसगाड्यांचा वापर करते.
महाराष्ट्रातील २५० ते ३०० सेंमी पर्जन्यमान असलेल्या जांभी मृदेच्या प्रदेशात सदाहरित वने आढळून येतात. भरपूर पाऊस असल्यामुळे ही वने सतत हिरवीगार असतात; परतु कमी प्रतीची जांभी मृदा आणि उताराचा प्रदेश असल्यामुळे वनस्पीच्या वाढीस पोषक नसतात.
पळणी हे तमिळनाडू राज्यातल्या दिंडीगूल जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर मदुराईपासून १०० किलोमीटरवर तर दिंडीगूलपासून ६० किलोमीटरवर वसलेले आहे.
जळगाव जिल्हा चहा, सोने, कडधान्ये, कापूस व केळी या पदार्थांसाठीचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. याचबरोबर या जिल्ह्यात जिनिंग व प्रेसिंग, साखर कारखाने, रेशीम कापड निर्मिती, वनस्पती तुप व तेल गिरण्या, अन्नप्रक्रिया उद्योग हे उद्योग मोठया प्रमाणावर चालतात.
Copyright © 2025 | Marathisrushti