महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
कोप्पळ हे कर्नाटक राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. पर्वतरांगाच्या मध्यभागी वसलेल्या या सुंदर शहराला मोठा इतिहास आहे. इतिहासात या शहराचे नाव कोपनानगर असे आहे. या परिसरात ७२ झैनबस्त्या असल्याने या शहराला जैन समाजाची काशी म्हणूनही देशभर ओळखले जाते.
पर्यटकांचे आवडते शहर
कोप्पळ हे कर्नाटकातील एक पर्यटकप्रिय शहर आहे. येथील किल्ला गवीमठ आणि मालेमलप्पा मंदिर प्रेक्षणीय आहे. येथून जवळच असलेल्या इटगी येथील चालुक्यकालीन पुरातन महादेव मंदिरही सुंदर आहे.
क्रांतिकारक बाळकृष्ण हरी चाफेकर हे या परिसरात काही काळ भूमिगत होते.
नागपूर येथील ड्रॅगन पॅलेस हे विशाल प्रतिष्ठित मंदिर आहे. १० एकरच्या विस्तीर्ण परिसरात बांधण्यात आलेले हे मंदिर शांतीपूर्ण बौध्द प्रार्थना केंद्र आहे. ओगावा सोसायटी द्वारे हे मंदिर बांधण्यात आलेले आहे.
चिलीमधील सेवेल हे गाव बार्डन कॉपर कंपनीने खाणकामगारांसाठी वसविले आहे. जगातील सर्वात मोठ्या तांब्याच्या खाणीभोवती हे गाव आहे.
सेवेल हे कामगांरासाठीच्या वसाहतीचे आदर्श उदाहरण मानले जाते.
राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या गोंदिया शहराला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यांच्या सीमेला लागूनच गजबजलेले हे शहर आधी वेगळ्याच धाटणीचे होते. प्राचीन काळी गोंदिया परिसर गोंडराजाच्या अधिपत्याखाली होता तेव्हा येथे विस्तीर्ण जंगल होते.
नागपूर जिल्ह्यातील पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यानाला पेंच प्रकल्पाचा नावाने ओळखले जाते. नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर नागपूरपासून ६० किलोमीटर अंतरावर या अभयारण्याची सुरुवात होते. सातपुड्याचे पर्वत डोंगर या अभयारण्यात येतात. निसर्गरम्य राष्ट्रीय उद्यान म्हणून याची ओळख आहे.
महाराष्ट्रातील बीड हे अतिशय पुरातन शहर आहे. बिंदूसरा नदीच्या काठी वसलेल्या या शहरानजीक खजाना ही प्रसिध्द विहीर आहे. निजामशहाच्या सलाबत खान या सरदाराने या विहीरीचे बांधकाम केले आहे.
ग्रीसमधील मेटेओराची निर्मिती १४व्या शतकात करण्यात आली आहे. मेटेओरा हे त्याच्या वैशिष्टपूर्ण उभारणीसाठी प्रसिध्द आहे. ३७३ मीटर उंच सुळक्यावर त्याची उभारणी करण्यात आली आहे.
संत जनाबाईंचे वास्तव्य काही काळ गंगाखेड येथे होते.श्री. विनायकराव चारठाणकरांनी निजामाविरुध्द लढून हैद्राबाद मुक्तीसंग्रामासाठी अथक प्रयत्न केले होते.
जी ईश्वरनिर्मित असल्याने चिरंतन टिकून आहे, ती ज्ञानेश्वरी. मराठी भाषेतील सर्वांत मोठा प्राचीन असा ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नेवासे येथे लिहिला. शिर्डी येथील प्रसिध्द साईबाबा मंदिर याच जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात आहे.
महाराष्ट्र राज्याला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. ७२० कि.मी. लांबीच्या संपूर्ण पश्चिम समुद्रकिनारपट्टीवर लहान-मोठी सुमारे ५० बंदरे आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti