महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
प्रकाशे – नंदूरबार जिल्ह्यातील प्रकाशे हे ठिकाण खानदेशाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. तापी व गोमाई या नद्यांचा संगम या तीर्थक्षेत्रावर झालेला असून केदारेश्र्वर, संगमेश्र्वर ही महादेव मंदिरे प्रसिद्ध आहेत.
धार्मिक आणि अध्यात्मिक अधिष्ठान लाभलेला नाशिक जिल्हा पर्यटनाच्या विविध अंगांनी नटलेला आहे. नैसर्गिक आणि जैविक वैविध्य जिल्ह्याच्या समृध्दतेचे एक अविभाज्य अंग आहे. रामकुंड परीसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेथे मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला ते काळाराम मंदिरदेखील पर्यटकांचे खास आकर्षण राहिले आहे.
लातूर जिल्ह्यात सुमारे ८७६३ कि.मी.लांबीचे रस्ते असून त्यापैकी राज्य मार्गाची लांबी ८४५ कि.मी.आहे. रस्त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे ८०% गावे जिल्हा मुख्यालयाशी जोडली गेली आहेत.
एकेकाळी पुणे शहराची ओळख विद्येचे माहेरघर अशी होती. ५ लाख विद्यार्थी शिक्षण घेत असलेले पुणे विद्यापीठ हे जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक आहे. या विद्यापीठाची स्थापना १० फेब्रुवारी १९४९ साली झाली. डॉ एम. आर. जयकर हे या विद्यापीठाचे पहिले कुलगुरु होते. नुकतेच या विद्यापीठाचे नामांतर करण्यात आले. आते ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या नावाने ओळखले जाते.
शुध्द सोन्यासाठी जळगावची बाजारपेठ महाराष्ट्रात प्रख्यात आहे.
जळगाव हे जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर असून कापूस, खाद्यतेले, केळी या कृषी मालाची मोठी बाजारपेठ येथे आहे.
येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जैन ठिबक सिंचन प्रकल्प देशभर प्रसिध्द आहेत. या शहरात मराठीसोबतच अहिराणी बोलीही बोलली जाते.
चेन्नई हे तामिळनाडू राज्याच्या राजधानीचे शहर असून, दक्षिणेतील मोठे औद्योगिक आणि आर्थिक घडामोडींचे केंद्र आहे. चेन्नई हे देशातील पाचवे मोठे शहर असून, तिसरे मोठे बंदर आहे.
हिमाचल प्रदेशाची ओळख म्हणजे स्वच्छ निसर्ग, शांत धवल पर्वत, बर्फाचे गालिचे, देवदारांच्या झाडांचा सुगंध आणि अध्यात्माची अनोखी अनुभूति. या प्रवास कथेत आपण धर्मशाळा, डलहौजी, अमृतसर, मनाली आणि शिमला या सर्व लोकप्रिय स्थानांना जोडणाऱ्या एका संस्मरणीय यात्रेचा अनुभव उलगडून पाहणार आहोत.
उड्डपी हे दक्षिण -पश्चिम कर्नाटकातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे, इथले कृष्ण मंदिर प्रसिध्द असून वैष्णव संत माधवाचार्य यांनी ते स्थापन केले आहे वादळात अडकलेल्या एका व्यापारी जहाजाला सुखरुप किनार्यावर येण्यासाठी माधवाचार्याँ मदत केली होती यामुळे खुश झालेल्या व्यापार्यांनी हे मंदिर बांधण्यास मोठी मदत केली.
उड्डपी शहरात तुलू ही स्थानिक भाषा येथे मोठ्या प्रमाणात बोलली जाते. त्याचबरोबर कोकणी व कन्नड या भाषाही येथे बोलल्या जातात या शहरातील लोकांचे दरडोई उत्पन्न संपूर्ण कर्नाटकात सर्वाधिक आहे.
सिंडिकेट बँक व कॉपोरिशन बँक या बँकांची स्थापना याच शहरात झाली आहे.
अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल व डाळ बनवणाऱ्या मिल आहेत.
हासन हे कर्नाटक राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले शहर असून त्याची स्थापना ११व्या शतकात चत्रकृष्णप्पा नाईक यांनी केली.
समुद्रसपाटीपासून या शहराची उंची ९३४ मीटर आहे. येथील हसनम्बा या देवीच्या नावावरुन या शहराचे नामकरण झालेले आहे. माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा हे याच शहरातील रहिवासी होते.
Copyright © 2025 | Marathisrushti