(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

  • मालडी : कोकणातील एक आखीव-रेखीव गाव

    कोकणातील अनेक गावांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. इतिहासात डोकावण्याची आवड असणार्‍या पर्यटकांनी गावांचा-पर्यटनस्थळांचा मागोवा घ्यायचा म्हटला तर सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण तालुक्यातील मालडी या सुंदर गावाला अवश्य भेट द्यायला हवी.

  • सहकारी औद्योगिक वसाहती

    राज्यातील सात शहरांमध्ये १४२ नोंदणीकृत सहकारी औद्योगिक वसाहती असून, १०१ सध्या कार्यरत आहेत.

  • कुंडलिकेच्या किनार्‍यावरील जालना

    जालना हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. पूर्वी जालना हा औंरगाबाद जिल्ह्याचाच एक भाग होता. १ मे १९८२ रोजी जालना जिल्हा वेगळा करण्यात आला. हे शहर कुंडलिका नदीच्या किनार्‍यावर वसलेले असून, येथे दक्षिण मध्य रेल्वेचे स्थानक आहे. इथला मोती तलाव प्रसिध्द आहे.

  • नांदेड जिल्हा

    नांदेड हे नाव श्रीशंकराच्या नंदी या वाहनाच्या नावावरुन उगम पावले असल्याचे सांगण्यात येते तर नऊ ऋषींचे निवासास्थान म्हणजेच ‘नवदंडी’ हे नांदेडचे पूर्वाश्रमीचे नाव होते असे म्हटले जाते.

  • भारतीय अभियांत्रिकीचा आविष्कार – कोकण रेल्वे

    एकेकाळी अत्यंत कठीण आणि अशक्य वाटत असलेले कोकणवासियांचे एक स्वप्न प्रत्यक्षात आले ते कोकण रेल्वेच्या उभारणी नंतर. भारतीय अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट आविष्कार म्हणजे कोकण रेल्वे.

  • अकोला जिल्ह्यातील ऐतिहासिक कावड सोहळा

    विदर्भातील अकोला जिल्ह्याचे ग्राम दैवत श्री राजराजेश्वर आहे. श्रावण महिन्यातील चवथ्या सोमवारी कावड-पालखीने पुरातन राजराजेश्वराला जलाभिषेक करण्याची प्रथा आहे.

  • शहरांतर्गत प्रवासी वाहतूक

    राज्यातील २५ शहरांत शहरांतर्गत वाहतूक सेवा आहे. यासाठी म.रा.प.म. दररोज सरासरी ५२० बसगाड्यांचा वापर करते.

  • सदाहरित वने

    महाराष्ट्रातील २५० ते ३०० सेंमी पर्जन्यमान असलेल्या जांभी मृदेच्या प्रदेशात सदाहरित वने आढळून येतात. भरपूर पाऊस असल्यामुळे ही वने सतत हिरवीगार असतात; परतु कमी प्रतीची जांभी मृदा आणि उताराचा प्रदेश असल्यामुळे वनस्पीच्या वाढीस पोषक नसतात.

  • पळणी

    पळणी हे तमिळनाडू राज्यातल्या दिंडीगूल जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर मदुराईपासून १०० किलोमीटरवर तर दिंडीगूलपासून ६० किलोमीटरवर वसलेले आहे.

  • जळगाव जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

    जळगाव जिल्हा चहा, सोने, कडधान्ये, कापूस व केळी या पदार्थांसाठीचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. याचबरोबर या जिल्ह्यात जिनिंग व प्रेसिंग, साखर कारखाने, रेशीम कापड निर्मिती, वनस्पती तुप व तेल गिरण्या, अन्नप्रक्रिया उद्योग हे उद्योग मोठया प्रमाणावर चालतात.