महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
माळशिरस हे सोलापूर जिल्ह्यातील एक छोटे शहर असून, येथे अजूनही ग्रामपंचायत आहे. माळशिरस तालुक्याचे मुख्यालय या शहरात असल्याने पंचायत समितीसह अनेक सरकारी कार्यालये येथे आहेत.
बुल्गेरियातील रिला मॉनस्ट्री (मठ) चा शोध १०व्या शतकात सेंट जॉन यांना लागला. आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या या मठाची १८३४ ला पुनर्बांधणी करण्यात आली.
राजमुंद्री हे आंध्र प्रदेशातल्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील एक मोठे शहर आहे. आद्य तेलगू कवी नन्नय्या यांचे हे जन्मठिकाण असून, आंध्र प्रदेशची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते.
आसाम राज्यातील जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत एक मोठे शहर आहे. ४.६९ वर्गकिलोमीटरवर विस्तारलेले हे शहर निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. या शहराची लोकसंख्या गेल्या दहा वर्षांत फक्त २.५ टक्क्यांनी वाढलेली आहे. पूर्वी हे शहर दरांग जिल्ह्यातील एक उपविभाग होते नंतर ओडलगुरी हा स्वतंत्र जिल्हा झाला.
महाराष्ट्र राज्यात मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुणे, ठाणे, रत्नागिरी व नागपूर या ४ ठिकाणी मनोरुग्णालये आहेत.
जम्मू आणि काश्मीर राज्यातील अनंतनाग येथील प्रसिध्द मंदिर आहे. सूर्याला समर्पित असलेले हे देशातील एकमेव सर्वांत सुंदर मंदिर आहे. कर्कोटक वंशाचे राजा ललितादित्य मुक्तापीड यांनी इ.स. ७२५-७५६ च्या मध्यात मंदिराची स्थापना केली.
जामोद’ हे बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातील एक छोटे शहर आहे. ‘जामोद’ शब्दाचा अर्थ आनंद, हर्षोल्हास असा होतो.
मलकापूर हे बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, त्याला ‘विदर्भाचे प्रवेशद्वार’ असेही म्हणतात. हे शहर विदर्भातील शैक्षणिक तसेच औद्योगिक क्षेत्राचे एक महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे शहराच्या पूर्व भागात असलेला आगाखान पॅलेस ही पुण्यातील एक महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू आहे. इ.स.१८९२ मध्ये सुरु झालेले या वास्तूचे बांधकाम १८९७ मध्ये पूर्ण झाले. सुलतान मोहमंद आगाखान यांनी आगाखान पॅलेस बांधले.
लक्ष्मीविलास महाल हा गुजरात राज्यातील बडोदा येथे आहे. महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या हुकमावरुन इ. स. १८९० साली ही वास्तू बांधण्यात आली. मेजर चार्ल्स मॉन्ट या इंजिनिअरच्या संकल्पनेतून ही मनमोहक वास्तु साकारली आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti